डोंबिवली कट्टा...अचानक.....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
लेखाची संकल्पना मिपावरील एका लेखावरून...पण शेवट थोडसा बदलून
शनिवार दि. ७ सप्टेंबर २०१३ वेळ दुपारची.
मी आपला मस्त पैकी भरतेट जेवून झोपलो होतो.आमची वामकुक्षीचीच वेळ ती. त्या प्रगाढ झोपेच्या काळात आम्हाला कूणीही त्रास देत नाही.(अगदी मोबाईल वाले पण..त्यांना एकदा हिसका दाखवला आहे)तरी पण त्या दिवशी रिंग वाजली ती वाजलीच.आता कोणाची तरी शामत आली असणारच.जशी पहिली रिंग वाजली तशी बायको लगेच(अक्षरश: धावत पळत) मोबाईल घेवून जवळ आली.
अशा भांडाभांडीची संधी ती कधीच सोडत नाही.स्वतः त्यात सामील होणार नसली तरी भांडण ऐकायला आणि हमरातुमरी पहायला तिची कधीच ना नसते.कधी कधी कंटाळा आला तर ती लोकलचा प्रवास करते,ते केवळ भांडण ऐकण्यासाठीच.बर्याच बायका ह्यासाठीच लोकलने प्रवास करतात असा हिचा तर्क आहे.फु़कटचा टाईमपास कुणाला नको असतो?नाही म्हटले तरी चाळीतली सवय जाणार अहे थोडीच.
मागच्याच तपात (हो, हो तपातच म्हण्जे १२ वर्षे झाली) ह्या अशाच वेळी (अवेळी) हिच्या काकांचा फोन आला होता.त्या वेळी त्यांच्याशी मी काय बोललो ते आता आठवत नाही पण ते बिचारे अजून पण मी दिसलो की रस्ता बदलतात.तेंव्हा पासून ही दुपारी मी झोपलो की. मोबाईल स्वतः कडे ठेवते. "तुम्हाला त्रास नको" असे म्हणते... पण कदाचीत तिला विषाची परीक्षा घ्यायची नसेल... मी पण तिच्या प्रस्तावाला होकार देतो आणि झोपेच्या अधिन होतो.
दुसर्या रिंगच्या वेळी हिने नांव बघितले.मि.पा. आणि पुढे काहीतरी प्र पासून होते.मि.पा. वर हिचा गेल्या १५/१६ महिन्यांपासुन जाम राग.(बाय द वे... ही मिपा ला सवतच समजते) आता कुठला तरी मिपा सदस्य माझ्या रागाला बळी पडणार आणि मग ती आग अशीच भडकत भडकत जावून आपला नवरा मिपाला सोडणार अशी अंधूकशी आशा तिला दिसायला लागली....शिवाय हिच्या माहेरच्या माणसांचा मी केलेला अपमान ती अद्याप विसरलेली नाही. आणि मग हिने मुद्दामच ३/४ रिंगा होवू दिल्या. (आपण कसे एखादा पदार्थ नीट शिजला नसेल तर परत कूकरला शिजायला ठेवतो आणि २ च्या जागी ४ शिट्ट्या काढून त्या पदार्थाची अजून वाट लावतो) अगदी तशाच प्रकारे हिने ४/५ रिंगा होवू दिल्या.
मी जरी प्रगाढ झोपेत असलो तरी, पहिल्या रिंग लाच मला जाग आली.दुसर्या रिंगला मी जरा कूस वळवली आणि बघितले तर आमची ही मोबाईल घेवून येत होती.तिसर्या ते पाचव्या रिंग पर्यंत हिचा चेहरा थोडसा हसरा ते जास्तच आनंदी झाला.बायकोला आनंदी अवस्थेत बघून माझ्यातला नवरा जागा झाला.
पुढचा संवाद असा
मी : कोणे ( अर्धवट झोप + बायकोचा आनंदी झालेला चेहरा बहून आलेला संताप + कंटाळले पण , असतांना मुखातून जे काही स्वर. व्यंजन येतील त्या सुरात)
बायको : आता तुम्हीच बघा ( आनंदी चेहरा + नवरा भांडतांना बघायला मिळणारा आनंद + सूड उगवल्याचे मिळणारे समाधान + त्या नंतर मिपा सुटल्यामुळे तिला मिळणारी शांती...अशावेळी जे काही शांतीचे सूर येतात त्याच सुरांत)
मी : दे ईकडे.धड वाचता पण येत नाही का?
बायको : तुम्ही कुणाच्या नावांने सेव्ह केला आहे ते मला काय माहित? नांव न टाकता कसे काय सेव्ह करता? मला लिहिता वाचता येतं म्हणून तर आपला संसार सुखाचा चालू आहे.नाहीतर तुम्ही लाखाचे १२ पैसे करायला तयार आहातच.
मी : दे इकडे.मीच बघतो.
बघितले तर मिपा कराचा फोन.आता मी फोन घेता घेता बायकोचा चेहरा बघायचा निर्णय घेतला. हे असे क्षण फार क्वचित येतात.मी मुद्दाम चेहरा गंभीर ठेवला आणि आवाजात भारदस्तपणा आणायचा प्रयत्न केला.हे नाटक वठवायला फार प्रयास पडले हो.एकमेव प्रेक्षक असतांना नटाला अभिनय करतांना जसे वाटत असेल तसेच वाटत होते.
मी : बोला
तो : हॅलो , काका मी प्रथम फडणीस
मी: अरे व्वा!!! बोल बोल... कसा आहेस? काय म्हणतोस?आज काल मिपावर का येत नाहीस?
ह्या पहिल्या ४ वाक्यांतच आमची ही चारी मुंड्या चीत झाली.
त्यावेळी झालेला हिचा चेहरा मी आजन्म विसरणार नाही. तुलना करायचीच झाली तर " अमर अकबर अँथनी " ह्या चित्रपटांत सगळ्यांत शेवटी जेंव्हा "जीवनला" समजते की हे तिन्ही भाऊ आहेत तेंव्हा झालेला त्याचा चेहरा + "जॉनी मेरा नाम" मधील देव आनंद आणि प्राण ह्यांच्या फायटिंगच्या वेळी (ऐन वेळी त्यांना समजते की आपण दोघे भाऊ आहोत.) त्या दोघांत झालेला समेट बघून "जीवनचा" चेहरा...आपुन तो वो सीन जिंदगीभर नही भुलेगा..वो सीन मतलब बायको के चहरे का रंग बदला ना वो सीन ...जीवन के सीन्स नहीं...
(मै खुष हुवा तो कभी-कभी हिंदी में बोलता है...हे मिपा के अॅडमिन मुझे माफ करदो...)
इथे बायकोची जरा पंचाईत झाली होती.ती आली होती भांडण बघायला आणि झाले भलतेच.पण मग तिने साळ्सूद पणाचा आव आणला आणि पुढील संभाषण ऐकू लागली.
प्रथम : अरे आज काल जास्त वेळ मिळत नाही.
मी : ठीक आहे.बोल काय काम काढले आहेस?
प्रथम : अहो काका. आपण परत एकदा जमणार आहोत.उद्या सकाळी.
मी : अरे व्वा !!! छान छान. कुठे आणि किती वाजता भेटायचे आहे?
ह्या तीन वाक्याने बायको तीन-ताड उडाली.तिचा चेहरा कसा झाला असेल ह्याची तुम्ही कल्पना केली असेलच...
प्रथम : उद्द्याच आणि १० वाजता.घरडा सर्कल जवळ.
मी : कोण कोण येत आहे? मी "भटक्या खेडवाला" ह्यांना पण बोलावु का?
प्रथम : मी नक्की येत आहे.तुम्ही पण या आणि येतांना "भटक्या खेडवाला" ह्यांना पण न विसरता घेवून या...
मग काय ... मी लगेच "भटक्या खेडवाला" ह्यांना फोन केला आणि मग दुसर्या दिवशी मी आणि त्यांनी कट्ट्याला जायचे ठरवले.तसेच घडले आणि कट्टा पार पडला.
मद्यपान न करता कट्टा झाल्याने बायकोच्या डोळ्यांतून आनंदाच्या जीवनधारा कोसळू लागल्या आणि त्यांत तो "अ अ अँ" वाला आणि "जॉ मे ना" मधला जीवनचा चेहरा वितळून गेला.
बाय द वे. मिपा हेच आता आमचे जीवन असल्याने बायकोने, मला पुढील कट्ट्यासाठी जायला आत्ताच परवानगी दिली आहे.
त्यामुळे लवकरांत लवकर पुढील कट्टा ठरवा.
प्रतिक्रिया
आँ!! यात कट्ट्याचा वृत्तांता
+१
बघा हं
;-)
सौ मुक्तविहारी काय सदस्यनाम घेतील?
=))
कट्-ट्टा!
कट्ट्याच्या वेळी मला डॉक्टरांनी केलेली तुफान फटकेबाजी जाम आवडली
वरील राग तुम्ही कट्टा केलात
मी घोरतो की नाही , हे मला माहित नाही...
रागवू नका...
कट्टा नमन भारीच. आता इतर
संकल्पना अशी आहे...
यावरून ....
धमाल कट्टा
मस्तच की ओ....
लीलाधर...
अरेच्चा ! कट्टा, अचानक!
नक्की हो भाते साहेब...
भारत भेटीत डोंबिवली येणे
कधी येताय?
खुसखुशीत !!