शुष्क
आयुष्य ना सुखांचे अंधार दाट होता
बुद्धयाच वेदनांशी श्रृंगार थाटलेला
झाली उजाड़ स्वप्ने, सत्यास दंभ होता
चातुर्य प्राक्तनाचे कळलेच ना कदापी
रक्तास चटक ओल्या लागून आज गेली
जखमाच त्या, तयांशी, संसार थाटलेला
अस्तित्व जाणिवांचे उधळून रात्र गेली
त्यां टाळणे मलाही जमलेच ना कदापी
होता तसाच आहे ओसाड माळ तिथला
पान्हा वसुंधरेचा वक्षात गोठलेला
मी रान शुष्क होतो पाऊस स्तब्ध तिथला
गोंजारणे फुलांना रुचलेच ना कदापी
झाडांस कोरडेपण जेव्हा असह्य झाले
तो कोंब पालवीचा बुंध्यात आटलेला
तो बहर जून होता फसवेच गंध झाले
ते श्वास पाळणेही पटलेच ना कदापी
विशाल कुलकर्णी
Classssssss
वाह! फक्त
धन्यवाद दमामि ! आधी तिथे 'अन्
हि कविता आनंदकंद वृत्तातली
सॉरी दमामि शेठ, तुम्हीच बरोबर
किंवा अन च्या ऐवजी "तो बहर
खूप सुंदर! अंतरास छळणार्या
A1
वाह! विशालभो मस्त. थोडं
अप्रतिम कविता.
मस्त कविता!!!
धन्यवाद मंडळी !
व्वा! हे अशक्य सुंदर लिहलयस
धन्यवाद रातराणी :)
सुंदर कविता आवडली.
खूप दिवसांनी वाचली तुझी रचना.
धन्यवाद राघव !
अप्रतिम कविता!
दर्जेदार
जबरी रे!!!