Skip to main content

ब्राह्मणांनी आत्मपरीक्षण करावे भाग -१

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 14/05/2011 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवात करण्याआधी त्या वादग्रस्त लिखाणा बद्दल- श्री.खेडेकर यांनी जे काही लिखाण केले आहे, ते अश्लाघ्य,आक्षेपार्ह, द्वेषमूलक आणी विशेषत:स्त्रियां बद्दल विकृत स्वरुपात असल्यामुळे कोणत्याहि विवेकशील माणसाला आवडणार नाही, त्याचं कुणी समर्थनहि करणार नाहि.असे लिखाण फक्त समाजात दुरावाच निर्माण करेल, त्यामुळे त्यावर शासनाने बंदि घालावी असे माझेहि मत आहे, ब्राह्मणस्त्रियांनी इतर समाजा वर अन्याय/अत्याचार केल्याचे वाचनात/ऐकिवात नाहि कारण त्यांनाहि इतर समाज/शुद्र या बरोबर गुलामित जगावे लागत असे, त्यामुळे विरोध,राग ब्राह्मण्याला असू शकतो संपुर्ण जात समुहाला असता कामा नये, थोर समाजसुधारक महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा ब्राह्मणशाहिला विरोध केला,म्हणजे ब्राह्मण्याला केला ब्राह्मणांना न्हवे,ब्राह्मण्यवाद हि व्याख्या त्यांचीच,त्यामुळेच तर त्यांना त्यांचे कार्य साध्य करता आले हे कुणीहि नाकारु शकत नाहि. सद्य काळात नेहमीच ब्राह्मणांना शिव्या-शाप देणं आरोप करणं याला सुध्दा काहि अर्थ नाहि. कारण सगळेच ब्राह्मण वाईट अत्याचारी न्हवते, एक उदा.स्वातंत्र्य पुर्व काळात जेव्हा स्वातंत्र्य लढ्याच्या/समाजहिताच्या ज्या काहि चर्चा/बैठका गांधींच्या आश्रमात, मुस्लिम लीग,हिंदु महासभा या संघटनांच्या कार्यालयात चालत त्या चर्चा/बैठका या अत्यंत गुप्तपणे चालत आणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परेल येथील कार्यालयात व पुढिल मैदानात उघडपणे चालणार्‍या चर्चा/बैठका यात जमिन अस्मानाचा फरक होता त्या मुळे बाबासाहेबांच्या विद्वत्तेला, चारित्र्याला व कर्तुत्वाला मोहून अनेक सवर्ण हिंदु व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित झाल्या होत्या, ते जाणत होते की जातीभेद हे थांबायला हवे बदलायला हवे,हि फार मोठी ऐतिहासीक गोष्ट होती,त्या सवर्ण हिंदुंचे मन मोठे होते म्हणुन हे घडु शकले त्यामुळे त्यांच्या नावांचा उल्लेख इथे करावाच लागेल १. अनंत चित्रे २.गं नी.सहस्त्रबुद्धे ३.बॅ.समर्थ ४.देवराव नाईक ५.प्रिन्सिपोल दोंदे ६.प्रो.व्ही.जी.राव ७.ए.बी गजेन्द्रगडकर ८.डि.व्हि.प्रधान९.राव बहादुर बोले १०. दादासाहेब केळूसकर ११. प्रा.मनोहर चिटणीस १२.रेगे १३.प्रिन्सिपल सुरबा टिपणीस. हि नावं काय दर्शवितात ? यात काही राहून गेली असतील ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठींबा मिळाला असेल, या वरुन तरी सर्वच सवर्ण हिंदु/ब्राह्मण हे अहंकारी अत्याचारी न्हवते असे म्हणता येते, मग सरसकट ब्राह्मणांच्या नावाने कंठशोष करण्यात काय हशील? तसेही लोकसंख्येच्या प्रमाणात ब्राह्मण वर्ग आहे किती ३:५/४ टक्के,म्हणजे लोकसंख्ये नुसार बहुजनच जास्त आहेत (त्यामुळे बहुजन आणी अभीजन हे २ वर्ग निर्माण झाले असावे) मग अशा प्रकारच्या द्वेषावर आधारीत चळवळी उभारुन हे कोणती संस्कृती जपत आहेत? आणी यातून कोणती नवीन आदर्श समाज व्यवस्था निर्माण करनार आहेत? ते एकदा जाहिर करा,तुम्हाला तुमचीच धर्म/ राजकिय सत्ता हवी आहे, एका धिकारशाहि हवी आहे? पण हे विसरु नका इथे लोकशाही आहे, लक्षात असू द्या ज्या चळवळी,पक्ष कोणत्याही गोष्टिचा अतिरेक करतात त्या ज्या गतीने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतात त्याच तिव्रतेने त्या रसातळाला जातात,वर्तमानात द्वेषावर आधारीत पक्ष/संघटना/ चळवळ भविष्यात कधिच टिकू शकत नाही हा इतिहास सर्वज्ञ आहे, हिटलरची चळवळ ही द्वेषावर आधारीत होती, नाझी धर्मसत्ता स्थापन करण्यासाठी त्याने हजारो लाखो ज्यु लोकांची अमानुषपणे कत्तल केली, या अत्यंतीक द्वेषामुळे तो संपला व त्याची चळवळ हि संपली.! देशात हिटलरशाहि असावी असे माननार्‍या आणी लोकशाहिला सुरुवाती पासून विरोध करणार्‍या शिवसेनेलाहि पक्ष स्थापन करण्यासाठी आपल्या तत्वात बदल करुन शेवटी लोकशाहिच मान्य करावि लागली, थोडं विषयांतर आहे पण सुरुवातीच्या काळात उठाव लुंगी बजाव पुंगी अशी क्याच लाईन घेऊन मराठी माणसां साठी चळवळ करणार्‍या शिवसेनेचे साऊथइंडीयन/गुजराथी(शेटजी-भटजी)हे लोक प्रामुख्याने टार्गेट होते, (तेव्हा भय्यांची संख्या नगण्य होती नाहितर तेहि असते) त्यांच्याविरुद्ध भावनीक राजकारण करुन मराठी माणसासाठी पक्ष स्थापन करणार्‍या शिवसेनेला शेवटि आपल्या ध्येय धोरणात बदल करावे लागले आज हेच लोक सेनेत आहेत, १९७७ च्या निवडणूकीत शिवसेनेने नवल टाटांना पाठींबा दिला. राज्यसभा व विधानपरिषदेत नेहमीच चंद्रिका केनीया,गिडवानी, जेठमलानी प्रितीश नंदी असे बिगरमराठी उमेदवार निवडून आणले. (शिवसेनेने मराठी माणसाला काय दिले यापेक्षा मराठी माणसाने शिवसेनेला किती दिले,असे जर आज कुणी विचारले तर ती अतीशयोक्ती ठरु नये) शेवटि याच मराठी माणसाने शिवसेनेला पराभवाची धुळ चारली हे जिव्हारी लागल्या मुळे दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंना आपल्या अग्रलेखात मराठी माणसावर विश्वास राहिला नाही, मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला असे म्हणावे लागले.याचा अर्थ मराठी माणूस खरच तसा मतलबी आहे?निदान जे शिवसेनेचे पारंपारीक वोटर आहेत ते? नक्कीच नाहि अहो नुसते नावं देउन आणी मराठी शाळेत शिकून मराठी माणसाचा विकास कसा होईल? शेवटि द्वेषाच अतिरेक होणं आणी ज्यासाठी आपण कार्य करत आहोत ते ध्येय-धोरण यामध्ये असलेली तफावत दुट्टपीपणा याचा हा परिणाम आहे. हिच परिस्थिती भविष्यात संभाजीब्रिगेड आणी त्यांच्या समविचारी संघटना यांचेवर येणार आहे, अशा अतेरिकी संघटनांना फार काळ लोकाश्रय मिळत नाहि,सध्या तरी त्यांच्याच संघटना/समाजात त्याच्या बद्दल सहानूभुती विश्वास अत्यल्प आहे,एक गट असा आहे ज्यांना आरक्षण नको आहे त्याने त्यांचा अहंकार दुखावला जातोय, त्यात एक गट असाहि आहे की ज्याला आंबेडकरी चळवळी बद्दल काहि देणे-घेणे नाहि उलट त्या लोकां बद्दल कटूता आणी आकसच खुप आहे,आणी एक गट असा आहे की ज्यांना यात पडायचे नाही त्यांना २ वेळ ची भाकरी कशी मिळेल याची भ्रांत असते,माहित असावे सध्या सर्वत्र सर्रास संभाजीब्रिगेड आपल्या जाहिर कार्यक्रमां मधे छ.शिवाजी महाराज,म.ज्योतिबा फुले,शाहू महाराज,आणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमा लावत असतात, या महापुरुषांच्या विचारांशी आम्हि बांधील आहोत,त्यांचे विचार आम्हि अंगीकारले आहेत,त्यांचे विचार समाजात पसरवण्याचे कार्य आम्हि करत आहोत असे म्हणून ते बहुजन समाजाची सहानूभुती मिळवून ब्रिगेड आपले इस्पित साध्य करत आहेत, दलित,मागासवर्गीय लोकांवर सर्वात जास्त अन्याय अत्याचार करणारे हे लोक आहेत हे न समजण्या इतके इथला बहुजन दुधखुळा नाहि, त्या उलट म.फुलेंची सत्यशोधक चळवळी ने तमाम स्त्रि वर्ग व दलित शुद्र वर्गाला शिक्षणाची बंद दारे उघडली, आंबेडकरांनी जी संघटना बनवली ती आंबेडकरीचळवळ हि बहुजनांच्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देनारी समतेची मूल्य जपणारी संघटना बनली, आंबेडकरांनी मनुवादाशी लढताना नेहमी विवेकाने,विचाराने, आणी आपल्या प्रकांडपांडित्याने लढा दिला आणी यात ते यशस्वीहि झाले,अशा महामानवांचे नाव घेउन आपली वैचारीक दिवाळखोरी दाखउवून विवेकहिन आणी विकृत लिखाण करुन दोन समाजात दुहि निर्माण करण्याचे काम ब्रिगेड करत आहे. (सकाळी उठले की आज बामनाला एकतरीशिवी द्यावी असे ब्रिगेडचा नित्यनेम चालू असावा) आंबेडकरांनी जर अशी खालच्या पातळीवर येउन स्त्रियांवर टिका केली असती तर ते कधी यशस्वी झाले असते का? उलट स्त्रियां विषयी तर ते खुपच Sensitive होते कुटुंबातील एक स्त्रि शिकली तर ते संपुर्ण कुटुंब शिकतं असे त्यांचे विचार होते,त्यामुळेच भारताच्या राज्यघटने मधे त्यांनी सर्व वर्गातील स्त्रियांना समान मत/समान कायदा/ घटस्फोट घेण्याची मूभा अशा तरतुदी करुन ठेवल्या अर्थात स्त्रिमुक्तीचा प्रभावी जाहीरनामा म्हणजे हिंदूकोडबिल होय. डॉ.आंबेडकरांनी हिंदूकोडबिलाचा आग्रह करून स्त्रियांवरील अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून देण्यासाठी आकाशपाताळ एक केले.या कायद्याने विधिवत लावलेले आणि नोंदणी पद्धतीने झालेले विवाह कायदेशीर ठरविले. लग्नाचे वय मुलासाठी २१ आणि मुलीसाठी १८ किंवा त्याहून अधिक असावे ही तरतूद झाली.(चु.भु.) त्यामुळे कायद्यानुसारच बालविवाह मोडीत निघाले.बालविवाह बंद झाले.सतीप्रथा, विधवांचे केशवपन याबाबीही बंद झाल्या.हिंदूकोडबिल म्हणजे भारतीय स्त्रीच्या स्वातंत्र्याची सनद स्त्रि मुक्तीला कायद्याची शक्ती देऊ पाहणारे,स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा असे कांतीकारी रूप असलेले,स्त्रीला समतेचे आणि स्वातंत्र्याचे पुरूषाच्या बरोबरीने हक्क देणारे हिंदुकोडबिल पास झाले तरी ते सगळ्याच तरतूदिंनी पास झाले नाहि,त्यास पं.नेहरु,कर्मठ हिंदू आणी हिंदूमहासभा जे अखंड हिंदुंचे हित जपतात त्यांनीच घेतला होता, मसुदासमिती मधील सदस्यांनीही तीव्र विरोध केला होता, पण जर मनुस्म्रुतीत असणारे कलमे घटनेत अंतर्भुत केली असती तर आजची स्त्रि हि शिक्षण,नोकरी तर दुरच घराबाहेर हि पडली नसती म.फुलेंनी,व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठीची पहीली शाळा पुण्याच्या भिडे वाड्यात सुरु केली,विधवा/बाल विधवा आश्रम सुरु केला.त्यामुळे या महापुरुषांचे ऋण आपण कदापी विसरु नये, अशा महापुरुषांच्या नावाने चळवळ चालवून ब्रिगेड त्यांना बदनाम करत आहे, ज्यांच्या नावे संघटना स्थापन केली त्या आदरणीय संभाजी महाराज आणी छ.शिवाजी महाराज यांचे विचार,आदर्श यांचे मधे आहे का?कुठे पर स्त्रि ला आई समान माननारे छ.शिवाजी आणी कुठे हे, इतिहासात रांझ्या पाटलाची गोष्ट प्रसिध्द आहे,या गावच्या वतनदार पाटलाने एका गरिब शेतकर्‍याच्या तरण्या ताठ्या पोरीला सर्वां समक्ष उचलून नेली अन् भोगली,माती झालेल्या जिण्या पेक्षा मरण बरं म्हणून पोरीने जीव दिला,सारा गाव हळह्ळला पण मुकाच राहिला,महाराजांच्या कानी हि गोष्ट गेली,पाटलाला मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणी हात-पाय तोडायची शिक्षा झाली, आज जर महाराज असते तर काय केले असते या ब्रिगेडचे, आज यांच्या अजेंड्या वर फक्त ब्रह्मण समाज आहे त्यांच्या बद्दल विखार इतका की कापून टाका, संपवून टाका,आणी कहर म्हणजे दंगलीची चिथावणी देणे,यावर सरकारने मुग गिळून गप्प बसणे पसंत केलेले दिसतेय, बरं उद्या सगळे ब्राह्मण (वाद) संपले किंवा भितीने ते स्थालांतरीत झाले मग पुढे अजेंड्यावर कोण? दलित-ओबिसी का भटके-विमुक्त,आदिवासी? का मुस्लिम/जैन/कॅथलिक? अशा टोकाच्या आणी ज्वलंत द्वेष असणार्‍या संघटना या देशाला घातक आहेत, इथे लोकशाही आहे आपले वाद असतील जीव्हाळ्याचे प्रश्न असतील ते चर्चा करुन सनदशीर मार्गाने सोडवायला हवेत इतर मार्ग आहेत,त्यासाठी वैचारीक लढा द्या अशा चिथावणीखोर भाषणे देउन रक्तरंजीत लढाईने जग जिंकता येत नाही, नाहि तर अजातशत्रु कधी हरला नसता;) अवांतर:स्वतः स्त्रि असून खैरलांजी सारख्या घटनेचे समर्थन करणार्‍या बाई ला हे लोक मराठा भुषण पुरस्कार देतात (त्या पिडित लोकांचे फोटो डोंबिवली स्टेशन जवळ लावले होते ते पाहूनच अंग शहारले,अगांवर काटा आला इतक्या क्रूरपणे त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांचे खून केले होते आज ते पुन्हा डोळ्यासमोर आले) आणी Atrocities Act रद्द करा म्हणनारे ब्रिगेड आणी संघटना या कायद्याचा गैर वापर होतोय असा कांगावा करतात,मुळात त्या कायद्याने किती जणांना न्याय मिळाला हे पाहिलं आणी ते गुन्हे करणारे कुठल्या समाजाचे लोक जास्त आहेत हे पाहिलं तर त्याचा विरोध ते का करतात हे सुज्ञास सांगने न लगे;) (कुठल्याहि ग्रेड मध्ये नसलेला)

वाचने 46952
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

लेखाचा आणि शीर्षकाचा संबंध काय आणि कसा असावा?

बरेच काही म्हणायचे आहे परंतू लिहीण्याच्या आवेशात लेख भरकटत गेला आहे असे वाटले. लिखाण विस्कळीत स्वरुपाचे वाटल्यामुळे योग्य अशी प्रतिक्रिया लिहीणे शक्य झाले नाही.

In reply to by रामदास

बर्‍याच अंशी सहमत आहे, पण 'लेखकाला यातून बरेच काही म्हणायचे आहे' हा भाग तरीही महत्त्वाचा वाटतो. बाकी, शीर्षक आणि लेख यांचा संबंध निदान या भागात तरी लक्षात येऊ शकला नाही. कदाचित पुढच्या भागांत तो स्पष्ट होऊ लागेल, अशी आशा आहे. परंतु, शीर्षकाचा लेखाशी संबंध असो वा नसो, निदान शीर्षकाच्या निमित्ताने अनेकांनी हा लेख किमान उघडून तरी पाहिला, हे या लेखाच्या आतापावेतोच्या अंशतः यशाचे लक्षण मानता यावे काय? कदाचित, 'आज या शीर्षकाच्या निमित्ताने लोक निदान लेख उघडून पाहतील, आणि कोण जाणे, उद्या लेखाची मापे काढण्याच्या मिषाने वाचतीलसुद्धा' असे काही सूत्र यामागे दडलेले असू शकेल काय? तसे असल्यास, स्ट्र्याटेजीला दाद द्यावीशी वाटते. ('बेट-अँड-स्विच' तंत्र सर्वांनाच जमते, असे नाही.) असो. (या मालिकेतील) पुढील लेखनास शुभेच्छा. लेखकाला या मालिकेतून नेमके काय म्हणायचे आहे, हे जसजसे स्पष्ट होऊ लागेल, तसतशी सुयोग्य प्रतिक्रिया देणे सुकर होऊ लागेल. (तूर्तास केवळ पुढील भागांबद्दल कुतूहल आहे.)

भाग - १ वाचतानाचा धाप लागली. ह्याच विषयावर असे अजुन किती भाग लिहिणार आहात ते ही सांगा. म्हणजे ब्राम्हणांनी नक्की किती वेळा आत्मपरिक्षण करायला हवे ते कळेल. अ'जात'शत्रू म्हणुन नावातही जात का आणताय राव ! :D (ह.घ्या)

In reply to by कानडाऊ योगेशु

अ'जात'शत्रू म्हणुन नावातही जात का आणताय राव ! (ह.घ्या) फेस्बुकात हा प्रतिसाद असता तर नक्किच लाईक केला असता :)

In reply to by प्राजु

शीर्षक वाचून आपल्याला अखेर कोणीतरी आत्मपरीक्षणाचा मार्ग दाखवणार या आशेने धागा उघडला. पण लेखांत ब्राह्मणांना कुठेच उपदेश नाही हे बघून निराशा पदरी आली. आता आम्ही आत्मपरीक्षण करावे तरी कसे ?

ब्राम्हण आत्मपरीक्षण करत राहिले म्हणुन या स्थितीला आलेत, आता गरज आहे, बाकीच्यांची परिक्षणं करुन बरे वाईट जे काही आहेत ते स्पष्ट निर्णय घेण्याची.

In reply to by अविनाशकुलकर्णी

तुम्हाला वाईट दिवस आले असतिल ...आम्हाला आलेले नाहित व येणारही नाहित.

डॉ.आंबेडकरांनी हिंदूकोडबिलाचा आग्रह करून स्त्रियांवरील अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून देण्यासाठी आकाशपाताळ एक केले.या कायद्याने विधिवत लावलेले आणि नोंदणी पद्धतीने झालेले विवाह कायदेशीर ठरविले. लग्नाचे वय मुलासाठी २१ आणि मुलीसाठी १८ किंवा त्याहून अधिक असावे ही तरतूद झाली.(चु.भु.) त्यामुळे कायद्यानुसारच बालविवाह मोडीत निघाले.बालविवाह बंद झाले.सतीप्रथा, विधवांचे केशवपन याबाबीही बंद झाल्या.हिंदूकोडबिल म्हणजे भारतीय स्त्रीच्या स्वातंत्र्याची सनद स्त्रि मुक्तीला कायद्याची शक्ती देऊ पाहणारे,स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा असे कांतीकारी रूप असलेले,स्त्रीला समतेचे आणि स्वातंत्र्याचे पुरूषाच्या बरोबरीने हक्क देणारे हिंदुकोडबिल पास झाले तरी ते सगळ्याच तरतूदिंनी पास झाले नाहि,त्यास पं.नेहरु,कर्मठ हिंदू आणी हिंदूमहासभा जे अखंड हिंदुंचे हित जपतात त्यांनीच घेतला होता, मसुदासमिती मधील सदस्यांनीही तीव्र विरोध केला होता,
यातील बाकी सर्व म्हणणे समजू शकतो, पण डॉ. आंबेडकरांचा किंवा हिंदुकोडबिलाचा सतीप्रथा किंवा विधवांचे केशवपन मोडीत निघण्याशी नेमका संबंध काही लक्षात आला नाही. कृपया सविस्तर विशद करू शकाल काय? आभारी आहे.

In reply to by पंगा

@त्यामुळे कायद्यानुसारच बालविवाह मोडीत निघाले.बालविवाह बंद झाले.सतीप्रथा, विधवांचे केशवपन याबाबीही बंद झाल्या विधवा स्त्रिचे केशवपन करणे, बालविवाह करणे, विधवा पुनर्विवाहास बंदी करणे, स्त्रिला सती जाण्यास प्रवृत्व करणे, होळीच्या दिवशी नग्न नाचविणे घटनेच्या कलम ५१ (ड) नुसार स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविणार्‍या सर्व सामाजिक व धार्मिक कुप्रथा व अनिष्ट परंपरांवर बंदी आहे, तिथे या तरतुदिंचा घटनेत समावेश केल्यामुळे कायद्याच्या सक्षम आधारा नुसारच बंद झाले असे म्हणायचे आहे, अवांतरः सतीप्रथा, विधवांचे केशवपन या प्रथा ब्राह्मण वर्गातच प्रचलीत होत्या असाव्यात, आणी त्यावेळच्या समाजसुधारकांनी अनुक्रमे राजा राममोहन रॉय आणी म.फुले यांनी त्या बंद करवल्या. धन्यवाद !!

हा असा लेख फक्त ब्राम्हनांविरुद्धच लिहिने शक्य आहे. करान तेच शांततेत वाचतात. तेव्हा शिर्शकात २री जात घालुन लेख पहा मग कोनाला आत्मपरीक्षनाची गरज आहे हे कळेल

In reply to by मुलूखावेगळी

>>हा असा लेख फक्त ब्राम्हनांविरुद्धच लिहिने शक्य आहे. करान तेच शांततेत वाचतात. लेख वाचलेला दिसत नाही. यात "फक्त ब्राम्हनांविरुद्धच" काहीही लिहिलेले नाही. लेख विस्कळित झाला आहे याच्याशी सहमत.

In reply to by नितिन थत्ते

@ लेख वाचलेला दिसत नाही. यात "फक्त ब्राम्हनांविरुद्धच" काहीही लिहिलेले नाही. धन्यवाद !! @ हा असा लेख फक्त ब्राम्हनांविरुद्धच लिहिने शक्य आहे. करान तेच शांततेत वाचतात. तेव्हा शिर्शकात २री जात घालुन लेख पहा मग कोनाला आत्मपरीक्षनाची गरज आहे हे कळेल किंवा असहि घालुन पाहूयात का?- असा लेख फक्त ब्राम्हनांविरुद्धच लिहिने शक्य आहे. करान तेच शांततेत वाचतात,जातीयवादाचे चष्मे लाउन? मुळात भाग-१ हा संभाजी ब्रिगेड आणी ते ज्या महापुरुषांच्या नावाने चळवळ चालवत आहेत त्यांच्या विषयी चा आहे, यामुळे इतर महापुरुषांची नावेहि यातुन वगळावी लागली, माझी त्या मागची भुमिका मांडण्यांचा एक प्रयत्न होता, कारण इथे(निरीक्षणा वरुन काहि अपवाद सोडले तर सगळेच अतीप्रगल्भ आहेत) काहि प्रतिसाद असे आहेत की,नाक्या वर उभे राहुन चर्चा चाललीए का एका गावच्या पारावर, असे वाटू लागले आहे,कोणत्या समाज/ नेत्यांबद्दल बोलायची त्यांच नाव घ्यायची सोय राहिली नाहि, नाहितर शिक्केवाले आहेतच घाउक स्वरुपात शिक्के मारायला, बहुजनवादी/समाजवादि काय, ब्रिगेडी विचाराचे काय,मार्क्सवादी, डावे-उजवे हे शिक्के मारुन मोकळे होतात, कोण कुणी का असेना लेखावरुन ते ठरवण्याचा अधिकार कुणी दिलाय का कुणाला? बर्‍याच जणांनी तर ब्राम्हणांनी आत्मपरिक्षण करावे असे म्हटले की लेखात ब्राह्मणां "विरुध्द" काय लिहिलय का तेच शोधण्याचा प्रयत्न केला काही तरी सापडतय का हे पाहिलं,त्यामुळे बर्‍याच जणांची निराशा झाली आहे, आपल्याला जर पुर्वग्रहाने ग्रासले असेल तर अस घडु शकतं ना.आणी त्यासाठी २र्‍या भागाची वाट ही न पाहता आपली मतं बनवून मोकळे झाले, आता एकाच धाग्यात काय काय कोंबायच आणी किती जरा दमानं घ्या की ;) त्यामुळे ज्यांना असे प्रश्न पडले आहेत त्यांनी सध्या आत्मपरीक्षण केलेत तरी चालेल बॉ, मागे सुध्दा मंदिर प्रवेशाचा विषय होता त्यात फक्त ब्राह्मण हा एकच शब्द एकदाच आला पण त्यावर त्या चर्चेलाच वेगळे वळन लागत गेले,आता तसे पाहिले तर भारतातल्या बहुसंख्य मंदिरात ब्राह्मण पुजारीच आहेत, (अपवाद सोडुन) बरे असे म्हणतात की धार्मिक ग्रंथ व वेदांचा अभ्यास करून त्यातील ज्ञान ग्रहण करणार्‍या अशा लोकांना ब्राह्मण ही उपाधी दिली जात असे.त्यामुळे ब्राह्मण बनण्यासाठी कोणावरही बंदी नाहि फक्त धर्मोपदेशक म्हणुन त्यांना स्वत:चे कर्तृत्व दाखवावे लागते.याच न्यायाने मी तो शब्द योजला असता त्यातहि काहिंनी आपला अहगंड,द्वेष दाखवुन दिलाच म्हणजे एकीकडे ब्राह्मण बनण्यासाठी कोणावरही बंदी नाहि या अर्थी कोणत्याहि मंदिरात कुनालाहि पुजा-अर्चा करण्यास कुणालाहि बंदि नाहि असे म्हनायचे आणी त्यांना त्या उपाधीने संबोधले की थयथयाट करायचा हा दुटप्पी पणा नाहि का? @अ'जात'शत्रू म्हणुन नावातही जात का आणताय राव ! (ह.घ्या) @का.यो. फेस्बुकात हा प्रतिसाद असता तर नक्किच लाईक केला असता कसं आहे पुर्वी मोगलांना जळी-स्थळी-पाषाणी संताजी-धनाजी दिसत, आता काहिंना जळी-स्थळी-पाषाणी जातच दिसतेय,बरे असे खिल्ली उडवणार्‍यांना लोकांना मनोरंजन करण्याची भारी हौस, पण कधी कधी त्यात आपलीही विकेट जाते याचे भान ठेवावे म्हणतो, आम्हाला वैयक्तीक बोललेलं आवडत नाहि गरज असेल किंवा व्यक्तीशः तसा उल्लेख असेल तेव्हाच आम्हि वैयक्तिक बोलतो, तुमच्या मागील (कारकिर्द) प्रतिसादां वरुन तुम्हि इथे नेहमी उचली जिभ लावली...करता त्यामुळे तुमच्या काही पोष्ट ही उडवल्या गेल्या आहेत असे दिसते, नेहमीच विनोद निर्मिती करनारे प्रतिसाद टाकण्या पेक्षा कधी कधी थोडं सिरीअसही व्हावं, तुम्ही स्वतः तुमच्या नावाचे कधी तुम्ही निरीक्षण केले आहे का? काय राव तुमच्या नावातच "गे" आहे की:० कानडाऊ यो"गे"शू ;) मग काय आता फेस्बुकात हा ही प्रतिसाद असता तर नक्किच लाईक केला असता ना? =) =) :bigsmile: :bigsmile: (ह. घ्याच) :bigsmile: अवांतरः भाग-१ वर म्हटल्या प्रमाणे हिंदूकोड बिल ला जसा त्यावेळी पं.नेहरु,कर्मठ हिंदू आणी हिंदूमहासभा जे अखंड हिंदुंचे हित जपतात त्यांनीच घेतला होता, मसुदासमिती मधील सदस्यांनीही तीव्र विरोध केला होता, तसा विरोध आजहि २१ व्या शतकात पहायला मिळत आहे, पहा> राजा राममोहन यांना हिंदु धर्म भ्रष्ट व विकृत करण्याकरिता इंग्रजांकडून करोडो रुपये मिळाले हा गौप्य स्फोट केला आहे गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (अरे बापरे हे महाशय ब्राह्मणच का? छे नसतीलहि "जाणकार" "प्रकाश" टाकतीलच,) त्यांचे काहि "मौलीक विचार" खाली वाचकांसाठी देत आहे, सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदु समाजाचा सनातनधर्म आणि संस्कृती, त्यांचे रितीरिवाज, परंपरा, शाश्वत असे वर्णधर्म, जातिधर्म, कुलधर्म, विवाहसंस्था, कुटुंबसंस्था या सर्वांवर बुलडोझर फिरवला गेला आहे. हिंदु-कोडबिल आणून महाभयंकर दुष्कृत्य केले गेले आहे.त्यांची गणना महापापातदेखील करता यायची नाही. हिंदूंचे वर्तमान आणि भविष्य यांनी छिन्न-भिन्न केले. त्यामुळे हिंदू संभ्रमावस्थेत आहे !, हिंदू कोण ? तेच आम्हाला कळेनासे झाले आहे आता वैदिक ब्राह्मणच काय; परंतु हिंदूदेखील इतिहास जमा व्हायचा बाका प्रसंग ओढावला आहे, . . . . . . . . . . . (कोल्हेकुई) . . . त्याची इथे लिंक आहे http://sanatandharmaasitis.blogspot.com/2009/08/blog-post_16.html सध्या तरी या महाशयां बद्दल जास्त माहिती नसल्यामुळे जास्त काहि लिहित नाहि,पण आपल्या इथल्या सन्माननीय सदस्य-मित्रां कडून (जर या बद्दल काहि माहिती असल्यास) ती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.तसेच त्यांच्या वरील मतांशी सहमत असल्यास कळावे, (योगप्रभु व जोगळेकर साहेब यांना त्याबद्दल खास आग्रह आहे) जाताजाता : एक विनंती मि.पा.वर येताना आप आपल्या जातीय द्वेषाचे चष्मे आप आपल्या घरीच ठेउन यावे.(म्हणजे ते लाउन वाचन करु नये) (स.ज.घ्या) :)

लिहिताना भावनेच्या भरात लिहिल्यामुळे लेख भरकटतला आहे. पण एकंदरीत तो खूपच सहिष्णू वॄत्तीने लिहिला आहे त्यामुळे खिल्ली उडवावीशी वाटत नाही. फक्त वर कोणीतरी लिहिले तसे वेट अ‍ॅण्ड स्विच करु नये म्हण्जे झाले . शिवाय वर एक-दोन जणांनी/जणींनी लिहिल्याप्रमाणे लेखाचा आणि शीर्षकाचा संबंध जोडता आला नाही. म्हणजे ब्राम्हण समाजास मार्गदर्शन केल्याचे कुठेच आढळले नाही.

लेखात सध्यपरिस्थीतीचा उहापोह केल्याचे जाणवते पर॑तु शीर्षकाचा संबंधी लेख आसल्यचे वटत नही. म्हणुन पुढिल भागासाच्या प्रतिक्षेत! विनित

अमक्याचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला होता/आहे, हा युक्तिवाद फसवा आहे. ब्राह्मण्याला विरोध करताना अशी माणसे हळूहळू 'समस्त ब्राह्मण जात' गृहित धरुनच टीका करायला लागतात. 'बी स्पेसिफिक' हा नियम विसरुन सैल तोंडाने 'ज्ञानेश्वरांचा छळ ब्राह्मणांनी केला', तुकारामांना ब्राह्मणांनी मारले, शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला, मराठ्यांचे राज्य ब्राह्मणांनी बुडवले, अशा प्रकारची विधाने करु लागतात. मागे अशाच एका चर्चेत मी विचारले होते, की ब्राह्मण आणि ब्राह्मण्य वेगळे काढता येते का? शाब्दिक खेळ करुन ब्राह्मण्य म्हणजे वर्चस्ववादी वृत्ती/सनातनीपणा/जातिभेद/अहंकार असे दाखवायचा प्रयत्न केला तरी हे दुर्गुण केवळ ब्राह्मणांत नसतात, तर प्रत्येक जातीतच दिसून येतात. राजकीय/सामाजिक वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न ब्राह्मण करत नाहीत कारण ते या व्यवस्थेत कधीच बाजूला पडलेले आहेत. जातीची गणिते कोण मांडते, ते सर्वांना दिसते आहे. सनातनीपणा म्हणाल तर आजही ब्राह्मणांपेक्षा सनातनी व कर्मठ असे इतर अनेक समाज आहेत.त्यांची देवस्थाने, प्रथा-परंपरा, रोटी-बेटी व्यवहारांची चौकट पूर्वीइतकीच अभेद्य आहे. जातिभेदाचेही तेच. ब्राह्मण समाज जातिभेदातून बाहेर आला आहे. ब्राह्मणेतराला ब्राह्मणाच्या घरी फुटक्या आणि बाजूला ठेवलेल्या कपातून चहा पिण्याचा अनुभव येत नाही. डॉ. आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, डॉ. नरेंद्र जाधव, सुशीलकुमार शिंदे या बहुजन नेत्यांच्या पत्नी ब्राह्मण आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नेते सीकेपी आहेत, पण पत्नी ब्राह्मण आहेत. ब्राह्मण समाजाखेरीज इतर कुठल्या समाजाने रोटी-बेटीची बंधने इतकी शिथील केली आहेत, याचा एकदा विचार करावा. ब्राह्मणांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देणे सोपे आहे, पण खरी आत्मपरीक्षणाची गरज इतर समाजाला आहे. गेल्या १०० वर्षांच्या काळात ब्राह्मण समाज बुरसटलेल्या विचारांतून बाहेर पडला आहे. स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाची कास धरणे, कुटूंबनियोजन, सुधारणावादी विचार, हुंडाबंदी, विधवा पुनर्विवाह, मुलींनी जातिबाहेर विवाह केला तरी 'ऑनर किलिंग'चे प्रकार न करणे हे जे बदल घडले आहेत त्यापासून इतरांनी काही शिकण्याची गरज आहे. याचा अर्थ ब्राह्मणांना आत्मपरीक्षणाची गरज नाही, असे नाही, पण ते मुद्दे संपूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यांचा इतर जातींशी संबंध नाही. जे काही विचारमंथन घडायची गरज आहे ते ब्राह्मण समाजातील अंतर्गत समस्यांवर हवे आहे. मला वैयक्तिक असे वाटू लागले आहे, की आता इतर समाजांनी ब्राह्मणांच्या घरात डोकावणे बंद करावे आणि स्वतःपुढील समस्या चर्चेस घ्याव्यात.जर आपण समाज म्हणून एकत्रित विचार करणार असू तर मग इतिहासातील दाखले देऊन एकट्या ब्राह्मण समाजाला बळीचा बकरा बनवणे थांबवावे.

In reply to by योगप्रभू

योगप्रभूंशी १०८ % सहमत!!! _______ बाकी अजातशत्रू यांची संयमित विचारशक्ती व भाषाशैली आवडली! :)

In reply to by योगप्रभू

एकसे टक्क्का सहमत... (श्री. - लायकि नाहि) खेडेकर यान्चे स्रिया बद्दल लेखनाच त्रिव निसेध. (चु भु - मराठी लेखन)

In reply to by योगप्रभू

शब्दाशब्दाशी सहमत आहे. अजातशत्रु यांनी या प्रतिसादाला योग्य ते उत्तर द्यावे अशी रास्त अपेक्षा ठेवायला हरकत नसावी.

In reply to by अप्पा जोगळेकर

@शब्दाशब्दाशी सहमत आहे. कुणाच्या ते समजले नाहि, ते योगप्रभुंच्या प्रतिसादा बद्दल असेल तर.. त्यांच्या प्रतिसादाला योग्य ते उत्तर देणार आहोतच काळजी नसावि. :)

In reply to by योगप्रभू

सुंदर उत्तर. मुद्देसूद आणि व्यवस्थित. योगप्रभूंना भेटण्याचा योग आला तर या प्रतिसादाबद्दल एक फालुदा पाजण्यात येईल (पुण्यात असाल तर मस्तानी.. तशी ती थोडीशी बदनाम झाली आहे, पण हरकत नाही)

In reply to by योगप्रभू

मी दिवसेंदिवस योगप्रभूंचा फ्यान होत चाललो आहे राव. संतुलित प्रतिसाद.

In reply to by योगप्रभू

शीर्षकाशी सुसंगत नसला तरी लेख चांगला वाटला. पण र्‍हस्व-दीर्घासारख्या शुद्धलेखनाच्या अनंत चुकांमधून वाटचाल करताना सतत ठेच लागल्यासारखे वाटत होते व रसभंग होत होता! या बाबीकडे पुढील लेखनात लक्ष द्यावे.

ब्राम्हण मागची अनेक वर्ष आत्मपरिक्षण करत आहेत. ब्राम्हणेतर लोकांनी आता थोडं आत्मपरिक्षण करायला हवं आहे. अनेक बाबतीत. चित्पावन आदि जोशी

नमस्कार,सर्वप्रथम अश्या विषयावर लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन.तरी काहि गोष्टी सुचवाव्याश्या वाटतात.सध्या संभाजि ब्रिगेड व त्यातले लोक जे काहि काम करत आहेत,त्या बद्दलची माझी मतं जनमानसापेक्षा फारशी वेगळि नाहित.किंबहुना त्यांचि कामगिरी व तीचे असणारे व होणारे परिणाम हा १ स्वतंत्र विषय असल्यामुळे त्याची मी ईथे चर्चा करत नाहि.फक्त मला तुमच्या लेखाच्या निमित्तानी काही प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात.आपण त्यावर मनन करावं,असं मला अपेक्षित आहे. १)आपल्या भारतीय समाजामधे धर्म/समाज/जात याविषयी काहितरी वादळ उठल्याशिवाय त्याबद्दल काहिही चर्चाच होत नाहि,आणि त्यामुळे सामाजिक द्रुष्ट्या,आपली सकारात्मक स्थित्यंतराकडे वाटचाल होत नाही,असं आपल्याला वाटत नाही काय? २)वादांची वादळे शमल्यानंतर,आपणही धुळ खाली बसल्या प्रमाणे पुन्हा "जैसे थै" का होतो? ३)आपल्याला हे असे विषय नित्याच्या 'घरसफाई' प्रमाणे अगत्याचे का वाटत नाहित?आपलं घ्रर साफ/निटनेटकं/संस्कारक्षम असण्यासाठि अपल्यावर शेजाय्रानी टीका करायचि वेळ येते का?कि, "काय हो किती हा कचरा?" असं कुणी म्हटल्याशिवाय आपण 'घराला' झाडुच लावित नाहि? ४)अश्या वादात कोणताही जातवाला सहभागी झाला,कि तो,लेख निरपेक्षपणे किंवा तटस्थपणे न लिहिता,त्या लेखाला आपला 'रंग' का लागु देतो? क्रुपया यावर आपले मत नोंदवावे...जाता जाता आणखि १---मी विचारलेले प्रश्न,खिल्ली किंवा टवाळिच्या स्वरुपाचे नाहित,किंबहुना तो माझा त्यामागचा छुपा कि कसलासा म्हणतात, तो हेतुही नाही.मी अश्या विषयात समोरच्याची मतं विस्कळित किंवा कश्याहि स्वरुपाची असली,तरी जोपर्यंत ती प्रामाणिक आहेत तोपर्यंत,मीही त्यावर गंभीरपणेच चर्चा करतो.आपणहि तसाच प्रतिसाद द्यावा ही विनंति...आपला...पराग दिवेकर.

रोज करतो. अगदी ब्रम्हगाठीला धरुन गायत्री मंत्र म्हणत करतो.

नमस्कार, आणी अभिनंदना बद्दल धन्यवाद, संभाजि ब्रिगेड बद्दलच माझं मत मी सुरुवातीलाच नोंदवल आहे, लेख विस्कळीत झाला ती कारणं इथे देता उपयोगाची नाहित, असो.. १)आपल्या भारतीय समाजामधे धर्म/समाज/जात याविषयी काहितरी वादळ उठल्याशिवाय त्याबद्दल काहिही चर्चाच होत नाहि,आणि त्यामुळे सामाजिक द्रुष्ट्या,आपली सकारात्मक स्थित्यंतराकडे वाटचाल होत नाही,असं आपल्याला वाटत नाही काय? खरयं पण असं वाटण्याची कारणं काय असावी? मला वाटतं याचं उत्तर योगप्रभुंनी दिलेल्या प्रतिसादात मिळेल, "दुर्गुण केवळ ब्राह्मणांत नसतात, तर प्रत्येक जातीत दिसून येतात.आणी प्रत्येकजण आपले राजकीय/सामाजिक वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, इथ पर्यंतच्या त्यांच्या वाक्याशी मीही सहमत आहे, त्यात मी- "प्रत्येक जातीचा अहंगंड,वर्चस्व सिध्द करण्याचा प्रयत्न असतो" असे त्यांचे वाक्य सुधारुन लिहित आहे, आपल्या हातून घडलेल्या चुका कबुल करुन त्या दुरुस्त न करता तशाच गिरवत राहणे, (काहिंना त्या चुका न वाटता त्याचे समर्थन करण्यातच पुरुषार्थ वाटतो) यामुळे सामाजिक द्रुष्ट्या,आपली सकारात्मक स्थित्यंतराकडे वाटचाल होत नाही अस मला वाटतं २)वादांची वादळे शमल्यानंतर,आपणही धुळ खाली बसल्या प्रमाणे पुन्हा "जैसे थै" का होतो? -सहमत नाहि, वादळे शमल्यानंतर पुन्हा जैसे थै बसणं हे त्या त्या व्यक्तींवर अवलंबून आहे,आय मीन हे सर्वांना लागु असु नये,प्रत्येक जण आपआपल्या परिने प्रयत्न करत असतो, काहिजण जाहिरपणे काहि सुप्तपणे, काहि प्रस्थापित व्यवस्थेशी लढत आहेत,काहिंना त्यात यश येते काहिंना नाहि, "चहाच्या पेल्यातील वादळ" किंवा "हे काय थोडे दिवस गोंधळ घालतील,मग आहेच येरे माझ्या मागल्या" हे होतं हे नाकारत नाहि, पण असे सगळेच नसतात नाहितर आदर्श/लवासा बाहेर आलंहि नसतं, सकारात्मक द्रुष्टिकोण ठेवून पहा कदाचीत तुमचा प्रश्न बदलेल. ३)आपल्याला हे असे विषय नित्याच्या 'घरसफाई' प्रमाणे अगत्याचे का वाटत नाहित?आपलं घ्रर साफ/निटनेटकं/संस्कारक्षम असण्यासाठि अपल्यावर शेजाय्रानी टीका करायचि वेळ येते का?कि,"काय हो किती हा कचरा?" असं कुणी म्हटल्याशिवाय आपण 'घराला' झाडुच लावित नाहि? या कचर्‍याला जबाबदार कोण ? जर कुणाला मनापासून आपलं घर स्वच्छ साफ करावेसे वाटले तर आपले भाऊ-बंध आहेतच कि मध्ये झाडू घालायला, कशाला हव्यात सुधारणा?अगोदर त्यांना सुधरवून दाखवा/ त्यांना असं बोलून दाखवा,असं बोललं की आपलं घ्रर साफ/निटनेटकं/संस्कारक्षम झाल्यासारखं वाटतं,स्वर्ग जिंकल्या सारखं वाटतं, (त्यांना हा वर्षा नू वर्षे पिढ्यान् पिढ्या असलेला पिंजरा तुटायचे भय असते,आपल्याच कोषात आणी फक्त आपल्या पुरताच विचार करणार्‍यांना त्यामुळे साहजीकच असुरक्षित वाटते) बरे दुसर्‍यांचा मळ साफ करा असे सांगण्या पेक्षा आपल्याला लागलेली घाण का साफ करु नये? त्यामुळे मुळ समस्या तशीच राहते, हाच खोटा अभिनीवेश या कचर्‍यास कारणीभूत आहे अस मला वाटतं. ४)अश्या वादात कोणताही जातवाला सहभागी झाला,कि तो,लेख निरपेक्षपणे किंवा तटस्थपणे न लिहिता,त्या लेखाला आपला 'रंग' का लागु देतो? व्यक्ती परत्वे त्याकडे बघण्याचा द्रुष्टिकोण आणी,वर लेखात म्हटल्या प्रमाणे जर ठरावीक रंगाचे चष्मे लावले तर तोच रंग दिसणार,लेखातील निरपेक्षता किंवा तटस्थपणा हि त्या त्या समाज घटकाच्या हितसंबंधावर ठरत असते त्यात जेव्हा स्वतःचे मानवी हितसंबंध निर्माण होतात आणि त्यानंतर एका समाजघटकाचे हितसंबंध दुसऱ्या मानवी हितसंबंधाच्या विरोधात जायला लागते तेव्हा असे वाटू लागते, @जाता जाता आणखि १---मी विचारलेले प्रश्न,खिल्ली किंवा टवाळिच्या स्वरुपाचे नाहित,किंबहुना तो माझा त्यामागचा छुपा कि कसलासा म्हणतात, तो हेतुही नाही.मी अश्या विषयात समोरच्याची मतं विस्कळित किंवा कश्याहि स्वरुपाची असली,तरी जोपर्यंत ती प्रामाणिक आहेत तोपर्यंत,मीही त्यावर गंभीरपणेच चर्चा करतो. असे स्पष्टिकरण द्यायची खरे तर गरज न्हवती आपण जे लिहितो ते प्रत्येकाला माहित असते आणी मग त्यावर प्रतिक्रीया काय याव्या याचाहि अंदाज असतो, किंबहूना लेखावरुन ती खिल्ली आहे की गंभीरपणा हे स्पष्ट होतं त्यास वेगळं स्पष्टिकरण द्यायची तसदी नको. विचारलेले काही प्रश्न हे सामुहिक स्वरुपाचे होते/ असावे तरी मी त्यांना माझ्या परीने वैयक्तिक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याने जर आपले समाधान होत असल्यास अनुमोदन द्यावे अवांतर :आम्हि गांधीवादि नसल्यामुळे आम्हाला ज्या टोन मधे प्रतिसाद येतात त्याचे उत्तर त्यांना त्याच टोन मधे मिळते, उद्धटासी उध्दट त्यामुळे कुणी त्रास करुन घेऊ नये.(उदा.योगेश यांची प्रतिक्रिया)

प्रथम--"आणि जाता जाता" असे मी का लिहिले,ते संगतो...मागे युयुत्सु रावांना मी 'ज्योतिष भाकित पडताळा' संबंधात १आव्हान दिले होते.त्यातल्या काही गोष्टींची,काही जणांनी खिल्ली उडविली होती.तश्या स्वरुपाचं काही घडुन येऊ नये,व त्यामुळे चर्चेतलं लक्ष उडु नये,म्हणुन समग्रपणे केलेलं ते १ आवाहन होतं.त्यात वैयक्तिक तुम्हाला गांभिर्याची जाणिव करुन देण्याचा कोणताहि हेतु नव्हता...तरी तुम्हाला तसं वाटलं असल्यास क्षमस्व...तरीही आपण उत्तरे प्रामाणिक पणे दिलित या बद्दल धन्यवाद...माझं समाधान बय्रापैकी झालेलं आहे...पण कधि प्रत्यक्ष भेटीचा योग आला,तर आपल्याशी याच प्रश्नांवर अधिक चर्चा करण्याची ईछ्चा बाळगतो...धन्यवाद...आपला पराग दिवेकर.

पण त्यांना ते आव्हान पेलणे शक्य न्हवतेच, त्यामुळे त्यावर त्यांनी स्पष्टिकरण देणेहि टाळल्याचे आठवतेय ! बाकि उत्तरे प्रामाणिकपणे द्याविच लागतात, नाहितर आपण स्वतःच स्वतःला फसवतोय असे होते. समाधान बय्रापैकी झालेलं आहे तुम्हि हे प्रामाणीकपणे कबूल केल्याबद्दल तुमचेहि आभार, पण कधि प्रत्यक्ष भेटीचा योग आला,तर आपल्याशी याच प्रश्नांवर अधिक चर्चा करण्याची ईछ्चा बाळगतो आम्हालाहि भेटायला/ चर्चा करायला आवडेलः) अवांतरःज्यांचे जवळ योग्य मुद्दे नसतात ते बोलण्यात/समजावण्यात अर्थ नाहि, बोललो असतो/ खोडता आले असते असे पळवाट काढून चर्चा सोडून जातात. (वो हम नहि)

ब्राम्हण याचा अर्थ केवळ महाराष्ट्रातील ब्राम्हण असाच का घेतला जातो. गुजराथी तमिळ भाषीकांत देखील तथाकथीत अर्थाने ब्राम्हण वर्ग आहेच की. तो तसा सर्वच भाषीकांत आहे. सगळे गुजराथी काही शेडजी नासतात तसेच सर्व दक्षीण भारतीय शेट्टी नसतात. ब्राह्मणस्त्रियांनी इतर समाजा वर अन्याय/अत्याचार केल्याचे वाचनात/ऐकिवात नाहि कारण त्यांनाहि इतर समाज/शुद्र या बरोबर गुलामित जगावे लागत असे, ब्राम्हण समाजानी तसे अत्याचार कुठेच स्वतःहोऊन केलेले नाहीत. राजसत्तेला धर्मसत्तेच्या माध्यमातून नियंत्रीत केले की मग राजसत्तेच्या आड राहून स्वतःचे नियम बनवता येतात. शिवरायाना राज्याभिषेक करणारा हा ब्राम्हणच ( पौरोहित्य करणारी व्यक्ती) असायला हवा होता. हे एक उदाहरण धर्मसत्तेचे राजसत्तेवर कसे प्रभूत्व राखून ठेवले होते ते दाखवायला पुरेसे आहे. विद्याभ्यास करणारा / विद्याभ्यास शिकवणारा तो ब्राम्हण ही संकल्पना सोयीस्करपणे पौरोहित्य देवादीकांची पूजा अर्चा करणारा तो ब्राम्हण अशी नकळ्त बदलली गेली आणि त्यातून धर्मसत्तेत रुपांतरीत झाली प्राचीन इतिहासात परशुराम व अर्वाचीन इतिहासात पेशवे , असे काही अपवाद सोडले तर ब्राम्हण समाज कधीच स्वतः लढण्याच्या भागडीत पडला नाही.तो समाज कधीच लढाऊ प्रतिमेचा नव्हता. लेखकाला अभिप्रेत असणारा ब्राम्हण हा केवळ कोणत्यातरी ब्राम्हण कुटुंबात जन्मल्यामुळे त्याला ब्राम्हण म्हणावे अशा अर्थाने ब्राम्हण म्हनून आलेला आहे. त्या वर्गाला नेहमीच राजसत्तेच्या जवल वावरता यायचे. ब्राम्हणातील विधवा स्त्रीयांना मात्र कष्टाचे जीणे वाट्याला यायचे. त्या साठी धोंडो केशव कर्वे जन्माला यावे लागले. त्यानन्तर मात्र ब्राम्हण समाज सामाजीकक सुधारणा चटकन आत्मसात करायला लागला. आरक्षण वगरेंच्या सामाजीक रेट्यापुढे टिकाव धरायचा असेल तर ज्ञानाचा तंत्राचा आधार घ्यावा लगेल हे ब्राम्हण समाजाने ओळखले आहे.

In reply to by विजुभाऊ

>>प्राचीन इतिहासात परशुराम व अर्वाचीन इतिहासात पेशवे , असे काही अपवाद सोडले तर ब्राम्हण समाज कधीच स्वतः लढण्याच्या भागडीत पडला नाही.तो समाज कधीच लढाऊ प्रतिमेचा नव्हता. विजुभाऊ, समस्त ब्राह्मण समाजाचा विचार केला तर तो केवळ पौरोहित्य या एकाच व्यवसायात गुंतून पडलेला नव्हता. राज्य करणे, प्रशासनात मदत करणे, शेती, सावकारी, अध्यापन, वैद्यकी, ज्योतिष सांगणे, गणित व खगोलशास्त्राचे ज्ञान संपादन करणे, नाटककार, कवी, साहित्यिक, कलाकार अशा इतरही क्षेत्रात ब्राह्मण होते आणि त्यांची संख्या धर्मशास्त्र्यांहून अधिक होती. ब्राह्मणाने क्षत्रियोचित कर्म करणे धर्माला अमान्य नव्हते. त्याचप्रमाणे नीती/धर्मबाह्य वर्तन करणार्‍या ब्राह्मणालाही शासन करणे रुढ होते. रामायणात लंकेचा राजा रावण हा ब्राह्मण होता. त्याने केलेल्या चुकीबद्दल रामाने त्याला मारले. पण ब्राह्मणांनी कुठे आक्रोश केला नाही. उलट उन्मत्त रावणाला मारण्यासाठी रामाला ब्राह्मणांनीच साह्य केले. (हनुमान हा ब्राह्मण आहे, हे लक्षात घ्यावे.) आजही ब्राह्मण क्षत्रिय असलेल्या रामाला पूजतात. ब्राह्मण असलेल्या रावणाला नव्हे. महाभारतात द्रोणाचार्य व कृपाचार्य हे पराक्रमी ब्राह्मण योद्धे होते. त्यांनीच कौरव-पांडवांना शस्त्रास्त्र विद्या शिकवली. महायुद्धात द्रोणाचार्य लढता लढता मारले गेले. पुढे अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा दुरुपयोग केल्यावर त्याला श्रीकृष्णाने वेदनादायी चिरंजीवित्वाचा शाप दिला. ते धर्माला अनुसरुनच झाले. त्यामुळे ब्राह्मण द्रोणाचार्यांच्या पराक्रमाला नावाजतात. अश्वत्थाम्याच्या नव्हे. परशुरामाने उन्मत्त क्षत्रियांचा संहार केला, परंतु त्याचा ब्राह्मण समाजाला आनंद झालेला नव्हता. परशुरामाने या हत्यांबद्दल प्रायश्चित्त घेण्याचे ठरवून जिंकलेली भूमी कश्यप मुनींना दान केली तेव्हा ब्राह्मण असलेला कश्यप परशुरामाला म्हणाला, की आता मी या भूमीचा मालक आहे आणि तुझ्यावर संहाराचे पाप आहे तेव्हा तू या भूमीत न राहाता इथून चालता हो. ती आज्ञा प्रमाण मानून परशुराम महेंद्र (सह्याद्रि) पर्वतावर गेला व त्याने समुद्राकडून अपरांत (कोकण) ही नवी भूमी तयार केली. (या परशुरामाचा पराभवही पुढे रामानेच केला आहे.) इकडे कश्यप मुनींनी आपल्याला मिळालेली भूमी पुन्हा क्षत्रियांनाच दिली आहे. मौर्यकाळात पुष्यमित्र शुंग हा शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहद्रथाचा सेनापती होता. मगधाचे राज्य ग्रीकांच्या ताब्यात जाण्याआधी पुष्यमित्राने ब्रुहद्रथाला मारुन शुंग घराण्याची सत्ता स्थापित केली. महाराष्ट्रावर राज्य करणारे सातवाहन राजे ब्राह्मण होते. विजयनगरचे साम्राज्य स्थापन करण्याची मूळ कल्पना विद्यारण्य नावाच्या ब्राह्मणाची होती आणि हरिहर व बुक्क या तरुणांना हाताशी धरुन ती प्रत्यक्षात उतरवली. हरिहर हा पुढे सम्राट कृष्णदेवराय झाला. बहामनी सुलतानशाहीचा संस्थापक हसन गंगू हा पूर्वीचा गंगू नामक बाटलेला ब्राह्मण. पण तो एकेकाळी ब्राह्मण होता म्हणून त्याचा कळवळा ब्राह्मण समाजाला नव्हता. उलट या मुसलमानांचा उच्छेद करण्यासाठीच इथले व कर्नाटकातले ब्राह्मण मदत करत होते. यादवकाळात देवगिरीच्या यादवांचा मंत्री हेमाद्रिपंत हा ब्राह्मण होता. शिवकाळात तर हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या शपथेपासून शिवाजीमहाराजांसोबत ब्राह्मण होते. आदिलशहाचा सरदार आणि शहाजीराजांचा जवळचा मित्र सरदार मुरार जगदेव हा ब्राह्मण होता. दादोजी कोंडदेवाला कितीही शिव्या दिल्या तरी तो एक स्वामीनिष्ठ कारभारी होता, हे कधीही मान्य करावेच लागते. महाराजांसोबत अनेक ब्राह्मण हातात शस्त्र घेऊन रणांगणात लढले आहेत. पेशवाईच्या काळात तर लढाऊ ब्राह्मणांची संख्या कितीतरी पटीने वाढलेली दिसते. देशस्थ तर पूर्वीपासून होतेच, पण या काळात चित्पावन, कर्‍हाडे व सारस्वत ब्राह्मणांतूनही कर्तबगार योद्धे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ब्राह्मणांनी वेळप्रसंगी क्षत्रियाचे आणि वैश्यांचेही कर्म केले आहे, इतकेच मला नमूद करायचे आहे.

@ब्राम्हण याचा अर्थ केवळ महाराष्ट्रातील ब्राम्हण असाच का घेतला जातो असा शोध तुम्हाला कधी लागला ? असो,जेव्हा मनसे भय्यांच्या विरोधात आंदोलन करते तेव्हा भय्या म्हणजे फक्त बिहारी भय्या असा त्याचा अर्थ होत नाहि किंवा फक्त उत्तरप्रदेशी भय्ये असे छाटून्,निवडून भय्यांना हुसकावले जात नाहि, तसेच ब्राह्मण याचा अर्थ केवळ महाराष्ट्रातील ब्राम्हण असाच का घेतला जातो हा तुमचा समज चुकिचा ठरतो,(बाकि काहि वक्तव्य करताना भौगोलिक मर्यादा येतात) @ब्राम्हणातील विधवा स्त्रीयांना मात्र कष्टाचे जीणे वाट्याला यायचे. त्या साठी धोंडो केशव कर्वे जन्माला यावे लागले. त्यानन्तर मात्र ब्राम्हण समाज सामाजीकक सुधारणा चटकन आत्मसात करायला लागला धोंडो केशव कर्वे आणी महात्मा फुले यांच्यात ३१ वर्षे वयाचा फरक आहे, कर्वे १८५८ व फुले १८२७ फुले जेव्हा ३० वर्षे वयाचे प्रौढ होते तेव्हा कर्वे जन्माला यायचे होते :) ब्राम्हणातील विधवा स्त्रीयांना मात्र कष्टाचे जीणे वाट्याला यायचे. त्यासाठी धोंडो केशव कर्वे जन्माला यावे लागले.हे तुमचे धाडस भारीच म्हणायचे, @लेखकाला अभिप्रेत असणारा ब्राम्हण हा केवळ कोणत्यातरी ब्राम्हण कुटुंबात जन्मल्यामुळे त्याला ब्राम्हण म्हणावे अशा अर्थाने ब्राम्हण म्हनून आलेला आहे. मला अभिप्रेत असणारा ब्राम्हण- "धार्मिक ग्रंथ व वेदांचा अभ्यास करून त्यातील ज्ञान ग्रहण करणार्‍या अशा लोकांना ब्राह्मण ही उपाधी दिली जात असे.त्यामुळे ब्राह्मण बनण्यासाठी कोणावरही बंदी नाहि फक्त धर्मोपदेशक म्हणुन त्यांना स्वत:चे कर्तृत्व दाखवावे लागते." यावर तुमचे विधान पुन्हा तपासा,जे तुम्हाला वाटतं त्याचा सोईस्कररित्या अर्थ काढून घेऊ नका. अवांतरः बाकिचे मुद्देहि गैर लागू आहेत त्यामुळे मी माझे श्रम वाचवत आहे.

In reply to by अजातशत्रु

बाकिचे मुद्देहि गैर लागू आहेत त्यामुळे मी माझे श्रम वाचवत आहे किंवा तुम्हाला त्याचा प्रतिवाद करता येत नाही असं म्हणा. फुले जेव्हा ३० वर्षे वयाचे प्रौढ होते तेव्हा कर्वे जन्माला यायचे होते या वाक्यानंतर स्माईली टाकण्याचे काय कारण ? यामध्ये एखादा विनोद आहे का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

@बाकिचे मुद्देहि गैर लागू आहेत त्यामुळे मी माझे श्रम वाचवत आहे किंवा तुम्हाला त्याचा प्रतिवाद करता येत नाही असं म्हणा. प्रतिवाद नक्की कुणाला करता येत नाही ते इथे असणार्‍या प्रतिसादां वरुन अगदि स्वच्छ दिसत आहे, तेव्हा त्याची दखल घ्या आधी मग काय ते बरळा, @फुले जेव्हा ३० वर्षे वयाचे प्रौढ होते तेव्हा कर्वे जन्माला यायचे होते या वाक्यानंतर स्माईली टाकण्याचे काय कारण ? यामध्ये एखादा विनोद आहे का ? असे विचारल्याने वरील वाक्यात बदल होणार नाहि,विनोद असला नसला तरी त्याने सत्य बदलनार नाहि, बाकी त्यांचे अती धाडस पाहून आम्हि स्मित केले हो कौतिकाने. बरं त्यापेक्षा असच म्हणूयात का की, ब्राम्हणातील विधवा स्त्रीयांना मात्र कष्टाचे जीणे वाट्याला यायचे. त्या साठी धोंडो केशव कर्वे जन्माला यावे लागले. त्यानन्तर मात्र ब्राम्हण समाज सामाजीकक सुधारणा चटकन आत्मसात करायला लागला. कारण कर्वे जेव्हा ३० वर्षे वयाचे प्रौढ होते तेव्हा फुले जन्माला यायचे होते, (नाऊ क्रेडीट गोज टू कर्वे) फुले १८५८ आणी कर्वे १८२७ ठीकय ना.. हम्म आता मिळालं क्रेडीट ब्राह्मण कर्वे ना ;) अर्रर कर्वे पण ब्राह्मणच का? मला तर वाटले ते एक समाज सुधारक होते? अरे हो त्यादिवशी कोणतरी गाडगेबाबां पण ब्राह्मणच असे म्हटले होते,आणी मग काय ओशाळून धावले सगळे खुलासा करायला,असो यातुन एक कळले गाडगेबाबा परीट होते,समाज सुधारक न्हवते, पुर्वी समाज सुधारक/संत हिच एक(जात) ओळख होती ती आता पुसली जाणार बहुतेक आम्हि या जन्मी तरी त्यांची जात शोधण्याचा प्रयत्न केला नसता,आणी ती शोधावी असं वाटलंही नाही, पण या कपाळकरंट्यां मुळे (फक्त ब्राह्मण नाही, सर्व समाज) हल्ली द्वेषाच्या राजकारणाला सुगीचे दिवस आले आहेत,जो तो आपल्या जातीची माणसं कुठे कुठे पराक्रम/दिवे गाजवले ते शोधू लागली आहेत, त्यामूळे वर पासून खाल प्रर्यंन्त पट्टेवाल्या पासून साहेबा पर्यंत सगळ्यांच्या जाती बाहेर येऊ लागल्या आहेत,या देशाचं काहि खरं नाहि, अवांतर: जे सत्य आहे ते सत्य आम्हिहि स्विकारतो त्यामूळेच ज्या विवेकशील आणी सह्रदय ब्राह्मणांनी सुधारणा केली,मदत केली {त्यांची नावे,जी काहि अंशी तुम्हालाही माहित नसावी}त्यांचा आवर्जुन उल्लेख मी केला आहे, म्हणुन आम्हि रामदास(आठवले न्हवे) पेक्षा बाजी प्रभुंना महत्व देतो निदान त्यांनी खिंड तरी लढवली,आणी कर्वेंचं कार्य महत्वाच आहे पण त्यांना क्रेडीट देण्याच्या नादात जर जेन्युयेन लोक डावलले जात असतील तर ते कसे चालेल? आपल्या माणसाला क्रेडिट देण्याच्या नादात इतरांना नेहमीच डावलले जाते. आणी यालाच ब्राह्मण्य म्हणतात योगप्रभूजी

In reply to by अजातशत्रु

>>आपल्या माणसाला क्रेडिट देण्याच्या नादात इतरांना नेहमीच डावलले जाते. आणी यालाच ब्राह्मण्य म्हणतात योगप्रभूजी ब्राह्मण्य म्हणजे काय, हे एखाद्या ब्राह्मणाला समजाऊन सांगण्याइतका दुसरा विनोद नसावा बहुतेक. असो. तुमची ब्राह्मण्याची व्याख्या जर इतपतच मर्यादित असेल तर मग बेसिकमध्येच गडबड आहे. बरंच काही वाचावं लागेल तुम्हाला. अभ्यासासाठी शुभेच्छा. ब्राह्मणांनी आत्मपरीक्षण कसे आणि कोणते करावे, याबद्दल पुढचा भाग वाचायला आवडेल.

In reply to by अजातशत्रु

प्रतिवाद नक्की कुणाला करता येत नाही ते इथे असणार्‍या प्रतिसादां वरुन अगदि स्वच्छ दिसत आहे, इथले प्रतिसादच कशाला हवे इथले अनेक धागेच याची साक्ष देतील. 'मला त्याने मारलं' अशा पद्धतीने रडत रडत उत्तर शोधण्यासाठी संजय सोनवणींचे दरवाजे किंवा ब्लॉग कोण झिजवतं हे एव्हाना सगळ्यांना ठाऊक झालंच आहे. असे विचारल्याने वरील वाक्यात बदल होणार नाहि,विनोद असला नसला तरी त्याने सत्य बदलनार नाहि बदल करा किंवा करु नका. त्या वाक्यात विनोदी काय आहे असे विचारले होते. त्याचे उत्तर टाळलेत. काहीच कारण नसताना उगाच हसलात त्यामुळे १) तुम्हाला कर्वे किंवा फुले यांपैकी कोणाचीतरी टवाळी करायची आहे किंवा २) तुम्हाला मानसिक उपचारांची गरज आहे असे मानण्यास जागा आहे. पैकी पहिलीच शक्यता मला जास्त वाटते. कारण कर्वे जेव्हा ३० वर्षे वयाचे प्रौढ होते तेव्हा फुले जन्माला यायचे होते, (नाऊ क्रेडीट गोज टू कर्वे) दोन महापुरुषांची तुलना करण्यासाठी शुभेच्छा. ज्या विवेकशील आणी सह्रदय ब्राह्मणांनी सुधारणा केली,मदत केली {त्यांची नावे,जी काहि अंशी तुम्हालाही माहित नसावी}त्यांचा आवर्जुन उल्लेख मी केला आहे चांगल्या माणसांचा उल्लेख केला हे कोणावर तरी उपकार केले अशा थाटात कशाला सांगायला पाहिजे. आणी कर्वेंचं कार्य महत्वाच आहे पण त्यांना क्रेडीट देण्याच्या नादात जर जेन्युयेन लोक डावलले जात असतील तर ते कसे चालेल? म्हणजे कर्वे जेन्युअन नव्हते असं म्हणायचं आहे का ? आपल्या माणसाला क्रेडिट देण्याच्या नादात इतरांना नेहमीच डावलले जाते. आपला माणूस याचा अर्थ स्पष्ट करावा. म्हणजे डॉ. आबेडकर, म. फुले, म. कर्वे हे सगळेच मला आपले वाटतात त्यामुळे 'आपला माणूस' या शब्दाने माझा गोंधळ उडाला आहे. आत्ताच माझ्या मित्राला तुमचे प्रतिसाद दाखवले आणि म्हणालो 'काय आचरट असतात रे आपली माणसं ?' यावरुनच काय ते समजून जा. आम्हि रामदास(आठवले न्हवे) पेक्षा बाजी प्रभुंना महत्व देतो मी तर या दोघांपेक्षा तुम्हालाच जास्त महत्व देतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

प्रतिवाद नक्की कुणाला करता येत नाही ते इथे असणार्‍या प्रतिसादां वरुन अगदि स्वच्छ दिसत आहे, इथले प्रतिसादच कशाला हवे इथले अनेक धागेच याची साक्ष देतील. 'मला त्याने मारलं' अशा पद्धतीने रडत रडत उत्तर शोधण्यासाठी संजय सोनवणींचे दरवाजे किंवा ब्लॉग कोण झिजवतं हे एव्हाना सगळ्यांना ठाऊक झालंच आहे.
मला कुणी प्रश्नच विचारले नसताना त्याची उत्तर शोधण्यासाठी संजय सोनवणींचे दरवाजे किंवा ब्लॉग झिजवण्याचे काय प्रयोजन असावे बुवा? उगा मनाचे काहि तरी घुसडवू नका हो, त्यामुळे पुन्हा, प्रतिवाद नक्की कुणाला करता येत नाही ते इथे असणार्‍या प्रतिसादां वरुन अगदि स्वच्छ दिसत आहे, असेच म्हणतो.
बदल करा किंवा करु नका. त्या वाक्यात विनोदी काय आहे असे विचारले होते. त्याचे उत्तर टाळलेत. काहीच कारण नसताना उगाच हसलात त्यामुळे १) तुम्हाला कर्वे किंवा फुले यांपैकी कोणाचीतरी टवाळी करायची आहे किंवा २) तुम्हाला मानसिक उपचारांची गरज आहे असे मानण्यास जागा आहे. पैकी पहिलीच शक्यता मला जास्त वाटते.
मी त्या दोघांमधील असणार्‍या वयाचे अंतर/ त्यांचा कार्य कालखंड स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यात कर्वे किंवा फुले यांपैकी कोणाचीतरी टवाळी कशी काय झाली? यावरुन तुम्हाला १)Post-traumatic stress disorder झाले आहे, २)किंवा तुम्हि बावळट आहात ३)किंवा फारच धुर्त आहात असे मानण्यास जागा आहे. पैकी पहिलीच शक्यता मला जास्त वाटते. कारण तुम्हाला डॉ. काटेस्वामीजी/हिंदु-कोडबिल याबद्दल खास आग्रह करुन विचारले असता त्याकडे तुम्हि पध्दतशीर पणे जाणून बुजून दुर्लक्ष केलेत.(गोची झाली ना,) आणखी बरेच आहेत पण सोयीच्या मुद्द्यांवरच बोलणं हि तुमची (कंपूची) सवय एव्हाना आम्हाला चांगलीच ज्ञात झाली आहे. तुम्हाला Post-traumatic stress disorder झाल्यामुळे तुम्हालाच मानसिक उपचारांची गरज आहे, त्याबद्दल शुभेच्छा, दुसरे तो विनोद आहे असे मी म्हटले नाहि,तसे वक्त्यव्य करणार्‍या सदस्याने फाजील आत्मविश्वास,आणी त्यामुळे केलेले धाडसी विधान आणी याचा परिपाक फजीती मध्ये झाल्याने,आम्हि प्रोत्साहनपर कौतिकाने स्मित केले, हास्य आणी स्मित यात फरक असावा. (तसा फरक माहित नसल्यास zee Tv वरिल हास्य मालीका हास्यसम्राट पहा तिथे हे सगळे प्रकार आहेत खळखळाट ते खसखस ;) ) त्याकाळी म.फुलेंनी जो आश्रम काढला त्यात 'अडचणीत' सापडलेल्या विधवांनी तेथे यावे आणी आपल्या अनौरस मुलांना जन्म द्यावा.त्यांची नावे जाहीर होणार नाहित.जातांना त्यांनी मुल घेऊन जावे किंवा ठेऊन जावे, आश्रमात त्यांच्या मुलांचे संगोपन केले जाईल अशी सोय करण्यात आली होती, यात प्रामुख्याने स्वत:ला उच्चवर्गीय समजणार्‍या वर्गातील विधवांचा समावेश जास्त होता,असे असताना- "ब्राम्हणातील विधवा स्त्रीयांना मात्र कष्टाचे जीणे वाट्याला यायचे. त्या साठी धोंडो केशव कर्वे जन्माला यावे लागले." वरिल वक्त्यव्यावरुन म.फुलेंनी त्या पिडीत स्त्रीयांसाठी काहिच केले नाहि असे प्रतित होत आहे, यातुन म.फुलेंचे अवतार कार्य दुर्लक्षीले जात असल्यामुळे मला तो योग्य खुलासा करावा लागला,
म्हणजे कर्वे जेन्युअन नव्हते असं म्हणायचं आहे का ?
असं मी म्हणालो नाहि, कर्वेंचं कार्य महत्वाचं आहे, असे म्हटले आहे.ते तुम्हि सोईस्करपणे दुर्लक्षीत करत आहात, आपला माणूस याचा अर्थ ब्राह्मण नेहमी आपले श्रेष्टत्व मिरवण्याच्या प्रयत्नात असतात आपल्या माणसाला क्रेडिट देण्याच्या नादात इतरांना नेहमीच डावलतात. त्याचा हा एक पुरावा होता,
डॉ. आबेडकर, म. फुले, म. कर्वे हे सगळेच मला आपले वाटतात त्यामुळे 'आपला माणूस' या शब्दाने माझा गोंधळ उडाला आहे.
तसे आम्हालाहि दादोजी कोंडदेव बद्दल आदर वाटत होता, तो एक स्वामीनिष्ठ कारभारी होता? का सुभेदार,पन्हाळ्याचे किल्लेदार होता? ते जाउद्या पण चौथीच्या पुस्तकात तो गुरु म्हणून सांगण्यात आले आणी आम्हि हि आजवर तेच मानत आलो होतो,पण एका शिक्षकाला किती महत्व द्यायचे याला काहि मर्यादा आहे की नाही,त्यामुळे आमचाहि गोंधळ उडाला आहे, बामणांनी त्याला इतका इतका मोठा केला कि स्वराज्य शिवाजी न्हवे तर कोंडदेवाने मिळविले असे वाटू लागले, यावरुन खरे आचरट कोण ते सुज्ञास सांगणे न लागे :) फुकाचे अभिनिवेश मिरवण्याच्या नादात स्वत:चेच हसे होत आहे,मग पुतळा काढल्या वर जगबुडी झाल्या सारखे कशाला आकांड-तांडव करता? आता आपला तुपलाचा तुमचा गोंधळ निस्तरला असेल असे समजावे का?.
आत्ताच माझ्या मित्राला तुमचे प्रतिसाद दाखवले
एक विचारु का तुमचा मित्र इतिहास तज्ञ आहे का शिवशाहिर आहे? तुम्हि माझे प्रतिसाद कुणाला दाखवावे हा तुमचा प्रश्न आहे त्याने काहि फरक पडत नाहि, ह जर तो आमचे सुध्द लेखन सुधारणार असेल तर स्वागत आहे,
चांगल्या माणसांचा उल्लेख केला हे कोणावर तरी उपकार केले अशा थाटात कशाला सांगायला पाहिजे.
उपकार केले अशा थाटात निदान आम्हि तरी सांगत नाहि जे खरे आहे ते मान्य करण्यात आम्हाला कसलीहि लाज वाटत नाहि आणी कमीपणा तर बिलकूल नाही !
मी तर या दोघांपेक्षा तुम्हालाच जास्त महत्व देतो.
मि मि.पा.वरील प्रत्येक सदस्याला महत्व देतो, त्यांनी मला विचारलेल्या प्रत्येक शंका/प्रश्नाला जमेल असे योग्य ते उत्तर देतो,भले त्यांनी नंतर दुर्लक्ष केले/पळ काढला वा खजील झाले तरी,:)

In reply to by अजातशत्रु

वर अनेक जाणत्या लेखकांनी प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे लेख आणि तुमच्या प्रतिक्रिया भरकटत गेल्या सारख्या वाटत आहेत. आणि अनेक वेळा परस्पर विरोधी विधानं केली आहेत. १) त्यामुळे विरोध,राग ब्राह्मण्याला असू शकतो संपुर्ण जात समुहाला असता कामा नये, -- हे लेखातलं वाक्य. वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे -- बामणांनी त्याला इतका इतका मोठा केला कि स्वराज्य शिवाजी न्हवे तर कोंडदेवाने मिळविले असे वाटू लागले, नक्की काय मत आहे तुमचं ? --> इतका मोठा दादोजींना कोणीही केला नसावा. अगदी तथाकथित ब्राम्हणवादी कोणी असतील तेही असलं मूर्ख पणाचं विधान करणार नाहीत. शिवाय कुठल्याही पुस्तकात दादोजींनी महाराजांना स्वराज्य प्रेरणा दिली असा उल्लेख वाचनात आला नाही . एक स्वामिनिष्ठ कारभारी ज्यांना खुद्द शहाजी राजांनीच नेमलं होतं. राजे लहान असताना मधली वर्ष त्यांनी इथे कारभार पाहिला असावा. त्यांचं काम होतं ते. तेव्हा जे काही आपल्या सरदाराच्या मुलाला मार्ग दर्शन केलं असेल किंवा त्याची योजना केली असेल. यात मान देण्यासारखं पुष्कळ आहे पण त्या पलिकडे त्यांचं महत्त्व सोडा बाकी काही अस्तित्व होतं असंही कोणाला वाटत नसावं. बाकी पुतळा काढला त्याचा वाद - मुद्दा दादोजी नाही तर त्यामागचं राजकारण होतं. २) बाजीप्रभूंनी निदान खिंड तरी लढवली होती -- असली passing statements करून तुमच्या लेखातून जे काही सांगायचा प्रयत्न करत असावात त्याच्या एका फटक्यात उलट दिशेचं मत generalize करताय. ३) एक विचारु का तुमचा मित्र इतिहास तज्ञ आहे का "शिवशाहिर" आहे? तुम्ही लिहिलंय की कुठल्याही ग्रेड मध्ये नसलेला आणि सगळा ब्रिगेडी खोटेपणा - गोबेल्स नीती स्वतःच वापरताय. आणि त्याच त्याच ठराविक बनवलेल्या गोष्टींवर बोट दाखवताय. कदाचित भाग २ मध्ये निसंदिग्धपणे नक्की काय म्हणायचं आहे ते वाचायला मिळेल अशी अपेक्षा.

In reply to by मैत्र

ब्राह्मण्य म्हणजे काय ? आपला माणुस म्हणजे काय हे जोगळेकरांना सांगण्यासाठी ते उदा. द्यावे लागले, आमच्या प्रतिसादातून ते उलट दिशेने generalize होते असे जर वाटत असेल तर काय करणार? प्रत्येकाचा द्रुष्टिकोण वेगळा आहे,
तुम्ही लिहिलंय की कुठल्याही ग्रेड मध्ये नसलेला आणि सगळा ब्रिगेडी खोटेपणा - गोबेल्स नीती स्वतःच वापरताय. आणि त्याच त्याच ठराविक बनवलेल्या गोष्टींवर बोट दाखवताय.
ब्रिगेडी खोटेपणा - गोबेल्स नीती वापरायची आम्हाला गरज वाटत नाहि, ब्रिगेडच्या शिवराळ/द्वेषमुलक भाषेतल्या चळवळीशी काही देणेघेणे नाहि, मी काय लिहिलय ते मला माहित आहे त्या गोष्टि जर ठराविक असतील तर त्या ठराविक गोष्टि निर्माण कुणी केल्या याचाहि विचार व्हावा, त्या कायमच्या खोडता येउ शकतात ना..ते का होत नाहि, कि सत्य स्विकारायला जड जात आहे का?
भाग २ मध्ये निसंदिग्धपणे नक्की काय म्हणायचं आहे ते वाचायला मिळेल अशी अपेक्षा.
जर जातिय वादाचे चष्मे वापरले नाहितर ते निसंदिग्धपणेच वाचता येईल :) खात्री बाळगा

In reply to by अजातशत्रु

आपल्या उत्तरात यांचा उल्लेख झाला आहे म्हणून खाली माझा एक पुर्वीचा प्रतिसाद देत आहे. आज ब्रिगेडचे लोक जे बोंबलत आहेत त्यापेक्षा महाराजांच्या मनात दादोजींबद्दल निश्चितच वेगळ्या आणि आदराच्या भावना होत्या हे यात दिसून येते. पण काय आहे, ज्यांचे प्रमूख खेडेकर आहेत आणि जे ब्राम्हणांना ज्यूंसारखे मारायचे आहे असे जाहीर करतात त्यांच्या मठ्ठ डोक्यात हे सगळे शिरणे अवघड आहे. त्यांची अवस्था ही शेवटी "आईकमन" सारखीच व्हायची. असो. यात बाकी बरीच माहिती आहे म्हणून तो एडीट केलेला नाही व त्यामुळे थोडासा अवांतर झालेला आहे ... त्याबद्दल क्षमस्व ! प्रेषक आम्हाघरीधन दि. मंगळ, 04/01/2011 - 20:58. याना उत्तर - हे बलकावडे तेच ना ज्यांनी पुण्यात २४ एप्रिल २००६ ला मराठा विकास मंचाने आयोजित केलेल्या 'दादोजी कोंडदेव कोण होते?' या खुल्या चर्चा सत्रातुन पळ काढला होता........ त्यावेळी संधी असुनही त्यांनी पळ काढला तेंव्हा त्यांचे म्हणने आज किती मनावर घ्यायचे हे वाचकांनीच ठरवावे.. असो. जयवंत राव आपण चालु ठेवा.... मी स्वत: एकदा संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाला गेलो होतो. कारण एकच होते की त्यांचे काही मुद्दे असले तर ते स्वत: ऐकावेत. पण तेथे गेल्यावर उकिरड्यात भुंकणारी कुत्री बरी अशी भाषा ऐकून माझ्यासारखे अनेक श्रोते त्या सभेतून उठून गेले. नशिबाने त्यात अनेक मराठेही होते. अशा सभेत कोणीही शहाणा, ज्याचा मेंदू शाबूत आहे तो जाणार नाही हेच सत्य आहे. श्री बलकवडे तेथे गेले नाहीत हेच बरोबर आहे. आम्ही उठून जात असताना आमची जी खिल्ली उडवण्यात आली त्यावरून मला वरील उपमा सुचली आहे. यात अतिशोयक्ती काहीही नाही. उत्तर अवतार यांना- दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. प्रेषक अवतार दि. बुध, 05/01/2011 - 01:43. १ यावेळी शहाजी मुघलांच्या नोकरीत होता. तेव्हा हा किल्ला शहाजीच्या जहागिरीत होता असेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. त्या काळी प्रमूख सरदारानी नोकरी बदलली की त्याचा मुलूख आपोआप त्या नवीन मालकाच्या मुलखात सामील व्हायचा. व त्यातला सगळा कर त्या नवीन मालकाला मिळे. हे दोन प्रकारे शक्य होत असे. एक म्हणजे त्या सरदाराने नोकरी बदलली तर किंवा त्याचा पराभव झाला आणि त्या नवीन मालकाने त्याला सरदारकी देऊ केली तर. पुर्वी छोट्या छोट्या सरदारांकदे सुध्दा दादाजी कोंडदेवांसारखी माणसे असायची. दादाजी कोंडदेव अदिलशाहच्या नोकरीत अप्रत्यक्षरित्या होता कारण शहाजी हा अदिलशहाचा नोकर होता आणि दादाजी शहाजीचा. असेच घडून १६३६ च्या शेवटास शहाजी याचा माहूली येथे पराभव होऊन त्याला अदिलशहाच्या नोकरीत जावे लागले. त्यामुळे त्याच्या मुलखातील त्याची सर्व माणसे ही अदिलशहाची अप्रत्यक्ष नोकरीत गेली. १६४१ पर्यंत म्हणजे शिवाजी १२ वर्षाचा असेपर्यंत ते बेंगलोरास होते. या बाबतीत सभासद बखरीत खालील उतारा आहे. “शाहाजीराजे यांसी दौलतेमधे पुणे परगाणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महारांजास भेटीस गेला. त्याबरोबर रा. शिवाजीराजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियांस वर्षे बारा होती. बराबर शामराव नीळकंठ म्ह्णून पेशवे करून दिले व बाळ्कृष्णपंत, नारोपंत दिक्षितांचे चुलत भाऊ, मजमूदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजे यांसी पुण्यास रवाना केले”. ( काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप ....) या वरून हे कळते की त्या वेळेस दादोजी हे शहाजीच्या पदरी होते व शहाजी अदिलशहाच्या. २ १६३६ साली शहाजी राजे अदिलशहाचे सरदार बनले नाही तर त्यांचा माहूली येथे अदिलशहाने पराभव केला व त्यांच्या आश्रयास असलेल्या निजामशहास ग्वाल्हेरला तुरुंगात टाकले. त्यांनी काही जॉब बदलला नाही. आता दादोजींच्या तथाकथित आत्महत्येबद्दल. हा उल्लेख जदूनाथ सरकार यांच्या एका लेखात आली आहे ती कशी आली ते बघुयात. एक्याण्णव कलमी बखरीच्या एका फार्सी अनुवादातून ही नोंद सरकारांनी उचलली आहे. याच बखरीच्या बाकीच्या भाषांतरात याचा उल्लेख नाही. ही बखरच मुळी अत्यंत अविश्वसनीय आहे. कारण यात असाही उल्लेख आहे की दादोजींच्या मृत्यीनंतर शिवाजीने शहाजीराजांची सर्व मालमत्ता व खजीना जप्त केला. परत हा जो उल्लेख (आत्महत्येचा) २४ व्या कलमात आहे असे म्हटले गेले ते कलमच मुळ बखरीत नाही. ( पारसनीस यांची प्रत). दादोजींच्या मृत्यूचा उल्लेख असलेली तीन अस्सल पत्रे खुद्द शिवाजी महाराजांनीच लिहीली आहेत त्यात काय लिहीले आहे ते बघुयात. १ पहिले पत्र १५ ऑक्टोबर १६४७चे आहे. ते त्यांनी पुणे परगण्यातील कर्हेलपठार तरफेच्या कारकुनास पाठवले आहे. त्यात त्यांनी पुर्वी जे इनाम चालू होते तेच चालू ठेवण्यास सांगितले आहे. त्यात असा उल्लेख आहे “ सालमजकुराकारणे मशहुरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यासी देवाज्ञा झाली म्हणऊनू” मशहूर : प्रसिध्द, हजरत : या शब्दाचा अर्थ माधव ज्युलियन यांनी असा दिला आहे “ राजास, पैंगमबरास,अगर श्रेष्ठ व वंद्य पुरूषास या शब्दाने स्वामी या अर्थाने संबोधितात. या वरून शिवाजीमहाराजांच्या मनात या माणसाबद्दल काय भावना होती हे समजते. १ ते राजे नव्हते २ ते पैगंबर नव्हते ३ ते शिवाजी महाराजांना श्रेष्ठ व वंद्य असण्याची शक्यता आहे. पण त्यांना स्वामी या अर्थाने संबोधण्याची शक्यता नाहीच. आता तरी सुध्दा असे संबोधण्याचे धाडस महाराजांनी केले त्या अर्थी ते एक तर त्यांचे गुरू असावेत किंवा प्रमूख सल्लागार असणार. प्रमूख सल्लागाराला गुरूप्रमाणे मान देणे हे महाराजांचे औदार्य आहे. तसे आपल्याला मोरोपंतांच्याही बाबतीत दिसते. ( अर्थात त्यांना हे त्या काळी खेडेकरांसारखे गुरू नव्हते म्हणून शक्य झाले हे आम्हाला मान्य आहे) २ दुसरे पत्र २४ मे १६४७ च्या आसपासचे आहे ते त्यांनी लिहीले आहे पुण्याच्या देशमुखांना पाठवलेले आहे त्यात सुध्दा त्यांनी एका मशिदीचे इनाम तसेच चालू ठेवायला सांगितले आहे. त्यात पण त्यांनी दादोजींचा असाच आदरपुर्वक उल्लेख केलेला आहे. ३ तिसरे महादजीभटाच्या तक्रारी विषयी पुण्याच्या देशमुखांना लिहीतांना त्यांनी म्हटले आहे “हाली मशहूरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यास देवाज्ञा जाली म्हणोन” इ.... जर शिवाजी महाराजांच्या उद्योगाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असती तर त्यांचा उल्लेख असा करायची शिवाजी महाराजांना गरज नव्हती हे मला वाटते मान्य असावे. कृपया जेधे शकावलीत व तारीख-इ-शिवाजी यात हे कोठे लिहीले आहे हे सांगावे. तारीख-इ-शिवाजी म्हणजे मुसलमानांनी केलेले एक्याण्णव कलमी बखरीचे फार्सी भाषांतर. त्यात अनेक त्यांच्या फायद्याच्या गोष्टी घुसडलेल्या ! ज्याचे केले त्याचे खरे नाव आहे “ तफ्सील अहवाल अरूज व खुरज राजाहाये व सरदारान दखन” याचा अर्थ दखनच्या राजांचा व सरदारांच्या उत्कर्षाचा व विद्रोहाचा इतिहास” हे सगळे मुळीच विश्वासार्ह नाही. यदुनाथ सरकारांना मराठी, मोडी, अजिबात येते नव्हते हे जगजाहीर आहे. त्यांनी लिहीले ते सगळे ग्रॅंट डफ आणि फार्सी साधनांवरून. त्यावर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. हे म्हणजे नेहरुंनी शिवाजीला चोर आणि लुटेरा म्हटले त्यावर विश्वास ठेवण्यासारखे झाले. खरे तर ते १६४१ पर्यंत बेगलोरला होते. शिवभारतात शिवाजी बेंगलोरास सात वर्षाचा झाला असा उल्लेख आहे. आता हे गोमाजी नाईक पानसंबळ कोण होते हे बघूयात. जिजाबाईंचे लग्न जेव्हा शहाजी महाराजांशी झाले तेव्हा जाधवांनी एका नोकर माणसास जिजाऊंबरोबर दिले. त्याचे नाव होते “ गोमाजी नाईक पानसंबळ जामदार” याचा उल्लेख महाराजांनी अफजलखानाच्या स्वारीत बैठकीच्या वेळी जे हजर होते ( सल्लामसलतीची) त्या लोकांच्यात आहे. जामादार/जामदार म्हणजे कपडे/दागदागिने संभाळणारा. हा एक गडी जाधवांनी जिजाऊंबरोबर दिला होता. जाधवांचे आणि भोसल्यांचे संबंध पहाता शिवाजीला शिकवण्यासाठी जाधव एखादा माणूस देतील आणि भोसले तो त्या कामासाठी स्विकारतील हे असंभवनीय. शिवाय एक पत्रात शिवाजी महाराजांनी या नाईकांना समज दिली असाही उल्लेख आहे तो असा. महाराजांनी हे पत्र मावळच्या देशाअधिकार्याठस पाठवले आहे. पाषाण, तर्फ कर्यात मावल, येथील पाटीलकी गोविंदराव शितोळे, देशमूख, परगणा पुणे यांची आहे. वाडी करंदी येथील कुणबी रणपिसे हा आपल्याला निराळा मजरा करून दिला आहे म्हणून भांडण करतो. तुम्ही त्याच्या सांगण्यावरून शितोळ्यांशी भांडण करता असे त्यांनी आमच्याकडे येऊन विदीत केले आहे. तरी नसती पाटीलकीची नवी भांडणे करावयाची तुला काय गरज आहे ? आम्ही लहानपणापासून या मुलखात आहोत. मिरासदार कोण व गैरमिरासदार कोण हे आम्ही चांगलेच जाणतो आणि माणसाचे माणूस ओळखतो. तू नवा सुभा करायला आला आहेस. तुला हे काही ठाऊक नाही आणि उगाच एकाच्या सांगण्यावरून दुसर्‍याशी भांडण करतोस. हे तुला करायला कोणी सांगितले आहे ? यापुढे नसती मिरासदारांची नवी भांडणे करशील तर आपले केलेले पावशील हे समजून शितोळ्यांशी भांडणे न करावीत. पूर्वी मातुश्री आऊसाहेबांनी करंदी हा वेगळा मजरा करायला सांगितले होते, त्यावेळी आम्ही ते मानले नाही. त्यानंतर गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शितोळ्यांशी तंटा केला. ते वर्तमान आम्हाला समजल्यावर आम्ही त्यांस ताकीद केली. आत्तापर्यंत सुरळीत चालू आहे. त्याप्रमाणे आत्ताही शितोळ्यांची पाटीलकी सुरळीत चालवणे. वाडी करंदीचा मजरा केलेला नाही. मातुश्री आऊसाहेबांचे अगर दुसर्‍या कुणाचे पत्र तंट्यामुळे त्याने ( रणपिशाने) नेले असेल त्यावर जाऊ नये. शितोळ्यांशी काही भांडण केलेस तर आम्हाला बोल नाही. ताकिद होईल. जाणिजे.” या पत्रात या गोमाजींना ताकीद दिली असा स्पष्ट उल्लेख आहे. गुरूजींना ताकीद देण्याइतके महाराज उध्दट असावेत किंवा हा त्यांचा गुरू नसावा. दुसर्‍याची शक्यता जास्त वाटते. तसेच हेही लक्षात घेतले पाहिजे की महाराजांनी साक्षात स्वत:च्या आईचे म्हणणे ऐकले नाही व न्याय दिला. त्यात त्यांच्या माहेरचा माणसाने शितोळ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला असताना सुध्दा. पण इतिहासात अशा अनेक नोंदी (जवळ जवळ सगळ्या निकालाबाबत) आहेत की महाराजांनी स्पष्टच सांगितले आहे की दादोजींनी दिलेला निर्णयच पुढे चालवावा. १ १६२९ साली लखूजी जाधवाचा विजापूर दरबारात खून झाल्यावर शहाजी महाराज पुण्यात येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी हा मुकासा कधीही हातचा जाऊ दिला नाही. त्यांना इकडून तिकडे नोकरदारी केली पण हा मुकासा सोडला नाही. त्यांच्या अनेक पत्रात दादाजींचा उल्लेख मायन्यात असा केलेला आढळतो “राजश्री दादाजी कोनदेऊ शुभेदार किले कोंडाणा व परगणा पुणा व माहालानिहाये” दादोजी हा शहाजीने नेमलेला एका किल्ल्याचा सुभेदार होता. अदिलशाहीत व मुघलांच्या दरबारात सुभेदार हे पद फार मोठे होते व सहसा त्यांच्या नातेवाईकातच दिले जायचे. खुद्द शहाजी महाराज सुध्दा कधी सुभेदार झाले असावेत की नाही ही शंकाच आहे. कारण त्यांचा तसा उल्लेख कुठेही नाही. पण ज्या प्रमाणे इंग्लीश सिनेमाची कॉपी हिंदीमधे व हिंदीची मराठीमधे त्या प्रमाणे छोट्या छोट्या परगण्यातसुध्दा पेशवे, सबनीस, सुभेदार असायचे..... अर्थात दादोजींच्या परगण्यातून शहाजीला अदिलशहाला कर द्यावा लागत असणारच तो दादोंजी मार्फतच देत असणार. तो जर अदिलशाचा सुभेदार असता तर त्याला शहाजीच्या आज्ञा पाळायची काही गरज नव्हती. पण तो शहाजीच्या, जिजाऊंच्या व शिवाजीच्या आज्ञा पाळताना दिसतोय. तो नि:संशय शहाजीचाचा सरदार/नोकर होता. दुसरे म्हणजे सर्व कागदपत्रात दादोजींचा उल्लेख हा शहाजींच्या वतनासंबंधीतच येतो. तसे नसते तर इतरही परगण्याबाबत उल्लेख सापडले असते. पहिल्यापासून दादोजी हे शहाजीचे व शिवाजीचे एकनिष्ठ बुध्दिमान सेवक होते. शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्‍याला यासाठी वेळच नव्हता. तुमच्या घरातली वरीष्ठ मंडळी जेव्हा कौतुकाने तुमच्याबद्दल “ हा सारखा बंदूक बंदूक खेळत असतो” अशी तक्रार करतात तेव्हा त्यांना तुम्ही पुढे अतिरेकी देशद्रोही होणार असे म्हणायचे असते का ? इतिहासात अनेक घटनांची तर्कशुध्द संग्ती लावायची असते. ती करताना प्रत्येक गोष्टीचा काटेकोर पुरावा असतोच असे नाही. नाहीतर फालतू व चक्रम प्रश्नही विचारता येतात. हे काही सापडले नाही. कृपया लेख स्कॅन करून द्या, म्हणजे आभ्यास करता येईल. पण दादोजींच्या हाताचा एक उल्लेख एका दंतकथेत आहे. तो असा. ती त्या एक्याण्णव कलमी बखरीतील आहे म्हणून दंतकथा. “दादोजीने शिवापूर येथे शहाजीच्या नावाने एक आमराई लावली होती. त्यातला एक आंबा त्याने तोडला. ही आपली चूक असे समजून तो आपला हात कापायला निघाला. लोकांनी त्याला त्यापासून प्रवृत्त केले. त्याची आठ्वण म्हणून त्याने त्याच्या अंगरख्याची एक बाही लांडी केली. ही हकिकत समजल्यावर शहाजीने समजूत काढण्यासाठी त्याला मानाची वस्त्रे पाठवली व त्यानंतर दादोजीने लांडी बाही वापरायचे सोडून दिले.” इ..... शाहू महाराजांनी पण असा उल्लेख केलेला आढळतो “ मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला परंतू त्याने केलेले निवाडे औंरंगजेब बादशहास वंद्य झाहले” हे उदगार शाहू महाराजांनी काढले असे पत्र बाजीरावाचा शाहूमहाराजांच्या दरबारातील प्रतिनिधी पुरंदरे याने बाजीरावास पाठवले आहे..... अजून काय लिहावे ......................... या पार्श्वभुमीवर संभाजी ब्रिगेड्चे प्रवक्ते यांनी टि.व्ही.वर एका मुलाखतीत "एक उल्लेख सोडला तर हे पुस्तक उत्कृष्ट आहे" असा उदगार काढले त्याला काय म्हणावे ? आणि यासाठी इतिहास बदलायला निघालेल्यांना कुठली विकृती आहे.... हे आपल्याला समजले असेलच. या विकृतीचे नाव आहे xxर..... महाराज आत्ता असते तर त्यांनी दादोजींच्या बदनामी केल्याच्या गुन्ह्यासाठी लेन आणि ब्रिगेडच्या शूरविरांचा चौरंग करायची शिक्षा दिली असती हे निश्चित...... चौरंग म्हणजे हातपाय तोडण्याची शिक्षा !

In reply to by जयंत कुलकर्णी

हि फॅशन आता जुनी झाली हो :) असो... तुम्हि हे कॉपी पेस्ट केलेले आहे असे तुम्हि सांगत आहात आणी ते तुमच्या मालकीचे आहे असा उल्लेख केलात तुमचे असो वा नसो मुद्दा उपस्थित केलात त्यास आम्ही प्रतिसाद देत आहोत हे यासाठी कि काहि लोक कॉपीपेस्ट मुद्द्यांचे आम्हि खंडण करत नसतो असे म्हणून चर्चेतुन पळ काढतात, आम्हि ते रणछोडदास नाहि,
शाहू महाराजांनी पण असा उल्लेख केलेला आढळतो “ मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला परंतू त्याने केलेले निवाडे औंरंगजेब बादशहास वंद्य झाहले” हे उदगार शाहू महाराजांनी काढले असे पत्र बाजीरावाचा शाहूमहाराजांच्या दरबारातील प्रतिनिधी पुरंदरे याने बाजीरावास पाठवले आहे..... अजून काय लिहावे
या तथाकथीत उल्लेखपत्राची तारीख,साल उपलब्ध नाहि, असल्यास तसे सादर करावे, यावरून हे पत्र नंतर घुसडवल्या गेले आहे तथा उल्लेख बनावट आहे हेच सिद्ध होत आहे. तुम्हाला असे काहिही लिहिण्याचा अधिकार आहे, लगे रहो..;) मुळात आम्हि मागेहि हेच म्हटले आहे की,आम्हालाहि दादोजी कोंडदेव बद्दल आदर आहे, तो एक स्वामीनिष्ठ कारभारी असेलहि, बालपणा पासून चौथीच्या पुस्तकात तो गुरु म्हणून सांगण्यात/बिंबवण्यात आले आणी आम्हि हि आजवर तेच मानत आलो होतो,आणी तो ब्राह्मण आहे हे हि आम्हाला अलीकडेच माहित झाले तुमच्या सारख्यांची क्रुपा, पण एका शिक्षकाला किती महत्व द्यायचे याला काहि मर्यादा आहे की नाही,त्याला नको तिथे उभे करुन काय साध्य करायचे आहे???? बर जिथे पुतळा उभा होता ती जागा योग्य होती का? ते एकदा स्पष्ट करा,
या विकृतीचे नाव आहे xxर.....
म्हणजे नक्की कोणती विकृती आहे हे जाणून घ्यायला आवडेल, ईथे जमत नसेल तर व्यनी करा.
महाराज आत्ता असते तर त्यांनी दादोजींच्या बदनामी केल्याच्या गुन्ह्यासाठी लेन आणि ब्रिगेडच्या शूरविरांचा चौरंग करायची शिक्षा दिली असती हे निश्चित
महाराज आत्ता असते तर फकस्त लेनचाच चौरंग केला असता काय? :o म्हणजे ज्यांनी माहीती पुरवली त्यांना सत्कार करुन जहागीरि दिली असती हो ना.. :)

In reply to by अजातशत्रु

सध्या कुठली फॅशन चालू आहे ते कृपया कळवावे. आणि कृपा करून फालतू स्माईली टाकू नयेत. पुढचा परिच्छेदात काही अर्थ नाही म्हणून त्याला उत्तर देत नाही. हे आम्हीच लिहीले आहे त्याबद्द्ल शंका नसावी. हे जे पत्र आहे ते पेशवे द्प्तरातेले निवडलेले कागद, खंड १७, क्र. ५२ वे पत्र आहे. या पत्रावर तारीख नाही. जुन्या काळातील अनेक पत्रांवर तारखा नाहीत म्हणजे ती पत्रे अस्सल नाहीत असे मानले तर काय गोंधळ उडेल हे आपल्या सारख्या विद्वानास सांगणे नको. हे पत्र "राजश्री राऊ व तथा राजश्री अपा स्वामी यांना म्हणजे थोरले बाजीराव व त्यांचा भाऊ चिमणाजी यांना पाठवलेले आहे. ते पाठवले बाजीरावाचा शाहूच्या दरबारातील प्रतिनिधी महादजी अंबाजी पुरंदरे याने पाठवले आहे. मुळ दप्तरही पहायला मिळेल अर्थात आपल्याला मोडी येत असेल तर. तो पर्यंत आपल्याला मराठीतील भाषांतरावरच विश्वास ठेवावा लागेल. असो. हे पत्र फालतू आहे असे आपण म्हणूही शकता. उरलेल्या शिवाजी महाराजांच्या पत्रांच्या तारखा देतो....का तिही बनावट व मागून घुसडलेली आहेत ? मला वाटते शिवाजी हे पात्रही ब्राह्मणांनी इतिहासात घुसडलेले आहे असे आपण म्हणण्यास कमी करणार नाही. कारण आपल्याला इतिहासाशी काही घेणे देणे नसून आपला अजेंडा वेगळाच आहे. यात पडायला नको होते पण आपले म्हणणे अनुत्तरीत राहू नये म्हणून हा उद्योग करावा लागला. पहिले - २६ रमजान, शुहूर सन १०४८ म्हण्जे १५ ऑक्टोबर १६४७. दुसरे - शुहूर सन १०४८. तिसरे - १७ शव्वाल, शुहूर सन १०४८ म्हणजे ५ नोव्हेंबर १६४७. या तिन्हही पत्रात महाराजांनी दादोजींचा उल्लेख अत्यंत आदराने केला आहे. पत्रही देऊ का ? उरला प्रश्न आमच्या अधिकाराचा. तर्कशास्त्र वापरून, सुसंगत आणि प्रामाणिकपणे लिहायचा अधिकार सगळ्यांनाच आहे. आपल्यालाही आहे असे आम्ही मानतो.
बालपणा पासून चौथीच्या पुस्तकात तो गुरु म्हणून सांगण्यात/बिंबवण्यात आले आणी आम्हि हि आजवर तेच मानत आलो होतो,आणी तो ब्राह्मण आहे हे हि आम्हाला अलीकडेच माहित झाले तुमच्या सारख्यांची क्रुपा, पण एका शिक्षकाला किती महत्व द्यायचे याला काहि मर्यादा आहे की नाही,त्याला नको तिथे उभे करुन काय साध्य करायचे आहे???? हा नियम लावायचा तर बाकिच्यांचे तरी तेथे आणि इतर ठिकाणी महाराजांबरोबर काय काम ? फक्त शिवाजीमहाराजांचाच पुतळा उभारला पाहिजे. गांधीजींचे पुतळे कुठे त्यांच्या अनुयायांबरोबर असतात ? बिचार्‍या महाराजांना एकटे पाडायचा हा कुटील डाव दिसतो. या विकृतीचे नाव समजणे फार सोपे आहे. हे मोठे राजकारणी आहेत आणि ब्रिगेडच्या लोकांना त्यांचा छूपा पाठिंबा आहे. काहीतरी करून बेकारांची सेना पोसायची आणि त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्यायचा हेच यांचे काम आहे. पण हे किती दिवस चालेल ? तेही लोक शहाणे होतीलच. ते नाहीतर त्यांची मुले शहाणी होतील. महाराजांनी लेनचा व ब्रिगेडचा चौरंग केला असता याचे कारण जगजाहीर आहे. समजा अगदी असे समजूयात की ही ज्या माहितीबद्दल आपण बोलता आहात त्यांची नावे त्यांना खेडेकर साहेबांनी दिली असती (आणि ती खरी निघाली असती तर) तर त्यांनी त्याची शहानिशा करून फक्त त्यांनाच फाशी दिले असते. पिसाळ देशद्रोही निघाला म्हणून सगळ्या पवारांना, घोरपड्यांना, मोर्‍यांना ठार मारा असा आदेश त्यांनी निश्चितच काढला नसता. अजून कसल्या तारखा पाहिजे असल्यास कळिवणे. पुरवण्यात येतील....

In reply to by जयंत कुलकर्णी

सध्या कुठली फॅशन चालू आहे ते कृपया कळवावे.
सध्या दंतकथा/भाकडकथा रेटून सांगण्याची फॅशन चालू आहे, आणी एक गंमत, काय असते आपल्या लोकांना पाश्चिमात्य/मुस्लिम (बखर) किंवा इतर लोकांनी काहिहि लिहिले,जरी ते सत्य असले तरी स्विकारण्यास जड जाते किंबहुना ते स्विकारले जातच नाहि, (असत्य असेल तर मानूहि नये) असो
एक्याण्णव कलमी बखरीच्या एका फार्सी अनुवादातून ही नोंद सरकारांनी उचलली आहे. याच बखरीच्या बाकीच्या भाषांतरात याचा उल्लेख नाही. ही बखरच मुळी अत्यंत अविश्वसनीय आहे
फायद्याच असलेलं सगळं कधिही विश्वसनीय असतं, अगदि काहिहि.
१६४१ पर्यंत म्हणजे शिवाजी १२ वर्षाचा असेपर्यंत ते बेंगलोरास होते. या बाबतीत सभासद बखरीत खालील उतारा आहे. “शाहाजीराजे यांसी दौलतेमधे पुणे परगाणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महारांजास भेटीस गेला. त्याबरोबर रा. शिवाजीराजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियांस वर्षे बारा होती. बराबर शामराव नीळकंठ म्ह्णून पेशवे करून दिले व बाळ्कृष्णपंत, नारोपंत दिक्षितांचे चुलत भाऊ, मजमूदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजे यांसी पुण्यास रवाना केले”. ( काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप ....) या वरून हे कळते की त्या वेळेस दादोजी हे शहाजीच्या पदरी होते व शहाजी अदिलशहाच्या.
दादोजी कोंडदेव पुण्यातून कर्नाटकात भरणा भरायला १६३९-१६४० च्या दरम्यान आले..तेव्हा शिवाजी महाराज ९-१० वर्षाचे होते..तसा दाखला दादोजिच्याच पत्रा वरून मिळतो, दादोजी इ.स. १६४१-४२ मध्ये मावळातच होते,आणि यातील दुसरा विरोधाभास म्हणजे शहाजी महाराजांकडे बंगरूळ सुभा इ.स. १६४४ नंतर आला. अशा विपर्यस्त मजकुराने बखरीतील नंतरच्या लिखाणातून काल्पनिक चित्रांचा का व कसा उठाव झाला याचा उलगडा होण्यास अभ्यासकांना कठीण पडणार नाही.यावरून हे नंतर पेशवे काळात घुसडवल्या गेले आहे हेच सिद्ध होत आहे, त्यामुळे असे पवाडा गायल्या सारखे, "काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप" असे म्हणल्याने सत्यात बदल होणार नाहि, तसेच शिवाजीमहाराजांच्या समकालीन बखरीत रामदासांचा कुठेच उल्लेख नाही. पेशवे कालिन बखरित तो घुसडण्यात आला असे दिसते मग खरे काय मानावे, म्हणजे हे उदात्तीकरण पेशवे कालात झाले असावे असे म्हणता येउ शकते,,
शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्‍याला यासाठी वेळच नव्हता.
१६४२ साली शहाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीतील कारस्थाने वाढली होती,रन्दुल्लाखान मेल्यावर त्याचा मुलगा कमकर्तुत्ववान निघाल्याने अफजल खानाला त्याची जहागीर मिळाली, व त्याने बाजी घोरपड्या सारखे सरदार गोळा करून शहाजीमहाराजांविरुद्ध कारस्थान रचले त्या नुसार.. आदिलशाहने शहाजीमहाराजांचा बराच प्रदेश त्यांच्या कडून काढून घेतला,आणी त्यांचे भाऊबंद बाजी घोरपड्यास दिला,हे सर्व बघून आदिलशाहीतील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र शिजतेय हे जाणून शहाजीमहाराजांनी शिवाजी आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला,त्या सोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो अश्या आशयाचे बोलणे त्यांनी आदिलशाहशी लावून ठेवले होते,१६४२ च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का, झेंड्या सोबत पेशवे, मुजुमदार, सबनीस, व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले, ह्या मूळे शहाजीराजा मोघालांशी संधान साधतोय कि काय, अशी भीती आदिलाशाहाला झाली त्यामूळे आदिलशाहने शहाजीशी चाललेल्या वादावर पडदा टाकत,काढून घेतलेल्या जहागिरी पेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला. १६४४ साली आदिलशाहने शहाजीराज्यांची आधीच्या (काढून घेतलेल्या ) ४ लक्ष जहागिरी ऐवजी ५ लाखाचा सुभा बंगलोर दिला...व तिकडे रवाना केले.अर्थात शहाजीराजांन सारख्या प्रबळ सरदाराचे मोघलांकडे जाने योग्य नाही ह्या भीतीने शहाजीराज्यांशी आदिलशाहने जुळवून घेतले, व इकडे मोघालांशी संधान साधायला नको म्हणून तिकडे कर्नाटकात बंगरूळला रवाना केले, इथे शिवाजीमहाराजांना पुणे प्रांती पाठवून शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजीराज्याकडून त्या प्रकारची बंडयुक्त कार्य करण्याचे आदेशहि पाठवले होते. यावरुन तुम्हि इथे काहिही धुम धडाक्यात ठोकुन देता हे सिध्द होत नाहि का? "शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्‍याला यासाठी वेळच नव्हता," या उपर तुम्हि शहाजीराजांना "बिचारे" म्हणत आहात ते वाक्य कशासाठी हे स्पष्ट करता येईल काय. ते आदिलाशहाच्या चाकरित असले तरी ते एक सुभेदार/जहारगीरदार होते,तसा वर उल्लेख आलाच आहे शहाजी राजांन सारख्या प्रबळ सरदाराचे मोघलांकडे जाने योग्य नाही ह्या भीतीने शहाजी राज्यांशी आदिलशाहने जुळवून घ्यावे लागले,शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला नाहि आणी त्यांना बिचारे संबोधणे कोत्याबुध्दि चे लक्षण वाटते त्यांना स्वतःचे स्वराज्य व्हावे वा ते आपल्या मुलाने मिळवावे असे वाटणे स्वाभाविक आहे,त्यांनी राजांना जमेल तशी मदत केलीच असणार, वडील बाहेरगावी कामाला असले म्हणजे ते त्याकडे दुर्लक्ष करतात?आपला मुलगा काय करतो,त्याच्या करीअरच काय या चिंता प्रत्येक बापाला असतात त्यास जमेल ते सहकार्य ते करणारच,मग तसा प्रयत्न शाहाजि राजांनी करु कि शिवाजी शेवटी स्वराज्या चे तोरण आपल्याच दारी लागणार ना. साधा कॉमनसेन्स आहे यात तुम्हि कसले तर्कशास्त्र वापरले कळायला मार्ग नाही,असली धाडसी विधाने तुम्हिच करु जाणो तुम्हि कुठल्याहि जगात वावरत असाल तिथेच रहा, उगा आणखि धुम धडाका नको,
पुढचा परिच्छेदात काही अर्थ नाही म्हणून त्याला उत्तर देत नाही.
कोणत्या परिच्छेदाने गैरसोय झाली म्हनायची,प्रतीवाद करता येत नसेल तर पळवाट योग्यच,
शाहू महाराजांनी पण असा उल्लेख केलेला आढळतो “ मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला परंतू त्याने केलेले निवाडे औंरंगजेब बादशहास वंद्य झाहले” हे उदगार शाहू महाराजांनी काढले असे पत्र बाजीरावाचा शाहूमहाराजांच्या दरबारातील प्रतिनिधी पुरंदरे याने बाजीरावास पाठवले आहे..... अजून काय लिहावे
सिलींबकर देशमुख प्रकरण -१६३८ साली सिलींबकर देशमुख घराण्यात वारसा हक्का बद्दल मलिक अंबरच्या आधीपासून भांडणे व खुणाखुनी चालू होती. १६३८ ला दादाजी कोंडदेव यांनी सिलींबकरांच्या बाजूने न्याय निवडा केला होता.परंतु दुसर्‍या एका करीन्यातील संदर्भानुसार,तसेच दादाजी कोंडदेव ह्यांचा निकाल शिवाजी महाराजांनी १६५७ ला फिरवला ह्या दोन्ही संदर्भावरून दादाजींनी चुकीचा न्याय निवडा केला होता असे आढळून येते.
हा नियम लावायचा तर बाकिच्यांचे तरी तेथे आणि इतर ठिकाणी महाराजांबरोबर काय काम ? फक्त शिवाजीमहाराजांचाच पुतळा उभारला पाहिजे. गांधीजींचे पुतळे कुठे त्यांच्या अनुयायांबरोबर असतात ? बिचार्‍या महाराजांना एकटे पाडायचा हा कुटील डाव दिसतो
हा नियम लावायचा तर बाकिच्यांचे तरी तेथे आणि इतर ठिकाणी महाराजांबरोबर काय काम हे बाकिचे कोण असतात कृपया थोडे स्पष्ट कराल काय??? गांधीजींचे पुतळे कुठे त्यांच्या अनुयायांबरोबर असतात, (म्हणजे गांधीजी सदोदित एकटेच असतात,ठिक बिचार्‍या महाराजांना एकटे पाडायचा हा कुटील डाव दिसतो (ह.ह.पु.वा.) इथे परत बिचारे हे अस दया कणव आल्या सारखं का बरे बोलत आहात? तुम्हि सम्राट आहात का? नाहि साक्षात महाराजांना तुम्हि बिचारे बिचारे म्हणत आहात, आणी महाराज एकटे पणाला घाबरत असावेत काय? म्हणून दादोजिला सोबतीला ठेवत असावेत? यात कसला आलाय कुटिल डाव असली बाळबोध विधाने करुन मनोरंजन करुन घेउ नका, बाकि ढोबळमनाने जर गांधीजी - अहिंसावादी आणी महाराज हिंसावादी( स्वराज्य उपवास करुन नाहि मिळाले लढावे लागले) अशी २ विरुध्द असलेल्या महापुरुषांची तुलना योग्य वाटत नाहि, हो ना हो जोगळेकर. त्या बद्दल ते आता सुभेच्छा गुच्छ पाठवतील तातडिने,
या विकृतीचे नाव आहे xxर....
याचे मोघाम उत्तर दिलेत,आणी ते काय होते हे तुम्हि खरे सांगणार नाहित खात्री होती.
पण एका शिक्षकाला किती महत्व द्यायचे याला काहि मर्यादा आहे की नाही,त्याला नको तिथे उभे करुन काय साध्य करायचे आहे???? बर जिथे पुतळा उभा होता ती जागा योग्य होती का? ते एकदा स्पष्ट करा
गैरसोय+बगल = पळवाट. ठिकच
महाराजांनी लेनचा व ब्रिगेडचा चौरंग केला असता याचे कारण जगजाहीर आहे. समजा अगदी असे समजूयात की ही ज्या माहितीबद्दल आपण बोलता आहात त्यांची नावे त्यांना खेडेकर साहेबांनी दिली असती (आणि ती खरी निघाली असती तर) तर त्यांनी त्याची शहानिशा करून फक्त त्यांनाच फाशी दिले असते. पिसाळ देशद्रोही निघाला म्हणून सगळ्या पवारांना, घोरपड्यांना, मोर्‍यांना ठार मारा असा आदेश त्यांनी निश्चितच काढला नसता.
महाराजांनी लेनचा व ब्रिगेडचा चौरंग केला असता याचे कारण जगजाहीर आहे ठिक पण मग "ती" माहिती पुरवली कुणी?आणि ती खरी निघाली असती तर तर त्यांनी त्याची शहानिशा करून फक्त त्यांनाच फाशी दिले असते. माहिती पुरवली कुणी ते तुम्हाला माहिती असेलच.बखरींचा अभ्यास करणार्‍यांना अलीकडील गोष्टी माहित असायलाच हव्यात कृपया ती प्रामाणिकपणे इथे जाहिर करावि हि नम्र विनंती.
मोठे राजकारणी आहेत आणि ब्रिगेडच्या लोकांना त्यांचा छूपा पाठिंबा आहे. काहीतरी करून बेकारांची सेना पोसायची आणि त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्यायचा हेच यांचे काम आहे. पण हे किती दिवस चालेल ? तेही लोक शहाणे होतीलच. ते नाहीतर त्यांची मुले शहाणी होतील
चालायचच, आजवर इतरांनी केले ते आता हे करतायत,फरक फक्त नाव आणी धर्म/जात बदलली, इतीहासाची पुनराव्रुत्ती होत असते असे म्हणतात असच काहितरी,कधी कोण सुपात तर कधी कोण जात्यात
उरला प्रश्न आमच्या अधिकाराचा. तर्कशास्त्र वापरून, सुसंगत आणि प्रामाणिकपणे लिहायचा अधिकार सगळ्यांनाच आहे. आपल्यालाही आहे असे आम्ही मानतो.
सहमती...लिहायचा/आपले म्हणने मांडण्याचा अधिकार सगळ्यांनाच,
अजून कसल्या तारखा पाहिजे असल्यास कळिवणे. पुरवण्यात येतील....
सध्या.इतक पुरवलत तेच खुप आहे ! >>अजून काय लिहावे= काहिही लिहा हो पण तुम्हि म्हणता तसे तर्कशास्त्र वापरून, सुसंगत आणि प्रामाणिकपणे, माझं म्हणंन इतकच आहे की एका शिक्षकाला किती महत्व द्यायचे याला काहि मर्यादा आहे की नाही,त्याला नको तिथे उभे करुन काय साध्य करायचे आहे???? बर जिथे पुतळा उभा होता ती जागा योग्य होती का? ते एकदा स्पष्ट करा. संदर्भ ग्रंथ - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध) लेखक - वा.सी. बेंद्रे. १९७२ अवांतर:आजच झी २४ तास वर त्यावर चर्चा पाहिली चर्चा अर्धवट स्वरुपातच झाली,सदर चर्चेत श्री.कोकाटे,आर.पि.आय. नेत्या सुलेखा कुंभांरे,श्री.रामटेके, (तेच ते ब्लॉगवाले) श्री.कुलकर्णी जेष्ट पत्रकार(बहुतेक हे ही ब्लॉगवर असतात )सहभागी होते आणी चर्चेचा सुत्र संचालन श्री.मंदार परब करत होते, सुलेखा कुंभांरे यांनी या बाबत आर.आर. पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगुन त्यावर बंदि घालण्यात यावी अन्यथा आंदोलन करु अशी भुमीका घेतली आहे,श्री.कुलकर्णी/ रामटेके यांनी सुध्दा तीच भुमिका घेतली,उत्तरे देताना सुरुवातीला कोकाटेंना हे पुस्तक वाचले का असे विचारल्यावर त्यांनी नाहि असे उत्तर दिले,व त्यात काहि आक्षेपार्ह असल्यास ते वगळू असे आश्वासन दिले(राजकारण्या सारखे) पण सुत्र संचालक श्री.मंदार परब यांना योग्य ठिकाणी त्यांना ट्रॅप करता आले नाहि, तसेच अभ्यास नसल्यामुळे ते ही काहि बाहीच बोलत होते,कहर म्हणजे त्यांनी कोकाटेना त्यांची भुमिका मांडण्यासाठी वेळच दिला नाहि नको तिथे ब्रेक घेत बसले,मग चर्चा करायला बोलावता तरी कशाला, त्यातुन कोकाटेंची/त्यांच्या संघटनेची मानसीकता आणी पुढच्या काहि गोष्टी/मुद्दे तरी कळले असते, असो आता वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढने आंदोलन होणार आहे म्हणे, डेडलाईन दिली आहे अवघड आहे देशाच......!

In reply to by अजातशत्रु

सुंदर उत्तर दिले आहेत आपण. सध्या आपण म्हणता त्या फॅशन्चे जनक आपणच आहात असे दिसते. बाकीचा फाफट पसारा देण्यापेक्षा मी जे केशरी अक्षरात दिले आहे त्याबद्दल लिहीले असते तर हे सगळे फाल्तू लिहीण्यात आपला वेळ गेला नसता. असो. पोर्तूगीजांच्या बखरींवर विश्वास आपण ठेवायला सांगता आहात का ? का दिल्लिश्वरांच्या ? बघा, फार कठीण जाईल आपल्याला ते.... आपण मांडलेल्या खोट्या इतिहासाबद्दल येथेच काही दिवसानी उत्तर दिले जाईल. सध्या गावाबाहेर जात असल्यामुळे आज देता येत नाही. नाहीतर जाऊ देत, मी या चर्चेतून माघार घेत आहे कारण काय आहे, इतिहास, इतिहासाची साधने, खरे खोटे, मागाऊन घुसडलेले, व अस्सल काय याचा आपला अभ्यास असणे शक्य नाही कारण त्यात २०/२५ वर्षे घालवावी लागतात. ते आपण केले आहे असे आम्हाला आपल्या लिखाणावरून वाटत नाही. त्यामुळे आपल्याशी चर्चा करावी किंवा वाद घालावा अशी आमची पात्रता नाही. आपण आपल्या या बदनामीच्या स्वप्नरंजनात मशगूल रहा. दुनिया पुढे जाईल व आपण येथेच रहाल. आपले व खेडेकरांचे नशीब. अजून काय बोलणार ? देव तुम्हाला सुबूद्धी देवो ! ( हे अत्यंत प्रामाणिक्पणे लिहीले आहे. यात कुठलाही उपरोध नाही हे कृपया लक्षात घ्या)

In reply to by जयंत कुलकर्णी

सध्या कुठली फॅशन चालू आहे ते कृपया कळवावे.
सध्या दंतकथा/भाकडकथा रेटून सांगण्याची फॅशन चालू आहे, आणी एक गंमत, काय असते आपल्या लोकांना पाश्चिमात्य/मुस्लिम (बखर) किंवा इतर लोकांनी काहिहि लिहिले,जरी ते सत्य असले तरी स्विकारण्यास जड जाते किंबहुना ते स्विकारले जातच नाहि, (असत्य असेल तर मानूहि नये) असो
एक्याण्णव कलमी बखरीच्या एका फार्सी अनुवादातून ही नोंद सरकारांनी उचलली आहे. याच बखरीच्या बाकीच्या भाषांतरात याचा उल्लेख नाही. ही बखरच मुळी अत्यंत अविश्वसनीय आहे
फायद्याच असलेलं सगळं कधिही विश्वसनीय असतं, अगदि काहिहि.
१६४१ पर्यंत म्हणजे शिवाजी १२ वर्षाचा असेपर्यंत ते बेंगलोरास होते. या बाबतीत सभासद बखरीत खालील उतारा आहे. “शाहाजीराजे यांसी दौलतेमधे पुणे परगाणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महारांजास भेटीस गेला. त्याबरोबर रा. शिवाजीराजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियांस वर्षे बारा होती. बराबर शामराव नीळकंठ म्ह्णून पेशवे करून दिले व बाळ्कृष्णपंत, नारोपंत दिक्षितांचे चुलत भाऊ, मजमूदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजे यांसी पुण्यास रवाना केले”. ( काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप ....) या वरून हे कळते की त्या वेळेस दादोजी हे शहाजीच्या पदरी होते व शहाजी अदिलशहाच्या.
दादोजी कोंडदेव पुण्यातून कर्नाटकात भरणा भरायला १६३९-१६४० च्या दरम्यान आले..तेव्हा शिवाजी महाराज ९-१० वर्षाचे होते..तसा दाखला दादोजिच्याच पत्रा वरून मिळतो, दादोजी इ.स. १६४१-४२ मध्ये मावळातच होते,आणि यातील दुसरा विरोधाभास म्हणजे शहाजी महाराजांकडे बंगरूळ सुभा इ.स. १६४४ नंतर आला. अशा विपर्यस्त मजकुराने बखरीतील नंतरच्या लिखाणातून काल्पनिक चित्रांचा का व कसा उठाव झाला याचा उलगडा होण्यास अभ्यासकांना कठीण पडणार नाही.यावरून हे नंतर पेशवे काळात घुसडवल्या गेले आहे हेच सिद्ध होत आहे, त्यामुळे असे पवाडा गायल्या सारखे, "काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप" असे म्हणल्याने सत्यात बदल होणार नाहि, तसेच शिवाजीमहाराजांच्या समकालीन बखरीत रामदासांचा कुठेच उल्लेख नाही. पेशवे कालिन बखरित तो घुसडण्यात आला असे दिसते मग खरे काय मानावे, म्हणजे हे उदात्तीकरण पेशवे कालात झाले असावे असे म्हणता येउ शकते,,
शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्‍याला यासाठी वेळच नव्हता.
१६४२ साली शहाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीतील कारस्थाने वाढली होती,रन्दुल्लाखान मेल्यावर त्याचा मुलगा कमकर्तुत्ववान निघाल्याने अफजल खानाला त्याची जहागीर मिळाली, व त्याने बाजी घोरपड्या सारखे सरदार गोळा करून शहाजीमहाराजांविरुद्ध कारस्थान रचले त्या नुसार.. आदिलशाहने शहाजीमहाराजांचा बराच प्रदेश त्यांच्या कडून काढून घेतला,आणी त्यांचे भाऊबंद बाजी घोरपड्यास दिला,हे सर्व बघून आदिलशाहीतील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र शिजतेय हे जाणून शहाजीमहाराजांनी शिवाजी आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला,त्या सोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो अश्या आशयाचे बोलणे त्यांनी आदिलशाहशी लावून ठेवले होते,१६४२ च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का, झेंड्या सोबत पेशवे, मुजुमदार, सबनीस, व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले, ह्या मूळे शहाजीराजा मोघालांशी संधान साधतोय कि काय, अशी भीती आदिलाशाहाला झाली त्यामूळे आदिलशाहने शहाजीशी चाललेल्या वादावर पडदा टाकत,काढून घेतलेल्या जहागिरी पेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला. १६४४ साली आदिलशाहने शहाजीराज्यांची आधीच्या (काढून घेतलेल्या ) ४ लक्ष जहागिरी ऐवजी ५ लाखाचा सुभा बंगलोर दिला...व तिकडे रवाना केले.अर्थात शहाजीराजांन सारख्या प्रबळ सरदाराचे मोघलांकडे जाने योग्य नाही ह्या भीतीने शहाजीराज्यांशी आदिलशाहने जुळवून घेतले, व इकडे मोघालांशी संधान साधायला नको म्हणून तिकडे कर्नाटकात बंगरूळला रवाना केले, इथे शिवाजीमहाराजांना पुणे प्रांती पाठवून शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजीराज्याकडून त्या प्रकारची बंडयुक्त कार्य करण्याचे आदेशहि पाठवले होते. यावरुन तुम्हि इथे काहिही धुम धडाक्यात ठोकुन देता हे सिध्द होत नाहि का? "शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्‍याला यासाठी वेळच नव्हता," या उपर तुम्हि शहाजीराजांना "बिचारे" म्हणत आहात ते वाक्य कशासाठी हे स्पष्ट करता येईल काय. ते आदिलाशहाच्या चाकरित असले तरी ते एक सुभेदार/जहारगीरदार होते,तसा वर उल्लेख आलाच आहे शहाजी राजांन सारख्या प्रबळ सरदाराचे मोघलांकडे जाने योग्य नाही ह्या भीतीने शहाजी राज्यांशी आदिलशाहने जुळवून घ्यावे लागले,शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला नाहि आणी त्यांना बिचारे संबोधणे कोत्याबुध्दि चे लक्षण वाटते त्यांना स्वतःचे स्वराज्य व्हावे वा ते आपल्या मुलाने मिळवावे असे वाटणे स्वाभाविक आहे,त्यांनी राजांना जमेल तशी मदत केलीच असणार, वडील बाहेरगावी कामाला असले म्हणजे ते त्याकडे दुर्लक्ष करतात?आपला मुलगा काय करतो,त्याच्या करीअरच काय या चिंता प्रत्येक बापाला असतात त्यास जमेल ते सहकार्य ते करणारच,मग तसा प्रयत्न शाहाजि राजांनी करु कि शिवाजी शेवटी स्वराज्या चे तोरण आपल्याच दारी लागणार ना. साधा कॉमनसेन्स आहे यात तुम्हि कसले तर्कशास्त्र वापरले कळायला मार्ग नाही,असली धाडसी विधाने तुम्हिच करु जाणो तुम्हि कुठल्याहि जगात वावरत असाल तिथेच रहा, उगा आणखि धुम धडाका नको,
पुढचा परिच्छेदात काही अर्थ नाही म्हणून त्याला उत्तर देत नाही.
कोणत्या परिच्छेदाने गैरसोय झाली म्हनायची,प्रतीवाद करता येत नसेल तर पळवाट योग्यच,
शाहू महाराजांनी पण असा उल्लेख केलेला आढळतो “ मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला परंतू त्याने केलेले निवाडे औंरंगजेब बादशहास वंद्य झाहले” हे उदगार शाहू महाराजांनी काढले असे पत्र बाजीरावाचा शाहूमहाराजांच्या दरबारातील प्रतिनिधी पुरंदरे याने बाजीरावास पाठवले आहे..... अजून काय लिहावे
सिलींबकर देशमुख प्रकरण -१६३८ साली सिलींबकर देशमुख घराण्यात वारसा हक्का बद्दल मलिक अंबरच्या आधीपासून भांडणे व खुणाखुनी चालू होती. १६३८ ला दादाजी कोंडदेव यांनी सिलींबकरांच्या बाजूने न्याय निवडा केला होता.परंतु दुसर्‍या एका करीन्यातील संदर्भानुसार,तसेच दादाजी कोंडदेव ह्यांचा निकाल शिवाजी महाराजांनी १६५७ ला फिरवला ह्या दोन्ही संदर्भावरून दादाजींनी चुकीचा न्याय निवडा केला होता असे आढळून येते.
हा नियम लावायचा तर बाकिच्यांचे तरी तेथे आणि इतर ठिकाणी महाराजांबरोबर काय काम ? फक्त शिवाजीमहाराजांचाच पुतळा उभारला पाहिजे. गांधीजींचे पुतळे कुठे त्यांच्या अनुयायांबरोबर असतात ? बिचार्‍या महाराजांना एकटे पाडायचा हा कुटील डाव दिसतो
हा नियम लावायचा तर बाकिच्यांचे तरी तेथे आणि इतर ठिकाणी महाराजांबरोबर काय काम हे बाकिचे कोण असतात कृपया थोडे स्पष्ट कराल काय??? गांधीजींचे पुतळे कुठे त्यांच्या अनुयायांबरोबर असतात, (म्हणजे गांधीजी सदोदित एकटेच असतात,ठिक बिचार्‍या महाराजांना एकटे पाडायचा हा कुटील डाव दिसतो (ह.ह.पु.वा.) इथे परत बिचारे हे अस दया कणव आल्या सारखं का बरे बोलत आहात? तुम्हि सम्राट आहात का? नाहि साक्षात महाराजांना तुम्हि बिचारे बिचारे म्हणत आहात, आणी महाराज एकटे पणाला घाबरत असावेत काय? म्हणून दादोजिला सोबतीला ठेवत असावेत? यात कसला आलाय कुटिल डाव असली बाळबोध विधाने करुन मनोरंजन करुन घेउ नका, बाकि ढोबळमनाने जर गांधीजी - अहिंसावादी आणी महाराज हिंसावादी( स्वराज्य उपवास करुन नाहि मिळाले लढावे लागले) अशी २ विरुध्द असलेल्या महापुरुषांची तुलना योग्य वाटत नाहि, हो ना हो जोगळेकर. त्या बद्दल ते आता सुभेच्छा गुच्छ पाठवतील तातडिने,
या विकृतीचे नाव आहे xxर....
याचे मोघाम उत्तर दिलेत,आणी ते काय होते हे तुम्हि खरे सांगणार नाहित खात्री होती.
पण एका शिक्षकाला किती महत्व द्यायचे याला काहि मर्यादा आहे की नाही,त्याला नको तिथे उभे करुन काय साध्य करायचे आहे???? बर जिथे पुतळा उभा होता ती जागा योग्य होती का? ते एकदा स्पष्ट करा
गैरसोय+बगल = पळवाट. ठिकच
महाराजांनी लेनचा व ब्रिगेडचा चौरंग केला असता याचे कारण जगजाहीर आहे. समजा अगदी असे समजूयात की ही ज्या माहितीबद्दल आपण बोलता आहात त्यांची नावे त्यांना खेडेकर साहेबांनी दिली असती (आणि ती खरी निघाली असती तर) तर त्यांनी त्याची शहानिशा करून फक्त त्यांनाच फाशी दिले असते. पिसाळ देशद्रोही निघाला म्हणून सगळ्या पवारांना, घोरपड्यांना, मोर्‍यांना ठार मारा असा आदेश त्यांनी निश्चितच काढला नसता.
महाराजांनी लेनचा व ब्रिगेडचा चौरंग केला असता याचे कारण जगजाहीर आहे ठिक पण मग "ती" माहिती पुरवली कुणी?आणि ती खरी निघाली असती तर तर त्यांनी त्याची शहानिशा करून फक्त त्यांनाच फाशी दिले असते. माहिती पुरवली कुणी ते तुम्हाला माहिती असेलच.बखरींचा अभ्यास करणार्‍यांना अलीकडील गोष्टी माहित असायलाच हव्यात कृपया ती प्रामाणिकपणे इथे जाहिर करावि हि नम्र विनंती.
मोठे राजकारणी आहेत आणि ब्रिगेडच्या लोकांना त्यांचा छूपा पाठिंबा आहे. काहीतरी करून बेकारांची सेना पोसायची आणि त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्यायचा हेच यांचे काम आहे. पण हे किती दिवस चालेल ? तेही लोक शहाणे होतीलच. ते नाहीतर त्यांची मुले शहाणी होतील
चालायचच, आजवर इतरांनी केले ते आता हे करतायत,फरक फक्त नाव आणी धर्म/जात बदलली, इतीहासाची पुनराव्रुत्ती होत असते असे म्हणतात असच काहितरी,कधी कोण सुपात तर कधी कोण जात्यात
उरला प्रश्न आमच्या अधिकाराचा. तर्कशास्त्र वापरून, सुसंगत आणि प्रामाणिकपणे लिहायचा अधिकार सगळ्यांनाच आहे. आपल्यालाही आहे असे आम्ही मानतो.
सहमती...लिहायचा/आपले म्हणने मांडण्याचा अधिकार सगळ्यांनाच,
अजून कसल्या तारखा पाहिजे असल्यास कळिवणे. पुरवण्यात येतील....
सध्या.इतक पुरवलत तेच खुप आहे ! >>अजून काय लिहावे= काहिही लिहा हो पण तुम्हि म्हणता तसे तर्कशास्त्र वापरून, सुसंगत आणि प्रामाणिकपणे, माझं म्हणंन इतकच आहे की एका शिक्षकाला किती महत्व द्यायचे याला काहि मर्यादा आहे की नाही,त्याला नको तिथे उभे करुन काय साध्य करायचे आहे???? बर जिथे पुतळा उभा होता ती जागा योग्य होती का? ते एकदा स्पष्ट करा. संदर्भ ग्रंथ - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध) लेखक - वा.सी. बेंद्रे. १९७२ अवांतर:आजच झी २४ तास वर त्यावर चर्चा पाहिली चर्चा अर्धवट स्वरुपातच झाली,सदर चर्चेत श्री.कोकाटे,आर.पि.आय. नेत्या सुलेखा कुंभांरे,श्री.रामटेके, (तेच ते ब्लॉगवाले) श्री.कुलकर्णी जेष्ट पत्रकार(बहुतेक हे ही ब्लॉगवर असतात )सहभागी होते आणी चर्चेचा सुत्र संचालन श्री.मंदार परब करत होते, सुलेखा कुंभांरे यांनी या बाबत आर.आर. पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगुन त्यावर बंदि घालण्यात यावी अन्यथा आंदोलन करु अशी भुमीका घेतली आहे,श्री.कुलकर्णी/ रामटेके यांनी सुध्दा तीच भुमिका घेतली,उत्तरे देताना सुरुवातीला कोकाटेंना हे पुस्तक वाचले का असे विचारल्यावर त्यांनी नाहि असे उत्तर दिले,व त्यात काहि आक्षेपार्ह असल्यास ते वगळू असे आश्वासन दिले(राजकारण्या सारखे) पण सुत्र संचालक श्री.मंदार परब यांना योग्य ठिकाणी त्यांना ट्रॅप करता आले नाहि, तसेच अभ्यास नसल्यामुळे ते ही काहि बाहीच बोलत होते,कहर म्हणजे त्यांनी कोकाटेना त्यांची भुमिका मांडण्यासाठी वेळच दिला नाहि नको तिथे ब्रेक घेत बसले,मग चर्चा करायला बोलावता तरी कशाला, त्यातुन कोकाटेंची/त्यांच्या संघटनेची मानसीकता आणी पुढच्या काहि गोष्टी/मुद्दे तरी कळले असते, असो आता वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढने आंदोलन होणार आहे म्हणे, डेडलाईन दिली आहे अवघड आहे देशाच......!

In reply to by जयंत कुलकर्णी

सध्या कुठली फॅशन चालू आहे ते कृपया कळवावे.
सध्या दंतकथा/भाकडकथा रेटून सांगण्याची फॅशन चालू आहे, आणी एक गंमत, काय असते आपल्या लोकांना पाश्चिमात्य/मुस्लिम (बखर) किंवा इतर लोकांनी काहिहि लिहिले,जरी ते सत्य असले तरी स्विकारण्यास जड जाते किंबहुना ते स्विकारले जातच नाहि, (असत्य असेल तर मानूहि नये) असो
एक्याण्णव कलमी बखरीच्या एका फार्सी अनुवादातून ही नोंद सरकारांनी उचलली आहे. याच बखरीच्या बाकीच्या भाषांतरात याचा उल्लेख नाही. ही बखरच मुळी अत्यंत अविश्वसनीय आहे
फायद्याच असलेलं सगळं कधिही विश्वसनीय असतं, अगदि काहिहि.
१६४१ पर्यंत म्हणजे शिवाजी १२ वर्षाचा असेपर्यंत ते बेंगलोरास होते. या बाबतीत सभासद बखरीत खालील उतारा आहे. “शाहाजीराजे यांसी दौलतेमधे पुणे परगाणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महारांजास भेटीस गेला. त्याबरोबर रा. शिवाजीराजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियांस वर्षे बारा होती. बराबर शामराव नीळकंठ म्ह्णून पेशवे करून दिले व बाळ्कृष्णपंत, नारोपंत दिक्षितांचे चुलत भाऊ, मजमूदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजे यांसी पुण्यास रवाना केले”. ( काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप ....) या वरून हे कळते की त्या वेळेस दादोजी हे शहाजीच्या पदरी होते व शहाजी अदिलशहाच्या.
दादोजी कोंडदेव पुण्यातून कर्नाटकात भरणा भरायला १६३९-१६४० च्या दरम्यान आले..तेव्हा शिवाजी महाराज ९-१० वर्षाचे होते..तसा दाखला दादोजिच्याच पत्रा वरून मिळतो, दादोजी इ.स. १६४१-४२ मध्ये मावळातच होते,आणि यातील दुसरा विरोधाभास म्हणजे शहाजी महाराजांकडे बंगरूळ सुभा इ.स. १६४४ नंतर आला. अशा विपर्यस्त मजकुराने बखरीतील नंतरच्या लिखाणातून काल्पनिक चित्रांचा का व कसा उठाव झाला याचा उलगडा होण्यास अभ्यासकांना कठीण पडणार नाही.यावरून हे नंतर पेशवे काळात घुसडवल्या गेले आहे हेच सिद्ध होत आहे, त्यामुळे असे पवाडा गायल्या सारखे, "काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप" असे म्हणल्याने सत्यात बदल होणार नाहि, तसेच शिवाजीमहाराजांच्या समकालीन बखरीत रामदासांचा कुठेच उल्लेख नाही. पेशवे कालिन बखरित तो घुसडण्यात आला असे दिसते मग खरे काय मानावे, म्हणजे हे उदात्तीकरण पेशवे कालात झाले असावे असे म्हणता येउ शकते,,
शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्‍याला यासाठी वेळच नव्हता.
१६४२ साली शहाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीतील कारस्थाने वाढली होती,रन्दुल्लाखान मेल्यावर त्याचा मुलगा कमकर्तुत्ववान निघाल्याने अफजल खानाला त्याची जहागीर मिळाली, व त्याने बाजी घोरपड्या सारखे सरदार गोळा करून शहाजीमहाराजांविरुद्ध कारस्थान रचले त्या नुसार.. आदिलशाहने शहाजीमहाराजांचा बराच प्रदेश त्यांच्या कडून काढून घेतला,आणी त्यांचे भाऊबंद बाजी घोरपड्यास दिला,हे सर्व बघून आदिलशाहीतील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र शिजतेय हे जाणून शहाजीमहाराजांनी शिवाजी आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला,त्या सोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो अश्या आशयाचे बोलणे त्यांनी आदिलशाहशी लावून ठेवले होते,१६४२ च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का, झेंड्या सोबत पेशवे, मुजुमदार, सबनीस, व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले, ह्या मूळे शहाजीराजा मोघालांशी संधान साधतोय कि काय, अशी भीती आदिलाशाहाला झाली त्यामूळे आदिलशाहने शहाजीशी चाललेल्या वादावर पडदा टाकत,काढून घेतलेल्या जहागिरी पेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला. १६४४ साली आदिलशाहने शहाजीराज्यांची आधीच्या (काढून घेतलेल्या ) ४ लक्ष जहागिरी ऐवजी ५ लाखाचा सुभा बंगलोर दिला...व तिकडे रवाना केले.अर्थात शहाजीराजांन सारख्या प्रबळ सरदाराचे मोघलांकडे जाने योग्य नाही ह्या भीतीने शहाजीराज्यांशी आदिलशाहने जुळवून घेतले, व इकडे मोघालांशी संधान साधायला नको म्हणून तिकडे कर्नाटकात बंगरूळला रवाना केले, इथे शिवाजीमहाराजांना पुणे प्रांती पाठवून शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजीराज्याकडून त्या प्रकारची बंडयुक्त कार्य करण्याचे आदेशहि पाठवले होते. यावरुन तुम्हि इथे काहिही धुम धडाक्यात ठोकुन देता हे सिध्द होत नाहि का? "शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्‍याला यासाठी वेळच नव्हता," या उपर तुम्हि शहाजीराजांना "बिचारे" म्हणत आहात ते वाक्य कशासाठी हे स्पष्ट करता येईल काय. ते आदिलाशहाच्या चाकरित असले तरी ते एक सुभेदार/जहारगीरदार होते,तसा वर उल्लेख आलाच आहे शहाजी राजांन सारख्या प्रबळ सरदाराचे मोघलांकडे जाने योग्य नाही ह्या भीतीने शहाजी राज्यांशी आदिलशाहने जुळवून घ्यावे लागले,शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला नाहि आणी त्यांना बिचारे संबोधणे कोत्याबुध्दि चे लक्षण वाटते त्यांना स्वतःचे स्वराज्य व्हावे वा ते आपल्या मुलाने मिळवावे असे वाटणे स्वाभाविक आहे,त्यांनी राजांना जमेल तशी मदत केलीच असणार, वडील बाहेरगावी कामाला असले म्हणजे ते त्याकडे दुर्लक्ष करतात?आपला मुलगा काय करतो,त्याच्या करीअरच काय या चिंता प्रत्येक बापाला असतात त्यास जमेल ते सहकार्य ते करणारच,मग तसा प्रयत्न शाहाजि राजांनी करु कि शिवाजी शेवटी स्वराज्या चे तोरण आपल्याच दारी लागणार ना. साधा कॉमनसेन्स आहे यात तुम्हि कसले तर्कशास्त्र वापरले कळायला मार्ग नाही,असली धाडसी विधाने तुम्हिच करु जाणो तुम्हि कुठल्याहि जगात वावरत असाल तिथेच रहा, उगा आणखि धुम धडाका नको,
पुढचा परिच्छेदात काही अर्थ नाही म्हणून त्याला उत्तर देत नाही.
कोणत्या परिच्छेदाने गैरसोय झाली म्हनायची,प्रतीवाद करता येत नसेल तर पळवाट योग्यच,
शाहू महाराजांनी पण असा उल्लेख केलेला आढळतो “ मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला परंतू त्याने केलेले निवाडे औंरंगजेब बादशहास वंद्य झाहले” हे उदगार शाहू महाराजांनी काढले असे पत्र बाजीरावाचा शाहूमहाराजांच्या दरबारातील प्रतिनिधी पुरंदरे याने बाजीरावास पाठवले आहे..... अजून काय लिहावे
सिलींबकर देशमुख प्रकरण -१६३८ साली सिलींबकर देशमुख घराण्यात वारसा हक्का बद्दल मलिक अंबरच्या आधीपासून भांडणे व खुणाखुनी चालू होती. १६३८ ला दादाजी कोंडदेव यांनी सिलींबकरांच्या बाजूने न्याय निवडा केला होता.परंतु दुसर्‍या एका करीन्यातील संदर्भानुसार,तसेच दादाजी कोंडदेव ह्यांचा निकाल शिवाजी महाराजांनी १६५७ ला फिरवला ह्या दोन्ही संदर्भावरून दादाजींनी चुकीचा न्याय निवडा केला होता असे आढळून येते.
हा नियम लावायचा तर बाकिच्यांचे तरी तेथे आणि इतर ठिकाणी महाराजांबरोबर काय काम ? फक्त शिवाजीमहाराजांचाच पुतळा उभारला पाहिजे. गांधीजींचे पुतळे कुठे त्यांच्या अनुयायांबरोबर असतात ? बिचार्‍या महाराजांना एकटे पाडायचा हा कुटील डाव दिसतो
हा नियम लावायचा तर बाकिच्यांचे तरी तेथे आणि इतर ठिकाणी महाराजांबरोबर काय काम हे बाकिचे कोण असतात कृपया थोडे स्पष्ट कराल काय??? गांधीजींचे पुतळे कुठे त्यांच्या अनुयायांबरोबर असतात, (म्हणजे गांधीजी सदोदित एकटेच असतात,ठिक बिचार्‍या महाराजांना एकटे पाडायचा हा कुटील डाव दिसतो (ह.ह.पु.वा.) इथे परत बिचारे हे अस दया कणव आल्या सारखं का बरे बोलत आहात? तुम्हि सम्राट आहात का? नाहि साक्षात महाराजांना तुम्हि बिचारे बिचारे म्हणत आहात, आणी महाराज एकटे पणाला घाबरत असावेत काय? म्हणून दादोजिला सोबतीला ठेवत असावेत? यात कसला आलाय कुटिल डाव असली बाळबोध विधाने करुन मनोरंजन करुन घेउ नका, बाकि ढोबळमनाने जर गांधीजी - अहिंसावादी आणी महाराज हिंसावादी( स्वराज्य उपवास करुन नाहि मिळाले लढावे लागले) अशी २ विरुध्द असलेल्या महापुरुषांची तुलना योग्य वाटत नाहि, हो ना हो जोगळेकर. त्या बद्दल ते आता सुभेच्छा गुच्छ पाठवतील तातडिने,
या विकृतीचे नाव आहे xxर....
याचे मोघाम उत्तर दिलेत,आणी ते काय होते हे तुम्हि खरे सांगणार नाहित खात्री होती.
पण एका शिक्षकाला किती महत्व द्यायचे याला काहि मर्यादा आहे की नाही,त्याला नको तिथे उभे करुन काय साध्य करायचे आहे???? बर जिथे पुतळा उभा होता ती जागा योग्य होती का? ते एकदा स्पष्ट करा
गैरसोय+बगल = पळवाट. ठिकच
महाराजांनी लेनचा व ब्रिगेडचा चौरंग केला असता याचे कारण जगजाहीर आहे. समजा अगदी असे समजूयात की ही ज्या माहितीबद्दल आपण बोलता आहात त्यांची नावे त्यांना खेडेकर साहेबांनी दिली असती (आणि ती खरी निघाली असती तर) तर त्यांनी त्याची शहानिशा करून फक्त त्यांनाच फाशी दिले असते. पिसाळ देशद्रोही निघाला म्हणून सगळ्या पवारांना, घोरपड्यांना, मोर्‍यांना ठार मारा असा आदेश त्यांनी निश्चितच काढला नसता.
महाराजांनी लेनचा व ब्रिगेडचा चौरंग केला असता याचे कारण जगजाहीर आहे ठिक पण मग "ती" माहिती पुरवली कुणी?आणि ती खरी निघाली असती तर तर त्यांनी त्याची शहानिशा करून फक्त त्यांनाच फाशी दिले असते. माहिती पुरवली कुणी ते तुम्हाला माहिती असेलच.बखरींचा अभ्यास करणार्‍यांना अलीकडील गोष्टी माहित असायलाच हव्यात कृपया ती प्रामाणिकपणे इथे जाहिर करावि हि नम्र विनंती.
मोठे राजकारणी आहेत आणि ब्रिगेडच्या लोकांना त्यांचा छूपा पाठिंबा आहे. काहीतरी करून बेकारांची सेना पोसायची आणि त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्यायचा हेच यांचे काम आहे. पण हे किती दिवस चालेल ? तेही लोक शहाणे होतीलच. ते नाहीतर त्यांची मुले शहाणी होतील
चालायचच, आजवर इतरांनी केले ते आता हे करतायत,फरक फक्त नाव आणी धर्म/जात बदलली, इतीहासाची पुनराव्रुत्ती होत असते असे म्हणतात असच काहितरी,कधी कोण सुपात तर कधी कोण जात्यात
उरला प्रश्न आमच्या अधिकाराचा. तर्कशास्त्र वापरून, सुसंगत आणि प्रामाणिकपणे लिहायचा अधिकार सगळ्यांनाच आहे. आपल्यालाही आहे असे आम्ही मानतो.
सहमती...लिहायचा/आपले म्हणने मांडण्याचा अधिकार सगळ्यांनाच,
अजून कसल्या तारखा पाहिजे असल्यास कळिवणे. पुरवण्यात येतील....
सध्या.इतक पुरवलत तेच खुप आहे ! >>अजून काय लिहावे= काहिही लिहा हो पण तुम्हि म्हणता तसे तर्कशास्त्र वापरून, सुसंगत आणि प्रामाणिकपणे, माझं म्हणंन इतकच आहे की एका शिक्षकाला किती महत्व द्यायचे याला काहि मर्यादा आहे की नाही,त्याला नको तिथे उभे करुन काय साध्य करायचे आहे???? बर जिथे पुतळा उभा होता ती जागा योग्य होती का? ते एकदा स्पष्ट करा. संदर्भ ग्रंथ - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध) लेखक - वा.सी. बेंद्रे. १९७२ अवांतर:आजच झी २४ तास वर त्यावर चर्चा पाहिली चर्चा अर्धवट स्वरुपातच झाली,सदर चर्चेत श्री.कोकाटे,आर.पि.आय. नेत्या सुलेखा कुंभांरे,श्री.रामटेके, (तेच ते ब्लॉगवाले) श्री.कुलकर्णी जेष्ट पत्रकार(बहुतेक हे ही ब्लॉगवर असतात )सहभागी होते आणी चर्चेचा सुत्र संचालन श्री.मंदार परब करत होते, सुलेखा कुंभांरे यांनी या बाबत आर.आर. पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगुन त्यावर बंदि घालण्यात यावी अन्यथा आंदोलन करु अशी भुमीका घेतली आहे,श्री.कुलकर्णी/ रामटेके यांनी सुध्दा तीच भुमिका घेतली,उत्तरे देताना सुरुवातीला कोकाटेंना हे पुस्तक वाचले का असे विचारल्यावर त्यांनी नाहि असे उत्तर दिले,व त्यात काहि आक्षेपार्ह असल्यास ते वगळू असे आश्वासन दिले(राजकारण्या सारखे) पण सुत्र संचालक श्री.मंदार परब यांना योग्य ठिकाणी त्यांना ट्रॅप करता आले नाहि, तसेच अभ्यास नसल्यामुळे ते ही काहि बाहीच बोलत होते,कहर म्हणजे त्यांनी कोकाटेना त्यांची भुमिका मांडण्यासाठी वेळच दिला नाहि नको तिथे ब्रेक घेत बसले,मग चर्चा करायला बोलावता तरी कशाला, त्यातुन कोकाटेंची/त्यांच्या संघटनेची मानसीकता आणी पुढच्या काहि गोष्टी/मुद्दे तरी कळले असते, असो आता वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढने आंदोलन होणार आहे म्हणे, डेडलाईन दिली आहे अवघड आहे देशाच......!

In reply to by अजातशत्रु

बहुतेक सर्व संदर्भांमध्ये -- बाजूने किंवा विरुद्ध देणार्‍यांमध्ये एक समान गोष्ट आहे की जे संदर्भ आपल्या सोयीचे असतील तेवढे घ्यायचे. जे आपल्या मताप्रमाणे नसतील ते चुकीचे / घुसडलेले / पूर्वग्रहदूषित म्हणायचे. एक्याण्णव कलमी बखर (जी काही आहे ती. मला काहीही माहिती नाही. मी फक्त समोर मांडलेले पुरावे बघतो आहे) ही जयंतराव किंवा ज्या कोणाचा तो मूळ धागा होता त्यांना विश्वासार्ह वाटत नाही. पण तुम्हाला वाटते. त्यांनी सांगितलेली पत्रे / पेशवेकालीन संदर्भ तुम्हाला घुसडलेले वाटतात. शिवाजी महाराजांचे स्वतःचे उल्लेख तुम्हाला खोटे वाटतात आणि गोमाजी नाईक पानसंबळ हा असामी यांना शिक्षक असावा इतका योग्य वाटत नाही विशेषतः जाधव आणि भोसल्यांचे तेव्हाचे संदर्भ पाहता. म्हणजे काय की आपल्याला जे सोयीचं ते घ्यायचं आणि बाकीचं खुशाल चुकीचं / खोटं / नंतर घुसडलेलं म्हणून मोकळ व्हायचं. मागे सुद्धा आम्हा घरी धन यांच्याशी वाद घालताना ग्रँट डफ बद्दल असंच झालं की त्याने लिहिलेला इतिहास हा influenced आहे आणि reliable नाही. पण त्याने लिहिलेला मर्यादित भाग दादोजी कोंडदेवांबद्दल जो खूप विशेष नाही मग तो चालतो. चौथीच्या पुस्तकात वाचलं की दादोजी गुरू होते त्यांनी थोडं काहि मार्गदर्शन केलं. ब्रिगेड ने बाऊ करेपर्यंत त्यांची जात कोणालाही माहीत नसावी किंवा फारशी महत्त्वाची नसावी. आता मात्र ती सगळ्यांना महत्त्वाची झाली. रामदास स्वामींचा उल्लेख नाही. नसेल बुवा. काय झालं मग. त्यांनी त्यांचं काम केलं समाज प्रबोधनाचं. ते ब्राम्हण होते असा उल्लेख आहे म्हणून थेट शिव्याच ! बरं ज्ञानेश्वरांनी असं काय ब्राम्हण्य पुढे आणलं होतं की त्यांनाही विरोध. संस्कृतातलं ज्ञान लोकांना कळेल अशा भाषेत आणलं याचाच विरोध ? नक्की प्रॉब्लेम काय आहे? जसा तुम्ही ब्राम्हण्य generalize करताय तशीच मराठा आक्रमक प्रवृत्ती करावी का? संभाजी राजांना फितुरीने पकडून देणारे शिर्के मराठा होते म्हणून त्यांना ३५० वर्षांनंतर ९६ कुळातून हद्दपार करावं का? ते generalization जितकं चुकीचं हेही तितकंच चुकीचं. कुठलेही संदर्भ घटना याकडे इतिहास म्हणून पहावं आणि त्यातून शिकावं का दोनशे तीनशे वर्षापूर्वी कोणी काही केलं ते धरून आता नव नवीन डबकी निर्माण करावीत ? विहीर तरी कसं म्हणायचं या घोळक्यांना... डबकीच ती.. इतके इतिहासाचे दाखले बारकाईने पहावे तर हे नक्की शंभर टक्के लक्षात येईल की खुद्द शिवाजी महाराजांनी जाती पातीला आधार दिला नाही. मोरोपंत पिंगळे, बाजी प्रभू देशपांडे, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सोनोपंत डबीर, मदारी मेहतर, हिरोजी फर्जंद, कान्होजी आंग्रे - किती जाती झाल्या एवढ्यातच ? पण ते कोणाच्या राजकारणाच्या किंवा वादाच्या सोयीचं नाही ना... अजून एक गोष्ट पण महत्त्वाची की मराठेशाही काय पेशवाई काय बुडाली एकाच कारणाने - बेदिलीने, फितुरीने, स्वार्थाने. जेव्हा जेव्हा जाती पाती सोडून मराठा एकत्र आला तेव्हा राज्य उभं राहिलं आणि आपापसात लढले किंवा एकमेकांना मदत न करता लहान स्वार्थाच्या मागे रहिले तेव्हा राज्य बुडालं. हे आत्मपरीक्षण ब्राम्हणांनी करावंच.. पण समस्त मराठी लोकांनी केलं तर महाराष्ट्राला खरा उपयोग होईल. एका जातीने करून अजून फूट पाडण्याने महाराष्ट्र मोठा होऊ शकत नाही.

In reply to by अजातशत्रु

त्यामुळे पुन्हा, प्रतिवाद नक्की कुणाला करता येत नाही ते इथे असणार्‍या प्रतिसादां वरुन अगदि स्वच्छ दिसत आहे, असेच म्हणतो. अगदी अगदी. सहमत आहे. मी त्या दोघांमधील असणार्‍या वयाचे अंतर/ त्यांचा कार्य कालखंड स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यात कर्वे किंवा फुले यांपैकी कोणाचीतरी टवाळी कशी काय झाली? वाट्टेल तिथे स्माईली टाकणे याचा अर्थ काय ? तुमच्या घरातल्या कुणाचा गॄह्यसंस्कार छापायचा असेल तर त्यानंतर सुद्धा तुम्ही स्माईली टाकाल कदाचित. कुठे काय लिहावे, बोलावे, वागावे याचे भान नसेल तर समोरच्या माणसाचे गैरसमज होणारच. अर्थात दोष त्या गैरलेखन्/वर्तन करणार्‍या व्यक्तीचाच आहे. डॉ. आंबेडकर, म. फुले, म. कर्वे हे सगळेच मला आपले वाटतात त्यामुळे 'आपला माणूस' या शब्दाने माझा गोंधळ उडाला आहे. कारण या वाक्यात गोष्टींचा परस्पर संबंध काय आहे ? आपला माणूस याचा अर्थ ब्राह्मण नेहमी आपले श्रेष्टत्व मिरवण्याच्या प्रयत्नात असतात आपल्या माणसाला क्रेडिट देण्याच्या नादात इतरांना नेहमीच डावलतात. या आरोपास काही अन्य आधार आहे काय ? की एखाद दुसरे उदाहरण पाहून तुम्ही जनरलायझेशन केले. तसे जर असेल तर तर तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात त्या जातीची माणसे अत्यंत हीन मनोवॄत्तीची असतात असे म्हणावे लागेल. बामणांनी त्याला इतका इतका मोठा केला कि स्वराज्य शिवाजी न्हवे तर कोंडदेवाने मिळविले असे वाटू लागले, बामण म्हणजे कोण ? ही ब्राम्हण या जमातीस दिलेली शिवी आहे काय ? हीच या अ‍ॅनालॉजी लावायची असेल तर महारांना 'म्हारड्या' आणि चांभारांना 'चांभारड्या' म्हणणे हीसुद्धा शिवीगाळ ठरणार नाही. मला स्वतःला तरी या जातीवाचक शिव्याच वाटतात. (आमचे इथले काही अत्यंत सभ्य भाषेत लिहिलेले प्रतिसाद उडवणार्‍या संपादकांनी ही बाब लक्षात घ्यावी.) फुकाचे अभिनिवेश मिरवण्याच्या नादात स्वत:चेच हसे होत आहे,मग पुतळा काढल्या वर जगबुडी झाल्या सारखे कशाला आकांड-तांडव करता? तुम्ही कोणत्या पुतळ्याबाबत बोलत आहात. तुम्ही एखादा पुतळा काढला आहे काय ? आणि त्यावरुन मी कधी आकांडतांडव केले? माझे हसे होत आहे असे तुम्ही म्हणता आहात प्रत्यक्षात या संस्थळावर 'अजातशत्रू' ही एक शिवी झाली याचा तुम्हाला अंदाज आहे काय ? आता आपला तुपलाचा तुमचा गोंधळ निस्तरला असेल असे समजावे का?. नाही. तुम्ही नेहमीप्रमाणे मुद्द्याला सोडून भलतेच काहीतरी लिहिले त्यामुळे गोंधळ निस्तरला जाण्याची शक्यताच नाही. मि मि.पा.वरील प्रत्येक सदस्याला महत्व देतो, पण तुम्हाला इथले सदस्य ( मी सोडून ) फारच कमी महत्व देतात हे ल्क्षात आले आहे काय ? एक विचारु का तुमचा मित्र इतिहास तज्ञ आहे का शिवशाहिर आहे? नाही. फालतू लिखाण तज्ञांना वाचायला देउन त्यांचा वेळ मी फुकट घालवत नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

वाट्टेल तिथे स्माईली टाकणे याचा अर्थ काय ? तुमच्या घरातल्या कुणाचा गॄह्यसंस्कार छापायचा असेल तर त्यानंतर सुद्धा तुम्ही स्माईली टाकाल कदाचित. कुठे काय लिहावे, बोलावे, वागावे याचे भान नसेल तर समोरच्या माणसाचे गैरसमज होणारच. अर्थात दोष त्या गैरलेखन्/वर्तन करणार्‍या व्यक्तीचाच आहे.
काय जोगळेकर डायरेक्ट घरातच एंट्रि मारलानीत.. :Sp माझ्या स्माईली टाकण्या मागे तुम्हि हात-पाय नाहितर अंघोळ करुनच मागे लागलात..भले आमच्या स्माईलीने जर तुमचा इतका 'उष्मा' वाढतो हे कळले असते तर मी ती टाकली नसती हो मित्राची काळजी वाटते ना... पण आपल्या क्रियेला तशाच प्रतीक्रियाहि येउ शकतात हे हि विसरु नये :)
या आरोपास काही अन्य आधार आहे काय ? की एखाद दुसरे उदाहरण पाहून तुम्ही जनरलायझेशन केले. तसे जर असेल तर तर तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात त्या जातीची माणसे अत्यंत हीन मनोवॄत्तीची असतात असे म्हणावे लागेल.
पहिली गोष्ट हा आरोप नसून वस्तूस्थिती आहे,पुरावे हवे असल्यास इथेच देतो, आणी तसा पुरावा कर्वेंच्या संदर्भात आलाहि आहे दुसरी गोष्ट "तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात त्या जातीची माणसे अत्यंत हीन मनोवॄत्तीची असतात असे म्हणावे लागेल." असे बोललात ठिक पण खरेच माझी 'जात' माहित पडली तर खजील होऊ नका हं, असो बाकि असे म्हणल्यावर कुणाची मनोवॄत्ती 'हीन' आहे हे सुज्ञास सांगणे न लगे. निदान मी तरी ब्राह्मण जातीची माणसे अत्यंत हीन मनोवॄत्तीची असतात असे म्हटलेले नाहि आणी म्हणनारहि नाहि कारण आमची बुध्दि इतकी अल्प आणी उथळ नक्किच नाहि अशी माणसे हि प्रत्येक जाती -धर्मात आहेत यावर माझा तरि विश्वास आहे,
बामण म्हणजे कोण ? ही ब्राम्हण या जमातीस दिलेली शिवी आहे काय ? हीच या अ‍ॅनालॉजी लावायची असेल तर महारांना 'म्हारड्या' आणि चांभारांना 'चांभारड्या' म्हणणे हीसुद्धा शिवीगाळ ठरणार नाही. मला स्वतःला तरी या जातीवाचक शिव्याच वाटतात. (आमचे इथले काही अत्यंत सभ्य भाषेत लिहिलेले प्रतिसाद उडवणार्‍या संपादकांनी ही बाब लक्षात घ्यावी.)
बामण हा शब्द शिवी सारखा आहे काय? तुम्हाला या जातीवाचक शिव्या वाटतात???? जरा स्पष्टिकरण द्या. असे कुणा कुणाला वाटतेय? माझ्या लेखी ते टंकायला सोपे जाते एवढाच आहे. पण तुम्हि तुमच्या बुध्दिने तुम्हाला हवे तसे शोध लावता आणी भलतीच अ‍ॅनालॉजी काढता, त्यात इतर जातींनाहि खेचता.... :O तुमच्या बुध्दिची कीव करावी तेवढि कमीच.. यावरुन आपल्यावर किती उच्च कोटीतल संस्कार झालेत हेच स्पष्ट दिसत आहे. आणी याच कारणा वरुन तुमचे इथले काही अत्यंत सभ्य भाषेत लिहिलेले प्रतिसाद संपादकांनी उडवीले असतील तर हि बाब नक्किच लक्षात घेण्यासारखी आणी गंभीर अशीच आहे. :) आमच्या सुदैवाने आणी तुमच्या दुर्दैवाने आमच्यावर असा प्रसंग आलेला नाहि, आणी तो न यावा यासाठी आम्हिहि काळजी घेतो उगाच स्वतःला हुश्शार समजुन घेण्यात अर्थ नाहि,
तुम्ही कोणत्या पुतळ्याबाबत बोलत आहात. तुम्ही एखादा पुतळा काढला आहे काय ? आणि त्यावरुन मी कधी आकांडतांडव केले? माझे हसे होत आहे असे तुम्ही म्हणता आहात प्रत्यक्षात या संस्थळावर 'अजातशत्रू' ही एक शिवी झाली याचा तुम्हाला अंदाज आहे काय ?
तुम्हाला आणी तुमच्या घाणेरड्या कंपुला 'अजातशत्रू' ही एक शिवी झाली याचा आम्हाला अंदाज आला आहे तरि त्याने काय फरक पडतो? निदान मला तरी पडत नाहि :) तशा इथे शिव्या जाहिरपणे देणारे आहेतच कि, मग त्यात नवल ते काय? जे शब्द सामान्यपणे सार्वजनीक ठिकाणी वापरु नये असे शब्द वापरणारेहि आहेत. इथल्या कंपुबाजांना काहि लेखकांचे लेखन हे भिकार,फालतु,विटलेले,टाकाऊ वाटते (ते आणी त्यांचे विचार कितीहि भिकार असले तरिहि) तसे इथला सभासदहि वाटल्यास आश्चर्य नको,
तुम्ही नेहमीप्रमाणे मुद्द्याला सोडून भलतेच काहीतरी लिहिले त्यामुळे गोंधळ निस्तरला जाण्याची शक्यताच नाही.
मुळ मुद्दे सोडून फुटकळ वाद घालणे (स्मायली वगैरे) यामुळे तुमचा गोंधळ निस्तरला जाण्याची शक्यताच नाहीच नाहि.
पण तुम्हाला इथले सदस्य ( मी सोडून ) फारच कमी महत्व देतात हे ल्क्षात आले आहे काय ?
मला तुम्हि 'एकटेच' महत्व देत आहात हे हि नसे थोडके, कौरवांशी लढताना श्रीकृष्णहि एकटाच अर्जुनाच्या बाजुने होता नाहि का... आता म्हणून मी स्वतःला अर्जुन समजण्याचा मुर्खपणा करनार नाहि ह, आणी तुम्हाला श्रीकृष्ण याची तर सुतराम शक्यता नाहि.
फालतू लिखाण तज्ञांना वाचायला देउन त्यांचा वेळ मी फुकट घालवत नाही.
बरं बुवा राह्यलं.. यावर काय प्रतिक्रिया द्यायची तेच कळत नाहि, एकुणच तुमच्या प्रतिक्रियांवर क्षणभर माझाहि गोंधळ उडालाय हे हि खरेच.. मानले तुम्हाला वा जोगळेकर वा.. नाहि एकिकडे तुम्हिच म्हणता ---> आत्ताच माझ्या मित्राला तुमचे प्रतिसाद दाखवले आणि म्हणालो 'काय आचरट असतात रे आपली माणसं ?' यावरुनच काय ते समजून जा. http://www.misalpav.com/node/18004 आणी एकिकडे तुम्हि म्हणता फालतू लिखाण तज्ञांना वाचायला देउन त्यांचा वेळ मी फुकट घालवत नाही :puzzled: असो यावरुन एक कळले बॉ तुमचा 'तो' मित्र कसलातरि 'तज्ञ' आहे.. म्हणजे तुम्हि त्याच्याशी बरिच सल्ला मसलत करत असण्याची शक्यता आहे.. करा करा.. इतकच म्हणेन प्रतिक्रीया देताना थोडा संयम बाळगा....(पाळणा लांबवा ) अर्रर हे काय, आता असे म्हणाल, असु द्या हो, थोडा ताण कमी करण्यासाठी ज्योक सुचला अवांतरः श्री.जोगळेकर आपण वेळच्या वेळीच प्रतिसाद द्यावेत अशी नम्र विनंती आम्हि करणार नाहि केव्हाहि द्या हरकत नाहि. तुम्हि हा प्रतिसाद द्यायला मुद्दामहून वेळ लावलात असेहि म्हणनार नाहि. कारण मी उत्तराची वाट पाहतच असतो आणि कंटाळून विषय/धागा सोडूनहि देत नाहि, जसे काहि अती-प्रगल्भ विचारवंतां प्रमाणे तुम्हाला समजत नाहि/ तुम्हि द्वेष्टे/ तुमचा अभ्यास नाहि/ तुमच्या विचारांची दिशा योग्य नाहि असे म्हणून आम्हि चर्चेतून पळ काढत नाहि अन् काढत नसतो.

In reply to by अजातशत्रु

काय जोगळेकर डायरेक्ट घरातच एंट्रि मारलानीत.. Sick माझ्या स्माईली टाकण्या मागे तुम्हि हात-पाय नाहितर अंघोळ करुनच मागे लागलात..भले आमच्या स्माईलीने जर तुमचा इतका 'उष्मा' वाढतो हे कळले असते तर मी ती टाकली नसती हो मित्राची काळजी वाटते ना... ही जर व्यक्तिगत टीका असेल तर विशिष्ट जातीवर नेम धरुन चिखल उडविणे हीदेखील व्यक्तिगत टीकाच आहे असे मानण्यास प्रत्यवाय नसावा. पण आपल्या क्रियेला तशाच प्रतीक्रियाहि येउ शकतात हे हि विसरु नये आम्च्या क्रियेआधीच तशा प्रतिक्रिया आल्या आहेत. "तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात त्या जातीची माणसे अत्यंत हीन मनोवॄत्तीची असतात असे म्हणावे लागेल." हे माझे मत नाही. तुमची अ‍ॅनालॉजी लावायची झालीच तर असे लिहून त्यानंतर उपरोल्लेखित वाक्य लिहिले आहे. तुम्ही सोयीस्कररीत्या वाक्याचा हवा तो भाग उचललात. असे बोललात ठिक पण खरेच माझी 'जात' माहित पडली तर खजील होऊ नका हं, तुमची जात माहीत झाल्यामुळे खजील व्हायची वेळ येणार नाही. तशी वेळ कदाचित जातिभेद मानणार्‍या आणि आपली माणसे हा कन्सेप्ट मानणृया लोकांवर येऊ शकते हे मात्र खरे. हां जातपात मानणारी तुमच्यासारखी मराठी तसेच भारतीय माणसे पाहून नित्यच खजील व्हायची वेळ येत असते हे मात्र खरे. निदान मी तरी ब्राह्मण जातीची माणसे अत्यंत हीन मनोवॄत्तीची असतात असे म्हटलेले नाहि आता तुम्ही तसे म्हणाल्याने अगर न म्हणाल्याने काहीच फरक पडणार नाही. जे सिद्ध व्यायचे ते झालेच आहे. आणी म्हणनारहि नाहि कारण आमची बुध्दि इतकी अल्प आणी उथळ नक्किच नाहि बुद्धी अल्प नाही हे जाणवले आहे. आणि वॄत्ती काय दर्जाची आहे हेही जाणवले आहे. बामण हा शब्द शिवी सारखा आहे काय? तुम्हाला या जातीवाचक शिव्या वाटतात???? जरा स्पष्टिकरण द्या हो. जर ब्राम्हण ऐवजी बामण हा शब्द वापरला जात असेल तर तो शिवीसारखा आहे. किंबहुना ती शिवीच आहे. असे कुणा कुणाला वाटतेय? कोणा कोणाला असे वाटते यामुळे काय फरक पडतो. त्यामुळे वस्तुस्थिती बदलते का ? तुमच्या बुध्दिची कीव करावी तेवढि कमीच. यावरुन आपल्यावर किती उच्च कोटीतल संस्कार झालेत हेच स्पष्ट दिसत आहे. अधिक कीव करण्यासाठी शुभेच्छा. आणी याच कारणा वरुन तुमचे इथले काही अत्यंत सभ्य भाषेत लिहिलेले प्रतिसाद संपादकांनी उडवीले असतील तर हि बाब नक्किच लक्षात घेण्यासारखी आणी गंभीर अशीच आहे. आमच्या सुदैवाने आणी तुमच्या दुर्दैवाने आमच्यावर असा प्रसंग आलेला नाहि, प्रतिसाद उड्वले जाणे, न जाणे, लिहाणाचा दर्जा या गोष्टीचा आणि प्रतिसादामधल्या कंटेन्टचा संबंध बर्‍याच वेळा नसतोच. या बाबतीत तुमचा अभ्यास कमी पडत आहे. तुम्हाला आणी तुमच्या घाणेरड्या कंपुला 'अजातशत्रू' ही एक शिवी झाली याचा आम्हाला अंदाज आला आहे तरि त्याने काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव करुन दिली इतकेच. कोशात लपून राहण्यापेक्षा जरा चारचौघा सदस्यांच्या संपर्कात राहात चला म्हणजे थोडासा अंदाज येईल. बाकी माझा कंपू आहे हे नव्यानेच कळले. याही बाबतीत अभ्यास वाढवा. श्री.जोगळेकर आपण वेळच्या वेळीच प्रतिसाद द्यावेत अशी नम्र विनंती आम्हि करणार नाहि केव्हाहि द्या हरकत नाहि. आभार. याकरताच थेट खरडवहीमध्येच उत्तर लिहून पाठवले.

In reply to by अजातशत्रु

म्हणुन आम्हि रामदास(आठवले न्हवे) पेक्षा बाजी प्रभुंना महत्व देतो निदान त्यांनी खिंड तरी लढवली आम्ही समर्थ रामदास आणि बाजीप्रभू दोघांनाही महत्व देतो. फक्त लढाई लढुन स्वराज्य राखणाराच तेवढा महत्वाचा असा गैरसमज करुन घेण्याइतपत सुदैवाने आमची बुद्ध भ्रष्ट झालेली नाही. आणी सुदैवाने समाजातला मोठा घटक तसे मानत नाही. तुम्ही काय म्हणता हे खरेच महत्वाचे नाही. चार गाढवे (म्हणजे तुम्ही किंवा कोणी एक विशिष्ट जातीचे लोक नाही म्हणत हा मी. एकुणच मुर्खांबद्दल बोलतो आहे) एकत्र येउन रेकली म्हणजे वेद प्रसवतात असे मला तरी वाटत नाही. "निदान त्यांनी खिंड तरी लढवल" या शब्दाला माझा आक्षेप आहे. बाजीप्रभूंनी जे काम केले ते "निदान" किंवा "किमान" या वर्गात मोडत नाही. त्यांच्याएवढे धैर्य फार कमी लोक दाखवू शकतात. शिवाय समर्थ रामदासांनी त्यामानाने काहीच केले नाही असा जो अर्थ त्यातुन ध्वनित होतो आहे तोच अर्थ जर तुम्हाला अभिप्रेत असेल तर देव तुमचे भले करो. आणि कुठल्याही समाजाच्या लोकांनी काय केले हा प्रश्न विचारण्यापुर्वी स्वतः आरसा बघावा हे उत्तम.

In reply to by मृत्युन्जय

सुदैवाने समाजातला मोठा घटक
हा मोठा समाजघटक कोणता ते स्पष्ट कराल काय?
आम्ही समर्थ रामदास आणि बाजीप्रभू दोघांनाही महत्व देतो. फक्त लढाई लढुन स्वराज्य राखणाराच तेवढा महत्वाचा असा गैरसमज करुन घेण्याइतपत सुदैवाने आमची बुद्ध भ्रष्ट झालेली नाही. आणी सुदैवाने समाजातला मोठा घटक तसे मानत नाही. तुम्ही काय म्हणता हे खरेच महत्वाचे नाही. चार गाढवे (म्हणजे तुम्ही किंवा कोणी एक विशिष्ट जातीचे लोक नाही म्हणत हा मी. एकुणच मुर्खांबद्दल बोलतो आहे) एकत्र येउन रेकली म्हणजे वेद प्रसवतात असे मला तरी वाटत नाही.
या वरुन आठवले ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले अशी एक लोक भावना आहे खरे खोटे माहित नाही कारण त्यावर तांत्रीक द्रुष्ट्या त्यास काहिंचा आक्षेप असल्यामुळे, शाहजोगपणे ते नंतर प्रक्षेपीत केले गेले आहे,असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते,(सिनेमात तर होते, आणी ती भिंतही चालवली असे पण दाखवले आहे) हे सांगायचा मुद्दा इतकाच की वेद हे अपौरुषीय आहेत असे धर्मशास्त्रात म्हटले आहे त्यामुळे ते कुणा गाढवा वा रेड्याच्या रेकन्याने प्रसवने अशक्यच, असेच डुकरे एकत्र येउन रेकली म्हणजे वेद प्रसवतात असे मला वाटत नाही त्यामुळे डुकरांच्या डुरकण्याने जरी ते प्रसवले असतील तरी त्यात सामान्य जनतेचे हित नसणार याची अतीशय खात्री आहे/ असेल. त्यामुळे त्याबद्दल गैरसमज करुन घेण्याइतपत सुदैवाने आमची बुध्दि भ्रष्ट आणी संघिष्ट झालेली नाही, बाकी आमचे भले करणारा आहे 'वर' त्यामुळे चिंता नसावी :) !! विठ्टल विठ्टल विठ्टल..!!

In reply to by अजातशत्रु

हा मोठा समाजघटक कोणता ते स्पष्ट कराल काय? या धाग्यावर तुमच्या मताचे किती आणि विरुद्ध मताचे किती यावरुनच मोठा समाजघटक कुठला आणि चूटा समाजघटक कुठला हे कळॅल तुम्हला या वरुन आठवले ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले अशी एक लोक भावना आहे खरे खोटे माहित नाही कारण त्यावर तांत्रीक द्रुष्ट्या त्यास काहिंचा आक्षेप असल्यामुळे, शाहजोगपणे ते नंतर प्रक्षेपीत केले गेले आहे,असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते,(सिनेमात तर होते, आणी ती भिंतही चालवली असे पण दाखवले आहे) आक्षेप असणार्‍यांचचा कशावरही असतो. जेम्स लेन चा नव्हता का काही गोष्टींवर आक्षेप? मुर्ख लोक म्हणुन सोडुन द्यायचे. लोक तर असेही म्हणतात की राम कृष्ण असे कोणीच नव्हते. अशी अस्त्रे शस्त्रे नव्हती. सुदर्शन नव्हते. महाभारत खरे नाही. शाहजोगपणे ते नंतर प्रक्षेपीत केले गेले आहे,असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते,( बी आर चोप्रांच्या मालिकेतर तर होते, आणी ते सुदर्शनही चालवले असे पण दाखवले आहे). महाराजांची भवानी तलवारही भवानीमातेने दिली नव्हती म्हणतात. पण चित्रपटात तर दाखवली आहे बाबा ती तलवार. हे सांगायचा मुद्दा इतकाच की वेद हे अपौरुषीय आहेत असे धर्मशास्त्रात म्हटले आहे त्यामुळे ते कुणा गाढवा वा रेड्याच्या रेकन्याने प्रसवने अशक्यच, चला एवढे कळते हे काय कमी आहे. असेच डुकरे एकत्र येउन रेकली म्हणजे वेद प्रसवतात असे मला वाटत नाही त्यामुळे डुकरांच्या डुरकण्याने जरी ते प्रसवले असतील तरी त्यात सामान्य जनतेचे हित नसणार याची अतीशय खात्री आहे/ असेल. एक अजुन उपमा राहिलीच की गांडुळांच्या वळवळण्याने पण ते प्रसवणार नाहीत. त्यामुळे त्याबद्दल गैरसमज करुन घेण्याइतपत सुदैवाने आमची बुध्दि भ्रष्ट आणी संघिष्ट झालेली नाही, हॅ हॅ हॅ. बाकी आमचे भले करणारा आहे 'वर' त्यामुळे चिंता नसावी सगळ्यांचे भले करणारा वरच आहे.

In reply to by मृत्युन्जय

या धाग्यावर तुमच्या मताचे किती आणि विरुद्ध मताचे किती यावरुनच मोठा समाजघटक कुठला आणि चूटा समाजघटक कुठला हे कळॅल तुम्हला
हा कसला निष्कर्ष? :stare: इथे प्रतिसाद देणारे प्रतिसाद करते हे वेग वेगळ्या समाज घटकांमधून येत असले तरि ते त्या त्या समाजाचे नेतृत्व करतात असा आहे काय? असे वाटत नाहि. हे म्हणजे पुढारी असल्या सारखे झाले,पण तसे त्या त्या विशिष्ट समाजाच्या पुढार्‍यांना तरी आप आपल्या समाजातून असा कितीसा पांठीबा मिळतो? समाजचे नेतृत्व करणार्‍या पुढार्‍यांच्या मताशी त्याचा समाज सहमत असेलच असे नाहि किंबहूना तो नसतो हि... त्यामुळे तुमचा मोठा समाज घटक हा मुद्दा स्पष्ट होत नाहि किंवा तो आणखी स्पष्ट करावा.
लोक तर असेही म्हणतात की राम कृष्ण असे कोणीच नव्हते. अशी अस्त्रे शस्त्रे नव्हती. सुदर्शन नव्हते. महाभारत खरे नाही. शाहजोगपणे ते नंतर प्रक्षेपीत केले गेले आहे,असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते,( बी आर चोप्रांच्या मालिकेतर तर होते, आणी ते सुदर्शनही चालवले असे पण दाखवले आहे). महाराजांची भवानी तलवारही भवानीमातेने दिली नव्हती म्हणतात. पण चित्रपटात तर दाखवली आहे बाबा ती तलवार.
यावर चर्चा दुसर्‍या धाग्यात होउ शकते/ करुयात..... बाकी टि.वी.सिरीयल पाहून बाल मनावर परीणाम होतात ते खरंच आहे तर, (मी जो वर प्रतिसाद दिला होता तो तुमच्या सारख्यांसाठीच हो..कारण आम्हि रेडा,भिंत या गोष्टिंवर वर विश्वास ठेवत नाहि)
चला एवढे कळते हे काय कमी आहे.
आम्हाला सत्य काय आहे तेच कळते इतरांचे माहित नाहि.
आक्षेप असणार्‍यांचचा कशावरही असतो. जेम्स लेन चा नव्हता का काही गोष्टींवर आक्षेप? मुर्ख लोक म्हणुन सोडुन द्यायचे.
हे समजले नाहि,जेम्स लेन चा आक्षेप कशावर होता???(दादोजि/दादोजिच्या पुतळ्यावर की शिवाजी महाराजांवर??) प्लिज जरा त्या काही गोष्टी स्पष्ट कराल काय?
एक अजुन उपमा राहिलीच की गांडुळांच्या वळवळण्याने पण ते प्रसवणार नाहीत
चर्चा आता किड्या-मुंग्याच्या दिशेने वळली आहे असे दिसतेय तेव्हा तुमच्या पुरते थांबावे म्हणतो, पुढच्या पौराणीक / धार्मीक / ऐतिहासीक सिरीयल/ चित्रपटांसाठी शुभेच्छा..!!!! ( रजनीकांत=रोबो भक्त )

In reply to by अजातशत्रु

एक विनंती आहे.... टेक्नीकल प्रॉब्लेम मुळे माझे एका पेक्षा जास्त प्रतिसाद येत आहेत कृपया अनावश्यक जास्तीचे उडवावे.... धन्यवाद...!!

In reply to by अजातशत्रु

हा कसला निष्कर्ष? इथे प्रतिसाद देणारे प्रतिसाद करते हे वेग वेगळ्या समाज घटकांमधून येत असले तरि ते त्या त्या समाजाचे नेतृत्व करतात असा आहे काय? असे वाटत नाहि. हे म्हणजे पुढारी असल्या सारखे झाले,पण तसे त्या त्या विशिष्ट समाजाच्या पुढार्‍यांना तरी आप आपल्या समाजातून असा कितीसा पांठीबा मिळतो? समाजचे नेतृत्व करणार्‍या पुढार्‍यांच्या मताशी त्याचा समाज सहमत असेलच असे नाहि किंबहूना तो नसतो हि... त्यामुळे तुमचा मोठा समाज घटक हा मुद्दा स्पष्ट होत नाहि किंवा तो आणखी स्पष्ट करावा. मिपा हे ब्राह्मणी संकेतस्थळ आहे असे वाटते की काय तुम्हाला? नाही म्हणाजे इथल्या बहुजनांची मते तुम्हाला मान्य अ नाहीत. तुमची स्व्त:चीच मते फक्त मान्य आहेत असे दिसते. रामदास आठवले झालाय तुमचा. बाकी तुम्ही समाजाचा मोठा घटक म्हणजे काय असे विचारले होते. त्याचे मुद्दे मान्य करावेत की करु नये हा वेगळा मुद्दा. सध्यातरी तुमच्या मताचे फारसे लोक नाहीत इथे. आणि बाहेरही कितीही शिमगा केला तर ब्राह्मणाद्वेष या एका मुद्द्यावर उभे असलेले लोकच केवळा तुमच्या मागे येतील. खेडेकर आणी ब्रिगेडी हे येडे आहेत. ते कोणाला पाठिंबा देतात त्याने आम्हाला फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचा पाठिंबा असेल तर मज्जा आहे. माझा मोठा समाज जा मुद्दा आधीच स्पष्ट झाला आहे. तो तुम्हाला अजुन झेपला नसेल तर डोळ्यावरची झापडे काढा. यावर चर्चा दुसर्‍या धाग्यात होउ शकते/ करुयात..... मला काय. तुम्ही म्हणाल तिथे करुयात. मुद्दा तुम्हीच सुरु केलात. तुम्हालाच पळून जायचे असेल तर खुशाल जा. ना कोणाची आहे. शिवाजी महाराजांच्या भवानीमातेने दिलेल्य तलवारीबद्दल तुमचे मत नाही सांगितलेत? बाकी टि.वी.सिरीयल पाहून बाल मनावर परीणाम होतात ते खरंच आहे तर, तुमच्या मनावर खुपच झालेला दिसतो. साधारण मणसे मोठी झाल्यावर त्यांच्या मनावरचे आघात कमी होतात. मोठे व्हा. (मी जो वर प्रतिसाद दिला होता तो तुमच्या सारख्यांसाठीच हो..कारण आम्हि रेडा,भिंत या गोष्टिंवर वर विश्वास ठेवत नाहि) मी पणा तुमच्यासारख्यांसाठीच प्रतिसाद दिला आहे हो. शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारी बद्दल जाणुन घेण्यास उत्सुक आहे. आणि कृष्णाच्या सुदर्शनाबद्दलही. की फक्त ब्रह्मणांनी रेड्याच्या मुखातुन वेद म्हणवण्यावर विश्वास नाही तुमचा. मुळात वेद अपौरेषेय आहेत असे म्हणतात त्यावर त्मचे मत काय? असो अजुन एकदा मोठे व्हा आम्हाला सत्य काय आहे तेच कळते इतरांचे माहित नाहि. तुम्ही बोलता तेच फक्त सत्य असे वाटते हे दुर्दैव. जौद्यात तुम्ही मोठे व्हाल असे वाटत नाही. सोडुन द्या. हे समजले नाहि,जेम्स लेन चा आक्षेप कशावर होता???(दादोजि/दादोजिच्या पुतळ्यावर की शिवाजी महाराजांवर??) प्लिज जरा त्या काही गोष्टी स्पष्ट कराल काय? जेम्स लेनचा आक्षेप कशावर होता माहित नाही तुम्हाला? मग विरोध कशाला करत होतात? चर्चा आता किड्या-मुंग्याच्या दिशेने वळली आहे असे दिसतेय तेव्हा तुमच्या पुरते थांबावे म्हणतो, का डुकरे आवडतात पणा गांडु ळे आवडत नाहीत का? पुढच्या पौराणीक / धार्मीक / ऐतिहासीक सिरीयल/ चित्रपटांसाठी शुभेच्छा..!!!! पुढच्या जातीय, विद्वेषी, विध्वंसक कल्पनापटांसाठी आणि इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी तुम्हाला शुभेच्छा. पराचा धागा आठ्वुन अंमळ हळवा झालो.

In reply to by मृत्युन्जय

मिपा हे ब्राह्मणी संकेतस्थळ आहे असे वाटते की काय तुम्हाला? नाही म्हणाजे इथल्या बहुजनांची मते तुम्हाला मान्य अ नाहीत. तुमची स्व्त:चीच मते फक्त मान्य आहेत असे दिसते. रामदास आठवले झालाय तुमचा. बाकी तुम्ही समाजाचा मोठा घटक म्हणजे काय असे विचारले होते. त्याचे मुद्दे मान्य करावेत की करु नये हा वेगळा मुद्दा. सध्यातरी तुमच्या मताचे फारसे लोक नाहीत इथे. आणि बाहेरही कितीही शिमगा केला तर ब्राह्मणाद्वेष या एका मुद्द्यावर उभे असलेले लोकच केवळा तुमच्या मागे येतील. खेडेकर आणी ब्रिगेडी हे येडे आहेत. ते कोणाला पाठिंबा देतात त्याने आम्हाला फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचा पाठिंबा असेल तर मज्जा आहे.
मिपा हे ब्राह्मणी संकेतस्थळ आहे असे मी तरी म्हटलेले नाही, माझी मते योग्य प्रमाण देऊन खोडली तर ती बदलायला मी तयार आहे किंबहुना ती खरी की खोटी या पडताळ्यासाठीच संस्थळावर आहे..हे स्विकारण्या इतके आम्हि तरी प्रामाणीक आणी सहिष्णु नक्किच आहोत, आमचा रामदास आठवले झालाय म्हणजे नेमकं काय झालं ते स्पष्ट करा, मी समाजाचा मोठा घटक म्हणजे काय असे विचारले होते. त्याचे मुद्दे मान्य करावेत की करु नये हा वेगळा मुद्दा असला तरी मि किंवा तुम्हि आपआपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहि जसे मी कुठल्या तरि समाजातून आलो असलो तरी माझि मते हि वैयक्तिक स्वरुपातील आहेत आणी त्याच्याशी माझा समाजहि सहमत असेलच असे नाहि तसेच तुम्हि ज्या समाजातुन आलात तो समाज देखिल तुमच्या वैयक्तिक मतांशी सहमत असेलच असे नाहि,म्हणुनच तसे म्हटले होते, त्यात तुम्हिच गल्लत केलीय, पक्षि तुम्हि जर या मतांशी सारेच मिपाकर सहमत असतीलच असे नाहि असे म्हणला असतात तर ते योग्य होते,पण तुम्हि इथे असणारे म्हणजे तो मोठा समाज अशी मनाची समजुत करुन घेतलेली दिसतेय, त्यामुळे तुम्हि म्हणता म्हणून मोठा समाज घटक हा मुद्दा आधीच स्पष्ट झाला आहे.हे तुमचे चुकिचं वैयक्तिक मत/समज आहे :) त्यामुळे माझा मुद्दा अजुन झेपला नसेल तर डोळ्यावरची झापडे काढा. असे मि म्हणनार नाहि.. फार तर लगे रहो एवढच म्हणु शकेन,
"मला काय. तुम्ही म्हणाल तिथे करुयात. मुद्दा तुम्हीच सुरु केलात. तुम्हालाच पळून जायचे असेल तर खुशाल जा. ना कोणाची आहे. शिवाजी महाराजांच्या भवानीमातेने दिलेल्य तलवारीबद्दल तुमचे मत नाही सांगितलेत?" "मी पणा तुमच्यासारख्यांसाठीच प्रतिसाद दिला आहे हो. शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारी बद्दल जाणुन घेण्यास उत्सुक आहे. आणि कृष्णाच्या सुदर्शनाबद्दलही. की फक्त ब्रह्मणांनी रेड्याच्या मुखातुन वेद म्हणवण्यावर विश्वास नाही तुमचा. मुळात वेद अपौरेषेय आहेत असे म्हणतात त्यावर त्मचे मत काय? असो अजुन एकदा मोठे व्हा"
यास वेगळं मत द्यायची गरज आहे काय ते ओघाने आलेच ज्यांना स्वतःची मतं निट माडता येत नाहित त्यांना इतरांच्या मतांमध्ये भारी इंटरेस्ट असतो. "फक्त ब्रह्मणांनी रेड्याच्या मुखातुन वेद म्हणवण्यावर विश्वास नाही तुमचा" मि ज्ञानेश्वर म्हणले होते ब्राह्मणांनी न्हवे ते एक वचन होते तुम्हि अनेक वचनात बोलत आहात म्हणजे ज्ञानेश्वरांचे अनेक वचन ब्राह्मणे/ब्राह्मणांनी असं आहे काय? दुसरे मी ती एक लोक भावना आहे खरे खोटे माहित नाही कारण त्यावर तांत्रीक द्रुष्ट्या काहिंचा आक्षेप आहे असे म्हणले आहे माझा स्वतःचा आक्षेप म्हणालो नाहि बरे. तुम्हि स्वतःची मतं आमच्यावर लादत आहात त्यामुळे इथे कुणाचा काय झालाय ते आपले आपण ठरविणे इष्ट, :)
तुम्ही बोलता तेच फक्त सत्य असे वाटते हे दुर्दैव. जौद्यात तुम्ही मोठे व्हाल असे वाटत नाही. सोडुन द्या.
असेहि मी कुठेच म्हणले नाहि आणी म्हणतहि नाहि :) आम्हाला सत्य काय आहे तेच कळते इतरांचे माहित नाहि.त्यामुळे आम्हि बोलतो तेच सत्य असा आमचा फाजिल हट्ट नाहि.
जेम्स लेनचा आक्षेप कशावर होता माहित नाही तुम्हाला? मग विरोध कशाला करत होतात?
जेम्स लेनचा आक्षेप कशावर होता हे मी तुम्हाला विचारलेय त्याचे उत्तर देऊन खरे तर आमचे ज्ञान वाढवायचे सोडून तुम्हि स्वतःची मतं चक्क आमच्यावर लादत आहात मि कोणत्या गोष्टिंना विरोध केला हे तरि समजते का तुम्हाला?
का डुकरे आवडतात पणा गांडु ळे आवडत नाहीत का?
तसे आम्हाला गाय पण आवडते, परंतू याचा अर्थ गैरसोय झाली की काहि प्रगल्भ विचारवंतां प्रमाणे तुम्हाला समजत नाहि/ तुम्हि द्वेष्टे/ तुमचा अभ्यास नाहि/ तुमच्या विचारांची दिशा योग्य नाहि असे म्हणून आम्हि चर्चेतून पळ काढत नसतो, त्यासाठी वेगळा धागा काढावा तिथे चर्चा केली जाईल पण त्याना इथे आणुन वेगळी सर्कस कशाला म्हणून तसे म्हणले होते,
पुढच्या जातीय, विद्वेषी, विध्वंसक कल्पनापटांसाठी आणि इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी तुम्हाला शुभेच्छा. पराचा धागा आठ्वुन अंमळ हळवा झालो.
इतके हळवे होऊ नका,जमिनीवर या,तुमच्यात फारच गोंधळ झालेला दिसत आहे, तुम्हि प्रत्येक वाक्यात आम्हाला मोठे व्हा मोठे व्हा असे फुकटचे सल्ले दिले आहेत,ते कशासाठी, नाहि आम्हि जसे आहोत तसे पुरेसे आहोत नाहितर मोठे होवून जर विचारलेले प्रश्न समजत नसतील आणी उत्तरे देता येत नसतील तर काय चुलित घालायचाय असला मोठेपणा. तुम्हि मोठे आहात तेच पुरेसे आहे आम्हि लहाणच बरे बुवा, फक्त पुढच्या वेळी प्रतिसाद देताना अगोदर दिलेल्या प्रतिक्रिया निट काळजी पुर्वक वाचा, आणी कृपया स्वतःची मतं हि स्वतःपुरतीच मर्यादित ठेवा ती इतरांवर लदण्याचा प्रयत्न करु नका म्हणजे आपल्या दोघांचा वेळ वाचेल कशे. :)

In reply to by अजातशत्रु

मिपा हे ब्राह्मणी संकेतस्थळ आहे असे मी तरी म्हटलेले नाही, माझी मते योग्य प्रमाण देऊन खोडली तर ती बदलायला मी तयार आहे किंबहुना ती खरी की खोटी या पडताळ्यासाठीच संस्थळावर आहे..हे स्विकारण्या इतके आम्हि तरी प्रामाणीक आणी सहिष्णु नक्किच आहोत, मते खोटी आहेत. प्रश्न मिटला. बाकी आम्ही म्हणजे कोण? तुम्ही कोणाला रिप्रेसेझेंट करता? तुमच्याकडे नायकपद कोणी दिले? की आम्ही हे आदरार्थी बहुवचन आहे स्वतःसाठी? आमचा रामदास आठवले झालाय म्हणजे नेमकं काय झालं ते स्पष्ट करा, मला माफ करा हो. विनोद समजावुन नसतो सांगायचा. मी समाजाचा मोठा घटक म्हणजे काय असे विचारले होते. त्याचे मुद्दे मान्य करावेत की करु नये हा वेगळा मुद्दा असला तरी मि किंवा तुम्हि आपआपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहि जसे मी कुठल्या तरि समाजातून आलो असलो तरी माझि मते हि वैयक्तिक स्वरुपातील आहेत आणी त्याच्याशी माझा समाजहि सहमत असेलच असे नाहि तसेच तुम्हि ज्या समाजातुन आलात तो समाज देखिल तुमच्या वैयक्तिक मतांशी सहमत असेलच असे नाहि,म्हणुनच तसे म्हटले होते, त्यात तुम्हिच गल्लत केलीय, सगळे जग मुर्ख आहे मीच एकटा शहाणा असे म्हणणार्‍या माणसाला काय म्हणतात माहिती आहे का हो तुम्हाला? पक्षि तुम्हि जर या मतांशी सारेच मिपाकर सहमत असतीलच असे नाहि असे म्हणला असतात तर ते योग्य होते,पण तुम्हि इथे असणारे म्हणजे तो मोठा समाज अशी मनाची समजुत करुन घेतलेली दिसतेय, सॅम्पल सर्व्हे हा प्रकार कधी ऐकलाय का हो तुम्ही? त्यामुळे तुम्हि म्हणता म्हणून मोठा समाज घटक हा मुद्दा आधीच स्पष्ट झाला आहे.हे तुमचे चुकिचं वैयक्तिक मत/समज आहे असा तुमचा समज आहे. त्यामुळे माझा मुद्दा अजुन झेपला नसेल तर डोळ्यावरची झापडे काढा. असे मि म्हणनार नाहि.. फार तर लगे रहो एवढच म्हणु शकेन, चला उपरोधाने का होइना एक बरोबर गोष्ट बोललात ते काय कमी आहे? यास वेगळं मत द्यायची गरज आहे काय ते ओघाने आलेच ज्यांना स्वतःची मतं निट माडता येत नाहित त्यांना इतरांच्या मतांमध्ये भारी इंटरेस्ट असतो. हॅ हॅ हॅ. तुम्ही इथे इतरांची मते जाणुन घ्यायलाच आला आहात ना? नाही म्हणजे तुम्ही असे तुमच्याच प्रतिक्रियेत लिहिले आहे. तुम्हाला नाहीच आठवणार म्हणा म्हणुन अधोरेखित करुन देतो इथेचः माझी मते योग्य प्रमाण देऊन खोडली तर ती बदलायला मी तयार आहे किंबहुना ती खरी की खोटी या पडताळ्यासाठीच संस्थळावर आहे तुमच्याच युक्तीवादाप्रमाणे तुम्हालाच तुमची मते नीट मांडता येत नाहीत. "फक्त ब्रह्मणांनी रेड्याच्या मुखातुन वेद म्हणवण्यावर विश्वास नाही तुमचा" मि ज्ञानेश्वर म्हणले होते ब्राह्मणांनी न्हवे ते एक वचन होते तुम्हि अनेक वचनात बोलत आहात म्हणजे ज्ञानेश्वरांचे अनेक वचन ब्राह्मणे/ब्राह्मणांनी असं आहे काय? तुम्हाला शब्दाचा अर्थ कळत नाही काय? ज्ञानेश्वर ब्राह्मण असल्याने त्यांनी रेड्याच्या मुखातुन वेद म्हणवण्यावर विश्वास नाही तुमचा असे मी विचारले एवढे साधे तुम्हाला कळले नाही असे वाटत नाही. नसेल कळले तर ..... हॅ हॅ हॅ. बर आता बोला. भवानी तलवारीबद्दल आणि महाराजांना ती भवानी मातेने दिली होती त्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे. महाराजांना भवानी माता तलवार देउ शकते तर ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या मुखातुन वेद वदवुन घेउ शकतात यात शंका घेण्यासारखे काय आहे? दुसरे मी ती एक लोक भावना आहे खरे खोटे माहित नाही कारण त्यावर तांत्रीक द्रुष्ट्या काहिंचा आक्षेप आहे असे म्हणले आहे माझा स्वतःचा आक्षेप म्हणालो नाहि बरे. तुम्हि स्वतःची मतं आमच्यावर लादत आहात त्यामुळे इथे कुणाचा काय झालाय ते आपले आपण ठरविणे इष्ट, जेम्स लेन जे काही खोडसाळपणे म्हणाला तीही एक लोक भावना आहे खरे खोटे माहित नाही असेच म्हणाला होता ते आपल्याला माहिती नाही की काय? तो मुर्ख, नीच, नालायक, निंद्यनीय माणूस लोक भावना, वदंता, खरे खोटे अश्या शब्दांचा आश्रय घेउन असत्य पसरवत होता हे माहिती नाही की काय तुम्हाला? आता कळाले ना कोणाचा काय झालाय? असेहि मी कुठेच म्हणले नाहि आणी म्हणतहि नाहि आम्हाला सत्य काय आहे तेच कळते इतरांचे माहित नाहि.त्यामुळे आम्हि बोलतो तेच सत्य असा आमचा फाजिल हट्ट ना मी खोटारडा नाही फक्त खरे बोलत नाही असे म्हटले काय किंवा मी असत्य कथन करत नाही फक्त सत्याचे मला वावडे आहे असे म्हटले काय. एकच. जेम्स लेनचा आक्षेप कशावर होता हे मी तुम्हाला विचारलेय त्याचे उत्तर देऊन खरे तर आमचे ज्ञान वाढवायचे सोडून तुम्हि स्वतःची मतं चक्क आमच्यावर लादत आहात मि कोणत्या गोष्टिंना विरोध केला हे तरि समजते का तुम्हाला? तुम्ही आधी बेसिक माहिती करुन घ्या. मग तुम्हाला ज्ञानदान देखील करु की. परंतू याचा अर्थ गैरसोय झाली की काहि प्रगल्भ विचारवंतां प्रमाणे तुम्हाला समजत नाहि/ तुम्हि द्वेष्टे/ तुमचा अभ्यास नाहि/ तुमच्या विचारांची दिशा योग्य नाहि असे म्हणून आम्हि चर्चेतून पळ काढत नसतो, त्यासाठी वेगळा धागा काढावा तिथे चर्चा केली जाईल पण त्याना इथे आणुन वेगळी सर्कस कशाला म्हणून तसे म्हणले होते, आता उद्या दाउद येउन आम्हाला म्हणेल की चर्चा करा "हिंदु - एक अडगळ" किंवा "भारत - एक दहशतवादी देश" वगैरे. त्याला लोक थोड्या शिव्या घालतील आणि मग मुर्ख म्हणुन सोडुन देतील. लोकांनी तरी किती स्वतःचा वेळ वाया घालवायचा ना? दाउद्ला दुसरे काही कामच नाही. त्याने त्यचे आयुष्य दहशतवादी कारवाया करण्यात खर्च करायचे ठरवले आहे. त्याला विधायक काही करायचेच नाही आहे. हिंदु मुस्लिमांमध्ये दुही निर्माण करण्यासाठी तो त्याचे जीवन वेचतो आहे. भारताला बरबाद करणे हेच त्याचे एकमेव उद्दिष्ट आहे. जगातल्या सगळ्या शिव्या कमी पडतील इतका तो गलिच्छ आहे. बाकीचे तसे नाहीत ना. आता मूळ मुद्दा. सगळ्या गोष्टी एकमेकांशी संलग्नित आहेत. मुळात सर्कस तुम्ही सुरु केलेली आहे. आता त्यात माकडचाळे चालणार तसेच इतर प्राणीही करामती दाखवणार. मला फक्त माकडचाळे बघायचे आहेत असे म्हणुन कसे चालेल? तुम्हाला ज्या गोष्टी अनुकुल आहेत असे तुम्हाला वाटते त्यावरच फक्त चर्चा कशी व्हावी. इतर संलग्न मुद्दे पण चर्चेत येणारच की इतके हळवे होऊ नका,जमिनीवर या,तुमच्यात फारच गोंधळ झालेला दिसत आहे, तुमच्या धाग्याचा आशय आणि शीर्षक वाचुनच बराच गोंधळ उडला होता. आता काही उरला नाही आहे उलट. तुम्हि प्रत्येक वाक्यात आम्हाला मोठे व्हा मोठे व्हा असे फुकटचे सल्ले दिले आहेत,ते कशासाठी, त्यासाठी तुम्ही मला फी देउ इच्छित असाल तर माझी हरकत नाही. मी आपली एक समाजसेवा म्हणुन फुकट सल्ला दिला. नाहि आम्हि जसे आहोत तसे पुरेसे आहोत नाहितर मोठे होवून जर विचारलेले प्रश्न समजत नसतील आणी उत्तरे देता येत नसतील तर काय चुलित घालायचाय असला मोठेपणा. कुठेही घाला हो आम्हाला काय त्याचे. पण तुम्हला मोठे होवूनही जर विचारलेले प्रश्न समजत नसतील आणी उत्तरे देता येत नसतील "मोठे व्हा" म्हणजे काय ते आधी समजुन घ्या. तुम्हि मोठे आहात तेच पुरेसे आहे आम्हि लहाणच बरे बुवा, तुमची मर्जी फक्त पुढच्या वेळी प्रतिसाद देताना अगोदर दिलेल्या प्रतिक्रिया निट काळजी पुर्वक वाचा, तुम्ही पुढच्या वेळेस लेख लिहिताना (लिहावाच असा आग्रह नाही. उलट नाही लिहिलात तर बरे) सगळ्याच गोष्टी एकदा नीट वाचुन घ्याव्यात हे बरे. आणी कृपया स्वतःची मतं हि स्वतःपुरतीच मर्यादित ठेवा ती इतरांवर लदण्याचा प्रयत्न करु नका य्ग्झॅक्टली. हे तुम्हाला आधीच समजले असते तर ९५ प्रतिक्रिया वाचल्या असत्या. म्हणजे आपल्या दोघांचा वेळ वाचेल कशे त्यापेक्षा मी या धाग्याकडेच दुर्लक्ष करतो ना. किमान माझा वेळ तरी वाचेल.

In reply to by मृत्युन्जय

अरे मृत्युंजय, मित्रा.. कशासाठी वाद घालतो आहेस ? आणि काय उपयोग त्याचा. विचार आणि प्रचार यांतला फरक कळत नाही का तुला? त्यापेक्षा भ्रष्टाचारावर चांगलं चाललंय. :)

In reply to by मृत्युन्जय

सर्व प्रतिसाद उत्तुंग आणि वाचनीय....आयला आम्ही असे लेख/प्रतिसाद लिहायला गेलो कि मिपा सर्वर साथ देत नाही :(

In reply to by मृत्युन्जय

संपादक/संपादक मंडळ यांना नम्र विनंती आहे की एका पेक्षा जास्त डबल डबल आलेले प्रतीसाद उडवावे.. भाग-१ ची चर्चा संपत आली आहे भाग-२ ची तयारी करावी म्हणतो.... अवांतर : यार इतके Panic होऊ नका जरा तटस्थ होऊन विचार करा... कुणाच्या भावना दुखावून मला काय मिळणार आहे ? आणी तुम्हाला तरी? मग चर्चा लेगेच टोका वर न नेता थोडा विचार करा की हे असे प्रश्न का येतात नेहमी चर्चेला? एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका ना.. नेहमी मग हे तुम्हाला माहित नाहि, पटणार नाहि आम्हि हे मानत नाहि हे कशाला ? वाद -विवाद करायला वेळ, ताकद ,बुध्दि लावतो मग ते एकदाचे पटवून द्यायला काय अवघड आहे? आणी जे खरे नाहि जे सिध्द करताच येत नाहि जे घडले नाहि, जे अस्तीत्वातच नाहि हे तरी प्रामाणिक पणे मान्य करा.. बस एवढच सांगणे आहे.. आणी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करा बाबानो.. उप्स बाबा नको साले ढोंगी असतात(अपवाद) मित्रांनो क्षमा असावी.. (कुणाचाहि शत्रु नसलेला)

In reply to by मृत्युन्जय

मते खोटी आहेत. प्रश्न मिटला. बाकी आम्ही म्हणजे कोण? तुम्ही कोणाला रिप्रेसेझेंट करता? तुमच्याकडे नायकपद कोणी दिले? की आम्ही हे आदरार्थी बहुवचन आहे स्वतःसाठी?
यावर सेंसरशीप आहे काय?
आमचा रामदास आठवले झालाय म्हणजे नेमकं काय झालं ते स्पष्ट करा, मला माफ करा हो. विनोद समजावुन नसतो सांगायचा.
रामदास आठवले होणे म्हणजे तुमच्या लेखी विनोद आहे तर.. कै च्या कै रामदासला रामदास ठोसर म्हणले तरि काहिंच्या अंगाचा तिळ पापड होतो मग यापुढे तो विनोद म्हणुन घ्यावा काय? :) मागे एकदा चेपु वर एकाने असा उच्चार केला होता तेव्हा त्यांना रामदास स्वामी म्हणा असे एक जण पोटतीडकिने सांगत होता, हि जबरदस्तीच आहे बुवा..
सॅम्पल सर्व्हे हा प्रकार कधी ऐकलाय का हो तुम्ही?
वडाची साल पिंपळाला..लगे रहो..
सगळे जग मुर्ख आहे मीच एकटा शहाणा असे म्हणणार्‍या माणसाला काय म्हणतात माहिती आहे का हो तुम्हाला?
मुर्ख कोण ते स्वतःच ठरवावे..
तुम्ही इथे इतरांची मते जाणुन घ्यायलाच आला आहात ना? नाही म्हणजे तुम्ही असे तुमच्याच प्रतिक्रियेत लिहिले आहे. तुम्हाला नाहीच आठवणार म्हणा म्हणुन अधोरेखित करुन देतो इथेचः
इथे इतरांची मते जाणुन घ्यायलाच आलो आहे.. "ज्यांना स्वतःची मतं निट मांडता येत नाहित त्यांना इतरांच्या मतांमध्ये भारी इंटरेस्ट असतो." याचा अर्थ इतरांची मते जाणुन घ्यायचीच नाहि असा आहे काय? बरं बरं :)
तुमच्याच युक्तीवादाप्रमाणे तुम्हालाच तुमची मते नीट मांडता येत नाहीत
तुम्हि म्हणताय तर हे हि शक्य आहे पण मुर्ख लोक तथ्यहिन मतांना हि युक्तीवाद करतात, त्यामुळे त्यांचा वेळ सत्कार्णी लावण्यासाठी मी माझि मते नीट मांडत नाहि.. :)
तुम्हाला शब्दाचा अर्थ कळत नाही काय? ज्ञानेश्वर ब्राह्मण असल्याने त्यांनी रेड्याच्या मुखातुन वेद म्हणवण्यावर विश्वास नाही तुमचा असे मी विचारले एवढे साधे तुम्हाला कळले नाही असे वाटत नाही. नसेल कळले तर ..... हॅ हॅ हॅ. बर आता बोला. भवानी तलवारीबद्दल आणि महाराजांना ती भवानी मातेने दिली होती त्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे. महाराजांना भवानी माता तलवार देउ शकते तर ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या मुखातुन वेद वदवुन घेउ शकतात यात शंका घेण्यासारखे काय आहे?
आम्हाला शब्दाचा अर्थ कळत नाही :) महाराजांना भवानी माता तलवार देउ शकते तर ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या मुखातुन वेद वदवुन घेउ शकतात यात शंका घेण्यासारखे काय आहे? हे दोन्हि दावे मी कधि केले बुवा ??? आणी त्यावर मी शंका कोणत्या जन्मी घेतलीय?? :puzzled: म्हणुन म्हणले होते कृपया स्वतःची मतं हि स्वतःपुरतीच मर्यादित ठेवा ती इतरांवर लादण्याचा प्रयत्न करु नका..यातहि मत व्यक्त करणे आणी लादने यात फरक असावा... त्यामुळे हे जर खरे असेल तर इतरांची मते जाणून घ्यायला आवडते पण लादून घ्यायला तीतकेसे आवडत नाहि...
जेम्स लेन जे काही खोडसाळपणे म्हणाला तीही एक लोक भावना आहे खरे खोटे माहित नाही असेच म्हणाला होता ते आपल्याला माहिती नाही की काय? तो मुर्ख, नीच, नालायक, निंद्यनीय माणूस लोक भावना, वदंता, खरे खोटे अश्या शब्दांचा आश्रय घेउन असत्य पसरवत होता हे माहिती नाही की काय तुम्हाला? आता कळाले ना कोणाचा काय झालाय?
चला कुणा कडून का होईना मला जे हवे होते ते सत्य शेवटी उगळले तर.. काय वाटते जेम्स लेन स्वतः कुणाचेहि ऐकून न घेताच पुस्तक छापुन मोकळा झाला? लोकं इतकी दुधखुळी समजता कि काय ? आता त्या बिचार्‍याला काय माहित हो आमचे राजे आणी त्यांच्या बद्दलच्या लोक भावना??? या पध्दतशीरपणे पुरवल्या कुणी? त्याला तुम्हि मुर्ख, नीच, नालायक, निंद्यनीय माणूस ठरवलेत ठिक.. मग त्या गोष्टि त्याने त्याच्या पुस्तकात समाविष्ट करे पर्यन्त आणी त्या पुस्तकाची स्तुती करे पर्यन्त तसेच त्याचा जाहिर सत्कार करे पर्यन्त ज्या ज्या लोकांनी त्याला मदत सहकार्य केले त्यांच्या बद्दलहि हिच विशेषणे वापरणार ना...:) जर हि लोक भावना, वदंता,होती असे मानून ती जर त्याने नजर चुकिने किंवा जाणून बुजून समाविष्ट केली असेल तरी ते पुस्तक बाहेर पडण्या अगोदर ज्यांनी ज्यांनी तपासले/वाचले ते त्याच्या पेक्षा जास्त मोठे गुन्हेगार आहेत.. जेम्स लेन तर एक प्यादा होता त्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून भलत्याच लोकांनी गोळ्या झाडल्या.. शिवरांयांचा खरा इतिहास माहित असणार्‍यांनी ते त्याला बदलायला का भाग पाडले नाहि? ते तसेच का प्रकाशीत केले गेले? त्या मागची भुमिका काय होती? त्याकडे जाणून बुजुन दुर्लक्ष का केले गेले? त्यात काय शरम वाटत होती त्यांना? कसली लाज मध्ये आली? तो जर असत्य पसरवत होता तर ते पसरवण्यासाठी मदत कोण करत होते? तसे न्हवते तर मग काय बांगड्या भरल्या होत्या का हाता मध्ये, का मेंदि लावली होती? त्याला कुणा कुणाचे मौलिक सहकार्य लाभले आहे हे त्याने प्रस्तावनेत जाहिर केले आहेच ते कोण कोण आहेत ते माहित असेलच कृपया त्या महान व्यक्तींची नावे जाहिर करा. वरिल सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हि प्रामाणीक असाल तर द्यालच नाहि तर फक्त जिभ आहे म्हणून आपले काहि तरी वाचाळता असे समजावे लागेल.. तुर्तास इतकेच बाकिचे नंतर..:)

कोन ह्यो ?? कुटुन आनला ह्येला ? आर .... तुला लिवायचा काय ?? तु लिवल काय ?? कन्च ते परिक्शन कराय्चा व्हत तेचा काय बी लिवल नाहि .... ओ अ. शत्रु ....तुमि पयल लिवा..मन्ग त्ये वाचा ....चार शान्या मानसनि दावा ...मन्ग हिता द्या....काह्याला टायमाची खोटी करु राह्य्ल भौ ??

In reply to by शाहिर

मान.संपादक/ संपादकमंडळ सलग ३ वेळा प्रकाशीत झाल्यामुळे कृपया हा प्रतिसाद उडवावा ! धन्यवाद

In reply to by शाहिर

तुम्हाला नक्की काय म्हणायच आहे ते समजले नाही कृपया समजेल अशा (शुध्द नसले तरि चालेल) मराठित लिहा, @टायमाची खोटी करु हेच काय ते समजले तेव्हा त्यावर इतकेच म्हणेन इथे कुणाच्या पोष्ट वाचुन पैसे मिळत नाहित किंवा लिहिणार्‍यालाहि मिळत नाहित, आणी हो संसस्थळाच्या मालकाला सुध्दा मिळत नाहित,त्यांच्या कृपाछत्रा खाली हे चालु आहे, (धन्यवाद निलकांतजी) त्यामुळे तुमच्या नुकसानाला भरपाई मिळणार नाही, अवांतरःआमचे टायमाची खोटी करणारे लेखण वाचण्याची तसदि नका करु हं.. धन्यवाद.

कुणा कुणाचं झालं रे आत्मपरिक्षण करून? हात वर करा पटापट!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कार्यकर्त साहेब, आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही, आम्ही गुंडगिरी करू शकत नाही, आम्ही खोटंनाटं लिहू शकत नाही, आम्ही राज्यकर्ते नाही. आमची संख्या कमी, अशा परिस्थितीत आम्ही काय करू शकतो ? जेथे जेथे असे लेखन येईल त्याला उत्तर देणे. कारण हे लिखाण येथे रहाणार आहे. तुमची मुलेपण कदाचित मिपा काही वर्षांनी वाचतील तेव्हा त्यांनी असे म्हणायला नको की जे लिहीले गेले आहे तेच खरे असेल नाहीतर कोणीतरी उत्तर दिले असतेना.... म्हणून आत्मपरिक्षणाचा दोष (?) पत्करून उत्तर द्यावे लागते......:-)

In reply to by जयंत कुलकर्णी

धागा चाळताना तुमचा हा प्रतिसाद वाचला. त्याला पुन्हा प्रतिसाद देणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत. पण तरिही... >>आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही -- त्याची गरज नाहि. >>आम्ही गुंडगिरी करू शकत नाही -- गरज पडल्यास करु शकता. किंबहुना करायची तयारी ठेवावी लागेल. >>आम्ही खोटंनाटं लिहू शकत नाही -- असहमत. तुम्ही मनुष्य आहात. खोटेपणा करणं हा मूळ मनुष्य स्वभाव(दोष) आहे. >>आम्ही राज्यकर्ते नाही -- सध्या तरी नाहि. पण जनतेला तुम्ही त्या लायकीचे वाटल्यास जनता तुम्हाला न विचारता सिंहासन अर्पण करेल. तेव्हढी तयारी करावी लागेल. पण आजच्या घटकेत तुमची "आम्ही" ची परिभाषा बदलली पाहिजे. जातवाचक समुहात अडकुन पडण्याचे दिवस गेले. सावरकरांचा वारसा सांगता आणि १०० वर्ष जुन्या परिभाषा वापरता. इट वाँट वर्क. >>आमची संख्या कमी -- आजच्या काळात संख्याबळ महत्वाचं असतं खरं. पण क्वांटीटीचि उणीव क्वालिटीने भरुन निघु शकते. आणि सर्वात मुख्य म्हणजे तुमची नाळ जातिपुरती मर्यादीत न ठेवता ति आवश्यक त्या ठिकाणि जोडण्याची लवचीकता आणि समजदारी दाखवा. मग बघा तुमचा "आम्ही" किती विशाल होतो ते. >>अशा परिस्थितीत आम्ही काय करू शकतो ? -- उपाय अनेक आहेत. पण क्वीक फिक्स नाहि. एक सोपा पण रामबाण उपाय... रोज स्वतः कमितकमी २०० सूर्यनमस्कार घाला आणि आपल्या नव्या पिढीला पण घालायला लावा. त्यातुन जे तन - मन तयार होईल ते पुढचा रस्ता आपोआप दाखवील || जय जय रघुवीर समर्थ || (बहुजन) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

>>पण आजच्या घटकेत तुमची "आम्ही" ची परिभाषा बदलली पाहिजे. जातवाचक समुहात अडकुन पडण्याचे दिवस गेले. सावरकरांचा वारसा सांगता आणि १०० वर्ष जुन्या परिभाषा वापरता. इट वाँट वर्क. आम्ही-तुम्ही ही परिभाषा सगळेच वापरतात. उगाच नको तिथे काड्या सारायचा प्रयत्न नको! >>सर्वात मुख्य म्हणजे तुमची नाळ जातिपुरती मर्यादीत न ठेवता ति आवश्यक त्या ठिकाणि जोडण्याची लवचीकता आणि समजदारी दाखवा आवश्यक म्हणजे नक्की कुठे याचा खुलासा झाल्यास सविस्तर उत्तर देता येईल.

In reply to by अन्या दातार

>>आम्ही-तुम्ही ही परिभाषा सगळेच वापरतात. उगाच नको तिथे काड्या सारायचा प्रयत्न नको ! हि परिभाषा सगळेच वापरतात, त्यात काहि गैर नाहि. पण ज्या प्रोब्लेमबद्दल जयंतराव हतबलता व्यक्त करताहेत त्याच्यावर उपाय योजताना जुने संदर्भ आणि परिभाषा बदलायलाच लागतील. प्रश्न काड्या सारायचा नाहि, ते करणे फार सोपं आहे. >>आवश्यक म्हणजे नक्की कुठे याचा खुलासा झाल्यास सविस्तर उत्तर देता येईल -- उत्तर मला देऊन भागणार नाहि. त्या करता हा प्रश्नच नाहि. हा प्रश्न स्वतःला विचारण्याचा आहे. जात्याआधारीत द्वेष पसरवणारे आपलं काम जोरात करताहेत. त्यांचा त्रास ज्यांना होतोय ते सध्या संख्येने कमि आहेत, पण हा रोग उत्तरोत्तर वाढणार आहे, किंबहुना कि कथा भस्मासुराच्या वळणावर जाईल... जयंतराव जी सांख्यीक लिमिटेशन मांडताहेत ति निव्वळ संख्याबळावर सोडवता येणार नाहि, त्याच्या मर्यादा आहेत. मग "संघशक्ती कलियुगे" (इथे संघ म्हणजी आर एस एस नाहि ;) ) या न्यायाने उत्तर शोधायला जाता कुठे आणि कसे हात पाय पसरवता येईल याचा सविस्तर विचार व्हावा... बाकि सविस्तर प्रश्नोत्तर तर काय, टंकायला मर्यादा नाहि. (बहुजन) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

>>(बहुजन) अर्धवटराव या कंसातल्या सहीचा अर्थ आणि उद्देश कळला नाही.

In reply to by आनंदयात्री

अर्थ म्हणाल तर त्याचा मायावती बाईंशी काहि संबंध नाहि. संबंध आमच्या नावात आहे... आम्हि अर्धवटराव. जगात बहुत करुन आमच्या सारखेच जन आहेत. उद्देश म्हणाल, तर पंढरीनाथ विठ्ठ्लाच्या या दुनियेबद्दल सर्वसाधारणपणे आम्हाला काय कळले हे सांगायचा एक क्षीण प्रयत्न... ( बहुजन) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

सर, तुमची मते कॉन्ट्राडिक्टरी वाटली म्हणुन विचारायचे धारिष्ट्य केले. एकिकडे तुम्ही कुलकर्णी काकांना जातसमूह सोडायला सांगता आणि स्वत:च्या सहीत समूहवाचक विशेषण लावता. तुमची सही वाचकाला चष्मा घालायला भाग पाडतेय आणि समाजवादी दृष्टिकोण पुसट होतोय असेही वाटते. - (हिंदु) आंद्या

In reply to by आनंदयात्री

हाच तर प्रोब्लेम झालाय मित्रा... वातावरण इतकं दुषीत झालय कि जातसमुहाचे काँटेक्स्ट आपसुकच लागतात आपल्याला. हे वातावरण निवळेल तो सुदीन !! ( :) ) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

असं कसं ? >>हाच तर प्रोब्लेम झालाय मित्रा... तुम्हाला प्रॉब्लेम माहित आहे, बहुजन हा शब्द समूहवाचक आहे हे ही माहित आहे. तरीही तुम्ही हाच शब्द पुन्हा पुन्हा हेतुपुरस्सर वापरता. या अर्थ तुम्हाला बहुजन शब्दाची आजची व्याख्या बदलायची आहे (क्रांतिकारी वैगेरे दृष्टीकोन) किंवा तुम्हीही समूहवाचक मानसिकतेला बळी पडलेले आहात. या दोन्हीपैकी एकही अर्थ खचितच नसावा पण तसे व्यक्त होणे तुमच्या समाजवादी दृष्टीकोनाला पूरक नाही हेच दाखवायचे होते. धन्यवाद.

In reply to by आनंदयात्री

>>अर्थ तुम्हाला बहुजन शब्दाची आजची व्याख्या बदलायची आहे -- बदलायची म्हणण्यापेक्षा खरी व्याख्या पुढे आणायची आहे. आणि या उठाठेवी करावं लागणं हि काळाची गरज आहे. एरवी आपलं निवांत आयुष्य सोडुन कशाला डोक्याला ताप करुन घ्या. >> (क्रांतिकारी वैगेरे दृष्टीकोन) -- किती छान वाटतं असं आपल्याला कोणि क्रांतीकारि विचाराचे वगैरे म्हटले तर... धन्स रे मित्रा :) >>किंवा तुम्हीही समूहवाचक मानसिकतेला बळी पडलेले आहात. -- अरे ज्या समाजात लहानाचं मोठा झालो तिथे रोगप्रतिबंधक लसी नंतर टोचतात, पण हे समुहवाचक मानसिकतेचं बाळकडु ( कळत - नकळत म्हणा हवं तर ) पहिले पाजतात असं ओब्सर्वेशन आहे. खैर... मूळ मुद्दा हा कि जयंतरावांना पडलेल्या प्रश्नांना, त्यांच्या अगतीकतेला काहि उत्तर आहे का ( आता काय स्वाक्षरी द्यावी बॉ... ) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तुम्ही एवढेच जर रेडी टु थिंक म्हणत असाल तर आधी थिंका आणि मगच उत्तर टंका! जात्याधारीत द्वेष ब्राह्मण पसरवत नाहीत ही फॅक्ट तुम्ही तुमच्या डोक्याच्या कक्षेबाहेर टाकली असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ब्राह्मण समाजाचा नाही.

In reply to by अन्या दातार

>>तुम्ही एवढेच जर रेडी टु थिंक म्हणत असाल तर आधी थिंका आणि मगच उत्तर टंका! -- जेव्हढी थिंकायची क्षमता आहे तेव्हढे प्रयत्न नक्की करतो दादा. हां, आता तुमच्या एव्हढा वकुब नसेल... त्याला इलाज नाहि. >>जात्याधारीत द्वेष ब्राह्मण पसरवत नाहीत ही फॅक्ट तुम्ही तुमच्या डोक्याच्या कक्षेबाहेर टाकली असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ब्राह्मण समाजाचा नाही. -- ब्राह्मण समाजाने काय पसरविले, काय काय केले, काय केले नाहि, काय करु शकले शकले असते आणि आजघडीला काय करता येईल याचा थोडाफार अंदाज, अभ्यास अणि अनुभव आहे मला. मी डोक्याबाहेर काय टाकले किंवा तुमच्या डोक्याच्या कक्षेत काय शिरत नाहि हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. सद्ध्या परिस्थिती अशी आहे कि जयंतरावांसारखे कितीतरी लोक मनस्ताप झेलत आहेत, समस्येचं समाधानकारक उत्तर दृष्टीक्षेपात नाहि, हि समस्या सतःहुन आपोआप सुटणारि नाहि, त्याला विशेष प्रयत्न करायला लागतील असं दिसतय, ते प्रयत्न काय आणि कशे करावे याविषयी संभ्रम आहे. द्वेष कोण पसरवतोय, ब्राह्मण समाजाचा काय प्रोब्लेम आहे वगैरे गोष्टी तुमच्या माझ्या डोक्याच्या कक्षेत काय बसतं आणि काय बसत नाहि यापेक्षा थोड्या जास्त गंभीर आहेत असं वाटतं. ( बहुजन ) अर्धवटराव

धागा शंभरी गाठणार..

ह्यानिमित्ताने नेमाड्यांच्या 'हिंदू' ह्या कादंबरीमधले एक वाक्य आठवले.
ह्या आर्यावर्तात ब्राह्मणच प्रत्येक युगात राज्य करतील. ब्राह्मणविरोधी बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमानी, महानुभाव, वारकरी, कम्युनिस्ट, सोशालिस्ट, कॅपिटलिस्ट अशा सगळ्या धर्माचं नेतृत्व ब्राह्मणच करतील.
आता बसा बोंबलत आणि आत्मपरिक्षण करत ... - (मुकवाचक)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

ब्राह्मणांना आत्मपरीक्षण करायला लावायची गरज नाही. ब्राह्मण समाज धूर्त, कावेबाज, प्रसंग पाहून निर्णय घेणारा, आत्ताच्या काळात जाती-पातीच्या बाबतीत लवचिक भूमिका घेणारा, चतुर आणि दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारा असा समाज असल्यामुळे त्यांच्या कावेबाजपणा बहुजनांना कळणार नाही अशा शक्यतेने तर नेमाडे तसे म्हणाले नसतील ना ? ;) आमचा उगा अंदाज हं........! -दिलीप बिरुटे

In reply to by छोटा डॉन

ह्या आर्यावर्तात ब्राह्मणच प्रत्येक युगात राज्य करतील. ब्राह्मणविरोधी बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमानी, महानुभाव, वारकरी, कम्युनिस्ट, सोशालिस्ट, कॅपिटलिस्ट अशा सगळ्या धर्माचं नेतृत्व ब्राह्मणच करतील.
भालचंद्र नेमाडे हे आद्य शंकराचार्य आहेत...असे वाटून ते/तुम्हि म्हणता तसे घडणार आहे खरे..:)
आता बसा बोंबलत आणि आत्मपरिक्षण करत .
शेण खावून(कुणाचेहि)थुंकल्याने लोकांना बोंबलत आणि आत्मपरिक्षण करण्यापलीकडे काय राहणार म्हणा.. :) अवांतरः काहि लोकांनी नेमाड्यांना फारच मनाला लावून घेतलेलं दिसतयं त्यामुळे डॉळे पानावले.... अतीअवांतर: पुढच्या धर्म नेतृत्वा साठी शुभेच्छा :) (अतीखोचक वाचक)

In reply to by अजातशत्रु

>>शेण खावून(कुणाचेहि)थुंकल्याने लोकांना बोंबलत आणि आत्मपरिक्षण करण्यापलीकडे काय राहणार म्हणा. आयला हे अजातशत्रू येडंच आहे .

..सावरकर देशद्रोही की देशप्रेमी ..... या लिंकवर असणारी मते निव्वळ खोटेपणा आहे....इतिहासाचे विकृतीकरण आहे..याला विरोध करायलाच हवा... http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=20887497&tid=55880846941700315…

In reply to by लॉरी टांगटूंगकर

स्थान दिलेल्या ब्राम्हना मध्ये कपटी चाणक्य,ज्याने आपल्या राज्यात बौद्धधर्मीयांचे शीर कापून आणेल त्याला एक हजार स्वर्ण मुद्रा बक्षीस असे जाहीर करून हजारो बौध्द बांधवाच्या हत्या करविल्या तो पुष्पमित्र शुंग,सिंधचा बौद्ध द्वेष्टा दाहीर राजा, बहुजन समाजाचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा शंकराचार्य, धनाजी जाधवा च्या तुकड्या वर राहणारा पळपुटा बाळाजी भटा पासून सगळे पेशवे,पेशवा नसताना स्वताला पेन्शनी पेशवा म्हणवणारा नानासाहेब हा १८५७ च्या बंडातील ब्राम्हण,झासीवाली लक्ष्मीबाई, नेहरू ,या ब्राम्हण लोकांचा गौरव काराताना सावरकर च्या लेखणी ला उन्माद चढतो,पण शिवरायाचे महानत्वा चे वर्णन करताना सावरकर च्या लेखणी ला जसे काही सर्व बामन मेले तसा सुतक येऊन ते अभद्र बनते.
सावरकरांनी नेहरूंचा गौरव केला?

In reply to by पंगा

त्या लिंक मधला आणखी काहि भाग,
सध्या सावरकर चे स्तोम माजवले जात आहे. त्या साठी विविध काल्पनिक गोष्टी लिहिल्या जात आहेत त्या काल्पनिक गोष्टी द्वारे सावरकर कसे वीर होते ते दाखवणे चालू आहे. तसेच आता काही ब्राम्हणे सावरकरांना नवभारता चा युगपुरुष ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत, सावरकरांचे लिखाण वरवर वाचणाऱ्याला असे वाटते की सावरकर हे एक महान देशभक्त आणि कट्टर धर्माभिमानी असावेत. पण चिकित्सक पणे त्यांचे लिखाण वाचले तर लक्षात येते की ते कट्टर जातीयवादी,पेशवाई ब्राम्हण होते. हा सावरकर कसा बहुजन द्वेषी आहे हे त्याच्या एकून साहित्या वरून दिसून येत आहे. भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर भारता मध्ये सावरकर कुणाला पण माहित नव्हता. त्याने जन्मठेपे साठी इंग्रजाची 8 वेळा माफी मागून इंग्रजां सोबत मैत्री केली होती. सावरकरवादी सावरकर ला सशस्त्र क्रांतिकारकाचा मुकुटमणी म्हणून गौरावितात.सावरकर ने कधीही हाती शस्त्र घेऊन कुणावर हल्ला केला नव्हता.त्यानी मोठा जमाव जमवून ब्रिटिशांवर कधी हल्ला केला नाही सावरकर ने हयातभर भारता मध्ये ब्राह्मणी वर्चस्व लोकावर लादण्याचे काम केले त्याने सशस्त्रक्रांती च्या नुसत्या गप्पा केल्या कधीही हातात शस्त्र घेतले नाही की कुणाला घेऊ पण दिले. नाही फक्त लिखित गप्पा मारून लोकांची दिशाभूल केली.सध्या काही ब्राम्हणे लिहीत आहेत की सुभाषबाबू यांची सशस्त्र क्रांती ची प्रेरणा सावरकर होते .आता सावरकर सशस्त्र क्रांतीकारक नव्हतेच तर त्यांच्या पासून सशस्त्र क्रांतीची प्रेरणा कशी आणि कुणाला घेता येईल. सावरकर ने जे लिखाण केले ते सर्व ब्राम्हणा कसे श्रेष्ठ आहेत फक्त आणि फक्त ब्राम्हणा चा उदो उदो आणि बहुजन महापुरुषाची बदनामी यासाठीच सावरकर ने इतिहासामधील पळपुटे बामन घेऊन ते कसे श्रेष्ठ होते यासाठीच प्रयत्न केले सावरकर ने सहा सोनेरी पाने नावाचे पुस्तक लिहिले त्या मध्ये फक्त ब्राम्हण लोकांचा इतिहास सोनेरी होता असे लिहिले आहे त्यात एका पण बहुजन महापुरुषां ला स्थान दिले नाही, Mar 25 Anonymous स्थान दिलेल्या ब्राम्हना मध्ये कपटी चाणक्य,ज्याने आपल्या राज्यात बौद्धधर्मीयांचे शीर कापून आणेल त्याला एक हजार स्वर्ण मुद्रा बक्षीस असे जाहीर करून हजारो बौध्द बांधवाच्या हत्या करविल्या तो पुष्पमित्र शुंग,सिंधचा बौद्ध द्वेष्टा दाहीर राजा, बहुजन समाजाचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा शंकराचार्य, धनाजी जाधवा च्या तुकड्या वर राहणारा पळपुटा बाळाजी भटा पासून सगळे पेशवे,पेशवा नसताना स्वताला पेन्शनी पेशवा म्हणवणारा नानासाहेब हा १८५७ च्या बंडातील ब्राम्हण,झासीवाली लक्ष्मीबाई, नेहरू ,या ब्राम्हण लोकांचा गौरव काराताना सावरकर च्या लेखणी ला उन्माद चढतो,पण शिवरायाचे महानत्वा चे वर्णन करताना सावरकर च्या लेखणी ला जसे काही सर्व बामन मेले तसा सुतक येऊन ते अभद्र बनते. शिवराया चे स्वराज्य स्थापन करणे म्हणजे काकतालीय न्याय योगायोग असा लिहून मोठी हरामखोरी सावरकर ने केली. शिवाजी महाराजा प्रमाणेच सावरकर च्या धर्मात सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बोद्ध ,चक्रवर्ती कनिष्क , हर्षवर्धन, कान्होजी आग्रे, संभाजी महाराज संताजी धनाजी उमाजी नाईक ,क्रांतिसिंह नाना पाटील नेताजी सुभाष इत्यादी बहुजन महापुरुष ना महत्व नाही. गांधीच्या खुना मधील आरोपी म्हणून प्रसिद्ध असलेले सावरकर चाणक्य सारख्या कपटी खुनशी माणसाचा आणि पुष्पमित्र शुंग सारख्या खुनी माणसाचा गौरव करतात. त्यांना भारता मधील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रपुरुष ठरविण्या साठी आपले लेखन कौशल्य वाफारतात तसाच प्रकार ते पेशवाई मधील पोटार्थी भटभिक्षुकाना महान राजकारण धुरंदर ठरविण्यासाठी करतात.सावरकर ला भिक्षुकांना राजकर्ते बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाणक्या बद्दल जसे प्रेम तसेच चाणक्य नंतर एकविसशे वर्षांनी भिक्षुकांचे राजे (पेशवे) बनलेल्या भटाबद्दल अलोट प्रेम त्याच्या या अलोट प्रेमा ची परिणीती भक्ती भावनेत झालेली दिसून येते. सावरकर लिहितो ”रत्न म्हटले की जसे टाकाऊ नसते.. किंवा देव म्हटले की जसे सर्व जगास वंद्य ! त्यातही महादेव सर्व जगास महावंद्य होऊन बसले आहेत. त्याप्रमाणे मोडकळीस आलेल्या स्वातंत्र्या प्रसादाचा ज्यांनी जीर्णोद्धार केला त्या बाळाजी विश्वनाथ(भट),बाजीराव बाळाजी(भट), चिमणाजी भट सर्व थोरात थोर व वीरात वीर होतच पण या अमोल वैजयंती मालिकेत कौत्सुभमनीचे ठायी शोभाणार्या राव माधवरावांची थोरवी काही विलक्षनच...” cont...... Mar 25 Anonymous वा रे नराधम सावरकरा हलकट कळकट स्वता च्या चुलती वर बलात्कार करणारे स्वताच्या बायका मराठा सरदारा कडे पाठवणारे, इंग्रजाशी युती करणारे तुझ्या दृष्टी ने वीर थोर.... भटाबामना च्या वाईट कामाला देशभक्ती ठरवनार्या सावरकर ची खूप मोठी ठगबाजी आहे ही मराठेशाही च्या स्वातंत्र्य प्रसादाचा जीर्णोद्धार प्रथम बाळाजी विश्वनाथ भटाने केला असा खोटा इतिहास हरामी सावरकर बेधडक लिहितो. आपल्या हलकट बामन जाती चे स्तोम माजवत असताना सावरकर खऱ्या खोट्याचा विधीनिषेध बाळगत नाहीत. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शिवरायानी स्थापन केलेले स्वराज्य चिरंजीव व्हावे म्हणून स्वातंत्र्य युध्द भडकत ठेवले. त्यावेळी हा बाळाजी भट धनाजी जाधवा कडे नोकर होता. कोकणात पोट भरेना म्हणून घाटावर गेला. तिथे धनाजी जाधवाचा पुजारी म्हणून राहिला. त्याला सुंदर बायको आणि बहिण होती त्याच्या जीवावर तो धनाजी जाधव च्या मर्जी मध्ये गेला, इतर काही मराठा सरदारा च्या घरी पण आपली बायको आणि बहिण पाठवल्या जाई त्याच्या जीवा वर तो पेशवा झाला . पेशवा म्हणजे कारभारी पण हा भाडखाउ राजाला नामधारी बनवायचे आणि आपल्या कडे सर्व सत्ता घ्यायची हे त्याचे तंत्र वाफारले त्यासाठी त्याने आपली बायको बहिण वाफारून फाटाफूट पाडू लागला. शाहू महाराजा कडे कारभारी असणारा हा बाळाजी राजकारण करू लागला. ज्या बाळाजी भटाला सावरकर आद्द्य महापुरुष ठरवितात त्या भटा चे पाप सावरकर ला दिसत नाही मराठा आरमार नष्ट करण्याचा देशद्रोह या हलकट बामना ने केला आहे. तुळाजी आग्रे यांचा आरमार इंग्रजां ची मदत घेऊन नष्ट केला आणि इंग्रजां कडे आपल्या जातीच्या बायका पाठवून घाऱ्या डोळ्या ची पैदास तयार करूंन घेतली जी आज पर्यंत महाराष्ट्र आणि देशा ला त्रास देत आहे . त्या हलकट इंग्रजां च्या औलादी ना चित्पावन असे म्हटले जाते हे एक नामांकित देशस्थ ब्राम्हणाच लिहितो. Mar 25 Anonymous सावरकरांचे राष्ट्रभक्त असे होते देशद्रोही ! स्वत माफीवीर असणाऱ्या सावरकरांचे आदर्श तरी जातीवंत राष्ट्रप्रेमी कसे असतील. सावरकर बाबत एक प्रचार करण्यात येतो तो म्हणजे सावरकर हे अखंड भारतवादी होते हा किती खोटा प्रचार आहे हे सावरकर च्याच शब्दा मध्ये वाचा “ त्यातही हिंदुत्व निष्ट पक्ष (सावरकराचा) मनोमन जाणून होता की हे पाकिस्थान म्हणजे म्हणजे हिंदुनी पूर्व जन्मी केलेल्या सद्गुण विकृती,शुद्धीबंदी,इत्यादी सामाजिक नि धार्मिक पापाचा परिपाक आहे. या रुढीपायीच हिंदुनी नगरो नगरी आधीच आपल्या हाताने जी छोटी छोटी पाकीस्थाने निर्मून ठेवली आहेत होती त्या सामाजिक पापांचा हा परिपक केव्हा तरी भोगणे क्रम प्राप्त होते. मुस्लिमा ना पाकिस्थान का द्यावे याचे उत्तर सावरकर ने जे दिले ते उत्तर भारता च्या फाळणी ला संमती देणार्या पंडीत नेहरू ला पण सुचले नाही. पाकिस्थान बाबत चे हे सावरकर भाष्य, सावरकर भगत लोकांपुढे मांडत नाहीत. गांधी चा खून झाला त्याला कारण सांगताना सावरकर भक्त म्हणतात गांधी नी पाकीस्थान ला मान्यता दिली मग या लोकांना कळून आले पाकिस्थान ला मान्यता देण्यात नेहरू चा पुढाकार होता. आता नेहरू पडले त्यांच्याच हलकट ब्राम्हण जाती चे मग त्यांना कसे दोषी ठरविणार ? म्हणून सावरकर ने हलकट शोध लावला पूर्व जन्मी च्या पापाचे फळ म्हणजे पाकिस्थान ची निर्मिती.....वारे हलकटा काय शोध तुझा सावरकर ला त्या काळी कोणीतरी भामटा हिंदू हृदय सम्राट म्हणून लिहित असे पण त्या कडे कुणी लक्ष देत नसे कारण सावरकर च्या पाठी मागे म्हणावा तसा जनसमुदाय कधीच नव्हता त्या मुळे त्यांच्या गावात पण त्याना महत्व नव्हते गावा मधून तर त्यांच्या विचित्रा वागण्या मुळे हाकलून दिले होते. त्याने वीर ही पदवी स्वताहून ढापली. तो एक नंबर चा थापाड्या खोटारडा होता त्याचे १ जानेवारी १९३८ या दिवशी अहमदाबाद येथे भाषण झाले होते त्या मध्ये सावरकर म्हणाला की मी अमेरिकेत गेलो असतो आणि तिथेच कायम चा राहिला असतो तर तेथील राष्ट्राध्यक्ष झालो असतो". काय ही सावरकर ची मनीषा साधी ग्राम पंचायत ची निवडणूक ज्याने लढवून काबीज करू शकला नाही तो माणूस अमेरिके चा अध्यक्ष आता काही बामणे या सावरकर च्या भाषणा वरून म्हणतील की सावरकर मुळे आज अमेरिका प्रगत आहे या भाटा चा काही नेम नाही काय लिहितील ते. Mar 25 Anonymous सावरकर होता समलिंगी मित्रानो सावरकर हे समलिंगी संबध ठेवणारे होते हे त्रिकाळ सत्य असून या बद्दल सावरकरवादी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात. सावरकर हे समलिंगी संबध ठेवत होते असे नथुराम गोडसे यांचे बंधू यांनी इंग्लंड मध्ये मुलाखती मध्ये सागितले होते. सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे मधुर समलिंगी संबध होते. तसेच सावरकर अनेक तरुण मुलांच्या आहारी गेले होते. त्या संबधी तत्कालीन मध्य विभागा चे महसूल आयुक्त श्री घोषाल यांनी सावरकर बद्दल लिहिलेल्या अभिप्राया मध्ये "सावरकर यांचे नैतिक चरित्रा खूप खूप वाईट आहे" असे म्हटले आहे. सावरकर च्या याच समलिंगी वागण्या मुळे त्याना रत्नागिरीच्या ब्राम्हणांनी शेजारच्या खेडेगावात राहणे भाग पाडले. सावरकर बद्दल काही ब्रिटीश लेखक सांगतात की सावरकर हे अंदमान तुरुंगा मध्ये गेल्या पासून समलिंगी संबध ठेवत होते. सावरकर अंदमान मध्ये असताना मुस्लीम पठाणांनी त्यांचा नटरंग करून सावरकर ना समलिंगी संबधा मध्ये आणले होते. बहुजन बांधवाना प्रश्न पडला असेल की सावरकर ला सक्तमजुरी ची शिक्षा असेल तर त्याना तुरुंगा मध्ये लिखाणा साठी अठरा अठरा तास कसे भेटत होते तर मित्रानो सावरकर ने तुरुंगातील तील अधिकाऱ्यांना आपल्या मधुर संबधा मध्ये ओढले होते बिचारे पत्नी विना राहत असत त्याना सावरकर पत्नी चे सुख देत असत.त्यांच्या याच मधुर संबधा मुळे त्याना शिक्षे मध्ये सुठ भेटली.कारण इंग्रजां ना खात्री होती की हिजड्या पासून आपल्याला कधीच धोका नाही त्यामुळे सावरकर ला इंग्रजां नी सोडून दिले..
बिचारे सावरकर काय वाटत असेल त्यांना? हे पाहून त्या अंदमानच्या समुद्रातच जीव दिला असता त्यांनी... हे जरा अतीच होत आहे, थांबवलं पाहिजे कुठेतरी.................... आपल्याच देशात आपल्याच लोकांकडून आपल्याच महापुरुषांचे असे धिंडवडे नीघणं हि शोकांतीकाच म्हणावी लागेल मग ते शिवाजी महाराज असो की सावरकर........... बाकी जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा, अवांतरः त्यांचं ते "ने मजसी तु परत मातृभुमिला सागरा प्राण तळमळला"...सुरेख संगीत अन् वाद्यमेळ आजहि अंगावर काटा येतो स्फुर्ती येते....... अवघड आहे देशाचं..! (धास्तावलेला)

अजात शत्रू (?) साहेब...\\ ब्राह्मणांनी अत्याचार केला वगेरे वगेरे खरय... पण तो काळ लोटून गेला , आता कुठला ब्राह्मण अत्याचार करताना दिसतोय ? उलट तुमच्या सारखी लोक, आरक्षण लाटून मोठ मोठ्या पदांवर विराजमान होतात, (लायकी नसताना) तेच एखादा गरीब ओपेन कास्ट चा मुलगा , अंगीभूत गुण असताना सुद्धा मागे राहतो, हा कोणावर अन्याय म्हणायचा ? कित्येक कालेजात लोवर कस्त ची मुल बिनधास्त असतात, त्यांना माहितेय कि ४० % मिळाले तरी आरक्षण फिक्स !!! कशाला अभ्यास करा? अश्याने तुम्ही बघाल तर फक्त सरकारी कामात तुम्ही नोकरी मिळवू शकाल, पण खाजगी क्षेत्रात तुमची झपाट्याने पिचेहाट होतेय हे आरक्षणच तुमचा विनाश करणार हे नक्की :( तुम्हाला आरक्षण असल्याने बाकीचे विकृत धंदे करायला मोकळा वेळ मिळतो हो, आम्हाला नाही सध्या २०११ सुरु आहे, १९३० नाही, वास्तवात या....\\\ जागा आणि जगू द्या... ते दहशदवादी आपली मार्तायेत, नैसर्गिक अप्पती येत आहेत, भ्रष्टाचार वाढलाय (सरकारी खात्यात ८५ % तुम्हीच आहात :) ) तिकडे लक्ष द्याना आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा, मग दुसर्यांना सांगा इथे गरळ ओकून , वातावरण दुषित करू नका

In reply to by धोणी

दुसर्‍यांची लायकी ठरविणारे ढोणी तुम्ही किती लायकबाज आहात ते तुम्हि तुमच्या वाह्यात बडबडितून सिध्द केले आहेच, बाकि "ब्राह्मणांनी अत्याचार केला वगेरे वगेरे खरय..." हे सत्य स्विकारण्याच धाडस केलेत त्याबद्दल अभिनंदन,असे धाडस योगप्रभु/जोगळेकर केव्हा दाखवणार देव जाणे... असो
आता तो काळ लोटून गेला , आता कुठला ब्राह्मण अत्याचार करताना दिसतोय ?
बरोबर आहे नाहि दिसत त्याचे कारण घटनेनुसार मिळालेली लोकशाहि अन् कायदा हे आहेत, स्वतः ब्राह्मण नाहि ह :) हा तसे काहि ब्राह्मण लोकांचे परिवर्तन झाले आहे अपवादात्मक..
उलट तुमच्या सारखी लोक, आरक्षण लाटून
व्यक्तीशःमला कुठलेही आरक्षण नाहि, ज्यांनी घेतले त्यांनी त्याचा दुरुपयोग केला का सद्उपयोग केला याचे उत्तर हो किंवा नाहि असे द्या उगा पाल्हळ लावू नका.. आरक्षण घेऊन कुठल्या ब्राह्मणांवर अत्याचार केला? ते हि सांगा, सध्याच्या पिढीने तसे ठरवले तर खुप भयानक असेल ते, (तसं संभाजी ब्रगेडने त्या दिशेने पावलं टाकली आहेच पण त्यांचं समर्थन आम्हि मुळीच करणार नाहि) चला एक मानु या इथे भारतात लोकशाहि नाहि मुस्लिम/तालीबानी कायदा आहे जर असे असते तर खुन का बदला खुन या न्यायाने जर त्या नाडल्या गेलेल्या जनतेने न्याय मागीतला तर ज्यांनी अत्याचार केले त्यांना काय काय शिक्षा झाली असती? नशीब समजा लोकशाहि आहे..
आरक्षण लाटून मोठ मोठ्या पदांवर विराजमान होतात,(लायकी नसताना)
हे लोक कोण आहेत ते माहित आहे का? माहित असल्यास नावे सांगा उगा उचलली जिभ करु नका ती घाण सवय आहे..मग त्याबद्दल चर्चा करु कि खरच त्यांनी आरक्षण घेतले होते की जनरल मधून पुढे गेले होते...
तेच एखादा गरीब ओपेन कास्ट चा मुलगा , अंगीभूत गुण असताना सुद्धा मागे राहतो, हा कोणावर अन्याय म्हणायचा ?
"ओपनकास्ट चा गरीब मुलगा" या वाक्यातच त्याचे उत्तर आहे, अंगीभूत गुण असताना सुद्धा मागे राहतो हे जर इतिहास माहित असेल तर समजेल, त्यावर नीट विचार करा मग गरळा.. उप्स बरळा..एकच आहे जाउदे.
कित्येक कालेजात लोवर कस्त ची मुल बिनधास्त असतात, त्यांना माहितेय कि ४० % मिळाले तरी आरक्षण फिक्स !!! कशाला अभ्यास करा?
आयला पुर्वी तुम्हि लोक ५०% म्हणत होतात आता ४० % वर आलात अरेरे किती जळायच ते... त्यापेक्षा अस म्हणा ना आरक्षणवाले प्राथमिक शिक्षण न घेता डायरेक्ट डीग्रीला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घेतात,त्यामुळे आमच्यावर अन्याय होतो.. अरे थोडा विचार करा.शारीरिक अपंगांसाठी आणी स्त्रियांसाठी राखीव जागा आहेतच ना? त्या मागची कारणं माहित आहेत का? ज्या समाजास(आपल्या आधीच्या पिढीने म्हणजे ब्राह्मणांनी/इतरांनी अत्याचार केला वगेरे वगेरे) सामाजिक दृष्ट्या अपंग केले गेलेय त्यांना वर येण्यासाठी थोडी सवलत द्यायला नको? तसेच भारतातला प्रत्येक नागरीक आणी एनआरआय यांना सुध्दा कोणत्याना कोणत्या प्रकाराच्या आरक्षणाचा / सवलतींचा लाभ घेत आहेत/ मिळतो आहे..त्याचे काय करणार आहात? इतकेच जर पोटात मुरडा उठला असल्यास वैद्य पाटणकर काढा घ्या काहि तरी फरक नक्की पडेल.:)
अश्याने तुम्ही बघाल तर फक्त सरकारी कामात तुम्ही नोकरी मिळवू शकाल, पण खाजगी क्षेत्रात तुमची झपाट्याने पिचेहाट होतेय हे आरक्षणच तुमचा विनाश करणार हे नक्की
सरकारी नोकरित किती आरक्षित अन् किती ओपन आहे याची आकडेवारी आहे का? सरकारि पेक्षा खाजगी नोकरित पगार जास्त आहे मग कशाला रडता? आणी खाजगी क्षेत्रात कुणाची झपाट्याने पिछेहाट होतेय बुवा? आय थिंक सरकारि पेक्षा खाजगी क्षेत्रातच जास्त आरक्षित/गरिब लोक आहेत आणी हो खाजगी क्षेत्र,उद्योगधंदे हे हि आरक्षण/ सवलत यावरच चालतात.. त्याबद्दल आपले काहि मौलीक विचार आहेत का? बाकि कुणाची पिछेहाट कुठे होते त्याची काळजी तुम्हाला नको, आणी विनाश फिनाश होनार असली बाबाटाईप वाक्ये सोडून तुम्हि स्वतःची पिछेहाट कुठे होते ते पहा..
तुम्हाला आरक्षण असल्याने बाकीचे विकृत धंदे करायला मोकळा वेळ मिळतो हो, आम्हाला नाही सध्या २०११ सुरु आहे, १९३० नाही, वास्तवात या....\\\ जागा आणि जगू द्या... ते दहशदवादी आपली मार्तायेत, नैसर्गिक अप्पती येत आहेत, भ्रष्टाचार वाढलाय (सरकारी खात्यात ८५ % तुम्हीच आहात ) तिकडे लक्ष द्याना
तुम्हाला आरक्षण असल्याने बाकीचे विकृत धंदे करायला मोकळा वेळ मिळतो..हे थोडे स्पष्ट करुन सांगा आणी तुमचे सामाजीक/वैचारिक/संस्कृतीक असे कोणते सोज्वळ धंदे आहेत हे जाणून घ्यायला फार्र फार्र आवडेल,उत्सुकता खुपच वाढलेय आता...(नंतर मी तुमच्या धंद्यांचे पुरावे देतो ह) सध्या २०११ सुरु आहे, १९३० नाही, वास्तवात या...बरे झाले सांगीतले नाहितर आम्हाला उगाच वाटत होते आम्हि अजुन कलयुगातच आहोत. तसेच साल २०११ ,साल १९३० यात काय फरक आहे? ते सांगण्याचे प्रयोजन काय ते स्पष्ट कराल काय?
आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा, मग दुसर्यांना सांगा इथे गरळ ओकून , वातावरण दुषित करू नका
माझा लेख तुम्हि निट वाचला नाहि? त्याबद्दल मि तुम्हाला आळशी म्हणावे काय? वाचला असल्यास मुर्ख/मंदबुध्दी असे म्हणावे काय? मी माझ्या लेखात ब्राह्मणांविरुध्द काहिही वाईट लिहिले नाहि आहे.. जे नंतर आले असेल/आहे त्या तुमच्या सारख्यांच्या प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिसादांना त्या स्वरुपातल्या प्रतीक्रिया आहेत, मुद्दे खोडण्यासाठी ते योग्यच होते..त्यास माझा नाईलाज आहे. त्यामुळे गरळ कुणी ओकली अन् वातावरण दुषित कुणी केले ते सांगा अवांतरः असे अकलेचे तारेतोडून विषयांतर करु नका आरक्षणावर या आधिहि या / इतर संस्थळांवर चर्चा झाली आहे/होते त्यावर बोलण्यासाठी दुसरा धागा काढा तुमचा कंड शांत केला जाईल :) अतीअवांतरः या प्रतिसादाला उत्तरायचे न्हवते पण तुम्हि लायकी काढता कुणाचीहि? त्यामुळे प्रतिसाद द्यावा लागला शेवटचा तशी आम्हाला असले कंड शमविण्याची लय खोड आहे बरं का...;) (आमची अज्ञानाची "गोणी")

In reply to by अजातशत्रु

हॅ हॅ हॅ तुमचे अवांतर बघून ... इथल्या एक मेम्ब्राची आठवण झाली.. तुम्ही जे काही लांब लचक लिहून इतरांना काही पटवून द्यायचा प्रयत्न करता ... केवळ आणि केवळ हास्यास्पद अभिनंदन बाकी काय? खेडेकर.. किती पैसे पुरवतो.. भद्खाऊ लिखाण करायचे... जाळपोळ करा, गुंडगिरी करा , आरक्षण लाटा.., भ्रष्टाचार करा मज्जा मज्जा करा त्यातच आनंद माना ओके? ...

In reply to by धोणी

हॅ हॅ हॅ तुमचे अवांतर बघून ... इथल्या एक मेम्ब्राची आठवण झाली.. तुम्ही जे काही लांब लचक लिहून इतरांना काही पटवून द्यायचा प्रयत्न करता ... केवळ आणि केवळ हास्यास्पद अभिनंदन
:)
बाकी काय? खेडेकर.. किती पैसे पुरवतो.. भद्खाऊ लिखाण करायचे... जाळपोळ करा, गुंडगिरी करा , आरक्षण लाटा.., भ्रष्टाचार करा मज्जा मज्जा करा त्यातच आनंद माना
:) (आमची अज्ञानाची "गोणी")

अमेरिका : हमारा कुत्ता फुटबॉल खेलता है ! जपान : हमारा फिश डान्स करता है ! चायना : हमारा हाथी सायकल चलाता है ! इंडिया : हमारे गधे गवर्मेंट चलाते है ! संपादक मंडळ, हा काय काथ्याकुट्ट चालला आहे ?? जात - धर्म - पंथ यावर खुप बोचकरणे झाले.. आता हे सर्व थांबवा !..आवरा !! A well-trained memory is one that permits you to forget everything that isn't worth remembering...!!

In reply to by वाहीदा

अमेरिका : हमारा कुत्ता फुटबॉल खेलता है ! जपान : हमारा फिश डान्स करता है ! चायना : हमारा हाथी सायकल चलाता है ! इंडिया : हमारे गधे गवर्मेंट चलाते है !
उन गधों को चुनाव में चुन कर पार्लमेंट में भेजने वाले?

In reply to by वाहीदा

अमेरिका : हमारा कुत्ता फुटबॉल खेलता है ! जपान : हमारा फिश डान्स करता है ! चायना : हमारा हाथी सायकल चलाता है ! इंडिया : हमारे गधे गवर्मेंट चलाते है !
उन गधों को चुनाव में चुन कर पार्लमेंट में भेजने वाले?

In reply to by वाहीदा

अमेरिका : हमारा कुत्ता फुटबॉल खेलता है ! जपान : हमारा फिश डान्स करता है ! चायना : हमारा हाथी सायकल चलाता है ! इंडिया : हमारे गधे गवर्मेंट चलाते है !
उन गधों को चुनाव में चुन कर पार्लमेंट में भेजने वाले?

In reply to by अजातशत्रु

आपले पासपोर्ट असेल तर तपासून पहा तिथे इंग्रजीत आपल्या देशाचे नाव रिपब्लिक ऒफ़ इंडिया असेल असो हा आमचा आपल्याला शेवटचा प्रतिसाद आम्ही तुम्हाला नव्हे तर संपादकमंडळाला आव्हान केले होते. उगाच अतिशहाण्या वाद-घालू माणसाशी काय संवाद साधणार ?

In reply to by वाहीदा

आपले पासपोर्ट असेल तर तपासून पहा तिथे इंग्रजीत आपल्या देशाचे नाव रिपब्लिक ऒफ़ इंडिया असेल
पासपोर्ट मध्ये इंग्रजीत आपल्या देशाचे नाव रिपब्लिक ऒफ़ इंडिया आहे बर मग?? प्रश्न गाढवांनी राज्य चालवणे म्हणजे देशाला/देशातील नागरीकांना कमी लेखण्यासारखे आहे या रोखातून होता आणी मग त्या गाढवांना निवडून देणारे कोण? त्यात उत्तर भलतेच.. इंडिया? असे असले तरी त्यात नेहमी इंडिया-भारताला कमी का लेखले जाते, असा आहे? इंडिया : हमारे गधे गवर्मेंट चलाते है ! हे असले वाह्यात विनोद दुसर्‍या देशावर करा की..
आम्ही तुम्हाला नव्हे तर संपादकमंडळाला आव्हान केले होते
जर असे आहे तर तसा व्यनी/खव मध्ये थेट मालकांशी संपर्क साधता आला असता ते जास्त योग्य वाटले असते, उगा धाग्यावर मखलाशी कशाला ?,
तुमच्याशी वाद घालण्याची तिळमात्र इच्छा नाही
तशी इच्छा मी कधी जाहिर केलिए तुमच्याशी? जर मी मला तुमच्याशी वाद घालण्याची कवडीमात्र इच्छा नाही असे म्हटले तर चालेल का? अहो ताई मला प्रत्येकाशी संवाद साधायची ईच्छा आहे (मुद्दे पटले नाहि कितीहि राग आला तरी मी संवाद थांबवत नाहि, आमचे 'परममित्र' श्री.जोगळेकर साहेब धाग्यावर वाद घालत असले तरी व्यनी मध्ये खुप गोड बोलतात..त्यांची शैली आवडते बुवा आपल्याला.) असो आम्हि जरी अती-शहाणे वाटत असलो तरी प्रस्तुत धाग्यावर शाहजोगपणे स्वतःला शांतीदुत म्हणवून घेण्याचा तुमचा असफल प्रयत्न लक्षात येण्याजोगा नक्कीच आहे, इतरांनाहि विनंती आहे की जर काहि मुद्दे पटत नसतील विरोध असेल तर तसे व्यनी द्वारे कळवावे आवरा/ पुरे/ बस झाले हे असले अवांतर प्रतिसाद देऊ नये---विनंती आहे नियम/बंधन नाहि. असो जसे प्रतिसाद असतात तशा मी संयमीत प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतच असतो, कधि-कधि नाईलाज होतो तरीहि कुणाला जाणते अजाणतेपणी दुखावले गेले असल्यास जाहिर माफि मागतो.. पण न पटणार्‍या मुद्यावर वाद घालणे आणी जमल्यास चर्चा तडिस नेणे सोडणार नाहि :)

अजातशत्रू, मला जे काही म्हणायचे होते ते मी माझ्या प्रतिसादातून पुरेसे स्पष्ट केले आहे. या अखेरच्या चार ओळी. तुमच्या विचारांची दिशा बघता तुमच्या कोणत्याही धाग्यावर मी यापुढे प्रतिसाद देणार नाही. तुम्हीही माझ्या नावाचा उल्लेख करु नये, ही इच्छा.

In reply to by योगप्रभू

तुमचा तो प्रतिसाद उधार आहे अजुन त्यास माझि प्रतिक्रिया यायची आहे, त्यास समर्थन आणी किती कंपुबाजी होते यासाठी वाट पहात होतो ती दिल्या नंतर मला हि कुठ्ल्या दगडावर डोके आपटून घ्यायची ईच्छा नाहि,

श्री. अजातशत्रू यांनी वेळच्या वेळीच प्रतिसाद द्यावेत अशी नम्र विनंती आहे. ते प्रतिसाद द्यायला मुद्दामहून वेळ लावतात. समोरचा वाद घालणारा माणूस उत्तराची वाट पाहातो आणि नंतर कंटाळून विषय/धागा सोडून देतो. शिवाय दरम्यानच्या काळात त्यांना 'बडे भाई' चे लिखाण गोळा करता येत असावे. मग हे चोरासारखे उपटतात आणि हळूचकन एक रिप्लाय टाकतात. त्याने कदाचित त्यांना 'जितं मया' असे समाधान मिळत असावे. पुन्हा 'माझ्या आक्षेपाचे खंडन केले नाही' असा कावा करता येतो. वस्तुतः त्यांचे वादपटुत्व पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत आदर निर्माण झाला आहे आणि त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीची प्रचिती आली आहे. अशा माणसाने स्वतःच स्वतःची अब्रू खुंटीला टांगून घ्यावी याचे फार वाईट वाटते. शिवाय इथले काही टवाळ, मवाली ब्राम्हण त्यांची वारंवार खिल्ली उडवतात ते पाहून तर फारच दु:ख होते. त्यातून त्यांची ती जागोजाग स्माईली टाकण्याची आत्मघातकी सवय. उद्या त्यांना एखाद्याचा गॄह्यसंस्कार छापायला दिला तर त्यानंतरदेखील ते एखादी स्माईली टाकून मोकळे होतील. खरं तर इतकं टाकून बोलू नये किंवा लिहूही नये. पण आपल्या माणसाची बदनामी पाहावत नाही म्हणून लिहिले.

श्री.जोगळेकर साहेब..आपली विनंती आम्हि नेहमी स्विकारतो.... पण आमचे दुर्देव की आमच्या विनंत्या तुम्हाला मान्य होत नाहित/ किंवा तुम्हि त्या गैरसोयीने हेतुपुर्वक दुर्लक्षित करता,. असो
प्रतिसाद द्यायला मुद्दामहून वेळ लावतात. समोरचा वाद घालणारा माणूस उत्तराची वाट पाहातो आणि नंतर कंटाळून विषय/धागा सोडून देतो. शिवाय दरम्यानच्या काळात त्यांना 'बडे भाई' चे लिखाण गोळा करता येत असावे. मग हे चोरासारखे उपटतात आणि हळूचकन एक रिप्लाय टाकतात. त्याने कदाचित त्यांना 'जितं मया' असे समाधान मिळत असावे. पुन्हा 'माझ्या आक्षेपाचे खंडन केले नाही' असा कावा करता येतो
. प्रतिसाद द्यायला मुद्दामहून वेळ लावतो हा तुमचा समज चुकिचा आहे,आपल्या संस्थळाचा प्रॉब्लेम सर्वांनाच ठाऊक आहे,आता लगेच म्हणाल तुम्हालाच बरे येतो तो... सर्वांनाच येतोय,मागे जे मी सलग ३-३ प्रतिसाद दिले याच प्रॉब्लेम मुळे ते ३-३ वेळा प्रकाशीत झाले आहेत ते लिहायला आणी प्रकाशीत करायलाच ४ ते ५ तास लागले ही वस्तुस्थिती आहे, दररोज इतका वेळ देणं जमत नाहि. तसेच चोरा सारखे उपटण्याची कला तुम्हालाच छान अवगत असावी..इथे जर लॉगीन हिस्ट्री रेकॉर्ड ची सोय असेल तर ते कळेल आपल्या (दोघा) पैकी जास्त वेळा इथे कोण उपस्थित होते ते, त्यामुळे असे हवेत बोलणं हे निदान तुमच्या कडून तरी अपेक्षित नाहि. "शिवाय दरम्यानच्या काळात त्यांना 'बडे भाई' चे लिखाण गोळा करता येत असावे" तुमचा रोख कळला पण उगा अधांरात दगड मारु नका,तिथून माहिती गोळा करायची आम्हाला गरज नाहि, नाहितर तोच दगड तुम्हाला वर्मी लागेल कारण तुमच्या म्हणन्या प्रमाणे त्या बडे भाईनी दादोजी कोंडदेव बद्दल जी माहिती मिळविली आहे त्या नुसार ते गुरु नाहित या दाव्याला आव्हान करण्याचे धाडस खचितच कुणी दाखवू शकेल, तसा विषय इथे निघाला तेव्हा ते मुद्दे मला इथे मांडता आले असते, पण मी दुसर्‍याच बाजुने ते मांडले आहे, ते गुरु असुदे नाहितर नसुदे माझा आक्षेप वेगळाच होता, आणी अपेक्षे प्रमाणे त्या बद्दल वाद घालणारे उत्तरे न देताच चर्चेला बगल देऊन पळून गेले, त्यामुळे पुन्हा माझ्या आक्षेपाचे खंडन केले नाही असे आम्हाला वारंवार म्हणावे लागतेच त्यात 'जितं मया' म्हणायची गरज काय मुद्दे खोडायला इथे कधिहि खोडले जाऊ शकतात ना.. समोरचा वाद घालणारा माणूस उत्तराची वाट पाहातो आणि नंतर कंटाळून विषय/धागा सोडून देतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे,जुनेधागे सुदैवाने उडविले जात नाहित त्यास वेळेच बंधन नसावं,तुमचं असं म्हणंन आहे का की ठराविक वेळेत जर कुणी एखाद्या मुद्दा/गोष्टीच खंडन केले नाहि तर ती गोष्ट खरि ठरते? किंवा निकालात निघते,त्याचं महत्व उरत नाहि ? तुमचे असे म्हणने आहे का की एखाद्याने प्रतिसाद दिल्या दिल्या त्यावर लगेचच प्रतिक्रिया यायला हवी? नेट/संस्थळ प्रॉब्लेम / वैयक्तिक कामे यांचा काहि विचार आहे का?
वस्तुतः त्यांचे वादपटुत्व पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत आदर निर्माण झाला आहे आणि त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीची प्रचिती आली आहे. अशा माणसाने स्वतःच स्वतःची अब्रू खुंटीला टांगून घ्यावी याचे फार वाईट वाटते. शिवाय इथले काही टवाळ, मवाली ब्राम्हण त्यांची वारंवार खिल्ली उडवतात ते पाहून तर फारच दु:ख होते. त्यातून त्यांची ती जागोजाग स्माईली टाकण्याची आत्मघातकी सवय. उद्या त्यांना एखाद्याचा गॄह्यसंस्कार छापायला दिला तर त्यानंतरदेखील ते एखादी स्माईली टाकून मोकळे होतील. खरं तर इतकं टाकून बोलू नये किंवा लिहूही नये. पण आपल्या माणसाची बदनामी पाहावत नाही म्हणून लिहिले
तुम्हाला कसली कसली प्रचिती येईल त्याचा काहि नेम नाहि, आणी आमची जागो जागी स्माईली टाकण्याची आत्मघातकी सवय तुम्हाला खुपच त्रासदायक वाटू लागलीए एवढं नक्की :) पण ती डायरेक्ट आत्मघातकी सवय ठरविलीत त्याबद्दल तुमचे कौतुक वाटतेय, असो बाकी इथले काही टवाळ, मवाली ब्राम्हण आमची वारंवार खिल्ली उडवतात ते पाहून तुम्हाला फारच दु:ख झाले हे पाहून आमचे हि डॉले पानावले :Sp अवांतरः जोगळेकर...टवाळ ब्राह्मण/ मवाली ब्राम्हण हे खुप गुळमुळीत वाटतेय. कस काय सुचलं?:p बाकी लहान भावाने कितिहि टवाळी/ मवाली केली तरि मोठ्या भावाची बदनामी होते असे आम्हि तरी मानत नाहि, (ह. घ्या.)

In reply to by अजातशत्रु

पण आमचे दुर्देव की आमच्या विनंत्या तुम्हाला मान्य होत नाहित/ तुमच्या विनंत्या दखलपात्र नसतात त्यामुळे त्या मान्य्/अमान्य करण्याचा प्रश्नच नाही. तसेच चोरा सारखे उपटण्याची कला तुम्हालाच छान अवगत असावी. जे काही लिहिलंय ते थेट कळावं म्हणून थेट खरडवहीमध्येच रिप्लाय देण्यास सुरुवात केली आहे. ..इथे जर लॉगीन हिस्ट्री रेकॉर्ड ची सोय असेल तर ते कळेल आपल्या (दोघा) पैकी जास्त वेळा इथे कोण उपस्थित होते ते, त्यामुळे असे हवेत बोलणं हे निदान तुमच्या कडून तरी अपेक्षित नाहि असा लॉग आहे की नाही ते ठाऊक नाही. आणि समजा असेल तरी कोण जास्त वेळ उपस्थित होतं याचा काहीच संबंध नाही. मी जे लिहिलं त्यातल्या नेहमीप्रमाणेच तुम्ही मूळ मुद्द्याला बगल दिली आहे. नाहितर तोच दगड तुम्हाला वर्मी लागेल कारण तुमच्या म्हणन्या प्रमाणे त्या बडे भाईनी दादोजी कोंडदेव बद्दल जी माहिती मिळविली आहे त्या नुसार ते गुरु नाहित या दाव्याला आव्हान करण्याचे धाडस खचितच कुणी दाखवू शकेल दादोजी कोंडदेव हा मूळ वादाचा विषय नाहीच. तुम्ही चिखलफेक करण्याच्या नादात मूळ विषय विसरुन गेलात. उद्या तुम्ही किंवा इतर कोणी दादोजी कोंडदेव औरंगजेबाचे गुरू होते असा दावा केला तरी माझे काहीच म्हणणे नाही. आठवा बरे. मूळ वाद महर्षी कर्व्यांच्या टवाळीवरुन सुरु झाला. तुमचं असं म्हणंन आहे का की ठराविक वेळेत जर कुणी एखाद्या मुद्दा/गोष्टीच खंडन केले नाहि तर ती गोष्ट खरि ठरते? किंवा निकालात निघते,त्याचं महत्व उरत नाहि ? छे. पण कधी कधी खंडन करण्यासाठी मुद्दामून उशिर लावला जातो त्याचं काय ? अवांतरः जोगळेकर...टवाळ ब्राह्मण/ मवाली ब्राम्हण हे खुप गुळमुळीत वाटतेय. मग तुम्हीच द्या की एखादी लोणकढी शिवी. त्यामध्ये एखाद्या विशिष्ट जातीचा उलेख अवश्य येउदेत. बाकी लहान भावाने कितिहि टवाळी/ मवाली केली तरि मोठ्या भावाची बदनामी होते असे आम्हि तरी मानत नाहि, चालू द्यात.

मूळ लेख चांगला वाटला होता पण प्रतिसादांची दिशा/रोख पहाता 'स्पा' यांच्या "पुरे आता" या प्रतिसादाला भरघोस पाठिंबा! अशा वादग्रस्त विषयांवरचे आणि देशाच्या एकीला बाधा आणू शकणारे लेख moderation नंतरच प्रकाशित करावेत असे वाटते. अन्यथा आपलाही 'पाकिस्तान' व्हायचा!

In reply to by सुधीर काळे

अशा वादग्रस्त विषयांवरचे आणि देशाच्या एकीला बाधा आणू शकणारे लेख moderation नंतरच प्रकाशित करावेत असे वाटते. मॉडरेशनला पात्र असलेला (पक्षी वादग्रस्त विषयावरचा) लेख हा मॉडरेशन करण्याआधीच लक्षात येणे शक्य नाही. म्हणजे सगळ्याच लेखांचे मॉडरेशन केले पाहिजे. म्हणजे मूळ सर्व मुद्द्यांपेक्षा हजारपट वादग्रस्त मुद्दा आला.. ;)

तुमचे लेख म्हणजे परस्परविरोधी विधानांनी भरलेले आहे. तसेच प्रतिसादही. तुमचा ब्राह्मण लोकांविरुद्ध राग वगैरे आहे हेच फक्त सिद्ध होतंय. तुमचे लेख आणि प्रतिसाद हे संभाजी ब्रिगेड नावाने संभाजी राजांना बदनाम करणाऱ्या संघटनेचे विचार आहेत असं दिसतंय. ब्राह्मणेतर लोक उदा. इंद्रराज पवार किंवा इतर कोणी संतुलित विचाराचे लोक तुमचे समर्थन करताना दिसत नाहीत ते का? हा फक्त ब्राह्मणद्वेष आहे . म्हणजे एकीकडे ब्राह्मण आम्हाला अजूनही समजून घेत नाहीत वगैरे वगैरे म्हणायचं आणि स्वतःच ब्राह्मणद्वेष पसरवायचा. आश्चर्य हे कि इतर मिपा सदस्य या अशा "चर्चेत" भाग घेत आहेत.

जसे प्रतिसाद असतात तशा मी संयमीत प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत असतो, मला ज्या सत्य गोष्टि माहित आहेत त्या विषयीच बोलतो माहित नसल्यास जाहिर माफि मागायचा प्रामाणिकपणाहि बाळगतो, माझे लेख संयमीत असावेत याची मि काळजी घेत असतोच पण कुणि उध्दटपणा केला तर मलाहि त्याच टोन मध्ये उत्तर द्यावे लागते,
तुमचे लेख आणि प्रतिसाद हे संभाजी ब्रिगेड नावाने संभाजी राजांना बदनाम करणाऱ्या संघटनेचे विचार आहेत असं दिसतंय.
हे असं कधी झालं तुमचं? नाहि माझ्या भाग -१ मध्ये मी एक शब्दहि तथाकथीत ब्राह्मण या जाती विरुध्द लिहिला नाहि या उलट माझ्या लेखाची सुरुवात आणी अवांतर पुन्हा एकदा काळजी पुर्वक वाचा, तुम्हि जो बिनबुडाचा आरोप केलाय कि, माझे विचार हे संभाजी ब्रिगेड नावाने संभाजी राजांना बदनाम करणाऱ्या संघटनेचे विचार आहेत दिसतात.हे किती तकलादू बिनबुडाचे आहे हे सिध्द होईल, काय असतं ना ज्यांना द्वेषाची काविळ झालेली असते त्यांना सगळे जग द्वेष ग्रस्तच दिसते त्यात तुमची चुक नाहि,त्यामुळे तुम्हि किमान माफि मागावी असे मी म्हणनार नाहि. सत्य हे ब्रिगेडने सांगितले काय नाहितर मी सांगितले काय तरी ते सत्यच राहणार आहे त्याला डावलून कुणालाच पुढे जाता येणार नाहि हे लक्षात ठेवा,
इंद्रराज पवार किंवा इतर कोणी संतुलित विचाराचे लोक तुमचे समर्थन करताना दिसत नाहीत ते का? हा फक्त ब्राह्मणद्वेष आहे .
इंद्रराज पवार हे इथले सदस्य आहेत काय? मि त्यांना ओळखत नाहि, ते किंवा इतर कोणी संतुलित विचाराचे असतीलहि पण त्यांना माझेच विचार पटावे किंवा मला समर्थन द्यावे असा माझा फाजिल अट्टाहास नाहि, तुम्हाला फक्त ब्राह्मणद्वेषच दिसला? मला जर न पटणारे मुद्दे खोडायचे असतील अन जे सत्य आहे ते तरी मांडायचा किमान अधिकार आहे/असायला हवा मग एखादा आरोप /मुद्दा असेल तर त्याची दुसरी अन खरी बाजू मांडणे, म्हणजे नाण्याची दुसरी बाजू, जर तुम्हाला ब्राह्मणद्वेषच वाटत असेल तर त्यास माझा नाईलाज आहे. फक्त काहि लोकांना आवडत नाहि म्हणून ते सत्य मांडायचेच नाहि का? अवांतर : प्रतिसादा शेवटी "तुमच्या विचारांची दिशा बघता तुमच्या कोणत्याही धाग्यावर मी यापुढे प्रतिसाद देणार नाही" असा पवित्रा घेतला नाहित याचे आश्चर्यच वाटले मला, काहि लोकांना प्रतिवाद करायला मुद्दे नसले की चर्चा थांबवण्याचे हे एक सोपे अन लोकप्रिय कारण आहे,

In reply to by अजातशत्रु

ओ ब बै गप्प बसा की. तुमच्यासारख्या काही लोकांमुळेच रस्त्यावरचे माकडाचे खेळ बंद झालेत. आता निदान ह्या आभासी जगातील खेळाकडे तरी तुमची वक्रदॄष्टी वळवु नका. अजात्रशत्रु तुम्ही ह्या लोकांकडे लक्ष देउ नका हो. इथली सगळी बामण कंपू करुन तुमच्या मागे हात धुवुन लागली आहेत पण आमच्या सारखे काही समविचारी तुमच्यामागे ठामपणे उभे आहोत. मला ना तुमचे खरच खूप कौतुक वाटते. इथली बामण तुम्हाला ब्रिगेडी म्हणतात, तुम्ही तुमचे लेखन कसे चोरुन आणता ह्याचे पुरावे देतात, तुमच्या प्रत्येक विचाराला दुरुत्तरे करुन तुम्हाला तोंडावर पाडतात, तुम्हाला २/४ दिवसांसाठी पळताभुई थोडी करतात, तुम्हाला 'अ-जात-शत्रु' म्हणतात पण तरी देखील तुम्ही ज्या दृढ निश्चयाने आणि एकाग्रतेने तुमचे हे सत्य उजेडात आणण्याचे कार्य चालवले आहे त्याला तोड नाही. अहो मारे त्या टिळकांनी काय ते गीतारहस्य वैग्रे लिहिले पण त्यांच्याकडे वेळच वेळ होता हो तुरुंगात. पण तुम्ही सर्व सामाजीक, आर्थीक जबाबदार्‍या पार पाडून हे जे कार्य करत आहात ते खरच महान आहे. आता 'बामणांचा उत्कर्ष हा त्यांच्या जन्माने नव्हे तर कर्माने होतो आहे' सारख्या सिद्धातांना आपण फाट्यावर मारायचे हे लक्षात घ्या. आपले काम लेखन करणे हे आहे; कोण कशाने पुढे येतो हे बघणे नाही. आता बामण स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर, श्रमावर वर येत असतील देखील पण आपल्याला त्याचे सोयर सुतक नाही. आपल्याला जे माहिती आहे तेच सत्य आहे आणि ते उजेडात यायलाच हवे. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओ ब बै गप्प बसा की. तुमच्यासारख्या काही लोकांमुळेच रस्त्यावरचे माकडाचे खेळ बंद झालेत. आता निदान ह्या आभासी जगातील खेळाकडे तरी तुमची वक्रदॄष्टी वळवु नका.
दोरी आमच्या हातात अन् कोलीत तुमच्या हातात बरयं बुवा :)
अजात्रशत्रु तुम्ही ह्या लोकांकडे लक्ष देउ नका हो. इथली सगळी बामण कंपू करुन तुमच्या मागे हात धुवुन लागली आहेत पण आमच्या सारखे काही समविचारी तुमच्यामागे ठामपणे उभे आहोत.
बामण कंपू कृपया असा शब्द प्रयोग करु नये आमचे परम मित्र श्री.जोगळेकर गुर्जीना हे फार्र फार्र खटकते ते लगेच अठरापगड जातींचा उध्दार करुन मोकळे होतात, बघा आता तुम्हालाहि त्याची प्रचीती येईलच जशी मला आली, (सॉरी हं जोगळेकर मी हा शब्दप्रयोग थांबवला आहे तुमच्यासाठी) असो तुम्हि समविचारी आहात ना मग मागे नको समांतर उभे रहा, आम्हि सर्वांना समान पातळीवर बघतो. उगाच भलतेच अर्थ निघू शकतात.
मला ना तुमचे खरच खूप कौतुक वाटते. इथली बामण तुम्हाला ब्रिगेडी म्हणतात, तुम्ही तुमचे लेखन कसे चोरुन आणता ह्याचे पुरावे देतात, तुमच्या प्रत्येक विचाराला दुरुत्तरे करुन तुम्हाला तोंडावर पाडतात, तुम्हाला २/४ दिवसांसाठी पळताभुई थोडी करतात, तुम्हाला 'अ-जात-शत्रु' म्हणतात पण तरी देखील तुम्ही ज्या दृढ निश्चयाने आणि एकाग्रतेने तुमचे हे सत्य उजेडात आणण्याचे कार्य चालवले आहे त्याला तोड नाही. अहो मारे त्या टिळकांनी काय ते गीतारहस्य वैग्रे लिहिले पण त्यांच्याकडे वेळच वेळ होता हो तुरुंगात. पण तुम्ही सर्व सामाजीक, आर्थीक जबाबदार्‍या पार पाडून हे जे कार्य करत आहात ते खरच महान आहे.
मला ना तुमच्या बद्दल काय काय वाटतेय काय सांगू शब्दच सुचत नाहिए, पण सध्या जे सुचतेय ते असे, बुचकळ्यात पडणे,कमाल,अचंभा,आश्चर्य,कीव,आणि हसून हसून पोटात गोळा आल्यावर होते तसे होतेय सध्या इतकच सुचलंय जसे सुचेल तसे पुढे सांगेनच, कारण तुम्हि स्वतःच केलेल्या एका हि मुद्द्यावर,दाव्यावर कधीच ठाम राहत नाहि, असे का? मागे सुध्दा मी म्हणालो होतो कि तुम्हि तुमची वैयक्तिक मते व्यक्तिगणिक (व्यक्ति पाहून ) बदलत असता पण आता असे म्हणावे लागतेय की तुम्हि तुमची मते प्रत्येक धाग्या गणिक बदलत आहात, बापरे इतके तर मुरलेले दलबदलू राजकारणीहि पक्ष बदलत नाहित, :) कमाल आहे ह तुमची, :Stare: "तुमच्या प्रत्येक विचाराला दुरुत्तरे करुन तुम्हाला तोंडावर पाडतात" नाहि हो अजून तरि नाहि ते व्हायचेय अजून, पण माझ्या प्रश्नांची उत्तरे देताना फारच कसरत करावी लागते, अन् काहिंनी तर घाबरुन हा माझा शेवटचा चेंडू म्हणून माघारहि घेतलीए, काहि लोकं "जाऊ दे ना दुर्लक्षच करतो" असे म्हणून (म्हणजे मला उत्तर देण्या वाचून वाचता येईल) असे म्हणून आपली तोंडावर पडतात का तोंडे लपवतात काय ते समजायचे, पण पुन्हा ते आपलं मुखदर्शन देत नाहित हो.. २/४ दिवसांसाठी पळताभुई थोडी करतात हे कसे काय ताडलेत बुवा? म्हणजे काहि कारणाने मी इथे आलो नाहि की, मि पळालो असा अर्थ आहे काय? असे नसते हो मालक...:) आता तुम्हि या धाग्यावर एक महिन्याने आलात मग काय तुम्हाला मी एक महिना पळताभुई थोडी केली असा घ्यायचाय का? :) बाकि मला लोक काय म्हणतात त्याचे मला तरि वाईट वाटत नाहि, निंदकाचे घर असावे शेजारी, इथे तर सगळे घरातच आहेत. हॅ हॅ हॅ =)
आता 'बामणांचा उत्कर्ष हा त्यांच्या जन्माने नव्हे तर कर्माने होतो आहे' सारख्या सिद्धातांना आपण फाट्यावर मारायचे हे लक्षात घ्या. आपले काम लेखन करणे हे आहे; कोण कशाने पुढे येतो हे बघणे नाही. आता बामण स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर, श्रमावर वर येत असतील देखील पण आपल्याला त्याचे सोयर सुतक नाही. आपल्याला जे माहिती आहे तेच सत्य आहे आणि ते उजेडात यायलाच हवे.
'उत्कर्ष जन्माने नव्हे तर कर्माने होतो' असा एक त्यांचाच होतो असा गोड गैरसमज आहे तर हम्म :) तुमच्या या धादांत गैरसमजाला खरच माझ्या लेखी काहिच सोयर सुतक नाही, !! लोभ असावा राग नसावा..!! तुमच्या पुढच्या व्यक्तिगणिक/धाग्यागणिक बदलत जाणार्‍या वैयक्तिक मतांसाठि मनापासून खूप खूप शुभकामना..!

In reply to by अजातशत्रु

बामण कंपू कृपया असा शब्द प्रयोग करु नये आमचे परम मित्र श्री.जोगळेकर गुर्जीना हे फार्र फार्र खटकते ते लगेच अठरापगड जातींचा उध्दार करुन मोकळे होतात, बघा आता तुम्हालाहि त्याची प्रचीती येईलच जशी मला आली, (सॉरी हं जोगळेकर मी हा शब्दप्रयोग थांबवला आहे तुमच्यासाठी) याचाच अर्थ तुम्ही आधी असा शब्दप्रयोग करत होता असाच होतो. नाही का? (कदाचित नाहीच म्हणाल एक मोठ्ठे अवांतर भाषण लिहून.) उद्या आम्ही हा महारड्यांचा, चाम्भार्ड्यांचा कंपू वगैरे म्हंटले तर कितपत चालेल (संपादक मंडळाला सुद्धा ) हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे. कदाचित तुमची जात मी उल्लेखलेली नसेलही पण मग जी काय असेल तिचा अशा रीतीने उल्लेख केला तर बघू द्या कि तुम्हाला किती पानी टंकायची गरज पडते ते. बाकी उत्कर्ष फक्त जन्मानेच होतो असे म्हणणे असेल तर , सर्वसामान्य व्यक्तींच्या बाबतीत, तर त्याचे काही दाखले द्यायला जमतील का? बाकी उत्कर्ष म्हणजे फक्त पैसा असाच अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे असं जाणवतंय. आणि पैसा हा ब्राह्मणांना कर्माने न मिळता जन्माने मिळतो अशी भावना असेल तर मग वा!!! बाकी मोठ्ठे पैशेवाले पवार, आठवले, ब्रिगेडी हे ब्राह्मणच असावेत असा संशय आहे. अर्थात तुम्हाला अधिक माहीती असेल (च) तर द्यावी ही विनंती.

कृपया धाग्याशी संबधीत प्रतिसाद धाग्यावरच द्यावेत, हि किमान अपेक्षा आहे, खव मध्ये वैयक्तीक चर्चा करावी, मला इतरांची ही मते जाणून घ्यायची असतात, त्यामुळे यापुढे मी "खव" मध्ये धाग्याशी संबधीत प्रतिसादांच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही, चर्चा सर्वांसाठी अन् जाहीर असावी,

असे बोलल्या बद्दल क्षमा करा,(सुरुवातीलाच) पण असा आयडी घ्यायला तुम्हाला मागे एका धाग्यात सुचविण्यात आले आहे, ते आता तुम्हि खरे ठरवित आहात काय असे वाटतेय. " 'उत्कर्ष जन्माने नव्हे तर कर्माने होतो' असा एक त्यांचाच होतो असा गोड गैरसमज आहे तर, तुमच्या या धादांत गैरसमजाला खरच माझ्या लेखी काहिच सोयर सुतक नाहि " हे जे ठळक अक्षरात अधोरेखित केले आहे याचा अर्थ- एखाद्या विशिष्ट समाज/जातीचा उत्कर्ष, हा ते त्या विशिष्ट समाज/जातीत जन्माला आल्यामुळे होतो, हा गैरसमज आहे अन तो चुकिचा आहे त्याचा अर्थ एवढाच, प्रत्येक जात-समुहाचा उत्कर्ष हा कर्मानेच होतो,हा माझा दावा आहे. त्यामुळे तुम्हि म्हणताय तसा दावा मि केला नसल्यामुळे तुमचा सर्वसामान्य व्यक्तींच्या बाबतीत, तर त्याचे काही दाखले द्यायला जमतील का? हा प्रश्न ऑपॉपच रद्दबातल ठरतो. याच प्रकारे तुमचे पुढचे इतरही मुद्दे गैरलागू अन् निकालात निघाले असले तरी, मी तुम्हाला निराश न करता त्यांची उत्तरे देतो
उत्कर्ष म्हणजे फक्त पैसा असाच अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे असं जाणवतंय.
नाहि, त्यापेक्षा मी असे म्हणेन माणूस जिवन जगला अन् निवर्तला म्हणजे तो संपुर्णपणे सक्सेस झाला त्याचे जिवन कार्य सफल झाले असे मी मानत नाहि,सो उत्कर्ष म्हणजे फक्त पैसा असा अर्थ मि तरी लावत नाहि, तुम्हि तो लावलात तर त्यास माझी काहि हरकत नाही.
पैसा हा ब्राह्मणांना कर्माने न मिळता जन्माने मिळतो अशी भावना असेल तर मग वा!!!
माझी तशी भावना नाही उत्तर वरील प्रमाणेच
मोठ्ठे पैशेवाले पवार, आठवले, ब्रिगेडी हे ब्राह्मणच असावेत असा संशय आहे. अर्थात तुम्हाला अधिक माहीती असेल (च) तर द्यावी ही विनंती.
माझ्यावर भलताच विश्वास दाखवत तुम्हि तुमच्या शेवटच्या वाक्यात केलेला (च) चा शब्दप्रयोग मी समजू शकतो पण नम्रपणे हे सांगावेसे वाटते की हे लोक पैसेवाले असतीलही पण मला त्यांच्या बद्दल खास अशी माहिती नाही. तसे दावे मि केले नसल्यामुळे जो तुम्हाला संशय आहे तो दुर करण्याची जबाबदारी माझी नाही,
याचाच अर्थ तुम्ही आधी असा शब्दप्रयोग करत होता असाच होतो. नाही का?
होय केला आहे आणी सहेतूकच केला आहे, करुन नाकारण्याचा मुर्खपणा आम्ही करत नसतो, त्यात आमचे परम मित्र श्री.जोगळेकर गुर्जी अलगद फसले मला त्यांना आपली माणसं अन् परकी माणसं यातला फरक दाखवायचा होता, तो तुम्हालाही दाखवायची नितांत गरज आहे. कारण तुम्हीही सारासार विचार न करता बोलता लाईक जोगळेकर, जसे तुम्हाला अन् जोगेळेकरांना बामण ही शिवी वाटते, (हे जोगळेकरांचे वाक्य पहा - "मला स्वतःला तरी या जातीवाचक शिव्याच वाटतात" माझा प्रश्न -बामण हा शब्द शिवी सारखा आहे काय? तुम्हाला या जातीवाचक शिव्या वाटतात???? जरा स्पष्टिकरण द्या हो. जर ब्राम्हण ऐवजी बामण हा शब्द वापरला जात असेल तर तो शिवीसारखा आहे. किंबहुना ती शिवीच आहे. ) बरं तसे ते इथल्या इतर सदस्यांना वाटत नाही याचे कारण काय? गंमत पहा "बामण कंपू" हा शब्द प्रयोग कुणी केलाय? श्री.प.रा. यांनी आणी तुम्ही बोलताय कुणाला मला?? :stare: काय ताई निदान प्रतिसाद तरी नीट वाचा मग प्रतिक्रिया द्या. मी उलट त्यांना तो शब्द प्रयोग मागे घ्यायला सुचवले होते पण हाय रे कर्म... तुमची अन् श्री.जोगेळेकरांची द्वेषाची काविळ अन् इतरां बद्दलचा राग, कटूता, या गोष्टी स्पेशीयली ज्या जातींचा उल्लेख रागाने अन् उद्वेगाने केलात त्यांचेबद्दल आजही जराही, तुसभरही, तुमच्या मनातून कमी झालेल्या नाहीत. हे या वरुन पुन्हा एकदा अगदी स्वच्छ स्पष्ट झाले आहे, तेव्हा तुमची हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा किती द्वेषातून,फोलपणातून अन् अत्यंत उथळपणे आलेली आहे हे ही पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, शिवाय त्यात तुम्ही संपादक मंडळाला सुद्धा या द्वेषात ओढून आवाहन केले आहे, जे अत्यंत बालिशपणाचे लक्षण आहे, आता मलाही यावर त्यांची प्रतिक्रीया जाणून घ्यावी असे वाटू लागले आहे, जोगळेकरांची गंम्मत पहा- "बामणांनी त्याला इतका इतका मोठा केला कि स्वराज्य शिवाजी न्हवे तर कोंडदेवाने मिळविले असे वाटू लागले " हे वाक्य माझे आहे हा शब्द मि एकदाच सहेतूक उच्चारला, मला कल्पना होतीच ते यावर आक्षेप घेतील, ( नोट ="बामण कंपू" हा शब्द प्रयोग मि कधीच केलेला नाही ) मलाही तो शब्द प्रयोग करायचा नव्हता, पण मला जोगळेकरांना आपली माणसे/कंपु बाजी या गोष्टी पुराव्या सहीत दाखवून द्यायच्या होत्या, त्या शिवाय ते माननार कसे, नाही का? श्री.प.रा. यांचा कोणताही प्रतिसाद घ्या ते "ब्राह्मण" असा शब्द प्रयोग बर्‍याच वेळा करत नाहीत, ते मलाही खटकत होते पण त्यावर कधी कुणी आक्षेप घेतला नाही, हाच पॉईंट पकडून मी तो शब्द प्रयोग केला, मला माहित होते जर मि हा शब्द प्रयोग केला तर 'काही लोक' लगेच बाह्या वर करुन कि-बोर्ड वर दंगा करतील स्पेशीयली जोगळेकर, मला तेच अपेक्षित होते ते ट्रॅप झालेच, काय जोगळेकर गुर्जी आहे ना हा धडधडीत पुरावा, :) तुमच्या कंपुबाज अन् आपल्याच माणसाच्या चुकांवर पांघरुन घालता त्याचा हा एक उत्तम पुरावा :) अहो जेव्हा ते किंवा इतर असा शब्द प्रयोग करतात तेव्हा काय फुलं पडतात काय अंगावर तुमच्या? का गुदगुल्या होतात? अन् फक्त आम्ही बोललो की ती लगेच मानहानी ठरवीली जाते जाती वाचक शिवी म्हणले जाते? म्हणजे मला एक नियम अन् इतरांना वेगळा नियम आहे काय? याचे स्पष्टिकरण द्या आणी जे शब्द माझ्यावेळी वापरलेत तसेच आणी तेच शब्द ज्यांनी ज्यांनी तो शब्द प्रयोग केलाय त्यांना स्पेशीयली श्री.प.रा. याना करुन दाखवा बघूयात किती खरे आणि प्रामाणिक आहात तुम्ही ? :) विशेष सुचना -जोगळेकरांचे वाक्य-हीच या अ‍ॅनालॉजी लावायची असेल तर महारांना 'म्हारड्या' आणि चांभारांना 'चांभारड्या' म्हणणे हीसुद्धा शिवीगाळ ठरणार नाही.आता यांनाही याच टोन मध्ये तुम्ही बोलाल अशी किमान अपेक्षा आहे, अती विशेष सुचना ते बोलताना वरचा "म्हा"/"चां"अन् खालचा "ड्या" हा व्यवस्थितच लागला पाहिजे अन्यथा तुमचे मार्क,गुण कापले जातील :) हि सुचना शिल्पा ताईंना ही आहे हं, फक्त पुढे तुम्ही मि न उच्चारलेले ( म्हणजे ते प.रा. यांचे वाक्य आहे) वाक्य म्हणायचे "बामणकंपू" हम्म आता बघू द्या कि तुम्हाला किती पानी टंकायची गरज पडते ते. :) अवांतरः हे म्हणजे असेच झाले म्हणायचे... !! तुम करे तो रास लिला, और हम करे तो साला, कॅरेक्टर ढीला !!

In reply to by अजातशत्रु

जोगळेकरांची गंम्मत पहा- "बामणांनी त्याला इतका इतका मोठा केला कि स्वराज्य शिवाजी न्हवे तर कोंडदेवाने मिळविले असे वाटू लागले " हे वाक्य माझे आहे हा शब्द मि एकदाच सहेतूक उच्चारला, मला कल्पना होतीच ते यावर आक्षेप घेतील, शिवी एकदा दिली काय आणि अनेकदा दिली काय शिवी ही शिवीच राहणार. शिवाय तो शब्द तुम्ही सापळा रचण्यासाठी/ सहेतुक रचला याला काहीच पुरावा नाही. किंबहुना आधी जातीवाचक शिवी दिली, चूक झाली हे तुमच्या लक्षात आले. त्यानंतर सापळा लावणे, त्यात अलगद अडकणे वगैरे वगैरे हा सगळा एक्सप्लनेशन देण्यासाठी केलेला कल्पनाविलास आहे. मलाही तो शब्द प्रयोग करायचा नव्हता, पण मला जोगळेकरांना आपली माणसे/कंपु बाजी या गोष्टी पुराव्या सहीत दाखवून द्यायच्या होत्या, त्या शिवाय ते माननार कसे, नाही का? कोणत्या पुराव्यासहित तुम्ही काय सिद्ध केले आहे ? तुम्ही 'बामण' हा शब्द वापरल्याने आपली माणसे/कंपू बाजी संदर्भातील तुमची गॄहीतके कशी सिद्ध झाली ? श्री. परा किंवा अन्य कोणी येथे जर जातीवाचक शिव्या देत असतील तर त्यालाही माझा विरोधच राहील. पण त्यांचे प्रतिसाद जर मी वाचलेलेच नसतील तर मला त्यांनी शिव्या दिल्या आहेत की नाहीत हे कळणार देखील नाही. त्यामुळे निषेध नोंदवण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. शिवाय शिवी दिला गेलेला शब्द काय संदर्भात वापरला आहे हेदेखील तपासून पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ - माझ्या एका सदस्य मित्राने केलेला व्यनि पाहा. का रे **** ? पुरे कर आता. तुझादेखील 'अजातशत्रू' झाला की काय ? येथे 'अजातशत्रू' हा शब्द शिवीसारखा वापरण्यात आला आहे. माझा आक्षेप अशा प्रकारच्या उल्लेखांना आहे. याउलट मी त्याला दिलेला रिप्लाय पाहा. एकदा रिंगणात उतरल्यावर माघार घेण्यात काय हंशील ? श्री 'अजातशत्रू', द्वेषमूलक जातीवाचक लिखाण थ्यांबवतील तर मीदेखील प्रतिसाद देणे आपणाहूनच थांबवेन. येथे 'अजातशत्रू' हा शब्द शिवीसारखा वापरण्यात आलेला नाही. कारण तो शब्द तसा वापरणे मला मान्यच नाही. माझे म्हणणे लक्षात आले ना ? सापळे लावणे/ अलगद अडकवणे वगैरे गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला अजून अवकाश आहे. तूर्तास डोंबारी उड्या व्यवस्थित मारता आल्या तरी खूप झाले. असे किती सापळे वर लागले होते, त्यात कोण अडकले, अडकलो आहोत हेदेखील कोणाला कळले नाही याचा अभ्यासच करायचा असेल तर सगळे प्रतिसाद पुन्हा एक्दा वाचून काढा. मास स्केलवर व्यनि पाठवून एखाद्याची पद्धतशीर बदनामी करण्याचे धंदेसुद्धा इथे चालू असतात. थोडे मोठे व्हा इतकेच म्हणू शकतो. तुमच्या आत्मपरीक्षण भाग - २ या भागातून होणार्‍या मार्गदर्शनाची/ज्ञानामॄताची/नक्कलीची किती दिवस वाट पाहायची ? इथे मूळ मुद्दे सोडून नुसती चिखलफेकच चालू आहे. अर्थात तुम्हाला चिखलात लोळणेच पसंत असेल तर चालू द्या.

In reply to by अप्पा जोगळेकर

शिवी एकदा दिली काय आणि अनेकदा दिली काय शिवी ही शिवीच राहणार. शिवाय तो शब्द तुम्ही सापळा रचण्यासाठी/ सहेतुक रचला याला काहीच पुरावा नाही. किंबहुना आधी जातीवाचक शिवी दिली, चूक झाली हे तुमच्या लक्षात आले. त्यानंतर सापळा लावणे, त्यात अलगद अडकणे वगैरे वगैरे हा सगळा एक्सप्लनेशन देण्यासाठी केलेला कल्पनाविलास आहे.
मलाही तो शब्द प्रयोग करायचा नव्हता, पण मला जोगळेकरांना आपली माणसे/कंपु बाजी या गोष्टी पुराव्या सहीत दाखवून द्यायच्या होत्या, त्या शिवाय ते माननार कसे, नाही का? कोणत्या पुराव्यासहित तुम्ही काय सिद्ध केले आहे ? तुम्ही 'बामण' हा शब्द वापरल्याने आपली माणसे/कंपू बाजी संदर्भातील तुमची गॄहीतके कशी सिद्ध झाली ?
पुरावा नाही कसे म्हणता हो रामशास्त्री ? :) पुरावा आहे न.. आम्ही फुकाचे 'एक्सप्लनेशन' देत नसतो, शिवी एकदा दिली काय आणि अनेकदा दिली काय शिवी ही शिवीच राहणार हे सांगायला ब्रह्मदेव यायला नको, आम्हि कल्पनाविलासात जगत नसतो, पण काही वेळा ताळतंत्र सोडलेल्या कंपुबाजांना वठणीवर आणन्यासाठी असे सापळे रचून त्यात कोंबायचे असते, आणि त्यांचि खरी जागा दाखवून द्यायची असते. तुम्हाला आपली माणसे/कंपु बाजी या गोष्टी पुराव्या सहीत इथेच दाखवून द्यायच्या होत्या ना, त्या शिवाय तुम्ही ते माननार नव्हता हे मला माहीतच होते, म्हणून मी हा सापळा रचला, अहो मी इतके स्पष्ट बोलत असतानाही तुम्ही ते न मानता, "त्यांचे प्रतिसाद जर मी वाचलेलेच नसतील तर मला त्यांनी शिव्या दिल्या आहेत की नाहीत हे कळणार देखील नाही" असे बरळत आहात? :stare: खरे तर तुमच्या या वाक्यातच काही लोकांना वाचवायचे म्हणजे आपला माणूस ही भुमीका स्पष्टपणे दिसत आहे, परिकथेतील राजकुमार यांनी Sat, 16/04/2011 - 18:51 ला प्रकाशित केले. हे श्री.प.रा.यांचे वाक्य 'बामणांनी केलेले अन्याय' असा धागा काढा ठिक, आता माझे वाक्य - Thu, 26/05/2011 - 21:14 ला प्रकाशित केले. (किती दिवसांचा फरक आहे करा हिशोब) बामणांनी त्याला इतका इतका मोठा केला यावर तुमचा आक्षेप होता,ती शिवी आहे म्हणून, प.रा. आणि माझ्या वाक्यात एक 'शब्दच' काय 'काना', 'अनुस्वाराचाही' फरक नाही जोगळेकर, अगदि तंतोतंत हुबेहुब जुडवा आहे ना.. तरी तुम्हाला माझे वाक्य शिवीसारखे वाटते अन् त्यांचे गोड लागतेय, कि बोबडी वळतेय? वा वा वा... यापेक्षा सुंदर पुरावा दुसरा असू शकेल काय? तुमच्या कोत्या कंपुबाजपणाचा.? ही घ्या लिंक अन खातर जमा करा एकदाची http://www.misalpav.com/node/17682 हेच कशाला आणखीन एक ताजे उदा. घ्या श्री.प.रा.यांनी याच धाग्यावर फक्त ४ प्रतिसाद सोडून बामण कंपू हा शब्द प्रयोग केला आहे (तसे ते नेहमीच अन सतत करत असतात) त्यावर मी त्यांना कृपया असा शब्द प्रयोग करु नये असे सुचवलेय सुध्दा, पण त्यावर तुम्ही अक्षरश:हा दुर्लक्ष केलेत,आणि वर कहर म्हणजे शहाजोगपणाचा आव आणत हे बोलता- श्री. परा किंवा अन्य कोणी येथे जर जातीवाचक शिव्या देत असतील तर त्यालाही माझा विरोधच राहील. पण त्यांचे प्रतिसाद जर मी वाचलेलेच नसतील तर मला त्यांनी शिव्या दिल्या आहेत की नाहीत हे कळणार देखील नाही. त्यामुळे निषेध नोंदवण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. आता तुम्ही नक्कि काय वाचता? कोणते प्रतिसाद वाचता ? हे प्रतिसाद दिसले नाहीत का ? हे विचारने म्हणजे आपल्याच थोबाडात मारुन घेण्यासारखे आहे, यास्तव हे धाडस मि करनार नाही. धन्य आहात तुम्ही महाराज खरेच धन्य आहात, मला वाटते जोगळेकर मी पुराव्यासहित आता मला जे काय सिद्ध करायचे होते ते सिद्ध केले आहे, मी 'बामण' हा शब्द वापरल्याने आपली माणसे/कंपू बाजी संदर्भातील माझी सर्व गॄहीतके सिद्ध झाली आहेतच,
माझे म्हणणे लक्षात आले ना ? सापळे लावणे/ अलगद अडकवणे वगैरे गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला अजून अवकाश आहे. तूर्तास डोंबारी उड्या व्यवस्थित मारता आल्या तरी खूप झाले. असे किती सापळे वर लागले होते, त्यात कोण अडकले, अडकलो आहोत हेदेखील कोणाला कळले नाही याचा अभ्यासच करायचा असेल तर सगळे प्रतिसाद पुन्हा एक्दा वाचून काढा. मास स्केलवर व्यनि पाठवून एखाद्याची पद्धतशीर बदनामी करण्याचे धंदेसुद्धा इथे चालू असतात. थोडे मोठे व्हा इतकेच म्हणू शकतो.
आता अजून काही लक्षात येण्यासारखे उरलेय का ? मी कुनाच्या सापळ्यात अडकलो कि नाही हे अजून ठरायचे आहे, पण ही तुमची वाक्ये तुम्हाला या क्षणी अगदि चपखल बसतायत सापळे लावणे/ अलगद अडकवणे वगैरे गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला अजून अवकाश आहे. तूर्तास डोंबारी उड्या व्यवस्थित मारता आल्या तरी खूप झाले. असे किती सापळे वर लागले होते, त्यात कोण अडकले, अडकलो आहोत हेदेखील कोणाला कळले नाही याचा अभ्यासच करायचा असेल तर सगळे प्रतिसाद पुन्हा एक्दा वाचून काढा.आणि खरेच काढा माझे आव्हान आहे तुम्ही माझ्या बर्‍याच प्रश्नांना अलगद बगल दिली आहे ते स्पष्ट तर होईल. बाकि मास स्केलवर व्यनि पाठवून एखाद्याची पद्धतशीर बदनामी करण्याचे धंदेसुद्धा इथे चालू असतात. हे मलाही माहीत आहे आणि चांगलेच माहीत आहे, मागे एका धाग्यात म्हटल्या प्रमाणे जातीयवाद,ध्रर्म यांच्यावरिल रोचक चर्चां काहिंच्या खरडवहित मुबलक प्रमाणात आढळून येतात, व्यनी दिसण्याची सोय नाहि नाहि तर मग सगळे उघडेच पडले असते... त्या जाहिरपणे धाग्यावर होत नाहित या वरुन मुख में राम बगल में छुरी असं इथे चालू आहे आणि धाग्यावर मारे सभ्यतेचा सहिष्णूपणाचा बुरखा घालणारे ही मुबलक प्रमाणात आहेत, आम्हाला अशी कधी गरज वाटली नाही आम्ही धागा असो नाही तर व्यनी आमचा हिशोब चोख असतो, :)
तुमच्या आत्मपरीक्षण भाग - २ या भागातून होणार्‍या मार्गदर्शनाची/ज्ञानामॄताची/नक्कलीची किती दिवस वाट पाहायची ? इथे मूळ मुद्दे सोडून नुसती चिखलफेकच चालू आहे. अर्थात तुम्हाला चिखलात लोळणेच पसंत असेल तर चालू द्या.
हॅ हॅ हॅ... आत्मपरीक्षण भाग - २ या भागा बद्दल मी वर अगोदरच ईथे http://www.misalpav.com/node/18004 जाहीर केले होते माझ्या परीने ही चर्चा केव्हाच संपली होती, पण काहींना आपले गलिच्छ कंड शमविण्यासाठी चिखलातच रुतून बसायला आवडते, त्यांना कितीही उठवण्याचा प्रयत्न केला तरी ते तिथेच फतकल मांडून लोळत असतात मग आमचाही नाईलाज होतो काय करणार? प्रतिसाद दिला नाहीतर पळपुटा म्हणाल ना.. आमच्या बिचार्‍या द्वेष्ट्यांची अवस्था शेळीच्या शेपटा सारखी झाली आहे झाकता येत नाही आणि धड माश्याही उडवता येत नाही :) आता तुम्ही झाल्या प्रकाराबद्दल माफी मागणार की शेपुट घालणार ते जरा कळू द्यात, :) जाताजाता: जोगळेकर साहेब मला तुमच्यावर किंवा इतर कुणावरही व्यक्तिगत रोष नाही, अहो वैचारीक मतभेद असतातच की, ठिक. आज तुम्हाला जास्तच ताणले आहे, त्याबद्दल मला जर्राही अभिमान नाही, अहो मी ही सापडेन की कधी तरी तुमच्यापण जाल्यात काय ;) . . . . . . . . . !! लोभ असावा राग नसावा !!

In reply to by अजातशत्रु

मी मिसळपाव वर प्रसिद्ध होणारा प्रत्येक धागा, प्रत्येक प्रतिसाद वाचून तो तपासून पाहतो अशी समजूत मनातून काढून टाका. ते काम संपादकांचे असते. धागा किंवा प्रतिसाद वाचत असताना मला जिथे शिवी दिसली तिथे ताबडतोब निषेध नोंदवला. अर्थात हेदेखील प्रत्येक खेपेला घडेल याचीसुद्धा शाश्वती नाही आणि हे करण्यासाठी मी कोणाला बांधील देखील नाही. मी कोणाचे कोणते प्रतिसाद अथवा धागे वाचावेत हा माझा प्रश्न आहे. पण जे धागे/ प्रतिसाद वाचतो ते पूर्णपणे वाचतो. हवा तो भाग सोयीस्कररीत्या उचलून स्वतःच्या मनाला हवे तसे अर्थ काढत नाही. थोबाडात मारून घेणे, कंड शमविणे, शेळीचे शेपूट, पळपुटेपणा, माश्या उडविणे, धन्य होणे वगैरे वगैरे शब्दप्रयोग वाचले. त्यावर उत्तर देण्याची इच्छा नाही. झालेल्या प्रकाराबद्दल कोणी माफी मागायला हवी ते स्पष्टच आहे. झालेला प्रकार म्हणजे जातीवाचक शिवी देणे. ती मी दिलेली नाही. ज्यांनी दिली त्यांची माफी मागण्याची इच्छा नाही असे दिसते आहे. त्यामुले चालू द्या इतकेच म्हणेन. तुमचा प्रतिसाद आणि त्यातले शब्दप्रयोग ( थोबाड, कंड, चिखल, पळपुटेपणा इत्यादी इत्यादी ) वाचून तुम्हाला प्रचंड राग आला आहे, चिडचिड झाली आहे हे कळले. सोडलेल्या पुड्या फळाला आल्या. :) हे विकट हास्य आहे. हे मनापासून लिहित आहे - इथले सगळेजण मला मित्रच वाटतात त्यामुळे तुमच्यावर रोष नाहीच. वैचारिक मतभेद असतातच हे माहीत आहे. पुढच्या खेपेला मूळ मुद्दे सोडून चर्चा भरकटणार नाही अशी आशा आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

हुश्श्श्श्श् .... भले मिच तुम्हाला विनाकारण त्रास दिला माफ करा मला, भयंकर आहे सगळं अशी माणसं असतात ऐकून होतो, आज त्याची प्रचीती आली, आम्ही हे याची देही याची डोळा अनुभवले, :) . . . . . . . . . . . . . (अनुभवसिध्द)

तुम्ही एवढे मोठ्ठे प्रतिसाद टंकून वाचणार्याच्या हाती काहीच लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेता हे तुमच्याकडून शिकून घेतले पाहिजे का असे वाटायला लागले आहे. म्हणजे काहीतरी लिहून धागा वर काढून वर पुन्हा विचार करून लिहिल्यासारखे दिसते. बाकी मी ढ आहे का नाही ते प्रसिदातून दिसतंच आहे. आम्ही ढ असल्या कारणाने उगाच अवांतर सल्ले देऊन स्वतःचे महत्व वाढवू पाहणाऱ्या वातूळ विचारी व्यक्तींना, गोष्टींना महत्व देत नाहीत. आता तुम्ही अतीच करून ब्राह्मण आणि ब्राह्मण्यावर अगदीच हल्लाबोल करून मग अवांतर भाषणे लिहून (मुद्द्यांचे उत्तर न देता आल्याने ) मग पुन्हा वैयक्तिक गोष्टींवर घसरत असल्याने नाईलाज आहे. अर्थात जेव्हा मुद्दे सापडत नाहीत त्यावेळी माणूस वैयक्तिक गोष्टींवर उतरतो याचाच हा पुरावा आहे.

तुम्ही एवढे मोठ्ठे प्रतिसाद टंकून वाचणार्याच्या हाती काहीच लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेता हे तुमच्याकडून शिकून घेतले पाहिजे का असे वाटायला लागले आहे
आपल्या सारख्या 'महान विभुतींना' एका वाक्यात लिहीलेले समजत नाही म्हणून आम्हाला एवढे मोठ्ठे प्रतिसाद टंकावे लागतात, पण यानेही काही फरक पडेनासे झाले आहे, असे तुमच्या प्रतीसादावरुन दिसत आहे. हो पण शिकायचे असल्यास माझी ना नाही,
म्हणजे काहीतरी लिहून धागा वर काढून वर पुन्हा विचार करून लिहिल्यासारखे दिसते. बाकी मी ढ आहे का नाही ते प्रसिदातून दिसतंच आहे.
हॅ हॅ हॅ... असे बिनबुडाचे आरोप करण्यात तुम्ही महारथ हासिल केले आहे, म्हणजे त्यात प्राविण्य मिळविले आहे, मला तुमची कमालच वाटते. काहीही अंधाधुंद बडबडता? हे एका प्रतिसादातले माझे वाक्य आहे, यात मी स्पष्ट केले आहे की माझ्या दृष्टिने या धाग्यावरची चर्चा संपली आहे, भाग-१ ची चर्चा संपत आली आहे भाग-२ ची तयारी करावी म्हणतो.... हे सापडणार नसेल तर ही लिंक घ्या अन प्रत्यक्ष खात्री करुन घ्या http://www.misalpav.com/node/18004 तुम्ही स्वतःच या धाग्यावर प्रतिसाद देऊन चर्चेला सुरुवात केलित, हा प्रतिसाद तुमचाच ना? तुमचे लेख म्हणजे परस्परविरोधी विधानांनी भरलेले आहे. तसेच प्रतिसादही. का तो ही मिच दिलाय तुमच्या आयडीने धागा वर काढायला ? :) तरी तुम्ही म्हणता मि स्वतः काहीतरी लिहून धागा वर काढतोय? वेड्यांबरोबर राहीले की,कालांतराने आपल्यालाही आपण वेडे आहोत की काय असे वाटू लागते, तसे मलाही आता मी 'ढ 'असल्यासारखे वाटू लागले आहे :) किव येते तुमच्या वागण्याची, अन सपाटून मार खाल्ला तरी तसे काही घडलेच नाही, हे दाखविण्याच्या केविलवाण्या धडपडीची, :)
आम्ही ढ असल्या कारणाने उगाच अवांतर सल्ले देऊन स्वतःचे महत्व वाढवू पाहणाऱ्या वातूळ विचारी व्यक्तींना, गोष्टींना महत्व देत नाहीत
तुमचे बिनबुडाचे तथ्यहीन आरोप पुराव्या सहीत यथेच्छ खोडले गेले आहेत त्यास तुम्ही महत्व देणार नाहित,या गोष्टि मला सरावाने चांगल्याच माहीत आहेत, :)
आता तुम्ही अतीच करून ब्राह्मण आणि ब्राह्मण्यावर अगदीच हल्लाबोल करून मग अवांतर भाषणे लिहून (मुद्द्यांचे उत्तर न देता आल्याने ) मग पुन्हा वैयक्तिक गोष्टींवर घसरत असल्याने नाईलाज आहे
मि काय अती केलेय ते कळेल काय? मुद्दे खोडून काढणे हा तुमच्या लेखी हल्लाबोल असेल तर, तशी ती तुमची समज आहे त्यास मि काहि करु शकत नाही. तुमच्या अशा कोणत्या मुद्द्यांचे उत्तर मिळाले नाही म्हणता? तुमचे लेख म्हणजे परस्परविरोधी विधानांनी भरलेले आहे या तुमच्या आरोपाचा पुरावा द्या.नुसतेच बेछुट आरोप करु नका. हे खाली तुमचेच वाक्य जे वर प्रतिसादात तुम्ही म्हणले आहे, तुमच्या अगोदरच्या पण प्रतिसादात तसेच आहे पण विस्तार भयास्तव एकच देतो, याचाच अर्थ तुम्ही आधी असा शब्दप्रयोग करत होता असाच होतो. नाही का? (कदाचित नाहीच म्हणाल एक मोठ्ठे अवांतर भाषण लिहून.) उद्या आम्ही हा महारड्यांचा, चाम्भार्ड्यांचा कंपू वगैरे म्हंटले तर कितपत चालेल (संपादक मंडळाला सुद्धा ) हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे. कदाचित तुमची जात मी उल्लेखलेली नसेलही पण मग जी काय असेल तिचा अशा रीतीने उल्लेख केला तर बघू द्या कि तुम्हाला किती पानी टंकायची गरज पडते ते. यात जे अधोरेखित केले आहे ते सार्वजनिक स्वरुपातले होते? :) ते मी माझ्या 'ढ' पणामुळे मि वैयक्तिक घेतले म्हणून तुम्ही म्हणता तसे या बोलण्याला नक्किच खुप अर्थ आहे :) अर्थात जेव्हा मुद्दे सापडत नाहीत त्यावेळी माणूस वैयक्तिक गोष्टींवर उतरतो याचाच हा पुरावा आहे. :) जाता जाता : जे लोक स्वतः वैयक्तिकरित्या चर्चा करत असतात ते खोटे ठरले, सणकून आपटले, हसे झाले की ओशाळून मुद्दे खोडणारर्‍यालाच उलटपणे, तुम्ही आता वैयक्तिक पातळिवर घसरलात असे म्हणून चर्चा थांबवण्याचा, स्वतःला त्यातून वाचवण्याचा पुरेपुर केविलवाणा प्रयत्न करतात, हा आरोप तसा फार लोकप्रिय आहे, :) बाकि चालू द्या... :)

In reply to by अजातशत्रु

किव येते तुमच्या वागण्याची, अन सपाटून मार खाल्ला तरी तसे काही घडलेच नाही, हे दाखविण्याच्या केविलवाण्या धडपडीची, अहो हेच तर मीच काय पण इतर खूप जणांनी त्यांच्या प्रतिसादातून सांगितलंय. आता तुम्हाला काहीच सुचेना झालंय त्यामुळे मला प्रत्येक वाक्यात "ढ" म्हणून घेताय. ठीक आहे. आम्ही तुमच्यासारखे हुश्शार अन प्रगल्भ नाहीच आहोत. यात जे अधोरेखित केले आहे ते सार्वजनिक स्वरुपातले होते? अज्जिबात नाही. हे फक्त आणि फक्त तुम्हाला उद्देशूनच होते/ आहे अन तेसुद्धा तुम्ही स्वतःच मी " असा" शब्दप्रयोग थांबायला असे स्पष्ट लिहिले होते म्हणूनच. आता तुमच्यासारख्या विद्वानाला हे समजू नये याचे आश्चर्यच वाटते. बाकी इतर सगळे सणकून आपटले आणि तुम्हीच फक्त एकटे तेवढे खणखणीत नाणे आहात हे वाचून प्रचंड आनंद झाला. शंभर जणांनी " हे येडच आहे " असं म्हंटल्यावर त्या येड्याला सुद्धा बाकी सगळे येडे आहेत असं वाटू शकतं. आमची काहीच हरकत नाही. बाकी आधी म्हणायचं कि प्रतिसाद न देता पळून गेले, आपटले अन प्रतिसाद दिला कि वादाची साल पिंपळाला लाऊन हे असे उत्तर लिहायचे. असो. असते ज्याची त्याची विचारशक्ती. आता तुम्ही असे प्रगल्भ अन प्रचंड विचारी आहात म्हंटल्यावर काय अधिक बोलणे.

In reply to by शिल्पा ब

अज्जिबात नाही. हे फक्त आणि फक्त तुम्हाला उद्देशूनच होते/ आहे अन तेसुद्धा तुम्ही स्वतःच मी " असा" शब्दप्रयोग थांबायला असे स्पष्ट लिहिले होते म्हणूनच.
असेच होते तर मग हे काय आहे ??????? अवांतर भाषणे लिहून (मुद्द्यांचे उत्तर न देता आल्याने ) मग पुन्हा वैयक्तिक गोष्टींवर घसरत असल्याने नाईलाज आहे. अर्थात जेव्हा मुद्दे सापडत नाहीत त्यावेळी माणूस वैयक्तिक गोष्टींवर उतरतो याचाच हा पुरावा आहे. :)
शंभर जणांनी " हे येडच आहे " असं म्हंटल्यावर त्या येड्याला सुद्धा बाकी सगळे येडे आहेत असं वाटू शकतं. आमची काहीच हरकत नाही.
कंपुबाज काहीही तर्क लावू शकतात नो लिमीट्स :) मी काल वर जो मोठ्ठा प्रतिसाद दिला आहे त्यात 'ढ' लोकांचा हाती काहीच लागणार नाही याची पुरेपुर काळजी घेतलि आहे :) त्यामुळे आता त्यात हाती काही लागलेच नाही डोक्यावरुन गेले असा कांगावा अशा लोकांनी करु नये, बाकि चालू द्या.

अ़़ख्खी दोन पाने व मुळ लेख वाचून देखील काहिच उमजेनासे झालेय. एनीवे धाग्याची मंडई झालीच आहे तर पुण्यात सध्या मटारचा भाव काय चाललाय? तेवढी माहिती हवी होती. अन मासळीचा भाव सांगितलात तर उत्तमच. आज रातच्याला मस्त पैकि मटार उसळ व बांगड्याचे कालवण करायचा विचार आहे. ;) (आत्मपरिक्षित ब्राह्मण) अभिज्ञ.

संपूर्ण लेख आणि प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचले. शिर्षकावरुन बामनांना मुद्दाम डिवचण्यासाठी काहीतरी प्रक्षोभक्/ब्रिगेडीछाप लिखान असावे असा कयास बांधला होता. कि जो साफ चुकीचा निघाला. अत्यंत संयमित अभ्यासु लेख नि प्रतिसादांमुळे आपण अजातशत्रु यांचा फॅन झालो आहे हे ह्या ठिकाणी नमूद करु इच्छितो. :) तसेच काही अविचारी बामनांच्या विनोदी विचारांमुळे लेखणामुळे मात्र भयंकर करमणूक झाली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानने आम्ही कर्तव्य समजतो. @ अजातशत्रु ... आपल्यासारखे साहित्यिक, लेखक, इतिहास संशोधक निर्माण होने हि काळाजी गरज आहे. आणि नियती ते घडवून आणत आहे. आढ्यताखोरांना काळच एक दिवस सणसणीत चपराक देणार आहे किंबहुना ती प्रक्रिया सुरु झाली आहे. हे बामनांनी या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. तुर्तास येवढेच.....

उत्तरतो हं वेळ काढून :)

काय राव १३८ प्रतिक्रिया बघुन मराठी माणुस आपली एनर्जि कशि वाया घालवतो याचा प्रत्यय आला. नि मग अमराठिं च्या नावाने कन्ठ्शोश करत बस्तो.. १८५७ च्या पुढे कधि याल ते भाग २ मधे कळ्वा. अ ज य

In reply to by ajay wankhede

मराठी माणूस किमान मुद्यांवर एकत्र येतो कुठे? आणि हे १८५७ पासून चालू आहे. इतिहास फक्त आपले हित संबंध जपण्यासाठिच वाचला जातो, (आपल्या ज्ञातीतला कोण? त्याने किती झेंडे रोवले हेच बघायचे) मग त्यातून प्रांतवाद ओघाने आलाच, अमराठीच्या नावाने कंठशोष आम्ही कशाला करणार, तो तर राजकारण्यांचा आवडता भावनिक मुद्दा आहे.

त्या ही पेक्षा बरीच जेष्ठ मंडळी प्रतिसादा वर प्रतिसाद का देत आहेत हेच कळत नाही. काही गोष्टी वाचायच्या आणि विसरून जायच्या असतात. BTW संपादक मंडळ काय करत आहे?

आपल्या प्रथम भागा वर साधक -बाधक चर्चा झली आहे . पुढील भागा च्या प्रतीक्शेत !!

In reply to by शाहिर

यावा अशी आपली अपेक्शा आहे काय?
आपल्या प्रथम भागा वर साधक -बाधक चर्चा झली आहे
या भागा वर काय साधले अन् काय बाधले ते कळेल काय? . . . . . . . असो, तेव्हढा वेल मिलाळा की टंकेन दुसरा भाग