प्रति,
प्रादेशिक परिवहन अधिकारी
विषय: रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल अभिनंदन आणि आभार
माननीय महोदय,
सर्वप्रथम आपल्याला आणि समस्त वाहतुक नियंत्रकांना माझा सप्रेम नमस्कार. नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. रस्ता सुरक्षा ही खरोखरच किती महत्वाची गोष्ट आहे याची जाणीव खरं तर आज प्रत्येकाला होणं गरजेचं आहे. या सप्ताहानिमित्त जागोजागी वाहतुक नियमांची जाणीव व माहिती करून देणारे फलक आपण उभारता, रस्त्यांवर वाहतुक नियंत्रकांची नेहमीपेक्षा जास्त संख्या असते, ते नियंत्रक वाहतुक नियंत्रित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. परंतु आपण माझ्या या मताशी कदाचित सहमत असाल की त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात. याला कारण ते नव्हेत; तर बेशिस्त वाहन चालवणारी असंख्य जनता आहे, जिला नियंत्रित ठेवता ठेवता त्यांच्याही नाकी नऊ येत असावेत.
नुकताच माझा एक अनुभव थोडक्यात सांगतो. मी एकदा एका सिग्नल वर गाडीत बसलेला होतो, तेथील वाहतुक नियंत्रक हाताने त्या सिग्नल वरील एका बाजूस थांबण्याचा इशारा करत होता, तरीही जवळपास प्रत्येक गाडीचालक, व दुचाकीस्वार नियंत्रकाला न जुमानता सिग्नल तोडत होते, आणि तो एकटा नियंत्रक त्या ठिकाणी ते थांबवण्यास हतबल ठरत होता. मला त्याची खरोखर दया आली आणि कौतुकही वाटलं, कारण तो तरीही हताश न होता तिथे वाहतुक नियंत्रित करत होता, आपली जबाबदारी पार पाडत होता.
आज लोकांना खरंच शिस्त लावायची नितांत गरज आहे, किंबहुना जर तसं झालं नाही, तर कदाचित पुढे सगळाच गोंधळ माजेल, असं चित्र आहे. मला बरेचदा असं जाणवतं, की कुठेतरी वाहतुक नियमांची अंमलबजावणी, किंवा त्यांच्या उल्लंघनाबद्दलचा असलेला दंड याच्या अंमलबजावणीत ढिलाई होत आहे. तसं कदाचित नसेलही, मी चुकीचा असेन, परंतु तसंच नेहमी बघायला मिळतं म्हणून हे पत्र.
कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेले अनेक सिग्नल अनेकदा बंद असलेले बघायला मिळतात. ते चालू रहाणं अत्यंत गरजेचं आहे. तरंच ते पाळले जाऊ शकतात. तसंच आजकाल सिग्नल वर झेब्रा क्रॉसिंगला कुणीच थांबलेलं दिसत नाही. त्यामुळे म्हातारेच नव्हे तर तरुणांनाही गोखले रोड, तीन हात नाका, टेंबी नाका यासारखे भाग पार करणं महाकठीण झालंय. तिथे नियंत्रकांचा जाच नसल्यामुळे कुणालाच तिथे थांबायची बुद्धी, बंधन, होत नाही. जर आर.टी.ओ. कडून सुरक्षा सप्ताहापुरतेच नाही, तर आणखी प्रदीर्घ काळ काही बोधपर फलक लावण्यात आले; जेणेकरून लोकांना कुठेतरी मनात असं वाटेल की आपण वाहतुकीचे नियम खरंच पाळायला हवेत, तर फार बरं होईल. त्यांनी ते न पाळल्यास त्यांना ते समजावण्यासाठी, दंड करण्यासाठी नियंत्रक असतीलच.
केवळ वाहतुक नियंत्रकांची भीती म्हणून नियम पाळले जाऊ नयेत तर ती शिस्त स्वयंशिस्त असावी असं मला मनापासून वाटतं. यासाठी वाहन चालवायचा परवाना देतेवेळी एक लेखी परीक्षा, जिची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, जिथे कुणालाही सूट नसेल अशी असायला हवी असं माझं मत आहे. किंवा परवाना पुनर्वैध करतेवेळीही काही उजळणीपर चाचण्या व्हाव्यात असंही वाटतं.
दंडाची रक्कम देऊन, पावती घेऊन, जर वाहनचालक सुटू लागला, तर केवळ नियमांचं उल्लंघन, त्याचा दंड, आणि पुन्हा उल्लंघन अशी प्रक्रिया चालू रहाते. तिथे त्या नियमाची, तो न पाळल्यास असलेल्या धोक्याची जाणीव होतच नाही. तेंव्हा नियंत्रकाने नुसता दंड न करता, त्या नियमाची माहिती, त्याचं महत्व, मैत्रीपूर्वक, एखाद्या सल्लागारासारखं त्या उल्लंघनकर्त्याला समजावलं, तर खरोखर लोकांच्या मनात ही स्वयंशिस्त जागृत करण्यास खूप मदत होईल, असं मला वाटतं. वाहतुक नियंत्रक हा तुमच्या आमच्यातलाच जर सर्वांना वाटला, तर हे अधिक प्रभावीपणे शक्य होईल.
आणखी एक गोष्ट मला सुचवावीशी वाटते, ती अशी, की जो नियम मोडतो त्याला नियंत्रकामार्फत शासन होतं; परंतु जो वाहतुकीचे नियम पाळतो त्याचं जर कौतुक केलं, उदाहरणार्थ, एखाद्या गाडीवाल्याने सिग्नलचं काटेकोरपणे पालन केलं, सिग्नल हिरवा होईपर्यंत तो झेब्रा क्रॉसिंगच्या आत थांबून राहिला, आणि तेथील वाहतुक नियंत्रकाने जर त्याचं कौतुक केलं, तर हे बघून कदाचित तो नियम मोडणा-यांनाही कुठेतरी नियम पाळायची इच्छा होईल; आणि अशी भावना अधिकाधिक लोकांच्या मनात जागृत होणं हेच परिवहन नियंत्रण कार्यालयाचं खरं यश असेल.
एक सामान्य वाहनचालक म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आणि सुचवायचं आहे; की कुठेतरी, वाहतुक नियंत्रकाची भूमिका बदलायला हवी, त्यात एक सकारात्मक वृद्धी व्हायला हवी, ज्यायोगे लोकांच्या मनातील वाहतुक नियंत्रकाची प्रतिमा आणखी आदराची होईल, अभिमानाची होईल, आणि त्यातूनच रस्ता सुरक्षा, किंवा वाहतुक नियमन, या गोष्टींना ख-या अर्थाने गती मिळेल.
आपलं पुन्हा एकदा अभिनंदन, आणि आपण अव्याहत करत असलेल्या कार्याबद्दल अनेक आभार.
आपला नम्र,
माननीय महोदय,
सर्वप्रथम आपल्याला आणि समस्त वाहतुक नियंत्रकांना माझा सप्रेम नमस्कार. नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. रस्ता सुरक्षा ही खरोखरच किती महत्वाची गोष्ट आहे याची जाणीव खरं तर आज प्रत्येकाला होणं गरजेचं आहे. या सप्ताहानिमित्त जागोजागी वाहतुक नियमांची जाणीव व माहिती करून देणारे फलक आपण उभारता, रस्त्यांवर वाहतुक नियंत्रकांची नेहमीपेक्षा जास्त संख्या असते, ते नियंत्रक वाहतुक नियंत्रित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. परंतु आपण माझ्या या मताशी कदाचित सहमत असाल की त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात. याला कारण ते नव्हेत; तर बेशिस्त वाहन चालवणारी असंख्य जनता आहे, जिला नियंत्रित ठेवता ठेवता त्यांच्याही नाकी नऊ येत असावेत.
नुकताच माझा एक अनुभव थोडक्यात सांगतो. मी एकदा एका सिग्नल वर गाडीत बसलेला होतो, तेथील वाहतुक नियंत्रक हाताने त्या सिग्नल वरील एका बाजूस थांबण्याचा इशारा करत होता, तरीही जवळपास प्रत्येक गाडीचालक, व दुचाकीस्वार नियंत्रकाला न जुमानता सिग्नल तोडत होते, आणि तो एकटा नियंत्रक त्या ठिकाणी ते थांबवण्यास हतबल ठरत होता. मला त्याची खरोखर दया आली आणि कौतुकही वाटलं, कारण तो तरीही हताश न होता तिथे वाहतुक नियंत्रित करत होता, आपली जबाबदारी पार पाडत होता.
आज लोकांना खरंच शिस्त लावायची नितांत गरज आहे, किंबहुना जर तसं झालं नाही, तर कदाचित पुढे सगळाच गोंधळ माजेल, असं चित्र आहे. मला बरेचदा असं जाणवतं, की कुठेतरी वाहतुक नियमांची अंमलबजावणी, किंवा त्यांच्या उल्लंघनाबद्दलचा असलेला दंड याच्या अंमलबजावणीत ढिलाई होत आहे. तसं कदाचित नसेलही, मी चुकीचा असेन, परंतु तसंच नेहमी बघायला मिळतं म्हणून हे पत्र.
कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेले अनेक सिग्नल अनेकदा बंद असलेले बघायला मिळतात. ते चालू रहाणं अत्यंत गरजेचं आहे. तरंच ते पाळले जाऊ शकतात. तसंच आजकाल सिग्नल वर झेब्रा क्रॉसिंगला कुणीच थांबलेलं दिसत नाही. त्यामुळे म्हातारेच नव्हे तर तरुणांनाही गोखले रोड, तीन हात नाका, टेंबी नाका यासारखे भाग पार करणं महाकठीण झालंय. तिथे नियंत्रकांचा जाच नसल्यामुळे कुणालाच तिथे थांबायची बुद्धी, बंधन, होत नाही. जर आर.टी.ओ. कडून सुरक्षा सप्ताहापुरतेच नाही, तर आणखी प्रदीर्घ काळ काही बोधपर फलक लावण्यात आले; जेणेकरून लोकांना कुठेतरी मनात असं वाटेल की आपण वाहतुकीचे नियम खरंच पाळायला हवेत, तर फार बरं होईल. त्यांनी ते न पाळल्यास त्यांना ते समजावण्यासाठी, दंड करण्यासाठी नियंत्रक असतीलच.
केवळ वाहतुक नियंत्रकांची भीती म्हणून नियम पाळले जाऊ नयेत तर ती शिस्त स्वयंशिस्त असावी असं मला मनापासून वाटतं. यासाठी वाहन चालवायचा परवाना देतेवेळी एक लेखी परीक्षा, जिची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, जिथे कुणालाही सूट नसेल अशी असायला हवी असं माझं मत आहे. किंवा परवाना पुनर्वैध करतेवेळीही काही उजळणीपर चाचण्या व्हाव्यात असंही वाटतं.
दंडाची रक्कम देऊन, पावती घेऊन, जर वाहनचालक सुटू लागला, तर केवळ नियमांचं उल्लंघन, त्याचा दंड, आणि पुन्हा उल्लंघन अशी प्रक्रिया चालू रहाते. तिथे त्या नियमाची, तो न पाळल्यास असलेल्या धोक्याची जाणीव होतच नाही. तेंव्हा नियंत्रकाने नुसता दंड न करता, त्या नियमाची माहिती, त्याचं महत्व, मैत्रीपूर्वक, एखाद्या सल्लागारासारखं त्या उल्लंघनकर्त्याला समजावलं, तर खरोखर लोकांच्या मनात ही स्वयंशिस्त जागृत करण्यास खूप मदत होईल, असं मला वाटतं. वाहतुक नियंत्रक हा तुमच्या आमच्यातलाच जर सर्वांना वाटला, तर हे अधिक प्रभावीपणे शक्य होईल.
आणखी एक गोष्ट मला सुचवावीशी वाटते, ती अशी, की जो नियम मोडतो त्याला नियंत्रकामार्फत शासन होतं; परंतु जो वाहतुकीचे नियम पाळतो त्याचं जर कौतुक केलं, उदाहरणार्थ, एखाद्या गाडीवाल्याने सिग्नलचं काटेकोरपणे पालन केलं, सिग्नल हिरवा होईपर्यंत तो झेब्रा क्रॉसिंगच्या आत थांबून राहिला, आणि तेथील वाहतुक नियंत्रकाने जर त्याचं कौतुक केलं, तर हे बघून कदाचित तो नियम मोडणा-यांनाही कुठेतरी नियम पाळायची इच्छा होईल; आणि अशी भावना अधिकाधिक लोकांच्या मनात जागृत होणं हेच परिवहन नियंत्रण कार्यालयाचं खरं यश असेल.
एक सामान्य वाहनचालक म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आणि सुचवायचं आहे; की कुठेतरी, वाहतुक नियंत्रकाची भूमिका बदलायला हवी, त्यात एक सकारात्मक वृद्धी व्हायला हवी, ज्यायोगे लोकांच्या मनातील वाहतुक नियंत्रकाची प्रतिमा आणखी आदराची होईल, अभिमानाची होईल, आणि त्यातूनच रस्ता सुरक्षा, किंवा वाहतुक नियमन, या गोष्टींना ख-या अर्थाने गती मिळेल.
आपलं पुन्हा एकदा अभिनंदन, आणि आपण अव्याहत करत असलेल्या कार्याबद्दल अनेक आभार.
आपला नम्र,
वाचने
13967
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता शामच्या आईनेच शामला
एक प्रष्ण
असेच म्हणतो.
In reply to एक प्रष्ण by अनिरुद्ध प
होय
In reply to एक प्रष्ण by अनिरुद्ध प
वेल्लाभट
In reply to होय by वेल्लाभट
यो !
In reply to वेल्लाभट by विटेकर
हायला!!
In reply to होय by वेल्लाभट
__/\__
In reply to हायला!! by सूड
वाहतूकीत केवळ दंडाने शिस्त
ज्या देशात असले (अवैध
In reply to वाहतूकीत केवळ दंडाने शिस्त by डॉ सुहास म्हात्रे
कल्पना आवडली
In reply to ज्या देशात असले (अवैध by काळा पहाड
त्या स्नायपरलाच पटवुन ठेवतील
In reply to ज्या देशात असले (अवैध by काळा पहाड
अगदी अगदी!!
In reply to ज्या देशात असले (अवैध by काळा पहाड
एक्सलंट आयडिया
In reply to वाहतूकीत केवळ दंडाने शिस्त by डॉ सुहास म्हात्रे
आपण मोठ्ठे कधी होणार ?
तुम्ही "खुलभर दुधाची कहाणी"
In reply to आपण मोठ्ठे कधी होणार ? by प्रसाद गोडबोले
खरंय
In reply to तुम्ही "खुलभर दुधाची कहाणी" by आदूबाळ
अराजकाला आमंत्रण???
In reply to आपण मोठ्ठे कधी होणार ? by प्रसाद गोडबोले
अगदी बरोबर
In reply to अराजकाला आमंत्रण??? by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to अराजकाला आमंत्रण??? by डॉ सुहास म्हात्रे
असो
In reply to अराजकाला आमंत्रण??? by डॉ सुहास म्हात्रे
अशा को-ऑपरेटिव्ह
In reply to असो by प्रसाद गोडबोले
को-ऑपरेटिव्ह
In reply to अशा को-ऑपरेटिव्ह by आदूबाळ
"पाप-पुण्य" ही धार्मिक
In reply to को-ऑपरेटिव्ह by प्रसाद गोडबोले
हानिकारक कृती (उदा. गाडी
In reply to "पाप-पुण्य" ही धार्मिक by आदूबाळ
दारु पिऊन "गाडी चालवणे" ह्या
In reply to हानिकारक कृती (उदा. गाडी by प्रसाद गोडबोले
एकनाथ एका पैशाची चूक काढायला
In reply to दारु पिऊन "गाडी चालवणे" ह्या by आदूबाळ
काय करणार..."शेंवटीं आम्हीं
In reply to एकनाथ एका पैशाची चूक काढायला by बॅटमॅन
शेंवटच्या शब्दात एक अनुस्वार
In reply to काय करणार..."शेंवटीं आम्हीं by आदूबाळ
>>दारु पिऊन "गाडी चालवणे"
In reply to दारु पिऊन "गाडी चालवणे" ह्या by आदूबाळ
(No subject)
In reply to दारु पिऊन "गाडी चालवणे" ह्या by आदूबाळ
असहमत
In reply to असो by प्रसाद गोडबोले
आपली लायकी
ह्म्म... माझ्या डोक्यात
लाखोली......येते डोक्यात. असो
In reply to ह्म्म... माझ्या डोक्यात by मदनबाण
बस मेड इन मोहाली
In reply to ह्म्म... माझ्या डोक्यात by मदनबाण
क्लास्इक व्हिडीयो
In reply to ह्म्म... माझ्या डोक्यात by मदनबाण
"बाय को-ओपरेटीव्ह
In reply to क्लास्इक व्हिडीयो by प्रसाद गोडबोले
चाबूक आणी गाजर
हे बेस आहे
In reply to चाबूक आणी गाजर by मराठे
अप्रतीम उपाययोजना
In reply to चाबूक आणी गाजर by मराठे
गुणांकन पद्धत खरचं चांगली
वा!
In reply to गुणांकन पद्धत खरचं चांगली by दाते प्रसाद
प्रसाद, पूर्ण सहमत. हाच
In reply to गुणांकन पद्धत खरचं चांगली by दाते प्रसाद
पण आपल्याकडे जिथे
In reply to गुणांकन पद्धत खरचं चांगली by दाते प्रसाद
पण आपल्याकडे जिथे परवान्याशिवाय गाडी चालवतात तिथे ह्याला कोण जुमानेल ?ही वस्थुस्थिती आहे हे खरे आहे. म्हणूनच आपल्याकडे शासनाची (गव्हर्नन्सची) कमी आहे असे म्हणतात. उत्तम शासन म्हणजे (अ) योग्य कायदे, (आ) त्यांनुसार योग्य देखरेख व अंमलबजावणी, आणि (इ) सर्वात महत्वाचे म्हणजे ती अंमलबजावणी होत आहे याची सर्व जनांत जाणीव करून देणे (कारण कायद्याच्या अंमलबजावणीचा उद्देश "कायदा तोडला म्हणून शिक्षा करणे" यापेक्षा जास्त "कायदा तोडणे थांबावे" याकरिता असावा) या तीनही गोष्टींचे पालन. याचे एक उत्तम उदाहरण म्हणून सिंगापूर डोळ्यासमोर येते. भारतिय मंडळींचे भारतिय विमानतळावरचे वर्तन आणि आणि सिंगापूरच्या चांगी विमानळावरचे वर्तन यांच्या जमीनस्मानाचा फरक असतो... तोच माणूस भारतिय विमानतळावर परतला की बहुदा परत मूळपदावर येताना दिसतो. माझ्या माहितितले सर्वसाधारणपणे शिस्त-स्वच्छ्तेचे नियम पाळणारे पाश्चिमात्य देशातले नागरिकही सिंगापूरमध्ये जाताना जरा जास्तच सजग असतात ! याचे मुख्य कारण सिंगापूरमध्ये वर सांगीतलेल्या तीनही गोष्टी आहेत. आपल्याकडे पहिली बहुतेक असते, दुसरीची वानवा असते आणि तिसरी तर स्वप्नरंजन समजली जाते.१००% सहमत
In reply to पण आपल्याकडे जिथे by डॉ सुहास म्हात्रे
ह्म्म....
आपल्या खांद्याला धरुन गदागदा हालवून सांगायला हवे की लोक हो , हा देश आपला आहे, इथे आपण आपल्याच घरी राहात आहोत, आता राज्यकर्ते आपलेच लोक आहेत . आता आंदोलन , जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेअचे नुकसान म्हणजे आपलेच नुकसान आहे ! इंग्रज लोक निघून गेले आहेत.. उठा .. जागे व्हा !!!!आपले राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे एक लोचा झाला आहे , किंबहुना, आपल्याला राष्ट्रीय चारित्र्यच नाही. राज्यघटनेपासून सगळ्या सरकारी व्यवस्थांचे आपण धमाल कडबोळे केले आहे ! "सर्वधर्म समभाव" , पंचवार्षिक योजना, मिळमिळित परराष्ट्रीय धोरण आणि जितके जमेल तितके अंधानुकरण ! असल्या भंप़क आणि एत्तदेशीय नसलेल्या खुळ्चट कल्पना पुचाट कॉग्रेसी सरकारने राबविल्याने आमचे स्वत्व आणि संस्कृतीच हरवली आहे. म्हणजे आमचे कमरेचे सोडले आणि शेजारच्याचे अंगाला बसत नाही .. विचित्र दिसते .....असली काही स्थिती! बरं कोणी संस्कृती , प्राचीन परंपरा याबद्दल बोलू लागला की त्याला " भगवा दहशतवाद " करुन टाकायचे ! वास्तविक इंग्रजाना हाकलल्यावर आपली भाषा , आपली वेष- भूषा , आपली संस्कृती पुन्हा निर्माण करण्याची केवढी मोठी संधी आपण घालवली... आता भोगा त्या कर्माची फळे ! हे फक्त रस्त्यावरच्या रहदारीला लागू नाही .. जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू आहे .. कोणती गोष्ट आपल्याला हवी तशी आहे ? शिक्षण? आरोग्य? राजकारण ? विकास ? कायदा आणि सुव्यवस्था? महिला आणि बालकल्याण ? कॉन्ग्रेसी ( हा पक्ष नव्हे , वृत्ती आहे ) नेत्यांनी खा खा खाल्ले , आपल्या पोरांना ( त्यातून बायका, मुली आणि विधवा सूना ही सुटल्या नाहीत ) त्याच मार्गाला लावून नवी संस्थाने निर्माण केली .. यापेक्षा काहीही घडले नाही!!! आतापर्यन्त या हरामखोरांनी देश विकून खाल्ला नाही हे आपले नशीब ! जे काही चांगले ( थोडेफार ) घडले ते या देशावर परमेश्वराची दयाळू दॄष्टी आहे आणि सामन्य माण्सातील परमेश्वर अजून कुठे कुठे थोडा जागा आहे म्हणून ! हे दयाघना , अजून तुझ्या अवताराची वेळ आली नाही काय ?ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म
In reply to ह्म्म.... by विटेकर
धैर्य
यात मी आहे असे अभिमानाने
In reply to धैर्य by तिमा
मी. तुमच्याप्रमाणेच मलाही
In reply to धैर्य by तिमा
मी पण
In reply to धैर्य by तिमा
मी पण. मी पण ! जर कोणी हॉर्न
In reply to धैर्य by तिमा
मी पण थांबतो..
जे ब्बात !
In reply to मी पण थांबतो.. by विटेकर
धाग्यावरील माहितीत
चांगला धागा
अजुन एक जालीम उपाय म्हणजे
हा हा भारी...मुम्बैमधेतर
In reply to अजुन एक जालीम उपाय म्हणजे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मोबाईल वर बोलणार्या आणि