मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे कुणा म्हणावे ...

मूकवाचक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना ज्याने हलाल केले, कित्येक काफिल्यांना तो भास मृगजळाचा, नजरेस पाहवेना जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना ती वाट मरूस्थळाची, मज कुठेच पोचवेना सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना (हरिहरन यांच्या 'गुलफाम' या संग्रहातील 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' या गझलचा स्वैर भावानुवाद)

वाचने 3651 वाचनखूण प्रतिक्रिया 23

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 22:14
>>>सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या >>>जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना खिक्क्क. भावानुवाद म्हणत लईच लिबर्टी घेतली की मुकेश सेठ. ;) आवडला.

आयुर्हित गुरुवार, 07/31/2014 - 22:36
वाह व्वा! क्या बात है!! खुप छान गज़ल आहे ही. 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' मला भावलेला सकारात्मक अर्थ असा आहे: येवु द्या हवा जरा, ह्लतील पाने जरा जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! थांबू नका मधेच, अत्याचार होता जरा, अजुन थोडेच दिवस होईल हा त्रास जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! ध्येय असे स्वतःहुन आपल्याजवळ येईल जरा, अरे मित्रांनो, काफिला तर चालु द्या जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! शहर असो कि गाव, आपल्याच घरात जरा, आपूलकीच संपली तर निघु या आता जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! जफर लिहि गज़ल, प्रत्येकाची भेट घेवू जरा, कोण कसे आहे, हे तरी कळु द्या हो जरा कोण'आयुर्हित'आहे, हे तरी कळु द्या हो जरा!

In reply to by आयुर्हित

आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल. व्हिडो दिसला नाहि तर इथे क्लिकावे @ मुकवाचक, आपण केलेला प्रयत्न भावला पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शिद Fri, 08/01/2014 - 15:15
आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल.
विडीयोत असलेल्या गाण्याच्या चालीवर आयुर्हीत साहेबांची कविता म्हणून पाहीली तर एकदम चाल जुळतेय. *lol*
@ मुकवाचक, आपण केलेला प्रयत्न भावला
+१...असेच म्हणतो.

मूळ ग़जल ऐकली. संपूर्ण वेगळी नज़ाकत आहे: कोई पत्ता हिले, हवा तो चले, कौन अपना है, ये पता तो चले । तू सितमसे ना खिंच हाथ अभी, और कुछ दिन, ये सिलसिला तो चले । मंज़िले खुद करीब आयेगी, ए अज़िज़ानों, काफ़िला तो चले । शहर हो, गांव हो, या घर अपना, आबोदाना ही उठ गया, तो चले । हर किसीसे मिला करो की ज़फर कौन कैसा है, कुछ पता तो चले । ___________________ किमान या ग़ज़लेचा उल्लेख न करता, काय लिहीलंय ते डकवलं असतं तरी ठीक होतं कारण कितीही स्वैर झालं तरी मूळ अर्थाला, इतका बेक्कार धक्का मारु नाही. आयुर्वेदाचार्यांनी त्यावर जो काय गोंधळ घातलायं तो म्हणजे, पुन्हा नवी मजा आहे. __________________ असो, सकाळी एक सुरेख चिज ऐकायला मिळाली त्याबद्दल आभार.

In reply to by स्पा

मूळातच हुकल्यावर काय जमणार?
शहर हो, गांव हो, या घर अपना, आबोदाना ही उठ गया, तो चले ।
हा त्या ग़ज़लेतला एक अत्यंत सुरेख शेर आहे. त्याचा अर्थ असायं : (कोणतही) शहर असो, की गाव, की आपलं स्वतःच घर; आता सगळीकडेच एक बेचैनी आहे. आब-ओ-दाना ही उठ गया, (म्हणजे, आता अन्न-पाणी सुद्धा मिळत नाही अशी बिकट परिस्थिती झाली) की चलू. दुसर्‍या अर्थानं आबो-दाना उठ जाना म्हणजे मृत्यू. सध्या अवस्था इतकी संभ्रमाची आहे, की कुठेही गेलं तरी तीच बेचैनी आहे. आता मृत्यू आलाकीच... निघू. कोई पत्ता हिले, हवा तो चले. कौन अपना है, ये पता तो चले । (या तप्त जीवनात) जरा थोडी वार्‍याची झुळूक येऊ दे. आशेची पानं डोलू देत. जिच्यामुळे या उदास आयुष्याला रंग येईल अशी ती आहे तरी कोण, याचा (मला जरा) पत्ता लागू दे!

नक्की नज़ाकत का आहे, ते पाहा :
तू सितमसे ना खिंच हाथ अभी, और कुछ दिन, ये सिलसिला तो चले ।
साधारणतः प्रियकरानं पहल करावी अशी रीत आहे. पण ज़फ़रचा अंदाज़े बयां बघा: तिचा हात तुझ्या हातात आहे पण इतक्यात तिला जवळ घेऊ नकोस, तो जुलूम होईल. हा अंतर राखून चालणारा प्रणयाचा सिलसिला अजून काही दिवस चालू दे. एकदा तीनं पहेल केली की मग आयुष्य उजळून निघेल! मग, कोई पत्ता हिलेगा, कोई हवा चलेगी आणि नक्की कोण आपलं आहे ते कळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

तु इतक्या कृरतेने, खेचू नको हाताला, अजुनी बरेच दिवस, हाताचे(च) काम आहे (डफर) पैजारबुवा,

In reply to by संजय क्षीरसागर

मूकवाचक Fri, 08/01/2014 - 23:22
संजयजींचं शैलीदार भाष्य आवडलं. तिचा हात हातात असताना, तिने पहल करण्याच्याचीच काय ती प्रतिक्षा असताना स्पष्टपणे अभिव्यक्त झालेला 'हर किसीसे मिला करो की ज़फर, कौन कैसा है कुछ पता तो चले' हा जफरचा दिलकश अंदाज म्हणा व्यावहारिक दृष्टीकोन म्हणा दाद देण्याजोगा वाटतो. :)

धन्या Fri, 08/01/2014 - 13:27
भावानुवाद आवडला. सुंदर आहे. मात्र संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. मुळची गझल आशावादी आहे तर तुमच्या गझलेत खिन्नतेचे, उदासिनतेचे सूर आहेत.

In reply to by धन्या

सुधीर Fri, 08/01/2014 - 21:50
संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. +१ संक्षींची उर्दू अनुवादाची हातोटी नक्कीच उत्तम आहे, (उचकटवून सांगितलं नसतं तर गझल कळलीच नसती) पण मूकवाचक आणि आयुर्हित यांचा भावानुवादाचा प्रयत्न चांगला आहे.