आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी
असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा.
अगदी खरे आहे...
जत्रेला समोर उभे केलेत आणि त्याचे स्तोम माजवणालाही...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
एकत्र यावे, मौज करावी, गर्दीतही फार आनंद असतो...
जत्रेत गर्दीची चेंगराचेंगरी होऊ नये अशी सोय केली नाही, याबद्दल मलाही वाईट वाटते. पण मनुष्याने घाईगर्दीत रमूच नये, तशा रेलचेल जत्रांचे आयोजनच केले जाऊ नये, असे माझ्या मनाला मानवतही नाही.
तरी या क्षणी वाटणारा विषाद सांगणारी तुमची गझल आवडली.
तात्कालिक अपघाती प्रसंगाबद्दल वाचून मनात आलेले विषण्ण भाव व्यक्त करणारी समर्थ गजल!
(स्वगत - पुरेशी स्वयंशिस्त आणि सामाजिक जाणीव येईपर्यंत किती निष्पाप हकनाक बळी जाणार कोण जाणे?)
चतुरंग
सुरेख (हा शब्द वापरताना आम्ही थोडे विचारातच पडलो आहोत. पण हे विशेषण रचनेला असल्याने तसेच ठेवले) रचना आहे. नेमके भाव व्यक्त झाले. आणि योग्य वेळीही आले. मागं एकदा आम्ही म्हटलं होतं तसं, संपादकीयापेक्षा सकस टिप्पणी.
काही वर्षापूर्वी सातार्याजवळ मांढरादेवीच्या जत्रेत अशीच दुर्घटना घडली होती. तेव्हा ही गजल लिहिली होती. हा निराशावाद नाही. पण काही वेळेला हताश व्हायला होते. मजेसाठी, भक्तिने देवाच्या दारात जाणार्यांवर ही पाळी यावी याचे दु:ख झाले. कारणे काहीही असोत; पण या घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी सर्वानी घ्यायला हवी.
आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी
असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा.
या ओळी पुन्हा नैनादेवी यात्रेच्या निमित्ताने खर्या झाल्या याचे वाईट वाटले.
सुंदर गझल...
भावभक्तीने/मौजमजेने एकत्र येणे, हा मानव्य भाव
असेच म्हणतो
असेच म्हणतो
हेच म्हणतो..
वा वा ओगलेशेठ!
का हो इतका
सुरेख
जत्रेबद्दल!
गझल
सहमत आहे.