[रामसेततु बाबत अनेक भ्रम पसरलेले आहे. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे वर्णन].
वाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.
आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही. रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे. आपल्या इतिहासाला भाकड कथा मानणारे, डोळ्यांवर विशिष्ट चष्मा लावलेले तथाकथित विद्वान, ज्यांच्या मते धनुषकोडी ते तलाईमन्नार (श्रीलंका) यांच्या मध्ये असणार १८ मैल लांबीच्या समुद्रात लाखो वर्षांपूर्वी प्रकृती निर्मित एक भोगोलिक संरचना आहे. या संरचनेला अडम ब्रिज किंवा रामसेतु असे ही म्हणतात. या अतिविद्वानांच्या अनुसार श्रीरामाने कुठला हि पूल समुद्रावर बांधला नव्हता. दुसरी कडे धुर सनातनी लोक म्हणतात. हाच तो सेतु आहे जो श्रीरामानी समुद्रावर बांधला होता.
दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्ट हि केले नसावे. रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसाला हि सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजहि समुद्र पातळीच्या वर आहे. ५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती, त्यावेळी हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेहि भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील. काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आज पेक्षा निदान २० फूट आणिक खाली असेल. त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.
आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल. एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry) रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.
आपल्या देशात आज हि दुर्गम भागातले ग्रामीण, पावसाळ्यात नदी किंवा नाल्यावरचा पूल वाहून गेल्यास, नदी नाल्यांवर, लाकडाचे ओंडके टाकून कामचलाऊ पूल तैयार करतात. त्याच प्रकारे श्रीरामांनीहि जंगलातील वृक्ष, लता, गवत, दगड-धोंडे वापरून एक कामचलाऊ पूल बांधण्याचा निश्चय केला. जेणे करून सैन्य समुद्र पार करू शकेल. अश्या प्रकारचे पूल बनविण्याचे तंत्र अवगत असलेल्या नील नावाच्या वानराने हे कार्य पूर्ण करण्याचा बीडा उचलला.
वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले. अर्जुन, बेल, अशोक, साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून समुद्र किनार्यावर घेऊन आले. या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा. बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर घेऊन आले. किनार्यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला. श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.
वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारच्या सैन्येला उथळ समुद्रावर रामसेतुचा निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता. कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग रंगविले.
टीप: वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:
ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥
ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥
बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥
हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥
संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले. हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.
समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥
दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥
मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥
संक्षिप्त अर्थ:कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. ॥इति॥
वाचने
33553
प्रतिक्रिया
119
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्च झालं का?
In reply to प्रथमतः(इतर मुद्द्यांवर भाष्य by सच्चिदानंद
जौ दे त्यांना काय कळंना काय
In reply to अच्च झालं का? by ट्रेड मार्क
अच्च झालं का?
In reply to अच्च झालं का? by ट्रेड मार्क
स्वामीजी…
In reply to अच्च झालं का? by सच्चिदानंद
पिरामिड हे आता कोडं आहे, उद्या सुटेलही.
In reply to राम होता की नाही हा प्रश्न by तर्राट जोकर
तुम्हाला कसा इतिहास पाहिजे हे
In reply to चला, थोडा वेळ आपला मुद्दा by तर्राट जोकर
लिहाच एक मालिका
In reply to तुम्हाला कसा इतिहास पाहिजे हे by कैलासवासी सोन्याबापु
सुबह सुबह हमरे चाचा की याद दिलायी.
In reply to तुम्हाला कसा इतिहास पाहिजे हे by कैलासवासी सोन्याबापु
सोयीनुसार सांगताय
In reply to तुम्हाला कसा इतिहास पाहिजे हे by कैलासवासी सोन्याबापु
तो हरामखोर औरंग्या कसा का
In reply to सोयीनुसार सांगताय by ट्रेड मार्क
असं म्हणू नका हो
In reply to तो हरामखोर औरंग्या कसा का by काळा पहाड
आजवर वैयक्तिक किती बगलबच्चे
In reply to तो हरामखोर औरंग्या कसा का by काळा पहाड
दगलबाजी घरच्यानी केली. औरंगजेबाने त्याचा राजधर्म पाळला.
In reply to तो हरामखोर औरंग्या कसा का by काळा पहाड
ह्या लॉजिकनी एक हजार वर्षांनी
In reply to कालौघात झालेले बदल by ट्रेड मार्क
:)
In reply to ह्या लॉजिकनी एक हजार वर्षांनी by सायकलस्वार
रामायणाचा काळ टिळकांनी
उगीचच राम भक्तांना नावे ठेवून
उगीचच राम भक्तांना नावे ठेवून
In reply to उगीचच राम भक्तांना नावे ठेवून by दत्ता जोशी
इथे रामभक्तांना कुणी नावे
In reply to उगीचच राम भक्तांना नावे ठेवून by प्रचेतस
धन्यवाद काका.
In reply to इथे रामभक्तांना कुणी नावे by दत्ता जोशी
चांगली माहिती.
थिएटर मध्ये सिनेमा पाहताना
रामराम
रामकथेचे वेदमूलकत्व
ऋग्वेदातले मंडल पहिले आणि
In reply to रामकथेचे वेदमूलकत्व by श्रीनिवास टिळक
हम्म एकंदर लोकांनी रोचक मते लिहली
मस्तच!!!
In reply to हम्म एकंदर लोकांनी रोचक मते लिहली by द-बाहुबली
रामायण किती जुने
तो संपूर्ण दुवा वाचून पु.ना.
In reply to रामायण किती जुने by रमेश आठवले
राम सेतूवर पु ना ओकांनी पण
In reply to तो संपूर्ण दुवा वाचून पु.ना. by प्रचेतस
पूर्वी वेद हे वेगवेगळे नव्हते
त्यातही ऋग्वेदातले पहिले आणि
In reply to पूर्वी वेद हे वेगवेगळे नव्हते by दत्ता जोशी
प्रचेतस जी,
In reply to त्यातही ऋग्वेदातले पहिले आणि by प्रचेतस
वेदांची टिका उपनिषदे आहेतच.
In reply to प्रचेतस जी, by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेब,
In reply to प्रचेतस जी, by कैलासवासी सोन्याबापु
सहमत. पण हेहि लक्षात घ्या.
In reply to त्यातही ऋग्वेदातले पहिले आणि by प्रचेतस
जन्माला आली असेच मी म्हणेन.
In reply to सहमत. पण हेहि लक्षात घ्या. by दत्ता जोशी
शंका.
In reply to जन्माला आली असेच मी म्हणेन. by प्रचेतस
नाही हो.
In reply to शंका. by दत्ता जोशी
होय हो प्रचेतस भाऊ.
In reply to नाही हो. by प्रचेतस
रामायण काल्पनिक असल्याचे कारण
In reply to होय हो प्रचेतस भाऊ. by दत्ता जोशी
प्रचेतस भाऊ,
In reply to रामायण काल्पनिक असल्याचे कारण by प्रचेतस
https://en.m.wikipedia.org/wiki/Allopanishad
In reply to जन्माला आली असेच मी म्हणेन. by प्रचेतस
मागे अशाच एका वादात समोर
काही संदर्भ नसतांना आणि काही
म्हणूनच 'गुजरात' करावं लागतं.
In reply to काही संदर्भ नसतांना आणि काही by दत्ता जोशी
जोशी काका,
In reply to काही संदर्भ नसतांना आणि काही by दत्ता जोशी
रामकथेचे वेदमूलत्व
पाण्यावर दगड तरंगणे