Skip to main content

स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे

लेखक महासंग्राम यांनी गुरुवार, 10/12/2015 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी नागपुर मध्ये वर्षभर काम करुन थकलेल्या आमदारांची हिवाळी अधिवेशन नामक सुट्टी सुरु झाली की 'स्वतंत्र विदर्भाची' मागणी जोर धरते, तशी यावर्षीही ती 'नागपुरी संत्री' खाण्यासाठी सुरु झाली. यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने या मागणीला जरा भलताच जोर आलेला दिसतो, खुद्द मुख्यमंत्र्याची भूमिका स्वतंत्र विदर्भाची असली तरी यावेळी त्यांनी चकार शब्द काढला नाही. पण त्यांच्या पाठिंब्याने महाधिवक्ता झाले श्रीहरी अणे यांंच्या तोंडून ते बोललेच, आणि लोकसत्तेने ही अग्रलेखातून त्याचीच री ओढत स्वतंत्र विदर्भाचे गाणे गायले आहे. विदर्भाच्या बाबतीत कायम अनुशेषाचे रडगाणे गाईले जाते पण इतके वर्ष अनुदान देवून सुद्धा अनुशेष भरून निघत नसेल तर हां विदर्भातल्या पुढाऱ्यांचा सपशेल पराभव आहे. आणि अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली याचा नेमका शोध घेणे गरजेचे ठरेल. आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही. सध्या संयुक्त महाराष्ट्रातात पूर्ण खाता येत नसल्याने वेगळा विदर्भ पाहिजे एकदा का वेगळा विदर्भ भेटला की सगळी पॅकेज अनुदान या बोक्यांच्या घशात जायला मोकळी अशी शंका घेण्यास वाव आहे. विकासाच्या नावाखाली स्वतंत्र विदर्भाची मागणी कारणाऱ्यानी आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही, ते स्वतः कुठे कमी पडले याचे आत्म परीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर पुढचं अधिवेशन आहेच आंदोलन करायला.

वाचने 35458
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

तुमचे पूर्वाग्रह पक्के आहेत का? असल्यास बोलून उपयोग नसेल, अन्यथा बोलण्यालायक अन चर्चा करण्यालायक खुप मुद्दे आहेत. कळावे (वैदर्भी) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाप्पू तसं नाही पूर्वग्रह नक्कीच नाही, पश्चिम महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो तर आपला का नाही त्याला स्वतंत्र कशाला पाहिजे एवढंच बोलन हा मायावाला …. चुभूदेघे मनाने विदार्भीय असलेला मंदार

सत्तेतील सरकार शेवटच्या वर्षात स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेऊ शकतो किंवा तशी काडी पुढील मतदान घेण्यासाठी टाकू शकतात. लहान राज्ये असली पाहिजेत विकसाची जास्त संधी असते फक्त आर्थिक सोर्स तितके मजबूत असले पाहिजेत. स्वतंत्र विदर्भ झाला की स्वतंत्र मराठवाडा राज्य झालंच पाहिजे आणि त्या आंदोलनात आम्ही असूच....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक एकत्र राहून जर यांना विकास साधता येत नसेल तर आपले नेतृत्व कूचकामी आहे असेच म्हणावे लागेल

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग काय औ'बाद राजधानी परभणी, हिंगोली , नांदेड , लातुर झाले एक राज्य ! जमल्यास बीड , उस्मानाबाद वगैरे जोडायच .

स्वतंत्र विदर्भ मुद्द्यावर काहीजणांची "भाकरी नसेल तर पुरणपोळी खा" ही भूमिका डोक्यात जाते. विदर्भात नेत्यांमधे आत्मविश्वासाची कमतरता आहे आणि मुदलात अशा नेत्यांची कमतरता आहे. बच्चू कडू सारख्यांनी हे आंदोलन हातात घेतले तर विदर्भ होणे आणि त्याचा विकास होणे अवघड नाही. बाकी. बोलण्यासारखे बरेच आहे. चर्चा पुढे गेल्यास उडी टाकूच.

In reply to by संदीप डांगे

बावाजी पन सारेच कुटी कडू हायीत तीतच आपलं खेटर अडकते ना

मंदार भाऊ, तुमचा खुलासा वाचुन बरे वाटले काही मुद्दे मांडतो ह्यांचा सविस्तर उहापोह झाल्यास काहीतरी उत्तम चर्चा होऊ शकते पण त्या आधी काही एक डिस्क्लेमर :- मी हलके प्रतिवाद करणार नाही वैयक्तिक होणार नाही अन वैयक्तिक झालेल्यांकडे लक्ष ही देणार नाही मुद्दे खालील प्रमाणे १ अनुशेषभरती संबंधी आपली वाक्ये पाहता हे सांगावे वाटते की अनुशेष होता हेच आधी सरकार मानत नसे त्यांनी ते नंतर मानले , बरं मानले अन काही केले अश्यातला भाग नाही, तस्मात् राज्यपाल महोदयांना स्पेशल इंस्ट्रक्शन राज्यसरकार ला द्याव्या लागल्या तरीही त्यावर काही कारवाई होऊन पुढे किती अनुशेषभरती झाली हे कळाल्यास उत्तम होईल २ एसआरसी (स्टेट रीआर्गेनाईजेशन कमिटी) ह्याचे अध्यक्ष बहुदा फजल अली असल्याकारणे हिला फज़ल अली कमीशन सुद्धा म्हणतात बहुदा,त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीचे रिकमेन्डेशन दिले होते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माझेही अगदी हेच म्हणणे आहे, वैयक्तिक/प्रांतिक आकस न ठेवता उत्तम चर्चा व्हावी हीच अपेक्षा आहे. पहिल्या मुद्द्याबद्दल माझ्याकडे योग्य आकडेवारी नाही त्यामुळे इथे गप्प
२ एसआरसी (स्टेट रीआर्गेनाईजेशन कमिटी) ह्याचे अध्यक्ष बहुदा फजल अली असल्याकारणे हिला फज़ल अली कमीशन सुद्धा म्हणतात बहुदा,त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीचे रिकमेन्डेशन दिले होते
फली आयोगाने रिकमेन्डेशन दिले होते पण स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन सुरु झाल्याने विदर्भाची मागणी मागे पडली.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्या बापु - विदर्भा वर वेगळा प्रतिसाद लिहीतोच. पण ह्या अनुशेष प्रकाराबद्दल लिहावे वाटले. ज्यांच्या बाबतील अनुशेष आहे ( इथे विदर्भ ) त्यांना त्याच्या बाबतीत अजिबात दोषी न पकडता, ज्यांनी जमेत तितका विकास करुन घेतला आहे त्यांन दोषी ठरवणे गमतीशीर आहे. राजकीय रीत्या तर विदर्भाला आणि मराठवाड्याला मोठा काळ मुख्यमंत्री पद मिळाले आहे. हे म्हमुल, एक मुलगा अभ्यास करुन जास्त मार्क मिळवतो, एक आराम करतो म्हणुन कमी मार्क मिळवतो. आता हा मार्कांचा अनुशेष अभ्यास करणार्‍या मुलाचे मार्क दुसर्‍याला देऊन पुरे करणे चुक आहे. त्याला फक्त मार्क मिळतील पण विद्या मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी असेच होणार. विदर्भ नैसर्गीक स्त्रोतामधे बाकी महाराष्ट्राच्या पेक्षा जास्त नशिबवान आहे. तरी पण हे कायम मागासलेलेच

In reply to by प्रसाद१९७१

एक मिनिट! अनुशेष आहे तो सरकार ने कबुल केलाय, "अनुशेष" म्हणजे इंग्लिश मधे "बॅकलॉग" विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर , तुम्ही वंचित आहात हा तुमचा दोष आहे ह्या प्रकारचे विधान हास्यास्पद वाटते दादा, उलट ज्यांनी विकासचक्र विषम ठेवले त्यांना दोष दिला तर तो अतार्किक कसा?? मराठवाड्यावर मी कॉमेंट करणार नाही कारण अभ्यास नाही विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच , मग जर कमी मार्क मिळणाऱ्या पोराने काही बोलले की त्यालाच बोल लावायचे ही कुठली रीत म्हणे दादा?? बरं विदर्भात जनतेची इच्छा नाही विकासाची असेही काही आढळले नाही मला तुमचे तसे काही निरिक्षण असल्यास नमूद करा त्यावर विचार करता येईल ही , फ़क्त ज्याच्या तोंडचा घास पळवलाय अन दुसऱ्याला चारला आहे त्याला तो चारलाय असे न म्हणता "मलाच का घास मिळत नाही" म्हणून स्वताड़न करणे आपल्याला अपेक्षित असल्यास मी त्याच्याशी तीव्र असहमत आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर ,
राज्यकर्ते म्हणजे कोण? विदर्भातुन आमदार निवडुन येत नाहीत का? खासदार निवडुन येत नाहीत का? जर ते बिनकामाचे असतील तर त्यांना बदलुन दुसरे का निवडले जात नाहीत? राज्यकर्ते म्हणजे कोण? मुख्यमंत्री म्हणजे राज्यकर्ता नाही का?
विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच ,
विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्‍या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्‍या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा.

In reply to by प्रसाद१९७१

राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार खासदार निवडून येत नाहीत का? वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा का काही नाही केले? वगैरे सवाल टिपिकल असतात तर त्या संबंधात मला वाटते एकटा सीएम वैदर्भी असुन काय उपयोग? तो त्याच्या हातात असलेल्या खात्यांच्या संबंधित कामे करेल सुद्धा, बाकी टीम कुठली काय कसे हे ही महत्वाचे!, मागच्या आघाडी सरकार चे एक उदाहरण घ्या बहुसंख्य कॅबिनेट मंत्री हे फ़क्त सांगली जिल्ह्यातले होते, इतके मातब्बर की स्वतः अशोक चव्हाण खुद्द नांदेड चे असताना सुद्धा गोदावरी पाणी वाटप अन बाभळी तिढा सोडवू शकले नाहीत (टीम ला घेणे देणे नसावे अन उदास हाईकमांड आहेच) तसाच अनुशेष प्रश्न , तुम्ही म्हणता आपल्या नेत्यांत आत्मविश्वास कमी आहे, मला तसे वाटत नाही उदाहरण आपल्याच महापालिकेचे घ्या एकात्मिक शहरी रस्ते विकास चा फ़क्त निधी मागायला गेलेल्या नेत्यांस बसणे दूर शिवीगाळ करून एका एर्रोगंट नेत्याने हकलुन दिले, नेत्यांचे नाव घेता आले असते पण विदर्भाची गरज हा मुळ मुद्दा असुन त्याचा राजकीय अखाडा होऊ नये ह्या इच्छेपाई आवरतो विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्‍या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्‍या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे. गल्लत होते आहे, नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे पेन पेंसिल गाइड असे माझे म्हणणे नाही तर ते वापरायच्या परवानग्या म्हणजे पेन पेंसिल आहेत, चंद्रपुर ची पुर्ण वीज पश्चिमेला जाते अन तिथे मात्र १० तास लोड शेडिंग! कारण परवानगी नाही वापरायला वीज! आले का लक्षात? भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा. मुळात हे अतिशय अनइंफॉर्मड विधान आहे, १९५३ च्या नागपुर कराराच्यावेळी अनुशेषभरती हा मुद्दा होताच उगाच का घटनेने कलम ३७१(१) ची खास तरतूद केली असेल का? बरं १९५३ च्या आधी म्हणजे १९४७ मधे जर खुप जास्त सुबत्ता होती हे तुम्ही कबुल करता आहात तर त्याचा अर्थ हा बट्याबोळ महाराष्ट्रात येऊन झालाय हे एकार्थी मान्य करणे समजावे का? ३७१(१) नुसार अनुशेष अभ्यास १९८३ पर्यंत केला गेला नाही ह्यावरुन काय ते समजा, १९८३ मधे दांडेकर समिति स्थापन झाली जिचा रिपोर्ट १९८४ मधे सबमिट झाला तो तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्यांनी दाखलच करुन घेतला नाही! त्यानंतर थेट १९९१ ते ९३ सुधाकरराव नाईक, ह्यांना काम करायला किंवा अनुशेष भरती वर बघायला वेळ होता का? आठवा मुंबई दंगली, मग १९९५ मधे राज्यपालांनी विशेष आदेश देऊन नवी समिती बनवे पर्यंत सगळे ढिम्म, बरं ह्या आधी वैदर्भीय आमदार शांत बसले होते का हा उपप्रश्न तर अजिबात नाही १९८३ च्याच अधिवेशनात का त्याच्या २ वर्षे अगोदर (साल आठवेना नीट) सर्वपक्षीय वैदर्भी आमदारांनी सदनात हा अभ्यास व्हावा म्हणून ठराव दाखल केला होताच समजा काय ते! बरं ह्याआधी झालेले वैदर्भी सीएम होते त्यांनी काय केले? किंवा केले नाही हा प्रश्न विचारला जातो तर १९६० ची स्थापना नंतर एखाद वर्षे यशवंतराव मग त्यांचे केंद्रात प्रयाण (कृष्ण मेनन च्या जागी) त्यानंतर उणी पूरी दीड वर्षे कन्नमवार ते ऑन पोस्ट वारले त्यांच्यानंतर आले ते वसंतराव नाईक, बरं हे ह्या प्रश्नातले आवडते पात्र त्यांनी अकरा वर्षात काय केले? तर राज्य नुकते जन्माला आलेले,पहिल्या मुख्यमंत्र्याला केंद्रात तातडी ने जावे लागले, दुसरा एखाद वर्षात मरून गेला, परत निवडणूक प्रचार ह्यातुंन सुद्धा त्यांच्या औद्योगिक पॉलिसी साधक असल्यामुळे महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचा पाया रचला गेला, बरं वरच्या प्रतिसादात म्हणल्या प्रमाणे मुख्यमंत्री हा काटेरी मुकुट होय, लोकांना घी देखा पर बड़गा न देखा असे हे पद, बहुमत सांभाळा गवर्नेंस पहा विकास करा काँग्रेस पार्टी म्हणली का हायकमांड सुद्धा सांभाळा, ह्या सगळ्या नादात कोणाशी किती भांडणार अन विदर्भात काय ओढून आणणार? हे एक झाले शिवाय तुमच्या प्रश्नान्तर्गतच अजुन एक मुद्दा मांडतो, मुख्यमंत्र्याने राज्याचा समग्र विकास पहावा का फ़क्त आपल्या क्षेत्राचा? मला वाटते राज्याचा मुंबई ते विदर्भ अंतर पाहता मुख्यमंत्र्याने त्या काळात किती फिरावे? मग राज्याकडे लक्ष देणार की क्षेत्राकडे? मुळात मुख्यमंत्र्याने पुर्ण राज्याच्या विकासाकडे पहायला हवे की राव ते वसंतदादा ते शरदराव कोणी केले? मग आता सांगा पेन्सिली कोणाला मिळाल्या??

In reply to by बॅटमॅन

शेवटच्या वाक्यावरुन पुढे सांगतो, माझे आजोळ तासगाव जिल्हा सांगली मधे आहे मी दोन्ही कडल्या कंडीशन पाहून आहे, वसंतदादा किंवा शरद पवार ह्यांनी जे केले ते चुकच होते (क्षेत्रकेंद्रित विकास) पण आजही लोक त्याला घटनात्मक अन बरोबर एंड codified duty of a legislative representative siting on post of CM मानतात तेव्हा मात्र ते एथिकल , मॉरल अन एडमिनिस्ट्रेटिव ग्राउंड्स वर चुक असतेच असते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चंद्रपुर ची पुर्ण वीज पश्चिमेला जाते अन तिथे मात्र १० तास लोड शेडिंग! कारण परवानगी नाही वापरायला वीज! आले का लक्षात?
सोन्याबापु - माझ्या प्रश्नाला तुम्ही टाळुन च मोठे उत्तर देत आहात. एकटा सीएम राज्यकर्ता नाही, ठीक आहे, मग ६० का ८० आमदार काय करतात? तुम्ही वर लिहीले आहे चंद्रपुर ची वीज पश्चिमेला जाते, मग हे ८० आमदार काय उपटत बसतात का? अशी कशी परवानगी नटाव? आणि असले बिनकामाचे आमदार कसे निवडुन येतात वर्षानुवर्ष. तसेच तुम्ही माझ्या दुसर्‍या प्रतिसादाकडे दुर्लक्ष केले आहे. प. महाराष्ट्रात पण असमतोल आहे. सांगली / कोल्हापुर ला दांडगे राजकीय नेतृत्व मिळुन पण आणि पाणी वगैरे असुन पण काही करता आले नाही. पुण्याला राजकीय दृष्ट्या काडीची किम्मत नसताना, त्याच भागात कशी प्रगती ? अमेठीतुन इतकी दशके पंतप्रधान निवडुन येत असुन अमेठीची हालत काय आहे ते तुम्हाला माहीती आहेच. हा दोष निवडुन येणार्‍याचा आहे का निवडुन देणार्‍याचा?

In reply to by प्रसाद१९७१

मग हे ८० आमदार काय उपटत बसतात का?
एक विनंती थोड़े भाषेचे भान असू द्याच आपण ही चर्चा डोकी फोडायला नाही तर डोकी चालवायला त्यांना खाद्य पुरवायला करतोय असे मला अजुनही वाटते, ते असो! तुमच्या प्रश्नाचे उत्तर, मी वरतीच बोललोय "रस्ते विकासाच्या फण्ड ची मागणी करायला गेलेल्या नेत्यांस बसवणे दूर तर शिवीगाळ करून हकलुन दिले होते" मग आता सांगा ते लोकप्रतिनिधी करंटे म्हणावे का आपला न्याय वाटा मागायला आलेल्यांना अपमानित करून हकलणाऱ्या लोकांना करंटे म्हणावे? आपले मुख्यमंत्र्याला सगळीकडे लक्ष देता येणे संभव नाही ह्या मुद्द्यावर एकमत समजू का? बाकी तुम्ही म्हणता ते कसे मानु? कारण हे ८० आमदार सतत फंड किंवा न्याय पैसा आणायचा प्रयत्न करत असतात ते ही मी वर मांडले आहे, आपण ते मिस केलेत काय? मुळात अमरावती नागपुर चंद्रपुर अकोला आता बुलडाणा वाशीम सगळे लोक भांडण करून पैसा आणून विकास करीत आहेत , आक्षेप आहे तो "भांडण करावे लागण्याला" ज्याचा जो हक्क आहे त्याचा त्याला मिळायचा प्रश्न आहे न भाऊ!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्याबापु, माझा मुद्दा राजकीय नेतृत्वा पेक्षा तिथल्या जनते बद्दल होता. मी आधी पासुन सांगतोय, पुण्याला राजकीय दृष्ट्या काही किंमत नाही. तरी मग इथेच का जो काही विकास होतो तो होतो? मागे राहीलेल्या प्रत्येकानीच स्वताकडे आत वळुन बघणे गरजेचे नाही का? दुसर्‍या कोणामुळे मागे राहिलो हा दावा किती वर्ष करणार? त्यात इथे काही गुलामगीरी, मग दुसर्‍यां वर दोषारोप कीती वर्ष करणार? २-५ अगदी १० वर्ष असे शोषण करणे शक्य आहे पण ५० वर्ष शोषण कसे होऊ शकते? मी नैसर्गीक स्त्रोत भरपुर आहेत असे लिहीले की तुम्ही म्हणणार वापरायला परवानगी नाही. खेचुन घ्यावी परवानगी. तुमचा युक्तीवाद म्हणजे ब्रिटीशांनी भारताला लुटले तसे प.महाराष्ट्र विदर्भाला लुटतोय अश्या लायनीवर चालू आहे. --------- पुन्हा विषयांतर तुम्ही एका आमदाराला शिव्या घालुन हाकलुन दिल्याचे उदाहरण पुन्हा पुन्हा दिलेत. त्या आमदारानी नंतर काय केले ते ऐकायला आवडेल. पक्षाचा राजीनामा, अपमान सहन न होऊन आत्महत्या वगैरे. किंवा ज्यानी हाकलुन दिले त्या माणसा विरुद्ध काही आंदोलन वगैरे,

In reply to by प्रसाद१९७१

दुसर्‍या कोणामुळे मागे राहिलो हा दावा किती वर्ष करणार? दावा नाही पुरावे सुद्धा दिलेत , वाटल्यास अजुन देऊ शकतो, असो. २-५ अगदी १० वर्ष असे शोषण करणे शक्य आहे पण ५० वर्ष शोषण कसे होऊ शकते? अब भाई जो है सो है ! खेचुन घ्यावी परवानगी. कशी घ्यावी म्हणे? लोकशाहीत?? तुमचा युक्तीवाद म्हणजे ब्रिटीशांनी भारताला लुटले तसे प.महाराष्ट्र विदर्भाला लुटतोय अश्या लायनीवर चालू आहे. अजिबात नाही, माझा रोख हा "विकासाचा क्षेत्रीय असमतोल" असे म्हणवतो, त्याची कारणे वगैरे मी देतोय, ह्यात तुम्हाला ब्रिटिश अन भारतीय वगैरे काय जाणवले तुमचे तुम्हाला माहिती देवा, आता विजेचे आहे असे त्याला तुम्ही मी काय करणार? तुम्ही एका आमदाराला शिव्या घालुन हाकलुन दिल्याचे उदाहरण पुन्हा पुन्हा दिलेत. त्या आमदारानी नंतर काय केले ते ऐकायला आवडेल. पक्षाचा राजीनामा, अपमान सहन न होऊन आत्महत्या वगैरे. किंवा ज्यानी हाकलुन दिले त्या माणसा विरुद्ध काही आंदोलन वगैरे नंतर काय करणार आमदार? बरं तुमच्या कडल्या कर्तबगार आमदारांनी काय केले असते ते सांगा, जमल्यास आमच्याकडल्या लोकांस कळवतो,बरं तसंही नको, आमच्या मुळ जिल्ह्याचे राजे नशेत पक्षश्रेष्ठी वगैरे ना नको तिथे बांधत असतात आमदार खासदार कोणाचेही वाभाडे काढत असतात त्यांच्या विरोधात कुठल्या आमदाराने काय केले ते सांगा तसेच वागायला सांगतो भेट होईल तसे इकडील लोकांस!. असो. मला असे वाटते now lets agree to disagree brother :)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

नेते नाकर्ते आहेत हो जनता नाही, साधन संपत्तीच्या बाबतीत विदर्भ बर्यापैकी स्वयंपूर्ण आहे, आणि हा भाग जो तुम्ही नाकर्ता म्हणताय तो वेगळा काढला तर महारष्ट्रात विजेचे वांदे होतील ….

In reply to by महासंग्राम

नेते नाकर्ते आहेत हो जनता नाही
हा प्रतिवाद न कळण्यासारखा आहे. विदर्भातले नेते आकाशातुन पडतात का प. महाराष्ट्र पाठवतो?

In reply to by प्रसाद१९७१

विदर्भातले नेते नाकर्ते आहे त म्हणून विदर्भाचा विकास रखडला आह इसा म्हणायचा आहे मला, तुम्ही पश्चिम महाराष्ट्र मधातच आणला, त्याबद्दल मी काही बोललोच नाही ओ ….

In reply to by महासंग्राम

अहो असले नाकर्ते नेते जनता च निवडुन देते ना का ते आकाशातुन पडतात असे मी विचारले होते. बिहारींनी लालू ला निवडुन दिले आणि लालु नसता तर त्याच्या सारखाच कोणी गोलु, भोलु निवडुन दिला असता.

In reply to by महासंग्राम

महारष्ट्रात विजेचे वांदे होतील असहमत मुंबई मध्ये उद्योग ११ रुपये युनिटला या दराने वीज देतात. तेंव्हा विदर्भ वीज देऊन उपकार करतो आहे हि भाषा नको.गुजरात मध्ये अतिरिक्त वीज उपलब्ध आहे आणि ती मुंबईत वाहून आणण्यात येणारा खर्च विदर्भातून आणण्यापेक्षा कमी आहे. आज भारतात भरपूर वीज उपलब्ध आहे पण जे पैसे द्यायला तयार आहेत त्यांच्यासाठी. आकडे टाकणाऱ्या /फुकट्या लोकांसाठी नाही.सगळीकडे गरिबांसाठी फुकट गोष्टी देण्याच्या कोंग्रेसी संस्कृतीमुळे उर्जा क्षेत्र डबघाईला आलेले आहे. माझ्या दवाखान्याला वीज ११ रुपये ३२ पैसे अधिक इंधन अधिभार अशी आहे. तेंव्हा २४ तास वीज पुरवतात हे काही उपकार नाहीत. स्वतःचे जनित्र यापेक्षा स्वस्त पडते पण प्रदूषणाचा बागुलबुवा दाखवून उद्योगाकडून वीज घ्यायची आणि "गरिबांना"/ आकडे टाकणार्यांना फुकट वीज द्यायची यामुळे महावितरण डबघाईला आलेले आहे. पहा http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Curious-case…

In reply to by सुबोध खरे

गुजरात मध्ये अतिरिक्त वीज उपलब्ध आहे आणि ती मुंबईत वाहून आणण्यात येणारा खर्च विदर्भातून आणण्यापेक्षा कमी आहे.
इतकी स्वस्त आहे वीज तर घेत का नाही गुजरात मधून तेवढच लोडशेडिंग कमी होईल

In reply to by महासंग्राम

इतकी स्वस्त आहे वीज तर घेत का नाही गुजरात मधून तेवढच लोडशेडिंग कमी होईल >> महाराष्ट्र विज घेते. त्याचा करार आहे. प्रथम तत्कालीन राज्यकर्त्यानीं करार करायला टाळाटाळ केली होती. कारण उघड आहे. तीन पैकी दोन राज्यातील मुख्यमंत्री शत्रु पक्षाचे होते. असो. कालांतराने करार होउन या प्रकल्पातुन होणार्या विजनिर्मीती पैकी { 1,450 MW installed capacity (1 billion kWh every year) } २७ % विज महाराष्ट्राच्या वाट्याला येते. There are two power houses viz. River Bed Power House and Canal Head Power House with an installed capacity of 1200 MW and 250 MW respectively. The power would be shared by three states - Madhya Pradesh - 57%, Maharashtra - 27% and Gujarat 16%. This will provide a useful peaking power to western grid of the country which has very limited hydel power production at present.

In reply to by सुबोध खरे

आज भारतात भरपूर वीज उपलब्ध आहे पण जे पैसे द्यायला तयार आहेत त्यांच्यासाठी. ह्या वाक्याचा अर्थ काय डॉक्टर साब? चंद्रपुरात कोणी पैसे द्यायला तयार नाही हे? की मुंबईकर ११₹ देतात त्याचा टेच? मुळात धंद्यात पैसे असले तर देणारे अन घेणारे कोणीच उपकार दर्शवु नयेत कारण त्याच्यामागे शुद्ध "डिमांड एंड सप्लाई" चा नियम असतो हे मी तुम्हाला सांगणे बरे दिसणार नाही बॉस, आम्ही देतोय कारण आमच्याकडे सप्लाई आहे अन तुम्ही घेताय कारण तुमच्याकडे डिमांड आहे, शिवाय गुजराती वीज स्वस्त पड़ते आहे तर घ्या की ती, ११ रु/यूनिट तुम्ही सांगता आहात त्यात फायदा विदर्भाचा तो काय आहे? मुंबई म्हणजे तुम्ही काही एमएसईडीसीएल कडून वीज घेता आहात का अंबानी अन टाटा कडून घेता आहात हा विचार ही करा, ट्रांसमिशन लॉस अन बाकी ग्रिड maintainance वगैरे पाहता आम्हाला थोड़ी स्वस्त का होईना पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ला वीज देने परवडल हो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आज भारतात भरपूर वीज उपलब्ध आहे पण जे पैसे द्यायला तयार आहेत त्यांच्यासाठी. बापूसाहेब उद्योगधंदे मग ते मुंबईत असोत कि विदर्भात त्यांना ११ रुपयांनी वीज घ्यावी लागते आहे. हा क्रॉस सबसिडीचा प्रकार आहे. वरील उत्तर आपल्याच मित्रांना आहे जे म्हणतात "मुंबईने आपली वीज वगैरे पाहून घ्यावी." विदर्भाने दिली नाही तर उद्योगांना ११ रुपयांनी वीज द्यायला कोणतेही राज्य किंवा प्रांत तयार होईल. की मुंबईकर ११ रुपये देतात त्याचा "टेच?" हि टेचाची भाषा आपणच लिहित आहात. मुंबई विदर्भावर अवलंबून आहे इ भाषा आपलेच मित्र वापरत आहेत. मुंबईला वीज पुरवण्यासाठी कोयना १९६० मेगा वॉट आणि एनरॉन २२२० मेगा वॉट हे दोन प्रकल्प पुरेसे आहेत.त्यात तारापूरचे १४०० मेगा वॉट घ्या उरण ६७२ मेगा वॉट, ट्रॉम्बे १८० शिवाय खोपोली भिवपुरी भिरा इ मुंबई च्या जवळचे प्रकल्प पाहिलेत तर विदर्भातील वीजच काय गुजरातची सुद्धा वीज घ्यायची मुंबईला मुळीच गरज नाही हे आपल्याला लक्षात येईल. हे सर्व उर्वरित महाराष्ट्रातील शेतकर्यांना मायबाप सरकार देत असलेल्या फुकट विजेची बिलं भरण्यासाठी महाविज इकडची सबसिडी तिकडे करते त्यासाठी आहे हे आपल्या लक्षात येईल. मुळात अजून विदर्भाची वीज मुंबईला येत नाही तर ती पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनलाच जाते आहे हे पण पाहून घ्या A proposed 440 kilovolt high power transmission line from Koradi to Bhusawal would join Nagpur with Mumbai.[5] https://en.wikipedia.org/wiki/Koradi_Thermal_Power_Station एकदा हे पण बघून घ्या न http://www.business-standard.com/article/opinion/why-mumbai-gets-24x7-p… जाता जाता गुजरात मॉडेल पण वाचून घ्या त्यात http://www.business-standard.com/article/economy-policy/rajasthan-looks… राहिली गोष्ट A proposed 440 kilovolt high power transmission line from Koradi to Bhusawal would join Nagpur with Mumbai.[5]

In reply to by सुबोध खरे

जाता जाता (जर आणि जेंव्हा) जैतापूर अणुविद्युत प्रकल्प झाला तर तो ९९०० मेगा वॉट इतका प्रचंड असेल. https://en.wikipedia.org/wiki/Jaitapur_Nuclear_Power_Project

In reply to by सुबोध खरे

चुकीच्या मुद्द्यावर वादविवाद होत आहेत. सुबोधजी, आपल्या ह्या मतावर समग्र आणि बृहन मुंबईचा ( ठाणे डोंबिवली कल्याण कसारा आणि कर्जत) सकट विकास झालाच पाहिजे नाहीतर बृहन्मुंबई हे वेगळे राज्य झालेच पाहिजे. आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील. मी ही टिप्पणी केली आहे. ठिक आहे. मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे. माझ्या टिप्पणीत विदर्भावर रोख नाही. तर मुंबईकरांच्या फुकाच्या टेचावर आहे. 'मुंबईचा पैसा' हे शब्द खटकले.

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब मुळात तो प्रतिसाद विनोदी होता. पण तरीही त्याच्या प्रतिसादात आपला मुंबईबद्दल आकस दिसून येतो. अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली चंद्रपुर ची पुर्ण वीज पश्चिमेला जाते अन तिथे मात्र १० तास लोड शेडिंग! हा भाग जो तुम्ही नाकर्ता म्हणताय तो वेगळा काढला तर महारष्ट्रात विजेचे वांदे होतील ठिक आहे. मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे. तसं जर का झाल त्त मुंबईतले अर्धे उद्योग बंद पडतीन ना हि सर्व वाक्ये कुणी म्हटली आहेत? जसे काही मुंबई विदर्भाच्या मेहेरबानी वर जगते आहे? प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे हे जर तुम्ही मी दिलेल्या दुव्यांवर लक्ष दिलेत तर लक्षात येईल. शिवाय डॉ श्रीकान्त जिचकार काय म्हणतात तेही नीट वाचा. राहली गोष्ट मुंबईच्या पैशाची . आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढण्यात आपण पटाईत आहात. ते वाक्य पूर्ण वाचा "समग्र आणि बृहन मुंबईचा ( ठाणे डोंबिवली कल्याण कसारा आणि कर्जत) सकट विकास झालाच पाहिजे नाहीतर बृहन्मुंबई हे वेगळे राज्य झालेच पाहिजे.आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील." हे पूर्ण वाक्य आहे. तुम्हाला मुंबईचा फक्त पैसा दिसतो. मुंबईचे अविरत कष्ट दिसत नाहीत. २६ जुलै च्या महा प्रलयानंतर मुंबई २७ जुलैला परत आपल्या पायावर उभी राहिली. कुणाच्या प्याकेजची वाट न पाहता. वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत. कष्टामुळे मुंबईत पैसा येतो.मुंबईत "भारतभरातून" कष्ट करण्याची तयारी असणारी माणसे येतात यात विदर्भ मराठवाडा उत्तर प्रदेश बिहार सुद्धा येतात. ते कष्ट करतात आणी पैसा कमावतात. हि मुंबईची संस्कृती आहे. त्याचा दुश्वास का? In this context, Mumbai - and by implication the rest of the State - subsidises Vidarbha's sustenance. ``Mumbai is the door to the temple of development and we cannot allow a division of the Marathi-speaking State,'' says Dr. Jichkar. Dr. Jichkar concedes that people of the region had shown relatively less enterprise compared to the people, for instance, of Mumbai ``because toiling is not in our blood''. हे परत एकदा वाचून घ्या

In reply to by सुबोध खरे

वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत
वा वा चक्क पुलंची आठवण करून दिली ना बाप्पा तुमी तुम्हाला नागपूरकर व्हायचे आहे का ???

In reply to by महासंग्राम

ते पुलंचेच वाक्य आहे. ( आम्ही स्वयंभू नाही परप्रकाशित आहोत) पुलांच्याच शब्दात -- मुंबई नागपूर जाण्यायेण्याचा खर्च जमा धरता मुंबईत संत्री विकत घेऊन खाणे स्वस्त पडेल. तुम्हाला नागपूरकर व्हायचे आहे का ??? नको हो कशीही असली तरी आपली माय माउली मुंबईच बरी

In reply to by महासंग्राम

वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत
संत्री हिवाळ्यात येतात (कालच ठाण्यात विकत घेतली - डायरेक्ट फ्रॉम वैदर्भिय शेतकरी!) आणि वाळ्याचे पडदे लागतात उन्हाळ्यात! मग संत्री खाण्यासाठी नागपूरकर ऐन हिवाळ्यात पडदानशीं होतो की भर उन्हाळ्यात शिळी संत्री खातो?

In reply to by सुनील

मग संत्री खाण्यासाठी नागपूरकर ऐन हिवाळ्यात पडदानशीं होतो की भर उन्हाळ्यात शिळी संत्री खातो?
पुलंनी इनोद केला होता व तो जरा हलक घ्या ना बाप्पा

In reply to by सुनील

थेच तं.. च्याबहीन, उन्हाळ्यात ना मिरीगाचा संत्रा येत ना आंबियाचा.. कोण खात बसन तवा? बाकी पुलं आमच्या आवडत्या लेखकांत असले, तरी पुलंवाक्यम प्रमाणम मानून आम्ही अश्या गैरसमजांना बळी पडणार नाही..

In reply to by प्रसाद१९७१

विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे.
या वाक्याचा काही विदा आहे का ? सोन्याबापू…तुम्ही या वाक्याशी सहमत आहात का ?

In reply to by चिनार

पार्शियली एग्रीड हाओ चिनार भाऊ, नैसर्गिक "स्त्रोत" म्हणले तर मी ते अमान्य करतो पण नैसर्गिक "संपत्ती" म्हणले तर काही अंशी मान्य उदाहरण कोळसा, वनसंपत्ती , खनिज वगैरे विदर्भात आहेत, पाऊस तितकासा नाही (पण ते नैसर्गिक कारण आहे), नद्या नाहीत मोठ्या (एक वर्धा नदीचा अपवाद सोडता)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर ,
राज्यकर्ते म्हणजे कोण? विदर्भातुन आमदार निवडुन येत नाहीत का? खासदार निवडुन येत नाहीत का? जर ते बिनकामाचे असतील तर त्यांना बदलुन दुसरे का निवडले जात नाहीत? राज्यकर्ते म्हणजे कोण? मुख्यमंत्री म्हणजे राज्यकर्ता नाही का?
विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच ,
विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्‍या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्‍या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्या बापु - माझा युक्तीवाद फक्त विदर्भ आणि प. महाराष्ट्राच्या बाबतीत नाहीये. प. महाराष्ट्रात पण असमतोल विकास आहे. पुणे पुढे गेले, कोल्हापुर मागे राहीले आणि सातार्‍याला तर कोणी विचारतच नाही. खरे तर १९७०-८०-८५ मधे कोल्हापुर पुण्यापेक्षा फार च संमृद्ध होते. पैसा होता, शेती / पाणी होते, औद्योगिक वसाहती पण होत्या. मग गोळ कुठे झाला? का तिथे पण राज्यकर्त्यांनी कोल्हापूर चा वाटा पुण्याला दिला असे म्हणाल तुम्ही. खरेतर गेली चार दशके पुण्याला राज्याच्या राजकरणात किंमत नाही. १९५० साली चीन भारतापेक्षा वाईट स्थितीत होता आणि पाकीस्तान आर्थिक दृष्ट्या भारतापेक्षा बर्‍या स्थितीत. २०१५ साली काय परीस्थिती आहे? ह्यात दोष कोणाचा? चीन कडे भारतानी अनुशेष भरुन देण्याची मागणी करायची का? भारतात तर लोकशाही आहे, मग का नाही जनता चांगल्या काम करणार्‍या माणसांना निवडुन देत?

बच्चू कडु सेन्सेशनलिस्ट आहे! बेंजामिन फ्रैंकलिन ने जन्माला घातलेली ही राजकीय विरोधाची संकल्पना आहे डांगे साहेब, ह्या भाकरी नाही तर पुरणपोळी कॉमेंट वरुन एक अजुन सुचले आहे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा का काही नाही केले? वगैरे सवाल टिपिकल असतात तर त्या संबंधात मला वाटते एकटा सीएम वैदर्भी असुन काय उपयोग? तो त्याच्या हातात असलेल्या खात्यांच्या संबंधित कामे करेल सुद्धा, बाकी टीम कुठली काय कसे हे ही महत्वाचे!, मागच्या आघाडी सरकार चे एक उदाहरण घ्या बहुसंख्य कॅबिनेट मंत्री हे फ़क्त सांगली जिल्ह्यातले होते, इतके मातब्बर की स्वतः अशोक चव्हाण खुद्द नांदेड चे असताना सुद्धा गोदावरी पाणी वाटप अन बाभळी तिढा सोडवू शकले नाहीत (टीम ला घेणे देणे नसावे अन उदास हाईकमांड आहेच) तसाच अनुशेष प्रश्न , तुम्ही म्हणता आपल्या नेत्यांत आत्मविश्वास कमी आहे, मला तसे वाटत नाही उदाहरण आपल्याच महापालिकेचे घ्या एकात्मिक शहरी रस्ते विकास चा फ़क्त निधी मागायला गेलेल्या नेत्यांस बसणे दूर शिवीगाळ करून एका एर्रोगंट नेत्याने हकलुन दिले, नेत्यांचे नाव घेता आले असते पण विदर्भाची गरज हा मुळ मुद्दा असुन त्याचा राजकीय अखाडा होऊ नये ह्या इच्छेपाई आवरतो , बाकी तुम समझदार है गाववाले! ;)

स्वतंत्र विदर्भ तर कराच, पण ते नाही जमले तर मराठवाडा महाराष्ट्रापासुन वेगळा करा. त्याचा फार त्रास होतो.

मी काय म्हणतो, होऊ द्याच ना वेगळा विदर्भ.. अरे, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे हा.. हिंदी बोलणारी इतकी सगळे राज्ये आहेत, आणि मराठी बोलणारं एकच? विदर्भ वेगळा करा आणि मराठीचं संख्याबळ वाढवा.. असो.. आता जरा सिरीयसली बोलतो.. १. अनुशेष आणि अनुदान नेमका किती देण्यात आला, ह्याची काही आकडेवारी? कशावरुन ह्या ना त्या कारणाने त्याला रोखून 'तुम्हाला पैशांचा उपयोगच करता येत नाही' ह्या नावाखाली मदत थांबवण्यात आली नाही? २. एका महीन्याचं अधिवेशन घेऊन खरंच काही फायदा आहे का? ३. जिल्ह्याचं मुख्यालय लोकांच्या जास्त जवळ जावं, म्हणून छोटे जिल्हे बनवल्या जाताहेत आता, मग राज्याचं मुख्यालय असं एक कोपर्‍यात का? मग विदर्भातल्या माणसांना मुंबईला जाण्याचा त्रास का? गोंदीया-मुंबई हे अंतर गोंदीया-दिल्ली इतकंच आहे जवळ जवळ.. ४.
'आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही.'
हे मत कशावरुन? ५. मुंबईमुळे महाराष्ट्राच्या खजिन्यात मोठी भर पडते, व त्यातून मिळालेल्या पैशांची विदर्भाच्या विकासासाठी मदत मिळते, हे मान्य.. पण विदर्भ स्वतःच्या 'रिसोर्सेस' वर तगू आणि वाढू शकत नाही , ह्याबद्दल काही स्टडी आहे का? असल्यास शेअर करावा, ही विनंती. ६.
एक मुलगा अभ्यास करुन जास्त मार्क मिळवतो, एक आराम करतो म्हणुन कमी मार्क मिळवतो. आता हा मार्कांचा अनुशेष अभ्यास करणार्‍या मुलाचे मार्क दुसर्‍याला देऊन पुरे करणे चुक आहे. त्याला फक्त मार्क मिळतील पण विद्या मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी असेच होणार.
पुन्हा तेच.. आराम केल्याने मार्क कमी पडताहेत कि गुर्जीलोकं पार्शालिटी करताहेत, हे कोण ठरवणार व कसं?

In reply to by राही

स्वतंत्र विदर्भ १००% मराठीभाषिक राज्य असेल याबाबत अजिबात शंका वाटत नाही. तसेच राज्याची अधिकृत भाषा हिंदी नसूनही बहुतांश जनता उत्तम हिंदी बोलणारे राज्य असेल. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी विदर्भ मध्य प्रांताचा हिस्सा होता ज्यात आजचे मध्य प्रदेश व छत्तिसगढ या राज्यांचेही भूभाग होते. तेव्हा मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती अन अधिकृत भाषा हिंदी व मराठी या होत्या. विदर्भात ज्या लोकांची मातृभाषा हिंदी आहे व जे रोजच्या व्यवहारात हिंदी अधिक वापरतात ते सहजपणे मराठी माध्यमांच्या शाळेत शिकतात व शासकीय कामांसाठी मराठीत पत्रव्यवहार करतात. बाकी वैदर्भिय बोलीभाषेत अनेक मराठी शब्दांचा वापर सहजपणे होतो ज्यांसाठी महाराष्ट्राच्या इतर भागांत हिंदी किंवा इंग्रजी शब्द वापरले जातात.

In reply to by चिगो

'आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही.' हे मत कशावरुन?
मी स्वतः विदर्भातला आहे म्हणून इथल्या परिस्थितीची मला पूर्ण जाणीव आहे असे मला वाटते, उद. द्यायचं झालं तर अकोल्याचे देता येईल अकोल्यात महापालिका झाल्यावर चंद्रशेखर रोकडे, श्रीकर परदेशी यांसारखे आयुक्त/जिल्हाधिकारी लाभले होते पण करंट्या राजकीय नेतृत्वाने त्यांचा फायदा न करून घेता पाय ओढण्यातच धन्यता मांडली .

In reply to by चिगो

पण विदर्भ स्वतःच्या 'रिसोर्सेस' वर तगू आणि वाढू शकत नाही , ह्याबद्दल काही स्टडी आहे का?
फार पूर्वी श्रीकांत जिचकार यांचे लेख वाचल्याचे आठवते ज्यात विदर्भातून त्यावेळेला येनाऱ्या पैशातून विदर्भाची वाढ होउ शकनार नाही असे सांगितले होत. मुख्य कारण होते खाणी किंवा इतर नैसर्गिक साधनातून येणाऱ्या उत्पन्नांचा मोठा हिस्सा केंद्रसरकारला द्यावा लागतो. लेख फार जुने आहेत तेंव्हा लिंक नाहीत. काही बाबतीत आकडेवारी तपासून अभ्यास करायला हवा छोटी राज्ये केल्याने विकास होतो का ढोबळ मुद्दे असे बाजूने मुद्दे - छत्तीसगडमधे राबविलेली सार्वजनिक वितरण प्रणाली ही आदर्श मानली जाते. - रायपुर, बिलासापुर ही शहरे लहानपणांपासून बघत आलोय, शहरांचा विकास वेगळ्या राज्यानंतर झपाट्यात झाला. - हैद्राबाद सारख्या शहरात तेलंगणा वेगळा झाल्याने काही थांबले नाही. उलट निर्णयक्षमतेअभावी रेंगाळून पडलेली कामे वेगात पूर्ण झाली. विजेची समस्या सोडवण्यात यश आले. आता पाणी ही मोठी समस्या आहे त्यावर सरकार काय करते बघायला हवे. विरुद्ध मुद्दे - छत्तीसगडमधला नक्षलवाद तसाच कायम आहे. - झारखंडला कित्येक वर्षे स्थिर सरकार लाभले नव्हते. तिथला भ्रष्टाचार. - राजकीय अस्थिरता आणि त्यानिमित्त्याने होऩारी घोडेबाजी.

विदर्भ स्वतंत्र, मराठवाडा स्वतंत्र, मग उत्तर महाराष्ट्रानेच काय घोडं मारलंय? नाशिक, नगर सह उत्तर महाराष्ट्र झालाच पाहिजे. जिल्हे कमी पडत असतील तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याची थोडी जोडतोड करा. म्हणजे धुळे-जळगाव-नंदुरबारच्या भरीला नाशिक, नगर, औरंगाबाद, बुलडाणा उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि औरंगाबादच्या बदल्यात वाशिम यवतमाळ मराठवाड्यात. विदर्भ खूप मोठा आणि मोठ्या मनाचा आहे. एकदोन जिल्हे इकडेतिकडे झाले तर फरक पडत नाही. पण तुळजापूर आणि जोगाईचें आंबें महाराष्ट्राबाहेर जाणार! आहे, त्यावरही उपाय आहे. मराठवाड्याने 'महाराष्ट्र' या नावावर क्लेम सांगावा. मराठवाड्याला आंदोलनाची सवय आहे. अ‍ॅडिक्शनच जणू. बरीच वर्षं झाली एखादं मोठं आंदोलन नाही झालं. तेव्हा होऊन जाऊं दे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

खेती करावले बी मन मोठा बख्खल लागते मिरगात बी तऱ्याच्या पारीले सब्बल लागते जंगल अना जरा नक्सलवादाची आली खबर बाहेरच्याइले झाडीपट्टी चंबल लागते -- स्वामी संकेतानंद शब्दार्थ बख्खल = (शब्दशः) जाड़ेभरडे, मिरगात= मृग नक्षत्रात तऱ्याची पार= तळ्याचा बाँध सब्बल= पहार

सगळे लोक आपल्या विकासाची री लावून धरतात. आमच्या मुंबईचा कोणी वालीच नाही. ते काही नाही. समग्र आणि बृहन मुंबईचा ( ठाणे डोंबिवली कल्याण कसारा आणि कर्जत) सकट विकास झालाच पाहिजे नाहीतर बृहन्मुंबई हे वेगळे राज्य झालेच पाहिजे. आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.

In reply to by सुबोध खरे

आमच्या मुंबईचा कोणी वालीच नाही
साहेब मुंबईच बजेट ३५,००० कोटी रुपये इतके आहे जे कि जगातल्या एखाद्या छोट्या देशाइतके आहे, अजून काय पाहिजे ओ तुम्हाला. आधीच डूबाले आली तुमची मुंबई कुटी जानार बाप्पा एव्हडा पैसा घेवून…
मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.
आणि मुंबई चा पैसा मागतेच कोण विदर्भाला स्वःताच्या हक्काचा पैसा पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.
आम्हाला मुंबई चा पैसा नकोच. आमचा पैसा थेट हम्रीकेतुन येतो.

In reply to by संदीप डांगे

हेहेहे बावाजी कौन अस करायले तुमी , तसं जर का झाल त्त मुंबईतले अर्धे उद्योग बंद पडतीन ना ….

In reply to by महासंग्राम

हे पण बघून घ्या न भौ Today, the collection is up to 98 per cent in residential, commerical and industrial categories. In agriculture, the collection is just 20-25 per cent. - See more at: http://indianexpress.com/article/cities/mumbai/power-tariff-in-maharash… http://indianexpress.com/article/cities/mumbai/power-tariff-in-maharash… पहा विदर्भाची वीज किती स्वस्त आहे आणि किती महाग आणि हे पण पाहून घ्या न If Vidarbha is hived off, Dr. Jichkar says, ``we will have no funds from day one to run the new State.'' ``The region's share is burdened by a deficit of Rs. 2,848 crores and Monopoly Cotton Purchase Scheme, Employment Guarantee Scheme and such activity will immediately cease since we would not have money to pay salaries.'' All available resources - iron ore, surplus power generation, forestry - would not be enough. In this context, Mumbai - and by implication the rest of the State - subsidises Vidarbha's sustenance. ``Mumbai is the door to the temple of development and we cannot allow a division of the Marathi-speaking State,'' says Dr. Jichkar. ``Are we to agree simply because some people raise the issue which is not a people's issue at all? Are Congressmen to back a demand which was not in the party's manifesto in the recent polls to both Assembly and the Lok Sabha?'' Dr. Jichkar concedes that people of the region had shown relatively less enterprise compared to the people, for instance, of Mumbai ``because toiling is not in our blood''. Inadequate development and progress is cited as one reason for demands for separation apart from ``step-motherly treatment'' by the people of the rest of the State. If the Fazal Ali Commission of the 1950s found Vidarbha viable it was on the relative position of other regions of Madhya Bharat, and that cannot be paraded now in support of a separate State, says Dr. Jichkar. ``It is a political demand unconcerned with its viability and it will convert the region into a agriculture State,'' he adds. http://www.thehindu.com/2000/09/09/stories/0209000g.htm

In reply to by सुबोध खरे

If Vidarbha is hived off, Dr. Jichkar says, ``we will have no funds from day one to run the new State.''
सहमत आहे सर म्हणूनच वेगळा विदर्भ नको म्हणतोय मी, पण धागा वेगळ्याच लायनीवर चालला आहे