Skip to main content

पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 18/11/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
पिंगा. येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू. मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता. बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो. गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच. भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला? मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा! तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा! असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका) तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही. पिंगा नेमका कधी घालतात? या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही. या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे. मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो. पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला वेल्ला भट

वाचने 105837
प्रतिक्रिया 344

प्रतिक्रिया

In reply to by काकासाहेब केंजळे

ही बाई डोक्यावर पडलीये का? असल्या स्वतःला 'पुणेरी मुलगी' म्हणवणार्‍या छप्पन पाह्यल्यात. त्याचा अभ्यास किती गंडलाय हे तुला कळतंय का बयो?

In reply to by सूड

शूक !! असं नाही म्हणायचं सूड भौ !! लिबरल वागायचं ! पेशवाईतल्या बायका मंगळागौरीला लावणी वर खेळ करत होत्या ! अस्सल पेश्वयांना काय कळतंय बायकांचं मन? पेशवाईतल्या बायकांचं स्वातंत्र्य , सवतीला घेऊन लावणी करण्यात सामावलेलं होतं. ती काव्यात्मक लिबर्टी घेऊन भंसाळी ने एक प्रकारे पेशवीणींना मरणोत्तर न्याय दिलाय. त्या बाजीरावाशी एकनिष्ठ राहताना मस्तानी आजुबाजुच्या वातावरणात खुप होरपळली पण तिला पण वाड्यात आणुन नाचवलंय... कसली आलीये शोकांतिका.. सिनेमामध्ये तिघेजण एकत्र शनिवारवाड्यात नांदताना पण दाखवत असतील. काव्यात्मक न्याय , यु नो !! उरलं सुरलं काम ऐनापुरे बाई करणारेत सगळ्यांना लिबरल बनवुन.

अनारकली हे कल्पित पात्र आहे तर मस्तानी हे खरे. .बाय द वे , आपल्याकडे बाकी पण्डित आहेत मस्तानी काय घालत असेल ते सांगायला. त्या फारिनच्या मडमा इथे सूना बनून येतात तवा चौपाटिवर काय ते बिकीनी का काय घालून फिरतात का वो?

In reply to by भंकस बाबा

अहो बाबा , अनारकली ही ड्रेसची पॅटर्न आहे. आधीच्या काळातील मुस्लीम नर्तकीचा पेहेराव .

काशीबाई यांनी लावणी पद्धतीचा नाच केल्याचे संजय लीला भन्साळी यांनी दाखवल्याचे वर काही प्रतिसादात आले आहे. उद्या या भन्साळी साहेबांनी शहाजहान आणि मुमताज महल यांच्या वर चित्रपट काढायचे ठरवले तर त्याना त्या चित्रपटात, आपल्या या सेक्युलर देशात, मुमताज महल यांचा मुजरा नाच दाखवण्याची हिम्मत होणार आहे का ?

In reply to by रमेश आठवले

इतकं लांब कशाला जाता? उद्या शिवाजी महाराजांवर सिनेमा झाला, आणि सईबाई किंवा अष्टराज्ञींपैकी कुणाचाही असा नाच दाखवला तर चालेल का? तशी हिंमत होईल का?

In reply to by वेल्लाभट

अहो पेशवे म्हणजे काय, कुणीही उठावे आणि काहीही बोलावे...कोण विचारतो, नै का? पण त्यासोबत "रणबीरसिंग बाजीराव शोभत नाही, त्याजागी कुणी पुणेकर घ्या" वगैरे कमेंटी होत्या, मी विचारले की बॉ पुणेकर सोडून बाकी कुणाला जमणार नाही का? तर म्हणे जमलं की कळवा... म्हणजे स्वतःच्या हातानेच अशी माती करून घ्यायची, पेशव्यांना पुण्यापर्यंतच मर्यादित ठेवायचे आणि वर गळे काढायचे की त्यांना कुणी भाव देत नाही म्हणून. आहे की नै मज्जा?

In reply to by वेल्लाभट

यांची गाडी आली शिवाजी महाराजांवर,पेश्व्यांचं चालू आहे तर् तेवढ्याचीच चर्चा करा कि,लगेच महाराश्ट्राच्या आराध्य दैवताला मधे आणायची गरज काय?

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट'जी
इतकं लांब कशाला जाता? उद्या शिवाजी महाराजांवर सिनेमा झाला, आणि सईबाई किंवा अष्टराज्ञींपैकी कुणाचाही असा नाच दाखवला तर चालेल का? तशी हिंमत होईल का?
म्हणजे कुणाला चालेल का? म्हणजे पेशवे तुमचे अन् महाराज आमचे? म्हणजे तुम्ही सोशीक अन् आम्ही डांबरट?

( आंतरजालीय लेखिका शेफाली वैद्य याकडून साभार) असाच चित्रपट जर नेहरूंवर काढूल त्यात असेच "विचारस्वातंत्र " घेतले तर ??? -------- माझे म्हणणे खरेच मजा येईल . काँग्रेसी लोकांची तर त्रेधा उईल . पण त्यात बहुदा देशी आणि विदेशी आयटम्स चा ग्रुप डान्स दाखवावा लागेल .. आणि लॉर्ड माउंट"बॉटम" बद्दाल की दाखवणार ?? विचारच करवत नाही .... हा चित्रपट बहुदा महेश भट किंवा कांती शाह लाच काढवा लागेल ...

In reply to by कपिलमुनी

आक्षेप नोंदवला आहे

बौद्धिक दिवाळखोरी दुसरं काय? असलं काहीही Cinematic liberty च्या नावाखाली खपवायचं! आश्चर्य वाटतं ते अशा महत्वाच्या गोष्टींना "चालतं" या सदरात टाकणारयांचं!

उद्या महाराजांवरच्या पिच्चरामध्ये असे दाखवलेले चालेल का? असा प्रश्न पाहिला , जरा खोदकाम केले आणि १९५३ सालच्याच भालजींच्या छत्रपती शिवाजी नामक सुपरहिट्ट पिच्चरात सईबाई-सोयराबाई यांचे गाणे दिसलेदेखील. =)) =)) तेव्हा सवती कशा एकत्र येतात वगैरे प्रश्न भालजींना पडले नसतील का? हां आता त्यांचा पेहराव वगैरे या गाण्यातल्यासारखा नाही तो भाग वेगळा.

In reply to by बॅटमॅन

थँक्स फॉर द इनपुट ! :) बट तेंव्हा वेगळ्या साहेबांचा प्रभाव (नुकताच ओसरत) होता, आणि आताचे साहेब वेगळे(वेगळे) आहेत. सो... वेल.....यू नो....व्हॉट आय मीन.

In reply to by बॅटमॅन

सई बाई आणि सोयराबाई एकत्र येत नसतील असे वाटत नाही. कदाचित त्या काही काळ एका किल्यावर पण राहिल्या असतील. तेंव्हा अनेक बायका ( त्या सुद्धा राजे लोकांना ) असणे ह्यात काही विषेश नव्हते. १०० वर्षापूर्वी पण असे असायचेच आणी त्या सवती एकाच घरात रहायच्या. भालजींनी गाणे एकत्र दिले होते, त्यात त्यांना नाचताना दाखवले होते का? म्हणुन हे उदाहरण आणि तुलना गंडलेली आहे.

In reply to by प्रसाद१९७१

जरा वेळाने गाण्याची लिंक टाकतो. पिंगासारखे नाचणे नाहीये इतके मात्र आठवते. कुठेतरी खांबांचा आधार घेत दुसरीकडे नजर लावणे, इ. प्रकार आहेत त्याप्रमाणे.

म्हातारी मेल्याचे दुख्ख नाही , पण काळ सोकावतो .

To be.... or not to be.... that is the question !!! जगावं की मरावं हा एकंच सवाल आहे !! कुणी मिसळ देता का मिसळ ? हो मिसळ... मामलेदाराची चालेल... फडतरेची चालेल..वैद्याची चालेल.. प्रभांची पण चालेल.? एका मिसळप्रेमीला तुफानाला कुणी मिसळ देतं का ?मिसळ... एक तुफान … कांद्या वाचून …. तर्री वाचून …. मिसळेच्या मायेवाचून …देवाच्या मिसळी वाचून … गावा गावातून हॉटेलात हिंडते आहे … मिसळ चापताना जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धूंडतं आहे … कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?..तर्रीवाली मिसळ..असा तवंग हवा तेलाचा तर्री वर....पावाच्या लाद्या हव्या.लिंबाच्या फोडी हव्यात...ग्लास भर ताक हव.....पहिल्या घासात ठसका हवा..मिसळ..हो मिसळ .....कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?.. मिसळ सम्राट.. निवृत्त मामलेदार बापुसाहेब भन्साळी मिसळकर (नाट्य लिबर्टी)....

हे पहा भन्साळिसाहेबाचे या विषयावरचे मत. http://www.loksatta.com/manoranjan-news/ranveer-singh-deepika-padukone-can-not-take-their-eyes-off-each-other-in-new-bajirao-mastani-poster-1161934/ आणि हे "http://www.loksatta.com/manoranjan-news/baji-rao-mastani-based-on-rau-1161826/"> वर या अभिव्यक्ति स्वात्नत्र्याच्या गप्पा. "http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/bajirao-mastani-pinga-sanjay-leela-bhansali/articleshow/49848186.cms"> म्ह्णजे कुणी विरोध केला तर हे साहेब अभिव्यक्ति स्वात्नत्र्याची गळचेपी म्ह्णायला रिकामे. देशात असहिष्णु वातावरण आहेच, त्यात याची भर. बाय द वे पुरस्कार परतीची फ्॔॓शन सम्पली वाटत.

२००

जे खपतंय ते विकतंय. हिंदी सिनेमात निम्मा वेळ हेरोइन कमी कपड्यात दाखवावीच लागते. नाही तर १०० कोटी चा क्लब कसा मिळेल? राहता राहिला २ बायका एकदम नाचताना दाखवण्याचा विषय. अहो 'नो एन्ट्री' सारखे पिक्चर येउन १० वर्षे होऊन गेली. औफ़िशिअलि लफडी करायला प्रोत्साहन देणारे पिक्चर बरीच वर्षे येतायत. बाजीराव-मस्तानी फक्त पब्लिसिटी साठी. एकदा का 'भावना दुखावल्या' कि फुकटात प्रसिद्धी. असले पिक्चर्स अनुल्लेखाने मारायला हवेत. विरोध केल्याने यांची प्रसिद्धीच जास्त होते. तसे 'पेशवे-द्वेषी' आणि ब्रिगेडी टोळ्या खुश असतील, पण ते त्यांचे कुंपण आहे, त्यापलीकडे कधी कधी गेलेत का ते? कशाला मनावर घ्या?

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

सर्वज्ञजी, नो एन्ट्री आणि इतिहासामधील कथा घेऊन चित्रपट बनवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नो एन्ट्रीमध्ये सेन्सॉर बोर्डाने संमती दिली की वाट्टेल ते दाखवता येते. तसे चित्रपटही चालतात. पैसे मिळवून देतात पण ऐतिहासिक कथानक हाताळताना जबाबदारी असते. मूळ कथेला धक्का न लावता तशीही उपकथानके जोडलेली असतातच की! भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही. ब्रिगेडी खूष असतील की नसतील याचा विचार डोक्यातही नाही. ते उद्या आणखी कश्यानेही खूष होतील! यात महत्व भन्साळी, ब्रिगेड, प्रसिद्धी, गल्ला याचा नाहीच. असलाच तर तो ऐतिहासिक संदर्भ बदलल्याचा आहे. जौदे म्हणणे हे तर आहेच. आता समजा त्या गाण्यावर काहीच कार्य्वाही झाली नाही तरी माझ्यासारखे अनेकजण पेशव्यांचा शिनेमा असल्याने पहायला जाणारच! ते तसेही जाणारच होते पण कोणत्या चुकीच्या गोष्टीला लोकांकडून किती जोरात विरोध होतोय यासाठी आज नाही दहा वर्षांनी भन्साळीसारखे लोक जरातरी बिचकून असतील. नैतर मोकाट सुटलेले वळू आणि म्हशी यांची कमतरता नाहीच! अनुल्लेखाने मारलेलं आजकाल कोण किती मनावर घेतं. बरेचजण निर्ढावलेले आहेत.

In reply to by रेवती

समजतंय. पण जर आपण सगळे अशी चिखलफेक करायला लागलो तर फरक काय राहिला? आजकाल गटारात जास्त आणि रस्त्यावर कमी आहेत. ते आपल्या अंगावर फेकतात म्हणून जर आपण गटारात उतरायला लागलो तर काम बाजूला राहिलं केव्हा आपली इज्जत गेली ते कळणार सुधा नाही. फार विचित्र गोष्ट आहे हि पण आता काय करणार. हा धागा निघाला म्हणून मला या सिनेमाचे नाव समजले. खरं तर हिंदी सिनेमा थेटर मध्ये जाऊन बघणं मी १५ - २० वर्षांपूर्वी सोडून दिलंय. सध्या भारतात नसल्यामुळे तो प्रश्न पडत नाही पण इकडे ३०-४० मैल तुडवत जाऊन थेटरात 'दबंगाई' करणारी जनता आहे, मला कधीही त्यांच्यात सामील व्हावेसे वाटले नाही. हे मी कुणी 'वेगळा' आहे म्हणून सांगण्यासाठी नाही. एकूणच आपली जनता फालतू माल आधी घेऊन त्याबद्दल आरडा ओरडा करून परत पुढच्या वेळी त्यांच्याच दारात जाऊन उभी राहते, या गोष्टीचे मला वाईट वाटते. आणि माझे हे विचार कोलेजात असतानापासून आहेत. ६.५ रुपयात एकदा मंगलाला 'प्यार तो होना हि था' चे टोर्चर सहन केले त्यानंतर जे डोळे उघडले ते कायमचे. आणि जे चित्रपटाच्या बाबतीत ते बाकीच्या गोष्टींच्या बाबतीतही. झोपतात न चितळे १ ते ३, झोपू द्या. बाकीची दुकाने आहेतच कि. दुर्वांकुर आणि लकी छान होते, त्या वेळी लाईन मध्ये उभे राहून 'बैठका' केल्या आहेत. क्वालिटी घसरली कि रेस्पोंस घसरायला हवा. तरच सेवा त्या दर्जाची मिळते. आपण आपली किंमत नाही ठेवली तर काय उपयोग? असो. विषय फार बदलू नये म्हणून.....माझे असे वैयक्तिक मत असे आहे कि असल्या फालतू पिक्चर च्या डायरेक्टर लोकांना आणि न्यायालयांना पत्र पाठवून फार फरक पडेल असे वाटत नाही. आपण आपली वाट चालणे योग्य. हाथि चले बजार, कुत्ते भोके हजार. आपण 'हाथी' कि 'कुत्ता' हे आपल्या हातात आहे.

(संदर्भ - भन्साळीचे पिंगा गाणे) पहिला मित्र: ही मंगळागौर काशिबाईंची होती की मस्तानीची? दुसरा मित्र: ही काशींची मंगळागौर नाही, तर मंगळागौरीची काशी होती. (WA वरुन साभार)

ज्या मिपाकरांचा ह्या प्रकाराला विरोध नाही, त्यांनी पुढे वाचू नये. त्यांनी खुशाल वाट्टेल ते करावं. ज्या मिपकरांच्या भन्साळींच्या ह्या अश्लाघ्य प्रकाराला विरोध (कडाडून किंवा साधाच) असेल. त्यांना- सॉल्लिड चर्चा. असल्या ज्वलंत आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण चर्चा झालेली बघून बरं वाटलं. बरं, मग शेवटी काय ठरलं? भन्साळींना निषेधाचे खलिते पाठवायचे ? त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालायचा? कोर्टात याचिका दाखल करायची? की भन्साळींना कोपच्यात घ्यायचं, आणि काळं फासायचं इन शिवसेना स्टाईल? कारण ह्यापैकी काहीच होणार नसेल तर मग इतकी उद्बोधक चर्चा होऊनही दुर्दैवाने काहीच उपयोग होणार नाही. मग कट्टर विरोध असणार्‍या मिपाकरांपैकी कुणी काही अ‍ॅक्शन घेणार आहे का? प्लीज कळवा. भन्साळींसारख्या चित्रपट दिग्दर्शकाला कळायला हवं की मराठी लोक किती बारकाईने कुठे कुठे लक्ष ठेवून असतात आणि त्यांचं रक्तही खवळू शकतं.

In reply to by सूड

तुम्ही बहुतेक भन्साळीचे आधीचे चित्रपट पाहिले नसावेत किंवा तरीही त्याच्याकडून तुमच्या फारच अपेक्षा असाव्यात. किमान गुझारिश तरी बघाच! ते जाऊ दे. चित्रपटात काहीही दाखवू शकतात- ती काही विषयाला धरून बनवलेली डॉक्युमेंटरी नाहीये, ऐतिहासिक सत्य वगैरे दाखवायला. 1942 a love storyच्या वेळीही लोकांनी असलाच शॉट दिला होता- की स्वातंत्र्यसंग्रामाच्या गौरवपूर्ण वर्षाचा संबंध इतक्या हलक्या दर्जाच्या प्रेमकथेशी कसा लावू शकतो वगैरे. common,१९४२ मधे काय लोक फक्त होलसेल देशभक्ती करून राहिले होते? इथेही तसलंच काहीतरी चालू आहे. एका " बॉलिवूडच्या १००% व्यावसायिक चित्रपटातल्या गाण्यातल्या नाचाचा" संबंध डायरेक्ट इतिहास वगैरे गोष्टींशी जोडला जातोय. तेव्हा खरंच जर विरोध वगैरे करणार असाल तर एक मेजर LOL. keep it up!

In reply to by भृशुंडी

विरोध म्हणजे काय समजलेत...? उद्या कुणीही उठून मराठ्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढेल ते चित्रपट-अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली गप बसून बघत राहायचं. साहेब, इथे कोणी त्याचं शीर कलम करायचा फतवा काढलेला नाहीये. 'आम्हाला हे पटलेलं नाही' असा साधा, सभ्य, सुसंस्कृत विरोध करत आहेत तर त्यालाही आपण नाक मुरडताय? वर कुणीतरी आतली खबर दिल्याप्रमाणे हा एन्डींग टायटल मामला असेल. मला चित्रपटात काय दाखवले याचे आता सोयरसुतक तर नाहीच, पण जास्त राग आता 'लोकांनी विरोधसुद्धा करू नये' म्हणणार्‍यांचा येत आहे. पुढचे अजिबात व्यक्तिगत घेऊ नका: समजा उद्या तुमच्या/माझ्या घराण्यावर कुणी चित्रपट काढला आणि माझ्या/तुमच्या आजीला वेश्या दाखवून कोठ्यावर कुल्ले हलवणार्‍या बाईंच्या रुपात दाखवले तर ती सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून सोडून द्याल? त्यामध्ये आजीची भूमिका सनी लिओनने केलीतर चालेल का? माझ्या/तुमच्या घराण्यावर कुणीतरी चित्रपट काढतेय ना, ह्या हर्षोल्हासात हे माफ कराल? एखाद्याला पैसे कमवायचे आहेत म्हणून त्याने तुमच्या/माझ्या अब्रूचे धिंडवडे काढावे आणि आपण गप्प बसणार का? याच न्यायाने अखिल भारतात मराठी सत्तेचा डंका वाजवणार्‍या पेशवे कुटूंबाला आपलेच कुटूंब, त्यांची अब्रू ती मराठी अब्रू समजून इथे कोणी विरोध नोंदवत आहेत तर ते चुकीचे कसे? कि अब्रू वैगेरे झूट असते तुमच्यामते? भंसालीने काढलेला सिनेमा किमान अडीच हजार चित्रगृहांमधे किमान दोन आठवडे बघितला जाईल. त्यानंतर तो अगणित वेळा टीवीवर येईल. लाखो लोक हा सिनेमा बघतील. लक्षात घ्या हा काही एक रात पुरानी हवेलीमें टाइप डी ग्रेड चित्रपट नाही जो कुठे आला-गेला कळणारदेखील नाही. ९० नंतर जन्मलेली पिढी तसेही इतिहासासोबत फार सख्य ठेवून नाही आहे. त्यांना ह्या चित्रपटात दाखवले तेच सत्य वाटले तर त्याचा प्रभाव चुकीचा असणारच. भंसाली सुरुवातीस एक पाटी दाखवून मोकळा होईल की 'ये एक काल्पनिक कहानी है'. आधीच मराठी इतिहासाबद्दल इंग्रजांनी वाट लावून ठेवली आहे. त्यात भंसालीसारखे नतद्रष्ट स्वतःच्या धंद्यासाठी आणखी विकृती आणणार. अरे, चाललंय काय? तिकडे परदेशात बघा लोक कसे इतिहास जपतात म्हणून कोडकौतुक, इथे साध्या गोष्टींचा विरोध केला तरी बोंबाबोंब. माझ्यामते संपूर्ण चित्रपटाचा विरोध करायचा असेल तर महाराष्ट्रातून कुणीच चित्रपट बघायला जाऊ नये. त्याच्या धंद्यावर परिणाम होवो न होवो, पण मराठी लोक फालतू धंदे सहन करणार नाहीत असा संदेश गेलाच पाहिजे. गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या कुप्रसिद्धिचाही फायदा त्यास मिळू नये असे झाले तरच एवढ्या सगळ्या काथ्याकूट, विरोधाचा काहीतरी परिणाम झाला असे मानावे. मध्यंतरी सोनिया गांधीवर चित्रपट निघणार होता, इटलीची सुप्रसिद्ध (इफ यु नो वाट आय मीन) अभिनेत्री मोनिका बेलुची हिला सोनिया गांधी च्या भूमिकेत घेणार होते. पण मोनिका बेलुची हीची पुर्वकारकिर्दीनुसार असलेली इमेज सोनिया गांधींच्या आताच्या राजकिय इमेजशी म्याच झाली नसती म्हणून चित्रपट बारगळला. त्यामागे सोनियांचा बारटेंडर म्हणून असलेला पुर्वेतिहासही काँग्रेससाठी डोकेदुखी ठरला असता. कारण आपल्या कडे बार टेंडर, बारगर्ल, बार-डान्सर, कॉलगर्ल सगळे एकच समजले जाते. चित्रपट पाहून लोकांनी सोनियाला भलतेच समजले असते तर देशाच्या सर्वात मोठ्या सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च महिला नेत्याबद्दल असा समज योग्य नसता म्हणूनही हा चित्रपट बंद करण्यात आला. आता बोला इथे सिनेमॅटिक लिबर्टीबद्दल बोंबाबोंब का झाली नाही? मी स्वतः एक कलाकार आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्य जपतांना कलाकारास सामाजिक भान असणे सर्वात जास्त आवश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कारण हे स्वातंत्र्य त्याला त्याच समाजाकडून मिळत आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. चित्रपट व्यावसायिक म्हणून भंसालीने पोर्नोग्राफीही करावी, कुणास न माहित असलेला खरा इतिहास खोदून खोदून तो मांडावा, कुणाचा विरोध नाही त्याला, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण समाजाच्या अस्मितांना वेशीवर टांगण्याचा हक्क कोणासही नाही. एका चित्रपटाने असे काय होईल असे विचाराल तर म्हणेन, काळ सोकावतो. त्याबद्दल चिंता आहे म्हणून विरोध.

In reply to by संदीप डांगे

हा जर विरोध करणार्‍यांचा असा प्रातिनिधिक प्रतिसाद असेल तर तो मेगा LOL आहे. असो, प्लीज तुमचा "इतिहासाच्या विकृतीकरणाचा" आणि "पेशवे घराण्याच्या अब्रूच्या धिंडवड्यांचा" विरोध चालू ठेवा. Sometimes things become so ludicrous that they are not even funny anymore.

In reply to by भृशुंडी

ओके. फाइन. विरोध करणारे करत आहेत. त्याविरूद्ध पोटदुखी होणार्‍यांना काय प्रॉब्लेम आहे? विरोधक करणारांना हास्यास्पद ठरवण्याची खुमखुमी तुम्हाला का होत आहे? विरोध करूच नये अशी तुमची भूमिका आहे का? मग तुम्ही तरी विरोध करणारांचा विरोध करायला इथे का कडमडला आहात?

In reply to by संदीप डांगे

माझी भूमिका ? इतकीच आहे की हे जे विरोध वगैरे चालू आहे ते बालिश आणि १००% हास्यास्पद आहे, lolworthy if I may say so. आणि त्याला माझा मुळीच आक्षेप नाही. त्यांनी विरोध करावा, निषेध करावा, चित्रपटावर बंदी आणायलाही हरकत नाही. बाकी इथे कडमडणे - सांगवीकर म्हणतो तसं जर उदया प्रत्येक ओळ लिहिण्यासाठी दहा हजार रूपये लागत असतील, तर कोण कशाला काही लिहायला जाईल? तेव्हा ते एक असोच.

In reply to by संदीप डांगे

अहो शिष्यवर्य, विरोध करणं हे बालिश आहे म्हटलं हो. विरोधाची पद्धत नाही. पण तुम्ही खरंच तुमचा (प्रखर!) विरोध आणि ह्या चर्चा चालू ठेवा. अतिशय मौलिक, महत्त्वपूर्ण अशी सगळी ही चर्चा आहे.

In reply to by भृशुंडी

विरोध करणं हे बालिश आहे म्हटलं हो
प्लीज एलाबोरेट इफ यु कॅन. आपल्याला जी गोष्ट चुकीची वाटते त्याला विरोध करणे बालीश आहे की एखादी गोष्ट चुकीचे वाटणे बालिश आहे की अजून काही. - विरोध करणार्‍यांना विरोध करून विरोध करणेच बालिश आहे असं म्ह्णणार्‍या श्रेष्ठ गुरुंचा नम्र शिष्य

In reply to by संदीप डांगे

Sorry, I don't have to elaborate anything. माझा विरोध बिरोधाला अजिबात विरोध नाही, उलट सॉल्लिड पाठिंबाच आहे- हे तुम्ही वटवाघूळ नसाल तर तुम्हाला कळायलाच पाहिजे होतं. आता गुरूदक्षिणा म्हणून एक कराल का? जरा कमी टायपत जा इथे, आणि रिलॅक्स.

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मिपावरची चर्चा वाचून संजय लीला भन्साली यांना आपल्या हातून घडलेल्या ऐतिहासिक प्रमादाची जाणीव झाली असल्याचे कळते. त्यामुळे आता चित्रपटात 'पिंगा' हे गाणे चालू असताना खालीलप्रमाणे पाट्या दाखवण्यात येतील. १) पेशवाईमें बम्मन स्त्रियाए इस प्रकार की नउवारी नही पहना करती थी, बल्कि पेट पुरी तरह से कव्हर करनेवाली नउवारीयां पहनती थी २) पेशवा स्त्रियाए डान्स नही करती थी, बल्कि (बहुत आग्रह किया तो) ज्यादासेज्यादा फुगडी खेलती थी ३) बाजीराव पेशवा ने मस्तानी के साथ शादी करने के अलावा और भी कई बडे काम किये थे ४) मंगळागौर में पिंगा नही, 'दिंडा' खेला जाता था याखेरीज कुणाला इतर आक्षेप असल्यास कृपया धाग्यावर नोंदवावेत, म्हणजे भन्सालीसाहेबांना त्याची नोंद घेता येईल.

मोर्चे काढ़ा, दगडफेक करा, इथे मिपावर प्रतिसादाचा कीस पाडा, गेलाबाजार त्या असहिष्णुवाल्यासारखे डेलिगेशन घेऊन जा, मोदी सरकार हायहाय म्हणून घोषणा दया. अरे पण ते पिक्चर तर रिलीज़ होउ दया. पहिल्या बाजीरावावरचि पुस्तके तर वाचा आणि हो आदर्श ठेऊ नका. कारण युद्धावर पराक्रम वैगेरे राहिला दूर ते दोन बायकाचेच तेवढे लक्षात ठेवतील आपली लोकं. तसेपण दुसऱ्या बाजीरावाचे पुस्तक न वाचताच त्याचा आदर्श घेऊन कृति करणारे बरेच लोकस्स आहेत आपल्याकडे! कृपया ही वैयक्तिक टिका नाही☺ ते मस्तानीला काय विरोध वैगेरे होता तो तिला बायको करुन घेण्याबद्दल होता वो, लिव इन चाल्ल्ल अस्त लोकाइली.

In reply to by वेल्लाभट

पण त्या बाजीरावाच्या पात्राचा आवाज म्हणजे थोडा 'हे'च वाटतो ना. बाजीरावकी तलवार, प्रेम है ऐय्याशी नहि वगैरे डायलॉग 'ए चाय गरम चाय गरम' किंवा 'दसा का बीस दस का बीस" स्टाईलचे वाटले.

खूप चर्चा झाली आहे, आता जरा एक वेगळी बाजू म्हणून लिहीत आहे. चित्रपटाच्या गुणगौरवामध्ये अथवा टीकेमध्ये भाग घेण्याचा हेतू आणि इच्छा नाही. तर, तीनशे साडेतीनशे णेवर्षांपूर्वी, कोंकणातल्या एखाद्या सर्वसाधारण ब्राह्मण स्त्रीचा पेहेराव कसा होता असेल? मला वाटते की गाठीची चोळी आणि नऊवारी आखूड ओचे खोचलेले लुगडे असा असेल. कोंकणातल्या उष्ण-दमट हवामानात शालीची जरूर नव्हती, उलट अडथळाच होता. शिवाय चार महिने बदाबदा पाऊस. आणि कोंकणातले ते सुप्रसिद्ध अठरा विश्वे दारिद्र्य. घुंघट किंवा डोक्यावरून पदराची पद्धत नव्हतीच. मोठ्या माणसांसमोर यायचे झाले तर दोन्ही खांद्यांवरून पदर मात्र असावा. बाकी दारिद्र्यास अनुसरून प्रत्येकाला काम करावे लागतच असणार. त्यावेळी सोय म्हणून पदर खांद्यांवरून न घेता कंबरेला खोचतच असतील. (पदर खोचणे हा वाक्प्रचार त्यावरूनच आला असेल काय?) पुढे पुण्यात थंडीमुळे शाल/शेला यांची भर पडली असावी. चोळीच्याऐवजी लांब पोलके (याला मराठीत झंपर म्हणत असत. मात्र, काही ठिकाणी परकरालाही झंपर म्हटलेले ऐकले आहे. पण नऊवारी काळात परकर नव्हता. इंग्रजी जंपर-पिनॅफर वेगळा) घालण्याची पद्धत महाराष्ट्रात नसावी. पोर्ट्रेट्साठी मुद्द्दाम केलेल्या पेहेरावावरून सरसकटीकरण करणे तितकेसे योग्य नाही. रोजच्या कामकाजाचा पेहेराव वेगळाच असणार. लांब पोलक्याची पद्धत एकोणिसाव्या शतकातल्या सुशिक्षित पारसी बायकांत प्रचलित होती. बंगाली बायकाही अशी दोन्ही बाजूंना अगदी छोटी स्लिट, छाट असलेली पोलकी घालीत असत. या स्लिट मुळे पदर वर खांद्यावर टाकणे सोपे होई. ही पोलकी म्हणजे राजस्तान वगैरे प्रांतातल्या कमीज किंवा कुडतीची मिनीमिनी आवृत्ती. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी कुलीन सुशिक्षित स्त्रिया नुकत्या नुकत्या सभासंमेलनांसाठी बाहेर पडू लागल्या होत्या तेव्हाच्या त्यांच्या फोटोत अशी लांब पोलकी दिसतात. मराठीतल्या अगदी जुन्या सामाजिक सिनेमातही दिसतात. बायका एरवी (अंगकामाच्या वेळा सोडून) दोन्ही खांद्यावरच्या पदराने वावरत असल्या तरी मंगळागौरीचे खेळ खेळताना तो पदर कंबरेला घट्ट खोचावाच लागत असणार. लुगडेही व्यवस्थित घट्ट आवरून घ्यावे लागत असणार. चोळीमुळे कंबरेचा एका बाजूचा भाग उघडा राहात असणार. पण बायकां-बायकांमध्ये हे चालून जात असावे. आता चोळीबद्दल. नऊ तुकड्यांची चोळी शिवणे हे कौशल्याचे काम असे. शिवाय ती खणाची असे. म्हणजे बाहीचे तुकडे ठरलेलेच असत. आणि खण हा ताग्यातून कापलेला नसणार. तो स्वतंत्र विणलेला (मध्ये धागे सोडून) असे.( या बद्दल कोणी अधिक खुलासा अथवा बिनचूक माहिती दिल्यास आभारी.) त्याचे आकारमान ठरलेले असणार. फार तर एक दोन आकारांचे वैविध्य होते असू शकेल. म्हणजे पन्हाही ठरीवच. यातून चोळी शिवायची. म्हणजे प्रौढ स्त्रियांना ती अंगभर होत नसेल. अर्थात हे सगळे सामान्य ब्राह्मणस्त्रियांबाबत झाले. पेशवेपत्नीचा पेहेराव वेगळाच असणार.

गाणं भारी आहे, दोघीही आवडल्या. तब्येत खुश झाली काल चित्रपटात ट्रेलर पाहतान्ना. डोला रे डोला गाण्याची आठवण मात्र सारखी होत होती. बाकी चालु द्या....! -दिलीप बिरुटे

ट्रेलर खालील प्रतिसाद वाचले. नकारात्मक एकही नाही. ह्या भन्साळी ला २०१६ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाच म्हणून समजा एका गाण्यातच त्याने बाजीराव मस्तानी ह्यांना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले तेही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधी तेही पिंगा घालून. प्रतिसादात प्रियांकाच्या अभिनयाची दिसण्याची चर्चा जास्त झालेली दिसली. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मस्तानी पेक्ष्या काशीबाई भारतात जास्त लोकप्रिय झाल्या तर नवल ते काय मला स्वतःला ट्रेलर आवडला त्यात महेश चा आवाज ऐकला, बरे वाटले. वैभव तत्ववादी बहुदा चिमाजी ची भूमिका करत असावा. त्याला पहायचे आहे. तन्वी आझमी बाजीरावाच्या आईच्या भूमिकेत आहेत, शाहू महाराजांच्या भूमिकेत महेश मांजरेकर आहेत. विकी अंकल सांगतो मिलिंद सोमण व संजय मिश्रा सुद्धा आहेत त्याची भूमिका कोणती असेल हे जाणण्यास उत्सुक आहे. बिचार्या रुक रुक खान ला परत एखादे वादग्रस्त विधान करावे लागणार त्याच्या दिलवाले साठी सध्या हवा बाजीराव मस्तानी ची आहे देशभर . पिंगा वादात झालेला विरोध हा प्रामुख्याने सोशल मिडिया वरून झाला तेही संयत भाषेत तर ह्या आधी जो वाद पुरस्कारावरून झाला. त्यावेळी वापरलेली भाषा आणि विरोधाची पध्धत कमालीची घसरली होती. मतांच्या राजकारणासाठी राजकारणी त्यात उतरले. ह्यावेळी राजकारणी लोकांच्या शिवाय पिंगा विरोध हा सुसंस्कृत समाज अजूनही भारतात इदान महाराष्ट्रात जिवंत आहे ह्याची खात्री पटली. पिंगा विरोधाला विरोध करण्यासाठी काही लोकांनी जातीयता मध्ये काढली पण पिंगा विरोधकांनी त्याकडे लक्ष दिले नाही नाहीतर शिवशाही व पेशवाही असा वाद निर्माण झाला असता. ह्या पिंगा विरोधामुळे माझ्यामते संजय भन्साळी हे पिंगा गाणे जर डोला रे डोला सारखे सिनेमाच्या मधेच टाकणार असतील तर बहुदा सेफ गेम म्हणून प्रमोशन गाणे म्हणून सिनेमाच्या शेवटी दाखवतील, व त्या बदल्यास युद्धाचे किंवा एखाद्या भडक म्हणजे सुडो सेक्युलर लोकांना भडक वाटतील अशी भीती वाटून गाळलेला एखादा कडक प्रसंग सिनेमात आणेल असे वाटते. निदान ट्रेलर पाहून तरी असे वाटते बाकी कार्य सिद्धीस नेण्यास संस्कारी सेन्सॉर आहेतच. आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे

Every era has its culture, and if you are picking up and historical topic then you have to be very very careful. I could see following mistakes, 1) The casting 2) Intrepratation of history using north indian goggles. 3) None of the MARATHI cultural aspects are not being used 4) If you do not want to make realistic cinema then do not use name of real historical heroes. 5) Less study of the history or no study 6) This wrong culture will go out to world as a Marathi culture .. as cinema is very very powerful medium. Its better , we should not go to watch movie and ask our non marathi friends and some marathi frineds about the same.

In reply to by रमेश आठवले

हे गाणं पहिल्यांदा पाहिलं. अगदीच दळीद्रीपणा केलाय संजयानं. पिंग्याच्या गोंधळानंतरही शिनेमा थेट्रात पहावा यावर मी पक्की होते पण आता नाही. म्हणजे आता शिनेमा पाहणारच पण नेटावर.

In reply to by रमेश आठवले

मराठी संस्कृतीचा अभ्यास करून चित्रपट केला आहे असे संजय लीला भन्साळी सांगत होते लोकसत्त्तामध्ये. नेमके कोणत्या मराठी संस्कृतीचा केलाय ते तरी सांगा. 'वाट लावली' म्हणे!!! काय ते गाणे आणि काय ते शब्द! थोरल्या बाजीरावांवर चित्रपट आहे कि बाजीराव सिंघम चा रीमेक???

आत्ताच 'मल्हारी' हे गाणं बघितलं. थक्क झालेय...संजय लीला भन्साली साहेब आता ऑफिशीयली वेडे झाले आहेत...

In reply to by पद्मावति

बाजीराव पेशवे "वाट लावली" म्हणून वाकडे तिकडे पाय उडवत नाचत आहेत??? भन्साळ्यावर पीएलआय टाका रे कॉणीतरी!