पाऊस .. तेव्हाचा
खर्याखुर्या प्रेमासारखा
पाऊस तेव्हा दाटायचा
बरोब्बर सात जूनला
येवून तो भेटायचा....!!
अडचणी होत्या चिकार
सर्व दूर करायचा,
मन हुरहुरलं की
हात तो धरायचा ....!!
तेव्हाचा पाऊस खरा
खरा पाऊस वाटायचा,
प्रत्येकाच्या आठवांत
घर तो थाटायचा ....!!
लहान, थोर, वडीलधारे
आदर तो राखायचा,
सार्यांच्या चेहर्यावर
आनंद तो माखायचा....!!
रसायन, फवारे वगैरे
लाडावलेला नसायचा,
येरे येरे पावसाच्या
गाण्यालाही फसायचा....!!!!
chan jamali aahe kavita......
फार छान जमलीय कविता.
@ रसायन ,फवारे वगैरे
छान कविता!
आठवांत म्हणजे आठवणीत /मनात
कविता
मस्तय.
हौसला अफजाई का शुक्रीया ।
उत्तम ! जम्या है !