Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुधीर मुतालीक on गुरुवार, 05/28/2015 - 19:15
इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!! http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Beheading.jpg
  • Log in or register to post comments
  • 35216 views

प्रतिक्रिया

Submitted by संदीप डांगे on Fri, 05/29/2015 - 14:27

In reply to आपणास मुद्दा कळालेला नाही. by बॅटमॅन

Permalink

सहमत...

सहमत...
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 05/31/2015 - 08:29

In reply to प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या by काळा पहाड

Permalink

बळी तो कान पिळी हेच्चं खरं.!!

बळी तो कान पिळी हेच्चं खरं.!!
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Fri, 05/29/2015 - 13:40

In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन

Permalink

+१११११११११११११

इराक ला असले स्वातंत्र्य मिळण्यापेक्षा, सद्दामी हुकुमशाहीच्या काळातली नोकरी अन चटणी भाकरी बरी होती.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Fri, 05/29/2015 - 22:08

In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन

Permalink

हमारा फिर क्या होगा ?

"अमेरिका हे महाहरामखोर राष्ट्र आहे. त्यांनी केलेल्या अत्याचारांचा बदला घ्यायचा तर मग अख्खा देशच बेचिराख करावा लागेल." आवो, आमी हिथच अमेरिकेत आहोत वो, थोडी दया दृष्टी असू द्या म्हंटलं. (हलकेच घ्या)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वच्छंद on Mon, 06/01/2015 - 01:49

In reply to हमारा फिर क्या होगा ? by सौन्दर्य

Permalink

:-D

:-D
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 05/29/2015 - 20:07

In reply to सद्दाम मारला गेला... पण आपले काय ? by मदनबाण

Permalink

बाण राव

बाण राव एक लक्षात ठेवा अमेरिकेला जशी चीन ची भीती वाटते तशीच भारताची पण वाटते. न जाणो हे ( भारतीय) उद्या आपल्याला डोईजड झाले तर( ज्याची शक्यता बरीच आहे. म्हणू तुम्हाला नियन्त्रणात ठेवण्यासाठी ते पाकिस्तानचा वापर करत राहणारच. पाकिस्तानला ते मदत करतात ते काही पाकिस्तान बद्दल प्रेम आहे म्हणून नाही हे लक्षात घ्या. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाने एकदा संतापून जाहीर वक्तव्य केले होते कि अमेरिका आम्हाला निरोध सारखे वागवते. वापरून झाले कि फेकून द्या. सर्वसामान्य पाकिस्तानी जनता आणि लष्कर अमेरिकेचा द्वेषच करते.उद्या तुम्ही त्यांचे एक्कावान्नावे राज्य( इंग्लंड सारखे) म्हणून मान्य करा कि ते पाकिस्तानचा विध्वंस करतील कि नाही ते पहा
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 05/29/2015 - 20:54

In reply to बाण राव by सुबोध खरे

Permalink

सहमत

पाकिस्तानला भारतासारख्या देशाचा शेजारी अन शत्रु असण्याचा नैसर्गिक फायदा मिळतो. पाकिस्तानकडे गमावण्यासारखे काहीच नाही. तेथील जनता गवत खाऊन जगायला पण तयार असते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 06/01/2015 - 16:04

In reply to बाण राव by सुबोध खरे

Permalink

पाकिस्तानला ते मदत करतात ते

पाकिस्तानला ते मदत करतात ते काही पाकिस्तान बद्दल प्रेम आहे म्हणून नाही हे लक्षात घ्या. डॉक अर्थातच हे माहित आहे मला, पण त्याचा "परिणाम" तर आपल्यालाच भोगावा लागेल की नाही ? अवांतर :- इसीसच्या आणि तिच्या सारख्या क्रूर संघटना त्यांचे काम करतच राहणार, कारण त्यांना रोखणारे आत्ता तरी कोण आहे ? मनुष्याने मनुष्याचा केलेला हिंसाचार तर इतिहासाच्या पानांमधे आढळुन येतोच त्यात नव्या पानाची भर पडते इतकेच ! :( पिंजर्‍यात उभे करुन जिवंत जाळणे { मला वाटत जॉर्डनच्या वैमानिकाला काही काळापूर्वी असेच ठार केले गेले होते} स्फोटके लावुन उडवुन देणे आणि इतर ! क्रूरपणा करण्याला कुठली मर्यादा आहे का ? ह्या आणि इतर घटना पाहिल्या आणि वाचल्या की मन प्रचंड अशांत होते ! माणसा सारखा स्वार्थी प्राणी निर्माण करुन विधात्याने नक्की काय साधले ? असा विचार हल्ली बर्‍याच वेळा टाळक्यात येतो... एक सांगतो हल्ली दिवसेन दिवस मन "मुर्दाड" बनत चालले आहे ! :( माणुस प्राण्यांशीही भयानक क्रूरतेने वागतो... आत्ताच एक व्हिडीयो पाहिला ! गो-हत्या बंदीला विरोध करण्याचा एक क्रूर प्रकार पाहुन मन मेले ! https://www.youtube.com/watch?v=_xRo7LpRZps { ही लिंकी त्रासदायक आहे, आपल्या विवेकानेच ही लिंक उघडावी. } मध्यंतरी असेच एका गाईला एका छोट्या कार मधे कोंबुन नेताना पाहिले होते { https://www.youtube.com/watch?v=xYw-hpJ2PVg } तेव्हा माणसा मधल्या हैवानपणाचे दर्शन घडले ! असो.... हल्ली आजुबाजुला जे काही पाहतो तेव्हा माणसातले राक्षसच अधिक झाले आहेत अशी खात्रीच पटत चालली आहे. जाता जाता :- ‘2,300 Humvees in Mosul alone’: Iraq reveals number of US arms falling into ISIS hands

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- कॅप्टन सौरभ कालिया मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार नाही- मोदी सरकार
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 06/01/2015 - 17:05

In reply to पाकिस्तानला ते मदत करतात ते by मदनबाण

Permalink

बादवे, ग्वाटानामो बे मध्ये

बादवे, ग्वाटानामो बे मध्ये अमेरिकेने तरी काय वेगळे केले?
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 06/01/2015 - 17:35

In reply to बादवे, ग्वाटानामो बे मध्ये by बॅटमॅन

Permalink

पण ग्वटानामो बे मध्ये

पण ग्वटानामो बे मध्ये अमेरिकेनं आणखी काय करणं एक्स्पेक्टेड होतं? जिहादी हे जगावरचा कलंक मानला तर कोणत्याही प्रकारे हा कलंक पुसून काढणे हे समर्थनीय आहे. या लोकांवर साम-दाम-भेद याचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळं दंडाचा अतिरेकी वापर करूनच त्यांच्या साथीदारांबद्दल माहिती काढणे इत्यादी गोष्टी करता येतात. अमेरिकेच्या सैनिकांनी वापरलेले उपाय हा जिहादींचं मनोबळ तोडणारे होते. याचं एक मवाळ उदाहरण म्हणजे कर्नल आठल्येंचा लेखः http://www.rediff.com/news/2008/dec/19mumterror-no-islamic-burial-for-mumbai-terrorists.htm एक आणखी मवाळ उपाय म्हणजे मेलेल्या जिहादी अतिरेक्यांवर डुकराचं रक्त शिंपडून आणि त्यांना उघड्यावर फेकून देणे (आणि बाकी अतिरेक्यांना हे पहायला लावणे). अमेरिकेनं ग्वा.बे. मध्ये वापरलेल्या उपायांमध्ये या कैद्यांना कडक उन, वारा, पाउस यामध्ये छप्पर नसलेल्या पिंजर्‍यात ठेवणे वगैरे आणि इतर सुद्धा उपाय सुद्धा केले होते आणि ते समर्थनीयच आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 06/01/2015 - 17:56

In reply to पाकिस्तानला ते मदत करतात ते by मदनबाण

Permalink

गाय ?

माणूस कोंबडी , बोकड सर्रास खातात आणि त्यांना सुद्धा असेच ( निर्दयीपणे ) मारले जाते . जो न्याय गायीला तोच कोंबडी आणि बोकडांना हवा
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 06/01/2015 - 20:18

In reply to गाय ? by कपिलमुनी

Permalink

माणूस कोंबडी , बोकड सर्रास

माणूस कोंबडी , बोकड सर्रास खातात आणि त्यांना सुद्धा असेच ( निर्दयीपणे ) मारले जाते . जो न्याय गायीला तोच कोंबडी आणि बोकडांना हवा ह्म्म्म... तस म्हणायच झालं तर हत्ती / डास / मुंगी / यांना मारले आणि माणसांना मारले तरी मग फरक पडु नये कारण "आत्मा" प्रत्येक देहात असतो, बदलते ते फक्त स्थुल शरीर ! आता गायी बद्धल :- मनुष्य प्राणी गाय या प्राण्यावर अवलंबुन राहत आलेला आहे,या गाय प्राण्याचे दुध मनुष्य प्राणी आजन्म पीत असतो आणि ज्या प्रमाणे नारळ हा कल्पवॄक्ष समजला जातो त्याच प्रमाणे गायीला कामधेनु आणि गोमाता ही उपाधी प्राप्त आहे. तेव्हा जन्मा पासुन मॄत्यु पर्यंत { मनुष्याच्या } कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगी पडणार्‍या या पशुची हत्या होउ नये असे वाटण्यास काय गैर आहे ? अघोरी लोक { मेलेल्या} मनुष्याचे मांस खातात मग तुम्ही का खाउ शकत नाहीत ? मांसाहार हा मांसाहारच असतो... जो न्याय कोंबडी / बोकड / खेकडा यांच्या मांसाला लागतो तोच न्याय मनुष्य मांस भक्षणाला का लागु शकत नाही ? असो...

मदनबाण.....

आत्ताची बदललेली स्वाक्षरी :- एनडीए सरकारचा यूटर्न... सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली तर कॅ. कालिया प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार...
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/02/2015 - 15:19

In reply to माणूस कोंबडी , बोकड सर्रास by मदनबाण

Permalink

बायदवे, किती लोक गायीचे दूध

बायदवे, किती लोक गायीचे दूध पितात आणि किती लोक म्हशीचे दूध पितात याचा जरा तौलनिक अभ्यास केला तर गायीबद्दलच सिलेक्टिव्ह पुळका येणं हे अंमळ रोचक आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 06/03/2015 - 10:46

In reply to बायदवे, किती लोक गायीचे दूध by बॅटमॅन

Permalink

मला जितके माहित आहे,वाचले आणि

मला जितके माहित आहे,वाचले आणि ऐकले आहे त्यानुसार गायीचे दूध हे म्हशीच्या दूधा पेक्षा अधिक उत्तम मानले गेले आहे. काही काळा पूर्वी जालावर वाचले होते की हिंदूस्थानी जातीच्या काही गायी लुप्त झाल्या आहेत,तसेच गाय आणि म्हैस यांच्या संख्येची तुलना करावयाची झाल्यास गायींची संख्या फारच कमी आहे. काही संदर्भ :- औषधाविना उपचार : गायीचे दूध - पृथ्वीवरील अमृत A spoon of ghee full of health: 'Poses no danger to cardiac health' and could protect us from cancer दूधाला "पूर्णअन्न" असे म्हंटले जाते, पण देशात मिळणार्‍या दूधा पैकी जवळपास ८० ते ८५ टक्के दूध हे भेसळ युक्त आहे { नक्की किती टक्के ? खरा आकडा कोणता ? } यावरुन भेसळयुक्त दूध विकुन किती पैसा मिळत असावा याचा अंदाज यावा ! हिंदूस्थान जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश असुन या देशात शुद्ध दूध मिळण्याची मारामार आहे हे कटु सत्य असुन त्याचा परिणाम नवजात बालकां पासुन वॄद्ध माणसां पर्यंत होतो कारण हे सर्व दूध पितात. येणार्‍या काळात देशाची वाढती लोक संख्या आणि घटते पशुधन संख्या पाहता दूध आणि दूधाची पावडर आयात करायची वेळ येउ नये म्हणजे झाले ! काही संदर्भ :- दूध…अमृत की विष ? गाय आणि म्हैस - दुध कुणाचे प्यावे ? The Desi Cow – Almost Extinct Maneka Gandhi for country-wide ban on cow, buffalo slaughter India’s livestock population decreases by 3.33 percent: Census जाता जाता :- सत्तेवर येण्या आधी मोदींचे विचार... एक हिंदूस्थानी म्हणुन या विचारांना माझे पूर्ण समर्थन आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 06/03/2015 - 14:13

In reply to मला जितके माहित आहे,वाचले आणि by मदनबाण

Permalink

मुद्दा गायीचे दूध उत्तम की

मुद्दा गायीचे दूध उत्तम की म्हशीचे हा नाहीच. मुद्दा हा आहे की दूध पिणार्‍या समस्त भारतीयांपैकी कितीजण गायीचे दूध वा गोदुग्धजन्यच पदार्थ सेवन करतात? अन किती % म्हशीचे दूध व तज्जन्य पदार्थ सेवन करतात? हा आहे. त्या अनुषंगाने विदा असेल तर बोला.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 06/03/2015 - 14:28

In reply to मुद्दा गायीचे दूध उत्तम की by बॅटमॅन

Permalink

मुद्दा हा आहे की दूध पिणार्

मुद्दा हा आहे की दूध पिणार्‍या समस्त भारतीयांपैकी कितीजण गायीचे दूध वा गोदुग्धजन्यच पदार्थ सेवन करतात? मुद्दा,कमी संख्येने असलेल्या या जीवाचे रक्षण असा आहे. मी तरी गायीचेचे {पिशवी बंद } दूध पितो,बाकीच्या जनतेचे काही माहित नाही बाँ...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 06/03/2015 - 14:47

In reply to मुद्दा हा आहे की दूध पिणार् by मदनबाण

Permalink

हर्कत नाही. तुम्ही गायीचे दूध

हर्कत नाही. तुम्ही गायीचे दूध पिता म्हणून तुम्हांला गायीबद्दल विशेष कळवळा असणे समजू शकतो. पण म्हशीचे दूध पिऊनही फक्त गायीबद्दलच कळवळा येणार्‍यांना नक्की काय वाटतं ते समजत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 05/29/2015 - 12:23

Permalink

तुम्ही ह्या धाग्यावर आत

तुम्ही ह्या धाग्यावर आत disturbing फोटो आहेत असं लिहाल का प्लिझ? जागत हे असं काही घडतय आणि त्यासाठी आपण काहिही करु शकत नाही ह्याचा त्रास होत असतोच.. पण हे फोटो पाहिले की ह्याच जगात आपलंही बाळ आहे हे आठवतं आणि तटकन आत काही तरी तुटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 05/29/2015 - 12:45

Permalink

.सद्दाम क्रूर होताच.पण

.सद्दाम क्रूर होताच.पण त्याच्या राजवटीत इराकमधे लोक बरेच स्वातंत्र्यात आणि मोकळे सुसह्य जगणं जगत होते असं ऐकलंय.स्त्रियांनाही बरोबरीने नोकर्‍या,हक्क,ड्रायव्हिंग,जबाबदारीची पदं होती म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 05/29/2015 - 13:59

Permalink

इराकी समस्या...

अरेरावी; एका राष्ट्राध्यक्षाचा दुखावलेला स्वाभिमान; अनेक (सामरीक साहित्य तयार करणार्‍या; तेल उद्योगातल्या आणि इतर काही) कंपन्यांचा आर्थिक फायदा; जागतीक वरचढपणा साधण्याचा स्वार्थ; तेल जगतावर कायम स्वामित्व स्थापन करण्याची अमेरिकेची महत्वाकांक्षा; इ इ इ... इराक बट्ट्याबोळ प्रकरणामागे आहेतच. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुवेत स्वतंत्र करण्यासाठी केलेल्या युद्धातल्या विजयाच्या उन्मादात अमेरिकन लष्करी डावपेच तज्ञ (मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट) इराक युद्धात "इराक = कुवेत" हे समिकरण खरे नसून "इराक = व्हिएतनाम" हे समिकरण खरे आहे हे समजून घ्यायला विसरले ! :( व्हिएतनाम युद्ध आणि इराक युद्ध या दोन्ही युद्धांत अमेरिकेची अपरिमित आर्थिक, राजकीय आणि मान हानी झाली आहे. परंतू, युद्धस्थळांच्या स्थानिक वस्तूस्थितींमुळे त्या युद्धांचे जागतिक पडसाद एकदम विरुद्ध टोकांचे आहेत... १. व्हिएतनाममध्ये कडवे देशाभिमानी व एकसंध कम्युनिस्ट होते. तेथे अमेरिकेचे कोणतेही स्थानिक दीर्घकालीन आर्थिक हितसंबध नसल्याने तेथून पळून जाणे ही अमेरिकेसाठी मानहानीची का होईना पण आपली फासात अडकलेली मान सोडविण्याची एक पळवाट होती. व्हिएतनाम युद्धानंतर तेथे सत्तेत आलेले सरकार कडवे राष्ट्रवादी आणि बर्‍यापैकी लोकाभिमुख होते. तसेच त्यांनी परिस्थितीचे भान राखून उदार आर्थिक धोरण अबलंबिल्यामुळे आज व्हिएतनाम दक्षिण पूर्वेतला एक विकसनशील पण सर्वसामान्य नागरीकांना बर्‍यापैकी सुस्थितीत आणणारा; चीनला टक्कर देणारा *; आणि मुख्य म्हणजे जागतिक शांततेला धक्का न लावणारा देश आहे. त्या युद्धात व्हिएतनामी जनतेने नरकयातना भोगल्या आणि अमेरिकेची आर्थिक, राजकीय व मान हानी झाली, पण बाकी जगाला त्याची फारशी झळ पोचली नाही. याविरुद्ध... २. इराक (अ) शिया विरुद्ध सुन्नी विरुद्ध कुर्द; (आ) धर्मांध विरुद्ध निधर्मी (सद्दामच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेली बाथ पार्टी); (इ) पाश्चिमात्य प्रभाव असणारे शहरी विरुद्ध देशाच्या ३/४ भागांत विखुरलेल्या भटक्या जमाती (नोमॅडीक ट्राईब्ज) अश्या एकमेकाविरुद्ध असलेल्या असंख्य तत्वांमध्ये विभागलेला देश होता. असे असले तरी सद्दामने आपल्या क्रूर लष्करी पकडीत ठेवलेला हा देश मध्यपूर्वेतला आर्थिक स्थैर्य, राजकीय स्थैर्य आणि (सद्दामला राजकीय विरोध न करणार्‍या नागरिकांसाठी) सुस्थिर जीवन असलेला देश होता. इराकमध्ये मूळ युद्धात विजय मिळूनही अमेरिका आपल्याला धार्जिणे सुस्थिर सरकार आणण्यात अपयशी ठरली... कारण ते घडून यावे असे केवळ दिवास्वप्न बाळगून अमेरिका त्यासंबंधी अनुसंधान व कृती (प्लॅनिंग अँड अ‍ॅक्शन) करायला विसरली. याचे मुख्य कारण म्हणजे या दोन युद्धस्थळांत आस्तित्वात असलेली वर विषद केलेली विरुद्ध टोकाची स्थानिक वस्तूस्थिती जाणण्यात अमेरिकन राजकारणी आणि युद्धतज्ञ अपयशी ठरले... काहींच्या मते अहंकार आणि केवळ संकुचीत आर्थिक फायद्यांकडे लक्ष दिल्यामुळे ही चूक झाली. त्यामुळे, युद्धानंतर इराक सुस्थिर करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी पूर्वीच्या राज्यव्यवस्थेतील महत्वाच्या माणसांना वेचून खटले, शिक्षा, उपेक्षा, इत्यादीव्दारा दूर करण्यात आले. परिणामी शासनव्यवस्था ताब्यात ठेवणारी सर्वच यंत्रणा नष्ट झाली आणि सद्दामच्या पोलदी पकडीत खूप काळपर्यंत दबून राहीलेल्या एकमेकविरोधी गटांचा उद्रेक उफाळून वर आला व अराजक माजले. अर्थातच, "जगातल्या सर्वात मोठ्या विक्रियोग्य तेलसाठ्यावर (मध्यपूर्वेवर) दीर्घकालीन नियंत्रण ठेवून जागतीक अर्थव्यवस्था आणि राजकारण आपल्या पकडीत ठेवणे" हा या युद्धातला अमेरिकेचा मुख्य उद्देश असफल झाला. युद्धानंतर दशकापेक्षा जास्त वेळ अनेक तर्‍हेचे प्रयत्न करून आणि अपरिमित आर्थिक व (दोन्ही बाजूंची) जीवहानी झाल्यानंतर अमेरिकेला इराकमधून सावध पलायन करणे भाग पडले आहे. मागे ठेवलेल्या शासकीय पोकळीत जन्मलेल्या अराजकाने इराक व सिरियात अनेक अतिरेकी तत्वांना जन्म दिला आहे. ISIS ही त्यातली अग्रगण्य अतिरेकी संघटना तर इतकी प्रबळ झाली आहे की तिचा अर्ध्या इराकवर आणि सिरियाच्या काही भागावर ताबा आहे. ताब्यातल्या भूभागातले खनिज तेल विकून आणि हितसंबंधियांकडून मिळणार्‍या देणग्या असे मिळून ISIS कडे जवळ जवळ २ बिलियन डॉलर्स जमले आहेत असा अंदाज आहे. ISIS च्या ताब्यातला भूभाग आणि तिचे उत्पन्न जगातील अनेक देशांपेक्षा जास्त आहे. या भस्मासूराच्या वल्गना आणि कारवाया पहाता त्याच्या आजूबाजूचे मध्यपूर्वेतले अनेक देश आणि सर्व जगही फार मोठ्या आणि दीर्घकालीन अनावस्थेत ढकलले गेले आहेत यात शंका नाही. ====== * व्हिएतनाम हा असा एकुलता एकच देश आहे की ज्याने अमेरिका (व्हिएतनाम युद्ध) आणि चीन (कंबोडियन युद्ध) या दोन आधुनिक जागतीक सामरी सत्तांना युद्धात पाणी पाजले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 05/29/2015 - 14:24

In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

* व्हिएतनाम हा असा एकुलता एकच

* व्हिएतनाम हा असा एकुलता एकच देश आहे की ज्याने अमेरिका (व्हिएतनाम युद्ध) आणि चीन (कंबोडियन युद्ध) या दोन आधुनिक जागतीक सामरी सत्तांना युद्धात पाणी पाजले आहे. व्हिएतनामीज 'अमेरिका सेव्ज मॅनकाइंड' वाले सायकोलॉजिकल प्रोपागंडा सिनेमे बघत नसतील. विवेचन अगदी योग्य आणि माहितीपूर्ण.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/29/2015 - 14:48

In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

जबरी विवेचन!!!!!

जबरी विवेचन!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 05/29/2015 - 15:11

In reply to जबरी विवेचन!!!!! by बॅटमॅन

Permalink

या चर्चेचे

एक चांगले फलीत. देवा अश्या धाग्यांच पीक येऊ दे रे !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 05/29/2015 - 15:16

In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

या सगळ्या निर्नायकी देशांच्या

या सगळ्या निर्नायकी देशांच्या वाताहतीच्या पार्श्वभूमीवर नेल्सन मंडेलांचं नेतेपण (Leader आणि visionary या दोन्ही प्रकारे चोवीस कैरेट सोन्याप्रमाणं उजळून दिसतं) एक्कामालकांचं विवेचन नेहमीप्रमाणेच भारी
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 05/29/2015 - 16:05

In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

सुंदर

फार सुंदर प्रतिसाद. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध सदैव रक्तरंजित राखण्याचे 'श्रेय' अमेरिकेकडे जाते. शिवाय खोमैनी, सद्दाम, लादेन यांसारख्या भस्मासुरांच्या निर्मितीचेही. पहिल्या इराण-इराक युद्धाच्यावेळी टीवीवर अमेरिकेने तुफान प्रचार केला होता. अमेरिकेची 'पेट्रियट' क्षेपणास्त्रे इराकच्या (सोविएतदत्त) स्कड क्षेपणास्त्रांची कशी धूळदाण उडवीत याच्या चित्रफिती तेव्हा सी एन एन दाखवीत असे. त्या सर्व खोट्या होत्या असे नंतर पुढे आले. ते काहीही असले तरी त्या क्षेपणास्त्री लढाया आपल्या रामायण-महाभारत मालिकांतल्या बाणांच्या लढायांप्रमाणे लुटुपुटीच्या वाटत. म्हणजे टीवी स्क्रीनच्या एका कोपर्‍यातून स्कड अस्त्र निघालेले दिसे . तेवढ्यात दुसर्‍या कोपर्‍यातून पेट्रियट निघे आणि दोघांची हवेत टक्कर होऊन पडद्यावर धूर आणि आग पसरे. वगैरे. स्टार-वॉर्सप्रमाणे ही युद्धे पाहाण्यास मजा येई.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Tue, 06/02/2015 - 14:12

In reply to सुंदर by राही

Permalink

रशियाचे काय?

विसाव्या शतकाचा उत्तरार्ध सदैव रक्तरंजित राखण्याचे 'श्रेय' अमेरिकेकडे जाते.
बरोबर आहे. पण केवळ अमेरिकेला नावे ठेऊन विचारवंतीपणा मिरवायचा हा प्रकार आपल्याकडे चालतो त्याचा मात्र भयंकर संताप येतो.अमेरिकेने व्हिएटनाममध्ये जे काही केले ते समर्थनीय नाहीच.पण मग रशियाने पूर्व युरोपात, अफगाणिस्तानात केले त्याचे काय? सर्वत्र पोलादी पडद्याआड रशियाने कोट्यावधी लोकांना कशा हालापेष्टा भोगायला लावल्या त्याचे वर्णन अलेक्झांडर सोल्झेनिस्टीनच्या गुलाग या कादंबरीत आहे-- आणि हो हा लेखक मुळातला रशियनच बरं का? अमेरिकेला नावे ठेवणारे लोक रशियाने जे काही केले त्याविषयी मात्र कायम मौन बाळगतात. मी तर म्हणतो की दुसर्‍या महायुध्दानंतर रशियाने पूर्व युरोप गिळंकृत केला नसता तर पुढचे सगळे रामायण कदाचित घडलेही नसते. तरीही केवळ अमेरिकेला नावे ठेवायची हा स्वतःचा विचारवंतीपणा मिरवायचा एक मार्ग म्हणून अनेक लोक वापरतात (आणि त्याचवेळी अमेरिकेत जायलाही धडपडतात) त्याचा मात्र नक्कीच संताप येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 05/29/2015 - 16:14

In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

थोडे अवांतर.

विएत्नाममधले 'मा लाय' मॅसॅकर हे जगातील रक्तरंजित घटनांमध्ये आणि नरसंहारामध्ये 'मानाचे पान' मिळवून बसले आहे. किंवा अमेरिकेच्या मुकुटातले एक मानाचे पीस म्हणा हवं तर. कोपोलाच्या 'अ‍ॅपॉकलिप्स नाव्' या अप्रतिम चित्रपटातली अशी नापाम बॉम्बची जळिते अंगावर काटा आणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 05/29/2015 - 16:15

In reply to थोडे अवांतर. by राही

Permalink

माय लाय

माय लाय हा अमेरिकन उच्चार. खरा उच्चार काय कोण जाणे.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 05/29/2015 - 22:04

In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

सुरेख प्रतिसाद.धागा वाचणे

सुरेख प्रतिसाद.धागा वाचणे सार्थक झाले विवेचन वाचुन.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Fri, 05/29/2015 - 14:22

Permalink

आयसिस क्रूरकर्मा आहेच पण

आयसिस क्रूरकर्मा आहेच पण सद्दाम हा पण त्याच माळेचा मणी आहे . अनेक निष्पाप लोकांच्या मृतदेहावर त्याचा राज्यशकट उभा होता . त्याचा मुलगा उदय तर निव्वळ कसाई होता . या उदयवर एक 'devil's double ' नावाचा जबरी चित्रपट आहे . या क्रूरकर्मा उदय चा एक 'body double ' होता त्याच्या निवेदनावर आणि सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे . अर्थातच हा चित्रपट म्हणजे सगळे सत्य सांगणारा चित्रपट आहे असा माझा गैरसमज आहे . पण तुम्ही गुगल वर जरी उदय हुसेन असा सर्च केला तरी हा कसला नर राक्षस होता याची भरभरून माहिती मिळेल
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 05/29/2015 - 14:42

In reply to आयसिस क्रूरकर्मा आहेच पण by पिंपातला उंदीर

Permalink

सद्दाम

इथे दगडापेक्षा वीट मऊ एवढेच ! दोघेही वाइटच.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Fri, 05/29/2015 - 16:51

In reply to आयसिस क्रूरकर्मा आहेच पण by पिंपातला उंदीर

Permalink

फरक

सद्दाम हलकट होता तो त्याच्या देशापुरताच. भारतातील कल्याण नामक नगरातून काही तरूण सद्दामकरता लढायचे ह्या ध्येयाने प्रेरित होऊन इराकला रवाना झाले असते का? आयसिसने ते केले आहे. जगभरातून डोकी फिरलेले, धर्मपिसाट लोक भरती करण्याची ताकद त्यांच्या खिलाफती संदेशात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Fri, 05/29/2015 - 17:50

In reply to फरक by हुप्प्या

Permalink

सद्दाम हा हुकुमशहा होता पण

सद्दाम हा हुकुमशहा होता पण धर्मयोद्धा नव्हता. किंबहुना सुन्नी असून सुद्धा तो जिहादींचा तिरस्कारच करे. इराण इराक युद्धात सद्दाम अमेरिकेचा लाडका होता आणि इराणला संपवण्याचा प्रयत्न म्हणून अमेरिकेनं त्याला शस्त्रास्त्र पुरवली. अमेरिकेनं याच्या पूर्वी इराणच्या शहाला (म्हणजे खोमेनीच्या विरोधी सत्ताधीशाला) सुद्धा शस्त्रास्त्रं पुरवली होती. जेव्हा खोमेनीनं सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा अमेरिकन्स नी विमानांच्या चिप्स नष्ट करून देश सोडला आणि ती विमानं बेकार केली. मध्य पूर्वेतलं राजकारण बरंच गुंतागुंतीचं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 05/29/2015 - 19:56

In reply to सद्दाम हा हुकुमशहा होता पण by काळा पहाड

Permalink

जेव्हा खोमेनीनं सत्ता ताब्यात

जेव्हा खोमेनीनं सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा अमेरिकन्स नी विमानांच्या चिप्स नष्ट करून देश सोडला आणि ती विमानं बेकार केली.
परत पेट्रोल भरून घेउन नै गेले?
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Fri, 05/29/2015 - 21:49

In reply to जेव्हा खोमेनीनं सत्ता ताब्यात by टवाळ कार्टा

Permalink

नाही, तसं बहुधा शक्य नसावं

नाही, तसं बहुधा शक्य नसावं कारण एकतर पायलट्स इराणी होते. १४० एफ-१४ इराणींच्या ताब्यात होती आणि त्यावर लावण्यासाठे ४०० फिनिक्स मिसाईल्स सुद्धा त्यांच्याकडे होती. दुसरं म्हणजे विमानं पळवून नेण्यासाठी तेवढं इंधन कुठून आणणार? त्या विमानांना रिफ्युएल कसं करणार? कुठे करणार? अमेरिकन्स नी या मिसाईल्स वापरण्यासाठीच्या विमानातल्या चिप्स पळवून मग देश सोडला. गूगलच्या सहाय्याने: As the Iranian revolution gathered speed in the final months of 1978, the possibility of all those weapons falling into unfriendly hands became a terrifying reality. The American intelligence community was seized with panic, for the fatal flaw of the Nixon Doctrine - the "special relationship" that had existed between Washington and Tehran - had finally surfaced, dashing a throne and a major alliance as inexorably as the furies of Greek tragedy. In the dark hours that preceded the Shah's flight from Iran, the CIA station chief in Tehran hastily dismantled US listening posts stretched along Iran's 1200 mile-long border with the Soviet Union. Sensitive equipment was destroyed or shipped out. Grumman technicians left the country carrying top secret repair manuals for the F-14 fighter. Others pocketed computer chips powering the "brains" of the Phoenix missiles that armed them http://www.iran.org/tib/krt/fanning_ch5.htm
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 05/29/2015 - 14:53

Permalink

सत्ता मिळवणे आणि तिचा विस्तार

सत्ता मिळवणे आणि तिचा विस्तार करणे या मूलभूत मानवी प्रवृत्ती नुसार सगळेच जण वागत असतात आणि आलेले आहेत. राजकारणात सारं काही माफ़ असतं या उक्तिनुसार ISIS च्या तथाकथित 'विचार'सरणी नं प्रेरित काही लोक या विचाराना पाठबळ देत आहेत. बरेच मुस्लिम लोक या विचारसरणीच्या लोकांना मुस्लिम मानत नाहीत. they are crazy people असं म्हणून बोळवण करतात. तरीही पाटला चं बाद पोर असल्यानं पाटलाच्या घरावरच दोष येतो यात नवल नाही (अर्थात पाटलांच्या घरात ज़रा जास्तच उद्योगी लोक आधीपासूनच आहेत हे लपून राहिलेलं नाहीच्च म्हणा)
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Sat, 05/30/2015 - 09:25

Permalink

स्त्रियांना स्वातंत्र्य.

स्त्रियांना स्वातंत्र्य. इराकमधे अल-कायदा प्रभावी होउ न देणं. ट्विन टॉवर हल्ल्यानंतर अफगाणीस्तान आधी इराकमधे आश्रय मिळेल का याची चाचपणी ओसामाने केली होती त्याला सद्दामने नकार दिला होता. धार्मीक कट्टरतेपेक्षा आधुनीकतेची कास धरणे. उदा. मी लोकांना त्यांची हातली आहेत ती कामधाम सोडून दिवसातुन ५ वेळा नमाजाची सक्ती करु शकत नाही वगैरे वगैरे विधाने. भारताने काश्मीर प्रश्नी युनोत जितके ठराव मांडले त्याला पाठींबा दिला. असे सद्दामचे काही नक्किच चांगले गुण आहे. पण तो क्रुरही तितकाच होता. उदा. त्याच्या दरबारात जेंव्हा तो विनोद करत असे तेंव्हा सर्वांना त्यावर हसणे बंधनकारक असे. एक जण हसला न्हवता तर तिथेच त्याला गोळी घातली होती :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 06/01/2015 - 13:13

In reply to स्त्रियांना स्वातंत्र्य. by द-बाहुबली

Permalink

स्त्रियांना स्वातंत्र्य.

स्त्रियांना स्वातंत्र्य. सद्दाम आणि त्याचा मुलगा उदय हे दोघेही बलात्कारांबद्दल बदनाम होते. त्यातही उदय फारच वाईट. असे म्हणतात की त्याच्या काळात त्याचे बॉडीगार्डस शाळा / कॉलेजांच्या बाहेर सुंदर मुलींची टेहळणी करत उभे रहायचे. त्यांच्याबरोबर उदय देखील असायचा. तो ज्या मुलीकडे बोट दाखवेल तिला उचलुन नेले जायचे आणि मग तिचे मर्जी असो अथवा नसो, उदयचे समाधान होइपर्यंत उदय तिला ठेउन घ्यायचा. जर तिने त्रागा केला किंवा ती त्रासदायक ठरेल असे वाटले तर तिची रवानगी तुरुंगात अथवा वेश्याघरात व्हायची. जर तिने सहकार्य केले तर काही दिवसांनी जेव्हा उदयचे समाधान होइल तेव्हा तिची सुटका व्हायची. असहकार्य करणार्‍या मुलींना त्याने दिलेल्या यातनांवर एक लेख वाचला आहे तो तर फारच हॉरिबल होता. त्यामुळे त्यांनी स्स्त्रियांना स्वातंत्र्य दिले आणि दुसरीकडे त्यांचे स्वातंत्र्य हिरावुन घेतले असेच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 06/01/2015 - 14:29

In reply to स्त्रियांना स्वातंत्र्य. by मृत्युन्जय

Permalink

सध्या बरं चाललंय का इराकमधे

सध्या बरं चाललंय का इराकमधे स्त्रियांचं ? सद्दाम आणि उदय गेल्यापासून? उपरोध सोडून देऊ, पण तुलना सद्यस्थिती आणि सद्दामराज्य यांच्यात चालली आहे. जंगलात बिबट्या लांडग्यांनी हरणं ससे मारुन खाणं हे हरीण ससा यांच्या दृष्टीने निश्चित दुर्दैवीच.. पण त्याच जंगलात बिबट्याच्या भीतीने मनुष्यप्राणी येत नसे, तो आता आला.. त्याउपर हजारो लाखोंच्या झुंडी घेऊन आला.. बंदुका घेऊन आला.. हरीण ससे यांची दिवसरात्र कत्तल केली, जमीन उजाड करुन स्वतःच्या ताब्यात घेतली.. इत्यादि. यात बिबट्या, लांडगा म्हणजे थोर मसीहा असा अर्थ नसून तुलनेत ते परवडले अशी स्थिती सर्व हरीणसशांची या निर्नायकीमुळे झाली असा अर्थ अभिप्रेत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 06/01/2015 - 16:58

In reply to सध्या बरं चाललंय का इराकमधे by गवि

Permalink

सध्या जे चाललय ते घ्रुणास्पद

सध्या जे चाललय ते घ्रुणास्पद आहे. पण त्यामुळे सद्दाम स्त्रियांचा रक्षणकर्ता होत नाही. दगडापेक्षा वीट मऊ म्हणायची असेल तर म्हणु शकतो आपण. हिटलर जर्मनीमधुन गेला आणि रशियन्सनी नंगानाच घातला. तेव्हाही परिस्थिती काही फार सुधारली नव्हतीच पण म्हणुन हिटलरला ज्युप्रतिपालक म्हणता येइल का?
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Tue, 06/02/2015 - 21:05

In reply to सध्या जे चाललय ते घ्रुणास्पद by मृत्युन्जय

Permalink

सद्दामने बुरखा सक्ति केलि

सद्दामने बुरखा सक्ति केलि न्हवती. स्त्रियांनी घराबाहेर पडणे, नोकरी करणे, शिक्षण घेणे त्याला गैर वाटत नसे.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 06/03/2015 - 11:09

In reply to सद्दामने बुरखा सक्ति केलि by द-बाहुबली

Permalink

बुरखा सक्ती केली असती.

बुरखा सक्ती केली असती. घराबाहेर पडण्यावर बंदी घातली असती, शिक्षण घेणे थांबवले असते तर उदयला बायका कश्या हेरता आल्या असत्या? एवढे सगळे केलेच तर उदयला सगळ्यात पहिल्यांदा तुरुंगात टाकायला हवे होते. अर्थात थोड्या फार फरकाने सद्दामही तसाच होता म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 06/01/2015 - 14:21

Permalink

अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले

अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले शत्रू मानते किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचे जे शत्रू असतात त्यांच्या राष्ट्रप्रमुखांविरुद्ध अतिरंजित, भडक, चिथावणीखोर बातम्या पसरवल्या जातात असं निरिक्षण आहे. सद्दाम, गडाफी इत्यादींविरुद्ध आपल्याला जे काही कळते त्यांचे स्त्रोत हे पाश्चिमात्य पत्रकार असतात. ते जे लिहितात ते सत्यच असं एकंदर जनमानस असतो. जगातल्या इतर कोणत्याही देशातल्या समस्येबद्दल आपले मत बनवतांना एक काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे की आपले मत कुठल्याही प्रोपगंडातर्फे प्रेरित किंवा आधारित नसावे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 06/01/2015 - 17:08

In reply to अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले by संदीप डांगे

Permalink

अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले

अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले शत्रू मानते किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचे जे शत्रू असतात त्यांच्या राष्ट्रप्रमुखांविरुद्ध अतिरंजित, भडक, चिथावणीखोर बातम्या पसरवल्या जातात असं निरिक्षण आहे. सद्दाम, गडाफी इत्यादींविरुद्ध आपल्याला जे काही कळते त्यांचे स्त्रोत हे पाश्चिमात्य पत्रकार असतात. ते जे लिहितात ते सत्यच असं एकंदर जनमानस असतो.
अगदी अतिप्रचंड नेमके. यामुळे अमेरिकन्सचा हरामखोरपणा अजूनच अधोरेखित होतो. अर्थात असे म्हणणे म्ह. सद्दाम = संत म्हणणे नव्हे हेवेसांनल. पण सॉफ्ट पॉवरमध्ये अमेरिकेची बरोबरी कुणीच करू शकत नाही, सबब असं होणारच.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 06/01/2015 - 17:49

In reply to अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले by बॅटमॅन

Permalink

सद्दाम = संत म्हणणे नव्हे

सद्दाम = संत म्हणणे नव्हे याच्याशी बाडीस. सॉफ्ट पॉवरमध्ये अमेरिकेची बरोबरी कुणीच करू शकत नाही, सबब असं होणारच. म्हणूनच सावध पवित्रा घेऊन बातम्या वाचल्या तर मनोरंजनाव्यतिरिक्त काही हेतू ठेवू नये. कुणीतरी कुठेतरी दाबू पाहतं ती बातमी. बाकी सगळ्या जाहिराती.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 06/01/2015 - 18:01

In reply to अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले by बॅटमॅन

Permalink

आता क्रमांक उत्तर कोरियाच्या

आता क्रमांक उत्तर कोरियाच्या साहेबांचा आहे. गेल्या वर्षीपासून जनमानस बनवायला सुरुवात झाली आहे. येत्या तीन वर्षात उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांनी आपल्या जनतेला वेटीस धरले आहे आणि जनता स्वातंत्र्य मागत आहे अशी बातमी येईल. मग सद्दाम, गडाफी, अरब स्प्रींगची पुनरावृत्ती होईल. अमेरिकेचे टेबलाखालून प्रतिस्पर्ध्याचे पाय तुडवल्या जातात. प्रतिस्पर्धी वेदनेने ओरडला की बघा किती असभ्य म्हणून पार्टीत त्याला बदनाम केले जाते. अशा असभ्य माणसाला पार्टीतून हाकलून लावणे किती आवश्यक आहे हे कुणाला पटवून द्यायची गरज पडत नाही. आणि त्या माणसाला पार्टीतून उचलून 'अत्यंत सभ्यपणे' बाहेर फेकले जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 06/01/2015 - 18:34

In reply to अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले by बॅटमॅन

Permalink

जय हो

अगदी अतिप्रचंड नेमके. यामुळे अमेरिकन्सचा हरामखोरपणा अजूनच अधोरेखित होतो.
एक गोश्त कळत नाही. इथे सगळे अमेरिकेला शिव्या घालत आहेत आणि त्यातले बरेचसे आय.टी हमाल आहेत (माझ्यासारखे). जर अमेरिकेत ऑन-साईट ओपोर्ट्यूनिटी मिळाली तर अमेरिकेला हरामखोर वगरे म्हणणारे बरेचसे लोक लंगडी घालत अमेरिकेत जायला तयार होतील. तसेही आय.टी मध्ये कधी ऑनसाईट जायला मिलते यावर सगळ्यांचे डोळे असतातच. आणि त्याचवेळी अमेरिकेला शिव्याही घालायच्या--हरामखोर म्हणायचे. आणि यात आपण काही विसंगत वागत आहोत हे त्यांच्या गावीही नसते. जय हो आय.टी मानसिकता. जय हो भारतीय ढोंगीपणा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/01/2015 - 18:43

In reply to जय हो by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

जरा असहमती

जरा असहमती. एखादा देश म्हणजे केवळ त्याचे सरकार नव्हे. सरकारच्या अनेक धोरणांना अन कारनाम्यांना त्या देशातल्या जनतेचा (कधी अल्पसंख्य कधी बहुसंख्य) विरोध असतोच.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 06/01/2015 - 18:51

In reply to जरा असहमती by श्रीरंग_जोशी

Permalink

पळवाट

ही पळवाट झाली हो. आणि अनेक आय.टी हमालांचे प्रोजेक्ट अमेरिकन सरकारच्या कुठल्यातरी डिपार्टमेन्टचेही असतात. मी स्वतः डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरचा प्रोजेक्ट केला आहे. चांगले सहा महिने वॉशिंग्टनमध्ये होतो मी. आणि जरीही प्रोजेक्ट प्रायव्हेटचा असला तरी अमेरिकेतल्या प्रायव्हेट कंपन्या कशा आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. तिकडे चांगले बक्कळ पैसे मिळतात त्यालाच नुसते महत्व. बाकी तत्वज्ञान गेले भाड्यात. पैशाला महत्व देण्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही.पण मग ज्या देशात जायला आपण टपून बसलेले असतो त्यालाच (विशेषतः आपण स्वतः त्या देशाचे नागरिक नसताना) हरामखोर वगैरे म्हणणे हा ढोंगीपणाच आहे. स्वतःच्या बायकांची बाळंतपणे अमेरिकेत करावीत म्हणजे आपल्या मुला/मुलीला जन्मजात अमेरिकेचे नागरिकत्व मिळेल यासाठीही धडपडणारे महाभाग आहेत आमच्या हापिसात. अशांनी परत अमेरिकेला हरामखोर म्हणणे यात काहीच ढोंग नाही?आणि ज्यांना कधीच अमेरिकेत ऑनसाईट जावेसे वाटत नसेल त्यांनी काहीही म्हटले तरी हरकत नाही.पण आपण स्वतः ज्याची इच्छा ठेवतो त्यालाच विसंगत वागताना लोक दिसले तर त्या ढोंगीपणाची कीव याते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/01/2015 - 19:20

In reply to पळवाट by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

तुमचे म्हणणे पटत आहे

तुमचे म्हणणे पटत आहे पण 'हरामखोर' किंवा त्या प्रकारचे शब्द न वापरता विरोध दर्शवला किंवा आक्षेप घेतला तर? अमेरिकेत किंवा कुठल्याही देशात काम करायला जाणे अन asylum (मराठीत शरणागती बहुधा) घेणे यामध्ये त्या व्यक्तिच्या वर्तनातला फरक अपेक्षित आहे. आमच्या शहरात ९० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेने asylum दिलेल्या सुमारे ५० हजार सोमालियन लोकांना वसवले गेले. काही महिन्यांपूर्वी त्या लोकांच्या इथे जन्मलेल्या मुलांनी (वय १९-२० वगैरे) आयसिसमध्ये सामिल होण्यासाठी टर्की वगैरे कडे कूच केले. तर काही जण इथल्या विमानतळावरच पकडले गेले. तर इथल्या सोमालियन समाजातील धुरिणांनी या तरुणांच्या कृत्याचे समर्थन केले तर तो ढोंगीपणाच काय द्रोहच समजला जाईल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com