मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कर्दळी वनात जात आहात का ?

नितीनचंद्र · · भटकंती
कर्दळी वन ही जागा अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय जागृत अशी सांगीतली जाते, यु ट्युब वर तर प्रा क्षितीज पाटकुले एक करोड व्यक्तीतली एक व्यक्ती कर्दळीवनाची यात्रा करते असा प्रचार करतात. कारणही तितकच प्रभावी आहे. इथे स्वामी समर्थ प्रकटले. ही यात्रा आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या टुरिझम पॉलीसीत बसते का यावर कोणी काही बोलत नाही. ही जागा आंध्र सरकारच्या वनखात्यात येते. या प्रदेशात वन्य पशुंचा संचार आहे. जिथे जेवणाची व्यवस्था नाही. जिथे संपर्काचे साधन नाही. कोणला साप चावला तर औषध नाही. एखादा व्यक्ती यात्रेच्या अतिश्रमाने आजारी पडला तर औषध उपचार नाहीत अश्या ठिकाणी ट्रेकर्स मंडळी सोडुन काही सामान्य माणसे जातात आणि त्यांचे अतोनात हाल होतात. ज्याने एकही ट्रेक केलेला नाही अश्या कोणत्याही वयाच्या स्त्री/पुरुषाला कर्दळीवन सेवा संघ जाहीरात करुन भुरळ घालते. कधी कधी आंध्र प्रदेश सरकार परवानगी नाकारते. अश्या वेळी ह्या सहली अ‍ॅरेंज करणारे विना-परवाना लोकांना जंगलात घुसवतात. एकेका दिवशी २५ किलोमीटर्स पेक्षा जास्त जंगलातल्या पायदळीवर चालण्यास भाग पाडतात. वनखात्याचे पोलीस धमक्या देतात आणि स्वतःच्या जबाबदारीवर लोक ही यात्रा पुर्ण करतात. माझी ही श्रध्दा आहे की स्वामी कोणाचे काही बिघडु देणार नाहीत. पण स्वामींना त्रास कशाला. या ऐवजी ह्या म्हहत्वाच्या स्थळी जर स्त्री पुरुष यांना न्यायचे असेल तर अश्या सोयी सुविधा उपलब्ध होतील याकडे आयोजक आणि शासन लक्ष देईल का ?

वाचने 18486 वाचनखूण प्रतिक्रिया 54

विजय पुरोहित Fri, 02/05/2016 - 17:46
सहमत... पण सर्व सोयी सुविधा पुरवल्या तर त्या यात्रेतील थरार कमी होईल. आज अनेक प्रसिद्ध देवस्थानांचा जसा बाजार झालाय तसे इथेपण होईल.

In reply to by टवाळ कार्टा

विजय पुरोहित Fri, 02/05/2016 - 18:37
कदाचित थरार हा चुकीचा शब्द आला. पण मला काय म्हणायचंय ही यात्रा पण अगदी सामान्य लोकांना अॅक्सेसिबल ठेवली तर आज अनेक देवस्थानांची जशी वाट लागलीये तसे इथे पण नक्कीच होणार.

In reply to by विजय पुरोहित

सतिश गावडे Fri, 02/05/2016 - 22:48
लोक देवस्थानांना गेल्याने देवस्थानांची वाट कशी काय लागेल? तुम्ही बरोबर उलट म्हणत आहात. सामान्य लोकांना देवस्थाने अॅक्सेसिबल ठेवली तर अधिकाधिक रंजले गांजले, दु:खी कष्टी लोक तिकडे जातील. देवस्थानाच्या पावित्र्यामुळे, तेथील दैवी शक्तीच्या प्रभावामुळे त्यांची दु:खे दूर होतील. जर कुणाच्या मनात काही वाईट विचार असतील तर ते दूर होऊन त्यांचा मनात सद्विचार उत्पन्न होतील.

In reply to by सतिश गावडे

sagarpdy Sat, 02/06/2016 - 00:08
काही देव आधी भक्ताची कठोर परीक्षा घेतात, पास झाला तरच पावताय. त्यामुळे या यात्रा सोप्या करणे पेपर फोडल्यासारखे आहे.

In reply to by sagarpdy

सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 00:28
काही देव आधी भक्ताची कठोर परीक्षा घेतात, पास झाला तरच पावताय.
संत तुकारामांचा एक अभंग आहे: जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें तोचि साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्‍त ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी दया करणें जें पुत्रासी, तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ति अभंगाच्या मतितार्थावरून आपण ही त्यांच्या मनातील देवाची प्रतिमा होती असे म्हणायला हरकत नाही. यात देव भक्ताला जवळ करण्याआधी कठोर परीक्षा घेतो याचा उल्लेख नाही. म्हणजे ही प्रतिमा अपुर्ण आहे असे म्हणता येईल का? (तुमचा प्रतिसाद उपहासात्मक नाही असं समजून मी प्रतिसाद दिला आहे.)

In reply to by सतिश गावडे

sagarpdy Sat, 02/06/2016 - 00:49
प्रतिसाद उपहासात्मकच होता.:) तुकोबांची डिग्री ची ब्रँच वेगळी, रावणादी राक्षस तसेच हरीश्चंद्रादी भक्तांची वेगळी.

ही यात्रा एका ओळखीच्यांनी गेल्या वर्षी केली. १५ जणांचा ग्रुप होता. त्यांच्या मागून त्यांचे खाणे घेउन येणार्‍या माणसावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला होता. तो जगला की मेला कळले नाही . या ग्रुप्चे देखिल हाल दोन दिवस हाल झाले.

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा Fri, 02/05/2016 - 23:25
आम्चे पुजाविधी हे वेगळे असतात...इथे मिपावरच शास्त्रोक्त पुजा कशी करावी याचा जुना धागा आहे ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा Sat, 02/06/2016 - 12:33
काल खफवर अजयाने एक कोडं घातलं होतं. आणि आज तुमचा हा प्रतिसाद बघितला.
काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला:

In reply to by प्रचेतस

पैसा Sat, 02/06/2016 - 12:53
कापूस गोरा असतो. आणि बुवा कुठचा हती मारणार आहेत? =))

In reply to by टवाळ कार्टा

पैसा Sat, 02/06/2016 - 17:13
>>>>काळ्या रानात हत्ती मेला>>> या कोड्याचं उत्तर माझ्या माहितीत 'ऊ' असं आहे, आणि बुवा कर्दळीवनात हत्तीला ठार मारणार म्हणाले ना, म्हणून विचारलं, कोणता हती. =))

In reply to by भीमराव

सतिश गावडे Sun, 02/07/2016 - 11:25
कर्दळीवनात जाउन हत्ती मारणे यात काही छुपा अर्थ आहे काय? ;)
त्यात फार गहन असा अध्यात्मिक अर्थ आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक पांढरा हत्ती असतो. हा हत्ती असतो "अहं"चा. कर्दळीवनासारख्या पवित्र ठिकाणी जाऊन हा अनावश्यक आणि न परवडणारा अहंचा पांढरा हत्ती मारायचा असतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाखु Wed, 02/10/2016 - 10:05
" मोक्षासाठी कुणी उठा म्हणत नसेल तरच बसायला अर्थ आहे !! अन्यथा बसणेच काय कर्दळीवन यात्राही व्यर्थ आहे !!! नाखुष चारोळीकर

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 10:53
हे कधी झाले? धर्म सुधारणेकडून शास्त्रोक्त पूजेकडे वळणे हे पुरोगामित्वाचे लक्षण की प्रतिगामित्वाचे?

In reply to by सतिश गावडे

मृत्युन्जय Sat, 02/06/2016 - 12:01
मुळात पुजा करणे (देवाची), सत्यनारायणाची पुजा सांगणे वगैरे हे पुरोगामित्व की प्रतिगामित्व? (शास्त्रोक्त की धर्मसुधारोक्त ही नंतरची गोष्ट)

In reply to by मृत्युन्जय

सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 12:34
ते तुमचा देवावर (किंवा देव या संकल्पनेवर) विश्वास आहे की नाही यावर अवलंबून आहे असं वाटतं. :)

In reply to by विजय पुरोहित

सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 12:32
मांत्रिकबुवा, याच धाग्यावर मी तुमच्या प्रतिसादाला उल्लेखून एक प्रश्न विचारला आहे. त्याचेही उत्तर दया जमले तर. :)

मोगा Sat, 02/06/2016 - 13:32
घरात बसुन पाच वेळा अजाण ऐकावी

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. Sun, 02/07/2016 - 11:34
मग काय तर. गप्प आपलं नैण्टीथम्साप्बिसलेरीसलाडन्शेंगा घिऊन बसायचं सन्डेला. परत जिस दिन साजन हायेच.

In reply to by अभ्या..

जब से तुने मुझे दिवाना बना रखा है पत्थर हर शक्स ने हाथ मे उठाया है. म्हणुन त्या बयेचं नाव घेऊ नका. ;) -दिलीप बिरुटे