सर्व वास्तु पांडवकालीन कश्या ?
आपण कोणत्या ही ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) पहायला गेलात तर तेथील स्थानिक रहिवाशी ती वास्तु पांडवकालीन आहे असा उल्लेख करतात.
माझे इतिहासाचे जे वाचन झाले ते थोडेसेच, आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा योगही जास्त नाहिये.
आज पर्यंत जेवढ्या ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) गोष्टी पहिल्या, स्थळांचा इतिहास स्थानिक लोकांकडुन ऐकला त्यावरुन एक अनुमान निघते की या सर्व वास्तु पांडवांनी त्यांच्या वनवासातील काळात ते इथे होते तेव्हा बांधल्या आहेत.
आता पांडवांना जो वनवास झाला तो १२ वर्षाचा आणि एक वर्षाचा एकांतवास होता. त्यानंतर ते कौरवांशी लढाई मध्ये गुंतले आणि जेव्हा युधिष्ठीर राजा झाला तेव्हा त्याने केलेल्या राज्यकारभारातील काळात इतर पांडव त्याच्या बरोबरीने होते. ही एवढी शिक्षेची १३ वर्षे सोडली तर पांडव हस्तिनापुर सोडुन बाहेर गेलेले नाहित.
मग आता प्रश्न असा की एवढी देवळे, लेण्या त्यांनी कधी बांधल्या. मग त्यात लोणावळ्याची एकवीरा देवी, अंबरनाथचे शंकर मंदिर, दाभोळची चंडिकादेवी, नुकत्याच अतिवास यांनी केलेल्या भीमनी घंटींचा उल्लेख.
आणि इतरही बरेच काही मंदिरे, वास्तु,लेण्या ज्या पांडवांनी बांधल्या असे सर्रास सांगितले जाते त्या आल्या.
औंढा नागनाथ हे मंदिर तर एका रात्रीत बांधुन पुर्ण झाले असे म्हटले जाते.
मग फक्त एकांतवासचे एक वर्षाच्या काळात भारतातील बहुतेक सर्व राज्यांना पांडवांनी भेटी दिल्या होत्या काय? आणि एकांतवास भंगु नये म्हणुन ते जर सतत जागा बदलत असतील तर किती कमी वेळात हे बांधकाम झाले असेल?. ( पण एकांतवासात पांडव हे विराट राजाच्या दरबारी आश्रयाला होते.)
का त्यांनी फक्त कोनशीला बसवीली आणि नंतर ते बांधकाम तिथल्या स्थानिक लोकांनी बांधकाम क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मदतीने पुर्ण केले.
कारण मुळात असे कोरिव बांधकाम करायला अनेक वर्षे लागतात. कारण ताजमहाल बांधायला ही ३० वर्षाच्या वर काळ लागला होता तेही हजारो मजुर असताना आणि कुशल कारागिर असताना.
मग बांधकाम क्षेत्रातील कुशलता ५ पांडवांपैकी कोणत्या पांडवाकडे होती? कारण गुरुकुलातले शिक्षण तर शस्त्रविद्या संबंधी झाले होते.
जाणकार लोक काही प्रकाश टाकतील काय?
प्रतिक्रिया
ते नै सांगता येत. असतीलही
धन्यवाद. कुशाणांचे मांडलिक
हो ना. साधारण इसवी सनाच्या
इंटरेस्टिंग! साला भारतीय
बॅट्या साहे,, वल्ली साहेब
पुराणातील वंशावळी
ते माहित नै.
पुराणातून अनेक वंशावळी
अर्र लिंक गायबली वाटतं.
पार्गिटर साहेबाचे काम
...शंभरेक वर्षांपूर्वीच्या
...शंभरेक वर्षांपूर्वीच्या प्रचंड बाडांमधे अगदी डीटेलवार माहिती, चित्रे, खेडेगावांचे वर्णन, तिथली लोकसंख्या (आता अगदी हास्यास्पद वाटणारी), उद्योगधंदे, वगैरे सापडले.हा पाश्चिमात्यांचा गुण आणि त्याबरोबर त्यांचे संघटनकौशल्य कौतूकास्पद आहे. त्यांना धडाडीने आणि चिकाटीने केलेल्या जगप्रवासाची साथ देवून सगळा वसाहतवादाचा कालखंड निर्माण केला गेला.टोपीकरांनी इतके प्रचंड काम
याला कारण त्यांचा राज्यविस्तार आहे.
इन जण्रल युरोपात
डॉक्युमेंटेशनची भारतीय परंपरा
तुम्ही पु ना ओकांचे शिष्य काय
नाही हो
प्रगत मेंदू हेच आमचे साधन आहे
आपला प्रोब्लेम
मिपा हे साधन उत्तम रित्या
व्यनी चा चपखल पणे वापर करावा
चालूद्या.
हे सर्व लिखाण भूर्जपत्रावर
मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे!
"मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे
आयला...किती वेळ वाट बघायची??
उशिराबद्दल माफ करावे
सोंड असलेला माणूस शोधून
हा ग्रंथ वेदव्यास यांनी
टोपीवाले इतिहास किंवा इतर
_/|\_
....... आपल्याशी याबद्दल एकदा चर्चा करायची आहे.
हाहाहा. चर्चा तर होणारच.
मूळ प्रश्न अजिबात अनुत्तरित
प्रश्न खरा आहे ....
जळ्ळं .....
जळ्ळं....हे पण मेल्या त्या
हेच तर मी म्हणतोय. भारतीय
कळतय हो कळतय सगळ्यांना...
भारतीय लोकाना भारतीय गोष्टींपेक्षा "इंपोर्टेड" गोष्टींचे जास्त..
इंपोर्टेड गोष्टि त्यान्च्या
हेच!
ही कल्पना फार छान आहे.
तात्पर्य...
लिंका शोधायचा बराच प्रयत्न
जाणकारांनी त्यांचे लेखन मराठी
त्यांच्याबद्दलची माहिती मराठी
वल्लीसाहेब, मग घ्याच मनावर हे
सर्वात जुन्या हिंदू लेण्या
पुण्यात गोखलेनगरच्या आसपास
Pagination