'श्रीमानयोगी'
एक अगदी तुमच्या आमच्या सारखी सर्वसाधारण व्यक्ती, जी आयुष्यभर नोकरी करून आपला संसार चालवते, नोकरीमधून निवृत्तीचे वेध लागताच मनामध्ये कुठेतरी प्रचंड मोठा स्वप्नांचा पहाड उभा असतो...पोटा-पाण्याच्या व्यवसाया मुळे फार पूर्वी पाहिलेली काही स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतारवयाची याचा सतत ध्यास घेतलेली एक व्यक्ती... ते स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत धडपड करणारी व्यक्ती... स्वप्नं होतं आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करायचं,
मनात विचारांचं काहूर माजलेलं, प्रत्येकजणाचा वेगळा सल्ला, प्रत्येकाची वेगळी मतं.
आणि एके दिवशी सहज 'श्रीमानयोगी' कादंबरी हातात पडली. आणि हाच तो टर्निंग पॉइंट ठरला, आणि मनात विचार पक्का झाला. 'श्रीमानयोगी' सारख्या परिपूर्ण कादंबरीवर आधारित एका भव्य ऐतिहासिक आणि दर्जेदार नाटकाची निर्मिती करायची आणि कादंबरीतील मौलिक, बौद्धिक प्रसंग टिपून प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करायचे. आजवर नुसताच 'शूरवीर' असलेला शिवाजी राजा राजकारणातही किती तरबेज होता हे त्यातून दाखवायचं असं ठरलं.
झालं तर मग, लगीन घाई सुरू झाली. उठता-बसता सतत नाटक कसं उभं करायचं याची तयारी सुरू झाली. त्यासाठी लागणारा प्रोजेक्ट रिपोर्ट, पटकथा, 'कास्टिंग', ड्रेपरी, सेट, संगीत, संवादलेखन या सगळ्यासाठी लागणारा पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाटकाचे प्रयोग मिळवणे, हे सगळं सगळं सुरू झालं. जिद्द, अमाप कष्ट घेण्याची तयारी आणि या सगळ्या मागे शिवरायांवरील प्रेम आणि श्रद्धा.
मनातील एक श्रद्धेचं स्थान माणसाला किती ध्येयवेडा करून सोडतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा माणूस! एका नोकरदार माणसाला हे सगळं करताना किती अडचणी आल्या असतील हे सुज्ञास सांगणे नं लगे. बँकेकडून कर्ज मिळविण्या साठीची धडपड,'कास्टिंग', 'ड्रेपरी', रंगीत तालमी, मार्केटिंग तसेच एक टीम तयार करून संगीत व गीतरचनेवर काम करून घेणे, ३५ लोकांचा ताफा घेऊन महाराष्ट्रभर नाटकाच्या प्रयोगासाठी फिरणे हे एक मोठे आव्हान होते. हा काळ होता साधारण १९८७-१९८८ चा. आजकालच्या 'कॉम्पुटर', 'इंटरनेट' व 'मोबाईल' सारख्या सुविधा त्या काळी विकसित नव्हत्या, त्यामुळे वेळोवेळी प्रवास करून स्क्रिप्ट पूर्ण करावे लागले. उत्तम स्क्रिप्ट हीच एक उत्तम जाहिरात होती.
कोल्हापूरला जाऊन कादंबरीकार 'रणजीत देसाई' यांच्या घरी जाऊन सलग ३ महिने त्या कादंबरीतले हवे ते प्रसंग उतरवून घेतले ते देखील प्रत्यक्ष रणजीत देसाई यांच्या हातून, तसंच भास्कर चंदावरकर यांना पूर्ण पटकथा दाखवून या भव्य-दिव्य कलाकृतीला साजेसे संगीत तयार झाले. श्रीकांत पारगावकर व अनुराधा मराठे यांच्या सारख्या गायकांच्या आवाजात सुमधुर गाणी रेकॉर्ड झाली देखील. मुंबईच्या खास कलाकारांकडून पूर्णपणे फिरता रंगमंच तयार करून घेतला. लिरिक्स व् डायलॉग श्रीराम रानडे यांनी लिहिली तर श्रीपाद गोखले यांच्या सारख्या अनुभवी नेपथ्यकाराकडून दिग्दर्शन करून घेण्यात आले. हे सर्व करताना हा 'नोकरदार' माणूस किती कसलेला 'व्यवस्थापक' होता याचीही प्रचीती आली. बॅक स्टेज पासून डायरेक्टर पर्यंत सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि १९८८ साली 'रंगमंदार' पुणे ह्या संस्थेचं एक अप्रतिम दर्जेदार असं भव्य नाटक 'श्रीमानयोगी' रंगमंचावर उभं राहिलं.
आता खरी आव्हाने पुढे होती. पुढची धडपड सुरू झाली ती नाटकाचे प्रयोग मिळवण्यासाठी. हा माणूस अपॉइंटमेंट घेऊन, थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटला. त्यांना पूर्ण स्क्रिप्ट वाचून दाखवले, "शिवाजी काय होते, ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे, बाळासाहेब!" हे वाक्य ऐकून बाळासाहेब भारावून गेले व पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले. पोलिस वेलफेयर साठी चे अनेक प्रयोग यातून पुढे मिळत गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रयोग होऊ लागले, म्हणता म्हणता 'श्रीमानयोगी' नावाची एक कलाकृती प्रसिद्धीस येऊ लागली. या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग कधी झाले हे कळले देखील नाही. दूरदर्शनवर नाट्यावलोकन मध्ये त्यांची मुलाखतही झाली.
एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो, मालेगांवला नुकतीच जातीय दंगल झाली होती, तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त या नाटकाचा प्रयोग करायचे ठरले, परंतु नुकत्याच झालेल्या दंगलीमुळे, नाटक करू नका असे लोकांनी सुचवले. पण या माणसाने धाडसाने उत्तर दिले, "महाराष्ट्रात शिवाजी सादर नाही करायचा तर कुठे करायचा? हा प्रयोग होणारच" असा पवित्रा घेऊन नाटक धैर्याने सादर केले. हा प्रयोग अतिशय शांततेमध्ये पार पडला, या धाडसाचे कौतुक म्हणून खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी या निर्मात्याचे फोनवर अभिनंदन केले.
एकदा तर 'वैराग' या गावात नाटकाचा प्रयोग सुरू झाला अन् दुसऱ्याच अंकात मुसळधार पाऊस सुरू झाला. शाळेच्या पटांगणात प्रयोग असल्याने सर्व सेट व कलाकार चिंब भिजले. तरीही, 'शो मस्ट गो ऑन' या म्हणीची प्रचीती देत नाटक सुरू राहिलं. येवढ्या पावसातही सगळे प्रेक्षक रममाण होऊन तसेच बसुन नाटक बघत होते. हे पाहुन खुप आश्चर्य वाटले. नुकसान बरंच झालं होतं, सेट पूर्णपणे खराब झाला, कॉस्ट्यूम खराब झाले. पण, न खचता या माणसाने परत तो भव्य सेट उभा केला. बँकेच्या वाऱ्या अन् सेट परत उभा करतानाची फरफट काय झाली असेल हे शब्दात सांगणे शक्य नाही.
नव्या उमेदीने नाटक परत मंचावर उभे राहिले. नाटकात आग्र्यापासून सुटका, कविकलश, रामदास स्वामींनी राज्याभिषेक करून घ्या हे सांगणे, शिवरायांनी शिवथर घळ येथे जाऊन रामदासस्वांमींची भेट घेतली. त्यांना रामदास स्वामींनी दिलेल्या दासबोध रुपी आशीर्वादाचा प्रसंग तर खुपच छान होता. "दिनांच्या दयेला आणि दुबळ्यांचा अहिंसेला फारसे महत्व नसते हे दोन्ही गुण सिद्ध होण्यासाठी प्रथम सामर्थ्यवान असावे लागते." ह्या व या सारख्या अनेक वाक्यांना प्रक्षकांची भरभरुन दाद मिळायची.
राज्याभिषेक घडणे, कोवाडला जिजाऊ चे जाणे, घरभेदी तसेच प्रेमळ स्त्रिया, संभाजीराजांवर टाकलेली जबाबदारी व शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्याची माळ भंगणे व जगाला दिलेला निरोप असे भावपूर्ण, बौद्धिक आणि विचार करायला लावणारे प्रसंग या नाटकात उभारले होते. 'अनंतराव कुलकर्णी' यांनी शिवाजी महाराज यांची भूमिका अप्रतिम रित्या साकारली होती. पुतळा, सोयरा, जिजाऊ, रामदास स्वामी, संभाजी, प्रतापराव, मोरोपंत, हंबिरराव, बाळाजी आवजी, कविकलश, गागाभट्ट, अश्या अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा या नाटकात सादर केल्या गेल्या.
या नाटकाचे १०० च्या वर प्रयोग केले. अनेक प्रकारची माणसं भेटली. कोणी शेवटपर्यंत साथ देणारी तर कोणी दगा देणारी, कोणी निःस्वार्थ सेवा देणारी तर कोणी त्या माणसाच्या चांगुलपणाचा पुरेपूर फायदा घेणारी, पण जेव्हा ध्येय सात्विकतेची साथ धरून असते तेव्हा देवाचा आशीर्वाद सतत लाभतो. या माणसाच्या बायकोचे प्रचंड सहकार्य त्यांना मिळाले. सर्व घेतलेली कर्ज परत फेडून, सर्व कलाकारांना समाधानी ठेवून, थोरा मोठ्यांचे आभार मानून हां माणूस आज ताठ मानेने आपल्या आयुष्यातील या सोनेरी क्षणांना आठवत आणि उजाळा देत जगत आहे..
या थोर माणसाला म्हणजेच माझे वडील श्री. खंडेराव कुलकर्णी व त्यांना प्रचंड साथ देणारी माझी आई, सौ. उमा खंडेराव कुलकर्णी यांना माझा दंडवत.
त्यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तर वर्ष पुर्ण केली त्या निमित्ताने लिहावेसे वाटले आणि तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावेसे वाटले.
धन्यवाद.
आता खरी आव्हाने पुढे होती. पुढची धडपड सुरू झाली ती नाटकाचे प्रयोग मिळवण्यासाठी. हा माणूस अपॉइंटमेंट घेऊन, थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटला. त्यांना पूर्ण स्क्रिप्ट वाचून दाखवले, "शिवाजी काय होते, ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे, बाळासाहेब!" हे वाक्य ऐकून बाळासाहेब भारावून गेले व पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले. पोलिस वेलफेयर साठी चे अनेक प्रयोग यातून पुढे मिळत गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रयोग होऊ लागले, म्हणता म्हणता 'श्रीमानयोगी' नावाची एक कलाकृती प्रसिद्धीस येऊ लागली. या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग कधी झाले हे कळले देखील नाही. दूरदर्शनवर नाट्यावलोकन मध्ये त्यांची मुलाखतही झाली.
एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो, मालेगांवला नुकतीच जातीय दंगल झाली होती, तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त या नाटकाचा प्रयोग करायचे ठरले, परंतु नुकत्याच झालेल्या दंगलीमुळे, नाटक करू नका असे लोकांनी सुचवले. पण या माणसाने धाडसाने उत्तर दिले, "महाराष्ट्रात शिवाजी सादर नाही करायचा तर कुठे करायचा? हा प्रयोग होणारच" असा पवित्रा घेऊन नाटक धैर्याने सादर केले. हा प्रयोग अतिशय शांततेमध्ये पार पडला, या धाडसाचे कौतुक म्हणून खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी या निर्मात्याचे फोनवर अभिनंदन केले.
एकदा तर 'वैराग' या गावात नाटकाचा प्रयोग सुरू झाला अन् दुसऱ्याच अंकात मुसळधार पाऊस सुरू झाला. शाळेच्या पटांगणात प्रयोग असल्याने सर्व सेट व कलाकार चिंब भिजले. तरीही, 'शो मस्ट गो ऑन' या म्हणीची प्रचीती देत नाटक सुरू राहिलं. येवढ्या पावसातही सगळे प्रेक्षक रममाण होऊन तसेच बसुन नाटक बघत होते. हे पाहुन खुप आश्चर्य वाटले. नुकसान बरंच झालं होतं, सेट पूर्णपणे खराब झाला, कॉस्ट्यूम खराब झाले. पण, न खचता या माणसाने परत तो भव्य सेट उभा केला. बँकेच्या वाऱ्या अन् सेट परत उभा करतानाची फरफट काय झाली असेल हे शब्दात सांगणे शक्य नाही.
नव्या उमेदीने नाटक परत मंचावर उभे राहिले. नाटकात आग्र्यापासून सुटका, कविकलश, रामदास स्वामींनी राज्याभिषेक करून घ्या हे सांगणे, शिवरायांनी शिवथर घळ येथे जाऊन रामदासस्वांमींची भेट घेतली. त्यांना रामदास स्वामींनी दिलेल्या दासबोध रुपी आशीर्वादाचा प्रसंग तर खुपच छान होता. "दिनांच्या दयेला आणि दुबळ्यांचा अहिंसेला फारसे महत्व नसते हे दोन्ही गुण सिद्ध होण्यासाठी प्रथम सामर्थ्यवान असावे लागते." ह्या व या सारख्या अनेक वाक्यांना प्रक्षकांची भरभरुन दाद मिळायची.
राज्याभिषेक घडणे, कोवाडला जिजाऊ चे जाणे, घरभेदी तसेच प्रेमळ स्त्रिया, संभाजीराजांवर टाकलेली जबाबदारी व शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्याची माळ भंगणे व जगाला दिलेला निरोप असे भावपूर्ण, बौद्धिक आणि विचार करायला लावणारे प्रसंग या नाटकात उभारले होते. 'अनंतराव कुलकर्णी' यांनी शिवाजी महाराज यांची भूमिका अप्रतिम रित्या साकारली होती. पुतळा, सोयरा, जिजाऊ, रामदास स्वामी, संभाजी, प्रतापराव, मोरोपंत, हंबिरराव, बाळाजी आवजी, कविकलश, गागाभट्ट, अश्या अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा या नाटकात सादर केल्या गेल्या.
या नाटकाचे १०० च्या वर प्रयोग केले. अनेक प्रकारची माणसं भेटली. कोणी शेवटपर्यंत साथ देणारी तर कोणी दगा देणारी, कोणी निःस्वार्थ सेवा देणारी तर कोणी त्या माणसाच्या चांगुलपणाचा पुरेपूर फायदा घेणारी, पण जेव्हा ध्येय सात्विकतेची साथ धरून असते तेव्हा देवाचा आशीर्वाद सतत लाभतो. या माणसाच्या बायकोचे प्रचंड सहकार्य त्यांना मिळाले. सर्व घेतलेली कर्ज परत फेडून, सर्व कलाकारांना समाधानी ठेवून, थोरा मोठ्यांचे आभार मानून हां माणूस आज ताठ मानेने आपल्या आयुष्यातील या सोनेरी क्षणांना आठवत आणि उजाळा देत जगत आहे..
या थोर माणसाला म्हणजेच माझे वडील श्री. खंडेराव कुलकर्णी व त्यांना प्रचंड साथ देणारी माझी आई, सौ. उमा खंडेराव कुलकर्णी यांना माझा दंडवत.
त्यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तर वर्ष पुर्ण केली त्या निमित्ताने लिहावेसे वाटले आणि तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावेसे वाटले.
धन्यवाद.वर्गीकरण
प्रतिक्रिया
लिखाण आवडले.
आपल्या वडिलांना अमृत महोत्सवी
jabaradast!
छान ओळख.वडिलांना शुभेच्छा.
एक नंबर ओळख! तुमच्या वडिलांना
उत्कृष्ठ माहिती
सुंदर ओळख आणि लेख. तुमच्या
सुंदर लेख
उत्तम ओळख. आपल्या वडिलांना
त्यावर एक लेख येऊ द्या
आपल्या वडिलांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
आपल्या आईवडीलांना शुभेच्छा..
सुरेख ओळख'!
अभिनंदन व शुभेच्छा !
सुरेख
प्रणाम
वा..
लेखन आवडले. प्रेरणादायी आहे.
+१
लेखन आवडले
प्रेरणादायी कार्य
सुंदर ओळख !
जोरदार
वाह ! लेखन आवडले. वडिलांना
निशब्द.
निशब्द.
तुमच्या वडिलांना
वा! सुंदर ओळख!
जिद्दीला सलाम
छान ओळख. काल दुपारी हा लेख
धन्यवाद विशाखा
__/\__
उत्तम परिचय!
वा...उत्तम परिचय!! तुमच्या
हो मी पुतळाबाई ची भुमीका केली होती..
सुंदर
अशी माणसे आता कुठे आहेत?
सर्वांना मनापासुन धन्यवाद !
__/\__
नतमस्तक
सुरेख ओळख.
धन्यवाद !
_/\_
ग्रेट.
धन्यवाद !
'श्रीमानयोगी'. बस . नामहि
आपल्या वडीलांना