Skip to main content

नेहमी असंच का होतं ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 31/07/2014 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
१) आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ? २) आपण ट्रेन पकडायला जिथे उभे असतो त्यापेक्षा समोरच्याच फलाटावर गाड्या जास्त येतात? ३) आपण एखाद्या गोष्टीसाठी जीव काढून ठेवतो तरी ती होत नाही पण तीच कोणी दुसऱ्याने केली की सहज होते? ४) आपण एखाद्या कल्पनेला जितके घाबरतो आणि लांब ठेवायचा प्रयत्न करतो तेवढीच ती कल्पना आपल्या बोकांडी बसते ? ५) जगातल्या प्रत्येक माणसाला जरी लॉटरी लागली तरी त्यातही आपला नंबर शेवटचा का असतो ? ६) एखादी संकल्पना आपल्यापुढे कोणीतरी मांड्ल्यावर आणि ती आपल्याला बेहद्द आवडल्यावर ही आपल्याला सुद्धा सुचली असती असं का वाटतं ? ७) आपण मरमरून दूध आटवतो आणि मलई कोणीतरी दुसराच सोम्या गोम्या खाउन जातो? ८) आपण कॉलेजच्या दिवसात ज्या कुणा मुलाच्या/मुलीच्या एका नजरेसाठी तडफडायचो तीच /तोच पुढे कधीतरी अत्यंत सुमार दिसणाऱ्या माणसाशी लग्न झाल्या नंतर आपल्याला का दिसतो/दिसते ? ९) आपण अति विचार करणे आपल्या मनाला घातक आहे हे माहित असूनही पुन्हा पुन्हा आपण विचार का करतो? १०) हा प्रश्न खास मिपासाठी आणि मेम्ब्रांसाठी : इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?

वाचने 21508
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

यालाच जीवन ऐसे नाव.

>>इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते? ब्रह्माऽपि अंतं न गच्छति टाईप प्रश्न आहे हा!!

याला मर्फीज् लॉ असे म्हणतात.'s_law गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

(उपरोक्त लिंक मिसटाइप झाली.) याला मर्फीज् लॉ असे म्हणतात. गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.

हे भोट असल्याचे लक्षण आहे.

In reply to by तिमा

अर्ध्यावरती डाव सोडला …… नाडीपरीक्षण केलेत तर मात्र सुद्धा सुचवा की काहीतरी ह्यावर …

१०) हा प्रश्न खास मिपासाठी आणि मेम्ब्रांसाठी : इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?
You are not in the traffic, you are the traffic :-)

आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ? हे बर्‍याचदा अनुभवलेय... आता कोणालाही मदत करत नाही.

2.चे उत्तर- कारण आपल्या फलाटावर आलेली पहिली गाडी आपण पकडतो. मागून कितीही गाड्या आल्या तरी आपल्याला त्या मोजता येत नाहीत.

प्रश्न क्र १०..साठी. नुसती टोपी नाही उडवत तर टोपीचाही एक नी एक धागा काढतात. (स्वानुभव) *lol*