शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता.
अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल.
असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता.
ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.'
खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती.
असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे.
--------------------------------------------------------------------------
(राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल.)
संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्या त्रुटी हि नाहीत...त्या गाढवचुका आहेत
दुसर्या दुव्यात
सल्ल्याचं म्हैती नै पण आशिर्वाद घेतल्याचे सर जदूनाथ म्हणतात:)
आणि पुढे तर he touched feet
-
गजानन भास्कर मेहेंदळ्यांच्या
एकमत होत नव्हतं म्हणजे विरोध म्हणावा का ?
भोसल्यांचं कूळ क्षत्रीय
जरा असाही विचार करुन बघा....
छान
योगप्रभूजि खुप छान विचार
सुंदर प्रतिसाद. यातल बरचस मी
मान गये प्रभूजी
जबरदस्त प्रतिसाद!
कै च्या कै....विचार.
विचार स्वीकारण्याचा आग्रह नाही...
सुंदर प्रतिसाद योगप्रभुजी,
राजे! मी लक्षात ठेवीन.
क्या बात है sir जी..
हम्म
हो
शिवाजी महाराजांना कुणी विरोध
"सदर धाग्याउपरी याउप्परी आणिक
खरे आहे...
मार्मिक प्रतिसादु!! ऐसेचि
ब्राह्मणांनी राज्यभिषेकाला
वेदोक्त प्रकरणाला भक्कम
ब्याटिंग मॅनास हणुमोदण्ण...!
+१
बॅटमॅन, म्हणजे राज्याभिषेकाला
तुमची विधाने कुठल्या
कै च्या कै बरळून झाल्यावर
हसू की रडू कळत नाहीये
+११११११११११११११११११११११११११११
पण
काही अंशी सहमत
+१०,०००
अशा जाणत्या राजावर कोणा एका जातीचा हक्क सांगणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे तर भगवद्गीता सांगणार्या श्रीकृष्णालासुद्धा "गवळ्याचा पोर" म्हणून हिणवणारे लोक होतेच. महाराजांना तेव्हा कोणी जातीवरून विरोध केला असे म्हणून आता साडेतीनशे वर्षांनंतर कोणी वाद घालायला पुढे येत असतील तर त्यांना नेऊन बारा गडगड्यांच्या हिरीत घाला. त्याबद्दल चर्चा करण्याइतकीसुद्धा किंमत देणे हा वेळेचा अपव्यय आहे.+१०,०००... कारण लाखमोलाचा विचार ! इतिहासाचा उपयोग जुन्या गोष्टींचा केवळ रवंथ करण्यासाठी करण्यापेक्षा, फक्त आणि फक्त शहाणे होऊन भविष्याकाळात एकत्रितपणे योग्य निर्णय घेणासाठी करण्याची कुवत नागरिकांत (आणि पर्यायाने नेत्यांत) आली की राष्ट्र वयात येऊन प्रगत व्हायला सुरुवात होते.गडबडीत एक शुन्य कमी टंकले गेले ! कृपया दोन्ही ठिकाणी +१००,०००...
शिवाजी महाराजांनी स्वतःच्या
राज्याभिषेकाची गरज
प्र.....चं...........ड..........स......ह........म.........त
ते नसते तर आज आपण सगळे
महाराज साहेब आणि
माहितीत भर...
स्पष्टपणे लिहिलं असतं तर....
खरं आहे तुमचं...
राजाश्रय संपला आणि येथील
अवांतर होतंय पण लिहिलं पाहिजे म्हणून शेवटचा प्रतिसाद.
हा हा हा
:)