धन्यवाद टारझन जी > असे प्रसंग चित्रपट पाहणं-या सर्वांच्याच हृदयात घर करतात. मात्र जेव्हा ते क्षण आपण अशा फोरमवर उघडे करतो त्यावेळी जो आनंद होतो त्याची खुमारी काही वेगळीच असते. मी जरूर आणखीन काही असे क्षण आपणा सर्वांशी चर्चेला आणण्याचा प्रयत्न करीन.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
मेरे पास माँ है | , कुत्ते, मै तेरा खुन पी जाउगॉ, हे राहीलेच की.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
धन्यवाद विकास जी > नक्कीच आपण उल्लेख केलेले दोन्ही जातीचे संवाद All Time Hit आहेत. पण मी अशांचा उल्लेख केला (वा करीन) जे हळुवारपणे मनाला भिडले आहेत.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
लेख छान झालाय :-)
मला पिक्चर संपल्यावर त्यातील प्रसंग अभावानेच लक्षात राहतात. पण तेच जर पिक्चरोत्तर त्या पिक्चरवर भरपूर काथ्याकूट झाला तर थोडेफार लक्षात राहण्याचे चान्सेस असतात. त्याप्रमाणे मायामेमसाब पिक्चरमधील बरेचसे प्रसंग लक्षात आहेत व त्यांचे दिग्दर्शन, छायाचित्रणही आवडले. पिक्चरमधील सुरुवातीची माया जास्त आवडली. फारुख शेखचे तिच्या वडीलांना तपासायला येणे, त्याचे गोंधळलेपण, तिचा अल्लड मिष्किलपणा व आपल्याच जगात वावरण्याची मस्ती.... छान जुळून आले आहे.
''संसार'' ह्या घिसेपिटे कौटुंबिक चित्रपटातीलही अनेक प्रसंग आजही डोळ्यांसमोर येतात. रेखा व अनुपम खेरच्या समर्थ अभिनयाच्या जोरावर पिक्चर तरला. त्यात रेखाचा पती, राज बब्बर, जेव्हा आपल्या स्वतःच्या गरजा व आपला खर्चच ह्या घरात सर्वात जास्त होता ह्या अनुमानापर्यंत येतो तो प्रसंग, अनुपम खेरची उद्विग्नता व चिडचिडाट, अरुणा इराणीचा घरकामाच्या बाईचा ''लाऊड'' अभिनय, सीमा देवचा संयत अभिनय, शेखर सुमन - शफी इनामदार -अजिंक्य देव - अर्चना जोगळेकर यांच्याही छोट्याशा पण पूरक भूमिका व कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय... या सर्वच गोष्टींनी हा पिक्चर लक्षात राहिला.
असे अनेक चित्रपट आहेत, जे कदाचित दर्जेदार नसतील, फार आवडलेही नसतील, पण तरी त्यातील प्रसंग लक्षात आहेत.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
"..... प्रसंग अभावानेच लक्षात राहतात." हा आपला अनुभव कमीजास्त प्रमाणात सर्वांचाच असतो. पण खरोखरी काही चित्रपट हे काव्य बनून आपल्या हृदयात शिरतात आणि मग त्यांच्याशी एक प्रकारचा आपुलकीचा संवाद सुरु होतो (मी हा अनुभव घेतला आहे, अर्थात मी ज्या ठिकाणी राहतो तो परिसर रहदारीपासून खूप दूर व तलावकाठ शेजारील असल्यामुळे विशेषत: रात्रीच्या वेळी वर उल्लेख केलेल्यापैकी अथवा अन्य हिंदी, इंग्लिश चित्रपटातील असे निवडक प्रसंग साक्षात मूर्त स्वरुपात समोर उभे ठाकतात व नकळत एका अनामिक ओढीने मीही त्यात गुंफला जातो.
शेवटचे आपले मत योग्य आहे ~~ चित्रपट दर्जेदार असेल वा नसेल, पण निदान एखादी तरी फ्रेम अशी येते कि जी कायमची सोबती होते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
पाहिला पाहिजे. पण आता अर्थातच डीव्हीडीवरच शक्य आहे. धन्यवाद.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
सरफरोशः आमिर खान आणि मुकेश रुषी एकत्र येतात तो प्रसंग
अमर अकबर अन्थनी मधला जखम पुसणारा आनि आरश्याला पट्टी लावणारा अमिताभ
सरकारनामा: 'सत्कार करा.....'
अजुन खुप आहेत...
-----
सौरभ :)
होय. सरफरोशमधील तुम्ही लिहिलेला हा प्रसन्ग खूपच प्रभावी आहे. अ अ अ मधिल प्रसन्ग जुन्या "कोहिनूर''ची कॉपी आहे तरीही लक्षात राहतो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
अगदी खरं आहे. चित्रपटातील काही प्रसंग मनःपटलावर कोरले जातात... असाच एक प्रसंग. चित्रपट 'सागर'.
चित्रपटातला प्रेमाचा अपरिहार्य त्रिकोण.. कमल हासन डिम्पलच्या एकतर्फी प्रेमात... ऋषी आणि डिम्पलच्या जन्मजन्मांच्या आणाभाका झालेल्या.. त्यात परत कमल आणि ऋषी जिगरी दोस्त...
तर प्रसंग असा की कमल काहीतरी कामात आहे.. एकदम देवदास मूडमध्ये.. आणि ऋषी कुठूनतरी त्याला शोधत येतो.. कधी एकदा मित्राला डिम्पलबद्दल सांगतो असं त्याला झालंय.. तर तो येतो आणि त्याच्या बडबड्या स्वभावानुसार कमलला आपल्या प्रेमाचे, भेटींचे किस्से सांगत सुटतो.
या दृश्यात पूर्णवेळ कमलचा क्लोज-अप घेत कॅमेरा फिरतो. त्यात कमल हासनने, दुखा:ने - अपेक्षाभंगाने, पिळवटून जाण्याचे; तरीही संयत असे जे भाव दाखवलेत ते केवळ शब्दातीत! शेवटी सगळं असह्य होऊन त्याचे डोळे लाल लाल होतात आणि भरून येतात... ते लपवण्यासाठी तो पटकन जवळ असलेल्या पिंपातलं पाणी स्वतःच्या चेहऱ्यावर उडवतो आणि ऋषीशी बोलण्यासाठी वळतो... बास, ते डोळे, तो चेहरा, ते पाणी उडवणं... कत्ले आम!!
अपघातात जखमी पूनम ढिल्लो ला तिच्या घरी अमिताभ सोडतो आणि त्याला धन्यवाद देण्यासाठी हात मिळवल्यावर संजीव कुमार च्या हाताला रक्त लागते आणि मग लक्षात येते की अमिताभच्या हातालाही जखम झालेली आहे आणि रक्त येत आहे. तेव्हा तो म्हणतो "एक मिनीट मुझे लगा मेरा अपना ही खून है"
(हा चित्रपट न पाहिलेले कोणी असतील तरः अमिताभ हा संजीव कुमार चा लग्नाआधीच्या संबंधातून झालेला मुलगा असतो)
सलीम-जावेद, अमिताभ, संजीव कुमार. आणखी काय पाहिजे? :)
व्वा व्वा.... मान गये उस्ताद !! नेमका असाच अनुभव कित्येकाना विविध चित्रपट पाहताना आला असणार, तर त्याचाही एक नवा धागा होऊ शकेल.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
'आनंद' चित्रपटाचा शेवटचा प्रसंग.. राजेश खन्नाचे ते पूर्वध्वनीमुद्रित संवाद.. ''ए बाबू मोशाय''.. ते अमिताभचे दचकून वर पाहणे.. राजेशचा तो हसरा चेहरा आणि तो गेलाय हे दिसत असूनही ते स्वीकार न करणारा अमिताभ!
'सिंहासन' चित्रपटाचा शेवटचा प्रसंग.. निळू फुलेंचा तो हतबल चेहरा.. शेवटी वेड्यासारखे हसत सुटणे!
मनावर कायम कोरले गेलेले हे प्रसंग!!
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
अप्रतिम आठवणी....
अभिनयाची शिखरं म्हणाल तर गुरूदत्त बद्दल सहमत... दिलिपकुमारबद्दल असहमत. व्यक्तिशः मला तो कलाकार वगैरे म्हणून अजिबात आवडत नाही.
बिपिन कार्यकर्ते
बिपीन जी ~~ मी मनापासून सांगतो कि आपले दिलीपकुमार यांच्याविषयीचे मत वाचल्यावर केवळ वाईटच नव्हे तर धक्कादेखील बसला. अर्थात अभिनयाच्या बाबतीत वा कलाकारांच्याबाबातीत वैयक्तिक आवडी निवडी असू शकतात किंबहुना असाव्यात, कारण त्याशिवाय चर्चेला वाव मिळत नाही. ("सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो" यात चर्चा करण्यासारखे काय आहे?). मी याच ठिकाणी आपल्या या मतावर दीर्घ उत्तर द्यावे का याचा विचार करीत होतो, पण नंतर लक्षात आले की 'चला यावर एक धागा तयार करता येईल'. (आपली परवानगी असेल तर !!)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
दिलीपकुमारचा 'मुघल-ए-आझम'सोडून एकही पिक्चर पाहिलेला नाही. तोच पहिला पाहिला, आणि ही सुंदर मधुबाला या म्हतार्या दगडाच्या प्रेमात का पडली हे कोडं शेवटपर्यंत सुटलं नाही. दगड अभिनय म्हणून नाही, चेहेरा म्हणून! त्यानंतर दिलीपकुमारचा पिक्चर दिसला तर एकतर टी.व्ही. बंद तरी करायचे नाहीतर चॅनलतरी बदलायचे.
अदिती
हे राम !!!!! आता काय बोलावे ~~ किंवा काय लिहावे ~~ बाबा, मुक्त सुनीत तुम्हीच या मदतीला, मला एकट्याला हे प्रकरण झेपणार नाही असे वाटते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
ऑप्शन ला टाका प्रकरण ... ;)
थ्री इडियट्स मधला एक सिन आहे शेवटी ... चतुर रामलिंगम व्हायरस ने रँचो ला दिलेला पेन घेऊन जातो ;) तेंव्हा माधवन आणि शर्मन ओरडतात .. "आरे तो पेन घेऊण चाल्लाय ... " .. तेंव्हा रँचो ने एक फारंच अर्थ पुर्ण वाक्य म्हंटलेले आहे .. आठवा पाहु कोणते ? "
- टारेश धडेशिकवी
अभिनयाची शिखरं म्हणाल तर गुरूदत्त बद्दल सहमत... दिलिपकुमारबद्दल असहमत. व्यक्तिशः मला तो कलाकार वगैरे म्हणून अजिबात आवडत नाही.
चला या निमित्ताने कार्यकर्त्यांशी पहिल्यांदा असहमत होता आले ! त्यांच्याशी सतत सहमतच असल्याचा मला ज्याम कंटाळा आला होता. ;-) बिपिनराव , होऊन जाऊ द्या एकदाच युसुफखानबद्दल खडाजंगी ;-) कसे म्हणता !
एम. एस. तुम्हीही दिलीपकुमार (तसेच एकूणच "अभिनय क्षमता" या विषयावर....) बद्दल लिहिण्याचा विचार करा ना.....कि मी लिहू? अर्थात श्री. बिपीन कार्यकर्ते यांची परवानगी असेल तर.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
परवानगी वगैरे अगदी शब्दशः नाही घ्यायचे ह्या संदर्भात.
दिलीपकुमारबद्दल लेख लिहावयाचा म्हणजे एक लंबी साँस लेना आवश्यक है. उसके बाद मे एक प्रदीर्घ पॉज..... मग इकडे तिकडे पहात प्रस्तावना...... मग लेख.....
दिलीपकुमारबद्दल लेख लिहावयाचा म्हणजे एक लंबी साँस लेना आवश्यक है. उसके बाद मे एक प्रदीर्घ पॉज..... मग इकडे तिकडे पहात प्रस्तावना...... मग लेख.....
आणि लेख लिहिताना एक एक ओळ एक एक महिन्यांनंतर ;) (ह. घ्या.)
@ मुसु / इन्द्रराज : आता नाही आवडत मला दिलिपकुमार... काय करणार? पण तुम्ही लेख टाका हो... इथे इतके लोक काय वाट्टेल ते लिहित असतात, कैच्याकै धागे टाकत असतात... घेतात कोणाची परवानगी? ;) ... मग तुम्ही दिलिपकुमारबद्दल का होईना पण लिहिणार असाल तर नक्कीच आवडेल. लिहाच तुम्ही... त्यानिमित्ताने दिलिपकुमारचा अभिनय या विषयी कळेल तरी काही तरी... :D
बिपिन कार्यकर्ते
हो, आणि एखाद्या चित्रपटात त्याचा चेहेरा अगदीच बद्दू म्हतारा दिसत नसेल तर तो चित्रपटही पहाता येईल मला! ;)
>> इथे इतके लोक काय वाट्टेल ते लिहित असतात, कैच्याकै धागे टाकत असतात... घेतात कोणाची परवानगी? ... <<
अगदी! इंद्रराज, तुम्ही लिहाच. मुसुंना काय सांगायचं परवानगीबद्दल! ;)
अदिती
ये हुई ना कुछ बात !! अदिती, बिपीन, टारझन, प्रदीप आणि हो मुक्त सुनीत >> चला एकदाचे हिरवे निशाण मिळाले, आता लिहितोच दिलीपकुमारबद्दल, आणि असे लिहितो कि अदिती ने विचारले पाहिजे "या चित्रपटांच्या डीव्हीडी बाजारात उपलब्ध आहेत ना?"
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
>>आता नाही आवडत मला दिलिपकुमार... काय करणार? पण तुम्ही लेख टाका हो... इथे इतके लोक काय वाट्टेल ते लिहित असतात, कैच्याकै धागे टाकत असतात... घेतात कोणाची परवानगी?
+१
इथे मी ( उगाच वाद वाढवायचा म्हणुन ) बिकांशी सहमत आहे ...
दिलिपकुमार हा अत्यंत रटाळ अशा अभिनेत्यांमधला एक होता, उगाच पब्लिकने त्याला का डोक्यावर चढवला ते देव जाणे ! फार्फार तर भारतभुषणपेक्षा किंचित उजवा म्हणता येईल, नाही तर आहे काय त्यात ?
त्या काळी बहुतेक जास्त ऑप्शन नव्हते म्हणुन तो भाव खाऊन गेला असेल नायतर काय .... जाऊ देत !
( हे ही आपले उगाच काड्या टाकायच्या म्हणुन, आता होऊ द्यात सुरु ;) माझे तर स्पष्ट मत असे आहे की म्हणजे दिलिपकुमार म्हणजे आजच्या पिढीतला झायेद खान ( हाण्ण तिच्यामायला ) )
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
सहमत आहे.
मला ही कधी आवडला नाही बॉ. त्यापेक्षा आमचा सुनील दत्त परवडला. ;)
तो मनोजकुमार ही विनाकारण त्याची श्टाईल मारुन करीयर खराब करुन गेला. (पण मनोजकुमार शॉल्लीड सिरीयस कॉमेडी करायचा हा.)
अरारारा.. काय भारी सीन आहे.. आणि काय तो खर्जातला आवाज तोंडझाकू मनोजकुमारचा..
आणि इतक्या सगळ्या 'राष्ट्रीय नेत्यांचे' फटू घरात? कि ऑफीसात झोपलाय अशोककुमार? ;-)
होऊन जाऊ दे धागा! तिकडेच आतषबाजी करु!! ;)
(खुद के साथ बातां : ना! रंगा, निशानेपाकिस्तान के बारे में ऐसे नहीं बोला करते, ना! ;) )
(निशाने'ना''ना')चतुरंग
मला तरी लहानपणी ज्ञानेश्वरी सिनेमात, ज्ञानेश्वर समाधी घेतात तेव्हा डोळ्यांतून गंगा जमुना लागल्या होत्या.
बाकी सिनेमे आठवत नाहीत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
सिनेमातच का...."ज्ञानेश्वर समाधी" हा विषयच डोळ्यांतून पाणी काढण्यास समर्थ आहे, मग ते लेखन स्वरुपात असु दे अथवा व्याख्यान स्वरुपात ! (तुम्ही म्हणता तो कोणता चित्रपट? "ज्ञानेश्वरी" अशा नावाचा कि दुसराच ?)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
सॉरी हं मला वाटतं मराठी चित्रपट - संत ज्ञानेश्वर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
प्रतिक्रिया
मस्त रे
धन्यवाद
फारच छान
धन्यवाद....
मेरे पास
धन्यवाद
लेख छान
दर्जेदार असेल वा नसेल
कळत नकळत.
पाहिला
..
कोहिनूर...!
अगदी खरं
एक मिनीट मुझे लगा...
आणखी काय पाहिजे?
'नाजायाज'
कहर सिनेमातला...........
दी एन्ड ही अक्षरे ... !
२
अप्रतिम
दिलिपकुमारबद्दल असहमत....!!
दिलीप सुमार चा अभिनय
दिलीपकुमा
"....सुंदर मधुबाला या म्हतार्या दगडाच्या ...."
मला
अरे वा !
दिलीपकुमार.....!
परवानगी !
तसे नव्हे!!
दिलीपकुमा
हो, आणि
इंद्रराज, तुम्ही लिहाच. .....
+१
+१
सिरीयस
हा हा हा
चायला कसला
मेलो...............
अरारारा..
ट्ठो =)) =)) =))
सहमत...
ए
जॉय मुखर्जी
हा, हा...
+१ आम्हालाही आवडत नाही दिलीपकुमार फारसा
बरेच आहेत
मला तरी
ज्ञानेश्वरी...!
सॉरी हं
+१ सहमत