Skip to main content

पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 03/05/2013 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो.. बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे.. अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..! अतिशय सुरेख गरमगरम पुर्‍या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?! पुर्‍या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो.. पुर्‍यांसोबत खायला आलुमटर, आलूमेथी, छोले असे मोजकेच परंतु चवदार पदार्थ... राईसप्लेटचीही व्यवस्था आहे. साधी राईसप्लेट मागवलीत तर साधारण ५० रुपायांमध्ये पोटभर जेवण होतं..गरमागरम ५ पुर्‍या, एक कोणतीतरी आपल्या आवडीची पातळ भाजी, चांगल्या तांदळाचा भात, सोबत कढी आणि वरण..अगदी ताजं आणि गरमागरम आणि मुख्य म्हणजे सोडा न मारलेलं जेवण असतं..! दहीही अगदी मधूर असतं.. डीलक्स थाळी ७० रुपायांपर्यंत मिळते. तुम्ही नुसती गरमगरम पुरीप्लेट मागवलीत तर सोबत तोंडी लावायला बटाट्याचा रस्सा फुकट..! - : ) हा काँप्लिमेटरी मिळणारा बटाट्याचा रस्साही चवीला अगदी सुरेख असतो.. साधी जिर्‍याची फोडणी..चवीपुरती मीठमिरची.. अगदी साधा असा हा रस्सा गरमागरम पुरीसोबत तुम्हाला खाता येईल.. तेलाची क्वालिटी अतिशय उत्तम.. कधी कुठल्या पुरीला तेलाचा खराब वास आलाय किंवा कधी मैद्याची पुरी दिली गेल्ये असं मला तरी आजतागायत आठवत नाही.. त्याशिवाय मसालापुरी, भटुरे हे देखील पदार्थ अतिशय उत्तम मिळतात.. पंचमचा जगनसेठ.. (मी त्याला जगनसेठ म्हणतो.. त्याचं खरं नांव मला माहीत नाही.. ) जग्नसेठचे कुणी आजोबा की पणजोबा त्याकाळी मुंबैत आले आणि एका लाकडी फळीवजा टेबलावर रस्त्यावरच उभं राहून त्यांनी पुर्‍या तळण्याचा व्यवसाय सुरू केला..तो यज्ञ आजही अव्याहत सुरू आहे..फक्त अलीकडे दोनेक वर्षांपूर्वी काही दिवस पंचमपुरीचं दुकान नुतनिकरणाकरता बंद होतं.. pp आजतागायत अनेकदा पंचमपुरीच्या पायर्‍या अगदी भक्तिभावाने झिजवल्या. आताशा जगनसेठ फारसा दुकानात येत नाही..आता त्याचा मुलगा सांभाळतो..(चवथी की पाचवी पिढी!) पण पूर्वी जगनसेठ असताना कधी पंचमपुरीच्या दुकानात गेलो की माझं अगदी, 'आओ भाई.. आज बहोत दिनोंके बाद दर्शन दिये.. " असं अगदी तोंड भरून स्वागत करायचा. मग लगेच स्वत: माझ्या टेबलापाशी येऊन ऑर्डर घेईल..माझं जेवण झालं की मी मागवलेला नसतानाही एखादा छानसा गुलाबजाम माझ्या पानात ठेवेल.. वर 'ये हमारी तरफसे.. ' - असंही मिश्किलपणे सांगेल.. सांगायचा मुद्दा हा की हल्लीच्या काळात या शेट्टी हॉटेलवाल्यांनी मांडलेल्या प्रचंड महागड्या हॉटेलच्या तुलनेत आजही आमचा पंचमपुरीवाला त्या मानाने खूप उजवा आहे.. शेट्टी हॉटेलातल्या महागड्या सोडा मारलेल्या पदार्थांपेक्षा पंचमपुरीचीवाल्याची पुरीभाजी अथवा राईसप्लेट केव्हाही उजवी, अधिक समाधान देणारी आणि मुख्य म्हणजे पोटभरीची..! असो... तात्या. आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 44967
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..
सुरेख .. 3 वाजलेत .. ५ वाजेपर्यंत येउंद्या पुढील लेख तुमचे लेख म्हणजे साला पर्वणी असते महाराजा :)

In reply to by स्पा

तुला़ काय अडच ण रे स्पावड्या? तात्यानी एकदम सतरा लेख टा कले तर तुला काय खतरा आहे़? पर्वणीचा लाभ घे की मेल्या. तुला काय पैशे पडायलेत ?

In reply to by प्यारे१

'नव्या माणसान रोज दोन लेख टाकले तर ताका जिल्बी म्हण्टंत नि जुन्या माणसान टाकले तं पर्वणी' हा म्हायत नाय ताका. रे मेल्या स्पावड्या, धा पावट 'पर्वणी पर्वणी' बरंय. हांगा फिरान येव नको, कळ्ळें?

In reply to by कुंदन

मौ भात न मेतकुट खाणार्‍या
&*%## स्पावड्या, साल्या गरीब बिचार्‍या मांजर्‍या मारून खातोस होय रे &%$##!!!! मुंबैच्या समस्त कोंबड्या डुकरे काय रोगग्रस्त झाली काय रे आँ? बॅटू बर्वे.

In reply to by बॅटमॅन

अच्छा अस आहे होय? म्हणुनच त्या भयकथा प्रसवतात स्पा कडुन. खरच रात्र वैर्‍याची आहे. जागते रहो!!!

In reply to by बॅटमॅन

=)) =)) =)) कॉफी अडकली साल्या नरड्यात! काय लिहितो का काय करतो? ते स्पांडू पारंपारिक वैदूच्या गेटपमध्ये डोळ्यापुढं आलं ना बे! =))

In reply to by धमाल मुलगा

=)) =)) =)) धमुशेठच्या नरड्यात कॉफी अडकण्यास अखेरीस आपणही कारणीभूत ठरलो हे पाहून डोळे पाणावले ;) लै दिसांची इच्छा होती ;)

In reply to by बॅटमॅन

मिपाशास्त्रात धमूशास्त्री आठवले यांच्या पद्धतीप्रमाणे कळफलकावर सांडून तो खराब होणे हेच खरे कर्मकांड आहे. आजकाल कळाफलक ह्या विधीत वापरला जात नाही. शॉर्टकट मधे प्रथा पाळल्या जात आहेत. चालायचेच..

In reply to by बॅटमॅन

या ब्याट्या ला कोणी तरी आधी मारा रे नको तिथे नको ते सुचतं याला सकाळी सकाळी तात्यांचा लेख वाचावं म्हटलं . तोंडाला पाणी सुटतंय . भूक लागतीये हे वाचून . पण तरीही मक्ख चेहरा ठेवलाय हापिसात . आणि हे उलटं लटकलेलं मधेच पचकतय . आता दिवस भर बॉस चा उगाचच रागावलेला आणि माझ्या कडे "काय पात्र आहे हे" अशी नजर झेला :-/

In reply to by प्यारे१

पर्वणीचा लाभ घे की मेल्या. तुला काय पैशे पडायलेत ?
पैशे? ऑं? पैशे पडतात का असं वाचण्यासाठी कुठं? आधीच सांगून ठेव. तिकडं जाणं टाळतो... ;-)

In reply to by श्रावण मोडक

तुम्ही पण आता डॉलर मध्ये वेवहार कर्ता का?

पुण्याच्या नान्या, जागा हो २४ तास मुंबैच्या तात्याचे आहेत ! चितळे, बेडेकर, श्री, सगळ्या श्रद्धास्थानांची लैन लाव गड्या !

वाचून जल्मात पहिल्यांदा आपण मुंबैकर नसल्याबद्दल खंत वाटली.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त साब के लिये एक प्लेट पुरी लाव.

चार पाच पिढ्या मुंबईत घालवूनसुद्धा स्थलांतरितांच्या पाचव्या पिढीने भाईकाका, आण्णा आणि बाबूजींसारख्या मराठी मानबिंदूंच्या निस्सीम भक्ताचे स्वागत आओ भाई.. आज बहोत दिनोंके बाद दर्शन दिये.. " अशा भय्यास्टाईलने करावे आणि त्या मराठी माणसाने मिटक्या मारत पाणीपुरी हाणावी याची मिपाकर म्हणून शरम वाटली.

In reply to by सामान्य वाचक

=)) =)) =)) बा**ला! त्या मदन्याचा साला तुमीतर पार शारुक करुन टाकला द्येवा! :D

In reply to by धमाल मुलगा

शारूक केला तोपर्यंत ठीक आहे नशीब कि कारण जोहर नाही केला

अत्यंत साध्या पण उत्तम रेस्टॉरंटची ओळख करून दिल्याबद्दल धन्स रे! जेवणात सोडा मारलेला नसतो हे तर फारच महत्वाचं :)

In reply to by संदीप चित्रे

आम्च्य नग्पुरत नहि मिलत अशि चन्ग्लि पुरि भजु.

In reply to by विनोद बोरोले

हा कि-बोर्डचा प्रॉब्लम आहे का जिभेचा?

तात्या, 'बोरीबंदर' ह्या एकाच शब्दात जिंकलस गड्या.. साला हल्ली सी.एस.टी नाहीतर व्हीटी शिवाय कोणी हाक नाही मारत त्याला.. ६५, ६६, ६९ किंवा कुठल्याही बशीत 'बोरीबंदर' हा शब्द हद्दपार झालाय.. पुरीवाल्याकडे जाऊन बघायला हवे एकदा.. पण तिकडे गेलो की विठ्ठल भेळ, बादशाहा आणि मागे भगत ताराचंद सारख्या भुरळ घालणार्‍या इतक्या गोष्टी आहेत की बस्स! आणि हो ते जाताजाता कामताला नावं ठेव्ण्याचं काम नाय हां.. सुविधा आहे ना समोर फोर्ट चं ते तोंडात मारेल कुणाच्याही.. हाटेल चालवावं तर कामतांनीच.. साला पुण्यात हे तुळ्ळू कामत मात्र फार दिसत नाहित ह्याचं वाईट वाटतं!

आजचा गृहपाठ - जगनसेठचे व्यक्तीचित्र लिहा. थीम- साधारण दुकान सुरु व्हायची वेळ, जगनसेठ व प्रोटॅगॉनिस्ट यांची भेट, जगनसेठ भीमाण्णाचे फॅन, मग काय सुरवातीला हा कोण आला पासुन आपण साला ह्या प्रोटॅगॉनिस्ट चे कट्टर फॅन व पुढे पुढे निस्सीम भक्त असा जगनसेठचा प्रवास. दरवेळी गेलो की आवडीने प्रोटॅगॉनिस्ट फर्माईश करुन गाउन घेणार. प्रोटॅगॉनिस्ट चे कौतुकच कौतुक, थरथरत्या हाताने शेवटच्या दिवशी पण प्रोटॅगॉनिस्टला पुर्‍या भरवून, ठंडा पाजून जगातून एक्झीट घेणार जगनसेठ सहाय्यक शब्द, - साला, कोणकुठला, फॅन, भक्त, भीमण्णा (हा शब्द सूचक जागी एकदाच किंवा दोन वेळा पुरे पण एका भीमाण्णाच्या वाक्यात चार मी, माझे, मला, आपणही हवे), कौतुक, समाधान, मान, सन्मान, माज

In reply to by सहज

उतार्‍याखालचे व्याकरण: १) भाजीत माशी मरुन पडली आहे, व्याकरणाच्या मदतीने चालवून दाखवा. २) 'बोरीबंदर' या शब्दाचा सामासिक विग्रह करा. ३) 'पुर्‍या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो.. ' यातील उपमा, उपमेय आणि उपमान शोधून व्याख्येसहित स्पष्ट करा.

In reply to by सहज

आदरणीय सहजराव, मूळ लेखासंदर्भात कुठलीही बरीवाईट प्रतिक्रिया न देणारा आपला अवांतर प्रतिसाद वाचून अतिशय वाईट वाटले. इतकेच सांगू इच्छितो की भारतरत्न अण्णांचा पूर्णत: अस्थानी असा उल्लेख व जगनशेठच्या जाण्याचा उल्लेख खूप दुखावून गेला. असो, मूळ लेखाप्रमाणेच हा प्रतिसादही अत्यंत थर्डरेट समजून दुर्लक्ष करावे अशी सादर विनंती करतो.. - तात्या

In reply to by विसोबा खेचर

ललित लेखनातली स्थळ, पात्र यांना काही एक स्वातंत्र्य असते. माझ्या प्रतिसादात तुम्हाला भारतरत्न अण्णा दिसले, पण ललित लेखनात ते एक स्वतंत्र घटक आहेत, दोन लोकांना जोडणारा दुवा आहेत. त्यात अनादर, अस्थान नाही. जगनशेठ हे एका ललितलेखाचा एक भाग असु शकतात. प्रत्यक्ष व्यक्तीशी संबध असेलच असे नाही. तुम्ही प्लीज भावना बाजूला काढून पाहीलेत तर माझा प्रतिसाद केवळ एक व्यक्तीचित्रण पाककृती आहे हे दिसेल. तुम्हाला ती पाककृती नावडायचा पर्याय आहेच. तुम्ही जरुर दुर्लक्ष करा, प्रतिसादाला थर्डरेट समजा पण आमच्या पाककृतीतल्या प्रोटॅगॉनिस्टला नावे ठेवू नका तो गरीब बिचारा आहे. आज त्याचा टाईम खराब असेल पण तो हिरो आहे. त्याचे भले कौतुक करु नका पण नावे ठेवू नका अशी विनंती करतो. तुम्ही सिद्धहस्त लेखक आहात आम्हा फुटकळ काळेपांढरे करणार्‍यांच्या प्रतिसादाला बघीतलेत हेच आमच्याकरता खूप आहे. बाकी खेद आहे.

पुरीभाजी व जेवणाच्या थाळीचे एवढे चपखल वर्णन वाचून लगेच पंचम पुरीवाल्याकडे जावेसे वाटत आहे. माझ्या लहानपणीपासून अफाट लोकसंख्येमुळे मुंबईवर खूप ताण आहे असे वर्तमानपत्रांत रोज रोज वाचल्यामुळे कशापायी त्यात भर घालावी या विचाराने मुंबईत कधी निवांतपणे फिरलोच नाही. एकदाच काय काही तासांसाठी दक्षिण मुंबईत चक्कर टाकली.

अवांतर प्रतिक्रिया वाचून काय म्हणावे कळत नाही. तात्या सध्या एकामागून एक बरेच लेख टाकत आहेत, बऱ्याच नवीन सदस्यांची ह्याच कारणासाठी खिल्ली उडवली जाते वगैरे सगळे मान्य. त्याबद्दल लिहीले तर एकवेळ समजू शकतो. पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि संपादक/ सल्लागार यांच्या काही खोचक वैयक्तिक टोमणे मारणाऱ्या प्रतिक्रीया वाचून अचंबा आणि खेद दोन्ही वाटले. मला भूतकाळात काय झाले याची बऱ्यापैकी कल्पना आहे पण ते सगळे ह्या आणि इतर धाग्यांवर का? अनेक नवीन सदस्य जे वयाने/ अनुभवाने तात्यांपेक्षा लहान असतील त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत. असो ह्या निमित्ताने बरेच जुने आय डी लिहिते झाले हेच काय ते चांगले म्हणायचे.

In reply to by लंबूटांग

पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि संपादक/ सल्लागार यांच्या काही खोचक वैयक्तिक टोमणे मारणाऱ्या प्रतिक्रीया वाचून अचंबा आणि खेद दोन्ही वाटले. मला भूतकाळात काय झाले याची बऱ्यापैकी कल्पना आहे पण ते सगळे ह्या आणि इतर धाग्यांवर का? अनेक नवीन सदस्य जे वयाने/ अनुभवाने तात्यांपेक्षा लहान असतील त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत.
या कारणामुळे आणि कंपूबाजीमुळेच मी इथे (इच्छा असूनही) फारसे लिहित नाही. केवळ वाचनमात्र असतो.

In reply to by उपाशी बोका

तुमचा बिल्ला क्रं ७ आहे. मिपाच्या जन्मापासूनचे तुम्ही सदस्य आहात. कॄपया इथे लिहिण्याचा एकदा प्रयत्न तर करा. मला तरी असे वाटते की जुन्या सदस्यांनी फार बागुलबूवा केल्याने बरेच नवे सदस्य मोकळेपणाने अभिव्यक्त होत नाहीत. (अवांतराबद्दल क्षमस्व)

In reply to by श्रीरंग_जोशी

तू तर काय आणि खुळाच हैस खरं. लेका बिल्ला नंबर दिसतोय तुला अन तरी कुठं प्रौढ साक्षरतेच्या मास्तरागत विनवण्या करतंयस?

In reply to by धमाल मुलगा

जसे जमते, तसे लिहितो. नवा असतांना धमुमास्तरांची शिकवणी भेटली असती तर असे लिहायची सवय लागली नसती ;-).

In reply to by श्रीरंग_जोशी

'धमुमास्तर'???? आयला! ते काय माणसात गणायच्या लायकीचं है होय रे? शिकवणी लावायची तर मास्तर एकच...... प्रभुमास्तर! :)

In reply to by धमाल मुलगा

शाळेत उशिरा प्रवेश मिळाल्यामुळे सर्व शिकवण्या आधीच फुल झाल्या होत्या....

In reply to by लंबूटांग

चलता है रे लंबुटांग. सुखात होतो, शोफरड्रिव्हन कारने फिरत होतो तेव्हा काहीच कळलं नाही. आता रोजच्या किराणामालाचेही वांधे झाल्यावर माणसं त्यांच्या प्रपिसादातल्या एखाददोन शब्दांनिशीच पटापट कळू लागली. ठीक आहे. सध्या सर्वांचंच बरेबर आहे, माझं एकट्याचंच चूक आहे हे मान्य. उद्या पुन्हा टाईम बदलला की एकेकाचा 'तात्या स्टाईल' अगदी खरपूस समाचार घेईन हे नक्की. तोपर्यंत दगडं खायला मी तयार आहे. रक्तबंबाळ करतात पण खूप म्हणजे खूप काही शिकवून जातात ती दगडं...!

In reply to by विसोबा खेचर

>>>>उद्या पुन्हा टाईम बदलला की एकेकाचा 'तात्या स्टाईल' अगदी खरपूस समाचार घेईन हे नक्की. इन्शा अल्लाह खुदा कसम झूठ नही बोल रहा, उस दिन का हम इन्तेझार कर रहे है. परवरदिगार आपको सलामत रक्खे.

In reply to by विसोबा खेचर

:( तात्या मी प्रत्येक विनोदी प्रतिक्रियेला हसते बरं का. कोणाला दुखविण्याचा अथवा चढविण्याच्या हेतूने येथे येत नाही. असो.

In reply to by विसोबा खेचर

आता रोजच्या किराणामालाचेही वांधे झाल्यावर माणसं त्यांच्या प्रपिसादातल्या एखाददोन शब्दांनिशीच पटापट कळू लागली.
ह्यातून कुणाला तरी कळवळा येऊ शकतो नाही का? ( आता पुढे काय कुणा निनाव्याला रोगाने पछाडले म्हणून मदत वगैरे का ? )

In reply to by विकास

( आता पुढे काय कुणा निनाव्याला रोगाने पछाडले म्हणून मदत वगैरे का ? ) रुजवात करून देईन असे तात्यांनी इथे जाहिर केले होते,किती जणाच्या वाती आत्ता पर्यंत वळल्या गेल्यात हे ज्यांचे त्यांनाच ठावुक... बाकी ज्या सदस्यांना इथल्या जुन्या जाणत्या सदस्यांचे या धाग्यावरचे प्रतिसाद पाहुन नवल वाटत आहे,त्यांनी हे सर्व सदस्य असे प्रतिसाद का देत आहेत याचा विचार करावा...कारण गेल्या ५ वर्षात माझ्या तरी पाहण्यात असा प्रकार या जुन्या जाणत्या मंडळींनी कोणाच्या लेखनात केल्याचे दिसुन आलेले नाही. बाकी तात्यांच लेखन महानच आहे आणि ते सिद्धहस्त लेखक सुद्धा आहेत... इतके सिद्धहस्त लेखक आहेत की त्यांच्या एका लिखाणात त्यांनी महर्षी व्यासांना अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी म्हंटल्याचे मला आठवते ! या वरुन उगाच तेव्हा मला कहा राजा भोज और कहा गंगुतेली ही म्हण आठवली होती... असो.

In reply to by विसोबा खेचर

आता रोजच्या किराणामालाचेही वांधे झाल्यावर माणसं त्यांच्या प्रपिसादातल्या एखाददोन शब्दांनिशीच पटापट कळू लागली.
तात्या हे वाचुन वाइट वाटले हे नक्की. पण तुम्ही नियमीत मिपावर असता म्हणजे तुमच्याकडे चांगला संगणक आणि इंटर्नेट जोडणी आहे हे स्पष्ट आहे,किराणा माल न परवडणारा मनुष्य इंटरनेटची जोडणी कशी काय घेईल? आता टाइम बदलला आहे असा निष्कर्श काढण्यास काही हरकत नसावी.

In reply to by विसोबा खेचर

उद्या पुन्हा टाईम बदलला की एकेकाचा 'तात्या स्टाईल' अगदी खरपूस समाचार घेईन हे नक्की.
समाचार आंतरजालीय कि रिअल लाईफ त्ये पण स्पष्ट करा कि . बाकी आंतरजालीय टिके वरून त्यात्या लगेच सामाचाराच्या गोष्टी करतात कूच जम्या नय. फॉर एक्झाम्पल.....चायला इथे म्या - सूड भांड भांड भांडतो.. पण प्रत्येक्षात आमच्यात काही वाद नसतात भले परा -विमे ची खडाजंगी चालत असेल, पण ते जेंव्हा भेटतात तेंव्हा एकमेकांचा खरपूस समाचार वेग्रे घेत नाहीत बाकीचे बरेच वाद अंतर्जालावर चालतात ते कोणी वयक्तिक घेत नाही, तुम्ही डायरेक समाचाराच्या भाषा करून लागले ना भाऊ . शिवाय तुमच्या वरील वक्तव्यावरून तुम्हाला झालेल्या प्रकारचे काडी मात्र वाईट वाटलेले नसून, केवळ काळ खराब आहे म्हणून मी गप्प आहे असेच सूचित होते आहे . शिवाय अजून कोणी येथे तुमच्यावर वयक्तिक टीका केलेली दिसत नाहीये. तुमच्या डेक्कन क्वीन च्या स्पीड ने येणाऱ्या "जुनाट फेस्बुकीय" लेखांवर झालेली ती टीका आहे . तोपर्यंत दगडं खायला मी तयार आहे. रक्तबंबाळ करतात पण खूप म्हणजे खूप काही शिकवून जातात ती दगडं...!

In reply to by विसोबा खेचर

काही तरी गैरसमज होतो आहे तात्या. तुमचे किराणामालाचेही वांधे झाले असतील तर ते इथल्या ९९.९९% जनतेला माहित असण्याचा काही मार्ग नाही. जे होते आहे त्याची कारणे वेगळीच(आणि सर्वज्ञात) आहेत. त्यामुळे तो विषय जाऊच द्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

खरोखर जर किराणामालाचेही वांधे झाले असतील तर अशा परिस्थितीत वेगवेगळे धागे काढण्याचा मूड राहतो? की माणूस दैनंदिन विवंचनेत गुंतून पडतो?

In reply to by विसोबा खेचर

अगदीच राहवलं नाही म्हणून हा अवांतर प्रतिसाद.शेवटी चुकत कोण नाही? लक्षात ठेवा.दुनिया गोल असते- वाईट दिवसांनंतर बरे दिवस हटकून येतातच! जीवन म्हणजे शब्दश: सापशिडीचा खेळ. असते एकेकाचे नशीब!आज मी शंभराच्या घरात तर उद्या सापाच्या तोंडी. चालायचेच, कालाय तस्मै नमः

In reply to by लंबूटांग

पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि संपादक/ सल्लागार यांच्या काही खोचक वैयक्तिक टोमणे मारणाऱ्या प्रतिक्रीया वाचून अचंबा आणि खेद दोन्ही वाटले.
या धाग्यापुरते बोलायचे झाले तर मला फार वैयक्तिक काही दिसले नाही.
मला भूतकाळात काय झाले याची बऱ्यापैकी कल्पना आहे पण ते सगळे ह्या आणि इतर धाग्यांवर का?
झाला प्रकार गंभीर होता. त्यामानाने बरी वागणूक देत आहेत लोकं.
अनेक नवीन सदस्य जे वयाने/ अनुभवाने तात्यांपेक्षा लहान असतील त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत.
चालायचंच... मागे एकदा असेच एका नवीन सभासदावर टीका होत असताना इतरांनी पण हात धुवून घेतले होते की. अगदी रसग्रहण वगैरे करून. नाही का? :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

या धाग्यापुरते बोलायचे झाले तर मला फार वैयक्तिक काही दिसले नाही.
माझा प्रतिसाद एकंदरच ह्या लेखकाच्या सर्व धाग्यांवर जे काही चालले आहे त्याला उद्देशून होता. हा धागा सर्वात वर होता म्ह्णून इथे टंकले इतकेच. कोणत्याच धाग्यावर प्रतिसाद वैयक्तिक नाहीत? ह्या धाग्यावर काही प्रतिसाद आहेत जे इथे उधृत केले तर हा प्रतिसाद उडेल.
झाला प्रकार गंभीर होता. त्यामानाने बरी वागणूक देत आहेत लोकं.
मी कधीच अमान्य केले नाही. मला ऐकीव माहितीवरून जे काही कळले ते गंभीरच्याही पलीकडले होते आणि मी त्याचे कधीच समर्थन करत नाहीये. पण ते सगळे इथे लिहीण्याची काय गरज आहे?
चालायचंच... मागे एकदा असेच एका नवीन सभासदावर टीका होत असताना इतरांनी पण हात धुवून घेतले होते की. अगदी रसग्रहण वगैरे करून. नाही का? smiley
गल्ली चुकताय राव,
  1. तात्या नवीन नाहीत.
  2. त्यांच्या लेखांच्या संख्येवर, गुणवत्तेवर टीका करणे ठीक आहे. मी बाकीच्या प्रतिसादांबद्दल बोलतोय.
  3. रसग्रहण, पाकृ, विडंबन सर्व ठीक आहे. करा की तात्याच्या लेखांचे! त्याच्या स्टाईलचे. येथे खुद्द तात्यांनीच लिहीले आहे http://www.misalpav.com/node/24673.
  4. तुमची वैयक्तिक आयुष्यात जी फसवणूक अथवा जे काही झाले त्याचे उट्टे इथे कशाला?.
मी काही तात्याला वैयक्तिकरीत्या भेटलेलो नाहीये, फोनवरून बोललो ही नाहीये. मिपाच्या स्थापनेच्या आसपास काय ती एक खरड केली असेल तेवढीच. त्यामुळे मी काही मित्रत्वाच्या नात्यातून वगैरे लिहीतोय असे काही नाहीये. येथे येणारे प्रतिसाद आयडी आणि लेखाला उद्देशून असावेत अशी जी एक सर्वसाधारण अपेक्षा असते त्याला अनुसरून लिहीतोय. वैयक्तिक टीका खटकली इतकेच. बाकी चर्चा करायची असल्यास खरडवहीत करूयात. येथे आधीच बरेच अवांतर झालेय नाही का?

In reply to by लंबूटांग

लंबुशी सहमत. जो प्रकार चालला आहे तो योग्य नाही, अगदी मनापासुन ह्याचा तिटकारा वाटत आहे. भूतकाळात जे झाले ते सर्वांना माहित आहे, पण ते प्रत्येकच ठिकाणी उगाळण्यात जास्त मतलब नाही असे मला वाटते. त्यात काही काही जणांची वागणुक पाहुन तर अचंब्याने तोंडात बोटे गेली, आश्चर्यजनक आहे सगळे. ह्यावर खरे तर चकार शब्द लिहायला नव्हता पण वाहत्या गंगेत अनेकजण उगाच हात धुवुन घेत आहेत असे वाटल्याने इथे लिहले. बाकी चालु द्यात ... - छोटा डॉन

तात्या, लेख आवडला. जुन्या आठवणी ताज्या केल्यास. पण आता त्या पुरी-आलूरश्श्याच्या चवीच्या आठवणीने जीभ खवळली आहे त्याचं काय करू? :) अवांतरः लंबूटांगच्या प्रतिसादाशी सहमत.