Skip to main content

’तिच्यामुळे’

लेखक ह्रषिकेश चुरी यांनी मंगळवार, 23/10/2012 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
पेन होतं, कागद होता त्या रात्री तो जागत होता रात्र चढू लागली त्याला आशा वाटली चंद्र गोजिरा झाला गार वारा झाला मन कोरं होतं, कागदही कोरा होता तरी पेन कागदाला भिडला पाच मिनीटं तसाच राहीला, एक ठिपका करून वर आला रात्रभर हेच चालू राहीले श्वास चालू राहीले, आयुष्य चालू राहीले की नाही हे कळत नव्हते घड्याळाचे काटे सरकू लागले आज कविता होणार नाही हे कळू लागले रात्र संपू लागली पेनातली शाई सुकू लागली झोप येऊ लागली त्याने अखेर पेन उचलला आणि ’तिच्यामुळे’ एवढंच लिहून झोपी गेला ह्रषिकेश चुरी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1420
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by पक पक पक

आंतरजालाची शाई संपेस्तोवर लिहू शकेल तो खरा कवी!