Skip to main content

फिर्याद

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 22/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुन्हा हवा आज, धुंदकुंद झाली ही पुन्हा मला आज, तुझी याद आली घनांचे पुरेपूर बरसून झाले आता कोण आसवांना, अवेळी साद घाली तु दिलास ना दगा, वाटते जगाला तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली मी न कधी घेतले, नाव तुझे कोणापुढे दोन शब्द लिहिले, हाय ती फिर्याद झाली लपविले सदा मी, पाय भेगाळले माझे वाटले जगास माझी, चाल सुखात झाली ईतक्यात त्यांना माझे, एवढे रडू आले आता कुठे सांगण्यास, माझी सुरुवात झाली
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3184
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

गझलच आहे, फक्त गैर्-मुरद्दफ (म्हणजे ज्यात 'रदीफ' नसतो ती) आहे

In reply to by चाणक्य

छान लिहिलय. पण गैर्-मुरद्दफ (म्हणजे ज्यात 'रदीफ' नसतो ती) > म्हणजे काय जरा सविस्तर लिहाल का?

In reply to by कवितानागेश

गझलेतल्या यमकाच्या शब्दांनंतर येणा-या शब्दाला / शब्दगटाला रदीफ म्हणतात. रदीफ गझलेच्या पहिल्या शेराच्या दोन्ही ओळींत येतो, मात्र पुढच्या शेरांच्या फक्त दुस-याच ओळीत यतो. उदाहरण म्हणून 'चुपके चुपके'ही प्रसिद्ध गझल घेऊ. या गझलेचा पहिला शेर आहे - 'चुपके चुपके रातदिन आसूं बहाना याद हैं हमको अबतक आशिकी का वह जमाना याद हैं' यात बहाना आणि जमाना या यमकाच्या शब्दांनंतर 'याद हैं' हे रदाफी (रदीफ चे अनेकवचन) आले आहेत. आता याच गझलेतले पुढचे शेर पाहू - दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिये वो तेरा कोठे पे नंगे पाँव आना याद हैं खींच लेना वो मेरा परदे का कोना दफ्फतन ऒर दुपट्टे से तेरा वो मुँह छुपाना याद हैं आता या वरच्या दोन्ही शेरात आना आणि छुपाना या यमकाच्या शब्दांनंतर 'याद हैं' हे रदाफी येतात. माझ्या गझलेत आली, झाली, घाली हे यमकाचे शब्द आलेत पण त्यानंतर कुठलाही रदीफ नाहीये. म्हणून ही गझल गैर-मुरद्दफ आहे.

In reply to by सुधीर

छान माहिती दिली आहेत. :) तुमच्या गजल्सबरोबर अजून इतर रसग्रहणे पण येउ देत. वाचायला आवडेल.

ज्जे बात!!
तु दिलास ना दगा, वाटते जगाला तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली
जियो!!

तू साल्या रडवणार आहेस एखाददिवस मला. हे असलं लिहिताच कसं येतं राव तुम्हाला? तू एक अन तो आमचा आंद्या एक. कमीतकमी शब्दात काळीज कसं पिळवटायचं ते शिकावं तुमच्याकडून. :(

गझल आवडली. आपण दिलेली माहितीही आवडली. वर माऊ ने म्हटले आहे तसेच म्हणते, रसग्रहण आणि माहिती वाचायला आवडेल.