Skip to main content

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित पुरुषांसाठी कोकीळ व्रत

लेखक दमामि यांनी मंगळवार, 25/08/2015 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. यावेळी समस्त विवाहित पुरुष वर्गासाठी कोकीळ व्रत सुचवले जाते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते.ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहे. हे व्रत विवाहित पुरुष करतात. (कारण त्यांनाच त्याची गरज असते ). हे व्रत केल्याने पुरुषांना दीर्घकाळ सौ माहेरी गेल्याचे भाग्य, म्हणून आपोआपच पौरुषवृद्धी, शेजारसौख्य व इतर प्रपंचात न अनुभवता येणारी सुखे प्राप्त होतात. हे व्रत ब्रह्मर्षी विश्वामित्रांना मेनकेने सांगितले. कोकीळ व्रताची कहाणी: शंकराची बायको पार्वती. तिला नेहमी आपल्या नवऱ्याचा आणि गंगाबाईचा संशय येई. त्यामुळे ती शंकरावर कायम लक्ष ठेऊन असे. कध्धी म्हणून माहेरी जात नसे. शंकराने बघितले तर सर्व देवांच्या बायका वर्षातून एकदा तरी चांगल्या महिनाभर माहेरी मुक्कामाला जातात पण पार्वती चुकून सुद्धा माहेरचे नाव घेत नाही . शंकराला आपल्या अविवाहित मुक्त जीवनाची (बॅचलर लाइफ़) ची फारच सय येऊ लागली. त्याचवेळी तिथे नारद मुनी प्रवेश करते झाले. शंकराच्या मुखकमलाकडे पाहून त्यांना परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी शंकरास मदत करायचे ठरविले. नारदमुनी (कळलावे) तिथून कोकीळ पक्ष्याच्या रुपात थेट पार्वतीकडे आले व दक्षनगरीत चालू असलेल्या आभूषणे व वस्त्रे यांच्या अल्प किमतीतील विक्री आणि प्रदर्शनाचे आणि तिथे देवी लक्ष्मी, सरस्वती, इंद्राणी यांनी केलेल्या खरेदीचे रसभरीत वर्णन गाऊ लागले. ते ऐकून दाक्षायणीला फारच चुटपूट लागून राहिली. (इतर स्त्रियांनी फायद्याची खरेदी केली आपल्याला मात्र संधी मिळाली नाही याचा स्त्रियांना फार राग येतो हो!). तिने शंकराच्या मागे भुणभुण चालू केली," मला माहेरची खूप आठवण येते. गेल्या अठरा वर्षात तुमची आबाळ होऊ नये म्हणून मी एकदाही तिथे गेले नाही, एकदा जाऊन यावेसे वाटते." शंकराने "तुझ्यामागे माझी काळजी कोण घेणार? जेवणाचे काय?" इत्यादी कारणे सांगत तिला अडवायचा लटका प्रयत्न केला. वस्त्रभूषणांच्या आनंदापुढे सर्व गोष्टी दुय्यम वाटल्याने "गंगाबाईला मी माझ्या हाताखाली साऱ्यांमध्ये निपुण केले आहे, माझ्यामागे ती तुमची व्यवस्था पाहील" असे सांगून पार्वती त्वरीत माहेरी जाण्यास निघाली आणि चांगली दोन मासांनंतर परत आली. शंकराने कैलास पर्वतावर स्वर्गीय सुख भोगले ते वेगळे सांगायला नकोच. त्यावेळपासून शंकर कोकीळ पक्ष्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि जो कोणी विवाहित पुरुष तुझे व्रत करेल त्यावर मी प्रसन्न होऊन त्याच्या पत्नीस माहेरी पाठवेन असा वर दिला. व्रत: प्रथम कोकिळ पक्षी शोधायचा. तो मिळाला की मला व्यनि करायचा. मगच मी पूर्ण व्रताची कृती देईन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21503
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

In reply to by सूड

:):):):) आता तुम्ही सुद्धा माझ्या पापात सहभागी झालात तर!!! रच्याकने वाणवश म्हणजे???

In reply to by सूड

उत्तर धृवावरच्या ष्टेडियममधुन थेट दक्षिण धृवावरच्या ष्टेडियम मधे मारलेला षटकार (का शतकार? ६ का १०० तेचं कळलं नै)

In reply to by सूड

सूडा अरे मला दवाखान्यात पाठवतोस काय आता? हसून हसून पोटाची अन जबड्याची पार वाट लागली. असे लेखन करू नये बाळा उगाच हसून हसून म्हातारी मेल्याचे पातक लागेल तुला.

आता आमाला नाय म्हैत, लागलंच नक्की पाप तुला भो, ग्यारंटीने... (संदर्भसाठी खालील दुव्यावर क्लिकावे) http://www.misalpav.com/comment/734549#comment-734549"