Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367191
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

आंतरजातीय विवाहास विरोध करुन स्वजातीय जोडीदार पहायला लावणारा समाज आंतरलिंगीय विवाहास प्रोत्साहन का बरे देतो? का नाही स्वलिंगीय विवाह करत?? स्वगत- १००० साठी काडी पुरेल का ही.

In reply to by खमक्या

मी लिहितो आहे ती काडी नाहीये पण वस्तुस्थिती आहे मला सुटेबल वाटणार्या मुली जास्त करून ब्राम्हण जातीतल्याच मिळत होत्या मॅट्रिमोनी सायटींवर...पण त्यापैकी कोणीही जातीबाहेर लग्न करण्यास तयार नव्हते...कारण विचारले तर उत्तर "आई-बाबांना नाही चालणार"

In reply to by टवाळ कार्टा

तोच तर लोचा आहे राव. पहिला फिल्टर मुलीचे गुण हा लावण्याऐवजी जात/धर्म हा लावावा लागतोय. त्यातून ज्या उरतील त्यांच्यामधून निवडावी लागतेय.

In reply to by टवाळ कार्टा

जातीबाहेर लग्न करताना लोक अनेक कारणांनी पाय मागे घेतात. खाण्यापिण्यात आणि चालीरीतीमधे बदल, उच्चनीचतेची भावना, नातेवाईक स्वीकारतील का नाही याची शंका, अनेक गोष्टी असतात. त्याच्यापलीकडे विचार करणारे आणि जातीचा विचार न करणारे फार कमी. या लग्ने जुळवणार्‍या साईट्स आणि मंडळांच्या उल्लेखावरून परिस्थिती किती बदलली आहे याची जाणीव झाली. मी लग्न केलं त्या काळात प्रेमविवाह झाला नाही तर ओळखीच्या कोणा काका मामा, आत्या, मावशी तर्फे त्यांच्या नात्यातली किंवा ओळखीची स्थळे सांगून यायची. त्यामुळे स्थळाची थोडीफार तरी माहिती मिळायची. गंमत म्हणजे ज्याचं जिचं लग्न जमत नसेल त्यांच्यासाठीच फक्त मंडळाचा वगैरे विचार व्हायचा. एकप्रकारे नाव नोंदवणे हे कमीपणाचं मानलं जायचं. तेव्हा रोहिणी नावाचं मासिक अशा स्थळांच्या छोट्या जाहिरातींसाठीच स्पेशल होतं असं आठवतंय.

In reply to by पैसा

अरे पण शिकलेल्यांना काय धाड भरलीय...इतक्या मराठी संस्थळांवर लिहिणारे बाकी जगात हे बदलण्यासाठी काहिच करत नाहीत का?

८८८ :)

In reply to by टवाळ कार्टा

बाकी मी १०००, १००१ या प्रतिसादांच्या शर्यतीत नाहीये...हापिसात असणारै :( माझा नंबर मी ७००, ८५० आणि ८८८ वर लावला आहे :)

In reply to by टवाळ कार्टा

मंडळी, आता ९०० वा तरी आमाला मिळावा.. ८५० कडे डोले लवून बसलो होतो. हापिसातून घरी येस्तोवर ८६० दिसले. :( आता ९०० आमच्यासाठी राखून ठेवा. नाय तर पारावरचा मुंजा १००० शिवाय सोडणार नाय तुमाला..

पैलच स्थळ. मला एवढ़यात लग्न करायचच नाही म्हणून सांगितलं होतं. पत्रिका जुळली नहीं म्हणून क्यान्सल झालं. आता सांगताहेत की एकुलती १ मुलगी आहे, पुण्यात ५०००० पगार आहे, बाबाचे २ फ्लॅट आहेत कोल्हापुरात. पोरगी नाकी-डोळी निटस. विशेष म्हणजे त्यांना आवडला होता म्हणे मुलगा(फोटोतला). :D च्यायला नशीबच झंडू.. आता म्हणतोय कसली पत्रिका बघताय? हिच्च पोरगी पाहिजे आपल्याला. तर कोण तयार नाही. मी काय करू आता? मिपाकरांनो.. F१ F१

In reply to by हाडक्या

आणि हो, ठरलं की आमाला बॅचलर पार्टीला बोलवायला विसरु नका.. (लग्नाला नाय बोलवलं तरी चालेल.. )

In reply to by हाडक्या

आमाला बॅचलर पार्टीला बोलवायला विसरु नका.. (लग्नाला नाय बोलवलं तरी चालेल.. ) >>> अग्दी अग्दी...जोर्दार अणुमोदन ;)

In reply to by यसवायजी

पैलच स्थळ. मला एवढ़यात लग्न करायचच नाही म्हणून सांगितलं होतं. पत्रिका जुळली नहीं म्हणून क्यान्सल झालं.
लग्न करायचे नाही सांगितलेले अस्ताना पत्रिका बघितलीच कशाला? यावरून समजते की तुम्च्यात १ आदर्श नव्रा होण्याचे गुण आहेत ;) ब्वॉर बघितल्यावर जर जुळली अस्ती तर काय केले अस्ते? म्हणजे बाकी लिहिलेले डिटेल्स माहीत नस्ताना...
आता सांगताहेत की एकुलती १ मुलगी आहे, पुण्यात ५०००० पगार आहे, बाबाचे २ फ्लॅट आहेत कोल्हापुरात. पोरगी नाकी-डोळी निटस. विशेष म्हणजे त्यांना आवडला होता म्हणे मुलगा(फोटोतला).
आवडीनिवडी जुळतात की नाही ते महत्वाचे नाही??? आणि फोटोत नक्की तुम्हीच होता ना ;)
च्यायला नशीबच झंडू.. आता म्हणतोय कसली पत्रिका बघताय? हिच्च पोरगी पाहिजे आपल्याला. तर कोण तयार नाही. मी काय करू आता? मिपाकरांनो.. F१ F१
असेल हिम्मत तर लावा फोन त्या पार्टीला...थोडे गोड बोलून बघा अंदाज येतोय का...समोरची पार्टी तयार असेल तर घरच्यांसमोर सरळ सांगा "लग्न केले तर हिच्याशीच...हॉलमधे का मंदिरात ते तुम्ही ठरवा" आणि असे नसेल कर्ता येत तर ही गोष्ट मिपावर लिहिल्यावर मिपाकरांचे जे काही प्रतिसाद येतील ते वेंजॉय करा ;) - हा प्रतिसाद म.घे.न. = नावर घेका :)

In reply to by टवाळ कार्टा

@ लग्न करायचे नाही सांगितलेले अस्ताना पत्रिका बघितलीच कशाला >> अरे मी नको म्हणत असताना घरच्यांनी पत्रिका बघितली. आता म्हणे, एकदा पत्रिका बघून नाही म्हटलं की पुन्हा विचार करायचा नाही. पुढे वाईट अनुभव आले तर पत्रिकेमुळे आले असं वाटतं 'म्हणे'. :)) @ आवडीनिवडी जुळतात की नाही ते महत्वाचे नाही? >> एवढा सिरियस काहीच नाही बे मी. कसल्या आवडी निवडी? न भेटताच? बाकी, "विषय" वाचला असतास (थोड़ा हातभार १००० साठी) तर एवढ शिरेस घेतलं नसतंस.

In reply to by यसवायजी

पुढच्या वेळी पत्रिका बघणे लास्टला ठेवा ;) विषय वाचून आधी शिरेस प्रतिसाद द्यायचा...मग त्यात पाणी घालून पातळ करायचा =))

मुळात वधु वरांच्या अपेक्षा वेगळ्याच असतात, मुळ धाग्यात ज्या अपेक्षांवर चर्चेची अपेक्षा आहे त्या, वधु आणि वर या संबोधनाला प्राप्त होण्यासाठी असणा-या अपेक्षा आहेत. लग्न ठरण्याआधी मुलगी दाखवायची अन मुलगा पाहायचा अशीच व्यक्ती असते, एकदा का लग्न कुणाशी करायचं ठरलं की मग ते वधु आणि वर होतात. आता या शिक्षण - करियर - पैसा कमावणे आणि आपला संसार किंवा कुटुंब सुरु करणे या गोंधळात अडकलेल्या मुला मुलीच्या आपल्या भावी आयुष्याच्या बद्दल काही स्वप्नं असतात, काही मतं असतात. यापैकी स्वप्नं मनातुन आलेली असतात तर मतं ब-याचदा लाद्लेली असतात. लग्न ठरवण्यासाठीच्या भेटींमध्ये बोललं जाते ते बहुधा या मतांबद्द्द्लच, फार क्वचितवेळा स्वप्नांचा उच्चार होतो, अगदी प्रेम करणारे दोघं स्वताचं लग्न स्वत ठरवत असले तरी. प्रेम विवाहात, तथाकथित कोर्ट्शिपच्या काळात या स्वप्नांबद्दल कधीतरी विषय निघालेला असतो पण अ‍ॅरेंज्ड पद्धतीत तेवढा वेळ दिला जातोच असं नाही. अशा भेटींमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे साधारणपणे ' तुम्हांला / तुला काय वाटतं ? अशा प्रकारचे असतात. किंवा एक विशलिस्ट असते, आता विशलिस्ट मधला प्रत्येक मुद्दा पुर्ण झालाच पाहिजे असं नसतं, पण उद्या वेळ पडलीच तर वाद घालायला असावेत म्हणुन काही गोष्टी घुसडलेल्या असतात. तसंच या अपेक्षा वाढायला आपण किंवा आपली मागची एक पिढी देखील जबाबदार आहे, ते नाही का उपग्रह सोडणारी रॉकेट दोन- तीन टप्प्याची असतात, पहिला टप्पा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडायला , दुसरा वातावरणाच्या बाहेर पडायला, तिसरा जास्तीचा वेग घ्यायला आणी चवथा त्या उपग्रहाला त्याच्या स्थिर कक्षेत पोहोचवायला. आता एका पिढिनं आपल्या पुढल्या पिढिला जन्माला घालण्यापुर्वी एक दोन टप्पे पार केले होते, पण नंतर जेंव्हा या पुढच्या पिढिला पुढें सरकायची वेळ आली तेंव्हा त्यांनी पुन्हा पहिल्या टप्प्या पासुन सुरुवात करावी ही अपेक्षा चुक आहे ना. ती पिढी ज्या टप्प्यावर आहे तिथुन पुढचाच विचार करणार. घरं तर मुलाच्या बापानी घेउन ठेवली असतील ना, आता आपल्या साठी चारचाकी अन झालीच किंवा होउ दिलीच तर त्या पोरांच्या शिक्षणं / ऐशआरामाची सोय मुलगा करु शकतो का नाही याचीच काळजी मुलगी करणार, ती कशाला विचार करते हा पोरगा भाड्यानं घर घेउन राहु शकतो का / वेळेवर एसटी रेल्वेची रिझर्वेशन करु शकतो का काय याची ? बेंन्टेक्स्च्या बांगड्या न मंगळ्सुत्रं घालुन तिच्या आईनं कित्येक सण समारंभ मिरवुन पार नेलेलं असतात, ज्या मुलीचे ८वे -९वे वाढदिवस १ ग्रॅ. सोन्याचे दागिने नाहीतर मायक्रोकॅरेट च्या हि-याच्या पेडंट्नं होत असतील, किंवा जी पोरं १०-१२व्या वर्षीच सिंगापुर / दुबई फिरुन येत असतील, त्या पिढीतल्या मुला मुलींनी का अपेक्षा वाढवुन ठेवुन नयेत. ही चर्चा झाली भौतिक अपेक्षांबद्दल, पण वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे या अपेक्षा पुर्ण करुन / होउन सुरु झालेले संसार परस्परांच्य अवास्तव / अनपेक्षित / विक्षिप्त / अनैसर्गिक शरीरसुखाच्या अपेक्षा एकमेकांना न पेलवल्या गेल्यानं मोडकळीस येतात हे भयावह वास्तव होउ पाहात आहे.

In reply to by ५० फक्त

धाग्याचे शीर्षक 'उपवर मुला मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?' असे हवे होते हे तुम्हीच सर्वप्रथम लक्षात आणून दिले. ही सर्व चर्चा वाचणार्‍या उपवर मुला मुलींपैकी काहींनी आपल्या अपेक्षा वास्तविकतेच्या जवळ नेल्यास ते या महाचर्चेचे यश म्हणता येईल. मला अशी आशा आहे की असे कुणी मिपाकर असल्यास किंवा वाचनमात्र मिपाकर असल्यास सदस्यत्व घेऊन भविष्यात या धाग्यावर परत येऊन त्यांना या चर्चेचा लाभ कसा झाला याबाबत लिहितील.

In reply to by ५० फक्त

ही चर्चा झाली भौतिक अपेक्षांबद्दल, पण वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे या अपेक्षा पुर्ण करुन / होउन सुरु झालेले संसार परस्परांच्य अवास्तव / अनपेक्षित / विक्षिप्त / अनैसर्गिक शरीरसुखाच्या अपेक्षा एकमेकांना न पेलवल्या गेल्यानं मोडकळीस येतात हे भयावह वास्तव होउ पाहात आहे.
>>> ++++++++++++११११११११११११११११ हेचते- (गेल्या १५ वर्षातल्या..) बहुसंख्य घट्स्फोटांचं बीज! कारण तेच..,मागे उल्लेख केलेलं.. विवाहीत होताना.. जात्/शिक्षण/पैसा/(तथाकथित सामाजिक)प्रतिष्ठा... या निरर्थक गोष्टी(च) पहातात...आणि परस्परांच्या व्यक्तिमत्वांची अनुरूपता व प्रीती ह्या सहजीवनाला अत्यंत आवश्यक पाहाण्याच्या-गोष्टी पहात(च) नाहित. बेसिक मधे(च) खाल्ला मार्,की पुढे सगळ्यालाच लागणार 'खार'! (पत्रिकेच्या निमित्तानी (जातकांच्या..) घट्स्फोटीत केसेस ट्रेस केलेला..) आत्मू ! :)

In reply to by बॅटमॅन

टेन्शन म्हंजे आता १००० जवळ आलेत आणी सगळे थंड पडलेत. बाकी कोणीतरी म्हणाले की मायबोलीवर हजारी धागे येउन गेलेत म्हणून. बघायला पाहीजे. पण तेथील प्रतीसाद नक्कीच गोग्गोड असणार. इथल्यासारखे वर्मी घाव करणारे नसणार असे वाटतेय. कोणाला माहीत असल्यास माबोवरील हजारी धाग्याची लिन्क देईल काय?

म्हणजे शेवटी वधूवरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत ... परंतु सॉक्रेटीसच्या आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा नियम बघता पुढील २५ वर्षात गुणात्मक वाढ कशी आणि कुठे होईल ?? आणि वधुवधू आणि वरवर ह्या विवाहांच्या अपेक्षांचा विचार पुरेसा किंवा अजिबात झाला नाही ह्या चा निषेध ह्या ह्या ह्या

In reply to by अत्रन्गि पाउस

सॉक्रेटीसच्या आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा नियम
एकदम समीक्षकी कोट चढवलात की ओ =))

In reply to by बॅटमॅन

लग्नात वधुवरांचे आईवडिल आणि नातेवाईक आपली हौसमौज पुरवून घेतात असे ऐकले होते.... लग्नासंबंधीच्या धाग्यावर प्रतिसादक आपली हौसमौज पुरवून घेत आहेत हे पहात आहे +D

इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का? जातीला प्राधान्य देतात का? स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? किती मुलाना स्वयंपाक करता येतो? घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते? काय म्हणता?

In reply to by अजया

इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का? -हो. जातीला प्राधान्य देतात का? -हो. (कारण शिक्षणानंतर ही एक अशी गोष्ट असते जी भांडणं झाल्यावर लोक हिणवायला वापरतात! आधी कितीही जातीयवादी नसल्याचे गोडवे गायले तरी.) स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? -नंतर वितुष्ट येण्यापेक्षा आधी शिस्तीत बाजूला व्हावं!! नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? -केलं तर उत्तम!! बडेजाव म्हणून नाही पण शिक्षणनोकरी सांभाळून आम्ही दोघांनी (मी आणि भाऊ) सगळे सणवार अगदी रीतभातीसकट व्यवस्थित पार पाडले आहेत. मग ते पक्ष असो की नवरात्र!! अर्थात त्यात कोणाला खूश करायचा हेतू नव्हता. किती मुलाना स्वयंपाक करता येतो? -हल्ली बर्‍याच मुलांना करता येतो. मुलींना चहा ठेवता आला तरी फार झालं. घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते? काय म्हणता? -सगळं माहित आहे. (निदान मला तरी)

In reply to by सूड

हे सगळे प्रश्न, लग्न न झालेले पण लग्न करु इच्छिणारे आणि लग्न न करु इच्छिणारे अशा गटात विभागला गेला तर बरं होईल.. अकारण आणि उपद्रवी वाढलेल्या सोशल आणि नॉक सोशिक मिडियाचा हा अजुन एक दुष्परिणाम आहे, नवरा बायको किंवा बायकोचा मुर्खपणा, बायकोचा आक्रस्ताळीपणा, हटवादीपणा, पैशाची हाव आणि याला उत्तर / उतारा म्हणुन नव-याचा बाहेरख्यालीपणा, दारुडेपणा, खोटारडेपणा असा बेस असलेले, अर्थात याला काहीसा वास्तवाचा आधार असलेले विनोद चेपु / वाअ वा इतर मिडियावर पसरतात, आणि मग या आभासी जगाला सत्य मानुन चालणा-या या पिढिला आपल्या लग्नोपरांत वैयक्तिक सुरक्षेसाठी जास्ती काळजीपुर्वक राहावे असे वाटले तर त्यात गैर काय ? मुलांसाठी, ज्यांचं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पाय-यांपेकी पहिल्या दोन पाय-या स्वप्रमाणित करुन यशस्वीरीत्या चढुन झालेल्या आहेत, त्यांच्या तिस-या पायरीबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, ही पायरी सगळ्यात उंच आणि लांबीला देखील सगळ्यात जास्त आहे, इथं या छोट्या आयुष्याचा फार मोठा काळ घालवावा लागतो. हा दोन शरीरांच्या मिलनाचा खेळ आहे, असं जे समजलं जातं तसं नव्हतं, नाही आणि नसणार, अगदी एकरात्रसंबंधांचे पुरस्कर्ते देखिल या संबंधांच्या नंतर तयार होणा-या भावनिक / आर्थिक गुंतागुंतीतुन सुटु शकत नाहीत. ह्या तिस-या पायरीवरच पुढचं आयुष्य, पुढची पिढी, भावी समाज आणि मग देश वगैरे उभे राहतात, पाहता पाहता ही पायरी दोन शरीरांमधली वैयक्तिक बाब न राहता खुलेपणानं मान्य करुन किंवा दबक्या आवाजातल्या अमान्यतेसह एक कुटुंब, एक जात, एक धर्म उभा करत असते, आणि हे मान्य न करण्याचा फसवेपणा किंवा दुटप्पीपणाच बाकीच्या अवास्तव अपेक्षांना जन्म देतो. मुलींच्या बाबतीत पहिल्या थोडंसं वेगळं असतं, त्यांच्या करिता धर्माच्या दोन व्याख्या होतात एक लग्नपुर्व आणि एक लग्नपश्चात, अर्थ हा भाग पण दोन प्रकारे येतो, एक पैसा कमावणे किंवा त्यासाठी मदत करणे, आणि मिळणा-या पैशात घर चालवणे, मग येणारी मोठी तिसरी पायरी, जी या ना त्या कारणाने पहिल्या दोन पाय-यांचा भाग बनते आणि हे ओव्हरलॅपिंग असं होतं की पहिलीचा कोणता भाग तिसरी पायरी आहे आणि तिसरीचा किती भाग दुसरीला सावरतो आहे हे कधीच स्पष्ट होत नाही, आणि मग आठवते एक असंच सोशल मिडियानं प्रसिद्ध केलेलं वचन 'when in doubt, then fire all' आणि हे फायर ऑलच मग अपेक्षा वाढवायला कारणीभुत होतं, जसं महान पतिव्रता सावित्रीनं केलं होतंं, नुसता नवरा कशाला मागा जिवंत करुन त्यापेक्षा नवरा, पोरं, आजारी न पडणारे सासु सासरे, पैसा संपत्ती, सत्ता सगळं एकत्रच, आणि हल्ली तर सावित्रीच्या लेकी हा एक नविन शब्दप्रयोग रुढ केला गेला आहे, अर्थात याला संदर्भ मा. सावित्रीबाई फुलेंचा आहे आणि त्यांच्या बद्दल संपुर्ण आदर आहे याची दखल घ्यावी. ह्या तिस-या पायरीवरच पुढचं आयुष्य, पुढची पिढी, भावी समाज आणि मग देश वगैरे उभे राहतात, पाहता पाहता ही पायरी दोन शरीरांमधली वैयक्तिक बाब न राहता खुलेपणानं मान्य करुन किंवा दबक्या आवाजातल्या अमान्यतेसह एक कुटुंब, एक जात, एक धर्म उभा करत असते, आणि हे मान्य न करण्याचा फसवेपणा किंवा दुटप्पीपणाच बाकीच्या अवास्तव अपेक्षांना जन्म देतो.

In reply to by सूड

मुलींना चहा ठेवता आला तरी फार झालं. अर्रे चहा पिणे is so downmarket u know....आजकाल बरिस्ता / स्टारबक्स यांची चलती आहे

In reply to by पैसा

रोज नुसत्या कॉफीला २००/३०० घालायचे असतील तर ५०००० पगार कसा पुरेल?
हा विचार झाला असता तर कशाला हवं होतं!! आमच्या आधीच्या किंवा त्याही आधीच्या पीढीतल्या बायका अमुक एक पदार्थ बाहेर खाल्ला मग, बाहेर पैसे घालवण्यापेक्षा तो पदार्थ घरी कसा बनवता येईल असा विचार करायच्या. आता मान्य आहे तुम्ही बिझी असता पण वरणभात पण घरी बनवायला त्रासिक वाटत असेल तर काय म्हणावं!! सणावाराचा तर विचारच सोडून द्या!! निम्म्या जणींना अमुक एक पदार्थ कसा बनवायचा हे माहीत नसतं आणि ज्यांना माहीत असतं त्यांना 'कोण एवढा घाट घालणार' असा प्रश्न पडतो. 'आपल्या' माणसांसाठी 'आपण' काहीतरी बनवण्यात एक आनंद असतो तो फार थोड्या जणींना समजतो. उरलेल्या बाजारातून विकतची पाकिटं आणण्यावर समाधान मानतात!! मग अर्थातच अशा पोरींना अगदी कुबेर जरी शोधून दिला तरी त्याला शंख घेऊन दारोदार फिरायला लावतील. आता प्रश्न येईल मग मुलांनी शिकावं, हरकत काहीच नाही शिकायला स्वयंपाक!! ज्यांच्या नवर्‍यांना येतो स्वयंपाक त्यातल्या काही जणी नवर्‍याला घाण्याला जुंपून गाव कोळपत फिरायला कमी करणार नाहीत याचा काय भरवसा? अशा वेळी दोघांनी सांभाळयचं, दोघांचा संसार हे फक्त स्वत:ला कव्हर करायला वापरलं जातं. आणि आता मुलाला जर स्वयंपाक येतच असेल तर मग त्याने असली धोंड पदरात (पक्षी, सदर्‍यात) पाडून घेताना दोनदा विचार केला तर काहीच हरकत नाही!!

In reply to by अजया

इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का? जातीला प्राधान्य देतात का? स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? किती मुलाना स्वयंपाक करता येतो? घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते? काय म्हणता?
यासाठी माझ्यापुरती उत्तर्रे... इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का? मी बघत नाही आणि घरच्यांनासुध्धा बघू देत नाही...मुलीकडच्यांना बघायची असेल तर खुशाल बघूदेत जातीला प्राधान्य देतात का? मला शष्प फरक पडत नाही...आणि घरच्यांचे जे काही थोडेफार नखरे असतील ते कमी करण्याची कपॅसिटी आहे स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? गरज असेल तरच रहावे...शक्यतो एकाच बिल्डिंगमध्ये २ घरे असतील तर तो सुवर्णमध्य असेल नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? ऑफिसची कामे करून घरची कामे स्वतःच करावी हे मला पटत नाही...सरळ धु जमत असेल तर घरकाम/धुणीभांडी करायला बाई असावी...स्वयंपाक आला पाहीजे (अग्दी सुगरण नसेल तरी खाण्यालायक बनवण्याइतके) पण रोज केलाच पाहीजे असी अपेक्षा नाही सणवार करायला सुट्टी टाकायची आवश्यकता जवळजवळ नसतेच...पण जर सुट्टी नसेल तर घ्यावीशी वाटली तर घ्यावी...नाही घ्यावीशी वाटली/नसेल मिळत तरी हरकत नाही...आजच्या जॉब मार्केट्मध्ये सणवार करायला सुट्टी मिळेल की नाही ते बॉस/क्लाएंट नावाचा प्राणी ठरवतो किती मुलाना स्वयंपाक करता येतो? अगदी सग्ळा नाही तरी बॅचलर असताना जितके लागते ते बनवता येते :) घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते? मलाच डाऊट आहे मला सग्ळे माहीत आहे का...मुलीला माहीत नसेल तर हा तिचा दोष नाही....तिच्या आईवडलांचा दोष आहे (माझ्याघरी सगळे व्यवस्थित करतात पण मला काही गोष्टी अंधश्रध्धा या प्रकारातल्या वाटतात त्यामुळे मी करत नाही)

अजयाताई, अहं लग्नाळू अस्ति. घरचे पत्रिका बघून जुळत असेल तरच मुलगी पहायला आस्मादिकांना घेऊन जातात. मी विज्ञानाचा प्राध्यापक असूनही काही करू शकत नाही याचा खेद वाटतो. जातीला प्राधान्य देतात का? मी एक मस्त प्रस्ताव आणला होता. पण मुलगी परजातीतील असल्यामुळे प्रस्ताव धुडकावून लावण्यात आला आहे. स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? पिताश्री नोकरीतून निवृत्त होऊन शेती करताहेत. माझे नोकरीचे ठिकाण जवळ नसल्यामुळे स्वतंत्रच रहावे लागणार आहे. नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? नाही. किती मुलाना स्वयंपाक करता येतो? मला तरी नाही येत.

In reply to by खमक्या

मी एक मस्त प्रस्ताव आणला होता. पण मुलगी परजातीतील असल्यामुळे प्रस्ताव धुडकावून लावण्यात आला आहे.
मला व्यनी कर्ता का? ;)

नविन प्रश्न तयार झाले आता!! तुमच्या होणार्या जोडीदाराच्या निवडीत तुमचा रोल नक्की काय? एखाद्या अावडलेल्या प्रपोजलला फक्त जातीचा निकष लावणे किती योग्य?आई वडलांचा या सर्व प्रोसिजरमध्ये कितपत इंडल्जन्स हवा?

In reply to by अजया

तुमच्या होणार्या जोडीदाराच्या निवडीत तुमचा रोल नक्की काय?
सग्ळ्यात महत्वाचा...veto power
एखाद्या अावडलेल्या प्रपोजलला फक्त जातीचा निकष लावणे किती योग्य?
जातीमुळे शष्प फरक पडतो पण ही वस्तुस्थितीसुध्धा बघा
आई वडलांचा या सर्व प्रोसिजरमध्ये कितपत इंडल्जन्स हवा?
असायलाच हवा पण आधी स्वतःची पसंती मग आई-बाबांची पसंती बाकी गेले तेल लावत या क्रमाने

प्रामाणिक उत्तरं सूड,टका ,खमक्या *HAPPY* खरं तर यावर लग्न झालेल्यानी पण लिहायला हरकत नसावी,अापल्या तेव्हा काय अपेक्षा होत्या,त्यांचं पुढे काय झालं!!

In reply to by अजया

ओ तै...प्रामाणिक उत्तरं आज्काल कोणी अ‍ॅसेट मानत नाही...मुविंनी धाग्यात लिहिल्याप्रमाणे कमीत कमी ७५००० महिना पगार + स्वताचे घर + लग्नानंतर वेगळे रहायला सुट + गाडी असे असेल तर उत्तरे प्रामाणिक नस्ली तरी चाल्तात हे मी स्वानुभवावरुन सांग्तो

In reply to by टवाळ कार्टा

प्रामाणिकपणा हा ॲसेट तर नाहीच, उलट प्रामाणिकपणा म्हणजे भोळसटपणाचे लक्षण मानले जाऊ लागलेय. अजयाताई, माझे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत माझा रोल अगदीच शुन्य नाही हं. घरातल्यांनी शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींमधून वधू निवडण्याचे अधिकार दिलेत ना मला. आणि या अधिकाराचे वर्णन 'आम्ही अंतिम अधिकार तुला दिलाय' अशा शब्दांत केले जातेय. एखादी शॉर्टलिस्ट केलेली मुलगी नाकारण्याचा अधिकार आहे मला. पण बाकीच्यांनी शॉर्टलिस्ट न केलेली मुलगी शॉर्टलिस्ट करण्याचे अधिकार नाहीत मला. अजूनही आपल्या समाजात जात, भावकी इ. गोष्टी फार खोलवर रुजलेल्या आहेत. खुप पालकांना मुलाच्या प्रेमविवाहाला मान्यता द्यायची इच्छा असूनही समाज, भावकी यांच्या भीतीने ती देता येत नाही. याचा अनुभव घेतोय मी सध्या.

In reply to by खमक्या

प्रामाणिकपणा म्हणजे भोळसटपणाचे लक्षण मानले जाऊ लागलेय.
आणि तेसुध्धा मुलींकडून...त्यांच्या पालकांकडून नाही
माझे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत माझा रोल अगदीच शुन्य नाही हं. घरातल्यांनी शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींमधून वधू निवडण्याचे अधिकार दिलेत ना मला. आणि या अधिकाराचे वर्णन 'आम्ही अंतिम अधिकार तुला दिलाय' अशा शब्दांत केले जातेय. एखादी शॉर्टलिस्ट केलेली मुलगी नाकारण्याचा अधिकार आहे मला. पण बाकीच्यांनी शॉर्टलिस्ट न केलेली मुलगी शॉर्टलिस्ट करण्याचे अधिकार नाहीत मला
=)) घरात मेणबत्ती मोर्चा न्या एकट्याचा =))

In reply to by खमक्या

या आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या गोष्टीत तुम्ही तुमचा से नाही वापरणार तर कधी वापरणार?शेवटी निवड करायला चुकलो तर माझी चूक मी जवाबदारी घेईन असा अॅटिट्युड का नसावा,मुलाचा किंवा मुलीचा देखिल? आई वडिलांचा अादर राखणं आणि लग्नाच्या बाबतीत त्यांच्या अर्ध्या आज्ञेत राहुन स्वतःच्या मनाशी तडजोड करणं ,मग हळहळणं या दोन गोष्टी वेगळ्या करता नाही येणार का? का हा तुमचा डिफेन्स असतो होऊ दे त्यांच्या मनासारखं असा काही किंवा कटकटीपासुन पळून जाणे?

जमाना बदल गया है और वो भी! अाम्ही दोघांनी शुन्यापासून सुरुवात केली आणि सतरा वर्षात तावुन सुलाखुन निघत बरीच प्रगती केली जी करता करता एकमेकांचे बेस्ट फ्रेन्ड्स होऊन गेलो.आधीच सर्व रेडिमेड मिळालेल्या नात्यात हे दोघांनी काडी काडी जमवुन घरटं उभं करण्याची मजा,तिचा सार्थ अभिमान कसं येणार!

In reply to by अजया

आताच्या पिढीकडे वेळ नाहीये. आता लग्नाचं वयसुद्धा साधारण २५ च्या पुढे, मुलींसाठी तीस हेच खरं. आपण २२/२३ च्या वयात लग्न करून मोकळे होत होतो. त्यामुळे तेव्हा आपल्याजवळ काही नसायचं यात विशेष वाटत नव्हतं. मी लहान असताना तर घरात टीव्ही, फ्रीज, फोन काहीच नव्हतं. मोबाईल, लॅपटॉप गाड्या तर सोडूनच दे. त्यामुळे लग्न करून आयुष्याची सुरुवात करताना हातात काही नसलं तरी फिकीर वाटत नव्हती. आईवडिलांनी जसं काडी काडी करून घर उभं केलं तसंच आपल्याला करायचं आहे ही जाणीव होती. आता ५० फक्त म्हणाला तसं टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, गाडी इ. घरात असणं आवश्यक आहे त्याच्यापुढचं काय ते आपण मिळवायचं ही या पिढीची भावना असणार. त्यामुळे घरात "चमचे वाट्या" गोळा करत बसायला त्यांच्याकडे वेळ नसणारच. शिवाय ३० च्या पुढे संसार सुरू करायचा तर सगळं गोळा करायचं, मुलं वाढवायची यासाठी वेळ कमी उरतो. एकूणच दिवसाचे १२/१२ तास काम करणारं पब्लिक आजूबाजूला बघून मला थक्क व्हायला होतं. घर, बायको, मुलं यांच्यासाठी हे कुठून कसा वेळ काढणार कळत नाही.

In reply to by पैसा

अगदी अगदी ताई.वेळ नाही,घाई मात्र आहे.दुसर्यांशी स्पर्धा आहे.तडजोडीची तयारी नाही.आणि दोघांचीही वयाची तिशी येताना बर्याच बाबतीत मतं ठाम झाली आहेत. बावीसाव्या वर्षी लग्न केलं तेव्हा अपेक्षाच कमी होत्या.दोघांचाही आपापल्या डिग्रीवर विश्वास होता.दोघं मिळुन काहीतरी छान करु अशी उर्मी .हे मिळून एक एक माईलस्टोन गाठत जाणं, अजूनही हे मला आवडतं.तेच दोघांना एक करत जातं असं वाटतं.