मुळ लेखक
सहाय्य.
प्रेषक अबब ( शुक्र, 05/09/2008 - 01:51) .
http://misalpav.com/node/1711
आपल्या मराठी टंकलेखनाच्या समस्येवर इथे काहि उपाय देत आहे.
त्याचा जरुर विचार करावा.
१.www.quillpad.com येथे जा.
भाषा "मराठी" निवडा.
तिथे प्रथम इंग्रजीत टाइप करा,
दुस-या खिडकीत त्याचे आपोआप मराठीत रुपांतर होते.
तुम्हाला नक्कि कुठला शब्द हवा आहे/किंवा टाइप करायचा आहे तो हि तिथे दिसतो.
२. www.baraha.com var jaun barahaIme1.0 हे सॉफ़्टवेअर डॉउनलोड करा.
तुम्हि जो संगणक नेहमी वापरता त्याच्यावर हे लोड करा.
मग START/PROGRAMS/BARAHAIME 1.0 मध्ये जाउन ते क्लिक करा.
खालील उजव्या कोप-यात जिथे वेळ दर्शवलि जाते त्याच्या जवळच बराहा चा icon दिसेल.
त्यावर माउस ठेऊन "right click" करा.
त्यात भाषा "मराठी" असे निवडा.आता आपण मराठीत टंकायला तयार झालोय.
आता START/PROGRAMS/ACCESSORIES/WORDPAD उघडा.
त्यात जाउन मराठीत लिहायला सुरु करा.
मिसळपाव वर वापरलेली ग म भ न प्रणाली आणि बराहा ह्यांच्यात विशेष फ़रक नाहि.
मिसळपाव वर दिलेले टंकलेखन सहाय्य इथेहि लागू पडते.
त्याउपरहि काहि समस्या आल्यास इथे मि.पा. वर कोणालाहि मदतीकरिता संपर्क करावा.
सगळेजण आपणास मदत करतिल.त्याकरिता खरड टाकावि.
यातला पहिला पर्याय हा आपण जालावर हजर असतानाच करता येतो.(online)
तर दुस-या पर्यायात आपणास जालावर हजर रहावे लागत नाहि.
आपल्या सोयीनुसार आपण लेखन करू शकता.फ़ावल्या वेळेचा ह्यामुळे सदुपयोग करता येतो.
आपल्याकडे लॆपटॉप असेल तर सोन्याहून पिवळॆ.
तुमचे लेखन यापैकी कुठेहि पुर्ण करा.तपासून बघा.वाटल्यास काहि सुधारणा करा.
आपले समाधान झाले की मगच मराठीतले लेखन इथे चिकटवा.
पोलीस सहआयुक्त सदानंद दाते यांच्याशी आय बी एन लोकमतचे संपादक निखील वागळे यांनी दिनांक २१ नोव्हेंबर २०१२ रोजी केलेली बातचीत
निखील वागळे - २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडलेला आरोपी अजमल कसाब याला अत्यंत गुप्ततेने येरवडा कारागृहात हलवण्यात आले व आज सकाळी साडेसात वाजता फाशी देण्यात आली हे सर्व अत्यंत गुप्ततेने करण्यात आले व ह्या सर्वात आपण एक प्रमुख अधिकारी म्हणून होतात. ह्या ऑपरेशन बददल महाराष्ट्रातील जनतेला खूप उत्सुकता आहे. एकतर हे ऑपरेशन मिडीयाला चुकवून गुप्तपणे आपण कसे पार पाडलेत आणि आम्ही मिडिया म्हणतो त्याप्रमाणे हे ऑपरेशन एक्स आहे का?
सदानंद दाते - नमस्कार. हे ऑपरेशन एक्स हे मी आज सकाळी पहिल्यांदाच ऐकले. मुंबई पोलिसांना एका जबाबदारीची कल्पना दहा दिवसांपूवी दिली होती. ती म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कसाबला मुंबईहून पुण्यात हलवायचे आहे. त्याचे नियोजन आम्ही करावे. पोलीस महासंचालकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे नियोजन केले होते मात्र ते डोक्यात केले होते कागदावर उतरवले नव्हते. कारण या बाबतीत गोपनीयता बाळगावी असे सांगितले होते आणि योग्य वेळी पुढील सूचना देऊ असेही सांगितले होते त्यानुसार जेव्हा आम्हांला सूचना मिळाली तेव्हा आम्ही त्याला मुंबईहून पुण्यात नेले. तीन तासाचा प्रवास! एव्हडेच खरे तर आम्ही केले. त्यासाठीचे नियोजन आम्ही केले होते. त्यासाठी सुयोग्य मनुष्यबळ,आम्ही आधीच शोधून ठेवले होते कॅम्पीटंट कमांडोज व ऑफिसर्सच्या टीम डी.जी. साहेबांनी आम्हांला दिल्या होत्या. काय काय होऊ शकते त्याचा अंदाज होता. त्याप्रमाणे आम्ही त्याला शिफ्ट केले शेवटी तो मुंबई पुणे तीन तास प्रवास.
निखील वागळे - पण हे काही सोप नाही आहे कारण तो कसाब आहे. सुरक्षितता आहे आणि आमच्या सारख्या भोचक मीडियापासून लपवून त्याला तुम्ही मुंबईहून पुण्याला नेले आहे गुप्तपणे! हे तुमच्या स्वभावाप्रमाणे आपण म्हणता आहात म्हणून त्याप्रमाणे हे सोपे नाही. ही गुप्तता, नेमके काय झाले? हे तुम्ही कसे केलेत? ते करताना तुमच्या मनात नेमके काय होते?
सदानंद दाते : निखीलाजी - एक काम डी जी साहेबांनी सांगितले होते आणि आम्ही ते पूर्ण केले. सगळे डिटेल्स येथे चर्चा करणे संयुक्तिक नाही. मात्र काय काय होऊ शकते धोके काय आहेत ह्याचे आडाखे आम्ही बांधले होते. त्यानुसार दक्षता घेतली होती गाडी बंद पडली, लोक मध्ये आली. मिडीयाने ........
निखील वागळे : हे तुम्ही मीडियापासून कसे लपवलेत? काहीच लपत नाही हो मीडियापासून?.........
सदानंद दाते- हा प्रश्न तुम्ही तुम्हालाच विचारला पाहिजे.
निखील वागळे - आज मुंबईचा पत्रकार ज्याला असे वाटते की आम्हांला सगळ्या बातम्या कळतात तो पराभूत झाला आहे आणि हे सिद्ध झाले आहे की मुंबईचे पोलीस दल काय करू शकते?
सदानंद दाते - निखीलजी तुम्ही म्हणता तितके काही कठीण नाही आहे ते. त्या रात्री नेले आम्ही त्याला मुंबईहून पुण्याला........
निखील वागळे : इतकं काही सोप नाही ते. तुम्ही त्याला मुंबईहून पुण्याला नेले आणि आज आम्हांला बातमी आली की त्याला फाशी देण्यात आली..... ठीक आहे मी पुढे जातो.
अजमल कसाबचा हा जो प्रवास २६-११ ला सुरु झाला आणि आज पर्यंत ह्या प्रक्रियेचे आपल्या समाजाच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने काय महत्व आहे असं तुम्हांला वाटत?
सदानंद दाते : आजचा दिवस भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी म्हणून आणि एक नागरीक म्हणून खूप समाधान देणारा दिवस आहे. आमच्या देशातील लोकशाही व्यवस्था न्याय देऊ शकते हे आज आपण ठळक पणे सर्वासमोर मांडलेले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनासमोर एक आव्हान होते. आपण एक जिवंत अतिरेकी पकडला ही खूप मोठी उपलब्धी आहे, मला असे वाटते की शहीद ओंबळे आणि त्यांच्या टीमने जे काम केले मुंबई पोलिसांनी त्या रात्री जे काम केले त्यातले सर्वोत्कृष्ट काम होते की एक जिवंत अतिरेकी आपण पकडला. असे उदाहरण क्वचित इतिहासात सापडेल. आता ह्या अतिरेक्याचे योग्य इंटरोगिशन, पुरावे गोळा करणे, आंतरराष्टीय धागेदोरे शोधून काढणे, कॉन्सपरसी प्रूव्ह करणे हे सर्व आपण चांगले प्रकार आपण केले क्राईम ब्रांचनी उत्तम चार्जशीट दाखल केली. प्रसिक्युटरने एक चांगली केस दाखल केली. कन्हीक्शन घेतले. प्रक्रिया पूर्ण केली आणि सुप्रीम कोर्टाची आणि सरतेशेवटी माननीय राष्ट्पतीची मोहोर त्याच्यावर उमटवली. आणि आज आपण त्याला फासावर लटकवले ही आपल्या देशातील लोकशाहीची सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. असं मला वाटते. आणि नागरिकांना व्यवस्थेबद्दलचे जे प्रश्न पडतात त्याला उत्तर आहे. system still works, we should help system जर नागरिकांनी मदत केली तर आम्ही अधिक जास्त चांगले काम करू शकतो. व्यवस्थेमध्ये ताकद आहे.
निखील वागळे : कसाबला तुम्ही पुण्याला पोहचवलेत. त्याला सुरक्षिततेने पुण्यात पोहोचविण्याची जबाबदारी तुमच्यावर होती. हे सुरक्षितपणे पोहोचवणे तुम्ही कशाप्रकारे केलेत? कसाबला बिर्याणी दिली, खर्च झाला हे सर्व खर आहे का? काय आहे ह्याच्यावर तुमचं म्हणण ? की हा अपप्रचार आहे आणि जे म्हणतात की खटल्याला उशीर झाला त्यातही काही तथ्य आहे का?
सदानंद दाते - कसाबची सुरक्षा आणि त्याच्यावरचा खर्च याबद्दल मी पण खूप मिडीयामध्ये ऐकले आहे आणि वाचले आहे. पण मला असं प्रामाणिकपणे वाटत की ही काही कसाबला दिलेली सुरक्षा नव्हती. ती न्याय व्यवस्थेच्या प्रक्रियेला दिलेली सुरक्षा होती. साक्षीदार सुरक्षित पाहिजेत, त्यांना निर्भयपणे साक्ष देता आली पाहिजे. पत्रकारांना सुरक्षा पाहिजे प्रासिक्युटर्सना आणि डिफेन्स कोन्सिलला विश्वास वाटला पाहिजे. ही लोकशाही मधील हि एक खूनी प्रक्रिया आहे. आरोपीला आपले निरपराधित्व सिद्ध करण्याचा हक्क आहे प्रसिक्युटर्सला त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्याचा अधिकार आहे. ही प्रक्रिया निर्वेधपणे पार पाडावी अडथळे येऊ नयेत त्यासाठी दिलेली ही सुरक्षा व्यवस्था होती आणि जे धोके होते ते निश्चितपाणे गंभीर स्वरूपाचे धोके होते. एक आंतरराष्टीय परिमाण या तपासात होते कसाब मुळे आपण ह्यात निष्पन्न करू शकलो. जर आपण २६-११ च्या घटनेतील कसाबचा शेवट अशाप्रकारे करू शकलो नसतो तर ती आपल्या देशातील पोलिसांना आणि न्याय व्यवस्थेसाठी ती एक प्रकारची नामुष्कीची बाब झाली असती म्हणून ही सुरक्षितता ही प्रक्रियेची सुरक्षितता होती ती करणे फार आवश्यक होते. कायद्याच्या प्रक्रियेने २६.११ च्या घटनेला न्याय देणे हे मला वाटत आपल्या समाजाचे खूप मोठे यश आहे.
निखील वागळे : २६-११ नंतर ऑथर रोड जेलला कसाबला नेले त्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमच्यावर होती ती आपण पार पाडलीत. ह्या चार वर्षात आपल्यावर किती ताण होता ?
सदानंद दाते : खंर सांगायचं तर टेन्शन वगैरे काही नव्हत........
निखील वागळे : अजिबात नव्हत? ...............
सदानंद दाते : कशासाठी नव्हत ते पण मी सांगतो तुम्हाला! २६-११ चा अनुभव एक वेगळा अनुभव होता . व्यक्तिगत मी तुम्हाला सांगतो की आम्ही कोणी तिथे काही हिरोगिरी करायची म्हणून गेलो नव्हतो. आमचे कर्तव्य होते. एक युनिफॉर्म मधील पोलीस अधिकारी आहोत. आपल्याकडे शस्त्र आहे.
आपल्या देशातील नागरिक अडचणीत आहेत. त्यांचे संरक्षण करणे हे आपले काम आहे तेव्हा जे दिसले, जे करणे योग्य होत ते आम्ही केले........
................२६.११ रोजी कामा हॉस्पीटलच्या सहाव्या मजल्यावर परिस्थिती वेगळी होती. ५०-५५ मिनिटे ते नाट्य म्हणजे सीमेवरील युद्ध शहरात आलेले होते. त्यामुळे तेथे जी लढाई झाली त्यावरून आम्ही खूप शिकलो........
निखील वागळे : या पुढच्या काळात दहशतवादाचा मुकाबला या देशाने कसा केला पाहिजे?
सदानंद दाते : मला असे वाटते की दहशतवाद म्हणजे काय हे समजून घेणे. हे काही भारतात किंवा मुंबईतहोणारे हे प्रकरण नाही. इंटरनेटवर सर्व माहिती उपलब्ध आहे. जगभर सर्वत्र दहशतवादी प्रवृत्ती वाढताना दिसतात. म्हणजे जगातल्या इतर सगळ्या नागरी समाजाप्रमाणे आपल्यावर हे संकट आहे. ते संकट समजावून घेणे हे संकट म्हणजे फक्त पोलिसांनी सामना करावयाचे संकट नव्हे, शासनाने सामना करावयाचे संकट नव्हे हे आपल्या ज्या प्रकारची समाजव्यवस्था आहे त्या समाजव्यवस्थेसमोरचे आव्हान आहे हे जर आपण नाही समजून घेतले तर आपण अशी अपेक्षा करू की सरकारने करावे, पोलिसांनी करावे तर ह्या संकटाचा सामना होण्यासारखा नाही.
निखील वागळे - मग नागरिकांनी काय करावे?..........
सदानंद दाते : मला असे वाटते की आपण जर आव्हान समजून घेतले पाहिजे. दहशतवाद्याची एक टीम आहे आणि त्यांच्या ज्यांच्याविरोधात सामना आहे तो नागरिक, प्रशासन बिझनेस, एनजीओ, पत्रकार त्या आपल्या सर्वांची टीम आहे. आपण जर असे समजलो आपला मुकाबला त्यांच्याबरोबर आहे. तर आपल्या ( टीम ) मधील जे दोष आहेत. ते दोष सुधारून आपल्या समाजव्यवस्थेकडे अधिक प्रगल्भपणे बघण्याची गरज आहे. दहशतवादाची समस्या सोद्विण्यासाठीचा हा पहिला मुद्दा.
दुसरे सतकर्ता म्हणजे जर मी बसने प्रवास करतोय तर कुणीतरी माझ्या बसच्या खालची सीट चेक करेल ही अपेक्षा करणे बरोबर नाही. मी बसताना चेक करायला पाहिजे की मी सुरक्षित आहे की नाही. सिनेमाहॉलमध्ये असेल, मॉंलमध्ये असेल एखादी संशयित वस्तू सापडली तर कळवायला पाहिजे आणि त्यातून काय धोके संभवतात ते आपल्याला समजले पाहिजे.
तिसरी बाब म्हणजे तुम्ही मला कदाचित स्वार्थी म्हणाल पण पोलीस ही दहशतवादाचा मुकाबला करण्याची एक यंत्रणा आहे. ती एक ठराविक ताकद आहे ती ताकद जर आपण अनावश्यक गोष्टी उदा. निर्देशने,संप इ. पासून वाचवू शकलो समाजातील नागरी प्रश्न जर अधिक चांगल्याप्रकारे सुटले तर हि ताकद आपण दहशतवादाविरुद्ध अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकतो. समाजाकडून सुजाण सहकार्याची अपेक्षा आहे. आपली प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. आम्हांला साक्षीदार मिळत नाही. जर आम्हांला ते मिळाले नाही तर आम्ही गुन्हा कोर्टात सिद्ध कसा करणार? मला असं वाटत की मिडीयासह प्रत्येक घटकाने जर असा विचार केली की हे आमच्या समाजासमोरचे संकट आहे आणि जर त्यात मी काय करायचे? असा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारला तर प्रत्येकाला उत्तर मिळेल की मी काय करायला पाहिजे आणि मला असा वाटत की हे उत्तर प्रत्येकाने शोधायला पाहिजे.
निखील वागळे : हा प्रश्न विचारावा की नाही ह्या द्विधा मनःस्थितीमध्ये मी आहे हा प्रश्न माझा नाही. २६-११ च्या घटनेत जखमी झालेल्या एका पोलिसांच्या मुलीचा आहे तिने विचारले की आज सकाळपासून तुम्ही सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक करत आहात, पण ह्या घटनेत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे पुरेसे कौतुक सरकारने केले आहे का? एका ऐतिहासिक घटनेचे, खटल्याचे साक्षीदार असलेल्या, सहभागी असलेल्या जखमी पोलिसांच्या मुलीचा हा प्रश्न आहे की शासनाने त्याच्यासाठी अधिक काही करायला नको का? तुम्हांला काय वाटत?
सदानंद दाते : मी असं सांगेन की २६-११ ला काम करण्याची संधी मिळाली आणि जर मी जखमी झालो असलो तर ते माझ्यावर संकट आलं आहे अस मी समजावं का? मला देश्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली ( याचे समाधान ) असे समजावे माझा दृष्टीकोन जर स्पष्ट असेल तर मग शासनाने काही करावे......
शासनाने बरेच काही केले आहेच. सेवेत आहोत सेवेतले लाभ तर आहेतच. रेक्गनिशन पण आहेच पण खर रेक्गनिशन मला जर का विचाराल तुम्ही तर मी या संकटाला सामोरे गेलो, डगमगलो नाही, सामना केला, आणि मला असं वाटत की माझे काम मी चांगले केले हे पारितोषिक तर मीच स्वतःला देऊ शकतो. अजून कुणी मला देऊ शकत नाही आणि मला अस वाटत की मुंबई पोलिसातील अनेक अधिकारी जे माझ्याबरोबर होते, ज्यांच्याशी मी बोललो त्यांना हे समाधान आहे की आपण ज्या कामासाठी अंगावर वर्दी घातली ते काम आपण आपल्या पूर्ण ताकदीने केले आणि आपण ह्याच्यापुढे पण करू.
निखील वागळे : हे कर्तव्याचे समाधान आहे, आभारी आहे मी तुमचा तुमच्यासारखे पोलीस अधिकारी आणि तुमचे सहकारी आहेत म्हणून आमच्यासारखे नागरिक सुरक्षित आहेत. तरी सुध्दा तुम्ही जो आम्हाला सल्ला दिला आहे. सतर्क रहाण्याचा तो आम्ही आणि महाराष्टातील जनता निश्चितच लक्षात ठेवेल. दहशतवादाचा मुकाबला करताना मी काय करू शकेन याचा विचार केला तर सदानंद दाते यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देणे शक्य होईल.
आभार आयबीएन लोकमत
तू प्रेमि ..... आ .......हा ....
मै प्रेमि ....... आ ~~ह्हा...
फिर कया डॅडी क्या अम्मा ...............
ईक बस तू ही ..... प्यार के काबील ...
सारा जहा है निकाम्मा ........
...
...
तम्मा तम्मा लो गे .......
.....
तम्मा तम्मा लो गे ...तम्मा
=))
येवढा अवांतर प्रतिसाद कधी स्वप्नात पण पाहिला नव्हता ...
हेच म्हणतो... तम्मा तम्मा लोगे काय.... आणि निकम्मा तम्मातात्या काय.... अगाययायाया.... गेली पाच मिनिटे वेड्यासारखा हसतोय... =)) =)) =))
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आय्चा घो.. अचानक एकडे येणे झाले म्हणुन नाही तर एका हुच्च प्रतिसादाला मुकलो असतो..
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
येवढा अवांतर प्रतिसाद कधी स्वप्नात पण पाहिला नव्हता ...
सहमत आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
ही स्माइली मिसळपाव वर उपलब्ध असल्याचं सार्थक करणारा अवांतर प्रतिसाद...
इतका बेष्ट प्रतिसाद दहा हजार वर्षात कोणी दिला नसेल...
टारोबा आणि तात्यांनी त्यावरही कमाल केली आहे.
इथे आजू बाजू चे लोक पहायला लागले आहेत. हसून डोळ्यात पाणी आलं...
जबरा... फार दिवसांनी इतकं हसवणारं काही वाचलं... झकास...
=)) =)) =))
हे म्हणजे पिच सोडुन बॉल लेग अंपायरच्यादेखील लेग साइडने वाइड गेल्यासारखच आहे की. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
ज्या तत्पुरुष समासाचे पहिले पद नकारार्थी असते त्याला नञ तत्पुरुष समास म्हणतात.
साक्षात् संपादकांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेले हे व्याकरणविषयक उत्तर चालून जावे असे वाटते
आपला
(माजी) आजानुकर्ण
ज्या तत्पुरुष समासाचे पहिले पद नकारार्थी असते त्याला नञ तत्पुरुष समास म्हणतात
धन्यवाद! माहीत होते पण लक्षात नव्हते! पण ञ वापरून शब्द केलेले आहेत का? ("नञ" सोडून)
बाकी व्याकरणविषयक माहीती चालते चर्चा चालत नाही. :-)
जेव्हा अनुनासिकापुढील अक्षर च, छ, ज, झ असते तेव्हा त्याच्या मागे ञ लावतात.
जसे अन्त, पम्प तसे (प ञ जा) पञ्जा. संस्कृत मध्ये मराठी प्रमाणे सरसकट अनुस्वार देत नाहीत तर त्या व्यंजन वर्गातील अनुनासिक वापरतात. (वर व्यंजन लिहिले आहे ते खरे म्हणजे व्यञ्जन असे लिहायला हवे.)
विनोद
प्रत्येक
सहाय्य.
सह्हाय्य
बरहापेक्षा गमभन
- मुम्बै ते पुणे - २६-११ ते २१-११ - फक्त तीन तास
हाण्ण!
हो मी पण बरहा डायरेक्ट वापरते
अहो, 'Sharvan' हा
श्रावण!
गाने मणातले
??? आपला, निक
थोडासा आनंद देण्यासाठी ह्या
ठॉ ...
येवढा
मेलो.....अ-क्ष-र-शः मेलो !!!!!
सहमत
आय्चा घो..
आय्चा घो..
+१
+१
वेड
>>इतका
कर्मण्ये
हे
र्हस्व
र्हस्व Rhasva
ञ
नञ तत्पुरुष समास
शब्द
पाञ्चजन्य
हाय
हाय
प्रतिक्रि
काही लिहायाचे आहे...
हृषिकेश hRuShik
मला माझे
अहो
हो तेच
अनुस्वार
अनुस्वार लिहिण्यासाठी..
santosh
संतोष
धन्यवाद!!
ञ
+१
नाहीब्बॉ
ब्ब्ब
"चेहरयाला"
चेहर्याल