Skip to main content

राजजामातांचे विमान जमिनीवर येणार ?

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 30/05/2014 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
गांधी घराण्याचा आणि पर्यायाने देशाचा जावई असणारे श्रीमंत राबर्ट वदराजी सोनियाजींच्या राज्यात एखाद्या राज्याप्रमाणेच वावरत असत. त्यांच्याकरता खास अशी योजना होती की सामान्यांना लागू असणारी सुरक्षा तपासणी त्यांना लागत नसे. तसे बोर्ड तमाम भारतीय विमानतळावर होते. बाकी मंडळी ज्यांना अशी सवलत असते त्यांना विशिष्ट पदाकरता असते. त्यामुळे ह्या बोर्डावर त्या पदाचा उल्लेख असे. म्हणजे माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री वगैरे. केवळ राजजामातांचा उल्लेख निव्वळ नावाने होत असे. http://superblog.crazyengineers.com/wp-content/uploads/2012/01/Robert-V… भारतीय लोकशाहीविषयी आदर असणार्‍या कुठल्याही भारतीय नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशी ही खाशी सवलत होती. कुठलाही सामान्य माणूस केवळ राजघराण्याशी संबंध प्रस्थापित करून आपले स्थान उंचावू शकतो असा दिव्य संदेश ह्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणार्‍या राष्ट्राने दिला होता. तर तूर्तास राजघराण्याचे दिवस फिरल्यामुळे ही राजसवलत आता काढून टाकण्याचे कुटिल कारस्थान शिजते आहे. तमाम देशप्रेमींनी मोठ्ठे मोर्चे काढून, राजघाटावर आंदोलन करून ह्या धर्मांध शक्तींचा विरोध करून हा डाव हाणून पाडला पाहिजे. राजजामात हे राजजामातच रहाणार. निवडणुका, सरकार ह्यांचा त्यावर परिणाम होऊ शकत नाही. जब तक सूरज चांद रहेगा वद्रा तेरा नाम रहेगा! http://ibnlive.in.com/news/robert-vadra-may-lose-the-privilege-of-not-b…

वाचने 24284
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

तुला मेल्या हसायला काय झाले? आम्हाला चक्क आत्मशून्य साहेबांकडून वा.दि.शु. मिळाल्या.... तुला टूक टूक....

In reply to by जेपी

पण माहीत होतं तुम्ही "का ?" हां प्रश्न मनी पकड़नार म्हणून उत्तर सोपे आहे दोन शहाणी मानसे चर्चा करत असताना पाळायचा तो संकेत आहे

In reply to by जेपी

अजुन वाचला नाही ? असो. तुम्ही रोंबर्ट वाद्राचा राग मिपावर का काढताय ? त्याने तुमचे काय घोडे मारले आहे ?

In reply to by आत्मशून्य

नायबा त्या वाद्रान मारायला माझ्याकड घोड नाय, गाईम्हशी आन कोंबड्या हायत. आन म्या मिपावर कुट रागावलोय.मी तर अक्कलशून्य लोकांवर रागावलोय.

In reply to by जेपी

जस डोण्ट डु एनी क्रेजी अन स्टुपिड ओखय ? ठीक आता असे आहे की आपण चिडलेले असल्यामुळे मुळात आपण का कोणावर अन कशासाठी चिड्लो आहोत हे आपल्या ध्यानात येत नाहिये एकदा का तुम्ही या संकटातुन सलामत बाहर आलात की मुक्त प्रभाव आपोआप नाहीसा होइल ठीक आहे चिडू नका घाबरू नका मिपाकर तुमचा सोबत आहेत. आम्ही तुम्हाला नक्कीच मनाशान्ति मिळावि म्हणुन प्रार्थना करू. प्राथना का ? तर अर्थातच अब दवाकी नहीं दुवाकी जरुरत हय आपको

In reply to by आत्मशून्य

े मग तुम्ही कोणालाहि अक्कलशून्य ठरवु लागता. जसे उद्या मुविन्ना अक्कल शून्य म्हणाल, मी म्हणेन नॉनसेन्स ही इज डिफरंट केस, तुम्ही वल्ली, धन्या, मी इतकेच काय स्वत: लाही अक्कलशून्य म्हणाल. मी हेच म्हणेन नॉन सेन्स पण मला एक मिपाकर म्हणुन तुमची अवस्था आवडणार नाही.. वेळीच स्वत: ला संभाला. आमच्या प्रार्थ्ना सोबत आहेत

In reply to by आत्मशून्य

तुमी वल्लीदा, धन्याला, आणी मला स्वत:च्या लायनीत आनु नका . त्यांची आन आमची अक्कल अजुन शून्य झाल नाय. आन ही प्राथ्र्ना कोन आण मला का सोबत करतेय.

In reply to by जेपी

आणललेे नाहि हे उमजले की तुम्ही नोर्मल झाला समजा. तो पर्यन्त शो मस्ट गो ओन. तुम्ही नॉर्मला येइ परेंत मदत केल्या जाइल

In reply to by जेपी

आणललेे नाहि हे उमजले की तुम्ही नोर्मल झाला समजा. तो पर्यन्त शो मस्ट गो ओन. तुम्ही नॉर्मला येइ परेंत मदत केल्या जाइल

In reply to by कानडाऊ योगेशु

एका पायावर तयार म्हणतात इथे एका अक्षराचाचे चेतुकडे पडायची केविलवाणी वेळ आलेली आहे. चर्चा घसरत वादरांच्या विमान गमनातून भरकटत आहे

In reply to by शशिकांत ओक

वाड्रा अथवा राहुल गांधी शब्द ट्नकुन निघायचा अवकाश..... मिपा वरील त्यांचे चाहते चेकाळलेच समजा. आणि हो मुक्त विहारी (राहुल) गांधीगिरी करतात हे मी सप्रमाण सिध्द करू शकतो.

In reply to by आत्मशून्य

ओखय. मुझे दवा और दुवा की जरुरत नै, दारु की जरुरत है. असले अक्कलशून्य प्रतिसाद वाचुन चिड नाय येत. उलट मनोंरंजन होते. बाकी माज्याकड अजुन अर्धा तास आहे. काय राहिल असल तर सांगुन टाका.

In reply to by आत्मशून्य

कोन चिडलय ते कळल. आणी दोन दोन वेळेस प्रतिसाद देत जाऊ नका. का ट्युब उशीर पेटते ? सांगा गाय म्हशी कोबंड्या सोबत चांगल्या ट्युब पण इकतो.तुमच्या साठी खास पाठवतो.

In reply to by जेपी

एकदा तुम्ही म्हणता तुम्ही चिड्लाय नंतर म्हणता चिड्लो कुटे मनोरंजन होतय ? काय तसमजत नाही काय नक्की काय झालय ? ट्यूब निस्ती उघडझाप करती आहे का ? नक्किःच उडेल मग घ्या बसवून दूसरी नाहीतरी तोतुमचा उद्योग आहे म्हणता ते आता लक्षात आले.

In reply to by आत्मशून्य

की आणखी कोनी ? बिसनेस कमी असेल तर भलत्या ठिकाणाला मध्यवर्ती समजणार्या पीपल ना कोंटेक्ट करा.... कामा सोबत सामान शीलं व्यसनेषु सख्यम धर्तीवर कट्याची सोय्ही होऊं जैल तुमच्या आहात कुठे ?

In reply to by आत्मशून्य

पोरी भांडताना पण इतका "वड्याचे तेल वांग्यावर काढायचा प्रकार करत नाहित नाहीत" :)

+413512

In reply to by यशोधरा

चालेल .. पण मेणबात्त्यांऐवजी उदबत्त्या वापरूया . तेव्हढीच बचत . आणि अजून असे किती मोर्चे काढायला लागतील देव जाणे. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

गांधी घराणे देशाकरता किती मोठमोठे त्याग करते ते पुन्हा अधोरेखित केले गेले. ह्याकरता बिटिया प्रियांकाला भारतरत्न देण्यात यावे आणि श्रीमंत राबर्ट वद्राजींचे नाव एखाद्या फर्मास विमानतळाला देण्यात यावे! देश ही ह्या खानदानाची वैयक्तिक जहागीर असताना इतका मोठेपणा दाखवणे हे केवळ राजघराण्यालाच जमते. चहावाले वगैरे येरागबाळ्यांचे तेथे काम नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

प्रियांकाची बातमी वाचली तेंव्हा "कांगावखोर" हा शब्द आठवला. भारतीय कायद्याप्रमाणे, माजी पंतप्रधानाच्या कुटूंबियांना नंतरची दहा वर्षे अशी सुरक्षा मिळते. म्हणजे तसे देखील बघायचे तर सोनीयांना देखील त्या कारणासाठी ही सुरक्षा मिळण्याची गरज नाही. मोदींच्या पत्नीला देखील साधी म्हणजे पाच पोलिस (त्यातील एकाकडे रायफल!) असली सुरक्षा दिल्याचे आणि मोदींच्या आईस अजिबातच सुरक्षाकवच देण्यात आलेलेल नसल्याचे वाचले.

In reply to by विकास

माजी पंप्र रागां यांच्या हत्येनंतर समस्त गांधी कुटुंबियांना आजन्म एसपीजी सुरक्षा देण्यात आली आहे असे वाचले होते. माझ्या माहितीप्रमाणे समस्त गांधी कुटुंबिय, माजी पंप्र अटलबिहारी वाजपेयी आणि (माजी) पंप्र ममो सिंग यांनाच एसपीजी सुरक्षा दिली गेली होती. आता माजी पंप्र ममो सिंगचे माहित नाही. :) त्यामुळे उद्या प्रियांका गांधीच्या मुलीच्या मैत्रिणीच्या मावस/चुलत भावा/बहिणीला सुध्दा अशीच सुरक्षा दिली तर नवल वाटायला नको. :)

अय्या माहीतच नव्हते. आपण बातमी इथे चिकटवलीत हे फार छन केलेत

मुळात कोणाला सिक्युरीटी द्यावी हा निर्णय राजकीय असु नये. त्यामुळे सरकारने घेतलेली सद्य भुमिका योग्य आहे.

परमआदरणीय महापराक्रमी वद्राजींची सुरक्षा व्यवस्था अबाधित राहिल अशी लक्षणे दिसत आहेत. हे वाचून आम्ही धन्य झालो! भारत काही इतका भिकेला लागलेला नाही की भारताचे एकमेव राजघराणे व त्यांचे नातेवाईक ह्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी आपल्या खिशातून करणे त्याला जड जाईल. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Sonia-Robert-Vadra/articl…

मा़झ्या माहितीप्रमाणे रॉबर्टला त्याच्या बरोबर साला, पत्नी किंवा सासूबाई असल्यासच ही सोय लागू होती/आहे. पण प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी किती काटेकोरपणे होत होती ते देव जाणे!