Skip to main content

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित पुरुषांसाठी कोकीळ व्रत

लेखक दमामि यांनी मंगळवार, 25/08/2015 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. यावेळी समस्त विवाहित पुरुष वर्गासाठी कोकीळ व्रत सुचवले जाते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते.ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहे. हे व्रत विवाहित पुरुष करतात. (कारण त्यांनाच त्याची गरज असते ). हे व्रत केल्याने पुरुषांना दीर्घकाळ सौ माहेरी गेल्याचे भाग्य, म्हणून आपोआपच पौरुषवृद्धी, शेजारसौख्य व इतर प्रपंचात न अनुभवता येणारी सुखे प्राप्त होतात. हे व्रत ब्रह्मर्षी विश्वामित्रांना मेनकेने सांगितले. कोकीळ व्रताची कहाणी: शंकराची बायको पार्वती. तिला नेहमी आपल्या नवऱ्याचा आणि गंगाबाईचा संशय येई. त्यामुळे ती शंकरावर कायम लक्ष ठेऊन असे. कध्धी म्हणून माहेरी जात नसे. शंकराने बघितले तर सर्व देवांच्या बायका वर्षातून एकदा तरी चांगल्या महिनाभर माहेरी मुक्कामाला जातात पण पार्वती चुकून सुद्धा माहेरचे नाव घेत नाही . शंकराला आपल्या अविवाहित मुक्त जीवनाची (बॅचलर लाइफ़) ची फारच सय येऊ लागली. त्याचवेळी तिथे नारद मुनी प्रवेश करते झाले. शंकराच्या मुखकमलाकडे पाहून त्यांना परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी शंकरास मदत करायचे ठरविले. नारदमुनी (कळलावे) तिथून कोकीळ पक्ष्याच्या रुपात थेट पार्वतीकडे आले व दक्षनगरीत चालू असलेल्या आभूषणे व वस्त्रे यांच्या अल्प किमतीतील विक्री आणि प्रदर्शनाचे आणि तिथे देवी लक्ष्मी, सरस्वती, इंद्राणी यांनी केलेल्या खरेदीचे रसभरीत वर्णन गाऊ लागले. ते ऐकून दाक्षायणीला फारच चुटपूट लागून राहिली. (इतर स्त्रियांनी फायद्याची खरेदी केली आपल्याला मात्र संधी मिळाली नाही याचा स्त्रियांना फार राग येतो हो!). तिने शंकराच्या मागे भुणभुण चालू केली," मला माहेरची खूप आठवण येते. गेल्या अठरा वर्षात तुमची आबाळ होऊ नये म्हणून मी एकदाही तिथे गेले नाही, एकदा जाऊन यावेसे वाटते." शंकराने "तुझ्यामागे माझी काळजी कोण घेणार? जेवणाचे काय?" इत्यादी कारणे सांगत तिला अडवायचा लटका प्रयत्न केला. वस्त्रभूषणांच्या आनंदापुढे सर्व गोष्टी दुय्यम वाटल्याने "गंगाबाईला मी माझ्या हाताखाली साऱ्यांमध्ये निपुण केले आहे, माझ्यामागे ती तुमची व्यवस्था पाहील" असे सांगून पार्वती त्वरीत माहेरी जाण्यास निघाली आणि चांगली दोन मासांनंतर परत आली. शंकराने कैलास पर्वतावर स्वर्गीय सुख भोगले ते वेगळे सांगायला नकोच. त्यावेळपासून शंकर कोकीळ पक्ष्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि जो कोणी विवाहित पुरुष तुझे व्रत करेल त्यावर मी प्रसन्न होऊन त्याच्या पत्नीस माहेरी पाठवेन असा वर दिला. व्रत: प्रथम कोकिळ पक्षी शोधायचा. तो मिळाला की मला व्यनि करायचा. मगच मी पूर्ण व्रताची कृती देईन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21398
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

सा सं, मोबल्यावरून टंकल्यामुळे परिच्छेद नीट करता आले नाहीत. मदत कराल का?

In reply to by दमामि

समजा दोन पत्नी असलेल्या पतीने दोन कोकिळांची व्रते करावी, की एकच कोकीळ दोन वेळा पुजावा ?

In reply to by एस

अविवाहित लोकांनी हे व्रत करू नये... त्यामुळे ते कायम अविवाहित राहतात, असे नारदमुनींनी विशवामित्र मुनींना सांगताना कायप्पा मुनींनी ऐकले असे गुपचुपव्रतपुराणाच्या १४ व्या अध्यायात लिहिले आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी काही काळ एका विदेशी काम केले. तेथे अविवाहित लोकाना नेहेमी ऐकवली जाणारी स्थानिक भाषेतील एक म्हण - ज्याना "तसेच" रोज दूध मिळवता येते, त्याना गाय (अथवा शेळी) विकत घेऊन, घरी ठेवून, तिची देखभाल करण्याची उठाठेव करण्याची काही जरूर नसते!

कोकीळ कि कोकिळा हे कसं शोधायचं? म्हणजे कोकीळ शोधला आणी ती कोकिळा निघाली तर आमचा ढोल व्हायचा.

In reply to by सुबोध खरे

सो सिंपल यु नो..... कोकिळ अथवा कोकिळेवर एक दगड फेकायचा, दगड फेकताच... उडाला तर कोकिळ आणि उडाली तर कोकिळा.

अच्र्त ब्व्ल्त मेला दमामि!!

=))

__/\__ स्विकारा महाराजा!

व्रताचा विधी मला म्हैत आहे. ११ अनाहितांना सोन्याचे कोकिळ वाटा. नाही वाटलेत तर तुमच्या पत्नीला कोकिळा व्रताची महालक्ष्मी व्रताची आणि संतोषीमातेच्या व्रताची पुस्तके भेट म्हणून देण्यात येतील.

आवडले हे व्रत. पण हे व्रत करताना प्रसादाची सोय कशी असावी? तसेच मित्र आप्तेष्टांना घरी बोलावल्यास "तिकडे" न कळण्यासाठी एखादा उपाय आहे काय?

एक नागपूरातला विवाहित मित्र हे व्रत करीत असे. त्यामानाने प.महाराष्ट्र आणि कोकणात या व्रताबद्दल अनभिज्ञता आढळते. अठरा वर्षांपूर्वी शेजारच्या काकांनी हे व्रत केले होते, व्रताचे नियम नीट्ट पाळले नाहीत म्हणून की काय देव जाणे काकांच्या साबा आणि साबु दुसरा आषाढ येईस्तवर त्यांच्या घरी मुक्कामाला होते.

त्यापेक्षा लग्नच केले नाहीतर, बायको नाही म्हणजे कोकीळा व्रत नाही आणि आयुष्यभर स्वर्गीय सुख! कस काय दमामी खर आहे की नाही.

=)) मस्तच! कोकीळ कसा दिसतो हे माहितीसाठी खाली चिकटवत आहे! Koel (चित्र विकीवरील असल्याने, अधिक माहिती हवी असल्यास माहितगारांना विचारावीत! ;) )

In reply to by अत्रुप्त आत्मा

सगळे व्रत करुन त्याच्या नावाने कोकळतायेत म्हणून चिडल्या कोकिळ, त्यामुळे तो लालबुंद डोळा!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

दिल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळ चा फोटो आहे. म्हणुन डोळे लाल आहेत!

दुसरी गोष्ट : हे व्रत करताना

"कावळे"*

दर्शन टाळावे. अन्य्था फल सांगतेवर परीणाम होतो. आता पहिली गोष्ट : व्रत कथा विस्तार चांगला आहे. चतुरमासानिमित्त आणखी व्रत-कहाण्या याव्यात ही अपेक्षा.

"कावळे"*

मध्ये डोम्/पर्/चोंबडे असे उप प्रकार आहेत याची नोंद घ्यावी. भावीक नाखु

व्रतात सोमरसप्राशन किंवा पांढरे बटाटे अथवा गोश्तीची गोष्ट नसल्याने बहुधा फाऊल धरण्यात आला असावा.

देवा . अजिबात माफ करू नको अश्या अश्रद्ध, पापी लोकांना . विनोदाच्या नावाखाली काहीही बरळनार्यांना . अस्सल विनोद करायला जमत नाही म्हणून तुझ्या नावाने विनोद करून हीन थराला जातात

In reply to by तुडतुडी

अयि तुडतुडे, एतादृशोऽभिमानस्तु वॄथा एव | किन्तु अरसिकेषु क्रूरजनेषु एतादृश: विनोदस्तु सदैव स्पृहणीयः अत एव अस्मान्सदैव रञ्जय इति मे विज्ञप्ति: | - भगवद्भक्तः वाल्गुदीश्वरः|

In reply to by बॅटमॅन

भोः वाल्गुदनररत्न, तस्याः संस्कृत भाषाकौशलं सर्वत्र प्रसिद्धम्भ, यद्यपि भद्रं व प्रतिसाद मराठीभाष्ये लेखिष्यातु, इती अनुरोधं करिष्यामी ।।

In reply to by पगला गजोधर

नै चांगलंय.. फक्त ते "करिष्यामी" चा "मी" पयला की दुसरा वो ??

In reply to by पगला गजोधर

सोन्स्क्रूत काहून लिवाया लाग्ले बा? आता जर मी हितं (समजा) मंडारिनात लिवाया लागलो, तर शिविगाळ करतोय की स्तुती, की नुसतीच प्लेन व्हॅनिला निर्भत्सना, हे तुडतुडीभाऊंना कसे कळावे?

In reply to by आनंदी गोपाळ

प्रॉब्लेम इतकाच आहे की मँडारिन ही हिंदू धर्माची प्रमुख भाषा नव्हे. ते स्थान संस्कृतचे आहे. त्यामुळे मँडारिनात काही लिहिल्यास तो इफेक्ट येणार नाय.

In reply to by बॅटमॅन

आमं, प्राचीन वैदिकहिंदूधर्म दर्पणः संस्कृतभाषायाम अस्ति खलु । किंन्तु मिपाः वैदिकहिंदूधर्मस्य मुखपत्र नस्ती, यत्र बहुधर्मीय बहुपंथीय जन मराठीसाहित्यवाचानार्थम आयान्तिच वर्तन्ति, अतः यत्र संस्कृतप्रतिसाद प्रकटीकर्तुं किंमं प्रयोजनम अस्ति ? मन्ये छद्ममनोरथः शंकयः !

In reply to by पगला गजोधर

नास्त्यत्र कोऽपि छद्ममनोरथः इति मे मति: - इतःपरम् भवान् यदि किञ्चित् निजमनसि धारयति तर्हि किं करवाणि? :)

In reply to by बॅटमॅन

त्वं सन्तुलितव्यक्ती एतत् जानामि, तत्र कोपि सन्देहः नास्ति । अन्यथा अहम् इति प्रतिभाति मनशङ्के प्रकट न करोमिस्म । ;)

In reply to by बॅटमॅन

ते अयि च्या ऐवजी भो: तुडतुडीबंधो असावं असा सौंशय आहे रे =)) बाकी बॉलरच्या हातावर बॅट हाणुन थेट ष्टेडियमच्या बाहेर षटकार. =))

In reply to by तुडतुडी

देवा असल्या विनोदबुद्धीहिन लोकांना थोडसं विनोदबुद्धीचं वाटप कर रे बाबा. असं झालं तर मिपावर रोज एक विडंबन पाडिन हो.

आमाले पन द्या महिती.........

हाहाहा. अशक्य विडंबन आहे. का कुणास ठाऊक पण दमामिंच्या लेखनावर घासुगुर्जींच्या लेखनाची छाप आहे. ते देखील विडंबनविद्यापारंगत आहेत.

In reply to by मृत्युन्जय

@का कुणास ठाऊक पण दमामिंच्या लेखनावर घासुगुर्जींच्या लेखनाची छाप आहे. ते देखील विडंबनविद्यापारंगत आहेत.>> :-D अट्यंट सहमत आहे! :-D

खूप छान, अतिशय उत्तम माहिती. तसेच व्रतविधी दिला असता तरी बरे झाले असते.

ऐका कोकीळांनो, तुमची कहाणी. स्वर्गलोकीं इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पाडवसभा इत्यादि पांची सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजाताहेत, रंभा नाचताहेत, तों तुंबोर्‍याच्या तारा तुटल्या. मृदुंगांच्या मेर्‍या फुटल्या. असें झाल्यावर सभेचा हुकूम झाला. “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. गांवांत कोणी वाणवशावाचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबोर्‍याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा.” असा हुकूम झाल्यावर किसनदेव आपल्या मनांत भ्याले. माझा मित्र अर्जुन ह्यानं कांहीं वाणवसा केला नसेल. रात्रीच्या पार्टीतच तो टल्ली झाला होता. तेव्हा ते उठले, त्याच्याकडे जाऊन चौकशी केली. त्यानं कांहीं वाणवसा केला नाहीं. नंतर कृष्णांनीं त्याला कोकीळाकरवी वसा सांगितला. ” अर्जुना अर्जुना, आखाड्या चतुर्दशीपासून रोज सकाळी; आय रिपीट रोज सकाळी आंघोळ करावी, अभक्ष्यभक्षण केल्यानंतर दात घासावे, अपेयपान केल्यानंतर फ्लॉस करावे . हा वसा श्रावण्या चतुर्दशीस संपूर्ण करावा. उद्यापनाचे वेळीं ब्याचलरास जेवायला बोलवावे आणि पाच घरचे सवाष्ण बाप्ये बोलवून पार्टी करावी." असं सांगून कोकीळ पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच अर्जुनानं सांगितल्याप्रमाणं केलं. पुढं सभेंत कळलं. अर्जुन वाणवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पहातात, तों त्यानं वसा वसला आहे. पुढं येतां येतां सुभद्रा त्यांना दिसली. तिने मोलकरणीला उद्योगाला लावले होते आणि आपण दक्षिणेस पाय करून 'होणार सून मी ह्या घरची' बघत बसली होती. तेव्हां तिला महिन्याभरासाठी माहेरी पाठवले. नंतर तंबोर्‍याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेर्‍या वाजत्या केल्या. तशाच रंभा नाचत्या केल्या. जसं ह्या व्रताच्या योगानं अर्जुनावरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण. तात्पर्य : ऊतू नये मातू नये, भरला ग्लास ओतू नये.

In reply to by सूड

एका मिपाकर पुरुषाने, हे कोकीळ व्रत केलं, आणि त्यामुळे त्याचं खूप भलं झालं, त्याच्या पत्नीला माहेरचा उमाळा येवु लागला, प्रत्येक महिन्यात ती माहेरी २-३ दिवसांसाठी जावू लागली. पण नंतर दुसऱ्या वर्षी तो व्रत रीन्यु करायचं विसरला, आणि त्याचा सत्यानाश झाला. सगळे सासरची मंडळीना उमाळा येवून ते वरचेवर मुक्कामी यायला लागले, मेहुण्याला इंजिनीअरिंगला त्याच्याच शहरातील संस्थेत प्रवेश मिळाला आणि तो मुक्कामी आला, नंतर पुन्हा पुरुषाने लेट फी भरून कोकीळ व्रत रीन्यु केल्यावर, त्याच्या सासरच्या मंडळीचा उमळा कमी होऊन, ते सर्व येइनाशे झाले, मेव्हण्याच कॉलेजात ग्याटम्याट जुळले, त्यामुळे मेव्हण्याने, त्याच्याघरी स्टडी होत नाही असे वाटायला लागण्यामुळे, व अभ्यासाला प्रेरणा मिळावी या हेतूने कॉलेज वसतीगृहावर मुक्काम हलवला, त्या पुरुषाचं सुखकाळ परत मिळाला..

In reply to by सूड

अगागागागागागागागागा =)) =)) =)) =)) =)) बाकी ते "भरला ग्लास ओतू नये" हे झ्याकच पटलं. भरला ग्लास, मग तो वारुणीचा असो वा ताकाचा, ओतू नये उगा कधीच साचा.