Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सर्वसाक्षी on Wed, 01/23/2013 - 14:50
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
akherJPG भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या व परकिय सत्तेवर निर्णायक घाव घालण्यासाठी 'आजाद हिंद सेनेला' घेउन शत्रूवर निर्णायक हल्ला करायला निघालेल्या व दुर्दैवाने स्वप्न साकार होण्याआधीच अनंतात विलिन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज त्यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त सादर वंदन.
  • Log in or register to post comments
  • 15945 views

प्रतिक्रिया

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 02/05/2013 - 01:47

In reply to समजत नाही by क्लिंटन

Permalink

फिलीपाईन्स, इंडोचायना, मलाया

फिलीपाईन्स, इंडोचायना, मलाया ह्या देशांची भारताशी भौगोलिक दृष्ट्या व लष्करी दृष्ट्या तेव्हा सुद्धा बरोबरी नव्हती व आज तर अजिबात नाही आहे , पण सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे भारताकडे इंग्लिश शिस्तीत वाढलेले सैन्य होते ज्यातील वरिष्ठ अधिकारी पहिले व दुसरे महायुद्ध लढले होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतीय सैन्याला भारताच्या स्थानिक जनतेची साथ होती. क्लिंटन तुम्ही थत्ते ह्यांच्या धाग्यावर जी काही मते मांडली आहेत त्यावर अनेक मिपाकरांनी प्रतिवाद केला आहे , तरीही तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात तेव्हा ह्या पुढे अजून मी काय लिहू , पण जपान्यांची मदत नेताजींनी चूक केली व पुढे कदाचित जपान ने भारतावर अत्याचार केले असते अश्या नावीन्यपूर्ण कल्पना मी तुमच्याकडून येथे मिपावर पहिल्यांदा वाचल्या ह्या आधी आंजा वर ह्या संबंधी इतर कोणी विद्वान व तज्ञ व्यक्तींनी लिहिल्याचे आठवत नाही , पण जे रहस्य तुम्हाला कळले तेच खरे कारण बहुदा नेताजी ह्यांना भारत रत्न न मिळण्यासाठी असावे. आणि राहिला भाग भारताला मदतीसाठी इतर देश रांग लावून बसले होते का ह्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या दुर्दैवाने होय असेच आहे , दुसरे महायुद्ध संपले आणी ह्या युद्धातील जेते देश रशिया व अमेरिका ह्यांनी आपल्या आपल्या मित्र राष्ट्रांच्या फळ्या उभारल्या , व समाजवाद विरुद्ध भांडवल शाही असे जगाचे चित्र झाले , नवीन स्वतंत्र झालेला भारत मात्र नेहरू ह्यांच्या नेतृत्वाखाली ह्या दोन बलाढ्य देशांना शांततेचे बोधान्मृत पाजण्यासाठी आपल्यासारखे छोटे देश एकत्र आणून तिसरी फळी बनवून बड्या राष्ट्रांना अक्कल शिकवत होते , नेताजी ह्यांचा कम्युनिस्ट रशिया कडे कधीच ओढा नव्हता .त्यांनी तेव्हा भांडवलशाही राष्ट्रांना अनुकूल धोरण स्वीकारले असते तर अमेरिकेने भारताला नक्कीच मदत केली असती , स्वतंत्र भारतात आपली आय ,आय टी सारखी विद्या मंदिर अमेरिकेने च्या सहाय्याने भारतात उभारली , आज भारताची व अमेरिकेची उद्दिष्टे समान आहेत व सगळ्यात महत्त्वाचे भारताच्या राजकारणात भांडवलशाही व खुली बाजारपेठ असे दोन परवलीचे शब्द आले व अचानक भारत अमेरिकेचा नैसर्गिक दोस्त बनला. हे दोन परवलीचे शब्द नेताजी ह्यांनी भारताच्या अर्थ शास्त्रात जमा केले असते तर आज जो भारतात गेल्या वीस वर्षात मध्यमवर्ग व त्यांचा चंगळवाद दिसत आहे तो पाचपटीने जास्त दिसला असता. सगळ्यात म्हणजे अमेरिकेची सुरवातीपासून मैत्री भारताला फायदेशीर ठरली असती. मात्र नेहेरु ह्यांनी तिसरी फळी निर्माण करून भारताला दोन्ही बलाढ्य राष्ट्रांहून दूर केले. पुढे शीतयुद्धात पाकिस्तान ने अमेरिकन मदत घेऊन त्यांचे मित्र राष्ट्र झाला तर इंदिरा गांधी ह्यांनी रशिया ची जवळीक वाढवली. ,अवांतर असे भारतात जपान्यांनी नाही मात्र भारतीयांनी खुद दंगलीत एकमेकांवर हिंसाचार केला , आझाद हिंद सेनेत एकत्र लढणारे सर्व धर्मीय भारतीय ही नेताजींची देणगी होती. शांती सेनेचे उदाहरण हा एक विनोद आहे , मुळात पाकिस्तान हा श्रीलंकेपासून लांब त्यात त्यांची नेव्ही भारतापेक्षा कंपूवत जे पाकिस्तान बांगलादेश वाचवू शकले नाही कारण मूळ पाकिस्तान पेक्षा ते भौगोलिक दृष्ट्या लांब होते ते श्रीलंकेत कश्याला येईल , माझा मुद्दा खोडण्यासाठी तुम्ही कल्पनेचे मोठे मनोरे रचत आहात. मुळात दुसर्या महायुद्धाचा इतिहास पहिला तर जर्मनी चे रशियात जे झाले ते पाहून जपान ने आपल्या मित्र राष्ट्र भारतात अशी आगळीक केली नसती. इंग्रजांच्या तालमीत तयार झालेले भारत व पाकिस्तान व बांगलादेश ह्यांचे सैन्य त्यावेळी सुद्धा जगात लढाऊ म्हणून प्रसिद्ध होते. पठाण ,गुरखा ,शीख , राजपूत , मराठा , महार अश्या आपल्या रेजिमेंट ज्या नुकत्याच युरोपातून भारतात परत आल्या असत्या , जपान ने कोणत्या तोंडाने आगळीक केली असती.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Tue, 02/05/2013 - 13:33

In reply to फिलीपाईन्स, इंडोचायना, मलाया by निनाद मुक्काम …

Permalink

काय सांगता

पण जपान्यांची मदत नेताजींनी चूक केली व पुढे कदाचित जपान ने भारतावर अत्याचार केले असते अश्या नावीन्यपूर्ण कल्पना मी तुमच्याकडून येथे मिपावर पहिल्यांदा वाचल्या ह्या आधी आंजा वर ह्या संबंधी इतर कोणी विद्वान व तज्ञ व्यक्तींनी लिहिल्याचे आठवत नाही
अहो या नावीन्यपूर्ण कल्पना नाहीत.जपान्यांनी अंदमान-निकोबार बेटे ताब्यात घेतली होती (नेताजींनी त्यांचे नामकरण शहिद आणि स्वराज्य केले होते). त्या दरम्यान तिथेही जपान्यांनी भारतीयांना मारलेच होते.सुदैवाने अंदमान-निकोबार हा दाट लोकवस्तीचा प्रदेश नसल्यामुळे आपले ७५० (दुसर्‍या महायुध्दातील स्टॅन्डर्डप्रमाणे त्या मानाने बरेच कमी) लोक मारले गेले. याविषयी थत्ते यांच्या थिअरी या धाग्यातही उल्लेख केलाच आहे. जपान्यांना भारतीयांविषयी विशेष प्रेम होते असे तुम्हाला वाटत असेल तर तसे वाटायला फारशी जागा नाही हे तर त्यातून नक्कीच समजून येईल. जे जपान्यांनी चीन्,फिलीपाईन्स, मलाया, इंडोचायना वगैरे प्रदेशात तर सोडाच तर अंदमानातही केले तेच बंगालमध्ये केले नसते हे नक्की कोणत्या आधारावर वाटते हेच मला समजत नाही.
राहिला भाग भारताला मदतीसाठी इतर देश रांग लावून बसले होते का ह्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या दुर्दैवाने होय असेच आहे ,
खरं की काय? मग इंग्लंडने भारताला त्यावेळीच स्वातंत्र्य का दिले नाही? महायुध्दाच्या दरम्यान "अटलांटिक कार्टर" प्रसिध्द झाली तेव्हा चर्चिलने भारताला स्वातंत्र्य देणार नाही असे निक्षून जाहिर केले.त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनाही भारताला स्वातंत्र्य द्यावे असे वाटत होते असे वाचनात आले आहे.पण चर्चिलपुढे त्यांनी हा मुद्दा लावून धरला नाही. म्हणजेच त्याकाळी भारत हा रूझवेल्ट आणि चर्चिलच्या दृष्टीने तुम्हाला वाटतो तितके महत्व देण्यायोग्य देश अजिबात नव्हता.मग भारताला मदत करायला नक्की कोण रांगा लावून उभे होते?जर्मनीत सुभाषचंद्रांनीही हिटलर आणि रिबेन्ट्रॉपची भेट घेतली पण जर्मनीनेही भारताला मदत करायला तशी टोलवाटोलवीच केली म्हणून सुभाषचंद्र नंतर जपानला गेले, बरोबर?
शांती सेनेचे उदाहरण हा एक विनोद आहे ,
उत्तम. विनोदाचा आस्वाद घ्या.पण त्यापेक्षा बराच मोठ्या विनोदाचा आस्वाद घ्यायची संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल आभारी आहे.तो विनोद म्हणजे-- पहिल्यांदा भारताने इंग्लंडला हाकलायला जपानची मदत घ्यायची आणि जर जपानने आगळिक केली असती तर जपान्यांना हाकलायला परत अमेरिकेची मदत घ्यायची आणि ती अमेरिकेने गपगुमान दिली असती ही कल्पनाच मला भयंकर विनोदी वाटते.
इंग्रजांच्या तालमीत तयार झालेले भारत व पाकिस्तान व बांगलादेश ह्यांचे सैन्य त्यावेळी सुद्धा जगात लढाऊ म्हणून प्रसिद्ध होते. पठाण ,गुरखा ,शीख , राजपूत , मराठा , महार अश्या आपल्या रेजिमेंट ज्या नुकत्याच युरोपातून भारतात परत आल्या असत्या ,जपान ने कोणत्या तोंडाने आगळीक केली असती.
अहो वैयक्तिक शौर्याच्याच बळावर युध्द जिंकायचे दिवस १९४५ मध्ये बरेच मागे पडले होते.पहिल्यांदा इंग्रजांशी वाकडे केलेच आणि नंतर जपान्यांशीही वाकडे केले असते तर त्यांच्याविरूध्द लढायला लागणार्‍या तोफा, बंदुका, रणगाडे, विमाने, युध्दनौका आकाशातून पडणार होत्या का? आणि खुद्द इंग्लंड आणि अमेरिकेच्या सैन्याचा जपानने काही महिन्यात दक्षिण-पूर्व एशियात पराभव केला होता.तेव्हा इंग्रजांच्या तालमीत तयार झालेल्या सैन्याची काय कथा? आणि तुम्ही नंतर आय.आय.टी ची स्थापना, शीतयुध्द वगैरे भविष्यातले संदर्भ दिलेच आहेत म्हणून मी पण फार नाही पण ३-४ वर्षे नंतरचा संदर्भ देतो. त्याच इंग्रजांच्या तालमीत तयार झालेल्या भारतीय सैन्याला (स्वातंत्र्य मिळाल्यावर इंग्रजांच्या सैन्यातील विमाने आणि शस्त्रास्त्रे दिमतीला असताना) १९४७-४८ मध्ये १४ महिन्यात पाकिस्तानी घुसखोरांना काश्मीरात ५०-६० किलोमीटरपेक्षा जास्त मागे पिटाळता आले नव्हते.पण दुसर्‍या महायुध्दाच्या काळात जपान उलटला असता तर अशी शस्त्रे हातात नसताना जपान्यांचा आपण चुटकीसरशी पराभव कसा करणार होतो (थिअरी चर्चेतील शब्द) हे त्या भगवंतालाच ठाऊक.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 02/05/2013 - 14:42

In reply to काय सांगता by क्लिंटन

Permalink

जपानी लोकांनी जे अंदमान येथे

जपानी लोकांनी जे अंदमान येथे केले ते बंगाल मध्ये का केले नसते असा प्रश्न तुम्हाला फक्त पडला पण ह्याआधी कुठल्याही राजकीय विचारवंताला का बरे पडला नसावा , आतापर्यंत आपल्या देशात कुणीच बरे हा मुद्दा धसास लावला नाही , का तुमच्या डोक्यात जी ही अभूतपूर्ण कल्पना आली ती ह्या आधी इतर लोकांच्या का बरे आली नाही , कदाचित नेताजी ह्यांचा करिश्मा एवढा असावा की तुम्हाला जी तयंची चूक वाटते ती आधी कोणतही राजकीय विचारवंताला म्हणजे कोणाला सुद्धा वाटली नाही. आणि तुम्ही किती विनोद करता राव चर्चिल व इंग्लंड ने भारताला स्वातंत्र्य का दिले नाही , अहो साहेब जर विचार करा समजा जपानच्या मदतीने इंग्रज देशाबाहेर गेला असता म्हणून काही जर्मनी चा रशियात पराभव व त्याचं बरोबर रशिया ,अमेरिका , इंग्रज अशी युती होणे काही टळले नसते , जपान ने जर्मनी ला मदत केली नाही व ती ते रशियात करू शकले नसते. तेव्हा जरा विचार करा दुसर्या महायुद्ध नंतर अमेरिका व इंग्लंड मध्ये आलेला मजूर पक्ष वसाहत वादाच्या विरोधात होता, चर्चिल विरोधी पक्षाच्या बाकावरून भारताला स्वतंत्रता देऊ नका असे बजावत असतांना सुद्धा हा निर्णय घेतला गेला , प्रत्यक्ष दुसरे महायुद्ध चालू होते तेव्हा देश गांधी ह्यांच्या अहिंसेच्या मार्गावर चालत होता , व गांधी ह्यांचा बोस ह्यांच्या सशस्त्र क्रांती ला विरोध होता म्हणूनच अमेरिका व जर्मनी ने बोस ह्यांना महत्व दिले नाही , पण आपण येथे चर्चा करत आहोत जर जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना इंग्रजांना पराभूत करून भारतात दाखल झाली असती व मग जपान ने बंगाल मध्ये अत्याचार ,... येथे एक मुद्दा लक्षात घ्या , एक नेता भारता बाहेर जातो , सशस्त्र सैन्य उभारतो व भारतात विजेता म्हणून परत येतो व पराभूत राष्ट्रे त्यावेळचे बलाढ्य इंग्लंड असते अश्यावेळी सुभाष चंद्र ह्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा काय असती , व वसाहती भारताचे अमेरिकेला महत्व वाटत नसेल पण स्वतंत्र देश म्हणून अमेरिकेला भारताचे महत्व नक्कीच वाटले असते. किंबहुना अमेरिकेला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे महत्व पटले होते , त्यांच्या एम आय टी च्या धर्तीवर आपली आय आय टी स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला , भारतने मिश्र अर्थ व्यवस्था स्वीकारली , पण नरसिंह राव ह्यांनी जी अर्थव्यवस्था भारतात अंमलात आणली त्या धर्तीवर जर अर्थव्यवस्था भारत स्वतंत्र झाल्यावर स्वीकारणार असेल तर अमेरिकेला आपल्याला मदत करणे काहीच अशक्य नव्हते , ज्यू राष्ट्रे प्रगत देशांच्या मदतीने स्थापन झाले , तेव्हा ह्या राष्ट्राने प्रगत राष्ट्रांची सुरवातीपासून सुसंगत धोरणे राबविली म्हणून अमेरिका व ज्यू राष्ट्रांशी मैत्री अभेद्य आहे, जर बांगलादेश , पाकिस्तान सह आजचा भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आले असते तर आणि त्यांनी अमेरिकेशी सुसंगत धोरण स्वीकारणार असते तर अमेरिकेने भारताला नक्कीच मदत केली असती. The CIA succeeded the Office of Strategic Services (OSS), formed during World War II to coordinate espionage activities against the Axis Powers for the branches of the United States Armed Forces. The National Security Act of 1947 established the CIA, affording it "no police or law enforcement functions, either at home or abroad".[१ दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेने ह्या हेर संस्थेंची स्थापना केली व आपल्या सहकारी असलेल्या रशिया विरुद्ध कारवाया सुरु केल्या. कारण आता लढाई दोन राष्ट्रांच्या मध्ये नव्हती तर समाजवाद ,भांडवशाही च्या मध्ये होती , जेथे अमेरिका आपल्या एकेकाळच्या सहकारी राष्ट्रे रशिया विरुद्ध शीत युद्ध घोषित करू शकतो तेथे त्यांचा भारताशी वैयक्तिक असा काहीच वाद नव्हता , किंबहुना मजूर पक्षाचे सरकार इंग्लंड मध्ये आले तेव्हा स्वतंत्र भारताशी त्यांनी संबंध तोडले नाही. तेव्हा अमेरिकेने जर अणु बॉंब बनवला नसता तर त्यांचे जपानशी युद्ध सुरूच असते , ते इतक्यात निकाली लागणे शक्य नव्हते , तेव्हा कुठे जपानला भारतात येणे शक्य झाले असते. तेव्हा अश्यावेळी जर जपानने भारतात अत्याचार केला असता ,तर जपानशी युद्ध चालू असलेल्या अमेरिकेने भारताला का बरे मदत केली नसती. जपानला भारतात प्रस्थापित होणे हे भविष्यात अमेरिकेला जड गेले असते कारण आशियात सर्वत्र जपान चा बोलबाला झाला असता , एवढे अमेरिकेला कळत होते , दुसर्या महायुद्धात जर्मनी व रशिया ह्यांचा करार झाला होता , पुढे जर्मनी ह्याने जेव्हा रशिया वर हल्ला केला तेव्हा रशिया ने जर्मनींच्या शत्रू राष्ट्रे इंग्लंड व अमेरिकेशी मैत्री केली , जे रशिया ने जर्मनी उलटल्यावर केले ते भारताने जपान उलटल्यावर केले असते एवढे लॉजिक पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Tue, 02/05/2013 - 22:49

In reply to जपानी लोकांनी जे अंदमान येथे by निनाद मुक्काम …

Permalink

खरं की काय

आणि तुम्ही किती विनोद करता राव
हे वाचून तर अगदी परमसंतोष जाहला.मिसळपाववर गेल्या साडेपाच वर्षांत अनेक चर्चांमध्ये मी भाग घेतला.पण माझी एकूणच प्रतिमा थोडीशी (किंवा बरीचशी) गंभीर लिहिणारा अशी होती असा माझा गैरसमज होता.तो दूर केल्याबद्दल आपला आभारी आहे.
चर्चिल विरोधी पक्षाच्या बाकावरून भारताला स्वतंत्रता देऊ नका असे बजावत असतांना सुद्धा हा निर्णय घेतला गेला
बरं मग?चर्चिलने विरोधी बाकांवरून कितीही बजावले तरी त्याला अजिबात गांभीर्याने घ्यायची गरज नाही.
तेव्हा अमेरिकेने जर अणु बॉंब बनवला नसता तर त्यांचे जपानशी युद्ध सुरूच असते , ते इतक्यात निकाली लागणे शक्य नव्हते , तेव्हा कुठे जपानला भारतात येणे शक्य झाले असते.
जपान्यांचा इंटरेस्ट इंग्लंड आणि अमेरिकेला स्वत:च्या प्रभावक्षेत्रापासून जास्तीत जास्त दूर ठेवण्यात होता. तसेच १९४२ च्या शेवटी-१९४३ च्या सुरवातीला जपानी ब्रम्हदेशातून भारताच्या दिशेने वेगाने वाटचाल करतच होते.आणि त्या दृष्टीने जपान्यांना भारताच्या निदान काही भागात तरी तळ ठोकून राहण्यात नक्कीच इंटरेस्ट होता.आणि सुदैवाने जपानी भारतात फार आत घुसू शकले नाहीत.तसे ते घुसले असते तर त्या प्रदेशात त्यांनी इंग्रजांना उखडून फेकले असते हे अगदी १००% मान्य.पण त्यांनी सत्ता भारतीयांच्या हातात दिली असती हे मला तरी अशक्य वाटते.जपान्यांनी फिलीपाईन्स,इंडोनेशिया या देशांना स्वातंत्र्य दिले नव्हते तर तिथे कत्तलीच केल्या होत्या.तेव्हा भारतात आल्यानंतर त्यांना अचानक प्रेमाचे भरते आले असते असे अजिबात वाटायची गरज नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे अणुबॉम्ब वगैरे बऱ्याच पुढच्या गोष्टी झाल्या जपानी भारतात थोडे घुसलेही होते. त्यांना तसेही भारतात घुसायचेच होते आणि त्यांना घुसायला आपल्याच लोकांना मदत केली आणि अशा मदतीचे समर्थन तुमच्यासारखे लोक करतात.
ज्यू राष्ट्रे प्रगत देशांच्या मदतीने स्थापन झाले , तेव्हा ह्या राष्ट्राने प्रगत राष्ट्रांची सुरवातीपासून सुसंगत धोरणे राबविली म्हणून अमेरिका व ज्यू राष्ट्रांशी मैत्री अभेद्य आहे,
खरं की काय? मला आपले उगीचच वाटत होते की ज्यू समाजाची आर्थिक ताकद अमेरिकेत असल्यामुळे अमेरिका इस्राएलविरूध्द जाऊ शकत नाही.हा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद.
जर बांगलादेश , पाकिस्तान सह आजचा भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आले असते तर आणि त्यांनी अमेरिकेशी सुसंगत धोरण स्वीकारणार असते तर अमेरिकेने भारताला नक्कीच मदत केली असती.
कमाल आहे.पहिल्यांदा आपला कट्टर शत्रू टोजोच्या जपानची मदत घ्यायची, आपल्याच मित्रदेशाला भारतातून हाकलायचे हे प्रकार केल्यानंतर अमेरिकेने भारताला मदत केली असती?
दुसर्या महायुद्धात जर्मनी व रशिया ह्यांचा करार झाला होता , पुढे जर्मनी ह्याने जेव्हा रशिया वर हल्ला केला तेव्हा रशिया ने जर्मनींच्या शत्रू राष्ट्रे इंग्लंड व अमेरिकेशी मैत्री केली , जे रशिया ने जर्मनी उलटल्यावर केले ते भारताने जपान उलटल्यावर केले असते
यात दोन गोष्टी आहेत.पहिली म्हणजे १९३९-जून १९४१ दरम्यान जर्मनी आणि रशिया यांच्यात अनाक्रमणाचा करार असला तरी कधीनाकधी जर्मनी आणि रशिया दरम्यान युध्द होणार हे वत: स्टॅलिनलाही माहित होते.तसेच या काळात रशियाने फिनलंड आणि पोलंडवर हल्ला केला होता पण कुठेही ब्रिटिश हितसंबंधांना प्रत्यक्षपणे धोका निर्माण केला नव्हता. तेव्हा इंग्लंड-अमेरिकेला १९४१ मध्ये रशियाला मदत करण्यात काहीच अडचण नव्हती. जर जपानची मदत घेऊन इंग्रजांना भारतातून मागे रेटले असते तर तो इंग्रजांच्या अगदी जिव्हारी लागणारा घाव ठरला असता.ब्रिटिश साम्राज्यात भारताचे स्थान काय होते हे वेगळे सांगायलाच नको.असा घाव भारतीयांनी दिल्यानंतरही जपान्यांविरूध्द इंग्लंड-अमेरिका भारताच्या मदतीला आले असते असे वाटणे अत्यंत भाबडेपणाचे आहे. दुसरे म्हणजे १९४१ मध्ये रशियाला जेव्हा इंग्लंड-अमेरिकेने मदत सुरू केली तेव्हा रशिया एक बऱ्यापैकी बलाढ्य देश होता. निदान स्वतंत्रपणे शस्त्रे नाहीत, विमाने नाहीत, रणगाडे नाहीत अशी रशियाची परिस्थिती नक्कीच नव्हती (जी भारताची होती). तसेच लाखभर इंग्रज ३० कोटींच्या भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले म्हणजे भारतीय समाज हा फारसा लढवय्या नाही हे काही त्यांना कळले नसेल का? तेव्हा भारताला मदत करणे म्हणजे भारताचे युध्द आपणच लढण्यासारखे आहे हे इंग्लंड-अमेरिकेला कळणार नाही का?अशी मदत करून इंग्लंड-अमेरिकेला काय मिळणार होते?परराष्ट्रसंबंधात स्वत:ला काही मिळाल्याशिवाय कोण कशाला इतरांना मदत करायला जातो?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 02/05/2013 - 14:45

In reply to काय सांगता by क्लिंटन

Permalink

लगे रहो!

क्लिंटना मानले रे बाबा तुला.. चिकाटी थोर आहे! आम्ही पूर्वी असा प्रयत्न करायचो हल्ली (वय झाल्यावर ;) ) २-४ प्रतिसादानंतर सोडून देतो :) या धाग्यांवर निव्वळ आदरांजली वहाणार होतो पण राहवले नाही म्हणून हा प्रतिसाद दिला. लगे रहो!
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Fri, 01/25/2013 - 19:00

Permalink

माझीही

आदरांजली
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 01/30/2013 - 14:01

Permalink

आदरांजली

नेताजींना आदरांजली
  • Log in or register to post comments

Submitted by अधिराज on Fri, 02/01/2013 - 14:19

Permalink

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वंदन व भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 02/01/2013 - 14:39

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sat, 02/02/2013 - 00:26

Permalink

अर्रर्र...

अर्रर्र, वरची काही चर्चा ह्या धाग्यावर झाली नसती तर ह्या धाग्याचे पावित्र्य आबाधित राहिले असते असे उगाच वाटून गेले. -(सुभाषबाबूंचा भक्त) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 02/05/2013 - 02:15

Permalink

एक प्रश्न

हे खरे आहे का? मध्यंतरी असे वाचनात आले होते की, स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नेहरूंनी आझाद हिंद सेनेतील इच्छूक सैनिकांना स्वतंत्र भारताच्या सैन्यात घेण्यास नकार दिला. (त्याच बरोबर हे देखील लक्षात ठेवायला हवे की आझाद हिंद सेनेतील पकडलेल्या सैनिकांवर लाल किल्ल्यामधील राजद्रोहाच्या खटल्यात, त्यांच्या बचावासाठीच्या काँग्रेसने नेमलेल्या समितीत नेहरू देखील एक वकील होते.)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 02/05/2013 - 08:14

In reply to एक प्रश्न by विकास

Permalink

सरसकट नकार नसावा

मध्यंतरी असे वाचनात आले होते की, स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नेहरूंनी आझाद हिंद सेनेतील इच्छूक सैनिकांना स्वतंत्र भारताच्या सैन्यात घेण्यास नकार दिला
सरसकट नकार नसावा. कारण एअर कमोडर रमेश सखाराम बेनेगल नावाचे आझाद हिंद सेनेतील एक अधिकारी नंतर भारतीय सैन्यात दाखल झाले. ६५ आणि ७१ च्या युद्धात भाग घेतला. त्यांना अति विशिष्ठ सेवा पदक तसेच महा वीर चक्र यांनी गौरवले गेले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 02/05/2013 - 09:06

In reply to सरसकट नकार नसावा by सुनील

Permalink

नंतर

त्यांच्या (कमोडर बेनेगल) मरणोत्तर प्रकाशीत झालेल्या आठवणींच्या पुस्तकात, BURMA to JAPAN with Azad Hind: A War Memoir (1941–1945) म्हणल्याप्रमाणे: The end of the war finds Benegal being shipped to India to be imprisoned by the British - ironically the first time he actually set foot in India. Released a few weeks later - thanks to the prevailing atmosphere at that time - Benegal decided to join the Indian Air Force . His hopes would be dashed when the IAF rejected his application citing his INA links! Not content with that response, Benegal would try again, this time successfully to get commissioned in the IAF in 1952.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 02/05/2013 - 09:13

In reply to नंतर by विकास

Permalink

बरोबर

बरोबर पण १९५२ सालीदेखिल नेहरू होतेच की! तेव्हा नेहरूंनी नकार दिला ह्यात तसे काही तथ्य दिसत नाही! सरसकट संपूर्ण आझद हिंद सेनेचे भारतीय सैन्यात विलीनीकरण अशक्यच होते. परंतु, केस बाय केस प्रवेश दिला गेला, असेच दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 02/05/2013 - 09:21

In reply to बरोबर by सुनील

Permalink

बरोबरच आहे

पण त्यात जे His hopes would be dashed when the IAF rejected his application citing his INA links! म्हणले आहे त्यासंदर्भात मूळ प्रश्न होता. असे काय कारण होते की आझाद हिंद सेनेशी संबंधीत म्हणल्यावर त्यांना सैन्यापासून दूर ठेवले गेले? त्यातील अनेकांना होमगार्ड वगैर तत्सम (अलाईड) पेशासाठी घेतले गेले. त्यात दोन शक्यता आहेतः (१) त्यांच्यावर (आझाद हिंद फौजेवर) अविश्वास दाखवला गेला असे वाटते. (२) ब्रिटीशांचे निर्णय हे तात्काळ रदबातल केले गेले नसल्याने त्यांना राजद्रोहीच समजले गेले. जसे पांडूरंग सदाशीव खानखोज्यांच्या बाबतीत झाले तसेच काहीसे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 02/05/2013 - 09:34

In reply to बरोबरच आहे by विकास

Permalink

शक्य आहे.

शक्य आहे. १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० पर्यंत भारताचा कारभार हा १९३५ च्या गवर्मेन्ट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अंतर्गत सुरू होता. त्यानंतर भारताची घटना लागू झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 02/05/2013 - 02:22

Permalink

विकासजी हे दुर्दैवाने खरे आहे

विकासजी हे दुर्दैवाने खरे आहे , महानायक ह्या नेताजींच्या पुस्तकात ह्याचा सविस्तर उल्लेख आहे. नेहरू ह्यांनी वकीलपत्र घेतले खरे मात्र स्वतंत्रता मिळाल्यावर मात्र त्यांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांना सैन्यात घेतले नाही ,ह्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आझाद हिंद सेनेतील जे मुस्लिम अधिकारी पाकिस्तानात गेले ते पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले , आज ज्या मनोज कुमार चा सिनेमा काही सध्याच्या काही मध्यमवर्गीय लोकांचा चेष्टेचा विषय ठरतो , खरे तर त्या सिनेमातून अशोक कुमार ला निवृत्त आझाद हिंद सेनेचा जवान दाखवून त्याने खरे भारताच्या सर्व निव्रूत जवानाची शोकांतिका दाखवली आहे , आझाद हिंद सेनेतील महिला अधिकारी लक्ष्मी ह्यांनी म्हणूनच पुढे सरकारने पुढे पुरस्कार देत होते ते नाकारले ,
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 02/05/2013 - 03:25

In reply to विकासजी हे दुर्दैवाने खरे आहे by निनाद मुक्काम …

Permalink

?

आझाज हिंद सेनेतील जवानांना भारताच्या सैन्यात घेतले नाही म्हणून लक्ष्मी सैहगल यांनी पुरस्कार नाकारला असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 02/05/2013 - 06:03

In reply to विकासजी हे दुर्दैवाने खरे आहे by निनाद मुक्काम …

Permalink

तसे नसावे

आझाद हिंद सेनेतील महिला अधिकारी लक्ष्मी ह्यांनी म्हणूनच पुढे सरकारने पुढे पुरस्कार देत होते ते नाकारले तसे नसावे. त्यांना १९९८ साली राष्ट्रपती वेंकटरामन यांच्या हस्ते पद्मविभूषण देण्यात आले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 02/05/2013 - 15:12

In reply to तसे नसावे by विकास

Permalink

वेंकटरामन???

१९९८ ?? १९९८ला शंकरदयाळ शर्मा किंवा के आर नारायणन हे राष्ट्रपती होते. वेंकटरामन हे राजीव गांधींच्या काळात् १९८८च्या आसपास त्या पदावर होते.(ते त्यांचे पंतप्रधानांविरुद्ध सुप्रसिद्ध वाद व घटनात्मक पेच वगैरे त्याच वेळेसचे.)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 02/05/2013 - 17:20

In reply to वेंकटरामन??? by मन१

Permalink

नारायणन

चुकून वेंकटरामन लिहीले होते. ते आर के नारायणन होते. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 02/07/2013 - 16:40

In reply to नारायणन by विकास

Permalink

आर के नारायणन नाहित

आर के नारायण हे दिग्गज व्यंगचित्रकार्.टाइम्स मधील "कॉमन मॅन" हे त्यांचेच अपत्य. . के आर नारायणन हे भारताचे माजी राष्ट्रपती.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/07/2013 - 17:38

In reply to आर के नारायणन नाहित by मन१

Permalink

लक्ष्मण

ते आर के लक्ष्मण! :-) के आर नारायण हे राष्ट्रपती - धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sat, 02/09/2013 - 09:39

In reply to आर के नारायणन नाहित by मन१

Permalink

आर के नारायण हे मालगुडी डे

आर के नारायण हे मालगुडी डे वाले आहेत,
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 02/05/2013 - 23:05

In reply to तसे नसावे by विकास

Permalink

पुरस्कार नाकारला होता हे खरे

लक्ष्मी सहगल यांनी पुरस्कार नाकारला होता हे खरे. मात्र त्याचा आझाद हिंद सेना आणि भारत सरकार यांच्यातील तथाकथित वादाशी काहीही संबंध नसून, कॅ. सहगल यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीशी संबंध असावा असा दावा त्यांच्या कम्युनिष्ट पक्षाने केला होता. येथे वाचा. http://www.hindustantimes.com/News-Feed/India/Politicking-over-the-Bharat-Ratna-award/Article1-268981.aspx
Pandhe pointed out that CPI(M) members in West Bengal and Kerala were known to reject even the freedom fighters’ pension as they viewed it as a government dole. “Our Presidential candidate Laxmi Sehgal is one such freedom fighter who refused the pension and the (Padma) award,” said Pandhe. CPI general secretary A.B. Bardhan had his own take on the debate. “We are anti-establishment and are fighting the state to attain a socialist society. So, we are against any state awards,” he said.
कदाचित आझाद हिंद सेनेला सरसकट भारतीय सेनेत स्थान न देण्यामागे सुभाषबाबू व आझाद हिंद सेनेचे इतर पदाधिकारी यांच्या साम्यवादी विचारसरणीच्या प्रेमाची नेहरुंना लागलेल्या कुणकुणीचे काही स्थान असावे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on गुरुवार, 02/07/2013 - 16:33

In reply to विकासजी हे दुर्दैवाने खरे आहे by निनाद मुक्काम …

Permalink

कृपया महानायक ला इतक महत्व

कृपया महानायक ला इतक महत्व देऊ नका. ती 'कादांबरी' आहे. ऐतिहासिक दस्ताएवज नाही.आणि क्लर्क हा तुमचा टेकु असेल तर मग बोलनेच संपले
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 02/05/2013 - 12:17

Permalink

:(

दुसर्‍या एका धाग्यावर गांधींच्या मृत्युदिनाचे 'पावित्र्य' राखावे असे मत कुणीतरी व्यक्त केले होते. तेच या धाग्यालाही लागू व्हायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com