Skip to main content

मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?

लेखक टॉपगिअर्ड फिलोसॉफर यांनी गुरुवार, 16/01/2014 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-m… अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर मुस्लिमांच्या आणि इंग्रजांच्या राजवटीतही आमचे अधिकार सुरक्षीत होते जे स्वराज्यात काढून घेतले जातात असा पुजारी सेवेकरी लोकांचा सूर आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक मंदीरे आहेत, जिथे व्यवस्थापनाकडून अनागोंदी कारभार ,भ्रष्टाचार, दर्शनपास, पूजेसाठी व अभिषेकासाठी पुजार्यांकडून करण्यात येणारी सक्ती या सारख्या गोष्टींमुळे भाविक त्रस्त होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. परंपरागत हक्क असणारे, पुजेचे मानकरी बर्याचदा स्वतःच मंदीराचे खाजगी मालमत्तेप्रमाणे व्यवस्थापन करताना बघायला मिळते . अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारने प्रस्थापीत कायद्यात बदल करुन ताब्यात घ्यावे काय? असे ताबांतर करुन मंदीरे, देवस्थाने यांची परिस्थीती सुधारेल का एवढाच प्रश्न शिल्लक राहतो.....

वाचने 30944
प्रतिक्रिया 203

प्रतिक्रिया

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

कुठे वाचले होते ? कारण २००९ साली झाला इतकाच खर्च २०११ साली झाला असे गृहीत धरले तरी तो खर्च INR 8647.7 million (अक्ष्ररी : जाऊनद्या आता तुमचं तुम्हीच वाचा ) http://en.wikipedia.org/wiki/Haj_subsidy असे मलातरी कोणत्याही पेप्रात वाचायला मिळाले नाहीये , असे काही झाले असते तर किमान "द हिंदु " ने तरी नक्कीच छापले असते . आता तुम्ही कुठे छापुन आले होते ते शेयर कराच (तुमचे लॉजिक लक्षात आल्याने चर्चा संपली असे म्हणालो होतो , पण तुम्ही असा फुल्ल टॉस्स ताकल्यावर परत बॅटींगला यायची खुमखुमी आली . असो . आता मात्र चर्चा खरचं संपली .)

In reply to by प्रसाद गोडबोले

पवित्र कुराणाच्या नियमाने वागणारा मुस्लिम बांधव त्याच्या धर्माचरणाची बातमी करण्याच्या फंदात पडत नाही ,ते निस्वार्थीपणे हजचे पैसे परत करतात. पैसे परत केल्याची बातमी मी एका वर्तमानपत्रात वाचली होती ,आता त्याची लिँक सापडत नाहीए.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

म्हणजे सांगोवांगी अन वडाला वांगी. तुमचा गिअर मोडून पडला आहे ,पेट्रोल तर कधीचेच संपले होते.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

असे फुल्ल टॉस्स टाकु नका हो =)) ..... काम करु द्या , मी इन्कमटॅक्स भरला नाही तर सबसीडीला पैसे कमी पडतील =))

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

>>> पवित्र कुराणाच्या नियमाने वागणारा मुस्लिम बांधव त्याच्या धर्माचरणाची बातमी करण्याच्या फंदात पडत नाही पण धर्माचरणासाठी लाऊडस्पीकरवरून आवाज देतात त्याचं काय?

In reply to by श्रीगुरुजी

गणपती नवरात्र गरबा दिवाळीतले फटाके याबाबत मुस्लिम बांधवांनी णिषेध केला तर चालेल काय आपल्याला?तसेच आपणही त्यांना समजून घ्यावे...

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १०००% टॉपगिअर्ड थाप !

वर्ची लिंक वाच्ली नायका??? इनोदबी लैच झ्याक जमतया. का सप्नात कायबाय वाचून फकस्त डोस्क्यात आल्या त्या पूड्या सोडन्याला फिलोसोफि म्हंतात आसं वाटत तुमाला ?

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

>>> त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी ते पैसे परत केले होते असे वाचलेले. हे काँग्रेसच्या समाचारपत्रात वाचलेलं दिसतंय.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

सहमत. विमान तिकिटाची जी काय नॉमिनल किंमत असेल ती मुस्लिम स्वतःच्या खिशातूनच देतात. त्यांना सबसिडीचा एक रूपयासुद्धा हातात मिळत नाही.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

इस्लामिक फायनान्सबद्दल भलतेच अज्ञान दिसते..कुणा मुसलमानाचे स्टेट बँकेत समजा खाते असेल तर तो व्याज परत करेल ही शक्यता अतिशय म्हणजे अतिशय कमी आहे. असे एकही उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. पण अलीकडे इस्लामिक बँकिंग नावाचा प्रकार रूढ होऊ पाहतोय ज्यात व्याज इ.इ. ब्यान आहे. साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की मग बँकव्यवसाय चालणार कसा? कारण व्याज आकारणी हा तर ब्यांकेचा आत्मा आहे. तर त्याचे उत्तर असे की व्याजाच्या नावाखाली नेहमी जे काही घेतले जाते ते अन्य मार्गांनी आणि वेगळ्या लेबलखाली घेतले जाते. थोडक्यात हिशेब एकच. धर्म काही सांगो, अर्थस्य पुरुषो दासः हे आणि हेच खरे आहे.

In reply to by बॅटमॅन

व्याजाच्या नावाखाली नेहमी जे काही घेतले जाते ते अन्य मार्गांनी आणि वेगळ्या लेबलखाली घेतले जाते. थोडक्यात हिशेब एकच. धर्म काही सांगो, अर्थस्य पुरुषो दासः हे आणि हेच खरे आहे.
अगदी हेच्च लिहायला आलो होतो. बर्‍याच इस्लामिक ब्यांका स्विस रेसिडेंट असतात**, कारण काही विशिष्ट कँटन (स्विस जिल्हे) त्यांना चिक्कार करसवलती देतात. इस्लाममध्ये "कर चुकवू नये" वगैरे काहीतरी असतं. त्याचं काय करतात कोण जाणे! ** "त्या" स्विस ब्यांका या नव्हेत

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

त्यामुळे बहुतांश मुस्लिम बांधव व्याज बँकेला परत करतात असे मी पाहिले आहे.>> साफ खोटे आहे. पुराव्या द्या.

In reply to by मंदार दिलीप जोशी

मुद्दलाच्या दुप्पट व्याज मिळवायचा धंदा पठाण लोक करायचे. ते मुस्लिमच होते ना ब्वा?

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

मी एका बँकेत २ राज्ये आणि ५ शाखा, एक अ‍ॅडमिनि. ऑफिस एवढ्या जागी २५ वर्षे सर्व्हिस केली. एकाही मुस्लिमाने कधी व्याज परत दिलेले पाहिले नाही. उलट रत्नागिरीत एन आर आय ठेवी मोठ्या प्रमाणात मुस्लिम खातेदारांकडून येत असत. आणि ठेव रिन्यू करताना काही नियमांमुळे मधल्या कालासाठी कमी व्याज दिले तर आवर्जून विचारत असत. कोणीही खातेदारांनी जागरूक असणे चांगलेच, मला त्यात काही गैर वाटत नाही. तिथे धर्माचा काही संबंध येत नाही. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे गेले तर इस्लामिक देशांमधे बँका कायम तोट्यात चालल्या पाहिजेत कारण व्याजाच्या फरकातून मुख्यतः बँक चालवण्यासाठी पैसे येतात. मध्यंतरी कोणीतरी आर्थिक संस्थेने खास इस्लामिक म्युच्युअल फंडही काढला होता. डिव्हिडंड मिळाल्याशिवाय म्युच्युअल फंड कसा काय चालवता येईल?

In reply to by पैसा

ईस्लामिक देशात बँका फक्त सेव्हिंग अकांऊट चालवतात व नॉमिनल व्याज देतात, त्यांची भिस्त कर्जाच्या व्याजावर असावी.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

ईस्लामिक देशात बँका फक्त सेव्हिंग अकांऊट चालवतात व नॉमिनल व्याज देतात, त्यांची भिस्त कर्जाच्या व्याजावर असावी. वरचे वाक्य पाहून इतकेच खात्रीने सांगू शकतो की तुमचे इस्लामिक बँकिंगचे अज्ञान अगाsssध आहे ! त्यातले तीनही दावे इस्लामच्या शिकवणीविरुद्ध आहेत ! तुम्ही फक्त काल्पनिक बेजबाबदार दावे करण्याऐवजी जरी थोडासा आंतरजाल अभ्यास केलात (पोत्याने माहिती आहे तेथे) तरी तुमच्या चर्चेला थोडातरी विश्वासूपणा यायला मदत होईल आणि मिपासारख्या सार्वजनिक चौकात तुम्ही जी आयडी घेतलीत तिच्या नावाची लज्जा थोsssडितरी वाचू शकेल. बाकी लोकांचे मनोरंजन हाच हेतू असल्यास... लगे रहो ;)

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

हायला. ही तर टॉपगियर्ड थाप जाली की व वंगाळशेट ! ह्येन्ला आवरा आता नायतर ह्ये असल इस्लामविरुद्द लिवलं म्हनुन त्येच्या नावं फतवा निगुन गियर मोडित निगायचा. ल्येका, ल्येका, ल्येका, चारचौगात किति खोट ब्वोलून आपली इज्जत चौकात उघडि कराय्याची ? बाकी लोकबी कयबाय वाच्त्यात, त्येन्ला डोस्क अस्तया. त्येंच्यापुडं आप्ल रिकाम खोकं अस उगड नाय करायच प्वोरा. लोकं खो खो हसत्यात बाबा.

In reply to by पैसा

वेगळे आहे, आणि आता ते जगातील बर्‍याच फायनॅन्स सेंटरांत मूळ धरू लागले आहे (प्रचंड प्रमाणात पैसा इस्लामी जगात, मध्यपूर्वेत उपलब्ध असल्याने, त्यांच्यामागे धावणे जगाला जरूरी आहे आता!) ह्याच चर्चेत वर बॅटमॅन व आदूबाळ ह्यांनी ह्याविषयी माहिती दिलेली आहे ती पहावी. टॉफ्या खाऊ नयेत, प्रकृतिस अपायकारक असते :)

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

>>> बहुतांश मुस्लिम बांधव हज सबसिडी घेत नाहीत.. व्याज खाणे हे देखिल पवित्र कुराणाने वर्ज्य सांगितले आहे, त्यामुळे बहुतांश मुस्लिम बांधव व्याज बँकेला परत करतात असे मी पाहिले आहे. जबरदस्त खोटे वाक्य!

In reply to by प्रसाद गोडबोले

कुठल्याही समाजाच्या सणांवर, धार्मिक गोष्टींवर थोडाफार खर्च केला सरकारने तर बिघडले कुठे? तसे तर सरकार कुंभमेळ्या वरतीही करोडो रुपये खर्च करते.

In reply to by सचीन

अर्थात "पंढरपुरच्या मंदीरातुन कमाई करा आणि हज यात्रेला सबसीडी द्या " असंच तुम्हाला म्हणायचे आहे तर ?

In reply to by सचीन

मग ते करायला सरकार कशाला हवे ? मंदीर विहिंपच्या किंव्वा संघाच्या ताब्यात द्यायले हवे होते मग !

In reply to by सचीन

एक प्रष्ण आहे उत्तर मिळण्याची अपेक्षा सुद्धा आहे कुम्भमेळा केव्हा असतो? ज्याच्या साठी सरकार आपल्या सांगण्यापमाणे ईतका खर्च करते,तसेच त्याचा विदा दिलात तर उत्तमच.

In reply to by अनिरुद्ध प

सागर वैद्य, एबीपी माझा, Monday, 25 November 2013 16:16 नाशिकचा कुंभमेळा नाशिक : नाशिकमध्ये होणऱ्या आगामी कुंभमेळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले यांनी विरोध केलाय. उत्तरप्रदेशातून चित्रविचित्र अवस्थेत येणाऱ्या आणि गांजा पिणाऱ्या साधूंवर दोन हजार कोटी खर्च करण्याऐवजी ते पैसे विधायक कामांवर खर्च करावे असंही संभाजीराजेंनी म्हटलंय.. मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेली शिवशाहू यात्रा घेऊन रविवारी रात्री संभाजीराजे नाशिकमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी 2015 साली नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला विरोध केला. उत्तर भारतातून येणाऱ्या तथाकथित व्यसनींवर पैसे वाया घालण्याऐवजी ते जनतेला उपयुक्त ठरतील अशा विधायक कामांवर खर्च करावे अशी मागणी संभाजीराजेंनी यावेळी केली....

In reply to by सचीन

पुरोगामी सरकारची बदनामी करणारे आंधळे मोदी भक्त कुठल्या थराला जाऊन खोटं बोलतील याचा नेम नाहि. तिकडे ते टॉपगियर पवित्र कुराणाचा संबंध मोठ्या चलाखीने आतंकवादाशी जोडुन राहिले... आणि इकडे हे... चालु द्या.

In reply to by सचीन

कोर्टात साक्षीदार म्हणुन नाव काढणार तुम्ही,माझ्या माहीती प्रमाणे कुंभ मेळा हा बारा वर्षातुन एकदा येतो/असतो,आणि विदा द्या असे सांगीतल्या वर एखादी बातमी द्या असे नव्हे भारत स्वतंत्र झाल्या पासुन चा म्हणजे ईतक्या वर्षात किती खर्च झाला याचा अभ्यास उपयोगी पडला असता असो प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by अनिरुद्ध प

कुंभमेळा बारा वर्षातून एकदा येतो म्हणून २००० कोटी खर्च. १२ वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा नाशिकला १ वर्ष असतो.

In reply to by सचीन

हाज यात्रेचा खर्च काढा की. तो जास्त आहे हे उघडच आहे. कशाला वेस्ट करावे मग सरकारने पैसे हाजवर तरी?

In reply to by बॅटमॅन

हिंदु धर्मातील यात्रा , इतर विधीही स्वखर्चानेच करायचे असतात . असा नक्की लेखी नियम नसला तरी संकेत नक्कीच आहे

In reply to by सचीन

हजयात्रेला जाणा-या यात्रेकरूंना भारत सरकारतर्फे दिली जाणारी सबसीडी पुढील दहा वर्षात टप्याटप्याने संपवावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.पण कुंभमेळ्यावरील अफाट खर्चाचे काय?

In reply to by सचीन

तुम्ही आहात की. करा अ‍ॅप्लिकेशन सर्कारकडे, होऊदे खर्च!!! आम्ही तुमच्या स्तुतिपर चार जिलब्या टाकतो हाकानाका.

In reply to by सचीन

म्हणताय्,ते सुद्धा २०१५ च्या कुम्भमेळ्या बाबतीत,बरे एक सान्गा हा खर्च कोण करतो?म्हणजे केन्द्र सरकार की राज्य सरकार? आणि जर असेच असेल तर ऑलिम्पिक तसेच ईतर स्पर्धा यावर होणारा खर्च सुद्धा तुमच्यासाठी अनावश्यकच असेलना?

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

बरोबर नमो आले तर मंदिरांचे व्यवस्थापन सुधारू शकते... देशाच्या व्यवस्थापनाबद्दल मात्र शंका आहे.

In reply to by सचीन

अहो तुमच्या गुढघ्याला 2014 चे बाशिंग बांधलेल्या पप्पूला थांबायला सांगितलंय त्याच्या इटालियन मम्मीने. नमोमुळे वीतभर फाटलीये काँग्रेसवाल्यांची. "फाटलेली शिवायला वेळ हवा आहे" या सारख्या निवडणुकांच्या आधी पंतप्रधानपदासाठी कँडिडेट घोषित करण्याची परंपरा काँग्रेसमधे नसल्याची सबब पुढे करत पळ काढलाय. :D

In reply to by मंदार दिलीप जोशी

केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांची पब्लिसीटी हायजॅक केली आहे, आता परत ती कशी मिळवायची यासाठी भाजपचे तरुण म्हातारे चिंतन बैठकीला बसले आहेत .:-P

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

भाजपचे म्हातारे तरुण चिंतन बैठकीला बसले तेरी सरकार मात्र काँग्रेसचेच येणार.

सगळी मंदिरे गोदरेज कंपनीला चालवायला द्यावीत ( आणि कुलुपं लावून बंद करावीत. )

In reply to by उद्दाम

सर्व मशिदी आणि मदरसे ISI च्या हवाली ऑफिशियली करावीत. तसेही अनऑफिशियली कधीच त्यांनी ताबा घेतलाय.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

वर माहितगार यांनी जो पंढरपूरचा अनुभव दिला आहे, थोडाफार तसाच अनुभव आम्हाला अजमेर दर्ग्याला आला. (हो, आम्ही दर्ग्यातही जातो. हिंदुत्ववादी असुनही) जवळ जवळ १-२ किमीवर गाडी पार्क करायला लागली. ड्रायवर लोकलच होता. त्याने सांगितले सगळे दागदागिने, घड्याळं, पैसे गाडीतच ठेवा. जरुरीपुरते पैसे घेऊन जा. गाडी पार्क केली होती एका घराजवळ. त्यांनी २५० रुपये घेतले. तिथून रिक्षा आणि दर्शन. पर हेड १०० रुपये. मग दर्ग्याजवळ गेल्यावर ठराविक दुकानातूनच फुले आणि चादर घ्यायला लावली. दुसरे फुलवाले अगदी हाताला धरुन ओढत होते. पण पैसे तेवढेच मागत होते. मग बरीच ढकलाढकली करत त्या रिक्षावाल्याने आत समाधीजवळ नेले. गळ्यात एक धागा घातला आणि सोडेच्ना. हा काय प्रकार. त्याने तेव्हा दक्षिणा मागितली. परत १०० रुपये पर हेड दिले. तेव्हा त्याने काही मंत्र म्हणून तो धागा गळ्यात बांधला. (गंडाच बांधला म्हणा ना!) जवळच कुठल्यातरी ट्रस्टच्या ओफिसात नेऊन गरिबांना जेवण देण्यासाठी देणगी द्यायला लावली. मग कसबस गल्लीबोळातून परत रिक्षाने पार्किंग जवळ नेऊन सोडले.

In reply to by परिंदा

फत्तेपूर सिक्रीला असाच ७०० /८०० रुपयांना चुना लावला... त्यानिमित्ताने 'भ','ग' आणि 'झ' कारयुक्त अपशब्दांची चांगली उजळणी झाली...

In reply to by अत्रन्गि पाउस

फत्तेपूर सिक्रीला असाच ७०० /८०० रुपयांना चुना लावला... त्यानिमित्ताने 'भ','ग' आणि 'झ' कारयुक्त अपशब्दांची चांगली उजळणी झाली...
अशीच ऐनॉटॉमी आणि बायलॉजीकल फंक्शन्स ,बिहेवियर या विषयाची उजळणी अनेक मंदीरातदेखिल होते, हे ही नमूद करतो.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

म्हणजे आपण 'अनेक' मंदिरात उजळणी करायला जाता कि काय... माझा अनुभव एकदाच आलेला आहे हे नमूद करणे आवश्यक आहे...

In reply to by परिंदा

स्टॅटीस्टीकली वाईट आणि चांगली माणस सर्वसाधारणतः सर्व जाती धर्म भाषा प्रांत देश यात साधारणतः सारखीच वाटली जात असावीत आपण नेमके कुठे अनुभव घेत असतो ऐकत असतो त्यानुसार स्थल काल आणि वापरलेल्या पद्धती परत्वे थोडा फार फरक पडत असावा. कोणतीही गोष्ट इन्स्टीट्यूशनलाईज झाली असतील शीते तेथे जमतील भूते असा भूतवास चालू होतो. अयोग्य गोष्टीं शोधून त्यांचा विरोध समाजबदल आणि निर्मूलन करताना जाती धर्म भाषा प्रांत या नूसार भेद आणि अपवादही करू नयेत तरच त्यांना सवलत देता आम्हाला का नाही असा आवाज कमी होतो.पण वाईट वागण्यात त्यांना सवलत म्हणून आम्हालाही द्या याचे मात्र हे समर्थन ठरू नये.

In reply to by माहितगार

फेल्यूअर टू आयडेंटीफाय अँड अ‍ॅक्ट हि खरतर सवलत नव्हेच फेल्यूअर इज अ फेल्यूअर.

हा धागा मुद्दामुन चिथवण्यासाठीच काढला गेला आहे हे (लेखकाच्या) प्रतिसादावरुन स्पष्ट होतय. स्वतःच्या खाली काय जळतय ते पहा. यांच्यात उगा येऊन कोणी पण सोम्या गोम्या फतवा काढतो आणि हे खाली मुंडी घालुन स्वःताचं डोकं न चालवाता ऐकतात.हे काय सांगणार आम्हाला.