Skip to main content

पुन्हा एकदा पाकिस्तान

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 09/01/2013 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्‍यांना संकुचित म्हटले जाते. कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल. मग अशा घटना घडल्यानंतरही आपण' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' असे गुणगुणत पाकिस्तानी खेळाडुंना निमंत्रित करत राहणार का? इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे? जर त्या कलावंतांना/ खेळाडुंना इथे येणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी अशा कृत्यांचा जाब आपल्या राष्ट्राला का विचारु नये? आणि जर ते असे करत नसतील तरीही आपण त्यांना इथे कडेकोट बंदोबस्तात मिरवणार का?

वाचने 70310
प्रतिक्रिया 132

प्रतिक्रिया

साक्षीशेठ, तुम्ही म्हणता ते सर्व खरे आहे. पण मुळात आम्ही संकुचित विचारसारणीचे असल्याने आम्ही काहीही म्हटले तरी ते संकुचितच रहात असल्याने आम्ही आपलं गपगुमानं पुढचे क्रिकेट सामने लागत नाहीत तोवर पाकी कलाकारांचे समावेश असलेले रिअ‍ॅलिटी शो बघत आहोत व आपल्या दोस्तीनाम्याचे गोडवे गात आहोत. -छोटा डॉन

In reply to by ऋषिकेश

पाकिस्तानात (आणि भारतातही?) निवडणूका जवळ आल्यात ना!
हा प्रतिसाद अंमळ खटकला... निवडणूका जवळ आल्यामुळे सैनिकांचा शिरच्छेद करणे हे मान्य आहे का? हे justification कसे काय होऊ शकते? हे निषेधार्ह वाटत नाही?

In reply to by विकास

हे जस्टिफिकेशन नव्हे अनेक कारणआंपैकी एक महत्त्वाचे कारण आहे. फक्त मी नाही अनेक वृत्तपत्रांच्या कालच्या अग्रलेखात अनेकांना असेच वाटते आहे. अगदी पाकीस्तानातही थेट नाही तरी याचा निवडणुकांवर होणारा परिणाम अश्या आडमार्गाने हेच सुचवले जात आहे. असो.

अस कसं? भारत पाकिस्तान सामने झाले नाहीत तर खेळ वाहिन्या, BCCI, सरकारी धेंड हे पैसे कसे कमवणार? बिचारे दारिद्र रेषेखाली जातील ना!! मग काय ते तुमच्या आमच्या सारख्या शुद्र सामान्य माणसां सारखे रेशनच्या लाइनीत उभे राहणार की काय? काहीतरी आपल तुमचं. त्या तिकडे कोपर्‍यातल्या बॉर्डरवर काय होतय याच्याशी त्यांना काही देण घेण नाहीये, तिथले ते सैनिक काही त्यांचे ग्राहक नाहीत.

१०० % अनुमोदन. पाकिस्तानला कडी चेतावनी दिल्याची बातमी आलीच आहे. आता पुढे काही ठोस कारवाई करतील अशी आशा करावी का? की ठराविक जमातीचे लांगूलचालन करण्यासाठी, मतांसाठी सैनिकांच्या जिवांची किंम्मत शून्य ठरणार आहे? मागे इथेच मिपावर काही जणांनी सैनिकांचा तो जॉबच आहे, त्यात इतके काय वाटायचे हे म्हटल्याचेही आठवते. :( संताप, संताप झाला आहे जिवाचा!

निषेध खलिते तयारच असतात आमच्याकडे, वर फक्त तारीख आणि विषय टाकतो आणि पाकिस्तान ला देतो पाठऊन. ते तिकडे हल्ली पेपर रोल विकत घेत नाहीत त्यामुळे असं ऐकीवात आहे.

पंतप्रधानांना कुठे ह्या भारतात जन्म घेतला असे वाटुन गेले असावे,मला तरी असे वाटते कारण ते नेहमी डोक्याला हात लावुन बसलेले असतात्,बाकी हे कडक शब्दातले खलीते कसे असतात हो, नाही म्हणजे शब्द भिंतीवर कोरुन भिंतच मारुन नाहीना फेकत. (त्यांनी पण आपल्या दुताला कडक शब्दाचा खलिता दिला म्हणे)मागच्या धाग्यात कोणीतरी म्हटले की ,त्यांनी काहीबाहीकेले तरी आपल्या सैनिकांनी सीमेवर काय केले हे पेपरात कधीच छापुन येत नाही,@रणजीत चितळे साहेब तुम्हाला यातले काही माहीत आहे काय्?असल्यास आम्हा सांगा ना.

आपल्या सहिष्णु सरकारने "investigation" च्या ऑर्डर्स दिल्या आहेतच. कसलं investigation करणार? आपल्या जवानाचं शिर कोण घेऊन गेला आणि त्याचा पाकिस्तानी सरकारने कसा सत्कार केला याचं? अर्थात आपल्या सरकारकडून अजून कसल्या अपेक्षा ठेवायच्या? जिथे आपल्याच देशातल्या मुलीवर अन्याय करणार्‍या आपल्याच देशातल्या गुन्हेगारांना पकडूनसुद्धा त्यांना शिक्षा करण्याची धमक या भ**** च्या गां*** नाही, तिथे बाहेरच्यांबद्दल हे काय उखडणार?

हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना कडक सलामी. सदर घटना पाहून भारतीय राजकारण्यांचा निषेध करावा तितकाच थोडा आहे. अतिशय नेभळट, षंढ असल्या राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहून या बुळ्या भारताकडून पाकिस्तानचे काहीच वाकडे होणार नाही याची खात्री वाटते. मी पाकिस्तान या देशाबद्दलच्या कोणत्याही मिडीयामध्ये येणार्‍या बातम्या वाचणे/ पहाणे/ ऐकणे कधीचेच सोडून दिले आहे.

In reply to by पाषाणभेद

बाकी या धाग्यावरच्या सगळ्याच प्रतिक्रिया विनोदी सदरात जमा होऊ शकतील . ५६ इंची पम्प्र आहेत पण परिस्थिती तीच आहे . काय म्हणाव याला ? सध्याचे पम्प्र कसे ? नेभळट का षंढ? का अजून कुणी ?

तिथे पाकिस्तानात काय म्हणतेय मिडिया? इथे पूर्वी काळे काका पाकिस्तानच्या वृत्तपत्रातले लेख अभ्यासून माहिती द्यायचे असं आठवतय (मी बरेच दिवस बेपत्ता असल्याने अजूनही ते इथे देतात का माहित नाही). हुतात्मा सैनिकांना सलाम - भारतिय नागरीकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो... तुमच्यासाठी..! सरकार काही करतय का याची वाट बघत हात चोळत बसायचं..

हुतात्मा झालेल्या जवानांना सलामी.सहज पाकिस्तानी वृत्तपत्र काय म्हणतात हे पाहिले- भारताने अजून यु.एन.मध्ये तक्रार नोंदवली नाही असे यु.एन.ने म्हंटले आहे. http://dawn.com/2013/01/10/un-says-no-complaint-received-over-kashmir-b… भारत-पाकिस्तान संबंध हे न सुटणारे कोडे आहे.दावूद ईब्राहिमला नंबर एकचा शत्रु म्हणायचे पण त्याच्या मुलीच्या सासर्‍याला जावेद मियॉदादला व्हिसा द्यायचा आणि त्याचे समर्थन करायचे. सध्या निषेध नोंदवत आहेत.आणखी चार दिवसांनी दोघांचे हस्तांदोलन करतानाचे फोटो बघायचे.मग त्यांनी निषेधाचा खलिता पाठवायचा मग ह्यांनी अमन की आशा म्हणायचे.

कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल. साक्षीकाका फक्त कालचीच बातमी हादरवणारी नव्हती ! १५ मे १९९९ रोजी ४-जाट रेजिमेंटचे जवान (Captain Kalia & Arjun Ram, Bhanwar Lal Bagaria, Bhika Ram, Moola Ram and Naresh Singh )हे सर्व पाकिस्तान सैन्याच्या कैदेत अडकले. २२ दिवस हे त्यांच्या कैदेत होते,आणि जुन ९ १९९ ला पाकिस्तान लष्कराने त्यांचे मॄतदेह आपल्या सैन्याच्या ताब्यात दिले. त्यांच्या मॄतदेहांचे autopsy रिपोर्ट आल्या नंतर धक्कादायक गोष्टी जगा समोर आल्या !या सर्व जणांना भयानक यातना देउन ठार मारण्यात आले होते.त्यांचे डोळे काढण्याआधी फोडले,त्यांच्या कानात गरम सळ्या घातल्या,संपूर्ण शरीरावर सिगरेटचे चटके देण्यात आले,त्यांचे ओठ कापण्यात आले,जबड्यातले सर्व दात पाडण्यात आले,त्यांचे डोक्या (कवटी) सकट शरीरातली सर्व हाडे मोडली होती.इतर इंद्रियांबरोबर या सर्वांची जनन इंद्रिये सुद्धा या हैवान पाकड्यांनी कापुन टाकली होती.याच बरोबर मेंटल टॉर्चर देखील करुन झाले होते...शेवटी या सर्वांना गोळ्या घालण्यात आल्या ! {जरा या यातनांचा विचार करुन पहा,त्यांना ज्या खोलीत या यातना देण्यात आल्या त्यात यांचे आवाज किती वेळ घुमले असतील याचा देखील विचार करा}ही घटना घडली त्यावेळी कॅप्टन कालिया याचे वय होते फक्त २३ वर्ष ! आज १३ वर्ष होउन सुद्धा त्यांना कारगिल हिरो म्हणण्या पलिकडे आपण काहीही करु शकलो नाही ! :( कालियाचे वडील इतके वर्ष आपल्या मुलासाठी लढा देत आहे,तरी हाती काहीच गवसले नाही. आता ते युएन मधे दाद मागण्याची तयारी करत आहेत. काही दुवे :--- Capt Kalia’s father demands strong action against Pak Capt Saurabh Kalia's father says no hopes from Pakistan Kargil War hero Captain Saurabh Kalia's father approaches UN Saurabh Kalia जाता जाता :--- आपल्या मातॄभूमीसाठी बलिदान देणार्‍या जवांनाना जर आपले सरकार न्याय मिळवुन देउ शकत नसेल आणि देशातील नागरिकांना या बलिदानांचे महत्व कळत नसेल तर मग अशा आणि अनेक जवानांनी देश रक्षणाची सेवा कोणत्या कारणास्तव करावी ? पाकिस्तानच्या ह्या घॄणास्पद अमानविय वर्तनाकडे हिंदुस्थान सरकार गांभिर्याने पाहत नसल्याने याचा हिंदुस्थानी लष्कराच्या मनोबलावर अयोग्य परिणाम होत असुन...पाकिस्तानला बहुधा हेच साधणे अपेक्षित असावे ! असे मला वाटते.:(

In reply to by मदनबाण

सहमत... मात्रः
आज १३ वर्ष होउन सुद्धा त्यांना कारगिल हिरो म्हणण्या पलिकडे आपण काहीही करु शकलो नाही
याच्याशी असहमत. "कारगिल हीरोज" हे नाव वापरुन आदर्श बिल्डिंग उभी केली की.. :(

In reply to by गवि

"कारगिल हीरोज" हे नाव वापरुन आदर्श बिल्डिंग उभी केली की.." आरोपीतले २ चचले. हळूहळू सगळे ढगात जाऊन केस आपोआप बंद पडेल. फार नाही फक्त अजून १०-१५ वर्षे थांबा.

In reply to by मदनबाण

आपल्या मातॄभूमीसाठी बलिदान देणार्‍या जवांनाना जर आपले सरकार न्याय मिळवुन देउ शकत नसेल आणि देशातील नागरिकांना या बलिदानांचे महत्व कळत नसेल तर मग अशा आणि अनेक जवानांनी देश रक्षणाची सेवा कोणत्या कारणास्तव करावी ? पाकिस्तानच्या ह्या घॄणास्पद अमानविय वर्तनाकडे हिंदुस्थान सरकार गांभिर्याने पाहत नसल्याने याचा हिंदुस्थानी लष्कराच्या मनोबलावर अयोग्य परिणाम होत असुन...पाकिस्तानला बहुधा हेच साधणे अपेक्षित असावे ! असे मला वाटते.:( तुमचे हेच मत अजून पण कायम आहे का हो ?

In reply to by पिंपातला उंदीर

तुमचे हेच मत अजून पण कायम आहे का हो ? ह्म्म... यापुढे पाकड्यांनी मस्ती केल्यास सध्याचे सरकार कसे रिअ‍ॅक्ट करते ते पाहुन झाल्यावर मतात बदल झाला तर होइल ! आपल्या सौनिकांची होणारी विटंबना आता सहन करण्या पलिकडे आहे हे आपल्या सैन्याने आणि सरकारनेच दाखवुन ध्यावयास हवे नाही का ?

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi

तुमचा आमचा आक्रोश कोणाच्या कानावर पडणार आहे? whiteflower कभी वो दिन भी आयेगा, कि जब आजाद हम होंगे, ये अपनी ही जमीं होगी, ये अपना आसमां होगा, शहीदों कि चिताओं पर, लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का, यही नामों-निशां होगा.

पाकिस्तानने कितीही क्रूर कृत्ये केली, कितीही अतिरेकी हल्ले केले, कितीही बॉम्बस्फोट केले तरिही भारताची प्रतिक्रिया निषेधाचे खलिते पाठविण्याकडे जात नाही. गेल्या २०-२५ वर्षातले ठळ्क प्रसंग आठविले तरी अंगाची लाहीलाही होते. (१) १९९३ मध्ये दाउद इब्राहिम, टायगर मेमन इ. ना पैसा, बॉम्ब, शस्त्रे पुरवुन पाकिस्तान्यांनी मुम्बईत बॉम्बस्फोट घडवून आणून जवळपास ३०० लोक मारले. त्यानंतर या सर्व अतिरेक्यांना आजतगायत पाकिस्तानने राजाश्रय दिलेला आहे. भारताची कारवाई - दाउदला आमच्या ताब्यात द्या अशी २-३ वर्षातून एकदा मागणी करणे. पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या मागणीला केराची टोपली दाखविणे. (२) कारगिल, द्रास इ. भागात मे १९९९ मध्ये घुसखोरांच्या वेषात सैनिक घुसवून पाकिस्तानने भारताचा भाग बळकाविण्याचा प्रयत्न केला. भारताची कारवाई - हवाई हल्ले करून सीमा न ओलांडता भारताने घुसखोर सैनिकांना हाकलून लावून आपला भाग मुक्त केला. यात भारताला ४०० सैनिकांचे बलिदान द्यावे लागले तर पाकड्याचे अंदाजे १००० सैनिक मेले. (३) याच युद्धात युध्दकैदी म्हणून पकडलेल्या कॅ. सौरभ कालिया व इतर ५ जणांना पाकच्या सैनिकांना अतिशय रानटी व अमानवी पद्धतीने हालकाल करून ठार मारले. भारताची कारवाई - पाकिस्तानला निषेध खलिता पाठविला. पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली. (४) डिसेंबर १९९९ मध्ये पाकिस्तानने कट आखून अतिरेक्यांच्या सहाय्याने नेपाळमधून इंडियन एअरलाइन्सचे विमान अपहरण करून अफगाणिस्तानमध्ये नेले. भारताला १६० प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी मसून अझर व इतर २ अतिरेक्यांना सोडावे लागले. हे तीनही अतिरेकी व विमान पळविणारे ५ चाचे पाकिस्तानात सुखरूप आहेत. भारताची कारवाई - पूर्वीचाच निषेध खलिता तारीख-वार बदलून दिला. पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली. (५) २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी लष्कराने १० प्रशिक्षित अतिरेक्यांना मुम्बईत पाठवून धुमाकूळ घातला. भारताने त्यातल्या ९ जणांना कंठस्नान घातले व एकाला जिवंत पकडून नुकतेच फाशी दिले. पण त्यापूर्वी तब्बल २०० जणांचा जीव गेला होता. भारताची कारवाई - जुना निषेध खलिता २६ नोव्हेंबर २००८ ही तारीख टाकून दिला व या हल्ल्याचा सूत्रधार सईद हाफिजला आमच्या ताब्यात द्या अशी २-३ वर्षातून एकदा मागणी करणे. पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या मागणीला व निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली. (६) ०८ जानेवारी २०१३ - पाकिस्तानी सैन्याने सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत येऊन हल्ला करून २ सैनिकांना मारून त्यांचे शिर कापून नेले. भारताची कारवाई - जुनाच निषेध खलिता ०८ जानेवारी २०१३ ही तारीख टाकून दिला. पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली. या ठळ्क घटना आहेत. अशा इतर असंख्य घटना आहेत. प्रत्येकवेळी घटना घडल्यावर भारताची कारवाई व त्या कारवाईवर पाकिस्तानचा प्रतिसाद हा अत्यंत निरर्थक स्वरूपाचा आहे. भारत आपल्याविरूद्ध साधे डोळे सुद्धा वटारू शकत नाही याची पाकिस्तानला खात्री असल्याने पाकिस्तान असे प्रकार करतच राहणार आणि आपण निषेधाचे खलिते पाठविण्यापलिकडे काहीही करणार नाही. "भारत हे एक बनाना (लेचेपेचे) रिपब्लिक आहे" असे काही लोकांचे मत वाचले होते. भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या दुबळ्या प्रतिसादाने हे अनेकवेळा सिद्ध केले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

या ठळ्क घटना आहेत. अशा इतर असंख्य घटना आहेत. प्रत्येकवेळी घटना घडल्यावर भारताची कारवाई व त्या कारवाईवर पाकिस्तानचा प्रतिसाद हा अत्यंत निरर्थक स्वरूपाचा आहे. भारत आपल्याविरूद्ध साधे डोळे सुद्धा वटारू शकत नाही याची पाकिस्तानला खात्री असल्याने पाकिस्तान असे प्रकार करतच राहणार आणि आपण निषेधाचे खलिते पाठविण्यापलिकडे काहीही करणार नाही. "भारत हे एक बनाना (लेचेपेचे) रिपब्लिक आहे" असे काही लोकांचे मत वाचले होते. भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या दुबळ्या प्रतिसादाने हे अनेकवेळा सिद्ध केले आहे. @गुर्जी आता काय म्हणे आहे तुमचे ? मे २०१४ नंतर सीमेवर जीव गमावलेल्या जवानाबद्दल . आणि हो त्याचवेळेस मोदिनी शरीफ यांच्या आईला साडी पाठवल्याबद्दल

आताच बी रामन यांचा लेख वाचला. असे कितीही प्रकार घडले तरी पाकड्यांशी चर्चा चालूच ठेवावी व उगाच भावनेच्या भरात कारवाई करू नये अशा त्यांचा सल्ला आहे. हे वाचून हसू आले आणि खेदही वाटला. गेली ६५ वर्षे हे चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. त्यातून आजतगायत काहीही, कणभरसुद्धा सकारात्मक निष्पन्न झालेले नाही. तरीसुद्धा चर्चा सुरूच ठेवायची! मुळात पाकिस्तानला भारताशी सुरळीत संबंध हवे आहेत का याचा कधी आढावा घेतला आहे का? याबाबतीत गेल्या ६५ वर्षांचा काय अनुभव आहे? एवढे होऊनसुद्धा कारवाई न करता शांत बसायचे! का तर म्हणे चर्चेत अडथळा नको. काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील एका चर्चेत एक पाकिस्तानप्रेमी (जतीन देसाई) असेच तारे तोडत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानशी भारताने क्रिकेट खेळू नये असे म्हणणारे भारतीय व तालिबानी यांच्यात काहीच फरक नाही. असे म्हणण्यातच त्यांच्या एकंदरीत सारासारविवेकबुद्धीची कल्पना आली. मुम्बईत पाकिस्तानशी सामने होत नसल्याने क्रिकेटरसिक पाकड्यांचा बहारदार खेळ पहायला मुकले आहेत असा यांचा दावा आहेत. बहुसंख्य पाकड्यांना भारताविषयी खूप प्रेम आहे म्हणे. हे असलं पूतनामावशीचं प्रेम काय कामाचं? भारत व पाकिस्तानची संस्कृती समान आहे म्हणे. पाकडे मूर्तीभंजक तर भारतीय मूर्तीपूजक, पाकडे गोभक्षक तर भारतात गोभक्षकांची संख्या खूप कमी, पाकिस्तानमध्ये बहुतेक काळ लष्करशाही तर भारतात त्याच्या उलटे, पाकिस्तान अतिरेक्यांना मदत देणारा व आश्रय देणारा तर भारत त्याच्या उलटा! पाकिस्तानची राज्यघटना इस्लामाधारित तर भारताची राज्यघटना निधर्मी, पाकिस्तानी हा अधिकृत इस्लामी देश तर भारत अधिकृत निधर्मी देश. पाकिस्तान सतत भारतात अतिरेकी हल्ले करत असतो तर भारत फक्त निषेधाचे खलिते पाठवितो. काय डोंबलाचं साम्य आहे या दोन देशात? काय बोलावं अशा माणसापुढे! असे शरीराने भारतात पण मनाने व विचारांनी पाकिस्तानी असलेले अनेक तथाकथित निधर्मांध भारतात आहेत हे भारताचं दुर्दैव!

In reply to by श्रीगुरुजी

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील एका चर्चेत एक पाकिस्तानप्रेमी (जतीन देसाई) असेच तारे तोडत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानशी भारताने क्रिकेट खेळू नये असे म्हणणारे भारतीय व तालिबानी यांच्यात काहीच फरक नाही. असे म्हणण्यातच त्यांच्या एकंदरीत सारासारविवेकबुद्धीची कल्पना आली. मुम्बईत पाकिस्तानशी सामने होत नसल्याने क्रिकेटरसिक पाकड्यांचा बहारदार खेळ पहायला मुकले आहेत असा यांचा दावा आहेत. बहुसंख्य पाकड्यांना भारताविषयी खूप प्रेम आहे म्हणे. हे असलं पूतनामावशीचं प्रेम काय कामाचं? भारत व पाकिस्तानची संस्कृती समान आहे म्हणे. पाकडे मूर्तीभंजक तर भारतीय मूर्तीपूजक, पाकडे गोभक्षक तर भारतात गोभक्षकांची संख्या खूप कमी, पाकिस्तानमध्ये बहुतेक काळ लष्करशाही तर भारतात त्याच्या उलटे, पाकिस्तान अतिरेक्यांना मदत देणारा व आश्रय देणारा तर भारत त्याच्या उलटा! पाकिस्तानची राज्यघटना इस्लामाधारित तर भारताची राज्यघटना निधर्मी, पाकिस्तानी हा अधिकृत इस्लामी देश तर भारत अधिकृत निधर्मी देश. पाकिस्तान सतत भारतात अतिरेकी हल्ले करत असतो तर भारत फक्त निषेधाचे खलिते पाठवितो. काय डोंबलाचं साम्य आहे या दोन देशात? काय बोलावं अशा माणसापुढे! असे शरीराने भारतात पण मनाने व विचारांनी पाकिस्तानी असलेले अनेक तथाकथित निधर्मांध भारतात आहेत हे भारताचं दुर्दैव! गुर्जी आता होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सिरीज बद्दल काय मत आहे तुमचे ?

जे झाले ते अतिशय भयानक आणि निषेधार्त आहेच , पण सगळ्यात दुख हे आहे कि आमच्या पंतप्रधानाच्या किव्हा परराष्ट्र मंत्र्याच्या गां%$# थोडा सुधा दम नाही ती इटलीची बाई आणि तो सो called युथ आईकॉन कुठे गाढवाच्या गां$%$^ गेलेत कोण जाणे, आता बोला ना कुठे गेले तुमचे देश प्रेंम. आपल्या कडे
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=CeGcQkkQYKQ
(लिंक कॉपी पेष्ट करा ) होत असताना आणखी पाकड्यानी त्रास द्यायची गरज काय ? ह्याच्या मध्ये हिंदुनो जागे व्हा म्हटले आहे पण जागे होण्याची गरज सगळ्यांनाच आहे.

एक प्रश्न पडतो.. भारत करतोय ते इतक्या जणांना चुकीचे वाटतेय तर भारताने सद्यस्थितीत काय करावे ज्यामुळे हा प्रश्न 'हमखास' आणि 'कायमचा' (किमान पुढील ५० वर्षे) सुटेल असे तुम्ही सुचवाल? (हा प्रश्न कोणा एकाला नसून भारत सरकारच्या सध्याच्या प्रतिसादाने कावलेल्या सगळ्यांनाच आहे)

In reply to by ऋषिकेश

एवढी तरी जाणीव करून देऊन चर्चेचे त्याच्याशी गु-हाळ थांबवले पाहिजे. खेळ सांस्कृतिक कार्यक्रम हे शत्रुंबरोबर नाहीत आणि आमची काही ताकद आहे हे तरी दाखवले पाहिजे. मोदक साहेबांचे इस्त्राईल वरचे लेख वाचून त्याच्या एक दशांश जरी आपण करु शकलो तर भारतीय असल्याचा अभिमान बाळगावा असं काही केल्यासारखे वाटेल पण हे भारताच्या कोणत्याही पक्षाच्या सरकारच्या आवाक्यात आहे असे वाटत नाही.

सद्यपरिस्थितीत पाकिस्तानशी संपूर्ण राजनैतिक संबंध तोडणे, सीमा बंद करणे, दिल्ली-लाहोर रेल्वे-बस इ. बंद करणे, पाकिस्तानी विमानांना भारतीय प्रदेशावरून उडण्यास बंदी घालणे, पाकिस्तानशी सर्व आर्थिक व्यवहार संपूर्ण बंद करणे, पाकिस्तानशी सांस्कृतिक्/क्रीडा इ. संबंध बंद करणे, झेलम/सतलज इ. नदीतून पाणी सोडणे बंद करणे आणि भारतात ठाण मांडून बसलेल्या अदनान सामी, सलमा आगा इ. पाकड्यांना भारतातून हाकलून देणे इ. उपाय करावे असे मला वाटते. त्याचबरोबरीने जगभर पाकिस्तानच्या क्रूर वागणूकीविरूद्ध आवाज उठवून पाकिस्तानला एकटे पाडणे आवश्यक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पहिले सगळे उपाय केल्यानंतर जी परिस्थिती होती ती भारत-पाकिस्तानात अनेकद आली आहे पण त्यामुळे मुळ प्रश्न सुटला आहे असे वाटत नाही
त्याचबरोबरीने जगभर पाकिस्तानच्या क्रूर वागणूकीविरूद्ध आवाज उठवून पाकिस्तानला एकटे पाडणे आवश्यक आहे.
म्हंजे? त्यासाठी काय करावे? भारत आपली भुमिका जागतिक मंचावर मांडतोच. त्यापलिकडे या प्रश्नाला दोन-देशांप्मधील आपापसातील प्रश्न ही भुमिका बदलून मध्यस्थास मान्य करावे का?

In reply to by ऋषिकेश

"पहिले सगळे उपाय केल्यानंतर जी परिस्थिती होती ती भारत-पाकिस्तानात अनेकद आली आहे पण त्यामुळे मुळ प्रश्न सुटला आहे असे वाटत नाही" त्याचे कारण असे असे उपाय एकदाच म्हणजे २००२ साली फक्त काही महिने अतिशय मर्यादित स्वरूपात केले होते व त्याचे बरेवाईट परिणाम दिसायच्या आतच ते उपाय थांबविले गेले. पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबध तोडणे, सीमा सील करणे, सीमा ओलांडू पाहणार्‍यांना जागेवरच गोळ्या घालणे व धरणांचे पाणी अडविण्यासारखे उपाय किमान ३-४ वर्षे तरी करणे आवश्यक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सद्यपरिस्थितीत पाकिस्तानशी संपूर्ण राजनैतिक संबंध तोडणे, सीमा बंद करणे, दिल्ली-लाहोर रेल्वे-बस इ. बंद करणे, पाकिस्तानी विमानांना भारतीय प्रदेशावरून उडण्यास बंदी घालणे, पाकिस्तानशी सर्व आर्थिक व्यवहार संपूर्ण बंद करणे, पाकिस्तानशी सांस्कृतिक्/क्रीडा इ. संबंध बंद करणे, झेलम/सतलज इ. नदीतून पाणी सोडणे बंद करणे आणि भारतात ठाण मांडून बसलेल्या अदनान सामी, सलमा आगा इ. पाकड्यांना भारतातून हाकलून देणे इ. उपाय करावे असे मला वाटते. मोदी सरकारने या उपाय योजना तातडीने अमलात आणल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार : )

काश्मिर व पंजाबमधून पाकिस्तानमध्ये वाहणार्‍या नद्यांचे पाणी भारताने अडवून ठेवले तर पाकिस्तान नाक मुठीत धरून शरण येईल. हा अत्यंत प्रभावी उपाय ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

या उपायाने जगाची सहानुभुती आणि पाठींबा आपल्याला आहे तो आपण गमाव असे वाटत नाही का? का त्याची पर्वा करु नये असे वाटते?

In reply to by ऋषिकेश

शब्दिक सहानुभूतीपलिकडे जगाने कृती केल्याचे उदाहरण दाखवता का? जग सहानुभूतीवर चालत नाही... आर्थिक/ सामाजिक/ सामरिक हितसंबंधांवर चालते.

In reply to by ऋषिकेश

पोखरण२ च्या वेळेस देखील जगाचा पाठींबा गेला अशी बोंब झाली होती. पण पुढचा इतिहास माहीत आहेच. अगदी ज्या अमेरीकेने राळ उठवली, त्याच अमेरीकेने त्यानंतरच्या काळात जास्तच आउटसोरर्सिंग पण केले आणि घनिष्ट राजनैतिक संबंध देखील. तेच अण्वस्त्रांविरोधातल्या जपानने देखील केले होते... वनानी दहतो वन्ही, सखा भवती मारूतः सएव दिपनाशाय कृशे कश्चास्ती सौहृदम्. (भावार्थ: जंगलात लागलेल्या वणव्याला वाढण्यास मदत करणारा वारा, हा लहानसा दिवा मात्र फुंकरेने विझवतो, थोडक्यात दुर्बळाला कोणी मित्र असतो का?)

In reply to by श्रीगुरुजी

आडवायचे आणि पाकडे बोंबा मारायला लागले कि सगळे सोडून द्याचे , असेच करायची तयारी चीन पूर्वेकडे करत आहे.

कोणत्याही राष्ट्राला स्वसंरक्षण करण्याचा हक्क आहे. भारत असे करण्याने जगाची सहानूभूती गमावेल असे वाटत नाही. भारत अतिरेक्यांपासून पोळतो आहे हे सर्व जगाला माहिती आहे व भारताचा प्रतिसाद अत्यंत मिळमिळीत आहे याचीही जगाला कल्पना आहे. हा उपाय करताना अमेरिका, रशिया, इंग्लंड इ. प्रभावी देशांशी बोलूनच त्यांचे मत आपल्याविरूद्ध जाणार नाही याची खात्रीदेखील करून घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांच्या संमतीने किंवा संमतीशिवाय भारताला असे कठोर उपाय योजावेच लागतील.

सत्य परिस्थिती माहित नसताना सरकारच्या नावाने त्रागा (जो इतर अनेकदा रास्त असेलही) करणे घाईचे ठरू शकते. केवळ भारतीय इलेक्ट्रॉनिकमिडीयाच्या वार्तांकनावरून मते बनवणे अधिकाधिक धोक्याचे होत चालले आहे असे वाटते. आता बाहेर येत असलेल्या माहितीनूसार घटनाक्रम असा आहे: (संदर्भ : द हिंदु मधील ही बातमी) -- एका भारतीय महिलेच्या पाकव्याप्त काश्मिरमध्ये जायच्या प्रयत्नाने सचेत होऊन भारताने LOC वर गावकर्‍यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी खंदकाचे बांधकाम करून सीजफायर करारातील 'या भोवती कोणतेही बांधकान न करण्याच्या अटीचे' उल्लंघन केले होते. -- त्यावर पाकिस्तानी सैनिक अग्रेसीव झाले आणि त्यांनी काहि वेळा सुचना दिल्या, नंतर लाऊडपीकरवर सुचना देऊन गोळीबार केला. -- त्यानंतर झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने हल्ला केला असे पाकचे म्हणणे आहे तर भारत त्याला नकार देतो पण त्या चकमकीत पाकिस्तानचा एक सैनिक मारला गेला -- त्याला पाकिस्तानच्या सैन्याने उत्तर द्यायचे ठरवले व झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान ठार झाले. एका भारतीय लष्करी अधिकार्‍याने म्हटल्याप्रमाणे अश्या चकमकी आणि हल्ले आवेशात होत असतात. भारतीय सैन्याला LOC ओलांडायची आज्ञा नसताना तसा प्रकार कधी होतो तसेच पाकिस्तानी सैनिकआंकडून होते. या घटनेला 'वाजवीपेक्षा अधिक' फुगवण्यात फारासे हशील दिसत नाही. आता या घटनाक्रमावरही आणि त्यातून उद्भवणार्‍या बर्‍याच सार्थ प्रश्नांवरही चर्चा होईलच, पण अश्या घटनेसाठी भारताच्या वाजपेयींपासूनच्या प्रयत्नांना सोडून द्यावे असे वाटत नाही. बाकी चालु दे..

In reply to by ऋषिकेश

पण मग देहाची विटंबना / मृत्यूपूर्वी छळ हे सर्व विकृत आहेच ना? हे तरी खरं आहे ना? की तेही पाकिस्तानी सैनिक नव्हतेच? कुठेतरी आपल्या लष्कराच्या व्हर्शनवर विश्वास ठेवावा लागेल. अर्थातच त्यावर करण्याचे उपाय हे लष्करप्रमुख आणि राज्यकर्त्यांच्या स्कोपमधे आहेत आणि बर्‍याचशा गोष्टी ते जाणत असतील ज्या त्यांच्या निर्णयप्रक्रियेत अपरिहार्यपणे विचारात घ्याव्या लागत असतील. बर्‍याचशा गोष्टी / खरं चित्र (लार्जर पिक्चर) आपल्यापर्यंत पोचणं शक्यच नाही.

In reply to by गवि

पण मग देहाची विटंबना / मृत्यूपूर्वी छळ हे सर्व विकृत आहेच ना? हे तरी खरं आहे ना? की तेही पाकिस्तानी सैनिक नव्हतेच? कुठेतरी आपल्या लष्कराच्या व्हर्शनवर विश्वास ठेवावा लागेल.
होय हे विकृत आहे आणि याचा निषेध योग्य त्या पातळीवर झालाच पाहिजे. इतकेच नाही तर सर्वत्र व्यक्त झालेला उद्वेगही बर्‍याच अंशी सार्थ असला तरी काहिशा भडक वार्तांकनावर आधारित आहे. आणि मग अश्या वार्तांकनाची प्रतिक्रीया जनतेत 'त्या देशाशी संबंध तोडून टाका' अशी झाली तर नवल नाही. दुसरे असे की आपल्या वाजवीपेक्षा अधिक उचललेल्या पावलांचा फायदा घेऊन पाकिस्तान हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करु पाहणार असेल तर ते किती ताणावे याचाही सरकारला विचार करावा लागेल. आपले सरकार किंवा राजकीय नेते एरवी कसेही असले/नसले तरी अश्या प्रश्नात लष्कर, गुप्तहेर, विविध ज्येष्ठ तज्ज्ञ अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करूनच पावले उचलत असणार यावरही विश्वास ठेवायला हवा (आणि तसा इतिहासही आहे, सरकारे बदलली मार सर्वपक्षीय सरकारने या बाबतीतले धोरण बदललेले नाही हे ही लक्षात घ्यायला हवे). शिवाय इतिहासात बघता आपल्या राजकीय नेत्यांनी युद्धातील देशाच्या पराभवाच्या जबाबदारीपासूनही पळ काढलेला नाही, तेव्हा फक्त राजकीय नेत्यांनाच आनि सरकारला किती झोडपायचे हे ही ज्याने त्याने ठरवावे इतकेच. आणि राजकीय नेतेच नही तर जेव्हा लष्कराचे अधिकार सांगतात की अश्या घटना एरवीही होतात, यावेळी त्यातील विकृतपणाची तक्रार केली आहेच, मात्र त्याहून अधिक ताणायला, त्यावर अधिक प्रखर तेही बोलायला तयार नाहीत त्यातच ते बरेच काही सांगून जातात

In reply to by ऋषिकेश

"दुसरे असे की आपल्या वाजवीपेक्षा अधिक उचललेल्या पावलांचा फायदा घेऊन पाकिस्तान हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करु पाहणार असेल तर ते किती ताणावे याचाही सरकारला विचार करावा लागेल. " हा पाकिस्तान-भारत संबंध हे भारत-पाकिस्तानच्या जन्मापासून म्हणजे जवळपास १९४७ पासूनच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहेत. त्यामुळे यात नव्याने आंतराराष्ट्रीय होण्यासारखे काहीही नाही. आणि तसे झाले तरी भारताने आंतरराष्ट्रीय दडपण झुगारण्याचे ठरविले पाहिजे किंवा मग पाकडे जे करतील ते निमूटपणे ऐकून घेतले पाहिजे. जर पाकिस्तानशी संबंध तोडणे आततायी किंवा भावनेच्या भरात केलेली कृती वाटत असेल, तर भारताला अजून वेगळ्या कृती करता येतील. (१) शांतता चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवणे. (२) पाकिस्तानला गाजावाजा न करता जशास तसे उत्तर देणे. म्हणजे सैनिकांना सैनिकांचा वेष न देता इतर वेषात गुपचूप सीमा ओलांडायला लावून सीमेजवळील पाकड्यांच्या ठाण्यावर अधूनमधून हल्ले करून परत येणे. असे हल्ले झाल्यावर ते आम्ही केलेच नाहीत असे सांगून काखा वर करणे. (३) पाकिस्तानमधील फुटिरतावादी संघटनांना (बलुचिस्तान, पख्तुनिस्तान व सिंध प्रांत स्वतंत्र देश करू पाहणार्‍या फुटिरतावादी संघटना) भारताने गुपचुप आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत द्यावी. असे करण्याची क्षमता फक्त इंदिरा गांधींमध्येच होती. नरसिंहराव व वाजपेयी हे देखील २००१ पर्यंत अफगाणिस्तानमधील कट्टर तालिबानविरोधी असलेल्या अह्मदशहा मसूद या पंजशीर खोर्‍यातल्या ताजिक नेत्याला शस्त्रे व आर्थिक मदत देत होते. आता पाकिस्तानी फुटिर संघटनांना तशीच मदत करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून पाकचे विभाजन होण्याची शक्यता वाढेल व पाकिस्तान अंतर्गत भांडणांनी दुबळा होईल. (४) आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पाकिस्तानी साहसवादाचे बळी आहोत व आपण कसा संयम पाळत आहोत असे कायम सांगत राहून आंतरराष्ट्रीय मत आपल्या बाजूने जरी आले नाही तरी विरूद्ध जाणार नाही यासाठी प्रयत्न करणे.

In reply to by श्रीगुरुजी

एक गंमत वाटली २,३ भारत करत असेल तर आपल्याला कसे कळेल? पाकिस्तान तर नेहमी बोलत असते की खलिस्तानी फुटिरवाद्यांना भारत मदत करतो म्हणून. जर हे गुप्त असेल तर ते गुप्तच रहावे नाही का? बाकी, तुमच्या पर्यायांपैकी १ व ४ प्रत्येक सरकार करत असतेच आणि ते योग्य आहेच

In reply to by ऋषिकेश

थोडीशी चुक आहे. खलिस्तानवाद्यांना पाकिस्तान मदत करतो. भारत सिंध- बलुचिस्तान मधील लोकांना मदत केल्याचा आरोप होतो बहुदा. हा आरोप खरा असेल तर प्रचंड आनंदाची गोष्ट आहे. कोणत्याही पद्धतीने पाकिस्तानला संपवायलाच हवं. सापाला ठेचायलाच लागतं. त्याच्याशी चर्चा करत बसण्यात सेन्स नसतो.

In reply to by ऋषिकेश

बाकी "त्याच्याशी चर्चा करत बसण्यात सेन्स नसतो." याबद्दल असहमत.. पण ते असो.
+१. याविषयी जॉन केनेडी म्हणाले होते:"Let us not negotiate out of fear but let us not fear to negotiate".

In reply to by श्रीगुरुजी

जर पाकिस्तानशी संबंध तोडणे आततायी किंवा भावनेच्या भरात केलेली कृती वाटत असेल, तर भारताला अजून वेगळ्या कृती करता येतील. (१) शांतता चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवणे. (२) पाकिस्तानला गाजावाजा न करता जशास तसे उत्तर देणे. म्हणजे सैनिकांना सैनिकांचा वेष न देता इतर वेषात गुपचूप सीमा ओलांडायला लावून सीमेजवळील पाकड्यांच्या ठाण्यावर अधूनमधून हल्ले करून परत येणे. असे हल्ले झाल्यावर ते आम्ही केलेच नाहीत असे सांगून काखा वर करणे. (३) पाकिस्तानमधील फुटिरतावादी संघटनांना (बलुचिस्तान, पख्तुनिस्तान व सिंध प्रांत स्वतंत्र देश करू पाहणार्‍या फुटिरतावादी संघटना) भारताने गुपचुप आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत द्यावी. असे करण्याची क्षमता फक्त इंदिरा गांधींमध्येच होती. नरसिंहराव व वाजपेयी हे देखील २००१ पर्यंत अफगाणिस्तानमधील कट्टर तालिबानविरोधी असलेल्या अह्मदशहा मसूद या पंजशीर खोर्‍यातल्या ताजिक नेत्याला शस्त्रे व आर्थिक मदत देत होते. आता पाकिस्तानी फुटिर संघटनांना तशीच मदत करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून पाकचे विभाजन होण्याची शक्यता वाढेल व पाकिस्तान अंतर्गत भांडणांनी दुबळा होईल. (४) आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पाकिस्तानी साहसवादाचे बळी आहोत व आपण कसा संयम पाळत आहोत असे कायम सांगत राहून आंतरराष्ट्रीय मत आपल्या बाजूने जरी आले नाही तरी विरूद्ध जाणार नाही यासाठी प्रयत्न करणे. जे बात ! या सगळ्या गोष्टी अमलात आणल्याबद्दल मोदींचे अभिनंदन

हे वाचा. http://in.news.yahoo.com/un-observer-group-probe-loc-incident-040002953.... पाकिस्तानने युनोमध्ये भारताविरुद्धच तक्रार केली आहे. चोराच्या ऊलट्या बोंबा. आपण असे गुळमुळीत का वागतो असेच वाटायला लागते कधी कधी. खंबीर पवित्राच नाही कधी. श्या.....

In reply to by गवि

भारतीय इतके "थंड रक्ताचे" कसे ? आपण निषेधाचे तुणतुणे किती दिवस वाजवत बसणार ?नुसत्या बैठका आणि खलिते इतके वर्ष चालु आहेत मग त्याचा परिणाम असा का दिसतो ? अजुन कितीवेळा आपल्या जवानांची अशी विटंबना होत राहणार ? जाता जाता :--- Defence Minister हे आमच्या स्वतंत्र देशाचे सध्याचे संरक्षण मंत्री आणि त्यांच्या बरोबर आहेत चीनचे संरक्षण मंत्री जेन लिंग. लुंगीवाल्या या संरक्षण मंत्र्याची कोणाला धास्ती / जरब तरी वाटेल काय ? अरे संरक्षण मंत्री आहेस ना तू ? मग नुसते पाकिस्तानची ही भ्याड कॄती चिथवणीखोर आहे असे काय सांगत फिरतोस ? सरळ लष्कराला द्या आदेश की मोडा पाकिस्तानच्या नांग्या आणि द्या चांगला धडा... की पुढे कधीही हे पाकडे आमच्या सैनिकांची अशी दुर्गती करण्याचा विचार सुद्धा करु शकणार नाहीत. पण मी कोणत्या सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय ? ज्या सरकारचे गॄहमंत्रीच आत्ता पर्यंत झाले-गेले विसरुन जा अशी जपमाळ घेउन फिरतात ! तिथे हा लुंग्या काय दिवे लावणार ?

In reply to by मदनबाण

पुलंच्या एका ललित लेखात लोकल प्रवासात प्रवाशांमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर होणार्‍या चर्चेचे खुमसदार वर्णन केले होते. त्या चर्चेचा शेवट आपण डोंबिवलीकाराणी कल्याण च्या लोकाना आपल्या बोगीत चढू द्यायचे नाही या निर्णयावर होतो. ही प्रतिक्रिया आणि इतर अनेक अतीसंवेदनशील प्रतिक्रिया पाहून त्या लेखाची आठवण होते. ऋषिकेश यांच्या प्रतिक्रिया आवडल्या.

In reply to by नाना चेंगट

एकेकाचे प्रतिसाद त्याच्या त्याच्या ख्यातीनुसार.
अगदी! जुने लेख उचकले तर, बर्‍याच प्रतिक्रियांमध्ये फक्त प्रतिसादकाचे नाव दिसते, खालील प्रतिसाद नाही! असे का, हे आता उमगले!

In reply to by सुनील

हा हा. :D

इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे?
हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जो पर्यंत होत नाही तो पर्यंत क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला भारतात प्रवेशास मज्जाव असलाच पाहिजे.

निषेध निषेध! डार्विनच्या विचारसरणीने प्रेरीत होऊन डार्विनच्या माकडांनी केलेल्या अमानुष कृत्यांचा निषेध! मिपावरच्या डार्विन तज्ञांचे मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' अशी प्रतिक्रिया दिल्यावर आपण झटपट पुरोगामी ठरतो ना! आणि आपल्या देशात पुरोगाम्यांची पैदास डासानपेक्षा जास्त झाली आहे.

मी एक उपाय सुचवतो. - एक वेबसाइट तयार करा. - तीवर पाकिस्तानी कलाकार असलेल्या कार्यक्रमांची आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांची नोंद करा - ती माहिती भारतीय जनतेत सर्वत्र पसरेल असं पहा - यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती देणं, गावोगावी जाऊन सर्वांना ती माहिती मिळेल अशी योजना करणं वगैरे त्यात येईल. - त्यासाठी अर्थातच मोठी ग्रासरूट ऑर्गनायझेशन तयार करावी लागेल. पण बऱ्याच राजनैतिक पक्षांकडे अशी यंत्रणा आहे. ती वापरायला त्यांना उद्युक्त करा. - मग ज्यांना पाकिस्तानविरुद्ध राग असेल ते लोक अर्थातच हे कार्यक्रम बघणार नाहीत - मग पाकिस्तानी कलाकारांना आपोआपच पैसे किंवा आमंत्रणं मिळणार नाहीत इतकी वर्षं पाकविरोधी आरडाओरडा करणाऱ्या पक्षांनी असे प्रयत्न का केले नाहीत कोण जाणे. पाकिस्तानची मॅच सुरू झाल्यावर लोकसुद्धा येड्यासारखे टीव्ही बंद न करता बघत का बसतात हेही कळत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

इतकी वर्षं पाकविरोधी आरडाओरडा करणाऱ्या पक्षांनी असे प्रयत्न का केले नाहीत कोण जाणे. हिंदुस्थानी राजकारणार्‍या ओरडाओरडी करणे हाच प्रयत्न वाटत असावा बहुधा ! पाकिस्तानची मॅच सुरू झाल्यावर लोकसुद्धा येड्यासारखे टीव्ही बंद न करता बघत का बसतात हेही कळत नाही. ठळक केलेला शब्द बहुतेक आपल्या देशातील नागरिकांची मानसिकता दर्शवतो असे वाटते,राष्ट्रप्रेम हे किराणामाल विकणार्‍याच्या दुकानात इतर गोष्टींप्रमाणेच मिळते असा यांचा समज नक्कीच असावा !

दुर्दैवी घटना. ह्याची योग्य त्या पातळीवर आणि योग्य त्या प्रमाणात दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा.

पाकिस्तानी वृत्तपत्र "डॉन"च्या बातमीनुसार भारतीय लष्कराने आज एका पाकिस्तानी जवानाला कंठस्नान घातल्याचे समजतय. http://dawn.com/2013/01/10/another-pakistani-soldier-killed-by-indian-f…