राग राजस्थानी
लोक किती काही म्हणोत . कि बाहेर राहून आल्यावर फक्त घरचंच जेवण चांगलं लागतं किंवा आईच्या हातचा वरण भात किंवा बाबांच्या हातचा तिखट जाळ झुणका. या सगळ्याची किंमत जरी बाहेर राहिल्यावर समजते . तरीही , घर सोडून दुसऱ्या गावात राहायला गेलं कि एक कला आपल्याआपण शिकतो . ती म्हणजे चांगली खायची ठिकाणे शोधणे.
मग तो साधा भेळपुरी वाला असो कि भवानी मंडपातला तोंडाला पाणी सुटेल असा तांबडा पांढरा रस्सा असो . किंवा भल्या सकाळी ७ वाजता कटाकिर्र मध्ये जाऊन हाणलेली मिसळ असो . किंवा रात्रीच्या शांत वातावरणात पद्मा गेस्ट हाउस सामोरील "चाचा" ची गरमागरम चाय असो . डेक्कन कडे फक्त संध्याकाळी येणारी आत्या आणि तिथे अंडा राइस + बुर्जी + हाफ फ्राय सगळं एकाच वेळी एकाच प्लेट मध्ये द्या, अशी दिलेली आमची ऑर्डर असो. किंवा मग शाहूपुरीत "वामन" मध्ये बसून यथेच्छ हाणलेले मासे आणि , खेकडा , शिंपले सोलकडी. असो, विषयांतर होतोय वाटतं . किंवा असं म्हणू कि विषयाला सुरुवातच केली नाहीये . होतं असं. चांगलं खायला प्रचंड आवडतं. आणि ते मिळणारी ठिकाणं आठवली कि तिथे आत्ता या क्षणी जाता येत नाहीये हे समजलं कि अस्वस्थ होतं . तर असोच .
मुद्दा हा कि अश्याच एका ' रोज घरचं खाउन कंटाळा आला च्यायला ' अश्या संध्याकाळी घरी जात असताना नेहमीच्या हॉटेल कडे गाडी वळली . पण आईची धमकीही आठवली . " श्रावण नाही , कमीत कमी गणपतीचे २ दिवस तरी मांसाहार नको रे . चिकन मासे खाल्लेलं समजलं तर विहिरीत बुडवून मारेन ", कमीत कमी वडापाव तरी खावा असा विचार आला .
हरिमंदिर समोर हा माणूस गेली कित्येक वर्षी एक हातगाडीवर वडापाव आणि कचोरी तळून विकतोय. किती ते नक्की नाही माहित . पण मी तरी गेली १५ वर्ष त्याला बघतोय, तोच सरळ साधा अवतार, जोडीला अखंड बडबड. याचा अक्खा मेनू दोन गोष्टीत संपतो . कचोरी आणि वडापाव . आणि किंमत . अजुनी फक्त १० रुपये .
तिथे पोचलो ते पक्क्या राजस्थानी खड्या आवाजात "माझे माहेर पंढरी " च्या सुरात पोहतच. याला हि पण सवय होती . रोज साधारण ६ वाजता याचा " बिसनेस " सुरु व्हायचा , आणि ९ वाजता संपायचा. पण या मधल्या वेळात सुरुवातीची गरम वाडे आणि कचोरी काढण्याची धांदल संपली . कि हा लोकांना एक एक प्लेट मध्ये वाढत गायला सुरुवात करी . राजस्थानी हिंदी गाणी तर होतीच , पण इतकी वर्षे बेळगावात राहून कन्नड मराठी आणि कोकणी गाणी पण शिकला होता. आवाज हि अगदी आकाशापर्यंत चढे. आणि सुरांचं ज्ञान होतं. मुख्य म्हणजे गावाकडे कोणा गुरु कडे लहानपणी शिकला हि होता .
पोचल्या पोचल्या त्याने गात गातच सलाम केला, आणि मी वडापाव खात खात त्याच्या राजस्थानी बोलीतल्या मराठी भजनाची मजा घेऊ लागलो. मला गाण्यातलं फार काही कळत नाही . पण अण्णा असते तर कमीत कमी तरी कौतुकाची थाप नक्कीच मारली असती त्याच्या पाठीवर . गाणं संपलं तसं याची बडबड सुरु झाली .
"क्या साब बोहोत दिन दिखे नई "
"हा काम बोहोत आय पिछले कुछ दिन मे . गाना क्यू रोका ? दुसरा कुछ गाओ "
"अरे साब गाना तो गाते रहेगा . कम से कम और कुछ दिन तो . मदत करोगे क्या ? "
"हा बोलो "
" मै वापीस गाव जाएगा अगले महिने. तबियत खराब रेहता है. पर मेरा बेटा येही रहेगा . दसवी गया उसका. अभी ITI सिखेगा . वायर्मेन बनेगा . "
मागून त्याचा मुलगा आला समोर
" हा तो पैसा चाहिये क्या? "
"अरे नही नही . पैसा नही. हम भिकारी थोडी है . पैसा वो खुद कमाएगा. गाडी चलाएगा वो शाम मे . दोपहर तक सिखेगा . और शाम तक पढेगा . शाम को यहा सेवा करेगा . सब धंदा सिखा दिया है. वडा भी अच्छा बनता है. आपको बस यहा आते रेहना है. "
"ठीक है . मै कोई पैसा का बात नाही करेगा . और यहा आता भी रहूंगा . लेकिन एक शर्त पर . "
" जी कहिये "
"ये भी गाना गाता है? "
"हा मुझसे भी अच्छा . "
प्रतिक्रिया
एका मस्त माणसाचा तितकाच सुरेख
खरंच मस्त आहे व्यक्तिचित्रण
काय सुंदर लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलय.
आवडलं!
नमनाइतकंच पुढचंही खुलवायला
हेच म्हणतो. शेवट अजून
हो :)
सुरुवात चांगली केलीस, शेवट
वाह, मस्तं लिहिलंय.
राजस्थानी अत्यंत मानी असतात
पण फक्त काटक होतात . जर्रा
@स्वॅप्स , सूड , किसान शिंदे
सर्वांचे धन्यवाद :)
क्या बात है.....
सुपर्ब!
पुढल्या वेळी गेलो आणि तो मूड
खूप छान लिहलय!
घर सोडून दुसऱ्या गावात
'पूर्ण' होता होता अपुरं
सुंदरच!
इन्नु सोल्प बरिबेकागित्तप्पा!
होउदु .
अद्या
हाहाहाहा
आवडल
भारीच लिहिलायस रे अद्द्या.