Skip to main content

तो अनुभव...

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 06/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मी अनेक वर्ष शिफ्ट ड्युटी केली. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ३.३० तर दुसरी ३.३० ते रात्री १२.०० पर्यंत. तिसरी शिफ्ट कधी करावी लागली नाही. लग्न व्हायच्या आधीच्या काळात रात्री १२.०० नंतर गप्पा मारायला, चहा प्यायला इ. कारणासाठी बुधवारच्या सेकंड शिफ्ट नंतर आम्ही बॅचलर्स जमा व्हायचो. मग कुणाच्या रुम मधे पत्ते रंगायचे तर कधी फक्क्ड चहाच्या सोबतीने गप्पा रंगायच्या. सायकलीवर कामाला जाणारे सगळे खंडोबाचा माळ अकुरडी येथे बुधवारी रात्री १२ च्या पुढे जमा व्हायचे. तिथुन कधी चिंचवड गावात तर कधी चिंचवड स्टेशनवर असलेले टुरिस्ट हॉटेल जे रात्री पण सुरु असायचे तर कधी अन्य ठिकाणी आधारण दोन महिन्यातुन आम्ही जमायचो. एकदा अश्याच गप्पा होऊन मी एकटाच घरी निघालो. थंडी जबरदस्त होती. रात्रीचे २ तरी वाजले होते. चिंचवड गावातुन एस के एफ कंपनीच्या मागे असलेल्या प्रेमलोक पार्क मधे मी रहायचो. या रस्त्यावर एक झोपडपट्टी आहे. इथुन जाताना अचानक १०-१२ भटकी कुत्री अंगावर आली. आरडा ओरडा केला पण सारे जग झोपले होते. मग सायकल उचलुन स्वतः भोवती ढाली सारखी फिरवु लागलो. भलता दम लागला होता. अजुन कुणा कुत्र्याने माझा चावा घेतलेला नव्हता. ह्या प्रकारात एक -दीड मिनीट गेले. मी आता देवाचा धावा करत होतो. इतक्यात सायलेन्सर फाटलेली एक मोटारसायकल समोरुन आली. माझ्यामागे लागलेली ती भटकी कुत्री त्याच्या मागे धावली. संधीचा फायदा घेऊन मी पुन्हा सायकलवर टांग मारली आणि मागे न पहता सायकल घरापर्यंत पळवली. एखादी मॅरेथॉन धावल्याचा दम लागला होता. सायकल लॉक करायचे कष्ट न घेता मी सायकल फे़उन लॅच की ने घर उघडुन आडवा झालो. कपडे, बुट रात्रभर तसेच ठेऊन मी श्रमाने तसाच झोपलो. भयानक प्रसंग आठवताना हा प्रसंग जसा च्या तसा आजही ३० वर्षांनी डोळ्यासमोर उभा रहातो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14477
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत मला स्वतः पर्यावरण आणि प्राणिप्रेमी असूनही यत्किंचितही सहानुभूती वाटत नाही. त्यांच्या वाढत्या संख्येला आळा घातलाच पाहिजे मग तो उपाय कितीही कठोर का असेना.

In reply to by अजया

कंपूबाज, डुआयडी आणि त्यांची निर्लज्जपणे पाठराखण करणारे यांना तर फारच लागू पडते.

In reply to by सतिश गावडे

मोक्ष मिळ्ळण्णारच्च होता....मिपावर अफझलखानाचा उदो उदो चालतो पण काही विशिष्टप्रजातींबद्दल लिहिले की तत्परतेने कैची चालते

In reply to by प्यारे१

आम्ही अजिबात मिशा फेंदारणार नाही.रच्याकने आमच्या मलिका आमच्याच आयडीने लाॅगिन करतात मिपावर! प्रतिसाद मात्र देत नाहीत सुदैवाने! ;)

In reply to by बोका-ए-आझम

खी खी :) मलिका अभ्यास करून उतरणार असतील मैदानात. तुमचा कंपू...आपलं ते हे टेरिटरी मार्क करून ठेवा आताच! :)

In reply to by टवाळ कार्टा

या प्रश्नाचं उत्तर म्हणून घारे डोळे तुमच्यावर रोखलेली, पहात असूनही चेहऱ्यावर तुम्हाला न पाहिल्यासारखे भाव असलेली, मग हलकेच एक पाय उचलून कान खाज्व्नारी मांजरीची कल्पना करावी. खूदसे बाँता: "सगळचं कसं उलगडून सांगावं लागतं?"

In reply to by रातराणी

अश्या टैपच्या मांजरींशी माझे चांग्ले मेतकूट जम्ते...फार सोप्या अपेक्षा अस्तात त्यांच्या...आधा कपां दूध के लिये कुच बी करतें ;)

In reply to by बॅटमॅन

प्राणी सदृष्य पक्षी किंवा पक्षी सदूष्य प्राणी, उर्फ वाल्दूलाचार्य उर्फ बरेच काही...ह्यांच्याशी सहमत....

In reply to by अजया

सगळ्यांसाठीच स्वतंत्र पि़ंजरे अथवा बागा तर नाहीत ना बनवता येणार...

कुत्र्यांचा असा अनुभव मलाही अलेला आहे. कॉलेजात असतानाची गोष्ट. रात्री भूक लागली म्हणून नाईट कँटीनमध्ये जायला निघालो. कँटीनच्या वाटेवर नेहमीप्रमाणे फुल अंधार. तिथेच एक काळं कुत्रं बसलं होतं ते कै दिसलं नै. मग ते भुंकायला लागलं माझ्यावर, त्याल हाड केलं तर ते तेवढ्यापुरतं मागं झालं पण मागून लगेच रीइन्फोर्समेंट आलीच की त्याची. क्षणार्धात ५-६ कुत्र्यांनी मला वेढाच घातला आणि टिपेच्या आवाजात सर्वजण माझ्यावर भुंकू लागली. मला काय करावे सुधरेचना, तिथे एक खांब होता त्यावर चढलो तरी कै होईना. सुदैवाने तोपर्यंत सिक्युरिटीवाले लोक्स तिथे आले आणि कुत्र्यांना हाकलले म्हणून बरे, नैतर कै खरं नव्हतं माझं तेव्हा. हेच लहानपणी मात्र भीती वाटली नव्हती. तेव्हा ६वी-७वीत असेन. क्रिकेट खेळून घरी जात असताना वाटेत अचानक खूप कुत्री जमलेली दिसली. जराही न घाबरता एक दगड त्यांच्यामध्ये भिरकावला. कुत्र्यांची पांगापांग झाली आणि काही झालेच नाही अशा थाटात मी निवांत घरी आलो.

In reply to by जातवेद

मर्यादा येतात. उगाच फुलाला फूल टकरवायचं कशाला? फुलांनाही भावना असतात. तुम्ही म्हणता म्हणून कुठल्याही फुलाला हे करुन देईल काय?

In reply to by प्यारे१

म्हणजे आंब्याची अनसेन्सॉर्ड कविता आहे म्हणायची. रच्याकने, फुलांवरून आठवले; नविन विभागाचे नाव 'तीन फुल्या' असेलसे वाटते.

अनुभव लई झकास, औरोकि गलीमें शेरभी कुत्ता

दगड मारणे हा बेस्ट उपाय. जवळपास दगड नसतील तर कमरेचा बेल्ट काढून हातात घ्यावा, कुत्रा लांबूनच भुंकतो. बेल्टही नसेल तर हरीनाम घ्यावे...!!

दगड मारणे हा बेस्ट उपाय. जवळपास दगड नसतील तर कमरेचा बेल्ट काढून हातात घ्यावा, कुत्रा लांबूनच भुंकतो. बेल्टही नसेल तर हरीनाम घ्यावे...!!

In reply to by योगी९००

हरीनामास कुत्रे घाबरतात ही नवीनच माहिती.. इच्छुकांनी प्रयोग करुन पहावा आणि (धड राहिलात तर) आपला अनुभव सांगायला विसरु नये. बादवे, जर चेष्टा करत असाल तर आमच्या तुडतुडी तै तुम्हाला कध्धी कध्धी माफ करणार नाहीत हे ही लक्षात ठेवा हो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

योगी००९, आसाराम बापू आणि अनिरूद्ध बापू हे तुमचेच डु आयडी काय हो? ;) हा हा हा!! आमचे तेवढे भाग्य नाही हो आसाराम बापू लेवल पर्यंत पोहोचायचं..

In reply to by बोका-ए-आझम

कदाचीत असं असावं हरी ओम हरी येऊ नको घरी !! तुला देतो खारी तुझी गल्ली बरी !! वाटे भिती जरी जातो आता घरी !!
अखिल मिपा भटके पाळीव जालीय लोचट श्वान पाठलाग निर्मुलन निर्दालन आणि लसीकरण मोहिमेतील पत्रकाचा एक संक्षीप्त भाग

In reply to by नाखु

काकाश्री रॉक्स, मिपाकर शॉक्स !!!

घरी जेव्हा कॉलेज मधे होतो तेव्हा रोज रनिंगचा परिपाठ होता आमचा एकदा उमेदवारी करून आमचा सरदारजी मित्र सुद्धा सोबत येतो म्हणाला तो साडेपाच फुट उंच अन एकदम थुलथुलीत जाडू होता, आमचा रनिंग चा रस्ता गावातील एका प्रसिद्ध वकिलांच्या बंगल्यासमोरुन जात असे अन सरदारजी यायला लागला तेव्हा पासुन ते गुबगुबित पगड़ीधारी प्रकरण सोबत धावताना पाहुन रोज अन्हिके आटपायला बाहेर येणारे ते कुत्रे बावचळून आमच्या मागे लागायला लागले तसे पोरे बोंबलायला लागली , त्याला म्हणेल "यार वीरे ये ता प्रॉब्लम हो गयास्सी" तर सरदार मिश्किल म्हणाला उद्या मीच सोलुशन काढतो प्रॉब्लम ला दूसरे दिवशी पहाटेच्या धुक्यात आम्ही आपले सावध धावतोय अन आमच्या थोडा पुढे सरदार धावतोय ते आले थोराघरले श्वान वसवस करीत पुढे तसे सरदारजी अजुन स्पीड मधे पुढे अन अचानक सरदार वळला अन त्याच द्रुतगती ने त्या खवळलल्या कुत्र्यावरच धावून गेला ते कुत्रे एकदम बिचारे गर्भगळीत का काय म्हणतात तसेच झाले अन भयानक जोरात केकाटत आपल्या घरात शिरले ते कायमचेच! परत कधी कोणाच्या वाटेला गेले नाही बेटे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सरदारजींचा असाच एक किस्सा आता मेळघाट डायरी मध्ये वाचला. अस्वल अचानक हल्ला करतात. मागून येऊन सूमडीत. त्यांच्या हल्ल्यातून जिवंत वाचणे परमेश्वरालाच शक्य आहे. मेळघाटात तेव्हा कोणीतरी मोठे फॉरेस्ट अधिकारी होते. धिप्पाड, साडेसहा फूट उंच. बंगल्याच्या आवारात एकदा सकाळी ह्यांच्याकडे चहा-न्याहारी चालू असतांना सोबत काही पाहूणेही होते. तेव्हा मागून एका अस्वलाने आरोळी ठोकली आणि चालून आला. सिंगसाहेबही चिडले, केस मोकळे सोडून त्या अस्वलाच्या दहापट आवाजात आरोळी ठोकून त्याच्यावरच धावून गेले. हे काय प्रकरण उपटले अचानक असे वाटून अस्वलसाहेब मागल्या मागे पळाले....