Skip to main content

१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलिड लोचा

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 03/11/2013 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
गरवारे कॉलेज मध्ये असताना आमचा एक छान ग्रूप जमला होता .बर्याच वर्षानी आम्हि काही दिवसापुर्वि एक मस्त गेट टुगेदर केल. खाण -पिण आणि गगन भेदी गप्पा . सगळे साधारण २८ ते ३० या वयोगटातले .या गप्पांमध्ये मला आणि माझ्या एका मित्राला एक गोष्ट strike झाली की आमच्या गप्पांमध्ये खूप वेळा 'आपल्या वेळेस अस नव्हत ' हे वाक्य अनेक वेळेला repeat झाल होत ……. आईला ! भर तिशीतच आम्हाला nostalgia आला कि काय ? मला अस वाटत होत की हा निवृत्त झाल्यावर , सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्यावर पोरटोर मोठी झाल्यावर येणारी हि गोष्ट असते . कुठेतरी काहीतरी चुकत आहे खास. म्हणजे अस पाहा . तेंडूलकर निवृत्त होत आहे. फेडरर उतरणीला ला लागला आहे . रहमान रहमानच राहिला आहे का असा प्रश्न पडला आहे . बाळासाहेब पण गेले. फेकू आणि पप्पू शी relate होता येत नाही . तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?" मुक्त अर्थव्यवस्थेचा खंदा समर्थक असणारा मी पण जागतिकीकरण च्या या बाय प्रोडक्ट मधून आलेल्या प्रश्नाने भोवंडून गेलो . कमी अधिक फरकाने मी पण या complex चा शिकार होतोच कि . १९९१ नंतर देशात जे वादळी बदल सुरु झाले त्यात अनेक जुन्या गोष्टी वाहून गेल्या. २००० नंतर या बदलांची गती अजूनच वाढली. ८० च्या दशकात जन्मलेली पिढी हि त्या जुन्या काळाची पण साक्षीदार आणि या भोवंडून टाकणाऱ्या काळाची पण वाटेकरी . एक उदाहरण द्यायचं झाल तर आम्ही पोस्टाने टपाल पण पाठवली आहेत आणि आता तितक्याच सहजपणे इमेल संस्कृतीचे पण वाटसरू बनलो . आई वडिलांची सरकारी नौकरी च सुरक्षित आयुष्य पण जवळून बघितलं आणि आताच्या अति असुरक्षित नौकरया तर आम्हीच करत आहोत . आम्ही शाळा सुटल्यावर मैदानावर जाऊन उन्हातान्हात खूप खेळलो आहोत आणि video games पण जाम खेळलो आहोत. स्वतःच घर -आंगण ते बंदिस्त flat संस्कृती हा प्रवास पण झरझर झाला . त्या अर्थाने आमची पिढी हि 'transition ' मधली पिढी . जागतिकीकरणाचे सगळे फायदे ओरपून घेतल्यावर त्याचे तोटे नको असणारी पिढी . प्रचंड भोवंडून टाकणाऱ्या जगाप्रमाणे बदलताना आमची पिढी तिशीतच थकून गेली आहे . ऐन उमेदीतच आपल आता पुढे काय होणार या भीतीने कोकरासारखी दबून गेली आहे . कुणी नोंद घेतली आहे कि नाही ते माहित नाही पण social networking वर गेल्यावर कुणी या पिढीतल्या लोकांची status बघितलीत तर जाणवेल की ती प्रचंड nostalgic अस्तात. आपल्या शाळा-होस्टेल-कॉलोनी चे group बनवून तिथे ती लोक (आम्ही ) ते दिवस किती भारी होते आणि आता कस सगळ बोर होत चाललय असल्या चर्चा करत अस्तात. दोन पूर्णपणे वेगळी जग पाहिल्याच्या धक्क्यातून हि पिढी कधी बाहेर येईल असे वाटत नाहि. आपली पिढी हि नशीबवान आहे आणि तिने खूप बघितले /सोसले आहे हा फेनोमेना जागतिक आणि सार्वकालिक आहेच. पण स्थानिक, जागतिक बदल पचवून त्या बदलांचा भाग बनलेली पिढी हि एकमेवच . जागतिकीकरण मधून एकाकी करणाकडे चालणारा प्रवास या ८० च्या दशकात जन्मलेल्या पिढी बरोबरच संपेल बहुदा . प्रत्येक पिढीला काही समस्यांचा सामना करावा लागतो. आम्हाला काही वेगळे करावे लागते असा दावा नाही पण lets give davil his credit . खूप पाहिलं रे तुम्ही पोरांनी लहान वयात असे कुणी मायेने तरी भरून पावल. पण तरी तोच माझ्या मित्राने विचारलेला प्रश्न दशांगुळे व्यापून उरतोच . Whats Next ? कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27013
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

वरील चर्चेत फक्त आयटीत अचाट आणि अफाट कमाई करणार्‍या पिढीचाच विचार झालेला दिसतो आहे. किंवा निदान तिच जमात डोळ्यासमोर दिसते आहे. पण प्रत्यक्षात आय टी व्यतिरिक्त फार मोठा तरूणवर्ग महागाईशी, राजकिय, सामाजिक परिस्थितीशी झगडताना दिसतो. लग्नाचे वय झाले पण वेगळी सदनिका नसल्याने किंवा आई-वडिलांसमवेत राहण्याच्या इच्छेमुळे कित्येक तरूण मुलांची वये लग्नावाचून वाढताना दिसत आहेत. शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, चर्चा, आंतरजाल आदी माध्यमातून मुलींचा दृष्टीकोन बदललेला जाणवतो आहे. खुपशा प्रसंगात मुलीच, आलेल्या स्थळांची छाननी करून मुलांना नाकारत आहेत. म्हणजे हा अधिकार फक्त मुलांनाच आहे असा माझा मुद्दा नाहिए. पण तिशीतच घर, गाडी घेणारे, घेऊ शकणार्‍या तरूणांचे प्रमाण किती आहे?
नोकरी, घर, पैसा यापलीकडे जाऊन काही जग असते याची जाणीव हळूहळू पुसट होत गेली. यात त्या पिढीचा काही दोष आहे असे नाही तर सामाजिक अभिसरणाचा हा एक साईडईफेक्ट आहे असे मला वाटते.
मला वाटतं, संगणकाद्वारे एकतर्फी ज्ञानाचा आणि मनोरंजनाचा बदाबदा कोसळणारा धबधबा, ज्यात 'विचार' करायला फार कमी असणारा किंवा अजिबात नसणारा वेळ ह्याने एकतर स्वतः विचार करण्याची सवय हरवली आहे. तसेच आंतरजालावर॑ व्यक्ती समोर नसल्याने तसेच नांवेही खरी नसल्याने कसेही बोला/लिहा आणि आपल्या वैफल्याला वाट करून द्या. शाब्दीक आसूड ओढून असूरी आनंद मिळवा ह्या सवयीत क्षणैक आनंदासाठी जगायची सवय लागत गेली आहे. शाश्वत आनंदाचे मुल्यच कमी झाले आहे. त्याने आयुष्यात पोकळी निर्माण होऊन 'पुढे काय?' ह्या विचारांनी हातपाय गाळणार्‍यांची संख्या वाढते आहे. चांगली संगत, प्रत्यक्ष समोरासमोर मुद्देसुद चर्चा, चांगल्या विचारांचे आदानप्रदान, संवेदनशिलता आणि चराचरावरील प्रेम ह्या मुल्यांच्या आधारे आयुष्य सुकर होईल, असे वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

विषयाचा आवाका फार आहे. आयटी व्यतिरिक्त समाजाचा मोठा वर्ग हा फारच भीषण वास्तवातून जातोय हे खरेच आहे. उद्याच्या जेवणाची चिंता असलेल्या समाजाचं "व्हॉट नेक्स्ट?" हे खूप वेगळं आहे! :( परंतू इथल्या लेखाच्या अनुषंगाने जो प्रातिनिधिक मध्यमवर्गीय समाज मी डोळ्यांसमोर घेतला त्यानुसार वरची प्रतिक्रिया होती.

खूप दिवसांनी एक चांगली चर्चा वाचायला मिळाल्याचे समाधान वाटले.
सहमत. ही चर्चा पुढे चालत राहून या मुद्द्याच्या वा लोचाच्या सगळ्या अंगांवर प्रकाश पडावा, जे काहीसे गोंधळात आहेत त्यांना भक्कम आधार, मर्गदर्शन आणि दिशा मिळावी.

सततच्या स्पर्धात्मक्तेने आता चेलेंज हे चेलेंजही वाटतच नाही.... मग वोट नेक्स्ट वाटणार नाही काय ? यश अपयश या गोष्टी आता कमालीच्या यांत्रिक झाल्यात तेंव्हा उगा हे राहीलय ते राहिले म्हणताना खरच या राहिलेल्या गोष्टी किती मिस होतात याचा विचार केला तर उत्तर विशेष नाही हेच असते. काहीही मिस हॉट नाही तेव्हांच नोस्टेल्जियाचा आधार घेउन आमच्या वेळी यांव अन त्यांव करावेसे वाटते... :(

In reply to by अग्निकोल्हा

भाऊ, हेच एग्झॅक्ट दुखणं आहे. आयुष्य हे जगण्यासाठी आहे. आपल्या नशीबाने विचार करणारा माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहोत हे लक्षात घ्याल त्यादिवशी जगण्याची, आयुष्याची खरी किंमत कळेल. नाहीतर घरात मांजर कुत्रे फार काय मुंग्या आणि पालीसुद्धा त्याच त्याच गोष्टी करत वर्षानुवर्षे जगत असतात. त्यांना कंटाळा आल्याचे कुणी पाहिले आहे? कंटाळा आणि वैफल्य हा फक्त माणसाला भेडसावणारा प्रश्न दिसतो आहे. तसेही इथे येणारे बहुसंख्य लोक हे आयटीत किंवा तत्सम क्षेत्रात काम करणारे आहेत. हा लेख त्या पिढीचे बर्‍यापैकी प्रतिनिधित्व करतो; पण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या कितीशी आहे? खेडेगावातील अल्पशिक्षित, कामगार वर्गातले, शेतकरी यांना यापेक्षा मोठे प्रश्न पडतात. उद्याचे जेवण कुठून येईल? पाऊस पडेल का? शेतीमालाला बरा भाव येईल का? त्यांना असले सगळे विचार म्हणजे चैनीची बाब आहे. कलेच्या क्षेत्रात काम करणार्‍या अभ्याचा प्रतिसाद पुरेसा बोलका आहे.

In reply to by पैसा

कंटाळा आणि वैफल्य हा फक्त माणसाला भेडसावणारा प्रश्न दिसतो आहे.
अर्थातच. कारण यांत्रिकतेचा तिटकारा मानवच करू शकतो. म्हणुनच विचार(आणि त्या बरहुकुम कृती) करायची क्षमता खरच कितपत वरदान आहे हां प्रश्न तेंव्हाच आ वासून उभा राहतो जेंव्हा विचार केल्याने प्रश्न संपूर्ण सुट्त नसतात हे समजते. अभ्याचा प्रतिसाद वाचला आहे! तरतरीत प्रतिसाद आहे. माझी टुडू लिस्ट त्याहुन भयंकर अन मोठी आहे पण प्रश्न हां आहे की यातल्या किती गोष्टी फार मिस करेंन ? PHP यांवे म्हणून अभ्या असा किती जीव ओतणार आहे ? तसे असेल तर मीच त्याला 1 वर्षात दृपलसाराखे फ्रेमवर्क फ्रॉम स्क्रेच लिहायला तरबेज करेन म्हणतो. पण प्रश्न त्याची टुडुलिस्ट तो खर्च किती मिस करतोय ? थोडक्यात एक्विलिब्रिअम अवस्था थोड्याफार फरकाने त्याचीही झालेली आहेच.... किंबहुना बहुतांश प्रतिसदकांची तीच अवस्था आहे... कोणी ते मान्य करतेय, कोणी तीला समजुन घेतय, कोणी अस्वीकार करतय, या प्रकारे आपले मन प्रकट करते आहे... परन्तु कृतिमधुंन या अवस्थेपासून कोणीही दूर भासत नाही

In reply to by अग्निकोल्हा

त्यातल्या किती गोष्टी मिस होतील याचे उत्तर देणे कठीण आहे. प्रत्येकाचे उत्तर वेगवेग़ळे असू शकेल. पण करायला किती ऑप्शन्स आहेत याचा काहीतेरी पॉझिटिव्ह विचार तरी डोक्यात राहतो ना! तसे तर जीवनावश्यक गोष्टी मिळवणे हेच आयुष्यात आवश्यक असते. पण आपण केवढा पसारा गोळा करतो. हमको मालूम है जन्नत की हक़ीकत लेकिन दिल को खुश रखने को ग़ालिब ये ख़याल अच्छा है!

In reply to by पैसा

पण एखादी गोष्ट नेमकी शब्दबध्द करणे वा शांतपणे मुद्देसुद मांडने हां माजा प्रांत नाही(मला दंगा करणे, विषय अनावश्यक भरकटवणे, उध्दार करूँ समोरच्याला शांत करणे च साध्य आहे) म्हणून agree to disagree इतकच बोलुन रजा घेतो, रच्याकने मी नाउमेद वगैरे अजिबात नाही हे नक्की.

छान लेख. दिग्गजांचे प्रतिसादही वाचनीय. प्यारेच्या पैसाताईंचे वय शोधण्याच्या प्रयत्नाला विशेष दाद ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आयला, असा पण अर्थ निघतोय काय? स्त्रिया १६ च्या पुढे सरकत नाहीत असा प्रवाद आहे, न मानल्यास वाद होतो.

१. आली लहर केला कहर... २. होवुदे तोटा भाऊ आहे मोठा.. ३. चर्चा तर होणारच होवु दे खरच... ४. एकच फाइट वातावरण ताईट ... ५. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत... 6. बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन... ७. मुलींचा दावा आहे ...... भाऊ छावा आहे... ८. एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे ९. .... भाऊ तुमच्यासाठी काय पण... १०. भाऊची डेरिंग कालपन ,आजपन,उद्यापन...... ११. आला कंटाळा केला घोटाळा... १२. अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच. १३. पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे. १४. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात..भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात. १५. असेल औकात.. तर भेट चौकात...

ऐन तिशीतच पुढे काय? असा प्रश्न पडनार्‍या नविन पिढीला काय म्ह्णावे? मोठे ध्येय नसल्याने असे होत असावे... रामरक्षेची जागा आता Android ने घेतली, त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली.... . माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण, मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन. . पुस्तकाची PDF झाली,रोज वेगळा BF अन रोज नवी GF आली... प्रगती होतेय सांगत घडणारी / बिघडणारी नवीन Online पीढ़ी आली... . अंगठे दुखतायत आता Type करून मानसं भेटतायतं आता Skype वरुन... . पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता, काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता... . मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय, Android Market मध्ये Temple Run जो आलाय... . व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले 'Connected', पण शेजारधर्म 'Was Totally Disconnected'... . आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता, 'देव देव' काय करता,पूजा करायचं पण App आलाय आता.... . या 'Technology' मागे पळता पळता, लोकांनी पळणंच बंद केलय आता.... . विसरले सारे चव आईच्या भाजीची,शुर गाथा शिवाजीची, साथ पसरलीय सावध रहा Latest आलेल्या 'Technology' ची... वाट लावून टाकील भिका पाटील

>> कंपू असेल पाठिशी,तर १००प्रतिसाद गाठिशी! ते दिवस गेले.... रे जिकडे तिकडे मालक वा कंपन्या बदलतात पण चपराशी मात्र परमनंट होतात. ममो असो व नमो चपराशी तेच

अमोल उद्गिरकर यांनी छान विचार करायला लावणारे निरीक्षण मांडले आहे. तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?" सहज एक विचार मनाशी करून पहावा... माझ्या आजोबांचा प्रचंड मोठा वाडा जमीनजुमला होता. त्यामानाने वडिलांचे घर छोटे होते. माझे घर त्याहूनही लहान आहे. तर मागच्या पिढीच्यापेक्षा मी अधिक संपन्न कसा !

छान लेख पण इतक्या लौकर हा प्रश्न कसा काय पडतो बुवा ? आम्हाला अजून बर्याच गोष्टींवर लव करायचं आहे या जन्मा वर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

ज्या समाजाने भौतिक सुखाची ध्येये ठरवून दिली आणि माणसाकडच्या खेळण्यांवरून त्याची किंमत करायला शिकवली, ती खेळणी तर आम्हाला मिळालीत; पण त्या भानगडीत आम्ही एका माईंडलेस कन्झुमरिझमच्या चक्रात अडकलोय आणि त्यात काही राम नाहीय हे कुठेतरी जाणवायला लागले आहे. त्यातूनच सतत घाईचे, सतत बदलणारे आयुष्य आणि त्यातूनच हा नॉस्टॅल्जिया (आणि प्रसंगी रिग्रेशन) निर्माण झाला आहे.