कविता (नेहमीप्रेमाणेच) आवडली. आरती प्रभूंची कविता आठवते : "नाही कशी म्हणू तुला ..." त्या सुंदर कवितेत (आणि बाळासाहेब नि लताबाईनी अजरामर केलेल्या गाण्यात !) असा घरगुती, घरंदाज गोष्टी येतात. "नाही कशी म्हणू तुला , विडा रे दुपारी . परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी..." रामदासांच्या कवितेत नवपरिणित पत्नीच्या भावना "टच टच" वाजणार्या जोडव्यांच्या प्रतिमेत फारच सुंदर व्यक्त झाल्यात.
ग्रेसच्या एका लेखात "तांदूळ मोजणार्या मुली" येतात - "निवडणार्या" नव्हे , "मोजणार्या" . इथे तीळ आहेत. या "मोजण्यातून" अशा , संसाराच्या गाड्यात अडकलेल्या आणि प्रसंगी हळुवार भावनांची परवड होणार्या स्त्रियांची व्यथा अधोरेखित होते.
रामदास यांच्या कवितेतून पूर्वसुरींच्या दिग्गजांची आठवण येते. (मागच्या एका कवितेच्या बाबतीत जी ए / डाहाके यांचा मी उल्लेख केला होता.) आज सत्यकथा असती तर त्यांच्या कविता तिथे आल्या असत्या असे वाटते. मिसळपाववरील थिल्लरपणाचे आरोप करणार्याना या कविता दाखवाव्यात. तेव्हढे बस्स आहे. :)
सुंदर कविता.
>>आरती प्रभूंची कविता आठवते : "नाही कशी म्हणू तुला ..."
मलाही असेच वाटले..
त्याच बरोबर आरती प्रभूंची थोडिशी आक्रमक असलेली 'लव लव करी पातं' ही कविताही आठवली
त्यातले हे एक कडवे -
तट तट करी चोळी
तुट तुट गाठीची
उंबर्याशी जागी आहे
पारुबाई साठीची
- अभिजीत
टच् टच वाजती जोडवी
किण् -किण करती काकण
माडीवर कशी येऊ
दारात आईची राखण.
असे काही मला ठीक वाटते. पण स्वर ओढून ताणून जसे लिहिले आहे तसेही म्हणता येते :
टच् टच वाजती जोडवी
किण्ऽ -किणती काकण (किंवा किण् -किणतीऽ काकण)
माडीवर कशी येऊ
आई दारात राखण. (ठेका ठीक आहे, पण वाक्य अर्धवट वाटते. राखण=राखणदार असा अर्थ असल्यास ठीक आहे. पण हा अप्रसिद्ध अर्थ डोक्यात येईपर्यंत ओळ संपली नाही असे चुकल्याचुकल्यासारखे वाटते.)
>>ठेका ठीक आहे, पण वाक्य अर्धवट वाटते
सहमत. मी फक्त ठेक्याचाच विचार केला (नेहेमीप्रमाणे) :(
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
समस्या
कविता
तीळ
सालस भाव
छान
वा!
सूचना
असे काही
>>ठेका ठीक
कदाचित असे..
मस्त
सुंदर
रामदासराव,
आगायायायायायायाअययययय
मस्त कविता.
च्या मारी...
अती अवांतर
तिळा तिळा दार उघड
लाजरी उघडी कविता
मस्त
सुंदर कविता
अप्रतिम कविता !!
कविता