अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.
दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.
परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
वाचने
150353
प्रतिक्रिया
452
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्यक्तिशः मी २०१३ च्या
In reply to मेकिंग व्हर्चू ऑफ नेसेसिटी by क्लिंटन
पण त्यासाठी कृपया निष्पक्ष
खरतर दिल्लीत आप चे सरकार यावे
रिक्षावाला
हे दिल्लीतल्या रिक्षावाल्याने
In reply to रिक्षावाला by क्लिंटन
+१
In reply to हे दिल्लीतल्या रिक्षावाल्याने by डॉ सुहास म्हात्रे
किरण बेदी यांच्या प्रचारप्रमुखांचा राजीनामा
राजीनामा मागे पण घेतला
In reply to किरण बेदी यांच्या प्रचारप्रमुखांचा राजीनामा by कपिलमुनी
हो
In reply to राजीनामा मागे पण घेतला by क्लिंटन
नवे आरोप
सर्व वाचत आहे.. बरेच बोलायचे
उशिरा का होयीना एक प्रतिसाद माझाही.
ऐकावं ते नवलच!
>>> त्यांच्या विरोधात निकाल
In reply to ऐकावं ते नवलच! by खेडूत
तसे झाल्यास दुर्दैवी असेल
In reply to >>> त्यांच्या विरोधात निकाल by श्रीगुरुजी
इंदिरा गांधींनी सरकारी वाहने
In reply to तसे झाल्यास दुर्दैवी असेल by क्लिंटन
पुन्हा त्रिशंकु
माझं मतः
काहीही असो आपने भाजपच्या
दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये
माफ करा, इथे रिप्लाय करणार
In reply to दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये by क्लिंटन
जरा सत्य जाणून घेऊया.
In reply to माफ करा, इथे रिप्लाय करणार by नांदेडीअन
गुर्जी, खरं सांगु का? एवढं
In reply to जरा सत्य जाणून घेऊया. by श्रीगुरुजी
झोपलेल्याला जागे
In reply to गुर्जी, खरं सांगु का? एवढं by हाडक्या
आता कशी मिरची झोंबली?
In reply to माफ करा, इथे रिप्लाय करणार by नांदेडीअन
परत परत तेच तेच चालू आहे.
आआपला बहुमत मिळणार हे आता
In reply to परत परत तेच तेच चालू आहे. by असंका
वायले
In reply to आआपला बहुमत मिळणार हे आता by श्रीगुरुजी
एकेकाळी 'पार्टी विथ डीफरन्स
In reply to वायले by सुनील
जसे आता आआपवाले स्वच्छ
In reply to एकेकाळी 'पार्टी विथ डीफरन्स by दुश्यन्त
प्रधान सेवकांची दिल्ली
आमच्या उत्तम नगर भागात गेल्या
बादवे, या निवडणुकीत केजरीवाल
अहो गुरुजी चालायचंच
In reply to बादवे, या निवडणुकीत केजरीवाल by श्रीगुरुजी
दिल्लीच्या लोकल केबल
आप वाले म्हणतील ....
In reply to दिल्लीच्या लोकल केबल by नांदेडीअन
>>> दिल्लीच्या लोकल केबल
In reply to दिल्लीच्या लोकल केबल by नांदेडीअन
आणि
In reply to >>> दिल्लीच्या लोकल केबल by श्रीगुरुजी
माझ्या घरीसुद्धा काहीवेळा
In reply to आणि by नांदेडीअन
इतक्या लवकर बॅकफुटवर येत जाऊ
In reply to माझ्या घरीसुद्धा काहीवेळा by श्रीगुरुजी
तुम्ही काहीही समजूत करून
In reply to इतक्या लवकर बॅकफुटवर येत जाऊ by नांदेडीअन
गोत्राचा अपमान आणि नीच जात
In reply to तुम्ही काहीही समजूत करून by श्रीगुरुजी
ते बरोबर आहे हो. पण ही तुलना
In reply to गोत्राचा अपमान आणि नीच जात by कपिलमुनी
दोघे या बाबतीत
In reply to ते बरोबर आहे हो. पण ही तुलना by श्रीगुरुजी
त्यावेळी मोदी चुकले होते हे
In reply to दोघे या बाबतीत by कपिलमुनी
अरविंद केजरीवाल हे अत्यंत
सहमत आहे.
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
अगदी मनातले बोललात
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
१०. निवडणुकीतली हार-जीत
In reply to अगदी मनातले बोललात by क्लिंटन
http://www.misalpav.com/node
In reply to १०. निवडणुकीतली हार-जीत by चिनार
पर्फेक्ट
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
+१
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
सर्व रिप्लाय वाचले...
भाजपच्या या नवीन प्रवक्त्यावर
या डिबेटमध्ये एक गोष्ट पाहिली
In reply to भाजपच्या या नवीन प्रवक्त्यावर by नांदेडीअन
The Delhi Elections
My all team members in delhi
In reply to The Delhi Elections by नांदेडीअन
धन्य आहे. काटजूंचं आवाहन इथे
In reply to The Delhi Elections by नांदेडीअन
वाजपेयी
खूप फरक आहे
In reply to वाजपेयी by कपिलमुनी
वाजपेयी यांना सरकार सोडावे'च'
In reply to वाजपेयी by कपिलमुनी
:)
In reply to वाजपेयी by कपिलमुनी
सहमत. ती तुलना कायच्या काय
In reply to :) by क्लिंटन
सरकार
In reply to :) by क्लिंटन
दोन्ही केस पूर्णपणे वेगळ्या आहेत
In reply to सरकार by कपिलमुनी
>>> उद्या हे सत्तेवर आले आणि
In reply to दोन्ही केस पूर्णपणे वेगळ्या आहेत by क्लिंटन
>>> त्याचप्रमाणे केजरीवाल
In reply to सरकार by कपिलमुनी
काळा पैसा
(No subject)
In reply to काळा पैसा by आजानुकर्ण
राजकारण