शेवट असा होईल असे वाटले नव्हते !!! :( वाईट वाटले वाचुन....
माणसाच मन त्याला स्वस्थ बसुन देत नाही हेच खरं !!!
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
सर्वसाधारणतः ह्या कथेचे विश्लेषण केल्यास,
भारतीय वृद्ध जोडप्यांची मुले सध्या अनिवासी भारतीय झाल्याने, त्यांच्या वृद्ध आईबापांच्या आत्महत्येस कारणीभूत झाली आहेत,
असे दिसून येईल.
आमच्या सोसायटीतील अनेक मुले-मुली अमेरिकेला निघून गेल्याने त्यांच्या म्हातार्यांची काळजी हल्ली आम्हाला घ्यावी लागते, हे आपल्याला माहितीच असेल.
-- सर्किट अभ्यंकर अथवा सर्किट चेंगट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
डीसक्लेमर
कथा मि.पा. वरील कोणत्याही वादाशी संबधित नाही. एक स्वतंत्र कलाकृती समजावी.
तब्बल आठवडाभरापूर्वी मी ही कथा रुपांतरित करणे सुरु केले होते; कोणत्याही वादापूर्वी :)
भिरभिर्या,
असे बरेचदा होते. कुठलेही वाद निर्माण होण्यापूर्वी अनेकदा, (मिसळपावावरील जुने लेखन पाहिल्यास, सुमारे ६ महिन्यांपूर्वी ह्या विषयावरील प्रतिसाद सापडतील, वाद नंतर निर्माण झाले) असे आपल्या डोक्यात राहते. आणि नंतर लिहिताना मेंदूतील झोपलेल्या पेशी कधी जागृत होतील ते काही सांगता येत नाही.
आनंदाची बाब अशी, की मी स्वतः अनिवासी भारतीय असूनही माझे आई-वडील आनंदित आहेत. हे महत्त्वाचे, नाही का ?
अरे हो, भाषांतर छान झाले आहे, हे लिहायचे विसरलोच.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
रुपांतर सुंदरच आहे.. चपखल शब्दप्रयोग! अभिनंदन
बाकी मुळ कथेतही मुलगा परदेशी जातो का मुंबईला? (नव्या देवदासात कसं मुंबईचं अमेरिका केलं आहे तसं ;))
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
आपट्यांचा मुलगा ( वरिजनल नाव राधाकांत) कुठे जातो याचा मुळ कथेत उल्लेख नाही. पण देशमुखांप्रमाणेच परदेशी जातो असे अभिप्रेत दिसते.
मुळ कथेत झोपेच्या गोळ्या प्रमाणाबाहेर खाऊन आपटे कसे मरतात याचे वर्णन आहे. मी ते अध्याहृत ठेवणे पसंत केले.
"सिरियल वा चेन सुसाईड" ( आत्महत्या शृखंला) हा पैलू मुळ कथेपेक्षा येथे जास्त अधोरेखित केलाय.
निदान एकदा तरी आपला विचार जुळला.म्हातारपणी रिकामे पेन्शनी आयुष्य जगण्यापेक्षा स्वःताला काहितरी कामात गुंतवुन घेणे चांगले. पण प्रत्येक माणसाची वृध्दापकाळी मनस्थिती कशी असेल हे काही सांगता येत नाही.
पंरतु ह्या आठवड्यात दोन म्हातारयाची तुलना कराविशी वाटते. एक म्हातारा धनगर (ऋषिकेश- दोन धनगर) व एक तुमचे आपटे .धनगर थकला असुन देखिल मनाने हिरवा आहे.पैसा नसुनही मनाने श्रीमंत आहे.९०वयाचा असुनही तरुण पोरांचा उत्साह त्यात ठासुन भरला आहे.त्या उलट आपटे व देशमुख व्यवहारी जगात खुप चांगले आयुष्य जगुन देखिल त्याना आपले म्हातारपन खायला उटले आहे.
दोन्ही लेख नीट वाचले तरी आपल्याला असे का घडले ह्याचे उत्तर नक्की मिळेल. जग झपाट्याने बदलत आहे. आज जगाचे वैश्विक खेड्यात रुपातंर झाले आहे व प्रत्येक घराचे रुपातंर एका मोठ्या अपार्टमेंट मध्ये झाले आहे.घरे जवळ आली पण माणसे दुर गेली आहेत.धनगर मुक्त निसर्गात राहिल्यामुळे त्याला कसे जगायचे व कुणासाठी हे नेमके ठाऊक आहे. पण सिंमेटच्या जंगलात राहणारयाना त्याचे घर एक तुंरुग झाला आहे.व त्यातुन सुटका म्हणजे फक्त मृत्यु हेच उत्तर वाटते.शेवटी प्रत्येक जण आपआपल्या प्रश्नाचे उत्तर आपआपल्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करतो. तेच त्याच्यासाठी सत्य असते.
कथा खुप छान आणि अंर्तमुख करायला लावणारी आहे. कथे बद्दल अभिरत तुम्हाला धन्यवाद.
वेताळ
धनगर मुक्त निसर्गात राहिल्यामुळे त्याला कसे जगायचे व कुणासाठी हे नेमके ठाऊक आहे. पण सिंमेटच्या जंगलात राहणारयाना त्याचे घर एक तुंरुग झाला आहे.व त्यातुन सुटका म्हणजे फक्त मृत्यु हेच उत्तर वाटते.शेवटी प्रत्येक जण आपआपल्या प्रश्नाचे उत्तर आपआपल्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करतो. तेच त्याच्यासाठी सत्य असते.
एकेका अक्षराशी सहमत !
इतकी भरभरुन व सुरेख प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार. अशी एखादी सुंदर प्रतिक्रिया लेखाच्या सौंदर्य दुणावते.
झटपट जगात थोडे मनाविरुद्ध झाले तर हताश निराश होण्याचे प्रमाण वाढलेय म्हणतात. सहनशीलता / सबुरी आज कधी नव्हती तितकी गरजेची आहे.
धनगर मुक्त निसर्गात राहिल्यामुळे त्याला कसे जगायचे व कुणासाठी हे नेमके ठाऊक आहे. पण सिंमेटच्या जंगलात राहणारयाना त्याचे घर एक तुंरुग झाला आहे.व त्यातुन सुटका म्हणजे फक्त मृत्यु हेच उत्तर वाटते.शेवटी प्रत्येक जण आपआपल्या प्रश्नाचे उत्तर आपआपल्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करतो. तेच त्याच्यासाठी सत्य असते.
वेताळभाऊ, अप्रतिम सांगड आणि मस्त प्रतिक्रिया! :)
अशी एखादी सुंदर प्रतिक्रिया लेखाच्या सौंदर्य दुणावते.
अभिरत,
आपण इतर भाषेतील उत्तम कथांचे छानसे भाषांतर इथे देत आहात हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
त्याबद्दल आपले अभिनंदन.
कथाबीज नकाराकडे झुकणारे असले तरि अंतर्मुख करणारे आहे.
भाषांतराबद्दल धन्यवाद.
अभिज्ञ.
एकतर अनुवाद अजिबात वाटला नाही.. आणि 'शेवट' अगदी रूतला .. :(
असा शेवट असायला नको होता.. पण कथा आहे त्यामुळे ठीके.. :)
तुम्ही भाषांतरही सुंदर केलंय.. गुंग होऊन वाचत होते मी..
http://bhagyashreee.blogspot.com/
आणि प्रभात रोडची बहूतेक म्हातारी मंडळी चालवतात तसा एखादा घरगुती क्लब चालवून पत्ते कुटत टायमपास करता आला असता ना राव! :)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
रुपांतरित कथा आहे हे सांगितलेस म्हणून खरे वाटले इतकी ती आपलीशी करुन टाकली आहेस! अभिनंदन!!
एकलेपणातून आलेले दु:सह जिणे ह्याला बर्याचप्रमाणात ती माणसेच कारणीभूत असतात असे माझे मत आहे. मुले दूरदेशी/गावी जाणे किंवा तिथेच असणे ह्याने फार मोठा फरक पडतो असे नाही.
वयापरत्वे येणारे म्हातारपण काही एकाएकी येत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी हळूहळू घटत जाणारी ताकद, रोडावत जाणारा जनसंपर्क, विरत जाणारे नातेसंबंध हे तुमच्या आर्थिक संपन्नतेवर मात करतात.
मनाचे सत्त्व संपुष्टात येणे ही मरणाकडे वाटचाल असते. मनाची शक्ती कशी टिकेल, आपण लोकांत कसे मिसळून राहू शकू, आपली मदत कशी होऊ शकेल, इतरांशी मनाने जमवून घेणे कसे साध्य होईल ह्याच विचार प्रत्येकाने प्रौढवयात का होईना करुन ठेवायला हवा. हट्टाग्रह, दुराग्रह कमी करणे. विनाकारण सल्ले देण्याचा स्वभाव कमी करणे इ. असो विषय मोठा आहे. एक लेखच होईल!
चतुरंग
प्रतिक्रिया
शेवट असा
रोचक
निशब्द॑....
शेवट
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
कथा आवडली.
....
नंदनशी
+१
अनिवासी भारतीयांचे अपयश
कथा
असे बरेचदा होते
याचमुळे
...
भिर भ-या
चटका बसला
वेगळीच कथा
सुंदर
ह्म्म
वा! अकृत्रिम रुपांतर!
छान.
सुन्न
कठिण!
कथा आवडली.
अभिरत राव छान
टाळ्या
सहमत
अभिनंदन.
मस्तच
.......
एकतर
धन्यु :)
या पाच
हो ना!
दुसरा भाग वाचला!