ऐकून होतो मायाजाली
दुर्लक्षील्या जातो जो नडे
समजती अनुभवांती वेडे
सरळास लाभती वाकडे
प्रतीसाद आभास मायावी
असतील काही सत्यही थोडे
का अट्टाहास करशी भूलीचा
जाणूनी पाखरू दूर जाया उडे
मनोहर साहेब, जालावरील काही गोष्टींचं फार मनावर घ्यायचं नाही. आपण लिहित राहावे आपल्यासाठी ( असे म्हणने सोपे आहे) वाचणारे वाचतील, प्रतिसाद देणारे देतील. तेव्हा आपल्या कवितेतला भाव आमच्यापर्यंत पोहचला आपण लिहित राहा !!!
अवांतर : कुबड्या तुझी धाव आहे, शुन्या कडून शुन्या कडे असे वाचले :) ( ह्.घ्या. )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणी येतो लिहीतो कविता लिही अनुभव कोणी तगडे
लिहीतो कधी कोणी नवखा सुंदर काही बोल बोबडे
लिही कोणी चारोळी कोणी पाककृतीही बरवी
लिही कोणी विडंबनेही कवितेहून बरवी
लिही कोणी शास्त्रार्थ कोणी ऋषितुल्याची कहाणी
लिही कोणी संस्कृत कोणी गाण्याची कहाणी
लिही कोणी नाट्याची समिक्षा आणि पंढरीची वारी
प्रतिसादावीण नसे का कधी लिहीण्याची गंमत भारी
(अचंबित)
पुण्याचे पेशवे
वा!
८५ प्रतिसादांनंतरही दुर्लक्षित राहिलेल्या
विचारले म्हणून सांगतो.....
लै मनावर नै घ्याचं
कोणी येतो
लिहणार्या