मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाजपला मत देण्याअगोदर

सागरलहरी · · काथ्याकूट
भाजपला मत देण्याअगोदर या प्रश्नाची उत्तरे भाजपाने, त्यांच्या समर्थकांनी अथवा कोणीही द्यावीत ..?? वरील पैकी मी कोणीही या सदरात येतो व कोणीही उत्तरे दिल्यास हवीत म्हणून मी माझ्या अल्प बुद्धी प्रमाणे ती देत आहे. १) महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नावेच मते का मागता .. >> मोदी हे देशव्यापी नेतृत्व आहे. राज्य भाजपा ही अखिल भारतीय स्तरावरील पक्षाची शाखा आहे. न चालणारा माल दुसरीकडून कच्च्या ब्रांड खाली विकायला काढलेली स्वतंत्र सिस्टर कन्सर्न नव्हे. मग देशव्यापी नेता जो काही नवीन घडवू पहात आहे त्याच्याच नावाने मते मागायची ना ? २) लोकसभेत मोदींना बघून मत दिले, ते पंतप्रधान झाले, आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का ? >> मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत , ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत हे उघड आहे. तरी प्रश्न विचारावासा वाटतो कुणाकुणाला म्हणून हे उत्तर. ३) नसेल तर मग महाराष्ट्रात मोदीएवढा आश्वासक चेहरा कोण ..? >>> महाराष्ट्रात आज पर्यंत अखंड आश्वासक चेह-यांचीच परंपरा जणू आहे असे समजून हा प्रश्न विचारलेला दिसतो. या राज्याने बाबासाहेब भोसलेंसारखे मुख्यमंत्री पण पाहिले आहेत. तरीही सांगायचे तर प्रशासकीय कामकाज, विधीमंडळाचे कामकाज, समस्यांची जाण या निकषावर टिकणारी अनेक नावे आहेत - नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे ही काही उदाहरणे. निव्वळ आश्वासक चेहरा नव्हे तर आश्वासक धोरणे व नीती आणि ती अंमलात आणण्याची क्षमता देखील आवश्यक आहे. नुसते अग्रलेखातून शब्दांचे फवारे उडवण्यापेक्षा भविष्याची जाण , दीर्घकालीन धोरण, नियोजन आणि गव्हर्नन्स मध्ये सकारात्मक बदल याची आवश्यकता आहे. ती फक्त भाजपाच पूर्ण करु शकेल असे वाटते. ४) नसेल तर मग युती का तोडली.. ? >> क्र. तीन चे उत्तर आहे असे असल्यामुळे प्रश्न लागू नाही. तरीही . . . युती तोडली नाही चर्चा करण्यास पुरेशा वेळेअभावी तुटली. ५) राष्ट्रवादी - पवार साहेब , काॅग्रेस - पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना - उद्धव ठाकरे, मनसे - राज ठाकरे, तर मग भाजप - ?????? महाराष्ट्राचा चेहरा कुठे आहे. दोन डझन आयात नेते /उडते कावळे आता भाजप चालवणार का..? (कृपया मोदींना या मध्ये ओढू नये. ते केंद्रात उत्तम काम करताहेत) >>>> या ???? प्रश्नातच भाजप चे वेगळे पण आहे. दुस-यांच्या मांडीवर बसून मोठे होणारे नेते या पक्षात कमीच आहेत. पक्ष = व्यक्ती हा लोकशाहीचा जावई शोध नवाच आहे. मोदी केंद्रात उत्तम करत आहेत याचे दाखले मागण्याची वेळ अद्याप आली नाही. ६) सबब मी मोदींच्या नावे महाराष्ट्रात भाजपला मत का द्यायचे... ? >>> वर प्रश्नांची उत्तरे दिलीच आहेत. केंद्रात आणि राज्यात एक पक्ष सरकार असणे राज्याच्या फायद्याचे हे धोरण म्हणून मत द्यायचे. >>> घरात पोर अंगठा चोखत मोठे होऊ लागले की आपोआप ते पोर बालनेता, युवानेता, उद्याचे आशास्थान, आणि मग नेता होत जाते आणि कार्यकर्ते खपत रहातात. ही संस्कृती अपवाद वगळता सरसकट या पक्षात नाही म्हणून मत द्या. >>> घराणेशाही, घराणेशाहीच्या बोंबा मारत तीच घराणेशाही पाळण्याची पद्धात गल्ली ते दिल्ली पर्यंत या पक्षात सरसकट नाही म्हणून मत द्या. >>> मोदी केवळ स्वत:चांगले काम करत नाहीत तर सहका-यांनी पण तसे केले पाहिजे याचा आग्रह धरतात तसे करायला लावतात आणि हेच ते राज्यात भाजप सरकार आले तर करायला लावतील हि खात्री बाळगायला जागा आहे म्हणून मत द्या. >>> कावळे मावळे गद्दार तलवार असल्या शब्दांच्या फुलो-यात आणि सतराव्या शतकात वावरण्यापेक्षा प्रशासन, नियोजन, विकासकारण याचे भान आणि अनुभव इतरांच्या मानाने चांगला असलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा या पक्षात तुलनेने अधिक आहे म्हणून मत द्या. ७) उत्तरा शिवाय मत नाही..., कारण आम्ही आंधळे किंवा कळपातले प्राणी नाही. आम्ही छञपती शिवरायांचे मावळे आहोत.. >>> उत्तरावर विचार करालच, आंधळे तुम्ही नाहीतच, कळपातले नाही ना मग झुंडी मागे जाऊ नका. शिवरायांचे मावळे आहात ना मग शिवराय धोरणी होते, प्रशासक होते, आणि मी शहाजी राजेंचा मुलगा आहे म्हणून मला राजा करा असे त्यांनी न म्हणता ईश्वरी प्रेरणा म्हणून स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. दोन दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली एखादी पालिका वर्षानुवर्षे खड्ड्यांमध्ये आणि झोपड्यांमध्ये कशी रहाते , किल्लेदारच किल्ल्याची रसद खातो आहे काय याचा शोध सच्च्या मावळ्या प्रमाणे घ्या. -- एक सामान्य नागरिक

वाचने 30621 वाचनखूण प्रतिक्रिया 165

देवेंद्र फडणवीस हा मला बेभरवशाचा माणूस वाटतो. शिवसेना,मनसे विरोधी पक्ष असेल तर स्वतंत्र विदर्भ ते होवू देणार नाहीत हे नक्की. ते महाराष्ट्र नक्की पेटवतील जे नरेंद्रला महागात पडेल.

In reply to by होबासराव

विजुभाऊ Tue, 10/07/2014 - 19:18
होबासराव. भुमिकेचं बेअरिंग साम्भाळायचे म्हणजे असले बोलावेच लागते. त्या माईसाहेब, नानासाहेब आणि आणखी काही अशी बरीच पात्रे एकाच वेळेस भजवत असतात. हे ही कसब वाखाणण्याजोगेच आहे.

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी Tue, 10/07/2014 - 22:37
माईसाहेब, नानासाहेब हे आता जुने आयडी झाले. गेल्या २-३ दिवसांपासून त्यांचा अजून एक डुआय निवडणुकांच्या धाग्यांवर धुमाकूळ घालत फिरतोय. नाना/माईला प्रतिसाद दिला तरी त्यांच्याऐवजी हाच उत्तर देतोय. पूर्ण दुर्लक्ष केलं तरी लोचटासारखा पुन्हापुन्हा प्रतिसाद खरडतोय.

In reply to by श्रीगुरुजी

जे प्रतिसाद आपणास आवडत नाहीत त्या प्रतिसादकर्त्यांना डुप्लिकेट म्हणायचे,वैयक्तिक हल्ले करायचे....स्वतःची संकुचित विचारसरणी दुसर्याच्या गळी उतरवायला बघायची.. श्रीगुरुजी, मिसळपाव हे व्यासपीठ आहे.संघाचे शिबिर नव्हे.

In reply to by दुश्यन्त

ते खडसे,गडकरी,मुंडे कन्या ह्यांविषयी माहिती वाचली इंटरनेटवर. आपापल्या जिल्ह्यात हे लोक सम्राट आहेत,बर्यापैकी पैसे जमवून आहेत लेकाचे.एकेकाची दोन कॉलेजेस, दोन चार शाळा, एखादी सहकारी बॅन्क.. आणि काय काय...

दशानन Tue, 10/07/2014 - 22:21
मी काही नाही बोलत आहे, हे फ़ैज़साहेब बोलत आहेत.. आता यात तुम्हाला राज'कारण दिसले तर मी काही करू शकत नाही ;) नसीब आज़माने के दिन आ रहे हैं क़रीब उन के आने के दिन आ रहे हैं जो दिल से कहा है जो दिल से सुना है सब उनको सुनाने के दिन आ रहे हैं अभी से दिल-ओ-जाँ सर-ए-राह रख दो केः लुटने-लुटाने के दिन आ रहे हैं टपकने लगी उन निगाहों से मस्ती निगाहें चुराने के दिन आ रहे हैं सबा फिर हमें पूछती फिर रही है चमन को सजाने के दिन आ रहे हैं चलो ’फ़ैज़’ फिर से कहीं दिल लगायें सुना है ठिकाने के दिन आ रहे हैं -फ़ैज़ अहमद फ़ैज़

इरसाल Wed, 10/08/2014 - 10:38
दिलय ना जनतेने निवडुन.. मग आता हे बाकीचे पोकळ विरोध करुन स्वतःची ** उपटुन का लाल करुन घेत आहेत. ह्यांच्या इथे उपटण्याने मोदींना काय फरक पडणार आहे का ? माम्हमाला ;)

इरसाल Wed, 10/08/2014 - 16:30
मृत्युंजय हे विष्णुच्या, सुळ्यावर पृथ्वी तोलुन धरणार्‍या अवताराशी कमलजननीत मल्लयुद्ध खेळत असल्याचा "फील" येत आहे

रमताराम Wed, 10/08/2014 - 16:59
'भाजपाला मत देण्या अगोदर...' च्या पुढे 'मतदार यादीत आपली नावे आहेत का ते चेक करा' हा उत्तरार्ध कसा वाटतो?