मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय?

सुधीर काळे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
खालील कविता माझी नाहीं पण प्रत्येकाने वाचावी अशी आहे. मिपाच्या कायद्यात बसत नाहीं. म्हणून संपादकांना असे करणे रुचले नाहीं तर अवश्य उडवावी! सुधीर काळे सुनीला गोंधळेकर यांची ही अप्रतिम कविता प्रत्येकाने वाचायलाच हवी! आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? यांना तुरुंगात घालायचं नाय, यांना बाहेर ठेवायचं नाय यांना बोलू द्यायचं नाय, मग गप्प करायचं काय? आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II१II जमली अवघड प्रश्नांची साय, खाली उकळत दुध हाय तोंड भाजून घ्यायचं का काय, जीभ दातात अडकली हाय आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II2II टी. व्ही. सारखाच वरडत हाय, कापडं अंगावर ठेवली न्हाय माझा अडला ह्यो गाढव आता, हरीचे धरतोया पाय आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II३II उपवास यांना करायचा हाय, पाणी आमच्या तोंडचं जाय अन्न गोड लागना माय, घास घशात अडकून रहाय आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II4II पब्लिक त्याच्याच माग माग जाय, त्याला अडवाव कसा नि काय ? बाहेर जायला दारच न्हाय, पब्लिक हसून म्हणतंय बाय आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II5II -सुनीला गोंधळेकर

वाचने 3098 वाचनखूण प्रतिक्रिया 15

In reply to by नितिन थत्ते

Dear Anna supporters - Gandhi would have cleaned the Ram Lila Grounds himself ... and that is the difference ... thank you
श्रीयुत थत्ते, गांधी जाऊन ६३ वर्षे उलटल्यानंतरही गांधीवाद्यांनी देशातील कचरापट्टीच स्वच्छ करावी, तरच ते गांधीवादी असं काही आहे का? इव्होल्यूशन कायसं म्हणतात ते काही आहे की नाही? आता थोड्या वेगळ्या रुपातील घाण स्वच्छ करणं सुरु आहे, एवढंच.

In reply to by नितिन थत्ते

अण्णा को याद करो, अभि के अभि. अण्णा को जेल से निकालो अभि के अभि. अण्णा के साथ कूछ भि होगा तो देश का इगो हर्ट होगा. आली रे आली आता सरकारची पाळी आली. आता लोकांची सटकली रे.........

In reply to by नितिन थत्ते

हीच बाब काँग्रेस परिवारातल्या प्रत्येकालासुद्धा लागू होते. कारण आम्ही गांधीजींना मानतो असे काँग्रेस परिवार नेहमीच म्हणत असतो. गांधी जयंतीच्या वेळी फोटोला हारतुरे घालण्यासाठी सोनिया किंवा मनमोहन सिंग येतात तेंव्हा समारंभाआधी ते लोक समारंभस्थळ स्वहस्ते स्वच्छ करतात काय ?
माझ्या कॉलेजच्या दिवसातल्या एका लोकप्रिय गाण्याची आठवण झाली (चित्रपट: ससुराल) "इक सवाल मैं करूँ, एक सवाल तुम करो हर सवालका सवालही जवाब हो!" जय हो!

इरसाल 19/08/2011 - 11:01
कधी कधी ब्रम्हानंदी टाळी लागलेली असताना "हे" लोक नक्की विचार करत असतील कि, गांधीजी जन्माला नसते आले तर बरे झाले असते.त्यांनी इंग्रजांविरुद्ध वापरलेले शस्त्र कधीकाळी ह्यांच्याच विरोधात कोणी वापरेल असे वाटले नसेल. दिवा विझता विझता मोठा होतो असे म्हणतात, हेच कारण कि काय म्हणून सत्तेपासून दूर जाता जाता मोठे मोठे खड्डे पाडून जातायेत.

अमोल केळकर 19/08/2011 - 16:56
भ्रष्ट नेते, सुस्त सरकार ! नित्य घोटाळे चव्हाट्यावर ! इतिहास नवा रचू आता ! रामलिलेच्या मैदानावर !! अमोल केळकर
कुणाच्या धोतराला हात घातला गेला असल्यास (आणि सुटल्यास) स्वतःच बांधून घ्यावे ह्यांची बरीच फाटलेली हाय , ह्या ******चा करावा काय बोलायला ऱ्हायला नाकच नाय, ह्या ******चा करावा काय तीन इडीयेटांची चव चव काय, ह्या ****** चा करावा काय लोकांचा संताप वाढत जाय, ह्या ******चा करावा काय आण्णा देताय पोटावर पाय, ह्या ******चा करावा काय मिपावर वतन दिलेला हाय, ह्या ******चा करावा काय ह्या ******चा करावा काय , कॉंग्रेसद्वेष्टे आले काय ?