✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विहिर विचारी समुद्राला...

स
सोत्रि यांनी
Sat, 03/17/2012 - 15:20  ·  लेख
लेख
एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती ती. खरंतर त्या विहीरीत अपवाद म्हणावा की आठवे आश्चर्य अशा तर्‍हेने वैविध्यपूर्ण प्राणी रहात होते, गुण्यागोविंदाने(?). पण मध्येच पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यावर पाणी भरपूर वाढून खूप हलकळ्ळोल व्ह्यायचा विहीरीत पण तो लगेच थंडही पडायचा. वेगवेगळ्या प्रकृतीचे, स्वभावधर्माचे विवीध प्राणी त्यावेळी आपापले अस्तित्व जाणवून द्यायचा प्रयत्न करायचे आणि गोंधळ मजवून द्यायचे. खूप आवाज व्ह्यायच्या विहीरीत अश्यावेळी. पण क्वचितच त्या विहीरीच्या मालकाला ते जाणवून यायचे, ते प्रमाण अगदी नगण्यच म्हणा ना. पण काही वेळा काही प्राण्यांचा खूपच अतिरेक व्ह्यायचा. ते थेट आकाशातून विहरीत पडल्यासारखे, स्वत:ला प्रेषित समजून इतरांना तुच्छ लेखायचे. त्यांनी तटच पाडले होते. उच्चभ्रू म्हणजे फक्त तेच जे विचार करू शकणारे आणि इतिहास घडवणार असा आत्मविश्वास (फाजील ?) असणारे व बाकीचे उपेक्षित, वैचारिक दलित जे विचार मांडू शकतात पण विस्कळीत, 'सप्रमाण' सिद्ध न करू शकणारे. त्या उपेक्षितांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे व्ह्यायचे बर्‍याच वेळेस. खूप गोंधळ व्ह्यायचा. मग मालकाला आणि त्याच्या 'मुनीम'जींना अशा गोंधळ करणार्‍या प्राण्यांच्या मुसक्या आवळाव्या लागायच्या, नाइलाजानेच. त्यालाही ते सर्व प्राणी प्राणाहून प्रिय होतेच. सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे असे त्याला वाटायचे. अशा 'वैविध्यतने नटलेल्या' विहीरीचा त्याला सार्थ अभिमान होता. पण आगतिक होऊन त्याला असे कडक पाऊल कधीकधी उचलावे लागायचे. परंतू एकदा फार मोठा,प्रचंड, महाप्रलय झाला. खुपशी भौगोलिक उलथापालथ झाली आणि चक्क एक समुद्रच वाटावा असा एक मोठा जलाशयच विहीरीच्या शेजारी तयार झाला. नुकताच भारत सरकारचा नद्याजोडणी प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे सर्वच प्राणी इकडच्या तिकडच्या पाण्यात जाऊ शकत होते. लोकशाही किंवा रामराज्यच होते म्हणा ना. त्यामुळे ज्याला जे पाणी अनुकूल वाटत होते तिथे जाऊन तो त्या पाण्यात डुंबून आनंद मिळवत असे. विहीरीतले बरेच उच्चभ्रू प्राणी त्या जलाशयाच्या आश्रयाला गेले आणि त्यांनीच त्या जलाशयला समुद्र असे नामाभिमान देऊ केले. हे त्या नामाभिमान मात्र त्या विहीरीतल्या प्राण्यांना ठाऊकच नव्हते. सर्व आलबेल आहे असे वाटावे अशी परिस्थीती होती. पण अचानक त्या मोठ्या जलाशयातले प्राणी विहीरीत येऊन त्या जलाशायाला त्यांनी समुद्र असे त्यांनी नामाभिमान दिले आहे असे सांगू लागले. समुद्रात कशी मज्जा-म्ज्जा असते, किती गुण्यागोविंदाने सगळे नांदतात हे सांगू लागले. समुद्रात खूप खूप जागा आहे, 'ऐस'पैस पसरता येते सर्वांना, विहीर फारच छोटी आहे हे सांगायचा प्रयत्न करू लागले. विहरीत सर्वांना संकोचित आयुष्य जगावे लागते आहे आणि त्यामुळे एकप्रकारची जैविक उत्क्रांती होऊन सर्व प्राण्यांचे बेडूक ह्या प्रजातीत रुपांतर झाले आहे आणि 'कूपमंडूक' प्रवृत्तीचा फैलाव झाला आहे असे एक मतप्रवाह त्यांनी विहीरीत सोडून दिला. समुद्रात कसे 'रामराज्य' आहे असे सर्वांना पटवून द्यायचा प्रयत्न जोर-जोरात होऊ लागला. अरेच्चा, विहीरीतल्या प्राण्यांना काहीच कळेना. हे काय? असे तर इथे होतेच, नव्हे नव्हे आहेच, मग हे काय नविनच? त्यांना काहीच कळेना की हा नविन समुद्र म्हटला जाणारा जलाशय म्हणजे नेमके काय? फार वैचारिक गोंधळ होऊ लागला. मग विहीरीलाच रहावेना, ती विहीर अखेर त्या समुद्रक्षम जलाशयाला विचारती झाली, 'हे विशाल 'ऐसी' ख्याती असलेल्या समुद्रा, माझ्या माहितीप्रमाणे समुद्राचे बरेच प्रकार असतात. जसे की समुद्र, महासमुद्र, पीत समुद्र, काळा समुद्र आणि चक्क मृत समुद्रही. तर हा जलाशय ह्यातला नेमका कुठल्या प्रकारचा समुद्र समजायचा आम्ही?' वि.सू.: ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे, ईतर काही शोधण्याचा प्रत्यत्न केल्यास समुद्राच्या खारटपणाशिवाय काहिही हाती येणार नाही. :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30594 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक

मदनबाण
गुरुवार, 03/22/2012 - 12:43 नवीन
तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक तरी नाही तर डिले तरी.... ते जे मेगाब्लॉक वैगरे होतात ते म्हणे प्रवाशांच्या सोयीसाठी असतं. खरंखोटं बघायला कोण जातंय म्हणा. खीक्क खीक्क खीक्क ! ;) हा धागा "जनजागॄती "करणारा दिसतोय ! ;) चला माझ्या मिपा ग्रहावरच्या ३ घटीका संपलेल्या दिसत आहेत.पुढची घटीका येई पर्यंत... नारायण ! नारायण ! ;) जाता जाता :- अगं मॄग्गा तुला उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण ठावुक असेलच नै ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मदनबाण'जी... हा धागा

मृगनयनी
गुरुवार, 03/22/2012 - 13:17 नवीन
मदनबाण'जी... :) हा धागा सौजन्यपूर्ण जनजागृती करणारा आहे.. :) ;) ;) आंणि उथळ पाण्याला कितीही खळखळाट असला... तरी ते "उथळ" असल्यामुळे (पर्यायाने ते जास्त खोल नसल्याने) जास्तीत जास्त गुडघ्यापर्यन्तच येते... त्यामुळे याचा एक फायदा असा.. की यामध्ये "बुडण्याची" शक्यता अजिबात नसते. तसेच अश्या पाण्यात आपण अनेक खेळ खेळू शकतो.. उदा.: पकडापकडी, विषामृत, आन्धळी कोशीम्बीर, रन्गपन्चमी, इ... तसेच अश्या पाण्यात "लन्गडी" खेळण्याचा अनुभव काही औरच असतो... अर्थात समुद्राची मजा जरी या पाण्याला नसली.. तरी एकदा या पाण्यात खेळायला लागल्यावर या पाण्याचा खळखळाट आपल्याला सुमधुर आणि हवाहवासा वाटतो.... अजून एक फायदा... म्हणजे असे पाणी कुठेही अ‍ॅव्हेलेबल होते... किन्वा आपण स्वतःच एखादा छोटासा टॅन्क बान्धून किन्वा स्विमिन्ग पूल बान्धून त्यात गुडघ्यापर्यन्त पाणी सोडू शकतो... मला अश्या पाण्यात धुळवड खेळायला खूप आवडते... :) ... कारण धुळवडीच्या दिवशी सगळ्या प्रकारचे रन्ग "एक" होऊन जातात.... बाकी मदनबाण... तू मिपा'ला ग्रह सम्बोधून तसेच स्वतःला नारदाच्या ठिकाणी प्रस्थापित करून "नारायण नारायण" म्हटल्यामुळे माझा तुझ्याप्रतिचा आदर वाढलेला आहे.... कारण नारदाचे प्रत्येक विधान हे पुढे घडणार्‍या घटनांची नान्दी असते!!!!! :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

समुद्र मंथन करून काही गाळीव

निनाद मुक्काम …
Fri, 03/23/2012 - 07:43 नवीन
समुद्र मंथन करून काही गाळीव उच्चभ्रू रत्ने निघाली अशी कथा कलियुगातील पुराणात वाचली होती. दुर्दैवाने ह्या रत्नांची पारख करणार्या दर्दी जोहरी वाचक वर्गाने अवतार समाप्ती घेतल्याने ह्या रत्नांना काचेच्या मण्यां सोबत नाइलाजाने संगत करावी लागते. आणि असंगांची संगत म्हणजे प्राणाशी गाठ हि म्हण माहित असून सुद्धा हा धोका पत्करून ते विहिरीकडे धाव घेतात
  • Log in or register to post comments

नक्की कुणाची विकेट काढता आहात

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 03/23/2012 - 17:48 नवीन
नक्की कुणाची विकेट काढता आहात ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

विमे तुम्हाला मुळी ताकाला जाऊन भांडे लपवता येत नाही:

निनाद मुक्काम …
Fri, 03/23/2012 - 19:45 नवीन
तुम्ही बुआ फारच स्पष्ट वक्ते आहात: असा प्रश्न खुलेआम विचारला- क्लास आणि मास ह्या प्रवृत्ती आभसी जगतात शिरल्याने अनेक जण मूक वाचक बनणे पसंत करतात कालांतराने ह्या भूतलावर विरंगुळा आणि मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असल्याने मराठी संस्थळ बहिष्कृत करतात: तेव्हा सदर प्रतिसाद जुने स्कोर सेटल करण्यासाठी नसून व्यक्तीशः कोणाविरुद्ध नसून त्या प्रवृत्तीसाठी होता: कोणाला राखी तर कोणाला करन जोहर ;थापर आवडतात: एकमेकांच्या आवडीचा सन्मान केला तर क्लास आणी मास समुद्र आणि विहीर ह्यांच्यातील फरक आपोआप मिटेल: नाहीतरी आजच्या जमान्यात सिनेमा गृहात बाल्कनी आणि स्टोल इतिहास जमा झाले आहे: या चिमण्यांनो ;परत फिरा रे असे आवर्जून सांगावेसे वाटते:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

झाले बहू, होतील बहू, परन्तू

मितभाषी
Sun, 03/25/2012 - 16:49 नवीन
झाले बहू, होतील बहू, परन्तू या सम हा (ही) मिसळपावची सर सध्या आंजावर असलेल्या एकाही मराठी साईटला नाही एवढे छातीठोकपणे सांगू शकतो. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा