Skip to main content

नि:शब्द (कथा)

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 10/07/2013 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्या संध्याकाळी घरातून निघतानाच नीलेश टेन्शन मध्ये होता ... आज गुरुवार होता, संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून स्तोत्र म्हटल्यावर आज घराबाहेर पडू नये असे तीव्रतेने वाटत होते. पण रमेशचा फोन पुन्हा आला तेव्हा साडेसात झाले होते. ...येतोस ना, मी वाट बघतोय...... रमेश आणि नीलेश ची दोस्ती अगदी कॉलेज पासूनची. नीलेश एका कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये अकाऊंटंट होता . मुंबईतली कार्गो लोजीस्टिक्स मधली नोकरी सोडून गेली 2/3 वर्षे आपल्याच गावशेजारी असलेल्या कंपनीत स्थिरावला होता. रमेश गेली दोन वर्षे सौदीला काढून सुट्टीवर आला होता . त्याची पिण्याच्या दृष्टीने सौदीला दोन वर्षे चांगलीच उपासमार झाली होती. त्यामुळे तिथी-वार-सण-उत्सव याची कसलीही फिकीर न करता तो पीत असे. नीलेश चे मात्र तसे नव्हते. नीलेश ही प्यायचा ,पण महिन्यातून 3-4 वेळा , तेही फक्त रविवार –बुधवारीच ... तो तसा धार्मिक होता. पण लग्न होत नसल्याचे टेन्शन कधीकधी असह्य होई,आणि मग त्याला नाइलाजाने बारचा रस्ता धरावा लागे. रमेशचा फोन आला तसा बाईकला किक मारून नीलेश निघाला. आईने विचारलेही……अरे आता रात्रीचा कुठे निघालास ?..रमेशने भेटायला बोलावले आहे ,लगेच येतो परत ..... असे आईला सांगून नीलेश निघाला .... घरापासून बारचे अंतर पंधरा मिनिटात कापून तो बारवर पोहोचला . रमेश आधीच आला होता. मग गप्पांची मैफिल जमली, आणि त्या नादात किती पेग झाले ,त्याचे भान कुणालाच राहिले नाही. नीलेशची एक क्वार्टर ची नेहमीची मर्यादा कधीच ओलांडली गेली होती. डिसेंबर महिना, थंडी आपले रंग दाखवू लागली होती. म्हणून आज ओल्ड मंक होती. एव्हाना साडेदहा झाले होते ,आणि दोघांनीही प्रत्येकी तीन क्वार्टर च्या वर ओल्ड मंक संपवली होती. आता पुरे ....म्हणून बारच्या मॅनेजरनेच त्यांना थांबवले,आणि बार बंद करायचं आहे ,असे सांगून दोघांना उठवले ... मग शेजारच्याच चायनीज गाडीवर ट्रिपल राईस खाल्ला आणि रमेशला घरी सोडून नीलेशने बाइक आपल्या गावाच्या रस्त्याला वळवली . साडेअकरा झाले, एव्हाना थंडी चांगलीच जाणवू लागली होती. गावाकडच्या रस्ता माळरानवरून जात असल्याने वारा सुद्धा भन्नाट लागत होता. थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली .नीलेशचा स्वत:च्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता . गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत,असेच त्याला वाटू लागले. इतक्यात समोरून एक पॉश कार आली. आणि दामिनी कार चालवत होती. ... दामिनी ........... नीलेशने दामिनीला 4-5 वर्षापूर्वी लग्नासाठी विचारले होते... तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिच्या प्रेमात होता ... पण एकतर्फीच .... त्याला ती खूप आवडायची ... त्याच्या स्वप्नांची राणी तीच होती.... पण..पण... जेव्हा त्याने तिला विचारले ,तेव्हा तिने साफ उडवून लावले.... नीलेश खूप खोलवर दुखावला गेला....तिचा नकार त्याला पचला नाही. प्रेमभंगाचे दू:ख त्याला पेलले नाही. यापुढे लग्न/प्रेम या गोष्टींवर विचारच करायचं नाही ,असे त्याने ठरवून टाकले..... आणि आत्ता , या अवस्थेत तीच दामिनी समोरून कार चालवत येत होती. चांगला डॉक्टर नवरा मिळाला होता तिला ,त्याचीच आलीशान कार घेवून ती निघाली होती... हॉस्पिटल नधून नवर्या.चा फोन आला होता... आज उशिरापर्यंत थांबावे लागणार होते... त्याच्यासाठी जेवण घेवून ती निघाली होती..... आपल्या सगळ्या दू:खाला ही दामिनीच जबाबदार आहे, असा विचार नीलेशच्या मनावर गारुड करू लागला... बदला घे तिचा....... मार मार ................ विचारांचा स्फोट झाला मेंदूत ...................आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने बाइक तुफानी वेगात सरळ कारवर चढवली...................... जाग आली तेव्हा नीलेश हॉस्पिटल मध्ये होता ....रमेश समोर बसला होता ,आई पायाशी रडत बसली होती. अपघातात त्याच्या उजव्या हाताची नस कापली गेली होती.गेले चार दिवस तो बेशुद्ध होता . कारचे फार नुकसान झाले असले तरी दामिनीला मात्र जास्त दुखापत झाली नव्हती. सुदैवाने तिने नवर्याेला फोन करून अम्ब्युलंस मागवली, आणि नीलेशला हॉस्पिटल मध्ये आणले. मग दामिनीच्या नवर्यावने त्याच्या प्लॅस्टिक सर्जन मित्राला बोलावून ऑपरेशन केले . ...आणि नीलेशला जीवदान मिळाले होते...... थोड्याच वेळात दामिनी आणि तिचा डॉक्टर नवराही तिथे आला . नीलेश ने त्यांचे आभार मानले. पण हताश डोळ्यांनी तो दामिनीकडे बघत राहिला ............. जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो...........तिच्यामुळेच आज मृत्युच्या दारातून आपण परत आलो.............हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते...........................!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32061
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं?

नीलेश , रमेश आहेत ..पण सुरेश कुठे आहे ? बहुतेक त्या पोरीने सुरेश सोबत लग्न केले असावे .. त्यांच्या मुलांची नावे काय असतील :P

बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्‍या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम :) असो. गाडीला बाईकने ठोकण्याआधी तो मिपाकर विवाहितांशी बोलला असता तर लग्नाविषयीचं त्याचं मत बदललं असतं.

In reply to by आदिजोशी

पण लग्न न झाल्याचं टेन्शन असणारा माणूस असा "मुंगीने हत्तीला चिरडून टाकण्यासारखा" विचार करू शकेल ना सहज!

बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्‍या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम
अरे त्यांच्या प्रत्येक कथेत हेच घडते .. सुरुवात वेगळी शेवट हाच. नशीब समज.. यावेळी गाडी पुलावरून खाली पडली नाही , फक्त भरपूर नुकसानच झाले .. बहुधा नायकाकडे स्कुटी असावी

उदयोन्मुख लेखकांना नाऊमेद करणार्‍या स्पा, बॅटॅ, मुनी आणि दिपक ह्या खलप्रवॄत्तींचा जाहीर निषेध. ह्या अशाच लोकांमुळे माझा लेखकराव होता होता राहिला. त्यावेळी नावं वेगळी होती पण प्रवॄत्ती हीच.

In reply to by आदिजोशी

मी आत्ता अगदि हेच म्हणायला आलो होतो......एनी वे माझं नाव वगळुन तुझ्या मताशी सहमत फ्क्त आपल्यात काय लिखाणाची ताकद नाहि.

=)l

कथेतल्या नायकाचा अ‍ॅक्सीडेंट केलाच आहेस तर काय काय दुखापत झाली ते पण सवीस्तर लिहि काय आहे प्लॅस्टिक सर्जन डॉ. मुळे नीलेशला जीवदान कोणत्या स्वरुपात मिळाले तर शेवट समजायला सोपा जाईल. शीवाय कारचा ईन्सुरस होता ना बाबा? काय आहे दुचाकि/चारचाकि चालवणार्‍यांच पहिलं प्रेम कार त्यांची बाईक/कार असते आणि मग पत्नी!

In reply to by दिपक.कुवेत

म्हणजे तुम्हाला तो निलेश दुसरं प्रेम असफल झाल्यानं निराश होता असं म्हणायचंय का??

In reply to by आदिजोशी

:P

हम्म! जिच्या जिवावर उठला तिनेच प्राणदान दिले. नीलेशला टाळायचा तिचा निर्णय अतिशय योग्य होता हेच यातुन स्पष्ट होते.

नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं?
कारण तो गुरुवार होता ,आणि गुरुवारी तो पीत नसे....
मागच्या वेळी तुमच्याच कथेत बाईक जीप ला ठोकून जीप पुलात पडलेली ना smiley
मागच्या वेळी बाईकच्या ठोकरीने शुकला चे स्टेयरिंग वरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे जीप नदीत पडली होती.
बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्‍या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम
दोन्ही वेळी बदला घेण्याचा विचार करणारा नायक fully drunk होता. ...........थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली .नीलेशचा स्वत:च्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता . गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत,असेच त्याला वाटू लागले.

In reply to by मंदार कात्रे

एकदा कडाक्याच्या थंडीमध्ये ओल्ड मंक च्या दोन क्वार्टर पिऊन भरधाव बाइक चालवून बघा ............. वारा जसा कानात भरतो तशी ओल्ड मंक मेंदूत भिनू लागते..................! -स्रोत-बेवड्याचे बायबल .लेखक - सुधाकर तळीरामपूरकर आणि बोकाजी बेवडे!

In reply to by मंदार कात्रे

च्यायला! ओम बसल्याजागी दणका देते..ग्लासाचा तळ दिसेदिसेतो. दोन क्वार्टर ओम सलग मारुन बाईकपर्यंत गेल्यावर बोंबलायला किल्ली लावायला इगिन्शन स्विचच सापडत नाय पैले धा मिंटं. वार्‍यासोबत चढते ती व्होडका. रम नव्हे. रम जास्त झाल्यावर तोंडावर सोडा मारुन वार्‍याला बसवायची जुनी पध्दत आहे...पंधरा मिनिटं असं वारं तोंडावर घेऊन झालं की मग उदरभरण केल्यावर पोरं जाग्यावर येतात. गोष्टीच्या डिटेलिंगमध्ये लै गडबड झालीये. येकडाव नवं ड्राफ्टिंग मारुन बघा राव. -आजीवन सचिव, आर्य मदिरा मंडळ

In reply to by धमाल मुलगा

>> येकडाव नवं ड्राफ्टिंग मारुन बघा राव. -- किंवा धम्यासोबत रम आणि व्होडका कधी, का, व कशी उतरते हे प्रत्यक्ष्य बघायला एक-दोन बैठका होऊन जाऊ दे (अर्थात, कथा लेखकाची स्पॉन्सरशीप ;) ) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

बघायला की अनुभवायला? ;) साला खूप वर्षं लोटली, ओमची बैठकच नाय झाली, चवही विसरायलाशी झालीये. येताव काय दोस्तहो? हैऽऽ तिच्यायला! करु मज्जाऽऽ :) चतकोरराव -रेडी टु ड्रिंक

In reply to by धमाल मुलगा

चतकोरराव -रेडी टु ड्रिंक --> पुढील बैठकीत पहिल्या पेगला हे आठवुन ठसका लागेपर्यंत हसणार हे नक्की =)) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

म्हणजे आमचा प्रयत्न सार्थकी लागणार तर. हसत रहा, हसवत रहा. :)

In reply to by धमाल मुलगा

ड्राफ्टींगच्या आधी ओमचा दणका बसला असेल तर?? डीटेलिंगमध्ये गडबड होणारच :-) कात्रेजी हलकेच घ्या..

In reply to by बाळ सप्रे

मला मात्र उलटं वाटतं. ओमच्या कृपेनं एकदा तार लागली म्हणजे पहिल्या ड्राफ्टिंगमध्येच ष्टुरी तयार. फू बाई फू चे स्किट्स लिहिताना पंचेस येण्यासाठी म्हणे नेहमीची ग्लेन ड्रमॉन्ड सोडून ओमची साधना करायचे आमचे लेखकूमित्र. हो ना रे अ‍ॅड्या? ;)

स्व. जसपाल भट्टींचा फ्लॉपशो आठवला. त्यात भट्टीसाहेब हॉरर सिरियल(का सिनेमा) बनवतात व त्याला सर्वोत्कृष्ट विनोदी सिरीयल(का सिनेमा)चं पारितोषीक मिळतं. अर्धवटराव

In reply to by रेवती

आधीची कथा दणकट बांध्याची होती ना? यावेळच्या कथेत दामिनीला फारशी दुखापत झाली नसल्याने कार दणकट दिसतीये.
लॉजीक चुकलं रेवती..... दामिनी दणकट बांध्याची होती असे म्हणायला पाहिजे

मंदार मामा, काय खतरनाक लोजिक आहे. ------नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं? ---------कारण तो गुरुवार होता ,आणि गुरुवारी तो पीत नसे.... अवांतर : मिपावर आगामी धागा :"दारु पितांना तुम्ही वार पाळता का ?"

In reply to by नि३सोलपुरकर

काय काय करताना वार पाळायचे ..याचा कोष्टक बनवून प्रसिद्ध केल पायजे

पुढच्या कथेत कात्रे बहुधा स्वत:च्याच गाडीवर स्वतःचीच बाइक चढवणार. किंवा गाडीमध्ये बाइक घालुन नदीत ड्गकलुन देणार. त्यावेळेस त्यात निलेश, रमेश सुरेश तिघेही असणार बहुधा.

हार्ट सर्जन जीव वाचवू शकेल. पोटाचा सर्जन जीव वाचवू शकेल, प्लास्टीक सर्जरीने जीव कसा वाचू शकेल हे इथले कोणी जाणकार सांगु शकेल का? तदमाताय .... हे म्हणजे एकता कपूरची सिरीयल वाटायला लागलीय. ढॅण्ण........... ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण ........ ढॅण्ण........... ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण

अपघातात हाताची नस कापली .... फाटली असेल :-)

त्या लॉजीकवर टेलर देखील जीव वाचवू शकेल प्यान्ट फाटली ती त्याने शिवून दिली. त्यामुळे प्यान्टच्या शिवणी मध्ये पाय अडकून पडला नाही. अपघात टळला .जीव वाचला. सही: सही रे सही. भरली माझी वही

काय खतरनाक चिरफाड केली आहे सर्व मिपा बंधूनी, पहिल्या जन्मी सर्वजण सर्जन व्हता का रा बंधुनो? काहि तरी सर्जनशीलता (सज्जनशीलता) दाखवा, किती ते नामोहरम… वाचवत नाही हो … बाकी अजून प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत. Nerd smiley face

हे ओल्ड मंक (ओम) आहे तरी काय? सगळे एवढी तारीफ करताहेत त्याची? एकदा गावठी पिऊन बघा, कशी नशा होते ते. रस्त्यावरची गाडी काय, आपण आकाशात विमान चालवतो आहोत असे वाटते, च्यामायला.

In reply to by रेवती

पुढच्या वेळी ते बाईकने विमानाला धडक देणार.. गवि , टंकनिकेला बोलवा ...नविन ष्टूरी येणार आहे ..विमान अपघाताची

In reply to by कपिलमुनी

एकदा रजनीकांत नेटवर आपलेच जोक्स वाचत असतो .. आणि आपल्यावरच खूष होत असतो.. तो अचानक मिसळपाव उघडतो .. आणि चक्कर येउन पडतो .. का बरं ??????? :-)

३ क्वार्टर 'ओम' मारल्यावर हिरोला बाइक चालवता येते, थंडी वाजते, आणि रात्रीच्या वेळी समोरुन येणार्या कारमधली 'लाईन' ओळखून तिच्या कारला ठोकता पण येते !? :-D 'सुपरहीरो'च आहे की हा.. नुसता निशःब्दच नाही, गतप्राण झालोय मी.. ;-) च्यायला, तीन क्वर्टर मारल्यावरही माझी कल्पनाशक्ती एवढी तरल होणे शक्य नाही..:-D.

In reply to by चिगो

च्यायला, तीन क्वर्टर मारल्यावरही माझी कल्पनाशक्ती एवढी तरल होणे शक्य नाही
चिगो, कल्पनाशक्ती एवढी तरल व्हायला शुद्ध असावी लागते! तीन क्वॉर्टर मारल्यावर, जाऊदे.... :D - (क्वॉर्टरच्या हिशोबात पिणे बंद केलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

मी तर दारुच्या बाबतीत भैताडच आहे.. पण दहा-पाच कथांमध्ये दारु ओतलेल्या मंदाररावांनी अशी गफलत करावी म्हणजे लैच आहे की..

आयुष्यात कधी भेट झालीच तर तुला ' ओल्ड मंक' किंवा म्हणशील तर सिक्कीममध्ये मिळते ती 'मंक' शेपच्या वाटलीतली रम भेट माझ्याकडून.. एवढा बेक्कार हसायचा चान्स दिलास तू, भाऊ.. =)) =))

कात्रे साहेब या कथेचा शेवट अशी करता येऊ शकतो का बघा . दामिनीच्या नवर्याने चौकशी केल्यावर त्याला निलेश च्या दामिनिवरील प्रेमाबद्दल कळाले ……. मग त्याला निलेश च्या दामिनिवरील खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार होऊन तो संगम मधल्या राजेंद्रकुमार सारखा स्वतः च्या डोळ्यावर जळती मेणबत्ती मारून आंधळा होतो आणि निलेश आणि दामिनीच्या लग्नाला होकार देतो. ……………… मग त्याला निलेश च्या दामिनिवरील खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार झाला आणि दामिनिनेच त्याचे प्रेम नाकारले म्हणूनच निलेश या अवस्थेला पोचला या निष्कर्षावर पोचला . दामिनीला धडा शिकवण्यासाठी मग निलेश आणि दामीनीचा नवराच लग्न करण्याचा निर्णय घेतात.

In reply to by lakhu risbud

दामिनी त्या दोघांचं लग्न पाहुन नि:शब्द होते :D. बाय द वे दामिनीचा नवरा कोणत्या विषयात डॉ. होता?

मनोरंजक कथा !

मंदार, तुमच्या लेखनात सफाई आहे. पण फक्त एका प्रसंगाला वा घटनेला कथेचा आत्मा करण्यापेक्षा कथेतल्या पात्रांची व्यक्तिमत्व , त्यांच्यातले परस्पर संबध (केमिस्ट्री) ठळकपणे समोर येउ दया. मग कथेत जान येईल कथा मोठी होईल पण हरकत नाही , भरपूर वेळ घेवून लिहा. बाकी दारु ओल्ड मंक होती की RC की signature हे तितकेसे महत्वाचे नाही. तसेच क्वार्टर किती झालेत हे ही महत्वाचे नाहीत. दामिनीशी झालेला प्रेमभंग रमेश शी बार मध्ये होत असलेल्या गप्पांतून वाचकांसमोर समोर आला असता तर अजून काही संवादातून त्याची उद्विग्नताही वाचकांना कळाली असती. कदाचित त्याच्या दु:खाने वाचकांचे अंतःकरण हेलावले असते. आणि विनोदी अंगाने येणा-या प्रतिक्रिया कमी आल्या असत्या. फक्त कथानक सांगू नका, कथा फुलवा... All the best.

अरे हो दामिनी रमेश ला पट्ट्याने / चाबकाने किंवा पट्टीने कसे आनि किती मारायची ते देखील लिहा

In reply to by विजुभाऊ

माझी कथा तुम्हाला आवडली नाही हे तर माहीत होते पण ती वाचून तुम्हांस मोठा धक्क बसलाय आणि तुमचे मानसिक संतुलन बिघडलेय हे आता समजले. आता तुमच्या या अवस्थेला अप्रत्यक्षपणे मीच जबाबदार आहे असल्याने तुमच्या वरील तिरसट प्रतिक्रियेबद्दल मी काही नाराजी व्यक्त करु शकत नाही. असो. तुम्हाला लवकर बरे वाटावे ही सदिच्छा. Get well soon मामू...

In reply to by मराठी कथालेखक

>>>तुमचे मानसिक संतुलन बिघडलेय हे आता समजले. बळंच? तुमच्या कथेसारखं एक वाक्य विजुभाऊंनी कोट केलं म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं? मग अशा अनेकानेक वाक्यांनी/परिच्छेदांनी भरलेली कथा लिहीणाराची मन:स्थिती कशी असेल बरं? बाकी आपली कथा नेमकी कुठून 'प्रेरित' झालेली असावी याचा अंदाज करतोय. :)

In reply to by प्यारे१

माझ्या कथेवरील कोणतीही प्रतिक्रिया त्या धाग्यावर दिली तर समजू शकतो. मी या धाग्यावर टाकलेली प्रतिक्रिया वाचताना माझे इतर लेखन आठवून त्यांचा ओढून ताणुन संदर्भ देणे चुकीचे आहे. एखाद्या पोस्टवर (मूळ लेखन वा प्रतिक्रिया) प्रतिक्रिया देतान फक्त त्या पोस्ट मध्ये "काय लिहिले आहे" त्यावरच प्रतिक्रिया व्यक्त करावी. ती पोस्ट "कुणी टाललीये", "टाकणा-याचे आधीचे लेखन" ई संदर्भ गरजेचे नाहीतच.