Skip to main content

वन रंक वन पेंशन ...

लेखक सत्य धर्म यांनी बुधवार, 09/09/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरानो , मी सुद्धा तुमच्या पैकीच एक सामान्य माणूस आहे .. वडील शेती करतात शाळेत असल्या पासून सांगितला जात आहे कि सीमेवर रक्षण करणारे सैनिक , विविद व्यवसाय करणारे व्यावसायिक उदा. डॉक्टर, वकील, शेतकरी इ. हे एक प्रकारे देशाची सेवा करतात. बाकी लोंकाना काय मिळते हे सर्वाना ठाऊक आहे आज शेतकरी आणि सहकारी क्षत्रात काम करणाऱ्यांची अवस्था काय आहे ? मग सरकार देशसेवा करणाऱ्या सैनिकांना इतक्या सुविधा पुरवत आहे कि त्याची मुल, बायको, आई , वडील या सर्वांच संगोपन करन्या इतपत पेन्शन सरकार देते मग जो शेतकरी पूर्ण देशाचा सांभाळ करतो त्याला कोनत्याच सोय सुविधा सरकार का देत नाही ? सहकारात काम करणाऱ्या लोकांना महिना १००० रुपये पेंशन मिळते त्यांचा विचार सरकार का करत नाही ? असहाकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच नोकरीत आणि नोकरी नंतर काय हाल होतात ? याचा विचार कोणी केला आहे का ? खूप बोलायचं आहे पण पहिलीच वेळ असल्यामुळे थांबतो पण या सर्वांवर विचार व्हावा हि अपेक्षा.. आपलाच , सत्य.

वाचने 5820
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

काका नाही कि काका आहे हे ठरवून घ्या. हलकेच घ्या :) मला तळमळ वाटते आजुबाजुची परिस्थिती पाहून ... खूपच वाईट अवस्था आहे कमवणारे कमवतात बाकी तसेच राहतात, पोटाच्या वर तर कोणी बांधून नेत नाही.

असंघटित कामगारक्षेत्रातील असुरक्षितता पाहून वाईट वाटते. या विषयावर अजून, मुद्देसूद आणि माहितीचे संदर्भ देऊन लिहा. पुलेशु.

In reply to by एस

असंघटित कामगारक्षेत्रातील असुरक्षितता पाहून वाईट वाटते.
यात आयटीवालेही येतात. ;)

In reply to by सतिश गावडे

आयटीवाल्यांच्या बाबतीत कंपन्यांची असुरक्षितता बघवत नाही. ;-)

शत्रूचे भय दाखवून आम जनतेला नागवणं हा जुना धंदा आहे.

सरकारने हे करावं ते करावं हे बंद होईल तो सुदिन. कुणाचं तरी वाक्य आहे - यह मत सोचो की देशने तुम्हारे लिए क्या किया । यह सोचो कि तुमने देशके लिए क्या किया । आणि नंतर आँखे लागायचं ;-)

पण पहिलीच वेळ असल्यामुळे थांबतो पण या सर्वांवर विचार व्हावा हि अपेक्षा..
तुम्ही काय काय विचार केलाय ते सांगा बघू आधी.

In reply to by कपिलमुनी

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!! चायला कोणाचं काय तर कोणाचं काय!! :P

असंघटीत क्षेत्रात असणार्यांना कोणी वाली नाही. स्वताचे पोट भरलेले असताना सुद्धा संघटनेच्या बळावर काही लोक आपल्याला हव ते करून घेतात..

सहकारी खात्यात कित्येक वर्ष काम करून जर १००० रुपये पेंशन मिळत असेल त्यांनि तक्रार कोठे करायची, ऐकून कोण घेणार आहे का ?....