मी पाचवी किंवा सहावीला असताना म्हणजे साधारण ९३ - ९४ च्या आसपास दुरदर्शनवर "संघर्ष" नावाची मालिका लागत असे तिचे हे शिर्षकगीत...
आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा
मालिकेतलं काहीच आठवत नाही... पण हे गाणं मात्र या दोन ओळींच्या रुपाने मनात घर करुन राहीलं आहे...
खुप शोधलं हे गाणं जालावर पण नाही मिळालं...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा
झिजूनी स्वतः चंदनाने
दुसर्यास मधुगंध द्यावा..
हे जाणता जीवनाचा
प्रारंभ हा ओळखावा
आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा
खरचं खुप अर्थपूर्ण गाणं. या गाण्यातल्या प्रारंभ या शब्दाबाबत मला थोडा संशय आहे.प्रारंभ च्या एवजी प्रारब्ध शब्द तर नाही ना..!असो पण..
खुप दिवसांनी या गाण्यानिमित्ताने माझी गाण्याची जुनी डायरी मी बाहेर काढली..आणि चक्क गायले.वा मजा वाटली.
मलाही ही शीर्षक गीते फार आवडतात..:--
१)गोट्या: बीज अ॑कुरे अ॑कुरे
२)स॑स्कारः मना घडवी स॑स्कार
३)१०० मालिका (जबरदस्त संगीत)
४)हॅलो इन्सेक्टर..(ऍनट ने भन्नाट गायले आहे)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
सुरभीचा उल्लेख राहिलाच की! माझे खूप आवडत॑ टायटल होत॑ व आहेही. (मी त्याचा रिन्गटोनही केलाय) कोरस, एक धीरग॑भीर आवाज व पै॑जण, बासरी, गिटार, घटमने एकदम अचूक वातावरण निर्मिती साधली होती.
भारत एक खोज व चाणक्यची शीर्षकगीतेही सु॑दर होती.
माझ्याकडे सुरभी, चाणक्य, भारत एक खोज, ज॑गलबुक, मालगुडी डेज, ब्योमकेश बक्षी व गॉडफादरची शीर्षकगीते आहेत (कारण ती जालावर सहज उपलब्ध आहेत) बाकी कुणाकडे आहेत का?
लेख. आवडणार्या बर्याचशा शीर्षकगीतांचा उल्लेख वर डॉक्टरसाहेबांनी केलाच आहे. मराठी मालिकांतली ही काही आवडती -
१. महाश्वेता - भय इथले संपत नाही (ग्रेसच्या 'निष्पर्ण तरूंची राई' या कवितेचा काही भाग लताबाईंच्या आवाजात)
२. प्रपंच - माणूस होऊन जगणे थोडे जगून पहा, देवपणा तू सोडून खाली उतर जरा (कवी - सौमित्र)
३. नायक - कसं जगायचं, कसं वागायचं, कुणी सांगेल का मला...
बाकी श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेचं शीर्षकगीत छोटेखानी असलं, तरी मालिका आवडत असल्याने चालून जायचं :)
परमवीर : जो करी जिवाची होळी...
महान नाही पण त्या वेळी बरेच आवडलेले... मराठीमधला अगदी सुरुवातीचा डिटेक्टिव्ह म्हणून असेल कदाचित...
( आता वाटतं, हे मला आवडायचं?? काय काय वाटत असतं लहानपणी).
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
माझ्याकडे महाश्वेता,आभाळमाया,संघर्ष या मालिकांचे टायटल गीत आहेत. जीवनाचा अर्थ सांगणारी गाणी आजही ताजीतवानी आणि मनाला आनंद देऊन जातात. तुम्हाला बंदिनी मालिका आठवते..तिचं टायटल गीत-
बंदिनी स्त्री ही बंदिनी...
ह्यदयी पान्हा नयनी पानी
जन्मोजन्मीची कहाणी..बदिनी
रुप बहिणीची माया देई,वात्सल्यमूर्त आई होई
माहेर सोडून येई,सासरी सर्वस्व देई
ह्यदयी पान्हा नयनी पानी
जन्मोजन्मीची कहाणी..बदिनी
कधी सीता कधी होई कुंती,सावित्रीची दिव्यशक्ती
शकुंतला तुच होई,मीरा ही प्रीत व देवयानी
ह्यदयी पान्हा नयनी पानी
जन्मोजन्मीची कहाणी..बदिनी
युगे युगे भावनांचे धागे
जपावया मन तुझे जागे
बंधने...ही रेशमाची,सांभाळी प्रित मायेनी
ह्यदयी पान्हा नयनी पानी
जन्मोजन्मीची कहाणी..बंदिनी
दुर्दैवाने बंदिनीचं हे शीर्षकगीत मला कधीच आनंद देऊन गेलं नाही , ताजंतवानं तर नाहीच केलं या गाण्याने...
.. स्त्रिया बंदिनी आहेत आणि ही जन्मोजन्मीची कहाणी आहे, हे कौतुकाने सांगणारे हे गीत मला कायम लिंगभेद करणारं वाटत आलंय.....
या गीतातला माझा आक्षेप बंदिनी शब्दाला आहे...आणि जन्मोजन्मीच्या कहाणीला आहे...( बाकी सगळं ठीक)...
मला आश्चर्य हेच वाटतं की खरंतर स्त्रियांना हे गाणं अधिक त्रास देणारं वाटायला हवं तर त्यांना ते जास्त आवडतं...
असो, ज्याची त्याची आवड, हेच खरं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मला आश्चर्य हेच वाटतं की खरंतर स्त्रियांना हे गाणं अधिक त्रास देणारं वाटायला हवं तर त्यांना ते जास्त आवडतं...
अहो भडकमकरजी...गीताचा अर्थ बघा..इतकी माया लावूनही या पुरुषप्रधान संस्क्रुतीने तिला आजही बंदिस्त ठेवलं आहे.स्त्रीचं मोठेपण कळते या गीतातून..!आपलं दु:ख स्त्री उघडपणे कुणाला सांगू शकत नाही.त्यामुळे या गीताद्वारे ती आपल्या मनातल्या वेदना जणू व्यक्त करते.असा भाव या गीताचा असल्याने हे गीत स्त्रियांना जास्त आवडते.
स्त्रीचं मोठेपण कळते या गीतातून..!आपलं दु:ख स्त्री उघडपणे कुणाला सांगू शकत नाही.त्यामुळे या गीताद्वारे ती आपल्या मनातल्या वेदना जणू व्यक्त करते.असा भाव या गीताचा असल्याने हे गीत स्त्रियांना जास्त आवडते.
मी भडकमकर मास्तरांशी सहमत आहे. या गाण्याचे कवी/कवयित्री कोण आहेत माहित नाही, पण ऐकताना असं वाटतं मोठेपणा द्यायचा आणि बंदिस्त करून ठेवायचं स्त्रिला, मग बंदिस्त केलं असेल तर पिंजरा काय आणि देऊळ काय, सारखंच!
अदिती
मग बंदिस्त केलं असेल तर पिंजरा काय आणि देऊळ काय, सारखंच!
छान वाक्य आहे....सहमत...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
स्त्रीचं मोठेपण कळते या गीतातून..!आपलं दु:ख स्त्री उघडपणे कुणाला सांगू शकत नाही.त्यामुळे या गीताद्वारे ती आपल्या मनातल्या वेदना जणू व्यक्त करते.
हे सगळं मान्य...
पण तिनं जन्मोजन्मी याच वेदना सहन कराव्यात असं कवीचं / कवयित्रीचं म्हणणं आहे असंही वाटतं, त्याचं काय?...
... या गाण्यात काही पॉझिटिव्ह निघेल असं वाटेपर्यंत पुन्हा जन्मोजन्मीची कहाणी म्हणून बदलाचे दरवाजे बंद केलेत असं वाटतं...
पॉझिटिव्ह म्हणजे निदान या अन्यायाविरुद्ध कोणीतरी स्त्री लढली, जन्मोजन्मीची कहाणी बदलायचा तिने काहीतरी प्रयत्न केला अशा अर्थाचे शब्द काहीतरी असते तर आधीच्या ओळींना अधिक अर्थ आला असता... शिवाय या कथासुद्धा माझ्या आठवणीप्रमाणे अत्यंत निगेटिव्ह शेवटाच्याच असत...
नाहीतर केवळ स्त्री प्रेक्षकांच्या अश्रूपातावर पैसे कमावणार्या सिनेमांमध्ये आणि या मालिकेत काहीच फरक नव्हता...
अर्थ समजून घेतला तरी बंदिनी शब्दाचे वृथा कौतुक का हे कळत नाही .......
काहींना आत्मपीडेत कौतुक वाटते असे असेल कदाचित ....
( विशेषतः जालावर खुट्ट होताच स्त्रियांच्या आत्मसन्मानाला ठेच लागत असते , इथंतर धडधडीत बंदिस्त असण्याचे कौतुक केले गेले आहे , तरी गाणं आवडतंच...आश्चर्य याचंच वाटतं..)...
.. बाकी ज्याची त्याची आवड, असं पुन्हा म्हणतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
स्वामी... जो जनतेचे...
आणि द्विधाता मालिका १९९० ... विक्रम गोखले डबल रोल ... छान टायटल ट्रॅक होता...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आणि द्विधाता मालिका १९९० ... विक्रम गोखले डबल रोल ...
विक्रम गोखलेंचीच दुहेरी भूमिका असलेली मालिका होती 'प्रतिबिंब'.
त्याचे शीर्षक गीत आवडायचे मला. 'बिंबातून प्रतिबिंब जन्मले, प्रतिबिंबित हे बिंब जाहले.'
नावाची एक मालिका (बहुतेक डीडी मेट्रोवर) लागायची. तिच्या शीर्षकगीतातलं वेगवेगळ्या सुरांत म्हटलेलं 'अहो, ऐकलंत का?' एवढंच आता लक्षात आहे. 'चाळ नावाची वाचाळ वस्ती'चे शीर्षकगीतही आता आठवत नाही. कुणाला आठवतंय का?
नाजूका नावाची एक मालिका असे.. त्याचे गीत..
माझ्या जन्माची चित्तरकथा.... असे होते.. पुढचे आठवत नाही... पण तेव्हा तो चित्तरकथा हा शब्द मी प्रथमच ऐकला होता :)
आणि नाजूका परिक्षेला शहरात येते तो परिक्षेचा भाग माझ्या शाळेत चित्रित केला होता.. ते आठवते.. ती शाळेतल्या मोठ्या खांबांकडे पाहून ते किती मोठे आहेत असे काही म्हणते असे आठावते..पण ते खांब खरेच इतके मोठे आहेत हे मला तेव्हाचा जाणवले...
--लिखाळ.
सर्वात प्रथम वादरहीत विषय चर्चेला आणल्याबद्दल अभिनंदन व वाढदिवसाच्या (झालेल्या व येणा-या) शुभेच्छा!!!
भारत एक खोज चे शीर्षक गीत जे ऋग्वेदातील नासदीय सुक्तावर आधारीत आहे ते आवडते. ते लिखित स्वरुपात माझ्या खव च्या स्वागत परिच्छेदात आहे.
मलाही ह्या मालिका व त्यांची शीर्षक गीते फार आवडतात अजूनही..:--
१)हॅलो इन्सेक्टर
२) राऊ
३)एक शुन्य शुन्य
४)फ्लॉप शो
५)सर्कस
६)सुरभि
७)श्रीयुत गंगाधर टिपरे
८)गोट्या
आणी बर्याच........... (कॄपया आपण ज्या ज्या मालिकांचे शीर्षक गीते इटंरनेटवर उपलब्ध त्याचा दुवा द्यावा)
जुनं ते सोनं मानणारा आधुनिक घासू
दर्याखोर्यात फुलते तू ग रानजाई
रामायण
विक्रम-विक्रम वेताळ -वेताळ
ज॑गल ज॑गल बात चली है
फ्लॊप शो
दादा-दादी की कहाणी
सुरभी
वरील कार्यक्रम आठवणीने पाहत असायचो, चांगल्या आठवणी चाळवल्या आज !!!
(नगरपालिकेतल्या टीव्हीवर, मित्राच्या घरी रंगीत टीव्हीवर कोणताही कार्यक्रम पाहायला आवडायचा )
लतादिदींच्या आवाजात स्वयंसिद्धा चे ...
एक दफा तो अपना जीवन, मुझको खुद ही बोने दो
लिख ले ने दो अपनी किस्मत , होना हैं जो होने दो
________________________________________
आशाताईंच्या आवाजात रथचक्र चे ...
... एक रोज अचानक धरती में , जीवन के रथ का चक्र धसा
________________________________________
...आणि शाळेत असताना अत्यंत आवडते ...
चिमणराव अन गुंड्याभाऊ
राघु मैना सोबत काऊ
खळखळून हसवायाला...
आला रे आला, चिमण आला
भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते...
ही सुरेश भटांची कविता .. महाश्वेता.. या मालिकेचं शिर्षक गीत होतं.
वादळवाट या मालिकेचं शिर्षक गीतही मला खूप आवडतं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते...
ही सुरेश भटांची कविता .. महाश्वेता..
ही कविता ग्रेस यांची ना?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
'कुछ खोया कुछ पाया' अशी एक हिंदी सिरीयल होती...(बहुतेक 'पडघवली' नामक कादंबरीवर आधारीत) शीर्षकगीत छान होतं. लताबाईंच्या आवाजात.
(शब्द चू.भू.द्या. घ्या)
यादों के धुंदले दर्पन में
बीते हर एक पल की छाया है
हर मोड पे मैनें जीवन के
कुछ खोया है कुछ पाया है
मस्त धागा आहे. यानिमित्ताने जुन्या आठवणी उगाळल्या जातायत.
'श्वेतांबरा' नावाची पण एक सिरीयल होती...पण त्याचं शीर्षकगीत कसं होतं आठवत नाही...
नवीन मालिकांपैकी 'मानसी तुमच्या घरी'चं देवकी पंडीत यांच्या आवाजातलं शीर्षकगीत खासच आहे. (मी झीमराठी वरुन डाऊनलोड केलं)
'कशी वेल्हाळ वेल्हाळ
त्यांना हवीशी हवीशी
सार्या सख्यासजणींचे
मन मानसी मानसी'
:)
-वर्षा
माझी आवडती भरपूर गीते वर येऊन गेली आहेतच.
संस्कार, जंगल बुक, गोट्या,ऍलिस इन वन्डरलॅन्ड, आभाळमाया, मु॑गेरीलाल के हसीन सपने, हॅलो इन्स्पेक्टर,नायक
इन्कार पण ही मालिका आधीच्या 'चुनौती'व 'सुबह' एवढी चालली नाही.
मेरे यारों,मेरे प्यारो, ...... (ह्या ओळी आठवत नाहीत)
गलत जो राहें, तुमको बुलाए, कर दो तुम इन्कार.
असे पाहुणे येती
असे पाहुणे.. असे पाहुणे.. असे पाहुणे येती...
आणखी एक हिंदी मालिका होती, दाने अनार के
त्याचेही शीर्षकगीत तेव्हा आवडायचे.
किस्सा है कहानी है पहेली है,जिंदगी ये __ की सहेली है
एक दो तीन चार
एक दो तीन चार.. चारो मिल के साथ चलें तो कर दे चमत्कार.
अशीच एक मालिका आली होती, सुपर सिक्स . त्याचे ही शीर्षक गीत तेव्हा आवडायचे.
लेखू, मोहन गोखलेंची मालिका. ह्याचे ही शीर्षक गीत चांगले होते. आता नीट आठवत नाही पण एक हिंदी सिनेमा 'टिंकू' ह्यातील 'टिंकू खो गया' गाण्याचीच चाल होती ती.
गुणीराम भई गुणीराम आ पहुंचे बंबई धाम.
मि. योगी, मि. योगी....
नुक्कड...बडे शहर की एक गली में बसा हुआ है नुक्कड. नुक्कड के सारे वासी है तकदीरों से फक्कड........
अरेच्च्या, लहानपणीच्या बहुतेक सर्वच मालिकांची यादी येईल बहुधा येथे ;) तेव्हा बहुतेक सगळेच आवडायचे :D
'स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट' या मालिकेच्या शेवटी लागणारे गीत/धुन (कारण त्यात शब्द नाहीयेत). ही धुन ए.आर. रेहमानने बनवली आहे. लैच्च भारी!!
ती धुन इथे ऐकता येईल.
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
बंदिनी या गीताचे गीतकार शांताराम नांदगावकर.
सध्याच्या मालिकांपैकी अवघाची संसार याचे शिर्षक गीत
मन माझे मोरपिषी स्वप्न जणु.........
मन माझे शिशिरातील इंद्रधनु ..............
हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज...........
नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश.....
राखेतुन मीच नवा घेतला आकार..........
उधळुन जाइ पुन्हा अवघाची हा संसार...........
तसेच जगावेगाळी या मालिकेचे शिर्षक गीत
सुखाचा तिचा गोड संसार होता
कुणाची कशी दृष्ट त्या लागली?
जळी सोडलेले दिवे दुर गेले
तरी सर्व नाती तिने सांधली
जगावेगळी...........
जरी संकटे पावलो -पावली
उभारी परि ना तिची भंगली
उन्हे सोसुनी दे जगा साऊली
जगावेगळी..............
अप्रतिम आहेत.
"अनामिका"
टिपू सुल्तानचा टायटल ट्रॅक मस्त होता... माझ्या आठवणीप्रमाणे नौशाद यांनी केला होता...
अवांतर : (मात्र मालिकेत महाराष्ट्रातले सैन्य शत्रुपक्षातले असायचे याचा वैताग येत असे... आणि तो द्राक्षं खात बोलणारा राजा... त्या नटाचं नाव होतं पप्पू पॉलिस्टर)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
ई टीव्ही वर यायची ही मालीका कदाचीत आताही येत असेल .त्याचे शिर्षक गीत मला खुप आवडायचे
ह्या गोजीरवाण्या घरात सारे अपुल्या मर्जीचे राजे
ह्या गोजीरवाण्या घरात सारे अपुल्या मर्जीचे राजे
कशी जपावी कुणा कळेणा ही रक्ताची नाती
माणुसकी अन परंपरा ही सारे विसरुण जाती
एका छायेखाली बघा कश्या नांदती
ह्या जुण्या नव्या संस्क्रुती
ह्या गोजीरवाण्या घरात सारे अपुल्या मर्जीचे राजे
ह्या गोजीरवाण्या घरात सारे अपुल्या मर्जीचे राजे
---नि३.
वर सांगितलेल्या गाण्यांपैकी बरीचशी गाणी आवडणारी आहेत.
पण मला त्यापैकी सगळ्यात जास्त आवडणारे म्हणजे आभाळामाया..
देवकीताई पंडीत यांच्या आवाजातलं हे गाणं काही वेगळीच छाप टाकत.
मी ती मालिका कधी जास्त पाहिली नाही पण ते गाणं मात्र आवर्जून ऐकायचो.
जडतो तो जीव, लागते ती आस
बुडतो तो सूर्य, उरे तो आभास
कळे तोच अर्थ, उरे तोच रंग
ढळतो तो अश्रु , सुटतो तो संग
दाटते ती माया, सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव, ते तर आभाळ
घननीळा डोह, अतिगुढ माया,
आभाळ माया.... आभाळ माया.... ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
नाही. टिपू सुलतानचे टायटल व पार्श्वस॑गीत नौशादमिया॑चेच होते. अप्रतिम होते (सिरियलचा विषय नालायक टिपूला स्वात॑त्र्ययोद्धा दाखविणारा असला तरी)
खय्यामसाहेबा॑नी त्यान॑तर आलेल्या अकबर दि ग्रेट ला स॑गीत दिले होते.
मला आवडणारी शिर्षक गीते-
गोट्या- बीज अंकुरे अंकुरे
सुरभी
जंगल बुक-जंगल जंगल बात चली है
तहकीकात
आमची माती आमची माणसं :)
टेल स्पीन
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
प्रतिक्रिया
आनंद या जीवनाचा...
अप्रतिम गाणं
साळसूद
साळसूद
मलाही ही
१०० मालिका (जबरदस्त संगीत)
अविस्मरणीय सुरभी
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नायक
>
परमवीर :
जीवनाचा अर्थ सांगणारी गाणी
ताजीतवानी आणि मनाला आनंद
स्त्रीचं मोठेपण कळते या गीतातून
स्त्रीचं
१०१% सहमत
मग बंदिस्त
स्त्रीचं
अवांतर
स्वामी... जो
आणि
अहो, ऐकलंत का?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लडकी है एक
चुनौति आणि सुबह
समंदर नावाची पण मालिका लागायची एक..
चुनौती आणि सुबह -- अजून १
नाजूका
फ्लॉप शो
सर्वात
मलाही ह्या
अवन्तिका
रानजाई
लतादिदी ...
भय इथले
भय इथले
होय...
कुछ खोया कुछ पाया
माझे काही....
स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट
तुमचे लाख
बंदिनी
शीर्षक धून
टिपू सुल्तानचा टायटल ट्रॅक मस्त
एक तितली..अनेक तितलिया..
पडघवली...
ह्या गोजीरवाण्या घरात..
आभाळामाया...
मला वाटतं
नाही. टिपू
मला