मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महापुरुषांची (ऑनलाईन) बदनामी: एक कायमची डोकेदुखी?

हुप्प्या · · काथ्याकूट
अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्‍यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे पुण्यात काही भागात वातावरण तंग होते. त्यात एका निरपराध मुस्लिम युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला. हे अगदी चुकीचे आहे. त्याच्या खुनाला जबाबदार असणार्‍यांना शक्य तेवढी कठोर सजा व्हावी. अगदी फाशीदेखील. मग त्यांना आपण हुतात्मा आहोत असे वाटले तरी बेहत्तर. पण ह्यावर उपाय काय? फेसबुक वा ट्विटर जगभर वापरले जाते. कुणी कुठे काय प्रकारची पोस्ट करेल ह्याला काही धरबंध नाही. अनेक देशात टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. केवळ भारतात दंगे होतात म्हणून हे देश आपल्या नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला मुरड घालेल अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. पण असले उठसुठ दंगे होणे भारताला परवडेल का? तशात मोदींकडे कलुषित नजरेने बघणारे कमी नाहीत त्यामुळे असे काही घडले की थेट मोदींवर आरोप केले जाऊ शकतात आणि जातातही. लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते. मग ते हिंदू असोत वा मुस्लिम वा अन्य कुणी. ड्यानिश व्यंगचित्रकाराचे प्रकरण आठवत असेलच. आपणास काय वाटते? ह्या विषयाशी संबंधित काही बातम्या. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Pune-IT-Engineer-murder/articleshow/36161829.cms http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/fear-drives-many-in-Pune-to-shun-skull-caps-Pathani-suits/articleshow/36243080.cms

वाचने 33739 वाचनखूण प्रतिक्रिया 102

मंदार कात्रे Mon, 06/09/2014 - 06:06
लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते.
यापेक्षा देवतांचा अपमान करण्याची खोडसाळ प्रव्रुत्तीच नष्ट केली तर?

In reply to by मंदार कात्रे

हुप्प्या Mon, 06/09/2014 - 08:18
जगाच्या पाठीवरील सर्व देशात जाऊन तिथे लोकांचे प्रबोधन करायचे? शक्य तरी आहे का? नुसते पाकिस्तान आणि बांगलादेश बघा तिथे रहाणारे वा तिथून अमेरिकेत वा युरोपात जाऊन रहाणारे लोक हे शिवाजीविषयी आदर बाळगतील का? ठाकर्‍यांविषयी आदर बाळगतील का? फेसबुक वा ट्विटरवरुन हे लोक बदनामीकारक काहीतरी लिहिणे थांबवता येणे शक्य आहे का? मला वाटते नाही. आजिबात शक्य नाही. आपल्या एका क्षुल्लक पोस्टमुळे लोक डोक्यात राख घालून घेतात आणि जाळपोळ करतात ह्याचा असुरी आनंद होणेच जास्त शक्य आहे.

निलरंजन Mon, 06/09/2014 - 08:17
आपल्या देवतांचे अपमान सहन न करण्याजोगे पोस्ट असतात पण काही प्रश्न पडलेले शिवराय आणि साहेब यांचे गलिच्छ फोटो नेमके धर्मवीर संभाजी महाराज या पेजवरच का टाकले गेले ? पोस्ट पाहिल्यावर वाॅटसअपवर शेअर करणारे खरेच भक्त होते का दहशतवादी? सोशल मीडीयाचा जास्त वापर करून हे प्रकरण जास्त चिघळले पण न्युज चॅनेल ने गैरसमज दूर केले नाही म्हणून संभ्रम अजूनच वाढला नव्हता का?

आतिवास Mon, 06/09/2014 - 09:38
उत्साहाच्या भरात आपण काय शेअर करतोय हेही अनेक लोक विसरतात असा अनुभव आहे. शिवाय एखाद्याची बदनामी करुन त्याचा/तिचा अपमान करता येतो हा विचार प्रचंड हास्यास्पद वाटतो मला! पण त्याला अगदी स्वतःला शिक्षित म्हणवणारे लोक बळी पडतात. आपल्याला काही दिसलं तर थेट सायबर सेलकडे तक्रार करावी - पण अनेक मंडळी महापुरुषांच्या बदनामीचं कळत नकळत वितरण करत असतात हे मात्र विचित्र वाटतं. आपल्या भावना लोकांनी काबूत ठेवायला शिकणं, सायबर सेलकडे तक्रार करणं, बदनामीकारक साहित्याचा अजिबात प्रसार न करणं, आणि कायदा हातात न घेणं एवढी पथ्य लोकांनी पाळली की सामाजिक द्वेष आणि अशांतता फैलावणा-यांचा उद्देश यशस्वी होणार नाही.

In reply to by आतिवास

राजेश घासकडवी Mon, 06/09/2014 - 15:05
शिवाय एखाद्याची बदनामी करुन त्याचा/तिचा अपमान करता येतो हा विचार प्रचंड हास्यास्पद वाटतो मला!
अगदी नेमकं. त्याहीपलिकडे जाऊन असा अपमान म्हणजे आख्ख्या जातीचा/समाजाचा/वर्गाचा अपमान असं मानून घेऊन 'आता आपल्यावर या अपमानाचा बदला घेण्याची जबाबदारी आहे. हे करणाऱ्या त्या साल्या जाती/समाज/वर्गाला इंगा दाखवलाच पाहिजे' हा विचारही होतो. नुसता विचारच नाही, तर त्यानुसार आचारही होतो हे फारच वाईट. महापुरुषांचं विभूतीकरण होतं. मग त्या महापुरुषाचं श्रेष्ठत्व विसरलं जाऊन त्यांचं केवळ एखाद्या मूर्तीत, प्रतिमेत, झेंड्यात किंवा बिरुदात रूपांतर होतं. त्यावर चिखलाचा एक थेबंही उडला तरी चवताळून उठायचं एवढाच त्यांचा उपयोग शिल्लक राहतो. हे दुर्दैव आहे.

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 09:45
>>>>अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्‍यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे .... अशा शब्दप्रयोगांनीही कांहींच्या भावना दुखावतात. त्या ऐवजी, 'अलीकडे झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि माननिय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फेसबुकवरील कांही प्रक्षोभक चित्रांमुळे...' अशी शब्दरचना जास्त आदरयुक्त वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Mon, 06/09/2014 - 10:28
बाळ ठाकरे यांचा अनेकवचनी उल्लेख पुरेसा आदरणीय आहे. ठाकरे यांचा आणि ठाकर्‍यांचा ह्यात आदराच्या बाबतीत फार फरक नाही. बाकी आदरणीय, माननीय, हिंदूहृदयसम्राट, सेनानायक वगैरे बाकीच्या पदव्या लावाव्यात का नाही हा लेखकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. शिवाजी महाराज हे माझ्या लेखी आदरपूर्वक केलेले संबोधन आहे. ह्या महामानवाविषयी माझ्या मनात आदराशिवाय अन्य भावना नाही. पण अमकेच शब्द वापरा वा तमकीच विशेषणे वापरा असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. असो. भरकटणे थांबवून मूळ विषयाकडे वळावे हे उत्तम.

In reply to by हुप्प्या

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 20:03
>>>>अमकेच शब्द वापरा वा तमकीच विशेषणे वापरा असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. अशी कुठलीही आज्ञा अथवा सुचना माझ्या प्रतिसादात नाही. माझ्या प्रतिसादात नसलेल्या गोष्टी तुम्ही फाट्यावर मारणार असाल तर मला कांहीच आक्षेप नाही. मला काय आदरयुक्त वाटते तेवढे मी दिले आहे. तुम्ही त्याचे पालन कराच अशी आज्ञा, सूचना, विनंती त्यात नाही. शिवाय, मी ठळक केलेल्या अक्षरांविषयीच माझे मत मी दिले आहे. बाकी पदव्यांबाबत लेखकाचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित आहेच. >>>>असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. मी सुद्धा. आपल्या मनाविरुद्धच्या वाक्यांचा एव्हढा राग येतो तर ज्यांच्या नजरेत हे महापुरुष आहेत त्या अजाणांना त्यांच्या दैवतावर केलेली चिखलफेक कशी सहन व्हावी? त्यांनी जशी सहनशक्ती अंगी बाणवावी तशीच त्यांना खडे बोल ऐकविण्याची इच्छा असणार्‍यांनीही बाळगावी असे नाही वाटत? माझा प्रतिसाद म्हणजे भरकटणे नसून मुख्य विषयाला धरुनच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Tue, 06/10/2014 - 01:50
माझा राग हा माझ्या मनाविरुध्दच्या वाक्यांना नसून अमक्या व्यक्तीला आदर दाखवायचा असेल तर अमक्या पदव्या आणि तमकी बिरुदे वापरा ह्या आग्रहाविरुद्ध आहे. तशी बिरुदे वापरले नाहीत तर त्यांचा मोठा अपमान होतो ह्या आपल्या अध्याहृत अर्थाला आहे. मी असे काही मानत नाही. मला जे योग्य बिरुद वाटते ते मी वापरले. शिवाजी महाराजांना छत्रपती हे बिरुद न लावल्यामुळे त्यांचा मोठा अपमान होतो असे मी मानत नाही. किंबहुना तसे मानणार्‍यांच्या मानसिकतेवर हा लेख हा एक प्रहार आहे. एका धर्मात त्यांच्या संस्थापकांचा उल्लेख करताना त्यांना शांती मिळो असल्या अर्थाचे काही म्हणण्याची पद्धत आहे. आदर दाखवण्याची ही पद्धत आता इतकी अनिवार्य झाली आहे की तसे म्हटले नाही तर संस्थापकाचा मोठा अपमान होतो असे मानणारा वर्ग त्या धर्मात निर्माण झाला आहे. तसे शिवछत्रपती वा अन्य कुणाबाबत घडू नये अशी माझी इच्छा आहे.

In reply to by हुप्प्या

प्रभाकर पेठकर Tue, 06/10/2014 - 18:02
>>>>माझा राग हा माझ्या मनाविरुध्दच्या वाक्यांना नसून अमक्या व्यक्तीला आदर दाखवायचा असेल तर अमक्या पदव्या आणि तमकी बिरुदे वापरा ह्या आग्रहाविरुद्ध आहे. माझा मूळ प्रतिसाद कृपया पुन्हा वाचा. त्यात ठळक केल्या शब्दांबद्दलच मी, 'मला काय आदरयुक्त वाटते' ते लिहीले आहे. तुम्ही ते तसेच वापरा असा आग्रह, आज्ञा अजिबात कुठे नाही. बाकीच्या महापुरुषाच्या पदव्या, बिरुदं ही माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग म्हणून वापरली आहेत. ती तुमच्यावर कुठल्याही कोनातून लादली, सुचवली, आज्ञा केलेली नाही. मूळ मुद्दा सोडून जे सुचविलेले नाही अशी गोष्टच धरून ती तुम्हाला झोडपत बसायचे असेल तर चालू द्या. ती तुमची वैयक्तिक आवड म्हणून मी दुर्लक्ष करतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Tue, 06/10/2014 - 23:31
आपण असे लिहिले होतेत >> अशा शब्दप्रयोगांनीही कांहींच्या भावना दुखावतात. त्या ऐवजी, 'अलीकडे झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि माननिय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फेसबुकवरील कांही प्रक्षोभक चित्रांमुळे...' अशी शब्दरचना जास्त आदरयुक्त वाटते. ह्यात अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे. आणि तो मुद्दा मला खोडायचा आहे. अशा शब्दप्रयोगामुळे लोकांनी आपल्या भावना दुखावून घेणे सोडावे. जगातील कुठल्या कानाकोपर्‍यात बसून कुणी काय लिहिल ह्याचे एककेंद्रीय नियंत्रण ठेवणे शक्य नाही तेव्हा सहनशक्ती वाढवा असे माझे म्हणणे आहे. मी मुद्दा सोडलेला नाही. आपण जे मागे जे म्हटलात ते मी म्हटलेच नव्हते असा दावा करत आहात. तो चुकीचा आहे.

In reply to by हुप्प्या

प्रभाकर पेठकर Wed, 06/11/2014 - 00:17
>>>> अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे. तुम्हाला तुमचाच हेका चालवायचा आहे. माझा मूळ प्रतिसाद वाचा..वाचा सांगून तुम्ही कांही तो वाचत नाही. त्यातील ठळक केलेल्या शब्दांबद्दलच मी माझं मत मांडलं आहे हे त्रिवार सांगूनही तुम्ही त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करता आहात. माझा प्रतिसाद पुन्हा चिकटविताना त्यातील मी ठळक केलेली अक्षरे पुसून ती इतर साध्या अक्षरांमधेच मिसळवून माझा संपूर्ण प्रतिसाद म्हणजे 'अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे' असा थेट आरोप करताताना तसा, मला अभिप्रेत नसलेला, अर्थ तुम्ही त्याला चिकटविता आहात. आनंद आहे. तुम्हाला जो अर्थ घ्यायचा तो घ्या, तुम्हाला जी तुमची मते मांडायची ती मांडत राहा, माझ्याकडून ह्या विषयावर हा शेवटचा प्रतिसाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

जाऊ द्या हो. बाळासाहेबांचा वरील लेखातील तसा उल्लेख खटकणारा आहे हेच वास्तव आहे, समजून नसेलच घ्यायचं तर आपण करू शकतो?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हुप्प्या Sun, 06/15/2014 - 11:11
अहो तुम्हाला खटकणारे असे कुणी काही लिहिले तरी त्या व्यक्तीच्या मतस्वातंत्र्याचा मान राखून ते सहन करणे हीच तर व्यक्तीस्वातंत्र्याची कसोटी आहे. सगळ्यांना आवडेल आणि पटेल असेच लिहिले गेले तर त्याकरता स्वातंत्र्य वेगळे मागावे का लागेल? समजा तुम्हाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे लिहिले नाही तर खटकत असेल तर मला बाळ ठाकरे इतके म्हणून पुरत असेल. जर सभ्यतेच्या सीमेत राहून असे वेगवेगळे उल्लेख होत असतील तर ते चालू दिलेच पाहिजेत. मला खटकते म्हणून दुसर्‍याच्या उल्लेखाला धारेवर धरा असे करून चालणार नाही. तशात मिसळपाववर लिहिणारे जगात सगळीकडे असतात. निव्वळ मुंबईत राडा करुन अशा लोकांवर जरब बसेल का? मला वाटत नाही. तेव्हा व्यक्तीस्वातंत्र्याचा मान राखणे हेच इथे इष्ट आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Sun, 06/15/2014 - 11:05
मी उद्धृत केलेल्या वाक्याखेरीज त्यात कुठलेही अन्य वाक्य नाही.तेव्हा नसलेली वाक्ये मला वाचायला सांगून आपण काय साध्य करत आहात ते आपणच जाणत असाल. बाळ ठाकर्‍यांना बाळासाहेबच म्हटले पाहिजे हे मला मान्य नाही. माझ्या मते अनेकवचनी उल्लेख करणे हे सन्मान दर्शकच आहे. ठाकर्‍यांविषयी मला आदर आहेच. मतभेदही आहेत. अजून एक उदाहरण घ्यायचे तर पु. ल. देशपांडे हे मला ठाकर्‍यांपेक्षा जास्त आदरणीय आहेत. पण त्यांचाही उल्लेख मी पु. ल. देशपांड्यांनी अमुक एका पुस्तकात असे म्हटले आहे असा करेन. त्यात साहेब, अण्णा, भाई कुठलाही प्रत्यय लावायची गरज वाटत नाही. त्यात मला काहीही अनादरणीय वाटत नाही. ह्यात मतांतरे असू शकतात. पण त्याकरता मतस्वातंत्र्यावर गदा आणण्याची भाषा असू नये.

In reply to by हुप्प्या

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 11:08
सहमत. रामकृष्णादि देवांचा उल्लेख जर एकवचनी केलेला चालतो तर शिवाजीमहाराज किंवा अन्य महापुरुषांचा उल्लेख एकवचनी केल्याने फरक का पडावा हे कोडे कै उलगडत नाही. पण ते एक असोच. मला डॉक्षावर उगी फतवा नकोय स्वतःच्या ;)

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 06/10/2014 - 11:51
रामकृष्णादि देवांचा उल्लेख जर एकवचनी केलेला चालतो तर शिवाजीमहाराज किंवा अन्य महापुरुषांचा
देवांविषयी प्रिती असते तर शिवाजी महाराज आदी महापुरुषांविषयी प्रितीयुक्त आदर असतो.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 12:19
शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर=बहुवचन आणि अनादर=एकवचन अशी सिस्टिम उपटलीय. वरिजिनल संस्कृतात असे कधीच नव्हते. कितीही आदराने बोलले तरी ते लोक अरेतुरेच करायचे- मग तो कुणी मोठा राजा असो नैतर कोणी महान ऋषी असो.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 06/10/2014 - 12:26
ते झालंच रे. पण तसंही बघितलं तर वडील/ आजोबांना आपण अहो जाहोच करतो आणि आई/आजीला अगं तुगं. हल्लीची पिढी मात्र हे संकेत पाळत नाही हे मात्र खरं.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 12:30
होय ते आहेच-पण वैयक्तिक मत विचारशील तर त्यात गैर काही नाही. उत्तरेत तर दोघांनाही अहोजाहो करतात. ते कितीतरी बरं. आपल्या इथे सिस्टिमिक भेदभाव इतका खोलवर आहे, की आईचा भाऊ म्हणून मामा तेवढा अरेजारे आणि वडिलांचा भाऊ म्हणून काका मात्र अहोजाहो? बरेचजण काकालाही एकवचनाने बोलावतात तो भाग वेगळा. असो.

In reply to by बॅटमॅन

सुनील Tue, 06/10/2014 - 14:38
त्याचं काय आहे - मामा म्हणताना ओठ एकमेकांच्या जवळ येतात (पक्षी जवळीक, बोले तो एकेरी) अन् काका म्हणताना ओठ एकमेकांपासून दूर जातात (पक्षी दूरावा, बोले तो बहुवचनी) ;)

In reply to by बॅटमॅन

पिशी अबोली Fri, 06/13/2014 - 17:22
शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर=बहुवचन आणि अनादर=एकवचन अशी सिस्टिम उपटलीय. वरिजिनल संस्कृतात असे कधीच नव्हते
विषयाशी अवांतर प्रतिसाद आहे, पण कोणत्याही भाषेचा विकास स्वतंत्रपणे होत असल्याने तिने 'वरिजिनल' व्हरायटीला चिकटून राहण्याची अपेक्षा नसावी. आणि काहीशा नंतरच्या काळातील संस्कृतमधे आदरार्थी बहुवचनाचा वापर होत असे असे काहीसे स्मरते. कदाचित शाकुंतल किंवा उत्तररामचरितात कुठेतरी उदाहरण असावे.

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन Mon, 06/16/2014 - 13:04
पूर्वार्धाशी सहमत आहे, उत्तरार्धाची उदा. पहायला आवडतील. पण एनीवे तो प्रक्षिप्त प्रकारच असावा. पाणिनीत अशा प्रकाराचा उल्लेख आहे काय?

In reply to by प्रभाकर पेठकर

माहितगार Mon, 06/09/2014 - 21:10
मराठीच्या व्याकरणात काळानुरूप बदल होतो आहे काय ? परंपरागत मराठी व्याकरणात नामाचे नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप बदलते त्याला 'सामान्यरूप' म्हणतात. आणि आडनावांचे सामान्यरूप होणे ही बाब मागच्या पिढ्यांमध्ये सामान्यबाब असावी. (चूकभूल देणे घेणे, कृ. मराठी व्याकरण त़ज्ञांनी/अभ्यासकांनी मार्गदर्शन करावे) काळानुरूप नवीन मराठी पिढ्यांनी आडनावांचे सामान्यरूप करणे थांबवले असेल तर मराठी बोलणार्‍या जुन्या पिढ्यांना मराठी बोलण्याचे नवीन काळानुसार प्रशिक्षण द्यावे लागेल, म्हणजे गैरसमज होण्याची शक्यता कमी होईल.

तिमा Mon, 06/09/2014 - 09:54
विज्ञान हे माणसाच्या प्रगतीसाठी असते. पण ते माकडांच्या हाती पडले की विध्वंस ठरलेलाच!

म्हैस Mon, 06/09/2014 - 11:26
रिकामटेकडे आणि दंगली झाल्यावर असुरी आनंद मिळवणारे अश्या पोस्ट टाकत असतात . त्यांना दंगली हव्याच असतात . दंगल झाली कि ते अजून चेकाळतात . आणि हे कोणी परदेशी करत असतील अस वाटत नहि. त्यामुळे दंगल वगेरे न करता ताबडतोब तक्रार करून अश्या पोस्त काढून टाकाव्यात हा उपाय मला वाटतो .
देवतांचा अपमान करण्याची खोडसाळ प्रव्रुत्तीच नष्ट केली तर?
सहमत आहे . पण कशी ? कोण करणार ?

तुमचा अभिषेक Mon, 06/09/2014 - 12:15
अश्या प्रकारांकडे न चिडता दुर्लक्ष करायला शिकले की हे प्रकार वाढतील वाढतील आणि तरीही दुर्लक्ष केले की एकदाचे थांबतील. जरी दुर्लक्ष करणे शक्य नसेल किंवा आपल्या देवांचा आणि दैवतांचा अपमान सहन करणे हे कोणाला कमीपणाचे वाटत असले तरी पडद्यामागच्या खर्‍या सुत्रधाराला न पकडता तोडफोड करत वा दंगली घडवत शासनव्यवस्थेवर राग काढणेही चुकीचे हे तरी प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे कारण यात छळ सामान्यांचाच होतो. महाराजांचा अपमान या महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही या भावनेचे समर्थन मी देखील करतो पण अरे तो कोण आहे तो समोर तर दिसू दे.. जरी प्रत्येक माणसाचे प्रबोधन करणे शक्य नसले तरी संघटनांचे नक्कीच करू शकतो. कारण बरेचदा तोडफोड वा बंदच्या स्वरूपात निषेध एखाद्या संस्था संघटनेच्या मार्फत वा पुढाकाराने होतो. सरकारने अश्या गोष्टींचा पाठपुरावा करावा अशी अपेक्षा धरणे चुकीचे नाही, पण या देशात आणखीही बर्‍याच समस्या असताना आपली प्रायोरिटी काय हे आपण जनतेनेच ठरवण्याची गरज आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ Mon, 06/09/2014 - 15:28
अहो त्यांचे दुसरे च interset असतात. त्या निमित्तानी दुकान दार वगैरें कडुन जास्तीची खंडणी घेता येते. ह्या area मधे माझा जोर आहे हे राजकीय बॉस ला दाखवता येते ( त्याचा फायदा निवडणुकीत वसुल केला जातो ). लोकांना त्रास दिल्याचा असुरी आनंद मिळतो. अशी अनेक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध फक्त आणि फक्त स्वार्थाशी आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 20:20
कांही राजकिय कारणांसाठी सुरक्षा आणि सुव्यवस्था पाळता येत नसल्याने किंवा सरकार पाळत नसल्याने सर्वसामान्य जनता वैफल्यग्रस्त झालेली असते. त्यांच्या ह्या अवस्थेचाच फायदा घेत राजकिय पुढारी समाजात विष पसरवत असतात. 'दुर्लक्ष केले पाहिजे हे ज्यांना कळते' त्या अल्पसंख्य (म्हणजे विशेष समाज नाही) समाजाला कांही समजवावे लागत नाही आणि ज्यांना समजणे गरजेचे असते असे समाजकंटक समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. सरकारी हस्तक्षेप आवश्यक आहे.

माहितगार Mon, 06/09/2014 - 13:38
मुख्य धागा लेखात वेगळ्या अर्थछटांचे शब्द कदाचित अधीक सुयोग्य ठरतील असे वाटते. अशा ठिकाणी हेतू बदनामी पेक्षा अपमान करून चाहत्यांच्या भावना जाणीवपुर्वक दुखवण्याचा असू शकतो नालस्ती किंवा अधिक नेमका शब्द वापरता येऊ शकेल असे वाटते. सहनकरणे आणि संयम यांच्या अर्थछटात अंतर आहे. मला वाटते वाक्य काहीसे खालील प्रमाणे असणे अधीक सुयोग्य होऊ शकेल. 'लोकांनी आपल्या दैवतांबद्दल अभ्यासपूर्ण टिका कठोर असली तरीही सहन करायला शिकलेच पाहिजे, आणि निंदकाकडून अपमानांबद्दल संयम दर्शवला पाहिजे. स्वतःस प्रीय विभूतींची भलावण करून हवे असणेही समजता येते, पण कौतुक जबरदस्तीने करवून घेता येते ? एखादी व्यक्ती जी स्वकतृत्वाने पुरेशी मोठी आहे, तीला मोठीच म्हणा हि सक्ती त्या व्यक्तीची प्रतिमा मोठी करते का ? आपल्या संयम सोडलेल्या वागण्याने इतरांच्या मनातील प्रतिमा उंचावण्या एवजी तडा तर जाणार नाही याचा चाहत्यांनी विचार करण्यास वाव आहे असे वाटते.'

माहितगार Mon, 06/09/2014 - 13:42
या धागा लेखात ज्या विशिष्ट घटनांचा उल्लेख आहे त्यातील काहींना राजकीय उद्दीष्टे आणि रंग नाहीतना अशी शंका वाटली. वृत्तमाध्यमांमध्ये सुद्धा जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव यावेळी प्रकर्षाने जाणवला.

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 13:58
बदनामी कोणाला चुकते ? सगळ्यांचे चाहते आपापल्या श्रध्दास्थानाची बदनामी वर्षानुवर्षे सहन करत आलेले आहेत, राहतील, ठोस पर्याय याला उपलब्ध्द नाही. विटंबना जरा संवेदन्शील मुद्दा असतो. विटंबना चाहत्यांच्या भावना दुखावते. विटंबना चाहत्यांच्या श्रध्दास्थानाशी असलेली निष्ठा डिवचते. म्हणून चाहत्यांचा तोल जातो. मी स्वतः जेंव्हा जेंव्हा ज्या ज्या लोकांच्या श्रध्दास्थानाची विटंबना केली जाइल तेंव्हा त्या लोकांनी एकत्र येउन धडकी भरेल असा विराट मुकमोर्चा काढुन निषेध नोंदवावाच या मताचा आहे. पण मला कोणत्याही प्रकारे भारतीय समाजाची शारीरीक, मानसीक, आर्थीक हानी होणे पसंत नाही भलेही मी अशा दुश्कृत्या विरोधा प्रचंड शक्ती प्रदर्शन मी आवश्यक मानतो. - जय महात्मा गांधी.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 14:03
यांच्या या http://www.misalpav.com/comment/586771#comment-586771 प्रतिसादाला उत्तर म्हणून दिला होता. शक्य झाल्यास तेथे हलवावा.

श्रीगुरुजी Mon, 06/09/2014 - 14:45
महाराष्ट्रात काँग्रेसचा १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी जेमतेम १५ जागा मिळवून (भाजप १८ + शिवसेना १५ अशा एकूण ३३ जागा युतीला मिळाल्या होत्या) काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर १९९७ मध्ये मुम्बईतील रमाबाई आंबेडकर नगरात आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे दंगल होऊन पोलिस गोळीबारात १० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यावेळी युतीचे सरकार जवळपास बरखास्त होत आले होते. त्या सरकारची बरखास्ती थोडक्यात टळली. नंतर १९९८ च्या निवडणुकीत दंगलीचा प्रमुख मुद्दा होता व त्यात युतीचा दारूण पराभव झाला होता (काँग्रेस ३३ + रिपब्लिकन ४ = ३७ आणि युती = १०). याच निवडणुकीत प्रमोद महाजनांचाही पराभव झाला होता. आता २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला आहे. ऑक्टोबर मध्ये विधानसभेची निवडणुक आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे बदनामी प्रकरण घडलेले आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी व २ दिवसांपूर्वी आंबेडकरांची बदनामी करण्यात आली आहे. लगेचच "केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर १५ दिवसांतच जातीय तणाव वाढण्यास सुरुवात झाली" अशी फुसकुली पवारांनी सोडलेली आहे. एकंदरीत हा प्रकार योजनाबद्ध असावा व विधानसभा निवडणुकीपूर्वी १९९७ प्रमाणे वातावरण निर्मिती करून युतीला बदनाम करावे अशी योजना असावी असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

काळा पहाड Mon, 06/09/2014 - 18:22
माझ्या मते हा त्याच्या पुढचा प्रकार आहे. काँग्रेसचा पराभव करण्यात सोशल नेटवर्क आघाडीवर होते. आता राज्यातील निवडणुका आहेत. तर ह्या निमित्ताने सोशल नेटवर्क वर अ‍ॅक्टीव्ह असणार्‍यांना धमकावण्याचा तर हा प्रकार नसेल? म्हणजे कसं तर अश्या पोष्ट स्वतःच टाकायच्या, दंगल स्वतःच्याच कार्यकर्त्यांकरवी करायची, मग सोशल नेटवर्क वापरणार्‍या लोकांना धमकी द्यायची. लोकांना माहीतच नसेल की कोणती पोष्ट ऑफेन्सिव्ह बनू शकते ते. बाकी पवारांच्या स्टेटमेंट्स बद्दल बोलणे म्हणजे चिखलात दगड मारणं होय.

In reply to by काळा पहाड

आजानुकर्ण Mon, 06/09/2014 - 18:55
हिंदूराष्ट्र सेना हे काँग्रेसचे पिलू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र काँग्रेसला सगळ्याच दंगलींचा फायदा झालेला नाही. उत्तरप्रदेशात मुझफ्फरपूरमध्ये निवडणुकीपूर्वी दंगली घडवून आणल्या तर काँग्रेसलाच त्याचा तोटा झाला. याउलट दंगलखोरांचा धीरोदात्तपणे प्रतिकार करणाऱ्या भाजपाच्या खासदाराला मंत्रीपदाचे सुयोग्य बक्षीस मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातील दंगलींचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होईल असे नाही. जनता सूज्ञ आहे. धनंजयभाई देसाईदेखील महाराष्ट्राचे भावी मंत्री होऊ शकतात.

In reply to by श्रीगुरुजी

आधी रथयात्रा मग बाबरी ,त्यामुळे झालेले मुंबैचे स्फोट,...... ९५साली युतीचे सरकार.... नंतर लगेचच केंद्रात भाजपचे सरकार..... . . . . परंतु हा योगायोग असावा.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 06/10/2014 - 20:29
>>> आधी रथयात्रा मग बाबरी ,त्यामुळे झालेले मुंबैचे स्फोट,...... ९५साली युतीचे सरकार.... नंतर लगेचच केंद्रात भाजपचे सरकार..... अरे माईसाहेब, आयुष्यात कधीतरी सुधार रे.

In reply to by श्रीगुरुजी

हाडक्या Wed, 06/11/2014 - 22:09
@गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय वो.. या लोकांना 'ग्रेट थिन्कर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नाना नेफळे', 'माईसाहेब' वगैरे डु-आयडी इतक्या फटाफट कसे काय मिळतात हो ? (यात संपादकीय हात असावा काय? असा आमचा संशय आहे.. परंतु तुमची या डु-आयडींबरोबर घनिष्ठ मैत्री असल्याने हा प्रश्न ) बादवे आमाला एक आयडी मिळवायला चार महिने लागले.. आशा सोडली होती तेव्हा ई-पत्र आले की या मिपावर म्हणून.!! *biggrin*

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी गुरुवार, 06/12/2014 - 17:00
>>> @गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय वो.. या लोकांना 'ग्रेट थिन्कर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नाना नेफळे', 'माईसाहेब' वगैरे डु-आयडी इतक्या फटाफट कसे काय मिळतात हो ? हा प्रश्न मलाही पडलाय. चव्हाण, उत्तर द्या. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने डू-आयडी कसे मिळविलेत ते सांगता का जरा. >>> परंतु तुमची या डु-आयडींबरोबर घनिष्ठ मैत्री असल्याने हा प्रश्न ) :lol:

In reply to by श्रीगुरुजी

भृशुंडी Mon, 06/09/2014 - 22:53
असहमत. हिंदू-मुस्लिम अशा रीतीने समाजातील मतांची विभागणी करून काँग्रेसला फायदा नाही. त्याउलट काँग्रेसला नेहेमीचं जातीय राजकारण करून मतं मिळवणं सोयीचं आहे, आणी त्यात काँग्रेस दरवेळी यशस्वी झालेली आहे. त्याला काटशह देण्यासाठी "धर्माचं" कार्ड खेळणं, हे दरवेळी भाजपाचं सूत्र राहीलं आहे. तेव्हा दंगलींंमुळे होणारं मतांचं ध्रुवीकरण हे "भाजपा"लाच सोयीचं आहे. (१९९२ नंतरचा भाजप उदय) उत्तरप्रदेशात मुझफ्फरपूरमध्ये हीच रणनीती वापरली गेलीये.

In reply to by भृशुंडी

राजेश घासकडवी Mon, 06/09/2014 - 23:08
तुमच्या प्रतिसादात मला सरळसरळ विभूतींची विटंबना करण्याचा प्रयत्न मला दिसतो. भाजपाला आख्ख्या देशाने एकमताने निवडून दिलेलं असताना त्या पक्षाविरुद्ध काही बोलणं हेच ब्लास्फेमस आहे. तुम्ही यातून संपूर्ण भारताच्या संपूर्ण जनतेच्या भावना दुखवत आहात. याला देशद्रोहच का म्हणू नये असा मला प्रश्न पडतो. ही ही असली मानसिकता ठेचून काढली पाहिजे. अशा कुरापतखोर माणसांमुळेच दंगली होतात. असल्या विभूतीभंजनाच्या कृतीने भक्तांच्या भावना दुखावल्या की मग ते बिचारे नाइलाजाने चवताळून उठतात. मग त्यातून दंगली झाल्या तर दोष कुणाचा? शब्दांनी उचकवणारे आणि लाठ्याकाठ्यांनी डोकी फोडून खून पाडणारे तत्वतः सारखेच.

गवि Mon, 06/09/2014 - 15:10
राजीव साने यांचा एक वाचनीय लेख अगदी याच विषयावर बोलतो. त्याची लिंक खाली आहे. अद्याप वाचला नसेल तर जरुर वाचावा. http://www.loksatta.com/sampadkiya-news/emotion-get-hurt-271325/ शीर्षक : दुखऱ्या समूहभावनांना उद्रेकाधिकार? थोडे अंश खाली चोप्य पस्ते करत आहे: एकटय़ा व्यक्तीला सातत्याने टोचून बोलून आत्महत्या करायला भाग पाडले जाऊ शकते व तो गुन्हा आहेही, पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय? सात शेपटय़ांचा उंदीर असे म्हणून चिडविला जाणारा उंदीर एकेक शेपटी कापत जातो. एक शेपटी उरल्यावर त्याला 'एक शेपटीचा उंदीर' म्हणूनही चिडविले जातेच. खरे तर एक शेपटीचा म्हणजे नॉर्मल! पण हा तीही कापतो!! ही गोष्ट, 'चिडवून घेण्यात' मुख्य दोष आहे, हे शिकविते. आपल्या देशात 'गोतगटीय' अस्मिताबाजी व जमातवादांमुळे वातावरण इतके दूषित आणि कलुषित झाले आहे, की शब्दाशब्दाला अडखळायला होते. एखाद्या व्यवसायाचा उल्लेख मराठीत केला तर तो भावना दुखावणारा ठरू शकतो. मग एक तर संस्कृतोद्भव शब्द वापरायचा किंवा इंग्लिश शब्द वापरायचा. मुस्लिमांना सरळ मुस्लीम न म्हणता 'मॉमेडियन' असे दबक्या सुरात का म्हणायचे? 'विशिष्ट समूह' का म्हणायचे? जिच्यावर झुंडशाहीचा हल्ला होतो, ती व्यक्ती भावना दुखावण्याच्याच नव्हे, तर इतर कोणत्याही गुन्हय़ात दोषी होती की नव्हती, हा मुद्दाच गरलागू आहे. कोणत्याही कथित अपराध्याला शासन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शासनसंस्थेलाच राहिला पाहिजे. अगदी 'रेडहॅण्ड' सापडलेल्या 'पाकीटमारा'ला जमावाने मारहाण करणे हेदेखील शासनाच्या सार्वभौमतेचा आणि पाकीटमाराच्या नागरी अधिकाराचा भंग करणेच ठरते. 'रेडहॅण्ड' पाकीटमाराचे उदाहरण अशासाठी, की त्याची दंडार्हता तुम्हाला 'साक्षात' असेल, पण तुम्ही दंडाधिकारी नाही आहात, हे कसे विसरता? ज्या क्षणी आपण ग्रस्तता ही गोष्ट 'समूहाला' बहाल करतो, त्या क्षणी आपण झुंडशाहीला अधिमान्यता देत असतो. कायदा असा हवा की, उदाहरणार्थ समजा मला कोणी जन्मावरून 'भटुरडय़ा' म्हटले तर म्हणणाऱ्याला काहीही शिक्षा नको, पण मी जर 'ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या गेल्या' असे म्हटले, तर मला शिक्षा झाली पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ प्रोव्होकेटिव्ह पब्लिक क्लेिमग ऑफ कम्युनल इन्सल्ट अ‍ॅक्ट! याने टवाळखोरी वाढेल की काय अशी चिंता वाटेल, पण मुद्दा आहे तो, टवाळखोरी 'गंभीर'पणे न घ्यायला शिकण्याचा, दुखरेपणा घालवायचा आणि खोडसाळपणाच्या उपद्रवमूल्यातली हवा काढून टाकण्याचा! सर्व विचार सर्वांना पटतील असं नाही, पण मांडणी लाजवाब आहे.

कलंत्री Mon, 06/09/2014 - 15:39
आपण इतरांच्या हातातील बाहुले बनत जात असतो याचे भान ठेवायला हवे. मागच्या १० दिवसामध्ये हजारो गाड्यांच्या काचा फुटल्या, दोन समाजात तेढ निर्माण झाली, काही लोक भयाच्या सावलीत जगत होते याचा विचार करता स्वप्रबोधन हाच खरा मार्ग आहे.

@पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय?>>> काही दिवसापूर्वीच हा अनुभव आला. फेसबुकावर भूत नावाचा एक ग्रुप आहे.तिथे मी भूत बनविण्याची पाककृती नावाचा छोटा लेख टाकला. त्याच्यावर काहि वेळातच परित्राणाय साधूनाम नावाचा एक पेज धारक(आय.डी.) येऊन वाट्टेल तसं आणि वाट्टेल ते बरळू लागला.माझं लेखन मार्मिक आणि प्रबोधनात्मक अंगानी जाणारं होतं.त्यात कोणत्याही विशिष्ट धर्माचा अपमान इत्यादी काहिही नव्हता. तरी त्यानी माझ्यावर जोरदार हल्ला चढवला. कारण त्यात सनातन कल्पनांची मी रेवडी उडवली होती..(किंबहुना ज्यांनी हल्ला केला,तसल्याच दुष्प्रवृतीं विरोधात जाणारी मत त्यात होती..ते एष धर्मः तन्नातन्नः वाले होते! हे निश्चित ) मी ही प्रतिवाद करत होतो. पण अ‍ॅडमिननी त्याला सुनावण्या ऐवजी सदर पोस्टच डिलिट केली(नंतर त्या सर्व कोल्ह्यांन्नी मिळून,तिथे माझ्यासारख्याला खिजवता येइल अशी पोस्ट टाकून बराच राग शमवून घेतला..आणि ती पोस्ट मात्र राहिलीच!) शेवट मीच त्या ग्रुपला त्याच्या एडमिन सह समजून घेतले..आणि त्यांन्ना त्यांच्या भयाण भवितव्यावर सोडून दिले. :)

पोटे Mon, 06/09/2014 - 16:41
बदनामी सगळेच करत असतात. कोण गान्धीन्ची करतो , कोण शिवाजीन्ची. व्यक्ती आनी पaddhat यात फरक आसाटॉ.

माहितगार Mon, 06/09/2014 - 19:08
एका खासगी बसवरील दगडफेकीत डोक्याला दगड लागून जखमी झालेली प्रवासी वसंत रूपनर (वय ४०, रा. सांगोला) नावाची व्यक्ती कोमामध्ये गेली आहे असे वृत्त आहे. संदर्भ: १. दैनिक लोक्सत्ता ९ जून २०१४ २. पुणे मिरर Jun 9, 2014, ३. इंडीयन एक्सप्रेस June 9, 2014

विवेकपटाईत Tue, 06/10/2014 - 20:15
आपली सहनशीलता संपत चालली आहे. यात राजनीती ही असू शकते. पण ज्या देशात चार्वाकला ही ऋषीचा दर्जा मिळाला आहे. तिथे निंदा नालस्ती सहन करण्याची शक्ती का हरवली याचा विचार करणे गरजेचे आहे. कबीरदास यांनी म्हंटलेले आहे, निंदा करणार्याची झोपडी घराचा शेजारी असलेली बरी. त्या वेळी देशात प्रचलित असलेल्या हिंदू मुस्लीम दोन्ही धर्मांच्या आडंबरांचा विरोध केला, त्यांची भाषा ही कडक होती तरी ही त्यांना आपल्या विचारांचा प्रचार करण्याची मुभा होती. दोन्ही धर्मावालंबी त्यांना संत मानतात. कुठल्या ही व्यक्तीचे किंवा धर्माचे आपल्या परीने विश्लेषण करण्याची स्वतंत्रता असली पाहिजे. तालिबान प्रमाणे आपण ही धर्मांधतेने वागू लागलो तर देशाचे तीन तेरा व्हायला उशीर लागणार नाही.

राजेश घासकडवी Tue, 06/10/2014 - 23:23

In reply to by राजेश घासकडवी

हुप्प्या Tue, 06/10/2014 - 23:40
ही कारवाई कुणाच्या अख्त्यारीत झाली? राज्य सरकार की केंद्र सरकार? माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आणीबाणी घोषित करुन तमाम राज्यांची सूत्रे (अजून तरी) हातात घेतलेली नाहीत. पोलिस खाते हे माझ्या माहितीनुसार राज्य सरकारच्या हाताखाली असते तेव्हा आपल्या उचंबळून येणार्‍या भावनांना काबूत ठेवा. थोडा धीर धरा. लवकरच मोदी भारताचे हुकुमशहा बनतील आणि आपला धर्मांध चेहरा दाखवतील मग तुम्हाला रान मोकळे होईल. चिंता नसावी!

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित Wed, 06/11/2014 - 00:08
राजेश घासकडवी, आपण दिलेले शिर्षक वाचुन कोणालाही त्या विद्ध्यार्थ्यांची/प्राचर्यांची खरोखर किव येइल हो! आपल्या दुर्दैवाने व आपली इच्छा नसतांना मोदी आता पंतप्रधान झाले आहेत. आता तरी घास गोड मानुन खा. किती दिवस दुस्वास करणार? मोदींचा फोटो केवळ इतर नकारात्मक चेहेऱ्यांच्या रांगेत छापला म्हणून नव्हे तर आपली भारताच्या पंतप्रधानंबद्दल संकुचीत मानसिकता व अल्पबुद्धि दाखविल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे. देव आपले व त्या नादान विद्द्यार्थ्यांचेही भले करो.

In reply to by आयुर्हित

भृशुंडी Wed, 06/11/2014 - 00:29
नाही तर काय? देशाच्या पंतप्रधानाबद्द्ल वाट्टेल ते कसं लिहू शकतं कुणी? स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी म्हणूनच ते मासिक जाळले. साधी गोष्ट आहे.

In reply to by आयुर्हित

राजेश घासकडवी Wed, 06/11/2014 - 22:25
आपली भारताच्या पंतप्रधानंबद्दल संकुचीत मानसिकता व अल्पबुद्धि दाखविल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
संकुचित मानसिकता आणि अल्पबुद्धि हा गुन्हा! अईशप्पथ, खरंच अच्छे दिन आले आहेत भारतात! पण आपल्या न्यायव्यवस्थेवर अतिरेकी ताण येईल याची काळजी वाटते. असो, ही बातमी देण्याचं कारण म्हणजे केवळ ऑनलाइनच नव्हे, तर छापील मीडियातही भक्तांच्या भावना किती चटकन दुखावल्या जातात हे लेखाच्या मूळ मुद्द्याशी सुसंगत विधान करायचं होतं. पण असं विधान करणं म्हणजेही न सहन होणारी टीका अनेकांना वाटते, त्याला काय करणार? चालूद्यात.

In reply to by राजेश घासकडवी

हुप्प्या गुरुवार, 06/12/2014 - 07:35
मोदींविरुद्ध वादग्रस्त लिहिलेल्या गोष्टीवर बंदी घालणारे त्यांचे भक्त हे आपण कसे ठरवले? केरळातील पोलिसांनी ही कारवाई केली असेल तर ती त्या राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली. केरळात आपले लाडके काँग्रेसचे सरकार आहे. तेव्हा जो दोष द्यायचा तो खुल्या दिलाने काँग्रेसला द्यावा. ह्या लेखावरील बंदीमागे मोदी समर्थक आहेत असे कुठेही दिसत नाही. आपल्या दिव्य (की पूर्वग्रहदूषित) दृष्टीलाच ते दिसतात असे वाटते. त्यामुळे हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे. आणि तो आपण दामटून, खोटेनाटे सांगून लोकांच्या गळी उतरवत आहात ह्याचा राग आहे.

In reply to by राजेश घासकडवी

अरे, अरे ! केरळमध्ये भाजप चे सरकार निवडून आलेसुद्धा !!!??? की आणीबाणी जाहीर करून कायदे बदलून दिल्लीतल्या सरकारने सगळ्या राज्यातील पोलिसदले ताब्यात घेतली ???!!! =)) , =)) , =)) (काल झोपी जाण्यापूर्वीपर्यंत पोलीस हा राज्यांच्या ताब्यातला विषय असल्याचे ऐकून होतो !)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भृशुंडी गुरुवार, 06/12/2014 - 23:44
ह्या बातमीनुसार तक्रार भाजपच्या युवा मोर्चाने केली आहे. करणारच! भाजपाच्या मुख्य नेत्यावर टीका करणे सोपे नाही, हे सगळ्यांना समजावण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर कोणीही सोम्यागोम्या उद्या टीका करायचा. भाजपा कार्यकर्यांनी डोळ्यात तेल घालून जागृत राहिले पाहिजे.

In reply to by भृशुंडी

विकास गुरुवार, 06/12/2014 - 23:51
भारतीय दंड विधानाच्या १५३ वे कलम हे पोलीसांनी लावले. हे कलम "Provoking with the intend to create rioting" साठीचे आहे. भाजपाच्या युवा मोर्चाने (मोदी विरोधकांना अपेक्षित असलेली) दंगल करण्याऐवजी दंगलीसाठी उद्युक्त करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीबद्दल प्रस्थापित कायद्यानुसार तक्रार केली. त्यात काही गैर दिसत नाही. तुम्हाला नक्की काय चुकीचे वाटते आहे? मला स्वतःला असल्या कारणावरून (कुठल्याही पुस्तक/लेख/विचारांवर) बंदी, अटक अथवा दंगल काहीच घडू नये असे वाटते. पण दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. दंगली घडवण्याच्या उद्देशानेच हे घडते. त्यामुळे, जो पर्यंत खोडसाळपणे हिंसेला उद्युक्त करणार्‍या घटना घडत असतील तेथे बंदी नाही पण असे खोडसाळपणा करणार्‍यांना अटक जरूर करावी आणि कायद्याप्रमाणे शिक्षा करावी असे नक्की वाटते.

In reply to by विकास

भृशुंडी Fri, 06/13/2014 - 01:09
महाविद्यालयातील एका मासिकात व्यक्त केलेली मते दंगल घडवण्यासाठी असतील, असं वाटत नाही. काहीशी चुकीची तुलना होती- नक्कीच. या इतर अनेक मान्यवरांमध्ये जॉर्ज बुशसाहेबही होते! पण त्या प्रमादासाठीच्या शिक्षेचे प्रमाण म्हणजे अटक (प्राचार्यांनादेखील) काहीच्या काही आहे. तथापि भाजपाच्या अतीउत्साही कार्यकर्त्यांनी दंगल किंवा गेला बाजार शिवसेनेची ट्रेडमार्क असलेली जाळपोळ, दगडफेक केली नाही, आणि निव्वळ तक्रार केली - याबद्दल त्यांचे खरंच अभिनंदन. ह्याच उद्या समजा एखाद्या महाविद्यालयीन हस्तलिखित अनियतकालिकात मोदी-उमा भारती यांची व्यंगचित्रे जर खोमेनी-KKK ह्यांबरोबर आली तर काय होईल ते बघणं ईंटरेस्टिंग असेल.

In reply to by भृशुंडी

विकास Fri, 06/13/2014 - 02:33
म्हणूनच म्हणले की मला बंदी हा प्रकार मान्यच नाही. पण "भावना दुखावल्या" ह्या नावाखाली बंदी घातली जाते तसेच "भावना भडकवल्या" म्हणून कायदा वापरला जाऊ शकतो. तसे बघायचे गेले तर असे कायदे वापरणे हे मला वाटते भाजपावाले डाव्या आणि स्युडो विचारवंतांकडूनच शिकले असावेत. म्हणूनच फार कमी वेळा वापरला गेलेला एक अमेरीकन विचित्र कायदा या असल्या भारतीय वंशांच्या विचारवंतांनी आणि त्यांच्या संघटनांनी मोदींविरुद्ध वापरून त्यांचा व्हिसा रद्द करायला लावला होता.

In reply to by विकास

यशोधरा Fri, 06/13/2014 - 16:06
मोदींविरुद्ध काही केले की लोकशाहीची बूज राखणे असते हे आपल्यासारख्या अनेक मिपा कारकीर्दी पाहिलेल्या मिपाकरास ठाऊक नाही, हे पाहून एक मिपाकर म्हणून... वगैरे वगैरे वगैरे :D

वेल्लाभट Fri, 06/13/2014 - 16:00
हा भावना हा प्रकार कमालीचा व्हल्नरेबल होत चाललाय आजकाल. आणि कशाला किती महत्व द्यायचं हे कळलंय का कधी आपल्याला? कुणी थोर व्यक्ती म्हणून गेला की `व्हॉट्स इन अ नेम' .... आपण नेम तर सोडाच त्यापाठची बिरुदं नी असल्या गोष्टींनाही डोंगराइतकं महत्व देतो. विचार, कार्य हे बाजूलाच पडतं नेहमी.

In reply to by वेल्लाभट

विकास Fri, 06/13/2014 - 19:08
सहमत. मला वाटतं एकदा होळीच्या निमित्ताने सगळ्या (सर्व जाती, भाषा, धर्म, विचार, इत्यादीच्या) ह्या "भावना विवश" पब्लीकला एकत्र करावे आणि संध्याकाळी सहा ते सकाळी सहा एक्मेकांविरुद्ध नुसते ठणाणा बोंबलायला लावावे. एकदा का असे ऐकून कान आणि डोके बधीर झाले की मग भावना दुखावणे बंद होईल अशी एक वेडी आशा...

In reply to by विकास

भृशुंडी Fri, 06/13/2014 - 21:41
एकदम बराबर बोल्या तुम! भावना दुखावल्या जाण्यावर अक्सीर इलाज!

इरसाल Wed, 06/18/2014 - 12:30
लुव्र संग्राहलयाच्या धर्तीवर एक मोठ्ठे गोडावुन बांधुन त्यात भारतात असणारे सगळे पुतळे/पुतळी, फ्लेक्स हलवावे. आणी ज्यांचे अस्मितांचे गळवे हळवे आहेत त्यांना तिथे जावुन दर्शन घ्यायला लावावे आणी त्यासाठी जबरदस्त तिकीटही लावावे. असेल प्रेम आस्था तर जातील तिथे आणी पुतळा विटंबना वगैरे प्रकार बंद होतील.

हुप्प्या गुरुवार, 06/26/2014 - 20:46
http://www.loksatta.com/pune-news/vinod-tavde-promises-to-make-cyber-law-for-anti-saint-content-632206/ संतांविरुद्ध लिहिण्याला प्रतिबंध करणारा कायदा बनवण्याचा प्रस्ताव विनोद तावड्यांनी मांडला आहे. वरवर बरा वाटणारा हा प्रस्ताव म्हणजे एक निसरडी वाट आहे. त्या वाटेने जाणारा उत्तरोत्तर घसरतच जाणार. संत कोणाला म्हणायचे, टीका कुठे संपते आणि बदनामी कुठे सुरु होते, श्रद्धेला पोचणारी ठेच मोजण्याचा काही व्यक्तीनिरपेक्ष मापदंड आहे का. अनेक मुद्दे आहेत. असल्या कायद्यांचा ब्ल्याकमेलिंगकरता, पैसे उकळण्याकरता पोलिसांकडून व अन्य समाजकंटकांकडून होण्याची शक्यता आहे. कुणी पंढरपूरच्या वारीत आढळणार्‍या अस्वच्छतेविरुद्ध नाक मुरडले तर त्याला तुकाराम वा ज्ञानेश्वरांविषयीची बदनामी म्हणून बोंबाबोंब होऊ शकते. असली घातक आश्वासने पूर्ण केली नाहीत तर समाजावर मोठे उपकार होतील.