मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिपिका

mohite jeevan · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
'मी तुझी होऊ शकत नाही,' 'का?,' 'ते तु ऐकु शकणार नाहीस?,' 'का?सांग ना का?,' 'कारण......कारण......मी..... नाही ते शक्य नाही,' 'दिपिका' रोजच्याप्रमाणे उमेश आपल्या गाडीवरुन जात होता,नेहमीप्रमाणे त्याने रोडच्या काँर्नरवर दिपिका त्याची वाट पाहत आसलेली दिसली,व त्याच्या चेहर्यावर एक स्मित हास्य झळकले,त्याचप्रमाणे दिपिकाही केसावरुन हात फिरवित त्याला पाहत पुढे सरकली, 'चल लवकर बस आज बाँसशी मिटींग आहे,'उमेश तिच्या जवळ येताच म्हणाला, 'हो रे पण तु कायमच लेट येतोस त्याचं काय?,'दिपिका गाडीवर बसत म्हणाली, 'साँरी,साँरी,' आसे नेहमीप्रमाणे म्हणत त्याने चटकण गाडीची किक मारली व गाडीचा गेर पडताच गाडी भरधाव वेगाने पुढे गेली. आज ही तो क्षण मला आहे तसा आठवतो,नेहमेची त्याची ती गडबड,वेळेत न आल्याने माझ्यावर दोष देत बसणे,आणि पुन्हा साँरी म्हणत तो आपलेसे करीत आसे,आसे कितीतरी क्षण मला आठवतात जेव्हा त्याच्याशी माझी मैत्री झाली.मला तो केव्हा पासुन आवडु लागला माझ्या मनाला माहीत नव्हते,मग मीच विचार केला की मी कोठेतरी वाहत जात आहे जेथे थांबणे अशक्य वाटत होते. मला ही थांबायचे नव्हते,कारण त्या प्रवाहाची मला सवय झाली होती.पण मी या प्रवाहातुन बाहेर पडले तर काय होईल? * 'दीदी आज तुला एक गमंत सांगणार आहे,'राधा दिपिकाला म्हणाली, 'कोणती गं?,'दिपिकाने आपल्या छोट्या बहीनीला कुतुहलाने विचारले, 'अगं उद्या तुला पाहुणे पाहायला येणार आहेत,' 'वेडे मग काय याला गमंत म्हणताता का ?,' 'मग तुझी गमंतच होते की आशावेळी,' आसे म्हणत राधा जोरात हासु लागली, 'वा गं वा खुप लक्ष आसते गं माझ्यावर तुझ,थांब आईलाच नाव सांगते तुझं,'आसे म्हणत ती स्वयपाक घरात गेली. रोज हा क्षण आठवतो मला,राधाला गंमत वाटत होती माझी पण आता ती सुखी आहे, कारण माझ्यासारखा नवरा तीला मिळाला नाही. पाहुण्यानी मला पाहिले त्यानी पंसती दिली,लग्न झाले. माझा संसार व्यवस्थित चालु होता की कोठे किड लागली कळाले ही नाही, नवर्यामध्ये व माझ्यात भांडणे चालु झाली.कारण हे की नवर्याचं माझ्यवर प्रेम नाही म्हणुन, छे आसले नवरे मग कोणावर प्रेम करतात हे कळालं. सासंर सोडुन माहेरी आले. घरात बसुन काय करायचं म्हणुन काम शोधले,पण चेहर्यावर आत्मिश्वास होता, जगण्याचा काहीतरी करण्याचा. दोन गोष्टी जीवनात शिकावयाच्या वाटल्या एक म्हणजे माणुसकी व दुसरे प्रेम , पण मी दोन्ही गोष्टीपासुन वंचित होत होते.समाज मला आज ज्या नजरेने पाहत आहे, त्या नजरेत एक कडवट पणा आहे, व मला तो प्यावा लागत आहे. पण जो मला साथ देतो त्याच्यावर खरंच जीव उदार होतो.उमेशची व माझी मैत्री जगाला पाहवत नव्हती, कारण तो माझा गुन्हा होता.उमेश आजुन ही आधांरातच होता.त्याला माझ्या आयुष्याची व्यथा माहीत नव्हती.पण चुक माझीच कारण मीच त्याच्यापासुन लपवत होते.कारण मला माझ्या गुन्हाचा आपमान वाटत होता. अनेक माझ्यासारख्या आनेक कितीतरी स्रीया संसार करतात की,त्याचे नवरे त्याच्यावर अत्याचार करीत आसतात तरी ही त्याचा संसार चालु आहे, मग मी का यातुन बाहेर पडले याचा मला आपमान वाटतो. माझा नवरा माझ्यावर प्रेमच करीत नव्हता पण आत्याचार तर करीत नव्हता ना? मग हीच संधी आहे प्रेमाला जिंकायची हीच माझ्या जीवनाची दिशा आसं मला वाटु लागले आहे.म्हणुन उमेशला सर्व काही सांगणार आहे,आसं मी मनातच ठरवलं आहे म्हणुन तर त्याला मी बोलावले आहे, माझ्या शुन्य नजरेकडे उमेश पाहत होता, 'आज आँफीसमध्ये गप्प गप्प होतीस,काय झाले आहे ?,' 'काही नाही,महत्वाचं बोलायचं होतं,' 'महत्वाचं ?,' 'हो,' 'कशाबद्दल?,' 'हे बघ उमेश लोकामध्ये खुप चर्चा होते आपल्या संबंधाची हे तुला कळत नाही का?,' 'हो मला कळतं ना,' 'मग,' 'मग काय,लवकरच आपण लग्न करुनया,झालं तर मग,लोकाची तोंडे कशी बंद होतात बघचं,' 'मी तुझी होऊ शकत नाही,' 'का?,' 'ते तु ऐकु शकणार नाहीस,' 'का?सांग ना का?,' 'कारण........कारण........मी...... नाही ते शक्य नाही,' 'दिपिका' मी तुझ्या शिवाय जगु शकत नाही', *

वाचने 7840 वाचनखूण प्रतिक्रिया 39

In reply to by अजया

शैलेन्द्र Wed, 07/23/2014 - 00:41
तुम्ही अंधारात होतात म्हणुनच जिमोंनी ही गॅस्बत्ती लावलिये ना.. आत्ता तिच्या प्रकाशात जीवन वाचा :)

सिद्धार्थ ४ Sun, 07/20/2014 - 17:49
अब रूलओगे क्या? :( कसली ती हृदय पिळवुन टाकणारी कथा. भौ तुसी ग्रेट हो, तोफा कबूल करो !

In reply to by यसवायजी

बॅटमॅन Mon, 07/21/2014 - 15:43
=)) =)) =)) पानपतच्या लढाईच्या अगोदर इब्राहिमखान गारद्याने अब्दालीला उद्देशून मारलेला ड्वायलॉक वाट्टोय =))

In reply to by बॅटमॅन

=)) हा असलाच डायलॉग कोणीतरी मारला असणार अन युध्दात भाऊसाहेबह्हत्तीवरुन गडाबडा हसत खाली पडले असणार =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Mon, 07/21/2014 - 20:24
हा हा हा =)) अरे पण दुपारी १:३० च्या सुमारास विश्वासराव हत्तीवर असताना एका गोळीने खलास झाल्याचा उल्लेख आहेच ना.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Mon, 07/21/2014 - 21:33
त्यांनी तोफा कबूल केल्या असतील आणि मग हत्ती वर बसले असतील. अहो, तेंव्हापासून हे बदला-बदलीचे राजकारण सुरु आहे, असे पण सांगता येईल.

बाँस, साँरी,साँरी, आँफीस...हा उमेश आँसाँ नाँक्खाँतुन काँ बोंलतोंय... म्हणजे तो एका 'विशिष्ट जमातीचा' आहे अशी काही गुढकथा आहे का हि...? (कंफ्युज्ड)

आयुर्हित Sun, 07/20/2014 - 21:08
मानले बुवा आपल्याला. जबरदस्त निरीक्षणशक्ति आहे जिवनभौ आपली! नायिकेला काहीतरी शिकायचे असते व तिला आपली चुक कळुन येते (स्वॉट अ‍ॅनॅलिसिसचे उत्तम उदाहरण) व ती ठाम निर्णय घेवु शकते (निर्णयक्षमता)हे सकारात्मकपणे दाखवुन दिल्याबद्दल धन्यवाद. मिपावर एक उत्तम लेखक उदयास आलेला आहे, हे येथे नमुद करावेसे वाटते.

In reply to by सानिकास्वप्निल

दिपक.कुवेत Mon, 07/21/2014 - 10:41
जिवभौंच्या कथा ह्या विश्लेषणासाठि नसतातच. त्या नुसत्या वाचायच्या (कॉमेडि अ‍ॅंगलने) आणि स्वःतास सुदैवी समजायचे कि आपणास त्यांच्या कथा वाचण्याचे भाग्य लाभत आहे ते!

एस Mon, 07/21/2014 - 11:50
mohite jeevan भौं, तुमची मस्करी करणार्‍या पामरांना क्षमा करा. मीही काल हाSSSSSS लांबलचक प्रतिसाद टंकला होता इथे. पार भेटि अनुपचन पासून कोबीखीर आणि आबालीग्रीसभटकंतीपासून मध्यवर्ती भाषा अन् काय काय टाकलं होतं. तुम्हांला पुरस्कार पण दिला होता येक. पण पूर्वपरीक्षण करायला गेलो आणि नेट बंद पडलं. तेव्हाच मला माझ्या चुकीची जाणीव झाली. सगळे टंकनश्रम वाया गेलेन् काय! तेव्हा मी जीवनभौंच्या कथांचं इडंबन नाय करू शकत. का? अरे का काय का? ते इंटर्नेट खपवून घेणार नाही. का? सांग ना का? अरे पुन्हा तेच! कारण......कारण...... नाही ते शक्य नाही!!!!!!! (इकडेतिकडे पहात) चला पुढची जिलबी कोण टाकतंय? (कडामकुडूम! कडामकुडून! (पॉपकॉर्नचा आवाज))...

विजुभाऊ Tue, 07/22/2014 - 07:51
"आमच्या येथे कथा पाडुन मिळतील" असा बोर्ड जीवनभौनी लावला आहे. आणि कथा ल्ह्याच ,कथा ल्ह्याच असा पाडीक आग्रह करीत आहेत असे अदृश्य द्रुश्य नजरेसमोर तरळून गेले

वपाडाव Tue, 07/22/2014 - 23:49
आत्मिश्वासु जिल्बीकारक जीवंभौचा विजै असो... आनेक आत्याचारी स्त्रियांच्या कैवार्‍याचे देव रक्षण करो...

मी तुझी होऊ शकत नाही,' 'का?,' 'ते तु ऐकु शकणार नाहीस,' 'का? सांग ना का?,' 'कारण........कारण........मी...... नाही ते शक्य नाही,' 'दिपिका' मी तुझ्या शिवाय जगु शकत नाही', *
तो * म्हणजे दिपिकाचा नवरा आहे. आणि अचानक, तो दिपिका आणि उमेश यांच्यामधे येऊन * उभा राहिलायं!

विजुभाऊ Wed, 07/23/2014 - 09:00
अनेक माझ्यासारख्या आनेक कितीतरी स्रीया संसार करतात की,त्याचे नवरे त्याच्यावर अत्याचार करीत आसतात तरी ही त्याचा संसार चालु आहे, मग मी का यातुन बाहेर पडले याचा मला आपमान वाटतो. अरे वरील वाक्य नजरेतुन सुटले की.. हा तर मराठी कथालेखकाना फुल्ल टॉस दिलाय. सगळे एकदम समर्पण करायची सम्धी आलीये.......