✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

G
ganeshpavale यांनी
गुरुवार, 05/28/2015 - 10:25  ·  लेख
लेख
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर ज्यांची लेखणी माझ्यासाठी नेहमीच आदरणीय, आणि वंदनीय. असामान्य व्यक्तिमत्व, आणि कर्तुत्ववान देशभक्त आपल्या विविध पैलूंनी आपली प्रतिभा प्रकट करणारे प्रगाड बुद्धिवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा

मित्रांनो,आपल्याकडे बरीच अशी व्यक्तिमत्व होवून गेली कि जी आजही जनमाणसात अजरामर आहेत. त्यात प्रत्येक हिंदुच्या मनात, मराठी माणसाच्या मनात आपल अढळ स्थान बनवणारे थोर क्रांतिवीर, स्वातंत्रवीर आपल्या पैकी बरेच जणांचे आदर्श………। आपल्या लेखणीने उभ्या हिंदुस्थानात नव चैतन्य निर्माण करणारे ज्यांचे शिवछत्रपती आदर्श होते. ते मवाळ, जहाल आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे "स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर" जय शिवराय जयस्तु हिंदुराष्ट्राम…। - गणेश पावले
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
15484 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

अभिवादन!

पैसा
गुरुवार, 05/28/2015 - 10:47 नवीन
स्वातंत्र्यवीरांना अभिवादन! सावरकर त्यांच्या अनुयायांनाही पुरते समजेले नाहीत मग विरोधकांची काय कथा! अर्थात हे त्यांचे आणि आपल्या सर्वांचेच दुर्दैव!
  • Log in or register to post comments

ओ ओ ओ

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 05/28/2015 - 11:48 नवीन
ओ ओ ओ
सावरकर त्यांच्या अनुयायांनाही पुरते समजेले नाहीत
हे काय भलते बोलताय तुम्ही ? आमच्या शिंव्हरोडवरील एक मित्र आहेत त्यांन्ना सावरकर पुर्ण म्हण्जे पुर्ण म्हण्जे पुर्ण १००% कळाले आहेत आणि म्हणुन ते आम्हा टनाटन धर्माच्या लोकांवर कडाडुन टीका करत असतात !! अभ्यास वाढवा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तो तुमचा भ्रम आहे

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 11:54 नवीन
तो तुमचा भ्रम आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मग

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 05/28/2015 - 12:18 नवीन
चालु द्या तुमचे निरर्थक अत्मरंजन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आज सकाळपासून जयोस्तुते ---

कंजूस
गुरुवार, 05/28/2015 - 10:49 नवीन
आज सकाळपासून जयोस्तुते --- गाणी रेडिओवर वाजताहेत.
  • Log in or register to post comments

या महानायकास कोटी कोटी प्रणाम

मदनबाण
गुरुवार, 05/28/2015 - 11:34 नवीन
या महानायकास कोटी कोटी प्रणाम ! उपेक्षित सावरकर

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्यवीर सावरकरांना

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/28/2015 - 11:56 नवीन
स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्यवीर सावरकर

नाखु
गुरुवार, 05/28/2015 - 12:11 नवीन
फक्त नाव उच्चारताच आपोआप नतमस्तक होतो. समग्र विविधांगी लिखाण्,प्रखर देशाभिमान आणी अत्यंत दूरदर्शी+ विज्ञानवादी परखड विचार असलेला भारतमातेचा सुपुत्र पुन्हा होणे नाही. त्यांच्या जीवनावर दूरदर्शन मालीका बनली तर किमान आजच्या पिढीला असाही एक समर्पीत योद्दा होता हे तरी कळेल. (पुस्तकातून वाचायचे दिवस दूरून्दर्शनले आहेत त्यामुळे हाच एक उपाय शिल्लक आहे)
  • Log in or register to post comments

.

hitesh
गुरुवार, 05/28/2015 - 12:20 नवीन
सावरकर समजले असते तर गोहत्याबंदी कायदा आला नसता
  • Log in or register to post comments

आज कधी नव्हे ते आपले एकमत

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 05/28/2015 - 12:23 नवीन
आज कधी नव्हे ते आपले एकमत झाले हितेशराव !! आमचे एक कट्टर सावरकरवादी मित्र बीफ लांब राहिले पण नुसते अंडा भुर्जीच्या वासाने लांब पळतात शिव शिव शिव म्हणत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

जर शिव शिव म्हणतात तर पळतात

बॅटमॅन
गुरुवार, 05/28/2015 - 14:29 नवीन
जर शिव शिव म्हणतात तर पळतात कशाला म्हणे? शिवाशिवी खेळायची म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तुम्हाला काय सावरकर या एकाच

कहर
गुरुवार, 05/28/2015 - 12:59 नवीन
तुम्हाला काय सावरकर या एकाच वाक्यासाठी माहित आहेत का ओ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

तरीच म्हंटले ….

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 05/28/2015 - 13:18 नवीन
सावरकर आले, अजून गाय कशी आली नाही … दिसली दिसली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

असल्या धाग्यांवर सहसा

आदूबाळ
गुरुवार, 05/28/2015 - 14:39 नवीन
असल्या धाग्यांवर सहसा प्रतिसाद देत नाही, पण तुम्ही बॉल एकदम मिडल केलात, म्हणून टाळ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

@..हितेसभॉय.......काय रे तुला खाजवुन खरूज काढायची .....

विनोद१८
गुरुवार, 05/28/2015 - 23:54 नवीन
..जन्मजात सवय दिसतेय, हा राजकारणावरचा धागा नाही याचे तारतम्यही तुला नाही, काय म्हाणावे तुला ?? मुळ धाग्याचा विषय काय आणि आपण प्रतिक्रीया देतो काय कुठे बारीकशी जरी संधी मिळाली की लगेच खाजवायला सुरवात करतोस तु, याचा अतिरेक करु नकोस तसेच इथले वातावरणसुध्धा खराब करु नकोस. तुला स्वताला स्वातंत्र्यवीर किती समजलेत हे तुझ्या आजवरच्या दिलेल्या प्रतिसादांनी सर्व मिपाकरांच्या लक्षात आले आहेच तसेच स्वा. सावरकर आम्हाला समजाविण्याच्या भानगडीत आपण पडु नये हे उत्तम, इथले स्वा.सावरकरप्रेमी त्यासाठी सर्वार्थाने समर्थ आहेत याची नोंद घ्यावी. गोहत्याबंदी कायद्यामुळे जर तुझी किंवा अन्य कोणाची उपासमार होत असेल तर ते समजु शकते, परंतु त्याला नाइलाज आहे, त्याविषयी सरकारकडे दाद मागावी इथे नव्हे, हा कायदा बाद करण्याचा अधिकार 'मिपाला किंवा मिपाकरांना' नाही. त्यामुळे त्याविषयीच्या वांझोट्या चर्चेलासुद्धा काही अर्थ रहात नाही. तेव्हा आता ह्या असल्या विषयाला पुढे करुन आपला आवडता 'हिंदुविरोधाचा अजेंडा' पुढे रेटणे थांबवावे अशी णम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

हितेश तुझं बरोबर आहे ..

चिनार
Fri, 05/29/2015 - 09:41 नवीन
हितेश तुझं बरोबर आहे .. गोहत्या या विषयावर सावरकरांचे एका वाक्यातले मत म्हणजेच संपूर्ण सावरकर तत्वज्ञानाचे सार आहे ! सावरकरांना समजण्यासाठी तू आणि राहुल गांधी यांचासारख्या विचारवंताची गरज आहे . राहुल गांधींना पंतप्रधान करा ! पण माझे पामराचे एक प्रामाणिक मत..सावरकरांचे विचार समजून जर खरच अमलात आणले असते तर गोहत्याबंदी साठी वेगळा कायदा करायची गरजच पडली नसती..! तरीपण ...राहुल गांधींना पंतप्रधान करा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

अगदी सहमत

पिवळा डांबिस
Fri, 06/05/2015 - 09:56 नवीन
सावरकर समग्र वाचून आणि नंतर समजून घेण्याचे कष्ट उठवण्यापेक्षा त्यांचा फक्त टिळा लावून फुकटची बोंबाबोंब करणारेच भ*वे आज अधिक!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

अभिवादन!

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 05/28/2015 - 13:24 नवीन
स्वातंत्र्यवीरांना अभिवादन!
  • Log in or register to post comments

अस वाटतय कि हि पोस्ट मी उगाच लिहिली…।

ganeshpavale
गुरुवार, 05/28/2015 - 13:26 नवीन
अस वाटतय कि हि पोस्ट मी उगाच लिहिली…। काही फायदा नाहीय…। वरील प्रतिक्रिया वाचून डोक फिरतंय….
  • Log in or register to post comments

तुम्हाला सीरीयस प्रतिसाद हवाय

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 05/28/2015 - 13:46 नवीन
तुम्हाला सीरीयस प्रतिसाद हवाय का ? तर मग हे घ्या = > सावरकरवाद हे खर्‍याअर्थाने निरर्थक अत्मरंजन आहे . कारण सावरकरांचे विचार प्रअ‍ॅक्टिकल नाहीत आजच्या काळाला काळसुसंगत नाहीत . प्लीज नोट : मी कोणी गांधीवादी किंव्वा काँग्रेसजन नाहीये . सावरकरांचे सहा सोनेरी पाने हिंदुत्वाचे पंचप्राण माझी जन्मठेप सारे लहानपणी वाचले होते आणि प्रभावितही झालो होतो , हळु हळु लक्षात आले की हा ही भाबडा आशावादच आहे , एकी कडे गांधींचा आशावाद अन दुसरी कडे सावरकरांचा ! तार्किक दृष्ट्या काहीच फरक नाही . हिंदुंचा देश अस्तित्वात येणे शक्य नाही , जर फाळणीच्या वेळेला देशाचे द्विभाजन न होता , पाकिस्तान , सेक्युलर इंडिया आणि हिंदुराष्ट्र भारत असे त्रिभाजन झाले असते तर कदाचित सावरकांचे हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकारले असते . पण आता ते शक्य नाही . हा सारा भाबडा आशावाद आता आपण विसर्जित करावा . आणि ह्याही पुढे जाऊन सावरकर ब्राह्मण होते त्यामुळे त्यांचे सारे तत्वज्ञान हे सारेच मुसळ केरात टाईप प्रकार आहे . सावरकारांचे साहित्य हे कायम ब्राह्मण्यवाद ह्या टोपलीतच टाकले जाणार . अंदमानात विमानतळाचे नाव मणि शंकर जी अय्यर ह्यांन्नी बदलले तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणाचे रक्त खवळले ... कोणाचे नाही ! हेच जर एखाद्या बंगाली नेत्या विषयी झाले असते तर कम्युनिस्ट दीदी कांग्रेसी सारे मतभेद विसरुन तुटुन पडले असते मणी जींवर ! जाति निर्मुलन तर काही मोजक्याच लोकांनी केले असे आजकाल जवळपास सर्व समाजाचे मत होत चालले आहे . सावरकरांन्नी रत्नागिरीत जे काम केले ते कुटील कारस्थान होते असा समज होत चालला आहे , शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सावरकर आगरकर कर्वे रानाडे आणि हो इतकेच काय तर लोकहितवादींच्याही समाजसुधारणेच्या प्रयत्नांना काडीमोल किंमत राहिलेली नाहीये हे कटु सत्य आहे . सावरकरांन्नीही अंधश्रधेवर कडाडुन हल्ला केला पण अंनिसला मात्र सावरकरांना संडासवीर म्हणणार्‍या संस्थांचा जास्त लळा आहे . थोडक्यात आहे हे असे आहे . कालाय तस्मै नमः !! सावरकरांचा काळ गेला , हिंदु धर्माभिमानी लोकांनी आणि त्यातही ब्राह्मणांनी हा सारा हिंदुराश्ट्र स्वप्नांचा आदर्शांचा पोकळ डोलारा किती दिवस वहायचा ? बास झाले आता . विसर्जन करा ह्याचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ganeshpavale

एक छोटीशी दुरुस्ती

अमृत
गुरुवार, 05/28/2015 - 14:12 नवीन
पोर्ट ब्लेअर विमानतळाचं नाव वीर सावरकर विमानतळ असचं आहे हो.बाकी सावरकरांच लिखाण जास्तं वाचनात न आल्यामूळे प्रतिक्रीयेवर पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+१

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 05/28/2015 - 19:54 नवीन
हल्ली मलासुद्धा असेच वाटायला लागले आहे!फक्त आपल्याइतकी स्पष्टपणे लिहिण्याची किंवा व्यक्त करण्याची कला नव्हती! सगळ्या पोस्टीस अनुमोदन! कालाय तस्मै नमः !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+१००

अजया
Fri, 05/29/2015 - 10:43 नवीन
सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन. प्रगोंच्या प्रतिसादास अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

>>> अंदमानात विमानतळाचे नाव

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/28/2015 - 20:29 नवीन
>>> अंदमानात विमानतळाचे नाव मणि शंकर जी अय्यर ह्यांन्नी बदलले तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणाचे रक्त खवळले ... कोणाचे नाही वाजपेयी पंतप्रधान असताना अंदमानात सेल्युलर जेलसमोर एक स्मृतिस्तंभ उभारण्याची योजना होती. त्यावर सावरकरांची वचने कोरण्यात येणार होती. परंतु २००४ साली सत्ताबदल झाल्यावर सावरकरद्वेष्ट्या मणिशंकर अय्यरने सावरकरांच्या वचनाऐवजी गांधीजींची वचने कोरण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर ज्या कोठडीत सावरकरांनी खिळ्याच्या सहाय्याने कोठडीच्या भिंतीवर काव्य कोरले होते, ते काव्य सुद्धा भिंतीला चुना फासून नष्ट करण्यात आले. मणिशंकर अय्यरला शिवसेनेने व भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केलेला होता. शिवसेनेने त्याला २-३ वेळा मुंबईत विमानतळावरून बाहेर येऊन न देता उग्र निदर्शने करून व घेराव घालून परत जायला लावले होते. त्याच्या पुतळ्याला जोडे मारा आंदोलनही सेनेने केले होते. कोणतेही आंदोलन फार काळ चालविता येत नाही. त्यामुळे ते आंदोलनही काही महिन्यांनी संपले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ते आंदोलनही काही महिन्यांनी

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 05/28/2015 - 20:41 नवीन
ते आंदोलनही काही महिन्यांनी संपले.
ह्म्म . मीही हेच म्हणतोय , आता संपुर्ण सावरकरवादाचाचा गणपति बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या केले पाहिजे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्या वेळेला (२००४ ते २००६)

आदूबाळ
गुरुवार, 05/28/2015 - 21:05 नवीन
त्या वेळेला (२००४ ते २००६) अंदमानचे नायब राज्यपाल भाजपचे - आणि मराठी - आणि मराठीचे प्राध्यापक असलेले - प्रा० राम कापसेच होते ना हो? http://en.wikipedia.org/wiki/List_of_Lieutenant_Governors_of_Andaman_and_Nicobar_Islands#Lieutenant_Governors_of_the_Andaman_and_Nicobar_Islands_.281982.E2.80.94.29
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

??

खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 21:24 नवीन
कोणतेही आंदोलन फार काळ चालविता येत नाही
हिशोब बघा देशाचा, आंदोलन काय असते. दोन तीन उदाहरणे देतो सरदारसरोवर, भोपाळचे आंदोलन, एनरॉनचे, इरोम शर्मिला, नियामगिरी शिवसेनेने जे केले ते आंदोलन नसावे. पुतळ्याला जोडे मारुन बदलत नाहीत असे निर्णय. भाजप शिवसेनेमधे इच्छाशक्ती असती ( भाजप बाकी राज्यातही आहे ना ) तर तडीस लावले असते प्रकरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मान गये खंडेराव . एकदम

पिंपातला उंदीर
गुरुवार, 05/28/2015 - 21:42 नवीन
मान गये खंडेराव . एकदम सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

@ प्रगो- एवढे अप्रतिम तार्किक

असंका
गुरुवार, 05/28/2015 - 22:14 नवीन
@ प्रगो- एवढे अप्रतिम तार्किक लिखाण मी फार दिवसांनी वाचले! अभिनंदन! फार सुंदर लिहिलंत!! आणि या आपल्या कुवतीबद्दल - _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

सांगता...

विकास
Fri, 05/29/2015 - 00:07 नवीन
आंदोलन काय असते. दोन तीन उदाहरणे देतो... सरदारसरोवर, भोपाळचे आंदोलन, एनरॉनचे, इरोम शर्मिला, नियामगिरी यातील प्रत्येक आंदोलनाची सांगता कशी झाली? एन्रॉन प्रकल्प गेला त्याला जबाबदार हे युतीचे राज्य होते असे युतीविरोधक म्हणतात. सरदार सरोवर अस्तित्वात आलेले आहे. भोपाळचे दुर्दैव तसेच राहीलेले आहे... हे सगळे उत्तम आहे असे म्हणायचे नाही. पण असली आंदोलने यशस्वी का झाली नाहीत अथवा होत नाहीत ह्यावर देखील चर्चा करायला हवी. इरोम शर्मिला हे एका व्यक्तीचे आंदोलन आहे. म्हणजे कमी आहे असे म्हणायचे नाही पण त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना वरील आंदोलनांवरच्या टिपण्णीत ठेवणे योग्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

विकास,

खंडेराव
Fri, 05/29/2015 - 10:10 नवीन
१) आंदोलणे यशस्वी होणे, न होणे यात त्यांचे महत्व ठरत नाही, तसेच वैयक्तिक/सामुहिक असण्यावरही. २) मराठवाडा विद्यापिठ नामांतर हे यशस्वी आंदोलनाचे उदाहरण. नियामगिरी ही तसेच. ३) हा धागा सावरकरांच्या जयंतीच्या अभिवादनाचा. त्यात बिजेपीचे नसलेले कर्तुत्व आंदोलण म्हनुण दाखवणे चुकीचे आणि इथे अप्रस्तुत. ४) कापसे राज्यपाल होतेना तेव्हा? राजिनामा दिला का त्यांनी? दिला असल्यास कळवावे. ५) एन्रोन विषयी एक वेगळा धागा काढुयात. मला जी माहीती आहे ती वेगळीच. वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारणे जो मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे एन्रोन सौदा पुर्ण करण्यासाठीची आर्थिक गॅरंटी देणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

धागा कश्यावर आपण चर्चा कशावर

मृत्युन्जय
Fri, 05/29/2015 - 10:23 नवीन
धागा कश्यावर आपण चर्चा कशावर करतो आहे. थोडेफार भान सग्ळ्यांनी ठेवा की. धागा सावरकरांवर आहे, त्यांच्या कार्यावर आहे त्यांच्या महत्तेविषयी आहे. यात मुर्ख मणिचा उद्धार होणे साहजिक आहे कारण त्याने सावरकरांची वचने खोडायला लावली. त्या आधीच्या आणि त्या नंतरच्या कुठल्याही सरकारने तसले कुठलेही अभद्र काम केलेले नाही. त्याला शिव्या घालणे अपरिहार्य होते. तसे भाजपाला यात ओढण्याचे काहीच कारण नव्हते. शिवाय सावरकर समजले असते तर गोहत्याबंदी आली नसती हे म्हणणे सुद्धा मुर्खपणाचे आहे हे म्हणजे अहिंसावादी गांधी समजले असते तर त्यांच्या खून्याला फाशी झाली नसती असे म्हणण्यासारखे आहे. कुठुनतरी बादरायण संबंध जोडायचा आणि विषय नसत्या वळणावर नेउन भाजपाला शिव्या घालायच्या याला मी "अपप्रचारकी कारस्थाने" मानतो. कोणीतरी आ* घात** निषेध भाजपाने आणी सेनेने जास्त काळ केला नाही म्हणुन त्यांना शिव्या घालणे म्हणजे निर्भया प्रकरणात सगळ्यात अमानुष आरोपी सज्ञान नसल्याच्या कारणावरुन सुटल्याचा निषेध सामान्य जनतेने जास्त काळ केला नाही म्हणून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासारखे आहे. गुन्हेगार गुन्हा करणारा असतो त्याचा "जास्त काळ" निषेध न करणारा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

वरील प्रतिसाद जरी

मृत्युन्जय
Fri, 05/29/2015 - 10:29 नवीन
वरील प्रतिसाद जरी खंडेरावांच्या प्रतिसादाला आला असेल तरी तो त्यांना वैयक्तप्रतिसादातो तिथे चुकुन पड्ला. वरील प्रतिसादात नमूद केलेले प्रतिसाद देणार्‍यांसाठी आणि गरज नसताना यात भाजपाला ओढलेल्या लोकांसाठी आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

१) आंदोलणे यशस्वी होणे, न

श्रीगुरुजी
Fri, 05/29/2015 - 14:34 नवीन
१) आंदोलणे यशस्वी होणे, न होणे यात त्यांचे महत्व ठरत नाही, तसेच वैयक्तिक/सामुहिक असण्यावरही. सहमत २) मराठवाडा विद्यापिठ नामांतर हे यशस्वी आंदोलनाचे उदाहरण. नियामगिरी ही तसेच. मराठवाडा नामांतर आंदोलनाला सावरकरांची वचने हटविण्याच्या तुलनेत प्रचंड मोठा पाठिंबा होता. त्याचबरोबर दोन्ही आंदोलनात जातीचे राजकारण होतेच. नामांतर आंदोलनाला विरोध म्हणजे दलितांना विरोध असे समीकरण असल्याने बहुसंख्य पक्षांचा त्याला पाठिंबा होता. सावरकरांच्या बाबतीत सावरकरांना पाठिंबा म्हणजे ब्राह्मणांना, हिंदुत्ववादाला पाठिंबा असे समीकरण असल्याने बहुसंख्य पक्षांचा त्याला पाठिंबा नव्हता. >>>> ३) हा धागा सावरकरांच्या जयंतीच्या अभिवादनाचा. त्यात बिजेपीचे नसलेले कर्तुत्व आंदोलण म्हनुण दाखवणे चुकीचे आणि इथे अप्रस्तुत. त्या आंदोलनाला मी बहुतेक श्रेय शिवसेनेला दिले आहे, भाजपला नाही. ४) कापसे राज्यपाल होतेना तेव्हा? राजिनामा दिला का त्यांनी? दिला असल्यास कळवावे. त्यांनी विरोध केला होता हे वाचले आहे. परंतु त्यांनी राजीनामा दिला होता का नाही ते माहिती नाही. दिला नसल्यास का दिला नाही याची कल्पना नाही. >>> ५) एन्रोन विषयी एक वेगळा धागा काढुयात. मला जी माहीती आहे ती वेगळीच. वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारणे जो मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे एन्रोन सौदा पुर्ण करण्यासाठीची आर्थिक गॅरंटी देणे. वेगळा धागा काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

+१

श्रीगुरुजी
Fri, 05/29/2015 - 14:34 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

>>> भाजप शिवसेनेमधे

श्रीगुरुजी
Fri, 05/29/2015 - 14:40 नवीन
>>> भाजप शिवसेनेमधे इच्छाशक्ती असती ( भाजप बाकी राज्यातही आहे ना ) तर तडीस लावले असते प्रकरण. २००४-२०१४ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे भाजपला हा निर्णय बदलणे शक्य नव्हते. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यावर अंदमान स्मृती स्तंभावरील गांधीजींच्या ओळी काढून तिथे पुन्हा सावरकरांच्या ओळी कोरणे आता शक्य नाही. मणि अय्यरने द्वेषबुद्धीने सावरकरांनी कोठडीच्या भिंतीवर कोरलेल्या कवितेच्या ओळी चुना फासून नष्ट करायला लावल्या. आताचे सरकार त्या ओळी पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयन करणार आहे असे नुकतेच वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

घाईच फार...

विकास
Fri, 06/05/2015 - 03:14 नवीन
हे घ्या! Modi govt to reinstall Veer Savarkar's plaque at Andaman jail काही निवडक भाग : ... After Modi came to power last year, there have been a series of demands made to reinstall the plaque by BJP and Shiv Sena leaders. Sena MP Rahul Shewale had raised the issue in Parliament and demanded the reinstatement of the plaque bearing Savarkar's poetry. Speaking to India Today TV, Shewale said the removal of the plaque had "insulted" the nation. "The controversy over Savarkar is unfortunate. The Congress did not recognise his contribution towards our freedom struggle, but now the NDA government is getting it done. Both Sena and BJP follow his ideology and we are happy about it," he said. Sources have told India Today TV the plaque is likely to be installed again on July 4, the day Savarkar was jailed by the British during the freedom movement. Shewale said 2015 is also the 50th year of his death in 1966. ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

.....मिपावर संपादक आहेत काय ???

विनोद१८
Fri, 05/29/2015 - 00:20 नवीन
..वैचारिक बाटग्यांकडुन तसेच गुढग्यात मेंदु असलेल्यांकडुन यापेक्षा वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही, केवळ सामाजिक वातावरण गढूळ करणे एवढ्या एकाच उद्देशाने हे असले प्रतिसाद येताहेत, स्वातंत्र्यवीरांचे नाव घेण्याची ज्यांची पात्रता नाही असली माणसे त्यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करताहेत आणि संपादक ती गंम्मत बघताहेत असे मला वाटते. मतस्वात्रंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारची निर्भत्सना मिपावर करता येते का ?? किंवा मिपाला तशी ती अपेक्शित आहे का ?? याचे उत्तर मिपाकडे मागण्याची वेळ आता आली असे मला वाटते. @.....प्रगो.. कुणी आमंत्रण घेउन आले होते का तुमच्याकडुन हा असला मळ्मळीत प्रतिसाद मागण्यासाठी. तुमचा उद्देश समजलाय पण हे लक्षात ठेवा अशा प्रव्रुत्तींना संरक्षण देणारे व उठता बसता 'शाहु, फुले आंबेडकरांचे' नाव घेणारे सरकार आता इतिहासजमा झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आपण एक

खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 13:48 नवीन
शहाणा समाज आहोत, महापुरुषांचे जे सोयिस्कर वाटते त्याचा उदोउदो आणि जे अडचणीचे त्याकडे दुर्लक्ष. सावरकरांना अभिवादन..
  • Log in or register to post comments

अभिवादन

अमृत
गुरुवार, 05/28/2015 - 14:07 नवीन
सेल्युलर जेलला भेट दिलेली आहे त्यामूळे काळ्या पाण्याची शिक्षा काय होती हे थोडंफार बघून आलोय संग्रहालयात. या सर्व यातना भोगून सुद्धा स्वातंत्र्यवीरांमधील कवी कसा काय जगला हे आश्चर्यच वाटतं. स्वातंत्र्यवीरांना अभिवादन!
  • Log in or register to post comments

सावरकरांची सगळीच राजकीय मत

पिंपातला उंदीर
गुरुवार, 05/28/2015 - 14:43 नवीन
सावरकरांची सगळीच राजकीय मत मान्य नाहीत . . राजकीय नेत्यांपेक्षा मला तरी त्यांचातला परखड सामाजिक सुधारक जास्त भावतो . अभिवादन .
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !

मुक्त विहारि
गुरुवार, 05/28/2015 - 18:50 नवीन
स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !!!!!
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्यवीर सावरकरांना

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/28/2015 - 20:24 नवीन
स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन! आजच अटलबिहारी वाजपेयींचे सावरकरांवरील अत्यंत सुंदर व्याख्यान ऐकले.
  • Log in or register to post comments

तसे म्हणाल तर महाराष्ट्रात

विवेकपटाईत
गुरुवार, 05/28/2015 - 21:42 नवीन
तसे म्हणाल तर महाराष्ट्रात कुणीच नेता महाराष्ट्राचा नाही. प्रत्येकाला जातीत जखडून टाकले आहे. कुणी गैर मराठी व्यक्तीने मराठी आदर्श पुरुषांवर चिखल फेकले तरी ही तो माझा नाही तो ... जातीचा आहे. आपले रक्त खळवळत नाही. हेच सत्य. म्हणून केंद्राला ही महाराष्ट्रावर अन्याय करायला कुठलीच भीती वाटत नाही.
  • Log in or register to post comments

+१००

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/28/2015 - 23:24 नवीन
+१०० महाराष्ट्राइतके संकुचित गोष्टींवर (पक्ष-धर्म-जात-उपजात-विचारधारा-विभाग-जिल्हा-इ-इ) विभागलेले आणि राज्य व राज्यभाषेकडे (महाराष्ट्र व मराठीकडे) दुर्लक्ष करणारे दुसरे राज्य नाही. "दुफळी हा मराठ्यांना कायम लागलेला शाप आहे" हे वचन खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

सहमत

स्वधर्म
Fri, 05/29/2015 - 13:21 नवीन
जातींचे अस्तीत्व हा एक फार मोठा जटील प्रश्न अाहे अन उत्तर अजूनतरी दृष्टीपथात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

आपापल्या परिनी सावरकर जगता

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/28/2015 - 21:49 नवीन
आपापल्या परिनी सावरकर जगता येणे शक्य आहे, . . . . अर्थातच, इच्छा असली आणि गैरसोय होत नसली तरच!
  • Log in or register to post comments

अरे बापरे

प्रसाद गोडबोले
Fri, 05/29/2015 - 11:32 नवीन
आपापल्या परिनी सावरकर जगता येणे शक्य आहे, . . . . अर्थातच, इच्छा असली आणि गैरसोय होत नसली तरच!
>>> बुवा ह्या वाक्याचा सरळ सरळ अर्थ " आपल्या सोयीने सावरकरांचा वापर करुन घ्यावा " असा निघत आहे . =)) बहुतेक तुम्हाला मिरान्डा राईट्स माहीत नसावेत म्हणुन रीइटरेट करतो
You have the right to remain silent . Anything you say or do may be used against you in a court of law. You have the right to consult an attorney before speaking to the police and to have an attorney present during questioning now or in the future.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हवा-तोच्च अर्थ-काढुन घेउन

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 12:01 नवीन
हवा-तोच्च अर्थ-काढुन घेउन अत्यंत अपेक्षित प्रतिसाद दिल्याबद्दल हार्डिक ढण्य वाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आपणास मुद्दा कळालेला नाही

प्रसाद गोडबोले
Fri, 05/29/2015 - 12:02 नवीन
आपणास मुद्दा कळालेला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा