Skip to main content

शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?

लेखक उगा काहितरीच यांनी गुरुवार, 28/01/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे. शनीच्या चौथर्‍यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ? राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ? आपल्याला याबद्दल काय वाटते ? मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ? सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....

वाचने 58440
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

जे शैक्षणिक व राजकीय राखीव जागांच उदाहरण दिलेल आहे. त्यात आज पर्यंतच्या स्त्रीयांना शिक्षण आणि राजकारण (सत्ता) पद्धतशीरपणे कुटीलतेने जाणीवपुर्वक डावलल्याची अत्यावश्यक भरपाई या हेतुने आहे. हे मागचा सर्व इतिहास पुसुन नविन पाटीवर जणु काल अस्तित्वातच नव्हता आजपासुन सुरुवात झालेली आहे. आणि आजपर्यंत दोन्ही बाजुला उत्तम अधिकार मिळत होते. अशा अ-सामान्य गृहीतकातुन घेतलेले आहेत. बस रेल्वे ठीक आहे पण किरकोळ स्वरुप असला तरी मुद्दा मात्र बरोबर आहे.

असे काही आले नां की मला हटकुन " एक रुका हुआ फैसला" ची आठवण येते मग इथल्या वेगवेगळ्या प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिसादाने मी गडबडुन जातो. भेंडी काय चाल्लय काय ? असे धागे नेहमी उडदाचे पापड करत असताना वाचा-लिहायला घ्यावेत. उडदाच्या चिवट पीठाच्या उंड्या मस्त्पैकी ठेचल्या जातील आणी पापड मस्त मऊ मुलायम.

एक माझेही मत(त्याला कुत्रं पण विचारात नाही हे सोडा) तेथे एक पाटी लावून ठेवा. "चौथर्यावर स्त्रियांनी पाऊल ठेवल्यास शनीमहाराजांचा कोप होऊन त्यांच्यावर संकट कोसळू शकते असा विश्वास आहे. तेंव्हा चौथर्यावर पूल ठेवण्याच्या अगोदर विचार करा. " ज्यांची श्रद्धा आहे त्या स्त्रिया पाउल ठेवणार नाहीत. आणि ज्यांची श्रद्धा नाही त्या मुळातच येणार नाहीत. बस काय चार "स्त्रीमुक्ती" वाल्या स्त्रिया त्यावर पाऊल ठेवतील बाकी कोणी ठेवणार नाही. एवढा काथ्याकुट आणि ठणाणा आपण होऊन बंद होईल.

In reply to by सुबोध खरे

आताही पाटी न लावता तोच अर्थ प्रचलित आहे. जे होत आलंय तेही त्याच भावनेतून आजवर होत आलंय. काथ्याकूट आणि ठाणाणा वेगळ्याच कारणासाठी आहे (इथला नाही-भुमाता रणरागिणी ब्रिगेड चा). मलातरी कुणाच्याच मुद्द्यात काहीच दम दिसत नाही. काहीतरी अंतर्गत राजकारण धुमसतंय. ती भूमाता ररा ब्रि वाचलं की भुछत्र आठवतं. दोन्ही ची उत्पत्ती साधारण एकसारखीच वाटते.

In reply to by हेमंत लाटकर

स्त्रीयांनी करू नये म्हणून पुरूषांवरसुद्धा बंदी मननीय आहे ! हे आणखी कोण-कोणत्या क्षेत्रात करता येईल ?