ही पुन्हा हवा आज, धुंदकुंद झाली
ही पुन्हा मला आज, तुझी याद आली
घनांचे पुरेपूर बरसून झाले
आता कोण आसवांना, अवेळी साद घाली
तु दिलास ना दगा, वाटते जगाला
तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली
मी न कधी घेतले, नाव तुझे कोणापुढे
दोन शब्द लिहिले, हाय ती फिर्याद झाली
लपविले सदा मी, पाय भेगाळले माझे
वाटले जगास माझी, चाल सुखात झाली
ईतक्यात त्यांना माझे, एवढे रडू आले
आता कुठे सांगण्यास, माझी सुरुवात झाली
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3184
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
गझल (आहे असे वाटते ) आवडली.
हो
छान लिहिलय.
In reply to हो by चाणक्य
गैर-मुरद्दफ
In reply to छान लिहिलय. by कवितानागेश
व्वा!
In reply to गैर-मुरद्दफ by चाणक्य
छान माहिती दिली आहेत.
In reply to व्वा! by सुधीर
सुरेख
ज्जे
फक्त सलाम सलाम सलाम!
आईऽऽगं!!!
गझल आवडली. आपण दिलेली
छान आहे. पण मला स्वतःला मराठी
छान गझल!
दवणीय गझल!