Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक प्रश्न....

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 08/24/2008 - 09:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29630 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sun, 08/24/2008 - 09:32 नवीन
पांडवामध्ये धर्मराज युधीष्ठर हाच मला देखील कधी समजलाच नाही... ! बाकी राहीली गोष्ट विरोधाची तर अर्जुनाने व भीमाने आपल्या परिने प्रयत्न केला होता.. पण जेष्ठ बंधू च्या अधिकारात व आदेशात राहणे हा त्यांचा नियम होता त्यामुळे ते अपमानाच घोट घेऊन चुपचाप बसले... पण भीम शांत बसला नाही त्यांने तेथेच प्रण केला होता भर राज्यसभेत की दुशासन व दुर्योधन ह्यांचा वध करेल ! एकाची छाती फोडून तर एकाची मांडी फोडून ! त्या सभेत कोण नव्हतं ? दोष त्या धर्म राजाचा तर आहेच पण त्याच बरोबर.. अंध राजा, भिष्म, द्रोणाचार्य.. व असंख्य लोकांचा देखील होता... पण येथे एक गोष्ट नमुद करण्यासाठी आहे की... खेळासाठी जे फासे सोडले तर शकुनीने कुठला ही नियम मोडला नव्हता... दुर्योधन प्रत्येक विजयानंतर धर्मराजाला पुन्हा खेळण्यासाठी तयार करत असे व जेष्ठपुत्र व प्रतिष्ठा.... व कोठे तरी जे हरले आहे ते जिंकण्याची आशा म्हणून तो पुन्हा पुन्हा खेळत असे व हरत असे ! काही ही असो मी काही जागी महाभारतामध्ये मानव स्वभावातील दोष दाखवले गेले आहेत भले ही तो धर्म राज असो व सामान्य पण मुर्ख शिशुपाल असो ! व असे म्हणतात की... कलियुग महाभारताच्या युध्दानंतर चालू झाले पण त्यांची सुरवात कृष्ण जन्मापासूनच झाली होती... त्यांचा जन्मच द्वापर युगाचा अंत व कलियुगाची सुरवात करण्यासाठी झाली होती.... ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 14:08 नवीन
.. पण जेष्ठ बंधू च्या अधिकारात व आदेशात राहणे हा त्यांचा नियम होता त्यामुळे ते अपमानाच घोट घेऊन चुपचाप बसले... अच्छा! म्हणजे पत्नीच्या अब्रूपेक्षा जुगारी थोरल्या भावाचा आदेश जास्त महत्वाचा! असेच ना? पण भीम शांत बसला नाही त्यांने तेथेच प्रण केला होता भर राज्यसभेत की दुशासन व दुर्योधन ह्यांचा वध करेल ! एकाची छाती फोडून तर एकाची मांडी फोडून ! उद्या रस्त्यात माझ्या बायकोच्या साडीला कुणी हात घातला की मी तिथल्या तिथे माणसाला थोबडावून काढणे अधिक योग्य की एखादा पण-बिण करणे अधिक योग्य? दुर्योधन प्रत्येक विजयानंतर धर्मराजाला पुन्हा खेळण्यासाठी तयार करत असे व जेष्ठपुत्र व प्रतिष्ठा.... व कोठे तरी जे हरले आहे ते जिंकण्याची आशा म्हणून तो पुन्हा पुन्हा खेळत असे व हरत असे ! हा हा हा! वाचून गंमत वाटली! धर्मराजाची आणि इतर पांडवांची अक्कल काय शेण खायला गेली होती का? आणि मग शिवाय हा प्रश्न उरतोच की अक्कल गहाण ठेवून स्वत:च्या पत्नीची भरदरबारात बेअब्रू करणार्‍या पांडवांच्या बाजूने कृष्ण कसा काय लढला? व असे म्हणतात की... कलियुग महाभारताच्या युध्दानंतर चालू झाले पण त्यांची सुरवात कृष्ण जन्मापासूनच झाली होती... त्यांचा जन्मच द्वापर युगाचा अंत व कलियुगाची सुरवात करण्यासाठी झाली होती.... ! द्रौपदी वस्त्रहरणाचे हे समर्थन आहे का? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 14:08 नवीन
.. पण जेष्ठ बंधू च्या अधिकारात व आदेशात राहणे हा त्यांचा नियम होता त्यामुळे ते अपमानाच घोट घेऊन चुपचाप बसले... अच्छा! म्हणजे पत्नीच्या अब्रूपेक्षा जुगारी थोरल्या भावाचा आदेश जास्त महत्वाचा! असेच ना? पण भीम शांत बसला नाही त्यांने तेथेच प्रण केला होता भर राज्यसभेत की दुशासन व दुर्योधन ह्यांचा वध करेल ! एकाची छाती फोडून तर एकाची मांडी फोडून ! उद्या रस्त्यात माझ्या बायकोच्या साडीला कुणी हात घातला की मी तिथल्या तिथे माणसाला थोबडावून काढणे अधिक योग्य की एखादा पण-बिण करणे अधिक योग्य? दुर्योधन प्रत्येक विजयानंतर धर्मराजाला पुन्हा खेळण्यासाठी तयार करत असे व जेष्ठपुत्र व प्रतिष्ठा.... व कोठे तरी जे हरले आहे ते जिंकण्याची आशा म्हणून तो पुन्हा पुन्हा खेळत असे व हरत असे ! हा हा हा! वाचून गंमत वाटली! धर्मराजाची आणि इतर पांडवांची अक्कल काय शेण खायला गेली होती का? आणि मग शिवाय हा प्रश्न उरतोच की अक्कल गहाण ठेवून स्वत:च्या पत्नीची भरदरबारात बेअब्रू करणार्‍या पांडवांच्या बाजूने कृष्ण कसा काय लढला? व असे म्हणतात की... कलियुग महाभारताच्या युध्दानंतर चालू झाले पण त्यांची सुरवात कृष्ण जन्मापासूनच झाली होती... त्यांचा जन्मच द्वापर युगाचा अंत व कलियुगाची सुरवात करण्यासाठी झाली होती.... ! द्रौपदी वस्त्रहरणाचे हे समर्थन आहे का? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/24/2008 - 09:34 नवीन
तात्या, तुम्ही म्हणता ते मान्य! (याचा अर्थ मला बायको आहे असा नाही). आणि हा प्रश्न काय कालच्या अशोक काकांच्या व्याख्यानाचा परीणाम का? त्यांनाच विचारा एकदा त्यांचं मत आणि इथेही टाका ते! (बॅक टू द रीअल नेम) अदिती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 14:16 नवीन
त्यांनाच विचारा एकदा त्यांचं मत आणि इथेही टाका ते! नक्की विचारीन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अवलिया Sun, 08/24/2008 - 09:44 नवीन
तात्या धर्म अधर्म नीती अनीती या संज्ञा कालसापेक्ष आहेत म्हणजेच कालानुरुप यात बदल होतात. समाजामुळे, राज्यकर्त्यांमुळे यात वारंवार बदल होत असतात व होतील महाभारत ज्याकाळात घडले तेव्हाच्या संकल्पना ज्यात अनेक गोष्टी धर्म अधर्म गणल्या जात होत्या त्या आज तशाच्यातशा असतील असे नाही परंतु जुगारात स्वत:च्या पत्नीलादेखील दावणीला दावावर लावण्याचा निर्ल्लज्जपणा करणार्‍या पांडवांची बाजू ही धर्माची कशी काय? कुणी खुलासा करेल काय? त्याकाळी द्युत खेळणे हे क्षत्रियांसाठी मानाचे होते. द्युताला नकार देणे हे क्षात्रधर्माविरुद्ध होते. आता या युद्धात स्वतः हरल्यानंतर द्रौपदीला पणाला लावायचा अधिकार त्याला होता की नाही हा वादाचा मुद्दा झाला व त्याचाच वापर करुन धृतराष्ट्राकडुन द्रौपदीने परत सर्व मिळवले. परत जात असतामना वाटेवर निरोप येवुन पुन्हा केवळ एकच डाव खेळावयाचा व जो हरेल त्याने १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञात वास हे ठरले. धर्मराज पुन्हा हरला व त्यांना राज्यत्याग करावा लागला. जेव्हा ते परत आले तेव्हा आधी ठरल्याप्रमाणे कौरवांनी पांडवांचे राज्य देणे आवश्यक असतांना सुईच्या अग्रावर मावेल इतकी पण भुमी मिळणार नाही अशी भुमिका घैतली व नंतर महायुद्ध झाले. ज्याप्रमाणे ठरले त्याप्रमाणे वागणे हे धर्माला अनुसरुन अशी समजुत ज्याकाळात होती त्या काळात पांडव जसे ठरले तसे वागले म्हणुन धर्माला अनुसरुन वागले असे म्हटले जाते तर कौरव हे अधर्माने वागले असे म्हटले जाते. म्हणुन कृष्णाने त्यांची बाजु घेतली आता प्रत्यक्ष द्रौपदीची छेडछाड प्रत्यक्षात किती झाली, तिची वस्त्रे खरोखरीच फेडली गेली होती का? सहदेवा अग्नी आण म्हणुन भीम गर्जना झाली होती का? वगैरे हा भाग कदाचित प्रक्षिप्त असु शकतो कारण मुळ संस्कृत श्लोक जे महाभारतातील या भागांचे वर्णन करतात त्यांची रचना उर्वरीत भागांइतकी पुरातन वाटत नाही. अर्थात मी यातील तज्ञ नाही. अजुन संशोधन होणे गरजेचे आहे. नाना
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 14:16 नवीन
धर्म अधर्म नीती अनीती या संज्ञा कालसापेक्ष आहेत म्हणजेच कालानुरुप यात बदल होतात. अच्छा! म्हणजे स्वत:च्या बायकोला जुगारात हारणे हे तेव्हाच्या काळात योग्यच होते आणि म्हणून कृष्णाने पांडवांना झोडून न काढणे हेही योग्यच म्हणायचे का? महाभारत ज्याकाळात घडले तेव्हाच्या संकल्पना ज्यात अनेक गोष्टी धर्म अधर्म गणल्या जात होत्या त्या आज तशाच्यातशा असतील असे नाही समर्थन मजेशीर आहे! :) त्याकाळी द्युत खेळणे हे क्षत्रियांसाठी मानाचे होते. द्युताला नकार देणे हे क्षात्रधर्माविरुद्ध होते. स्वत:ची पत्नीदेखील जुगारात लावणे हे क्षात्रधर्माला मान्य होते काय? क्षत्रियांकरता ही गोष्टदेखील मानाची होती काय?? ज्याप्रमाणे ठरले त्याप्रमाणे वागणे हे धर्माला अनुसरुन अशी समजुत ज्याकाळात होती त्या काळात पांडव जसे ठरले तसे वागले म्हणुन धर्माला अनुसरुन वागले असे म्हटले जाते मग कृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पुरवण्याचे कारण काय? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रियाली Sun, 08/24/2008 - 14:20 नवीन
मग कृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पुरवण्याचे कारण काय?
कृष्णाचा काय फावल्या वेळात साड्या तयार करायचा कारखाना होता काय? :O कृष्णाने हस्तिनापुरात हजर न राहता साड्याबिड्या पुरवल्या नाहीत. हा चमत्कार कृष्णाच्या माथी मागाहून कोणातरी चावट माणसाने मारला. ;) व्यासानी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अवलिया Sun, 08/24/2008 - 15:56 नवीन
अच्छा! म्हणजे स्वत:च्या बायकोला जुगारात हारणे हे तेव्हाच्या काळात योग्यच होते आणि म्हणून कृष्णाने पांडवांना झोडून न काढणे हेही योग्यच म्हणायचे का? तात्या आपण त्या काळातल्या समाजाबद्दल बोलत आहे जो स्त्री नोकर दास यांचे आयुष्य ही आपली वैयक्तिक मालमत्ता आहे असे समजत होता. अहो आजही घरात गडगंज असतांना, नवरा लाखौ रुपये पगार कमवित असतांना गृहलक्ष्मीला बसला लोंबकळत, लोकलला लटकत कामावर जावुन परत घरी आल्यावर स्वयंपाक करुन मुलांचा अभ्यास घेवुन नव-याच्या सर्व इच्छा पुरवुन परत दुसरे दिवशी तेच ... असे सतत करायला लावणारे महाभाग आजही २१ व्या शतकात आहेत ना ! अहो द्रोपदी तरी एकदाच पणाला लागली होती... आजची द्रौपदी रोज पणाला लागत आहे ... समर्थन मजेशीर आहे! समर्थन नाही केवळ वस्तुस्थिती :) स्वत:ची पत्नीदेखील जुगारात लावणे हे क्षात्रधर्माला मान्य होते काय? क्षत्रियांकरता ही गोष्टदेखील मानाची होती काय?? माझे म्हणणे काय होते ते बघा त्याकाळी द्युत खेळणे हे क्षत्रियांसाठी मानाचे होते. द्युताला नकार देणे हे क्षात्रधर्माविरुद्ध होते. आता या युद्धात स्वतः हरल्यानंतर द्रौपदीला पणाला लावायचा अधिकार त्याला होता की नाही हा वादाचा मुद्दा झाला व त्याचाच वापर करुन धृतराष्ट्राकडुन द्रौपदीने परत सर्व मिळवले. याच्यापेक्षा वेगळे कसे व काय लिहायचे? :) मग कृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पुरवण्याचे कारण काय? माझे म्हणणे काय होते ते बघा आता प्रत्यक्ष द्रौपदीची छेडछाड प्रत्यक्षात किती झाली, तिची वस्त्रे खरोखरीच फेडली गेली होती का? सहदेवा अग्नी आण म्हणुन भीम गर्जना झाली होती का? वगैरे हा भाग कदाचित प्रक्षिप्त असु शकतो कारण मुळ संस्कृत श्लोक जे महाभारतातील या भागांचे वर्णन करतात त्यांची रचना उर्वरीत भागांइतकी पुरातन वाटत नाही. अर्थात मी यातील तज्ञ नाही. अजुन संशोधन होणे गरजेचे आहे. यातच साडी, अक्षय्य थाळी, कर्णाचे चाक फसणे, परशुरामकर्ण कथा वगैरे वगैरे यांचा अंतर्भाव होतो. मी त्यांचा उल्लेख केला नाही कारण मग यादी फार मोठी होइल व या लेखाचे ते प्रयोजन नाही असे मी समजतो. मी कदाचित आपले शंकासमाधान करु शकलो नसेल तर क्षमस्व. नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/24/2008 - 16:44 नवीन
सहदेवा अग्नी आण म्हणुन भीम गर्जना झाली होती का हे पण काय बरोबर नाही! त्या भीमानी, ताकद होती म्हणून (लिंबूटींबू सहदेवाला) दुसय्राला का कामाला लावावं! ही जुनी परंपराच दिसते लहान भावंडांना कामाला लावण्याची! निषेध, निषेध, "जाज्वल्य" निषेध! (नकटी आणि धाकटी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sun, 08/24/2008 - 16:50 नवीन
ओ नकटे अन धाकटे जरा अडाणी काय तुम्ही ? नीट वाचा आता प्रत्यक्ष द्रौपदीची छेडछाड प्रत्यक्षात किती झाली, तिची वस्त्रे खरोखरीच फेडली गेली होती का? सहदेवा अग्नी आण म्हणुन भीम गर्जना झाली होती का? वगैरे हा भाग कदाचित प्रक्षिप्त असु शकतो कारण मुळ संस्कृत श्लोक जे महाभारतातील या भागांचे वर्णन करतात त्यांची रचना उर्वरीत भागांइतकी पुरातन वाटत नाही. कळले का? की दुर्बीण पाठवायची ? मराठी कच्च होत चाललय लोकांचे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/25/2008 - 09:33 नवीन
>> कळले का? की दुर्बीण पाठवायची ? नाना, दुर्बिणीमुळे क्यांपूटरमधे उजेड पडतो, डोक्यात नाही! >> मराठी कच्च होत चाललय लोकांचे आणखी थोडं शिजवायचं (पकवायचं) मग शाळेत, असे विषय शिकवून! >> सहदेवा अग्नी आण म्हणुन भीम गर्जना झाली होती का? वगैरे हा भाग कदाचित प्रक्षिप्त असु शकतो कारण मुळ संस्कृत श्लोक जे महाभारतातील ... ज्यानी कोणी हे महाभारतात टाकलं त्याला बोलले मी! तुला का त्याचा / तिचा पुळका एवढा? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 08/25/2008 - 09:45 नवीन
इथे भेटलात वर नका भेटु (तसे येवढी टवाळी करता की तुम्हाला वरती प्रवेश मिळणारच नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ल
लंबूटांग Sun, 08/24/2008 - 18:23 नवीन
>>> अहो आजही घरात गडगंज असतांना, नवरा लाखौ रुपये पगार कमवित असतांना गृहलक्ष्मीला बसला लोंबकळत, लोकलला लटकत कामावर जावुन परत घरी आल्यावर स्वयंपाक करुन मुलांचा अभ्यास घेवुन नव-याच्या सर्व इच्छा पुरवुन परत दुसरे दिवशी तेच ... असे सतत करायला लावणारे महाभाग आजही २१ व्या शतकात आहेत ना ! बर्‍याचदा बायकांचाच हट्ट असतो की मला नोकरी करायची आहे. विषयांतरा बद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/25/2008 - 09:31 नवीन
>> बर्‍याचदा बायकांचाच हट्ट असतो की मला नोकरी करायची आहे. विषयांतरा बद्दल क्षमस्व आणि त्याबरोबर हापण हट्ट असतो की माझ्या घरातल्या लोकांचंही घर आहे, तर त्यांनी पण घरात बूड हलवावं! फारच विषयांतर होतंय, दुसरा धागा काढता येईल या विषयावरच्या चर्चेसाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
ल
लंबूटांग Mon, 08/25/2008 - 18:28 नवीन
रास्तच आहे. अशा पुरूषांचे मी पण समर्थन करत नाही. सर्वांनी थोडे थोडे काम केले तर बराच भार हलका होतो गृहलक्ष्मीचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/25/2008 - 11:51 नवीन
अरे लंबूटांग भाऊ, अहो आजही घरात गडगंज असतांना, नवरा लाखौ रुपये पगार कमवित असतांना गृहलक्ष्मीला बसला लोंबकळत आधी मी एवढंच वाचलं, पुढे वाचायच्या आधी विचार करत होतो, "आयला काय डेरिंग, एवढं डायरेक्ट लिहिलंय", मग पुढे वाचताना कळलं, बसला म्हणजे बस ला =)) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
अ
अवलिया Mon, 08/25/2008 - 12:56 नवीन
खुलासा वरती बसला म्हणजे फतकल मारुन बसला किंवा इतर कोणताही अर्थ न समजता बेस्ट, पीएमटी, यस्टी, ट्रक, रिक्षा, डुक्कर गाडी वगैरे वाहन ज्यातुन माणसांची ने आण केली जाते ते समजावे. लोकलला म्हणजे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे किंवा हार्बर लाइन वरील स्थानिक रेल्वे वाहतुक किंवा लोणावळा पुणे रेल्वे वाहतुक वगैरे समजावे. (काही जण लोकलला म्हणजे स्थानिक व्यक्तिला असा समज करुन घेतील म्हणुन खुलासा) खुलासा संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ल
लंबूटांग Mon, 08/25/2008 - 18:30 नवीन
हे मी पाहिलेच नव्हते. =)) (typing चे कष्ट न घेता ctrl+C आणि ctrl+v ने शक्य तितके काम उरकणारा) लंबूटांग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
द
दिगंबर Mon, 08/25/2008 - 02:07 नवीन
नानांच्या मताशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
घ
घाटावरचे भट Sun, 08/24/2008 - 09:49 नवीन
तात्याबा, हा प्रश्न मलाही पडला होता. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी याचा अर्थ असा लावला की पांडवांनी स्वतःच्या धर्मपत्नीला द्यूतात पणाला लावून जो घोर अपराध केलेला होता, त्याचं प्रायश्चित्त त्यांना १२ वर्ष वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात काढायला लावून मिळालं होतं. धर्मयुद्ध झालं ते राजसिंहासनासाठी! युधिष्ठीर ज्येष्ठ युवराज असल्याने त्याचा हस्तिनापुराच्या सिंहासनावर प्रथम हक्क होता. तो डावलून हस्तिनापुराचं विभाजन केलं गेलं त्याला आणि इतर पांडुपुत्रांना इंद्रप्रस्थात धाडण्यात आलं. त्यानंतर द्यूतात छलकपटाच्या आधाराने शकुनीने पांडवांकडून त्यांचे राज्य हिरावून घेतलं (युधिष्ठीराने नसत्या क्षत्रिय धर्माला जागून द्रौपदीला पणाला लावले ही त्याची चूकच, आणि आपला ज्येष्ठ बंधू असा मूर्खपणा करत असताना केवळ तो ज्येष्ठ बंधू आहे म्हणून त्याला एक अक्षरही न बोलणार्‍या पांडवांची तर त्याहूनही मोठी चूक!). पण वनवासातून परत आल्यानंतर पांडवांनी इंद्रप्रस्थ परत मागितलं आणि त्याला दुर्योधनानं नकार दिला. इथे ऑफिशिअली युद्धाची चर्चा सुरु झाली. साहाजिकच, पांडवांचा इंद्रप्रस्थावर हक्क होता, आणि या ठिकाणी त्यांची बाजू सत्याची/धर्माची होती (कारण त्यांनी त्यांचं राज्य परत मिळवण्यासाठी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा वापर केला नव्हता) म्हणून कृष्णानं पांडवांना साथ दिली. बाकी त्या युद्धात जे वैयक्तिक हेवेदावे, अपमान वगैरे गुंतलेले होते त्याबद्दल आधीच खूप काही लिहिलं गेलं आहे, त्यामुळे मी काही अधिक बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 14:24 नवीन
माझ्या अल्पमतीप्रमाणे मी याचा अर्थ असा लावला की पांडवांनी स्वतःच्या धर्मपत्नीला द्यूतात पणाला लावून जो घोर अपराध केलेला होता, त्याचं प्रायश्चित्त त्यांना १२ वर्ष वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात काढायला लावून मिळालं होतं. भर दरबारात स्वत:च्या पत्नीच्या अब्रूचे धिंडवडे काढणे त्याकरता वरील शिक्षा पुरेशी आहे असं आपल्याला वाटतं का? युधिष्ठीराने नसत्या क्षत्रिय धर्माला जागून द्रौपदीला पणाला लावले ही त्याची चूकच, आणि आपला ज्येष्ठ बंधू असा मूर्खपणा करत असताना केवळ तो ज्येष्ठ बंधू आहे म्हणून त्याला एक अक्षरही न बोलणार्‍या पांडवांची तर त्याहूनही मोठी चूक!). हो ना? मग या चुकीकरता कृष्णाने पांडवां झोडून काढायचे की त्यांचे सारथ्य करायचे? कारण त्यांनी त्यांचं राज्य परत मिळवण्यासाठी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा वापर केला नव्हता) म्हणून कृष्णानं पांडवांना साथ दिली. हो, पण द्रौपदीच्या गेलेल्या अब्रूचे काय? तेव्हा कृष्ण कुठे गेला होता? आणि मारे त्याने द्रौपदीला वस्त्र वगैरे पुरवल्याच्या कथा आहेत, परंतु मुळात द्रौपदीला भरदरबारात हजर करणे आणि तिच्या निरीपर्यंत दु:शासनाचा हात जाणे इथेच द्रौपदीची अब्रू गेली असं आपल्याला वाटत नाही काय? प्रत्यक्ष निरी ओढणे ही त्यानंतरची क्रिया झाली! पण तो पर्यंत तिची अब्रू गेलेलीच होती. तेव्हा तिला वस्त्र पुरवणारा कृष्ण कुठे होता? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
ट
टारझन Sun, 08/24/2008 - 09:59 नवीन
रामायण महाभारतावरच आपला विश्वास नाहीये. ते पौराणिक ग्रंथ केवळ मानवाला धर्म-अधर्म शिकवण्यासाठी असावेत. बाकी पांडव जरा बावळटच होते. येत नाय तर कशाला कसिनो खेळायचा ? तात्यांनी फक्त एक मुद्दा उपस्थित केला... मला तर असंख्य प्रश्न पडलेत ...कृष्णाचं अर्जुनावर जरा जास्तच प्रेम होतं त्यामुळे तो पांडवांकडे गेला. असाच एक अवांतर प्रश्न .. जर आकाशवाणी ने कंसाला कळले होते की "वसुदेव-देवकी चा आठवा मुलगा त्याला मारणार आहे." आणि असं ग्रुहित धरली की त्या युगात बोललं ते खरं व्हायचं .. तर मग .. त्या अति मुर्ख कंसाने वसुदेव- देवकी ला एकाच तुरूंगात , एकाच रूम मधे का ठेवलं ... साधी गोष्ट आहे राव.. स्वत:च त्यांना ८ मुलं होतील अशी व्यवस्था करून देतो. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल म्हणनारा -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Mon, 08/25/2008 - 16:22 नवीन
जर आकाशवाणी ने कंसाला कळले होते की "वसुदेव-देवकी चा आठवा मुलगा त्याला मारणार आहे." आणि असं ग्रुहित धरली की त्या युगात बोललं ते खरं व्हायचं .. तर मग .. त्या अति मुर्ख कंसाने वसुदेव- देवकी ला एकाच तुरूंगात , एकाच रूम मधे का ठेवलं ... साधी गोष्ट आहे राव.. स्वत:च त्यांना ८ मुलं होतील अशी व्यवस्था करून देतो. =)) =)) स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रभाकर पेठकर Mon, 08/25/2008 - 18:41 नवीन
एकदा आठवा मुलगा मारणार म्हंटल्यावर त्यांना वेगवेगळे ठेवून ती भयाची टांगती तलवार सतत आपल्या मस्तकी ठेवायची ( हो! काय नेम त्यांचा कांही वेगळी क्लूप्ती काढतील) त्या पेक्षा एकत्र ठेवून, रोमँटीक वातावरण तयार करून, काय ती पटापट ८ मुलं होऊ द्यायची आणि त्यांची विल्हेवाट लावून ह्यांना मोकळं करून टाकायचे पुढील प्रॉडक्शन साठी. कारण ९ नंतर कांही भिती नव्हती. अस सूज्ञ विचार कंसाने केला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..
श
शैलेन्द्र Sun, 08/24/2008 - 10:11 नवीन
". तर मग .. त्या अति मुर्ख कंसाने वसुदेव- देवकी ला एकाच तुरूंगात , एकाच रूम मधे का ठेवलं ... साधी गोष्ट आहे राव.. स्वत:च त्यांना ८ मुलं होतील अशी व्यवस्था करून देतो" घे दणदणीत, कमितकमी एक टी व्ही तरी ठेवायचा.. देवकी क क च्या सेरिअल बघत झोपुन गेलि असति
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 08/24/2008 - 10:23 नवीन
तात्या, युधिष्ठिर हा धर्माप्रमाणे वागत होता म्हणून धर्मराज, पांडव धर्माप्रमाणे वागत होते की नाही त्याबद्दल जास्त माहित नाही. पण कृष्णाने पांडवांची साथ का दिली ह्याबाबत मी काही वाचल्याचे सांगतो. प्रत्यक्षात कृष्णाला युद्धात भाग घ्यायचा नव्हता. पण दोन्ही बाजूंच्या हट्टामुळे त्याने भाग घेतला व पर्याय दिले होते की ज्याला माझे सैन्य पाहिजे तो घेउ शकतो व ज्याला कृष्ण पाहिजे त्याचा सल्लागार म्हणून कृष्ण त्याला साथ देईल. ह्यात कौरवांनी सैन्य मागितले व पांडवांना कृष्ण पाहिजेच होता, म्हणून मग कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले. मग प्रश्न पडतो की जर कौरवांनी कृष्णाची मागणी केली असती तर इतिहासच बदलला असता का? भगवद्-गीता सांगण्यात आली असती का?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 14:30 नवीन
मग प्रश्न पडतो की जर कौरवांनी कृष्णाची मागणी केली असती तर इतिहासच बदलला असता का? भगवद्-गीता सांगण्यात आली असती का? करेक्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sun, 08/24/2008 - 10:28 नवीन
>>>मग प्रश्न पडतो की जर कौरवांनी कृष्णाची मागणी केली असती तर पाडवांचा पोपट झाला असता ;) ***** कृष्णाने पांडवांची साथ का दिली ? पाडवांच्या स्वत:च्या काही चुका सोडल्यातर (ज्या तात्यांनी वर लिहल्या आहेत त्या) त्यांनी जाणून बुजून अधर्म कधीच केला नाही... उलट इतरांची मदतच केली होती... त्यामुळे कृष्णांने त्यांची बाजू घेतली.... व फक्त बाजू घेतली नाही... तर पांडवाचाच विजय व्हावा ह्यासाठी प्रयत्न देखील केले (उदा. कर्णाकडून कुडंले व श्रीखंडी च्या मदतीने भिष्म वध.... व धर्मराजातर्फे अंशीक खोटे बोलवून द्रोणाचा वध) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 14:30 नवीन
त्यांनी जाणून बुजून अधर्म कधीच केला नाही... जर एखाद्याने माझ्या बायकोची छेड काढली तर ते दृष्य हाताची घडी घालून चुपचाप पहात बसणे हा मी अधर्मच मानतो! आपलं मत काय? उद्या जर एखाद्याने माझ्या बायकोची छेड काढली आणि ते दृष्य मी नुसतं पहात बसलो तर मी जाणूनबुजून अधर्म केला नाही असं आपण म्हणाल का? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/24/2008 - 15:01 नवीन
ओ तात्या... वहिनींच्या हातात एवढा मोठा दांडक्या सारखा ऊस आहे.... कोण कशाला त्यांची छेड काढेल? ;) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मनीषा Sun, 08/24/2008 - 12:21 नवीन
त्या काळाच्या प्रथे प्रमाणे द्युताचे आमंत्रण स्विकारणे राजा या नात्याने युधिष्ठिराचे कर्तव्य होते. महाभारताच्या काळात पत्नी ही पति ची वैयक्तिक संपत्ति मानली जाई (अजुनही त्यात खूप बदल झालेला नाही ) त्यामुळे पत्नी विकणे , पणाला लावणे त्या काळात अधर्म किंवा अनीती समजली जात नसे. (हरिश्चंद्राने सुद्धा तारामती ला विकले होते - आपले स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी ) द्रौपदी ने तीला दरबारात आणले तेव्हा तेथे हजर असलेल्या सर्वांना विचारले कि जे आधि गुलाम झाले आहेत त्याना मला (म्हणजे द्रौपदीला), इंद्रप्रस्थाच्या राणीला पणाला लावायचा हक्क आहे का ? म्हणजे तिला सुद्धा पतिने पत्नीला पणाला लावणे मान्य होते (असावे) पण एका गुलामाची एका महाराणीवर काय सत्ता आहे असाच प्रश्न तीला पडला होता. यावर निर्णय देताना दरबारातील पंडितानी सांगीतले (त्या वेळे तेथे भिष्म, द्रोण, विदुर गांधारी इ. हजर होते ) कि गुलाम असला तरी त्याचा (म्हणजे धर्मराजाचा) पत्नीवरील हक्क अबाधित राहतो आणि तो तीला पणाला लावू शकतो.( अर्थात तरीही हे कृत्य फार भयंकर आहे , आणि म्हणुनच महाभारतासारखे सर्वसंहारक युद्धा झाले ..) आपल्याला आता जरी विचित्र वाटले तरी त्या वेळी हे धर्माला अनुसरुनच होते. आणि पांडवांनी जे अधर्म केले त्यात ब-याच वेळा स्वतः श्रीकृष्णच सामील होता. (त्याचे प्रायश्चित्त म्हणून नंतर त्याच्या कुळात यादवी झाली). आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी अधर्माचा सहारा घेतला (कारण युद्धात सारे काही क्षम्य असते??) असे म्हणतात..
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 08/24/2008 - 13:25 नवीन
हे द्यूतच कपटनीतीने खेळले गेले होते ..शकुनीच्या. त्यामुळे त्यात पांडवांचे हरणे हेच कौरवांच्या अधर्माने वागण्याचे पहिले पाऊल होते. अधर्माची सुरुवातच तेथे झाली. बाकी सारे परिणामतः घडत गेले...आणि त्या काळाच्या योग्यायोग्यतेच्या नीतिनियमांनुसार पांडव वागत गेले. (मोठ्या भावाच्या आज्ञेबाहेर नसणे, द्रौपदी पत्नी असली तरी द्यूतात हरलेली होती...वगैरे..). आपल्या आजच्या विचारांमधे हे कोठेच बसणार नाही...कालाय तस्मै नमः !!!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 08/24/2008 - 13:45 नवीन
वाचते आहे. पण काही सुधारणा / पटणार्‍या गोष्टी सांगत जाते - १. महाभारत युद्ध द्रौपदीमुळे झालेले नाही, ते जमिनीच्या वादामुळे झालेले आहे. (बायका कलहाचे कारण ही व्युत्पत्ती फारा काळानंतरची) २. शकुनीने कपट केले असे मूळ महाभारत कोठेही म्हणत नाही, द्यूत कपटाने खेळलेले नाही. युधिष्ठीर बकवास खेळाडू होता असे म्हणता येईल फारतर. ३. नानांचा प्रतिसाद सर्वोत्तम. परत जात असतामना वाटेवर निरोप येवुन पुन्हा केवळ एकच डाव खेळावयाचा व जो हरेल त्याने १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञात वास हे ठरले - बरोबर, याला अनुद्युत म्हणतात. ४. घाटावरील भटांनी, कृष्णाने पांडवांची साथ देण्याचे जे कारण सांगितले आहे ते ही बरोबर. आपली, (व्यासभक्त ;) ) प्रियाली
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/24/2008 - 13:55 नवीन
सेम हिअर... (व्यासभक्त ;) ) दे टाळी... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 14:32 नवीन
आपली, (व्यासभक्त ) प्रियाली य विषयावर आपण नंतर बोलू! ;) (व्यासभक्तांचा शत्रू!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
द
देवदत्त Sun, 08/24/2008 - 15:52 नवीन
कृष्णाने हस्तिनापुरात हजर न राहता साड्याबिड्या पुरवल्या नाहीत. हा चमत्कार कृष्णाच्या माथी मागाहून कोणातरी चावट माणसाने मारला. व्यासानी नाही १. महाभारत युद्ध द्रौपदीमुळे झालेले नाही, ते जमिनीच्या वादामुळे झालेले आहे. (बायका कलहाचे कारण ही व्युत्पत्ती फारा काळानंतरची) २. शकुनीने कपट केले असे मूळ महाभारत कोठेही म्हणत नाही, द्यूत कपटाने खेळलेले नाही. युधिष्ठीर बकवास खेळाडू होता असे म्हणता येईल फारतर. एक प्रश्न पडतो, ह्यात मूळ महाभारत कोणते हे कसे ठरविणार? गेल्या हजारो वर्षांत त्यात किती बदल झाले असतील. 'चायनीज व्हिस्पर' खेळाचा प्रकार ना तो? थोडेसे आणखी, मुळात भगवद्-गीता कृष्णाने अर्जुनालाच सांगितली होती, तरीही संजयने ती ऐकून धृतराष्ट्राला सांगितली होती असे म्हणतात. पण मग ते लिहिले कोणी? धृतराष्ट्राने? संजयने? व्यासांनी गणपतीला सांगून? व्यासांनी कशावरून त्यात पूर्ण कथा सांगितली? गणपतीने तर त्यात स्वतःचे काही घातले नाही ना इथपासून प्रश्न पडतात मग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/24/2008 - 15:56 नवीन
गणपती/व्यास असेल तर उत्तर व्यासच! कारण श्टूडंटला पीएच.डी करताना शोध लागला आणि त्याला नोबल पुरस्कार मिळाला तर मास्तरला क्रेडीट जातं! (श्टूडंट नसलेली आणि कसलेही दिवे न लावलेली) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
द
देवदत्त Sun, 08/24/2008 - 15:59 नवीन
गणपती/व्यास असेल तर उत्तर व्यासच! कारण श्टूडंटला पीएच.डी करताना शोध लागला आणि त्याला नोबल पुरस्कार मिळाला तर मास्तरला क्रेडीट जातं! बिचारा गणपती... पण वाचला माझ्या आरोपांतून :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/24/2008 - 16:49 नवीन
>> बिचारा गणपती... पण वाचला माझ्या आरोपांतून काहो, बिचारा का? आणि नाना म्हणतो तसं तेव्हाचे नियम वेगळे असू शकतात ... त्यामुळे बोलायचं असेल तर बोलून घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
द
देवदत्त Sun, 08/24/2008 - 17:10 नवीन
तर मास्तरला क्रेडीट जातं! ह्याकरीता म्हटले बिचारा गणपती. म्हणजे क्रेडीट फक्त व्यासांनाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रियाली Sun, 08/24/2008 - 16:04 नवीन
कोणते हे ठरवणे कठिण आहेच पण मूळ कथेत चमत्कारांचा भरणा नसावा असे वाटते.
मुळात भगवद्-गीता कृष्णाने अर्जुनालाच सांगितली होती, तरीही संजयने ती ऐकून धृतराष्ट्राला सांगितली होती असे म्हणतात. पण मग ते लिहिले कोणी? धृतराष्ट्राने? संजयने? व्यासांनी गणपतीला सांगून? व्यासांनी कशावरून त्यात पूर्ण कथा सांगितली? गणपतीने तर त्यात स्वतःचे काही घातले नाही ना इथपासून प्रश्न पडतात मग
गणपतीला काही इतर कामधंदे नाहीत का? लोकांच्या कलागतींची इश्टोरी लिहिण्यावाचून? ;) असो, कोणा शिवनंदन गणपतीने महाभारत इ. लिहिले नाही. महाभारतात तसे म्हटलेले नाही. महाभारताच्या टंकनाचे काम गणपतीने केले हे खरे - पण तो शिवपुत्र गणपती असावा हे आपले तर्क. कदाचित तो कोणा गणाचा शासक - टोळीप्रमुखही असावा. गीतेचे लेखक व्यास असू शकतील. तेवढी त्यांची प्रतिभा नक्कीच होती. बाकी, "डॉन को ग्यारह मुलकोंकी पुलीस ढूंढ रही है|" असे डॉन नाही प्रत्यक्षात त्याचा पटकथाकार म्हणत असतो हा फरक ध्यानात घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
अ
अवलिया Sun, 08/24/2008 - 16:19 नवीन
कोणते हे ठरवणे कठिण आहेच पण मूळ कथेत चमत्कारांचा भरणा नसावा असे वाटते. बरोबर चमत्कार बाजुला काढले तर महाभारत एक सुंदर इतिहास म्हणून समोर येतो व खरीच अशी कथा असु शकते गणपतीला काही इतर कामधंदे नाहीत का? लोकांच्या कलागतींची इश्टोरी लिहिण्यावाचून? मस्त कोणा शिवनंदन गणपतीने महाभारत इ. लिहिले नाही. महाभारतात तसे म्हटलेले नाही. बरोबर महाभारताच्या टंकनाचे काम गणपतीने केले हे खरे - पण तो शिवपुत्र गणपती असावा हे आपले तर्क. कदाचित तो कोणा गणाचा शासक - टोळीप्रमुखही असावा. नागरी लिपीचा शोधक गणेश असावा जो पाणिनीच्या की पतंजलीच्या अनेक शिष्यांपैकी असावा बघा ना त्याने स्वतःच्या नावातील अक्षरांना कसे वेगळे बनविले आहे ग ण श उभी रेघ वेगळी इतर सर्व अक्षरे जोडलेली भारी ब्रैंडीग आहे नाही? गीतेचे लेखक व्यास असू शकतील. तेवढी त्यांची प्रतिभा नक्कीच होती. मला नाही वाटत कुणातरी उपनिषद अभ्यासकाने नंतर हा भाग कृष्णार्जुन संवाद रुपाने घातला असावा काही असले तरी गीते इतका सुंदर भाग कोणत्याच धर्मग्रंथात नाही हे १०० टक्के नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 20:47 नवीन
प्रियाली, गीतेचे लेखक व्यास असू शकतील. तेवढी त्यांची प्रतिभा नक्कीच होती. तुला काय गं माहिती? कशावरून? माझ्या माहितीप्रमाणे व्यासाचा कुणीतरी एक शिष्य होता ज्याने मूळ महाभारत लिहिले. ती ष्टोरी व्यासाला इतकी आवडली की त्याने ती स्वत:च्या नावावर खपवायचे ठरवले. त्याप्रमाणे त्याने दडपशाही करून शिष्याचे साहित्य ढापले व स्वत:च्या नावावर खपवले! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Mon, 08/25/2008 - 00:16 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे व्यासाचा कुणीतरी एक शिष्य होता ज्याने मूळ महाभारत लिहिले.
शिष्य नाही, शिष्या. मीच ती. आता कृपया, विचारू नका की तुला कसं माहिती? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विनायक प्रभू Sun, 08/24/2008 - 13:49 नवीन
पट्ले बर का. पण देवकी ने काय तरी वेगळी आय्डीया काढली असती. कुंती टाइप. कूंती पुत्र जन्म हा आजकाल पण होतात की. Artificial insemenation. त्याकाळी प्रोसेस ला वर म्हणायची सिस्ट्म होती. आता ए.आय्.डी म्हणतात. मग प्रश्न असा पडतो की तेव्हा जर हे शास्त्र प्रगत होते तर नसबंदी का नव्ह्ती? मुळातच सगळ खुंट्ल असत की. विनायक प्रभु
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 08/24/2008 - 15:07 नवीन
अहो पण ... आकाशवाणी अशी होती की "वसुदेव-देवकी" चा आठवा पुत्र ... कोणाचाही वर कसा चालेल मग ? अंमळ येडपट कंसाला ७ मुले आणि १ मुलगी मारण्यापेक्षा , वसुदेवाला मारता नाही तर अधु करता आले असते .. आणि त्याच्या पापाचा हंडा/कळशी काय असेल ते .. जरा उशीरा भरला असतां ना... शिवाय कृष्णपण जन्माला नसता आला ... मग पांडव भारतिय टिम सारखे २र्‍या दिवशीच १ इनिंग आणि ५००-६०० रनांनी हारले असते ... व्यासांची शाई वाचली असती ... रामानंद सागर ने बंगला थोडा उशिरा बांधला असता .. आणि तात्यांना हा प्रश्नच पडला नसता ... हे सगळं त्या अंमळ **** कंसामुळे झालं .. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
प्रकाश घाटपांडे Sun, 08/24/2008 - 17:39 नवीन
अहो पण ... आकाशवाणी अशी होती की "वसुदेव-देवकी" चा आठवा पुत्र ... कोणाचाही वर कसा चालेल मग ?
त्यान्ला वायलं वायलं ठुवायच व्हतं म्हंजी फुड्ली भानगडच झाली नसती. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विनायक प्रभू Sun, 08/24/2008 - 15:13 नवीन
अधु???????? वि.प्र.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/24/2008 - 15:25 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा