हम तो तेरे आशिक है...
सन १९८१ साली या देशात २ क्रांतिकारी घटना घडल्या. एक माझा जन्म झाला दूसरी एक दुजे के लिये रिलीज झाला. रातोरात वासू - सपना ही जोडी हीर - रांझा, सोनी-महिवाल, सलीम - अनारकली यांच्या पंक्तीत जाउन बसली. पण वासू - सपना या जोडीचा वारसा इतर सर्व जोड्यांपेक्षा अविनाशी ठरला. हा वारसा होता जिथे जागा मिळेल तिथे आपली स्वतःची "वासू - सपना" जोडी कोरण्याचा. दगड बघ नका, झाडे बघु नका, सार्वजनिक शौचालयाच्या भिंती बघु नका, वर्गातली बाके बघु नका, रुग्णालयाच्या भिंती बघु नका, मोटारींच्या धुळीने भरलेल्या काचा बघु नका की पुरातन वास्तुंची स्मारके बघु नका जिथे तिथे या प्रत्येकाच्या आपापल्या वासू सपनांच्या जोडीने गेली ३० - ३५ वर्षे उच्छाद मांडला आहे. इतक्या अनवट जागी या जोड्या कोरलेल्या बघितल्या आहेत की आताशा या उच्छादाकडे कानाडोळा करायला शिकलो आहे. अर्थात रायगडावर गेल्यावर एखाद्या दगडावर जय शिवाजीच्या मागे हळूच "तुच माझी लैला" वगैरे असले काही वाचायला मिळायले की चिडचिड होते. पण या सर्वांवर कडी करेल असला प्रकार मी नुकताच याचि देही याचि डोळा बघितला.
हे ब्रह्मांड जिथे सुरु होते आणि जिथे संपते अश्या पावन पुण्यनगरीत म्या पामराने गेल्या २ दशकात इतके नानाविध नमुने बघितले आहेत की अजुन काही नाविन्यपुर्ण नमुने कुठे बघता येतील याबाबतची आशा मावळत चालली होती. पण पुणे तिथे काय उणे. तर त्याच पुण्यनगरीत तानाजी मालुसरे यांनी जिथे देह ठेवला आणि शेलारमामाने जिथे उदयभानुला आडवा केला त्या सिंहगडावरील तानाजी मालुसरे समाधीच्या आसपासच मला काही नररत्नांनी त्यांचे प्रताप कोरुन ठेवलेले बघण्याचे भाग्य लाभले. यातील नाविन्य हे की आजवरच्या इतिहासात कोणी आपली नावे कॅक्टसच्या पानांवर कोरुन ठेवलेली बघितली नव्हती. याखेपी ते भाग्यदेखील लाभले.
यातला हा जो कोण शेखर आहे आणि जी कोण "Wating for you Forever" तिला पहिल्यांदा कोणीतरी पहिल्यांदा इंग्रजी शिकवा रे. तरी नशीब तिने "Wating" लिहिले. चुकुन a च्या ऐवजी e पडला असता तर पुण्यातल्या संस्कृतीरक्षकांनी आख्खा सिंहगड धुउन काढला असता.
या दुहेरी पात्यांवर ज्यांना आपली नावे कोरण्याचा विचार सुचला असेल त्यांना सलाम. पण बाबांनो जरा बरे अक्षर काढा. ती प्राची आहे ते कळाले पण तो नक्की कोण आहे? ते बेडकाने हागल्यासारखे जे काही लिहिले आहे ते माझ्या प्रेयसीने लिहिले असते तर मी ताबडतोब काडीमोड घेतला असता (लग्नाआधीच).
या मानवाचे त्याच्या मानसीवर जरा जास्तच प्रेम असावे बहुधा. एकदा लिहुन भागले नाही म्हणुन ३-३ दा लिहुन काढले उभे आडवे तिरपे जसे जमेल तसे त्या मानसीला कोरले आहे पठ्ठ्याने. नशीब एका पानात काम भागले नाहितर सिंहगडाचे नाव बदलुन मानसीगड ठेवायला लागले असते. त्याच्याबाजुच्या पानावर इ लोवे योउ कोरणार्या त्या म्हाभागाला जागेचा अंदाजच आला नाही. प्रेमाचा इकरार करुन झाल्यावर प्रेमवीरांचे नाव लिहायला जागाच न उरल्याने त्याचे (किंवा तिचे) प्रेम अजरामर होता होता थोडक्यात वाचले. सो सॅड ना?
अखिल सिंहगडावर सुवाच्य अक्षराचा पुरस्कार द्यायचा झाल्यास मी तो या जोडप्याला दिला असता. रोहन - नमिता. दोन्ही कसे स्पष्टपणे वाचता येते. ते दोघे (किमान लिहिणारा) डॉक्टर नाहित हे त्यांचे हस्ताक्षर दुनियेला ओरडुन ओरडुन सांगत आहे.
हा जो कोण असेल, बहुधा आदेश असावा. (इथे स्वतःचेच स्पेलिंग चुकवले माठाने) पण त्या आदेशची कल्पकता भावली आपल्याला. ----. हाण्ण तिच्यायला. जेव्हा कळेल तेव्हा लिहिन नाव तोपर्यंत आपली जागा तर अडवुन ठेवली. कदाचित काही गोंधळ असावा की नक्की कोणाचे नाव लिहावे. पण तेवढ्यासाठी इतिहासात अमर व्हायची संधी कोण चुकवणार? तर म्हणुन Adesh बदाम ----. जिसकी किस्मत मे होगा (थोडक्यात किस्मत खराब होगी) उसका नाम वहा लिखेगा.
इथे लेखकाची हुषारी बघा. तुषार - कजोल काय हजारोने आहेत. जितेंद्रने पण त्याच्या मुलाचे नाव तुषार ठेवले आहे आणि तनुजाने पण तिच्या मुलीचे नाव काजोल ठेवले आहे. किती ते कन्फ्युजन. कोण निस्तरणार नंतर? म्हणुन मग दोघा कुकुचकुंनी कंसात आपापली गोंडुश नावे पण लिहुन ठेवली. तो पिल्लु आणि ती बेबी. पिल्लु आणि बेबी वा. अजुन डायपरमधुन बाहेर नाही पडले हे पण नावे लिहुन ठेवायचा किती तो सोस. बालविवाह करायचा विचार असावा कदाचित. त्यातही ती बेबी हे ठीकच. पण तो पिल्लु? अंगावर काटा आला हो सर्रकन. विचार करा तुमची बायको किंवा प्रेयसी लाडाने तुम्हाला पिल्लु म्हणते आहे. पिल्लुल्लुल्लु. पिल्लु. मी त्या देवटाक्यात जीव दिला असता किंवा तानाजीने घोरपड चढवली ती जाग शोधुन काढुन खाली उडी मारली असती. असे असताना या महाभागाची हिंमत बघा. त्याने आधी ०३.१२.२०१४ ला स्वतःच्या उपनामाची कबुली दिली आणी वर पुढच्या बुधवारी येउन परत एकदा त्यावर मोहोर उमटवली. आशा करुयात की दुसर्या वारीत स्वतःची चुक उमजुन पिल्लुने ती घोरपडीची जागा शोधुन काढली असावी. आशा करायला वाव आहे कारण १० डिसेंबर नंतरची नोंद त्या पानावर सापडली नाही. बाकी त्या पानावरचे तीन बदाम बघुन मी तीन फुल्या शोधत होतो. सापडल्या नाहित. बेबी पुढच्या भेटीत करेल बहुधा. तेव्हा तिच्याबरोबर कदाचित बच्चु असेल.
हे त्रिकुट बघा आता. इसमे हिरो है, हिरोइन हय आणी व्हिलन भी हय. आधी निखिल आणि पी आले. मग त्यांनी स्वतःच्या इष्काचा यल्गार केला. निखिल ने पी वरचे प्रेम जगजाहीर केले (इथेही त्याने चलाखी केली आहे. फक्त पी लिहिले आहे. बरेच ऑप्शन ओपन ठेवलेत म्हणजे. प्राची, प्राजक्ता, प्रार्थना, पूजा, पल्लवी. घे तिच्यामायला. पायजेल ती असू देत.). पण इथे एक लव्ह ट्र्यांगल हाये. नंतर तो एके का कोण त्याने येउन पी पुढे स्वतःचा मालकी हक्क देखील बजावला आहे. आता तो मालकी हक्क पी वर बजावला आहे की निखिल वर देव जाणे? की तिघांनी आपापली नावे लिहुन ठेवली आणि यथावकाश निर्णय घेणार आहेत कुणास ठाउक. मी ती पी असतो तर त्या एकेला नक्की निवडला नसता. किती गचाळ अक्षर आहे.
हा एक कलंदर गडी बघा. काजल, पूनम, कोमल, श्वेता, सगळे ऑप्शन लिहुन काढले. एक फायनल झाली की बाकिच्यांची नावे कापता येतील. खाली तारीखही लिहिली आहे. ३०.०१.२०१५. बहुधा त्याने टार्गेट ठेवले असावे स्वतःसाठी. २ आठ्वड्यात (१४ फेब्रुवारी पर्यंत) नाव फायनल आणि मग १४ नोव्हेंबर पर्यंत ----. कळेलच ६ - ७ महिन्यात पुढची एंट्री पडली तर. तोपर्यंत स्टे ट्युन्ड.
ये उन हैवानो की दरिंदगी का सबसे मासूम शिकार. नाम है प्रीति. याच्याहुन छोट्या कॅक्टसवर उपकार केले होते आधुनिक वासु सपनांनी.
गडावरचा जवळपास प्रत्येक कॅक्टस असाच फुलला होता. असंख्य वेगवेगळ्या नावांची नक्षी आणि रेघोट्या. जगभरची नावे ओतली होती तिथे प्रेमवीरांनी.
या सगळ्याला वैतागुन कोणीतरी अस्सल पुणेकराने खालील मेसेज लिहिला असावा:
"येथे नावे लिहु नये नाहितर----". इथे बहुधा या बहाद्दुराला लिहायचे असावे "येथे नावे लिहु नये नाहितर कॅ़क्टस .........". प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार गाळलेल्या जागा भरुन घेणे. त्या नाहितरला घाबरुन असेल कदाचित पण तो बेंच या अत्याचारातुन बचावला.
नशीब त्या तानाजीने आणि शेलारमामांनी देह त्याग करुन शतके उलटली नाहितर आज त्यांनी परत एकदा प्राण ठेवला असता. काही नाही तर किमान शेलारमामांनी खालचा बॉर्ड वाचुन प्राणत्याग केला असता:
अर्रे का त्या शेलारमामांचे क्रेडिट काढुन घेताय? त्यांनी मारला ना त्या उदय भानु ला? तानाजी मालुसरेच्या समाधीवर, सिंहगडावरच त्या इतिहासाचे इतके जाहीर धिंडवडे?
असो. सिंहगडाची सध्या जी क्रुर चेष्टा चालु आहे ती बघता लवकरच गडाला भेट देउन या. सिंहगडाचा लव्करच लव्हर्स पॉइंट होणार बहुधा.
यातला हा जो कोण शेखर आहे आणि जी कोण "Wating for you Forever" तिला पहिल्यांदा कोणीतरी पहिल्यांदा इंग्रजी शिकवा रे. तरी नशीब तिने "Wating" लिहिले. चुकुन a च्या ऐवजी e पडला असता तर पुण्यातल्या संस्कृतीरक्षकांनी आख्खा सिंहगड धुउन काढला असता.
या दुहेरी पात्यांवर ज्यांना आपली नावे कोरण्याचा विचार सुचला असेल त्यांना सलाम. पण बाबांनो जरा बरे अक्षर काढा. ती प्राची आहे ते कळाले पण तो नक्की कोण आहे? ते बेडकाने हागल्यासारखे जे काही लिहिले आहे ते माझ्या प्रेयसीने लिहिले असते तर मी ताबडतोब काडीमोड घेतला असता (लग्नाआधीच).
या मानवाचे त्याच्या मानसीवर जरा जास्तच प्रेम असावे बहुधा. एकदा लिहुन भागले नाही म्हणुन ३-३ दा लिहुन काढले उभे आडवे तिरपे जसे जमेल तसे त्या मानसीला कोरले आहे पठ्ठ्याने. नशीब एका पानात काम भागले नाहितर सिंहगडाचे नाव बदलुन मानसीगड ठेवायला लागले असते. त्याच्याबाजुच्या पानावर इ लोवे योउ कोरणार्या त्या म्हाभागाला जागेचा अंदाजच आला नाही. प्रेमाचा इकरार करुन झाल्यावर प्रेमवीरांचे नाव लिहायला जागाच न उरल्याने त्याचे (किंवा तिचे) प्रेम अजरामर होता होता थोडक्यात वाचले. सो सॅड ना?
अखिल सिंहगडावर सुवाच्य अक्षराचा पुरस्कार द्यायचा झाल्यास मी तो या जोडप्याला दिला असता. रोहन - नमिता. दोन्ही कसे स्पष्टपणे वाचता येते. ते दोघे (किमान लिहिणारा) डॉक्टर नाहित हे त्यांचे हस्ताक्षर दुनियेला ओरडुन ओरडुन सांगत आहे.
हा जो कोण असेल, बहुधा आदेश असावा. (इथे स्वतःचेच स्पेलिंग चुकवले माठाने) पण त्या आदेशची कल्पकता भावली आपल्याला. ----. हाण्ण तिच्यायला. जेव्हा कळेल तेव्हा लिहिन नाव तोपर्यंत आपली जागा तर अडवुन ठेवली. कदाचित काही गोंधळ असावा की नक्की कोणाचे नाव लिहावे. पण तेवढ्यासाठी इतिहासात अमर व्हायची संधी कोण चुकवणार? तर म्हणुन Adesh बदाम ----. जिसकी किस्मत मे होगा (थोडक्यात किस्मत खराब होगी) उसका नाम वहा लिखेगा.
इथे लेखकाची हुषारी बघा. तुषार - कजोल काय हजारोने आहेत. जितेंद्रने पण त्याच्या मुलाचे नाव तुषार ठेवले आहे आणि तनुजाने पण तिच्या मुलीचे नाव काजोल ठेवले आहे. किती ते कन्फ्युजन. कोण निस्तरणार नंतर? म्हणुन मग दोघा कुकुचकुंनी कंसात आपापली गोंडुश नावे पण लिहुन ठेवली. तो पिल्लु आणि ती बेबी. पिल्लु आणि बेबी वा. अजुन डायपरमधुन बाहेर नाही पडले हे पण नावे लिहुन ठेवायचा किती तो सोस. बालविवाह करायचा विचार असावा कदाचित. त्यातही ती बेबी हे ठीकच. पण तो पिल्लु? अंगावर काटा आला हो सर्रकन. विचार करा तुमची बायको किंवा प्रेयसी लाडाने तुम्हाला पिल्लु म्हणते आहे. पिल्लुल्लुल्लु. पिल्लु. मी त्या देवटाक्यात जीव दिला असता किंवा तानाजीने घोरपड चढवली ती जाग शोधुन काढुन खाली उडी मारली असती. असे असताना या महाभागाची हिंमत बघा. त्याने आधी ०३.१२.२०१४ ला स्वतःच्या उपनामाची कबुली दिली आणी वर पुढच्या बुधवारी येउन परत एकदा त्यावर मोहोर उमटवली. आशा करुयात की दुसर्या वारीत स्वतःची चुक उमजुन पिल्लुने ती घोरपडीची जागा शोधुन काढली असावी. आशा करायला वाव आहे कारण १० डिसेंबर नंतरची नोंद त्या पानावर सापडली नाही. बाकी त्या पानावरचे तीन बदाम बघुन मी तीन फुल्या शोधत होतो. सापडल्या नाहित. बेबी पुढच्या भेटीत करेल बहुधा. तेव्हा तिच्याबरोबर कदाचित बच्चु असेल.
हे त्रिकुट बघा आता. इसमे हिरो है, हिरोइन हय आणी व्हिलन भी हय. आधी निखिल आणि पी आले. मग त्यांनी स्वतःच्या इष्काचा यल्गार केला. निखिल ने पी वरचे प्रेम जगजाहीर केले (इथेही त्याने चलाखी केली आहे. फक्त पी लिहिले आहे. बरेच ऑप्शन ओपन ठेवलेत म्हणजे. प्राची, प्राजक्ता, प्रार्थना, पूजा, पल्लवी. घे तिच्यामायला. पायजेल ती असू देत.). पण इथे एक लव्ह ट्र्यांगल हाये. नंतर तो एके का कोण त्याने येउन पी पुढे स्वतःचा मालकी हक्क देखील बजावला आहे. आता तो मालकी हक्क पी वर बजावला आहे की निखिल वर देव जाणे? की तिघांनी आपापली नावे लिहुन ठेवली आणि यथावकाश निर्णय घेणार आहेत कुणास ठाउक. मी ती पी असतो तर त्या एकेला नक्की निवडला नसता. किती गचाळ अक्षर आहे.
हा एक कलंदर गडी बघा. काजल, पूनम, कोमल, श्वेता, सगळे ऑप्शन लिहुन काढले. एक फायनल झाली की बाकिच्यांची नावे कापता येतील. खाली तारीखही लिहिली आहे. ३०.०१.२०१५. बहुधा त्याने टार्गेट ठेवले असावे स्वतःसाठी. २ आठ्वड्यात (१४ फेब्रुवारी पर्यंत) नाव फायनल आणि मग १४ नोव्हेंबर पर्यंत ----. कळेलच ६ - ७ महिन्यात पुढची एंट्री पडली तर. तोपर्यंत स्टे ट्युन्ड.
ये उन हैवानो की दरिंदगी का सबसे मासूम शिकार. नाम है प्रीति. याच्याहुन छोट्या कॅक्टसवर उपकार केले होते आधुनिक वासु सपनांनी.
गडावरचा जवळपास प्रत्येक कॅक्टस असाच फुलला होता. असंख्य वेगवेगळ्या नावांची नक्षी आणि रेघोट्या. जगभरची नावे ओतली होती तिथे प्रेमवीरांनी.
या सगळ्याला वैतागुन कोणीतरी अस्सल पुणेकराने खालील मेसेज लिहिला असावा:
अर्रे का त्या शेलारमामांचे क्रेडिट काढुन घेताय? त्यांनी मारला ना त्या उदय भानु ला? तानाजी मालुसरेच्या समाधीवर, सिंहगडावरच त्या इतिहासाचे इतके जाहीर धिंडवडे?
असो. सिंहगडाची सध्या जी क्रुर चेष्टा चालु आहे ती बघता लवकरच गडाला भेट देउन या. सिंहगडाचा लव्करच लव्हर्स पॉइंट होणार बहुधा. वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त लेख.
लैच घाण करुन ठेवतात !@#$%^.
पॅडलॉक्सचा पर्याय चांगला का हा सुद्धा वेगळा मुद्दा आहे!
आईग्ग! खरच की! प्यारभरा संदेश
हायला!! "प्यार" ने दिल पे मार
ही असली कुलपं लावून काय होतं?
नंतर कडी लावावी लागत नाही.
टु बी ऑन सेफर साईड कडी लावावी
मी तेच म्हणणार होतो. पण
कुठुन? =))
करत असतील आपापल्या आवड, निवड,
आजची बातमी
मी पण कुलूप लावले आहे
कधीच झालाय तो! तानाजीच्या
आपण बोलून लिहून शष्प फरक पडत
बेकार हसतोय! पिल्लु आणि बेबी
काहीही करतात लोक्स! धाग्याचा
बाकी प्रेमाची वाट काटेरी असते
मस्त लिहितोस तू. जरा नियमित
जरा नियमित लिहायचे मनावर घ्या
+१
हे सगळे पर्णालेख आधीपासून
अरेरे..
खंगरी लेख.
भन्नाट
बुंगाट निरिक्षण आणी
छान लेख
वाचताना डान्सींग कार आठवल्या
बच्चो की जान लेगा क्या बे...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व Why on earth is Narendra Modi going to Mongolia? Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li India’s foreign policy must continue to move past the parochial Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery gunsमस्त निरिक्षण!ऐतिहासिक
खतरनाक लिवलंय राव!!
इतिहासाचे हेही एक नवीन साधनच!
भन्नाट निरिक्षण शक्ती
भन्नाट लेख. :)
अरे!हा जबराट लेख वाचायचा
मस्त निरीक्षण...
=))
काय भन्नाट लिहिलंय. या महान
दगडावर, झाडांवर नावे लिहून