Skip to main content

रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हे.

लेखक हेमंत लाटकर यांनी शुक्रवार, 27/11/2015 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
दैनिक भास्कर मधील बातमी. 5 आक्टाेबर 1971 या वर्षी प्रख्यात इतिहासकार एच. डी. संकलिया यांचा एक रिपोर्ट अंग्रेजी दैनिक 'द स्टेट्समैन' मध्ये प्रकाशित झाला होता. या रिपोर्ट नुसार रामायणातील लंका म्हणजे "श्रीलंका" नसून झारखंड मधील छोटा नागपुर हे क्षेत्र आहे. अयोध्या ते कन्याकुमारी हे अंतर रस्त्याने अंदाजे 3000 किमी आहे, कन्याकुमारी ते श्रीलंका अंतर 290 किमी आहे. आता रस्ते असल्यामुळे इतके अंतर जाणे सोपे आहे. त्याकाळी रस्ते नव्हते, वाहने नव्हती, घनदाट जंगले होती. श्रीरामाने इतके पार केले असेल असे वाटत नाही. तुम्हाला काय वाटते......

वाचने 24554
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

शोलेतील सांबा हा मनुष्य नसून, उंचावर बसून येणारे जाणारे ढग पाहून, पावसाचा अंदाज वर्तवणारा हवामान-शास्त्रज्ञ होता. तुम्हाला काय वाटते......

In reply to by DEADPOOL

तुम्हाला सॅरकाझम समजत नसेल तर तो माझा दोष नाही. बाकी तुम्ही माझ्या हौसे-मौजेची काळजी क्रु ने ही नम्र इनंती.

In reply to by पगला गजोधर

s मधल्या काळांत उपसागरात राकु वादळाने निर्माण झालेल्या, कमी दाबाच्या पट्ट्याने, दूर राहिलेले 'लाटलेल्या जिलब्यांचे ढग' पुन्हा मिपा गांवावर जमा झालेत, मधल्या काही काळात उघडीप दिलेल्या जिल्बीवर्षाव पुन्हा कार्यान्वित झालेला दिसतोय.

In reply to by पगला गजोधर

बाक़ी सांभा बसलाय त्या खालच्या दगडाचा (पिवळ्या रंगाच्या) आकार हनुमानाच्या गदेसारखा दिसतोय. गब्बर रामायणकालीन असावा काय? की रावणच दोन रुपात वावरत होता ?

धागा फार मोठा आहे. अयोध्या ते कन्याकुमारी अंतर देखील फारच लांब आहे. त्यामुळे थोडा दोन भागात वरील धागा टाकला तर कीमान धाग्याच्या गहन विषयाचा प्राथमिक ढोबळ का होईना अंदाज लावता येतो. बाकी इतिहासकार एच. डी. संकलिया एक महत्वपुर्ण नावं. आपल्या व्यासंगी दिर्घ गंभीर धाग्यांचा नेहमीचाच यशस्वी चाहता.

पास.

नाग मणी म्हणजे खरं तर avengers मध्ये दाखवलेले mind stones आहेत . आणि हे सगळं आपल्या कडे पहिल्या पासून होतं . नॉर्स माय्थोलोजी ने हे आपल्याकडून चोरलेलं आहे . तुम्हाला काय वाटते ?

इरावती कर्वे का कुणीतरी एका मराटी लेखिकेने एका पुस्तकात हेच लिहिले होते.

त्याने काय फरक पडतो तुमच्या आमच्या आयुष्यात?

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे असं कसं . काय फरक पडतो ? हा प्रश्न तू विचारावस ? लाटकर काका आहे ते . त्यांना प्रत्येक गोष्टीने फरक पडतो आणि ते प्रत्येक गोष्टीवर विचार करतात .. काय फरक पडतो . . मिपा पण असिह्ष्णू झालंय खरं

आम्ही नै जा जिलबी थंड झाल्या आता

In reply to by मांत्रिक

बाकी सातारला कट्टा करायचाय! तू, चिमणराव, टका, नाखु, बॅटॅ यांना भेटायचंय एकदा! ये, मस्त सातारी मटण बनवू!!!

In reply to by सतिश गावडे

ओ सगाण्णा मी मूळचा सातारचा! ठाण्यात सर्विसला! तुमी पण या की राव सातारला! मस्त चुलीवरचं मटण आणि भाकर्या बनवू. तुम्ही कोकणातले नं? बहुतेक अस्सल सातारी टेस्ट नसेल केलं. एकदा या राजे. कट्टा करु!!! हाटेलात सातारी कोलापुरी मिळतं ते फ्राॅड असतं हे माझं मत. एकदा या सातारला राजे. पुढच्या डिशेंबरात सलग ४ सुट्ट्या आल्यात. मी गावी असेन. भेटू मग!!!

In reply to by मांत्रिक

दीड वर्षांपूर्वी मार्कस ओरेलियसची डायरी वाचली नसती तर आमंत्रणाचा स्वीकार केला असता. :) कधी काळी सातारला पायपीट करुनही पवई नाक्याच्या आसपास मांसाहारी हॉटेल सापडले नव्हते.

In reply to by सतिश गावडे

ऑ? आहो आमचं हाटेल नाहीये!!! घरी या म्हणतोय राजे!!! बाकी पवई नाक्यावर मराठा दरबार हे बेस्ट नानव्हेज हाटेल सापडलं नाही?

In reply to by मांत्रिक

मराठा दरबार आम्ही उतरलो होतो त्या रजताद्रीच्या डाव्या हाताला* होतं. मात्र "मला सटरफटर खावे लागेल तिथे" असे आमच्या शाकाहारी मित्राचे म्हणने. *"डाव्या हाताला" हा शब्द समुच्चय वाचला की कोकणातली "डाव्या हाताला तोंड जवळ" ही प्रसिद्ध म्हण आठवते.

In reply to by मांत्रिक

पुढच्या डिशेंबरात सलग ४ सुट्ट्या आल्यात. मी गावी असेन. भेटू मग!!!
अरे वा.. आम्हाला विसरु नका राव. आम्हीपण आहोत डिसेंबरमध्ये सातार्‍यात तेव्हा. काय ठरलं तर सांगा .. किमान भेटू तरी नक्की. (प्यारे चचा.. सातार्‍यात असला तर बोला तुम्ही पण भेटूयात. )

In reply to by बॅटमॅन

कैच्या कै. मांत्रिक नं चूल विझली तरी मटनाचा रस्सा पातेल्यात घालून चादर पसरून ठेवलीय. काय ते करा एकदा. मांत्रिक भो, तारखा कळवा, आम्ही पण येऊ.

असहिष्णुता!!!! . . . ज्यांचे डुआयडी आहेत त्यांनी ते या मोक्यावर मिपास परत करावेत. (माझा आहे/नाही)

मोठा लेख असेल, काही सन्दर्भ असतील आणि काही निष्कर्ष. धागा उघडला आणि हौस झाली, धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपेक्षा फार मोठया नसल्या की अपेक्षाभंगाचं दुःख सहन करावं लागत नाही. मोगरा फुलला - गो नि दांडेकर

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हौस झाली
हे काय सरजी? हौस झाली म्हणजे पोपट झाला टाईप का? फस्टाईम ऐकलो ब्वा.

रामायणात रामाने रामेश्वर येथील वाळूचे शिवलिंग स्थापियाले असा उल्लेख आहे रामेश्वर हे कन्याकुमारी जवळ आहे. म्हणजेच आताची श्रीलंका म्हणजेच लंका होय आसे वाटते

अंतर फार असल्याने १९७१ चा धागा आता निघाला.चित्रकुटावर घेतलेले कपडे फाटले मग पिपलीला मस्त रंगीत घेतले पण वाटेत माकडांनी ओरबाडले,शेवटी मदुराइला लुंग्या घेतल्या,डोसे खाऊन धनुष्कोडीला पोहोचलो.होडीतून जाताना फार भीती वाटत होती. हवामान खात्याने पाच नंबरचा बावटा लावलेला.होडी वर खाली होताना सेतू दिसायचा खालचा.बाब्बो काय ते आर्किटेक्चर! तोंडात बोटे घातली पण खारट लागली ,हात लुंगीला पुसले.किनाय्रावर रावणाचा १०००---००वा नातू आला होता स्वागताला. जव्हेरकँडीला हॅाटेलात उतरायची व्वस्था केली होती.बारतातून आलेल्या संसोदकांची इकडेच व्वसथा करतात.हॅाटेलच्या बाहेर पडू देत नाहीत.जाताना एक तयार प्रोजेक्ट रिपोर्ट हातात ठेवला.तो तुमच्यासमोर ठेवला आहे त्याचे काळजीपूर्वक वाचन करावे हीविनंती.

हे बघा, एक्का काका स्वतः श्रीलंकेला जाऊन आलेत. तिथे अशोकवन आहे की नाही विचारा. :)

सग्ळे मिप्पाकर मेल्ले अग्दि दुष्ट्ट आणि असहिष्णु आहेत. 'तुम्हाला काय वाटते ?' असे विचारले तरी त्याबद्दल कुण्णी कुण्णी काही सांगत नाही.

अशोकवन हे दहिसर येथे आहे. हा दुवा बघा. इथे उत्खननात सीतेची राखण करणार्‍या राक्षसिणींची हाडे मिळाली होती म्हणे.

दुवा पाहिला. अशोकवन दहिसरला होते आणि आहे हे पटले. मग शबरी आरे कॉलोनीत रहायची हे ऐकले हे खरे काय? अवांतर: अशोकवनात उद्वाहक (उर्ध्वगामिनी ) तेव्हा होता काय? बाकी हा अतिशय अभ्यासपूर्ण धागा आवडला.

मी तर आत्ताची ऑस्ट्रेलिया म्हणजे खरी लंका आणि ही जी जावा - सुमात्रा बेटे आहेत तो रामसेतु आहे असं वाचलं होतं .... दुवा मागू नये !!

लाटकर साहेबांनी सांकलिया यांच्या लेखाचा संदर्भ दिला असता तर बरे झाले असते . सांकलिया यांचा लेख बरेच वर्षा पूर्वी वाचला होता. तेलुगु आणि कदाचित इतर द्रविडी भाषांमध्ये लंका हा शब्द मोठ्या नद्यांमध्ये आढळणार्या बेटा साठी वापरतात. सांकलिया साहेब यांनी दंडकारण्या मधील अशा एखाद्या बेटांचा उल्लेख रावणाची लंका असा केला असावा. अशा मोठ्या बेटांवर मनुष्यवस्ती असते. उदहरणार्थ ब्रह्मपुत्रा नदीत सध्या ४२१ कि. मी . क्षेत्रफळाचे लोकवस्ती व शेती असलेले मजोली नावाचे बेट आहे . लहानपणी आईच्या तोंडी -लंकेची पार्वती- असा शब्द प्रयोग ऐकला होता. बहुधा तो दागिने अथवा आभूषणे न घालणार्या स्त्री साठी वापरला जात असावा. ही कोणती लंका आणि तिथे रहणारी मंदोदरी अथवा सीता यांच्या शिवायची ही कोणती पार्वती याचा खुलासा कोणी करू शकेल काय ? अयोध्या ते कन्याकुमारी हे ३००० कि. मी . श्रीराम यांनी कसे पार केले असेल असे श्री लाटकर यांनी विचारले आहे. त्या वरून मथुरा ते द्वारका हे १३०० कि. मी . श्री कृष्णाने साधरणत: त्याच कालखंडात कसे पार केले असा प्रश्न निर्माण होतो. मात्र या बाबतीत दुसरे एक पुरातन शास्त्रातील विद्वान, एस . आर . राव, यांच्या द्वारकेच्या समुद्रात केलेल्या उत्खनन कामाने सकृददर्शनी पुरावा उपलब्ध झालेला आहे