Skip to main content

बाबासाहेब पुरंदरे,महाराष्ट्रभुषण आणि वाद!!

लेखक ग्रेटथिंकर यांनी बुधवार, 24/06/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रभुषण पुरस्कारावरुन वाद सुरु आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक ठरवून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक संघटनांचा याला विरोध आहे.संभाजी ब्रिगेडने या विरोधात 'शिवसन्मान जागर परिषद' स्थापन करुन विरोध सुरु केला आहे. विरोधकांचे म्हणणे असे आहे की पुरंदरे इतिहासकार नाहीत ,तर ते एक नाटककार व शाहीर आहेत, त्यांना इतिहासतज्ञ म्हणुन पुरस्कार देणे चूक आहे. पुरंदरेंनीही स्वतःला कधीही इतिहासकार म्हणवून घेतलेले नाही ते स्वतःला शाहीर म्हणवतात, पण भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल करत त्यांना शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक ही पदवी दिली आहे असा विरोधकांचा आक्षेप आहे. तर प्रश्न असे आहेत 1.हा आक्षेप योग्य आहे का ? 2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का? 3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?

वाचने 41504
प्रतिक्रिया 148

प्रतिक्रिया

तुम्ही अजुन आहे होय मला वाटले हितेशबरोबर तुमच्या आयडीला पण देवाज्ञा झाली.
पुरंदरेंनीही स्वतःला कधीही इतिहासकार म्हणवून घेतलेले नाही
तेंडुलकरसुध्दा म्हणायचा मी अजुन फलंदाजी शिकतोय, त्यालापण उगीच भारतरत्न दिले.

मला या धाग्यावर एकच बोलण्यासारखे आहे: तो महाराष्ट्रभुषण नसून महाराष्ट्रभूषण पुरस्कार आहे !

हा विषय सद्ध्या संपला आहे. ब्रिगेडी बेडकांनी रान उठवण्याचा प्रयत्न करूनही सरकारने शष्प लक्ष न देता त्यांना फाट्यावर मारल्याने हा विषय पाताळात गाडला गेलेला आहे. तरी, सद्ध्या हाफिसात वेळ असल्याने आणि बोलायची खाज असल्याने तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. 1.हा आक्षेप योग्य आहे का ? अजिबात नाही. 2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का? बाबासाहेबांनी कोणताही कल्पनाविलास, मनाच्या घटना शिवचरीत्रात घुसडलेल्या नाहीत. बाबासाहेब शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक आहेत ह्यात चुकीचे काहीच नाही. अभ्यास आहेच त्यांचा ह्या बाबत वाद नाही. मांडणी बखर सदॄष नसून ललीत असल्याने अनेक मठ्ठ लोकांना तो कल्पनाविलास वाटतो. स्वतः बाबासाहेबांनी त्यांनी लिहिलेला चरित्रात चुका आढळल्यास त्या सुधारण्याची कायमच तयारी दाखवलेली आहे. 3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का? मुळात हे विरोधक राजकीय हेतूने प्रेरीत असल्याने त्यांच्याकडे लक्ष द्यायची अजिबात गरज नाही. ब्राह्मण विरोधाची कावीळ झालेल्यांच्या विरोधाचा हेतू बाबासाहेब ब्राह्मण आहेत हा असल्याने विरोधकांना फाट्यावर मारण्यात यावे.

नाटककार अथवा शाहीर यांना महाराष्ट्रभूषण देणे अयोग्य आहे का ??>>>>>>>>>>नाटककार किंवा शाहीर यांना पुरस्कार देण्यात काहिच अडचन नाही,पन त्यांना इतिहासकार म्हनुन पुरस्कार देण्यावर आक्षेप आहे.

काही लोकांना वेगळाच महाराष्ट्र काढून द्यावा का लोकसंख्येच्या प्रमाणात? म्हणजे त्यांचा इतिहास, इतिहासकार, शाहिर, नाटककार, भूषणं वेगळी राहून वाद होणार नाहीत. (जाउ दे.. खूप तुकडे पडतील आणि कुठल्याही तुकड्यात कायम रहिवासी कधीच मिळणार नाहीत)

पुरस्काराने काल्पनिक/ बायस्ड ईतिहास अधिक्रूत होइल. तस्मात्त पुरस्कार न देणे योग्य रहील. तसेही रयतेने या विरोधात रान उथवल्यामुले सरकार सध्यातरी शान्त आहे.

त्यांना इतिहासकार म्हणून पुरस्कार दिला तर कुठे बिघडले. अर्ध्या महाराष्ट्राला शिवरायाच्या इतिहासाची गोडी लावली हे त्यांचे ऋण काय कमी आहेत का? आइन्स्ताइन ला सुद्धा सापेक्षतावादाच्या सिद्धांतासाठी नोबेल मिळाले नाही तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी मिळाला होता त्यामुळे आईन्स्टाइंनची थोरवी कमी होत नाही. हि ब्रिगेडी मनोवृत्ती सोडून द्या. एखाद्याला त्याच्या जातीमुळे श्रेय मिळू न देणे हि वृत्ती कोती आहे.

चिमणराव कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी

In reply to by सुबोध खरे

=))

Vaicharik mat matantare ahet mhanun vaiyaktik halle chadvinyachi hi sanatani pratha samajik pragatis badhak aahet. Vicharanchi ladhai vicharanech ladhali pahije n ki ekhadyachi hatya karun.

पुरंदरे इतिहासतज्ञ आहेत. इतिहासकार शब्दाची काही सर्कारी व्याख्य असेल तर माहीत नाही. पण सर्वसाधारण अर्थाने ते इतिहासकारही आहेत. 'राजा शिवछत्रपती' हे पुस्तक अगदी कादंबरी आहे असे धरले (आणि ती बरीचशी आहे, हे नक्की) तरी त्याने पुरंदरे इतिहासतज्ञ नाहीत असा अर्थ कसा निघू शकतो? त्यांनी इतिहासाचा अभ्यास करतात तसाच तो केला, पण त्यावरून लिहीले ते लोकांना सहज आवडेल असे. ते पुस्तक म्हणजे ऐतिहासिकरीत्या सिद्ध झालेल्याच गोष्टींचे आहे की नाही हा वाद वेगळा आहे. तो काळ लोकांपुढे आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केलेले आहे. केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून द्यायचा नसेल तर गोष्ट वेगळी. बहुसंख्य लोक त्यांच्या मताला पुष्टी देणारी पुस्तके वाचतात. त्यात जे लिहीले आहे तोच इतिहास समजतात, त्याकरता सर्कारी अ‍ॅप्रूवल कोणी बघत नाही, ते मिळाले म्हणून हे बदलत नाही.

In reply to by फारएन्ड

पुरंदरे इतिहासतज्ञ आहेत. इतिहासकार शब्दाची काही सर्कारी व्याख्य असेल तर माहीत नाही. पण सर्वसाधारण अर्थाने ते इतिहासकारही आहेत. '^^^^^^^^^^^^ hich dharna pakki asel tar pudhil charches kahich arth urat nahi. mobile varun typt asalyane problem yet aahe

In reply to by मितभाषी

ते इतिहासाचे अभ्यासक नक्कीच आहेत, इतिहासतज्ञही नक्कीच आहेत. 'इतिहासकार' आहेत की नाही माहीत नाही कारण त्याला काही ठराविक व्याख्या असेल तर कल्पना नाही - इतर काही इतिहासकार जसे फक्त ऐतिहासिक कागदपत्रांवरून सिद्ध होऊ शकणारीच माहिती लिहीतात व त्यात इतर काही लिहीत नाही तसे एखादे पुस्तक त्यांनी लिहीले आहे की नाही कल्पना नाही. आता ब्रिगेड चा विरोध नक्की कशाला आहे?

In reply to by फारएन्ड

इतिहाससंशोधन करणारा तो इतिहासकार असे म्हणायचे असेल तर पुरंदरे नक्कीच इतिहासकार आहेत. काही पुस्तकांसाठी प्रख्यात इतिहासकार ग.ह.खरे यांच्या असिस्टंटचे काम पुरंदर्‍यांनी केलेले आहे. नक्की पुस्तकांची नावं जरा पाहून सांगतो. पण पहिल्या धारेचे संशोधन पुरंदर्‍यांनी थोडे का होईना, केलेय हे महत्त्वाचे आहे. भलेही त्यांचं मुख्य काम ते नसलं तरीही...

In reply to by बॅटमॅन

मराठी शाब्दबंधात "इतिहासाचा अभ्यास करणारी किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टी करणारी इतिहासाची जाणकार व्यक्ती" अशी इतिहासकार शब्दाची व्याख्या दिली आहे (संदर्भ). मराठी पारिभाषिक शब्दकोशात Historian या शब्दास इतिहासकार हा शब्द वापरला आहे.(संदर्भ). ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची Historian शब्दाची व्याख्या "An expert in or student of history, especially that of a particular period, geographical region, or social phenomenon:" अशी आहे. इंग्रजी विकिपीडियात historian ची ओळख "A historian is a person who researches, studies and writes about the past, and is regarded as an authority on it. Historians are concerned with the continuous, methodical narrative and research of past events as relating to the human race; as well as the study of all history in time." अशी दिली आहे. (संदर्भ)

"3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?" जेम्स लेन याने त्याच्या शिवाजी वरच्या पुस्तकात पुरंदरे यांचा नेमका कसा उल्लेख केला आहे आणि त्या वरून आक्षेप घेण्या सारखे काय आहे हे कोणी सांगू शकेल का ?

In reply to by मुक्त विहारि

खेडेकर आणि साळुंखे+कोकाटे यांना सलग ५ वर्षे हा पुरस्कार द्यावा म्हणून उपोषण करणार आहेत असे आम्चा ओसाडवाडीचा वार्ताहर कळवितो. दै तुणतुणे खुस्पटवाडी ता:आग्लाव जि: नसती भान्गड

In reply to by नाखु

@ दै तुणतुणे खुस्पटवाडी ता:आग्लाव जि: नसती भान्गड>> :-D

संभाजी ब्रिगेडने "तुकाराम महाराजांना मारण्यात आलं होतं. पण ब्राह्मणांनी हि गोष्ट लपवून ठेवली " असा शोध लावलाय

In reply to by तुडतुडी

ते काय, काहीही शोध लावतील. एकीकडे ब्राह्मण सर्वशक्तिमान होते असे म्हणायचे (खूनबीन करणारे इ.) तर दुसरीकडे त्यांच्या पौरुषावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, नक्की केहना क्या चाहते हो तेच कळत नै त्यांचं.

In reply to by dadadarekar

तुम्ही बघितलंय का? आमच्या माईसाहेबांनी बघितलंय आणि मला तसं सांगितलं आहे.

In reply to by बॅटमॅन

असू द्या हो. त्यांना सुन्दर उत्तर यापूर्वीच दिले गेले आहे. समजा तुकोबांचा खून ब्राह्मणांनी केला, हे एका क्षणासाठी खरे मानले, तर मग पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज तुकोबांना गुरू मानत होते, त्यांच्या गुरुंचा खून झाला आणि महाराजांना कळले पण नाही? तस्मात तुम्हाला नेमके काय सिद्ध करायचे आहे ते ठरवा, ब्राह्मण खूनी होते आणि शिवाजी महाराज त्यांना सामील होते, की ब्राम्हण एव्हढे हुशार होते की त्यांनी तुकोबांचा खून केला आणि शिवाजी महाराजांना "बनवले"?

In reply to by आनन्दा

हा हा हा, मग तर ब्राह्मण भलतेच चतुर दिसतात. साक्षात् शिवाजी महाराजांना बनवले म्हणजे हाईटच झाली, नै?

In reply to by बॅटमॅन

फक्त तुकाराम महाराज नाही कै. मोठ्ठी लिष्ट आहे. अगदी आंबेडकर, खुद्द शिवाजी महाराजसुद्धा आहेत त्या संशोधकांच्या लिष्टीत.

In reply to by dadadarekar

संत तुकारामांचा खून केलेल्या लोकांच्या हाताचे ठसे सुऱ्यावर किंवा तलवारीवर किंवा तुकारामांच्या गळ्यावर सापडले असतीलच नाही का बिग्रेडला ? तुमच्याजवळ संत शिरोमणी, राष्ट्रपुरुष, श्री श्री खेडेकर यांनी फोरेन्सिक रिपोर्ट ची झेरोक्स पाठवली असेलच ! कृपया शेयर करा..

In reply to by चिनार

"कृपया शेयर करा." ह्या वाक्याला सहमती. दादा दरेकर, हे अतिशय ज्ञानी आणि उदार मनाचे असल्याने, आपले ज्ञान वाटायला ते नहमीच तयार असावेत, असे वाटते.

In reply to by dadadarekar

विमानातुन न जाणार्‍या प्रत्येक माणसाचा खून होतो काय? आणी तो ब्राह्मण करतात काय? हेच कर लॉजिक असेल तर मग ठिकाय बी ग्रेड ची अक्कल याहुन जास्त चालेल असे वाटतही नाही म्हणा.

In reply to by मृत्युन्जय

विमानातुन न जाणार्‍या प्रत्येक माणसाचा खून होतो काय? आणी तो ब्राह्मण करतात काय?
ब्राम्हणांना सगळे कामधंदे सोडून लोकाचे खुन करत बसावे लागतील कि मग ! कैच्याकै लॉजीक ! लोल .

In reply to by उगा काहितरीच

बिचार्‍या शिवाजी महाराजांना ते विमान मिळालं असतं तर वायुदलाची स्थापना करण्याचं श्रेयही शिवाजी महाराजाना मिळालं असतं. तुकारामाना इतकी समज नक्कीच होती. त्यामुळे त्याना मिळालेलं विमान त्यानी महाराजा ना दिलं असतं

In reply to by मुक्त विहारि

त्यांनी असं कोणता मिपाचा नियम मोडला कि त्यांचा आयडी उडाला ? (फक्त उत्सुकता आहे म्हणून विचारलं , काळजी नसावी.)

In reply to by उगा काहितरीच

उगा काहितरीच समजा पाकिस्तानि क्रिकेट टिम मध्ये ११ च्या ११ खेळाडुंच्या जागि एकटा इझंमाम खेळ्तोय, फलंदाजि, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजि सुद्धा तोच कर्तोय बघणार्याला कसे वाटेल.. धागा सुद्धा हाच काढणार आणि आपल्या अनेक आयड्या वापरुन प्रतिसाद देताना उच्छाद सुद्धा हाच मांड्णार्..चला तुम्हि म्हणाल हा काहि गुन्हा नाहि. पण सदैव एकांगि लेखन, एकाच समाजाला टार्गेट करणे म्ह्णुन कदाचित त्यांचा मि.ईंडिया झाला असेल. पण ते दादा बनुन पुन्हा फुलथ्रोट्ल मध्ये आलेयत.

In reply to by होबासराव

मग ठिकाय ! आयडी उडन्याच्या यादीत आमचा नंबर यायची शक्यताच नाही मग.(चेक करायचे होते हो , चुकून एखादा नियम तर नाही ना मोडत ) ;-)

In reply to by मुक्त विहारि

ग्रेट थुंकर आहेत इथेच. फक्त त्यांनी जुने शरीर त्यागुन नविन शरीर धारण केलेले आहे. रावणाची कशी १० तोंडे होती तशी यांची अगणित तोंडे आहेत. आपण असे समजुयात की ते आधुनिक रावणच नाहित तर ते आधुनिक काळातले सहस्त्रकवच आहेत, नर नारायाणांना त्यांचे ९९९ अवतार खर्ची घालायला लागतील तेव्हा एका सहस्त्रकवचाचे निवारण होइल. इतकी साधी गोष्ट नाही ती १०००*१००० वर्षांची तपस्या असेल तर जमेल ग्रेट्थुंकरांना घालवणे.

In reply to by होबासराव

आयला, हे बहूदा विष्णूचा रेकॉर्ड ब्रेक करणार. मज्जाय बुवा ह्या अवतारी लोकांची. म्हणजे इतका काँन्फिडन्स की, एक अवतार समाप्त होण्यापुर्वीच, दुसरा अवतार घेवून ठेवतात.इतका काँन्फिडन्स तर विष्णू कडे पण न्हवता. अगदी त्या टॉम रीडल सारखे.म्हणजे लॉर्ड वॉल्डेमार्ट होण्यापुर्वीच, कुठे पुस्तकातच दड तर कुठे अंगठीतच लप.

In reply to by dadadarekar

"दादाचा नाद करायचा न्हाय" "याचा अर्थ प्रत्येक प्रचारकी कमेंट खपवुन घेणार असा नाही, त्यामुळे या धाग्यावर मी गप्प आहे." दोन वेगळ्या आयडि ने सेम धमकि !!!! मध्यंतरि सिरिया विजिट झालेलि दिसतेय.. एकदम फिदायीन झालायत.

मी इथे तार्कीक युक्तीवाद करु शकतो, पण मग त्यात जाती येतील ,शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील, वाद वाढेल! चार घटका गंमत करायला जे लोक मिपावर येतात त्यांच्यासाठी हा एक ताप असतो, उगाच दुसर्याच्या आनंदात आपण का विरजण घालायचे ???म्हणुन गप्प बसतो. याचा अर्थ प्रत्येक प्रचारकी कमेंट खपवुन घेणार असा नाही, त्यामुळे या धाग्यावर मी गप्प आहे. सध्या मिपावर आयडी उडण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अवतारकार्य पुर्ण करण्यासाठी संयम राखुन आहे.

In reply to by यसवायजी

उलट आहे.... त्यांनी "घंटा" हा अतिशय चपखल शब्द वापरला आहे.... १ घंटा = १च्या पुढे १०० शून्य..... जसे १० = दस्म १००= शतम ... ... ... ... त्याच्यामुळे ज्याला अवतारकार्य समजले त्याला घंटा मिळते, असे वाटते. पहा ना, मंदिरात पण घंटा असतेच की.कारण प्रत्येक देवाला त्याचे अवतार-कार्य समजत असते. तर्क चुकीचा असला तर दुरुस्त करावा.